Home Blog Page 234

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट:- समाजाला कीर्तन- अभंगाच्या माध्यमातून शिकवनी देणारे व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 398 ‌‌‌वी जयंती दि. 8 जानेवारी 2022 रोज गुरुवाराला स्थानिक नवयुवक शिवाजी दुर्गा मंदिर , तेलीपुरा चौक हिंगणघाट येथे उत्साहात साजरीत करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री बालाजी गहलोद व येरंडेल तेली समाज विदर्भ महिला उपाध्यक्ष हेमा ताई दुरबुडे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गजेंद्र नागोसे हे उपस्थित होते.

सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते मंदिर समितीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .

त्यानंतर प्रमुख पाहुणे हेमा ताई दुरबुडे यांनी संताजीच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी संकलन करून लिहिलेला तुकाराम महाराजांचे साहित्य व गाथे विषयी माहिती दिली अध्यक्ष भाषणातून श्री गजेंद्र नागोसे यांनी श्री जगनाडे महाराज हे समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे म्हटले त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन उपस्थित नवयुवक व समाज बांधवाना केले.

कार्यक्रमाचे संचालन तथा आभार श्री राजेश मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजना करिता संजय कावळे,गजु वरघने,अतुल वैरागडे, राजेश खानकुरे,विक्कि सहारे,विक्की नागोसे,गौरव सहारे,गौरव मुळे,नरेश कुंभारे, कैलाश सहारे,पवन गाले,शुभम साठोने,कपिल भजभुजे, रविंद्र सहारे,नागेश कैकाडे,धनराज कोलते,सचिन सहारे,ऋषभ खानकुरे, गणेश सहारे, यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाला मंदिर समितीचे सदस्य तसेच परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शासनाच्या योजना भाजप पक्षाच्या आहे का ? . शिवसेना आक्रमक

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

दि. 8 डिसेंबर
हिंगणघाट :- शिवसेना च्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून तक्रार करण्यात आली , शहरात पाच ते सहा महिण्यापुर्वी पासून कुठल्याही शासकीय योजना ज्या गरजू व गोरगरीबांकरीता अंमलात आणल्या जातात,

जसे दिवाळीपूर्वी कामगार कल्याण, वर्धा या विभागाद्वारे गवंडी कामगार तथा इमारत बांधकाम मजूर यांना साहित्य व पेटी वाटप कार्यक्रम निखाडे सभागृह येथे घेण्यात आला.

तसेच शहरातील रेशन दुकानातून दिवाळी साजरी करण्याकरीता आनंदाचा शिक्षा ही किट 100/- कमी दरामध्ये वाटप करण्यात आली व आता काही दिवसापुर्वी शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट येथे महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) द्वारे आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतिने शिक्षणाकरीता टॅब देण्यात आले आहे.

अशा शासनाच्या योजना आहे. त्या सर्व योजनेचे लाभार्थ्यांना साहित्य वाटप झाले त्यावेळी शिवसेना पक्षाच्या असे निदर्शनास आले की सदर योजना हया शासनाच्या नसुन एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या (भाजपा) आहे. कारण जेव्हा कामगार कल्याण कार्यालय, वर्धा यांनी निखाडे सभागृह मध्ये कार्यक्रम आयोजीत
केला त्या ठिकाणी लोक प्रतिनीधी म्हणून आमदार प्रमुख पाहूणे असणे गैर नाही.

परंतू त्या ठिकाणी बॅनर व
पक्षाचे झेन्डे व पक्षाचे इतर पुर्ण प्रतिनीधी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडतो. परंतू सदर कार्यक्रमात
शासकीय अधिकारी व कर्मचारी कुठेही दिसुन येत नाही. तसेच शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट महाज्योतीच्या
वतिन विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण केले तेव्हाही पक्षाचे बॅनर व झेन्डे लावण्यात आले होते. व त्याचे पक्षाचे सर्व प्रमुख
पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावरून असे निदर्शनास येते की, सदर कार्यक्रम हा शासकीय नसुन एका
विशिष्ट राजकीय पक्ष भा.ज.पा. चा आहे असे लक्षात येते.
तरी सदर शासनाचा निधी असला तरी तो निधी सर्वसामान्य जनतेचा आहे. हया ठिकाणी भा.ज.पा. आपली राजकीय पोळी शेकत आहे. त्यांच्या या सर्व कृतीमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

व हा प्रयोग कुठेतरी थांबला पाहिजे अन्यथा शिवसेनेद्वारा उग्र आंदोलन करण्यात येईल. यापुढे सदर कार्यक्रम पुनःश्च झाला तर याला आपली मुकसंमती समजण्यात येईल, व सदर कार्यक्रम उधळून लावण्यात येईल.

त्याची जबाबदारी आपली स्वतःची राहील. शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांच्या नेतृत्वात तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे,नगरसेवक मनीष देवडे,त बंटी वाघमारे इत्यादी शिवसैनिकासह निवेदन देण्यात आले व योग्य तो न्याय मिळावा

नीम हकीमांनो,गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय कमी होणार आहे? – फुलसिंग जाधव,औरंगाबाद

0

 

 

प्रतिनिधी:(जालना)-जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी जानेवारी २०२३ मध्ये पार पडणाऱ्या हिंदू गोर बंजारा व लभाना नायकडा समाजाच्या ऐतिहासिक कुंभची जोरदार तयारी चालू आहे.केवळ देशातीलच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या गोर बंजारा बांधवांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

हजारो कार्यकर्ते विविध प्रकारे स्वतःहुन या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करीत आहेत.कार्यक्रमाला समाजातून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहून अनेकांच्या पोटात पोटसुळ उठलेले आहे.लभाना समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता गोर बंजारा समाजातील सर्व अंतर्गत जातींना एकत्र जोडून समाजाला एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न स्वतःला विद्वान समजणाऱ्या लोकांना सहन न होणे अनाकलनीय आहे.दुःख एक लभाना कार्यकर्ता नेतृत्व करतो म्हणून आहे की,समाज एकत्र येतो आहे याचे आहे ?

आपल्या समाजातील नीम हकीम पुरोगामी डुकरांचा समाजात होणाऱ्या अशा विविध धार्मिक कार्याला नेहमीच विरोध राहत आलेला आहे.विशेष म्हणजे त्यांच्या अपप्रचाराला समाज कधीही बळी पडलेला नाही.

कारण समाजाला माहित आहे की,डुकरांचा स्वभावच असतो की, कुठेही घाण करणे.आजवर या डुकरांनी समाजात घाण करण्यापलिकडे काय केले आहे ?

संत श्री रामरावजी बापू यांच्या लक्षचंडी यज्ञाला याच डुकारांनी जातीबाहेरील लोकांना सोबत घेऊन संत श्री.रामरावजी बापूजींची आणि पोहरादेवीची नको ती बदनामी केली होती.

तरीही लक्षचंडी यज्ञ व्यवस्थित पार पडले.भक्तिधामला विरोध करणारेही हेच बेंदाड निवासी होते. इतर समाजामध्ये आपल्या समाजाची अप्रतिष्ठा करणे हा एकमेव कार्यक्रम हे नासके कांदे सतत राबवित असतात. जे की समाजासाठी खुप घातक आहे.

ही डुकरं समाजातील साधुसंताना तांड्याची औलाद नाही म्हणतात, ऐतखाऊ म्हणतात. पण हे ज्यांच्या पायावर डोके टेकतात ते भंते कुठे नांगरणी करुन पोट भरतात हे मात्र सांगत नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांना दुषित करुन जाती धर्मात तेढ निर्माण करणे आणि स्वतःला फार मोठे विद्वान असल्याचे साबित करण्यापलिकडे या बेंदाड निवास्यांचे दुसरा कोणताही उद्देश राहिलेला नाही. यांचा आजवरचा इतिहास तपासून पहा. समाज नासवणे यापलिकडे दुसरे कांहीही दिसणार नाही.समाजात कांही चुकीचे घडत असेल तर एकत्र बसून चर्चेतून मार्ग निघू शकतो.पण हे नीम हकीम पुरोगामी कधीच चर्चा करण्याची भाषा करीत नाहीत

लक्षचंडीच्यावेळी आणि आता गोद्री कुंभच्यावेळी आयोजकांशी आपण चर्चा करु असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेऊन सुद्धा त्यांनी चर्चेची तयारी दाखविली नाही.यावरुन त्यांची नियत किती दुषित आहे हे स्पष्ट होते.आता तर वेळ निघुन गेलेली आहे.आता कोणीही कितीही भुंकले तरीही त्यांना भीक घातली जाणार नाही.

या नीम हकीम पुरोगामीचे पाहुन काँग्रेसचे नालीतील कांही जीवजंतूसुद्धा बाहेर येऊन वळवळू लागलेले आहेत. कधी नव्हे एवढ्या प्रचंड संख्येने एकत्र येणाऱ्या समाजाला वेगवेगळी घाणेरडी कारणं पुढे करुन एकत्र न येऊ देण्याचा त्यांचा हा समाजद्रोही उद्देश स्पष्ट दिसतो आहे.या सर्व गांडुळानी एक लक्षात घ्यावे की, तुम्हाला विचारुन समाज जेवत नाही किंवा झोपत नाही.

याचेही त्यांनी भान ठेवावे.या गांडुळाना खुले आव्हान आहे की,तुमच्यात दम असेल तर जास्त नाही देशातील हजार दोन हजार लोकांना गोळा करुन तर दाखवा !

आरएसएसच्या मदतीने समाजाचे चार दोन प्रश्न सुटले तर तुमच्यावर आभाळ कोसळणार आहे काय ? आणि किती दिवस हे नको , ते नको करीत बसायचे. समाजाच्या भल्यासाठी कुठे ना कुठे तडजोड करण्यात चुक काय आहे ?

नेहमीच ताठर आणि टोकाची भूमिका घेत राहिल्याने समाजाचे प्रश्न कसे सुटतील ? याचा विचार नको का करायला,नीम हकीम पुरोगामी आणि काँग्रेसचे जीवजंतूची खरी पोटदुखी दुसरी तीसरी कांहीही नसून एक सामान्य आमचा लभाना बांधव देशभरातील सर्व गोर बंजारा समाजाला एकत्र करतो आहे.

हेच त्यांना सहन होत नाही.समाजाचे कांही प्रश्न या कुंभद्वारे सुटले तर उद्या त्यांना समाज विचारणार नाही याची भिती त्यांना सतावते आहे. म्हणून पोहरादेवी आडून ते त्यांच्या दुखऱ्या भागावर मलमपट्टी करुन घेण्याचा त्यांचा हा सर्व खटाटोप चाललेला आहे. यांना समाजाची , पोहरादेवीची एवढी काळजी असती तर धर्मांतरसंदर्भात यांची दातखिळी बसली नसती !

तोंड बंद करुन बसण्यासाठी त्यांना कोणाकडून पैसे मिळतात ? जर मिळत नसतील तर ते धर्मांतर प्रकारणाबाबत तोंड का उघडत नाहीत?संत श्री रामरावजी बापू यांचे उत्तराधिकारी श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या ऐतिहासिक गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय कमी होणार आहे ? संत रामराव बापूजींच्या निधनानंतर त्यांच्या गादीवर श्री बाबुसिंग महाराज यांची निवड सर्वसंमतीने झालेली आहे.

गोद्री येथे होणारे ऐतिहासिक कुंभ हे संत श्री रामरावजी बापू यांचे उत्तराधिकारी पीठाधीश्वर श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.त्यामुळे हा पोहरादेवीचा आणि सर्व महाराज मंडळीचा सन्मान नाही का ? पोहरादेवीचा सन्मान संपूर्ण समाजाचा सन्मान होत नाही का ? पीठाधीश्वर श्री बाबुसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे गोद्री कुंभमुळे पोहरादेवीचे पावित्र्य आणि महत्व कसे काय नष्ट होणार आहे ?

हा प्रश्न समाज नासवणाऱ्या प्रवृतीला समाजाने विचारला पाहिजे.समाजाला बदनाम करणाऱ्या या मनोरुग्णानी देश विदेशातून भाडोत्री आणून गोद्री कुंभची बदनामी जरी केली तरीही हा देशभर विखुरलेला समाज एकत्र येऊन आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन आणि आनंद सोहळा जबरदस्त उत्साहात पार पाडणार आहे, यात कोणतीही शंका नाही. समाज सुज्ञ आहे .

दुष्प्रचार करणाऱ्या विकृत प्रवृतीला तो कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही हे तेवढेच सत्य आहे.पोहरादेवीचे कांही महाराज या कुंभ आयोजनाच्या प्रचार प्रक्रियेत दिसत नसतील तर त्याचे कारण आयोजक नसून त्यांच्या अंतर्गत असलेला पराकोटीचा वाद आहे. याप्रसंगी येथे त्याची चर्चा करणे उचित नाही.

गोद्री कुंभ कुठल्याही धार्मिक स्थळाचे महत्व कमी करणारे किंवा पावित्र्य नष्ट करणारे अथवा प्रती काशी उभारण्यासाठी नसून समाजाच्या सांस्कृतिक वारशाची जगाला ओळख करुन देण्यासाठी आणि बळजबरीने आणि लालुच दाखवून होणाऱ्या धर्मांतराबाबत समाजाला जागृत करण्यासाठी आहे.म्हणून समाजाने गोद्री कुंभ विरोधात भुंकणाऱ्यांकडे लक्ष न देता प्रचंड संख्येने एकत्र येऊन आपली ताकद दाखवणारच आहे.

हे तेवढेच सत्य आहे.आध्यत्म आणि व्यवहार यांची नेहमीच सांगड घालता येत नाही.म्हणून प्रसंगानुसार ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत लिहावे,बोलावे लागते.म्हणून याठिकाणी कांही अभद्र शब्द प्रयोग झालेले आहेत.त्याबद्दल क्षमस्व.

शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा पूर्णतः मोबदला न मिळाल्यामुळे पिकविमा मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेतले भरून…

0

शेगाव तालुका प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव – शेतीचे नुकसान झाल्यानंतरसुध्दा ज्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून पूर्णतः मोबदला मिळाला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लढा उभारण्यात आला आहे.

अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांना पिक विम्याचा पूर्ण मोबदला मियाळला पाहिजे यासाठी शर्यतीचे प्रयत्न पक्ष करील त्याकरिता अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांनी पिक विम्याच्या हप्त्याचा भरणा पावतीची झेरॉक्स या ठिकाणी आपल्या कागदोपत्री सोबत माहिती भरून जमा करावी असे आवाहन.

काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. सदर नोंदनी ही छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे राबवण्यात आली.

आपल्या शेतीचे नुकसान झालेले आहे त्याची दक्षता घेऊन शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. शेतकरी बांधवांना पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही. असा इशारा पक्षाच्यावतीने देण्यात आला. प्रचंड बहुमताने लढा काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा करण्यात आलेला आहे.

शेतकरी बांधवांनी या ठिकाणी येऊन आपला अर्ज भरवयाचा आहे.असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विमा पूर्णता मोबदला न मिळाल्याने पिक विमा मिळवून देण्यासाठी शेगाव शहर व तालुका कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिक विमा अर्ज भरणा नोंदणी करण्यात आली.

यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतिने, प्रांताध्यक्ष मा.आ नानाभाउ पटोले यांच्या सुचनेनुसार तसेच बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात, शेगाव शहर व तालुका काँग्रेस तसेच किसान काँग्रेस च्या वतिने आज पीक विमा संदर्भात शेगाव येथे स्टाॅल लावून ज्या शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.

त्यांची माहिती अर्जाच्या माध्यमातून संकलित करताना प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, शहराध्यक्ष किरण देशमुख, जिल्हा सरचिटणीस दिपक सलामपुरीया, किसान सेल शहराध्यक्ष प्रकाश शेगोकार, सेवादल तालुकाध्यक्ष अनिल सावळे, बसंत शर्मा, ज्ञानेश्वर शेजोळे, पवन पचेरवाल, दिलीप पटोकार आदी उपस्थित असून सदर स्टाॅल ला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी तर दुसरीकडे तळीरामाची दिवाळी

0

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

शेगाव तालुक्यामध्ये दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणाऱ्या 18 डिसेंबरला जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये काल झालेल्या अर्ज छाननी मध्ये मिळालेल्या माहितीनुसार सरपंच पदासाठी तालुक्यातून 47 अर्ज मंजूर झाले आहेत तर सदस्य पदासाठी 128 अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु आज सात डिसेंबरला काही उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात.

परंतु यामध्ये कोण कोणते उमेदवार बाजी मारतील हे अठरा तारीख लाच समजेल.

निवडून कोणीही येईल परंतु ओल्या पार्ट्याचा उत नक्कीच येईल. आणि त्यामुळेच तळीरामाची दिवाळी नक्की साजरी होईल या चर्चेला उदान आले आहे.

सुरेश गायकवाड मित्रपरिवार तर्फे ज्ञानरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 6 डिसेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संध्या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश गायकवाड मित्र परिवार व सौजन्य आदर्श महिला नागरी पतसंस्था हिंगणघाट कडून करण्यात आले

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका मा. बबिताताई वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
” नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा” या स्वर संगीतातून अभिवादनाला सुरुवात झाली आपल्या मधुर स्वरातून व प्रबोधनातून संपूर्ण जनतेच्या उपस्थितीमध्ये अभिवादन संध्या च्या माध्यमातुन शब्दसुमनाने आदरांजली वाहली सादर करते साई स्वरयज्ञ संगीत कला वृंद हिंगणघाट, व सोबत मी होणार सुपरस्टार स्टार प्रवाह.

फेम गायक मा.राहुल मोरे, व साई स्वरयज्ञ संगीत कला वृंद, हिंगणघाट .
संचालन :- महेश मुडे
गायक महेश चौधरी,
योगिनी वांधरे,तबला – ढोलक वादक:- अभय जी झाडे अक्टो पॅड वादक:- अतुल तांदूलकर
कीबोर्ड वादक:- आदित्य खंदारे
साउंड सिस्टीम:- जितू भगत यांनी केले.

या अभिवादन संध्येला यशस्वीरित्या नियोजन सुरेश गायकवाड ,शुभम कोंडागुरले, रसपालजी शेंद्रे, अमित सोगे, निकु रामटेके, वीरेंद्र दुर्गे,अविनाश झाडे,अरुण कांबळे, निखिल उंमरे, मनीश सुनानी, रजत मून, ईशान खंदार, सौरभ पाझारे, प्रवीण जनबंधू, मित्रपरिवार यांनी केले

महसुली बाबांची अवैध रेतीमा बेधडक वाहन जप्त. अंदाजे वीस लाखाचा मुद्देमाल जप्त

0

 

  • प्रतिनिधी अशोक भाकरे

बाळापुर महसूल विभागांची अवैधर येथे उपवासा करून जाणारा वाहनावर या आठवड्यात एक के बाद एक कारवाई करण्यात येत असून दिनांक 6 डिसेंबर रोजी बेधडक कारवाई बाळापुर परिसरात करण्यात आली बाळापुर महसूल विभागांचे तहसीलदार सय्यद अहिंसा मोदी यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली.

की कागद येथून काही वाहन अवैध रेती उपसा करून वाहन मध्ये नेत असतात त्या माहितीनुसार ही तहसीलदार आपला वाफला घेऊन कागद येथे गेले असते तिथून काही वाहन फरार झाले तर एक वाणचा पाठ लाख करून गायगाव जवळ वाहन क्रमांक एम एस 28 बीपी 99 91 या वाहनाला पकडून कूच तास केली असता.

त्यांच्याजवळ बुलढाणा येथून तर रेती उपसा अंगात लोहारा या परिसरातून होत आहे त्यामुळे हे अवैध्य रितीचा वाहन जप्त करण्यात आला आहे कारवाई करून सदर हा वाहन महसूल विभागाने यांच्या ताब्यात सहज जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आले.

आहे ही कारवाई बाळापुर महसूल विभागांची तहसीलदार सय्यदिन यांच्या मार्गदर्शनाखाली विजय तेलगोटे मंडळ अधिकारी दीपक सोळंके मंडळ अधिकारी बोले मंडळ अधिकारी संतोष और निंबाळकर मंडळ अधिकारी गजानन भागवत यांनी केली हा या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफिया मध्यवर्तीचे वातावरण पसरले आहे

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत वीरा वॉरियर्स ग्रुप ला भरभरून यश

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

वर्धा :- जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन जिल्हा वर्धा यांच्या सयुक्त विद्यमाने 5,6 डिसेंबरला शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

त्या मध्ये जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या त्या मध्ये विरा वॉरियर्स ग्रुप हिंगणघाट ने घवघवीत यश प्राप्त केले त्या मधे 14 वर्षा खालील मुले या वयोगटात मानव मुकेश वानखेडे, आरुष विलास मनहोरे तर 14 वर्षा खालील मुली या वयोगटात प्राची राजेश मसराम, स्वरांगी गणेश घाटूर्ले तर 17 वर्षा खालील मुले या वयोगटात प्रज्वल महादेव देवतळे, साहील चंद्रशेखर तेलहांडे, 17 वर्षा खालील मुली या वयोगटा मधे विशाखा रामदास कंडे, श्रुती रविपाल खैरे, अदिती सुभाष गायकवाड आणि 19 वर्षा खालील मुले या वयोगटात संकेत मिलिंद नगराळे ,19 वर्षा खालील मुली या वयोगटात तेजल प्रमोद भोयर, छकुली रामकृष्ण पिसे, अनुष्का गणेश बलखंडे यांनी विजय प्राप्त केला. सर्वांनी प्रथम क्रमांक मिळऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे व यांची विभागीय स्तरावर निवड झाली.

व सर्व खेळाडू होणाऱ्या विभागीय तायक्वांडो स्पर्धेत वर्धा जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे। मुख्य पंच म्हणून मा. श्री श्याम खेमसकर सर( जिल्हा सचिव -तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन वर्धा) यांनी कार्यभार सभाळला.

मोलाचे मार्गदर्शन मुख्य प्रशिक्षक- रोहित राऊत सर यानी केले, प्रशिक्षक, गौरव खिराळे, भूषण वाठोरे, चेतन दहिवलकर, विशाल मडावी, हर्ष मून, कशिश खैरे, वैष्णवी पिसे, लक्ष्मी धनफोले, सदस्य. रोहित खैरकर, यश झाडे, मयूर नगराळे व गौरी पेटकर, यांनी अभिनंदन केले.

तसेच खेळाडूंनी यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन

0

 

शेगाव प्रतिनिधी  इस्माईल शेख 

वंचित बहुजन आघाडी तालुका शेगावच्या वतीने भारतरत्न विश्वभूषण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव तालुक्याच्या वतीने विश्रामगृह शेगाव येथे महा अभिवादन सभा घेण्यात आली.

यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य मधुकर बाबुळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण आणि महापरिनिर्वाण या विषयावर त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यामध्ये तिंत्रव येथील सरपंच माननीय विनायकरावजीं हिंगणे, मोहनराव विश्वासराव कराळे तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ निळे ,गजानन सोळंके ग्राम शाखा अध्यक्ष महागाव ,शिवाजी गुरव तालुका महासचिव, यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शब्दरूपी अभिवादन केले.

तर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण पहुरकर, शंकरराव पहुरकर जिल्हा उपाध्यक्ष, यांचे सुद्धा अभिवादन सभेवर शब्द रुपी अभिवादन केले तर कैलास भाऊ दाभाडे ,आशिष भाऊ शेगोकार ,गौतम इंगळे यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन केले.

संदेश कुमार शेगोकार व जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांनी अभिवादन सभेला मार्गदर्शन केले, अभिवादन सभेला प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, सुनीता ताई इखारे तालुका अध्यक्ष महिला आघाडी, शहराध्यक्ष संगीता ससाने, जिल्हा सदस्य वनमाला ताई इखारे, आशाताई सावदेकर, तालुका प्रसिद्ध प्रमुख पंडितराव पर्घरमोर,शेख नसीर शेख गफ्फर ,अर्जुन शेगोकार, धम्मपाल बाबुळकर, युवा नेतृत्व संजय भाऊ वाकोडे, संतोष राव हिवराळे तालुका उपाध्यक्ष, राहुल अनिल मोरे, चित्रपट सेनेचे निखिल पहुरकर, उदयनराजे सुरवाडे, युवा नेते क्षितिज कुमार निर्वाण ,युवा शहर सल्लागार अशोक भाऊ तायडे ,संतोष भाऊ तायडे, प्राची धम्मपाल बाबुळकर या मुलीने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

आकाश दादा चोपडे ग्राम शाखा अध्यक्ष चिंचखेड, सागर शिरसाठ ग्रामशाखाध्यक्ष गव्हाण, येउलखेडचे सरपंच प्रकाश गवई, भास्करराव शिरसाट ,कपिल भाऊ शिरसाठ, तर भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सरचिटणीस आदरणीय बोधिसत्व गवई तसेच राजकिरण सावदेकर यांच्यासह कार्यकर्ते हजर होते तर अभिवादन सभेचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहर युवा नेते माननीय दीपक भाऊ इंगळे यांनी केले.

संदीप शामगिर याचे यश

0

(तुकाराम राठोड)

जालना-तालुक्यातील मौजपुरी येथील लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी संदिप नारायण शामगिर याने शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ५१ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असुन,त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

या यशा बद्दल त्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.रमणताई बनकर,मुख्याध्यापक जयराम डुचे,अमोल बनकर,सरपंच भागवत राऊत,उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे,ग्रा.प.सदस्य बंद्रीभाऊ भसांडे,सतिश ढोकळे,नारायण गायकवाड,बंडुभाऊ काळे,संतोष मोरे,राम जाधव,विष्णूपंत डोंगरे,माजी सरपंच निवृत्ती गायकवाड,दिपक डोंगरे,राजु महाडिक,सोनाभाऊ खडेकर,बालाजी बळप,बबन शामगिर,पै.अनिल काळे,पै.अर्जुन काळे,रामदास गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.