Home Blog Page 234

नगर परिषद हिंगनघाट द्वारा राबविण्यात येत आहे शाळाबाह्य विद्यार्थी मुहिम

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिला परिषद वर्धा , यांचे पत्र क्रमांक शिक्षण/सशिअ/307/202. दिनांक: 14 /11/2022 अनव्ये नगर परिषद, हिंगनघाट Hingnghat द्वारे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलाना शालेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी नगर परिषदे तर्फे कलोडे भवन जवल ,वडर वस्ती कारखाने व बांधकामाचे क्षेत्र ,स्टेशन फैल ,वस्ती कारखाने व बांधकाम क्षेत्र, वीट-भट्टी क्षेत्र ,बस स्टॉप जवडील क्षेत्र , कारखाने व बांधकामाचे क्षेत्र व नंदोरी रोड व नागपुर Nagpur रोड वरील कारखाने व बांधकाम क्षेत्र ,विट-भट्टी क्षेत्रामध्ये जावुन ,दिनांक 20 नोव्हेबर 2022 ते दिनांक. 5 दिसेंबर 2022 या कालावधी मध्ये सर्वेक्षण करण्या साठी श्री हर्षल गायकवाड मुख्य अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांची आदेशानुसार श्री प्रवीण काळे प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद हिंगनघाट

यांचा नियंत्रणामध्ये श्री निलेश शिंदे प्रशासकीय अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांच्या देखरेखे खाली, शहर मध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असुन नगर परिषदेतर्फ या कामासाठी मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक नगर परिषद प्राथमिक शाला नगर परिषद हिंगनघाट ,यांच्या वति ने सहायक शिक्षक व शिक्षिका कल्पना कारामोरे, अरविंद निमजे, छाया राईकवार ,पिंकी बघेल, आरती माहुरे, एस के मस्के, सुनीता भूमर नीलिमा तेलतुंबरे, विजय बोरकर, कविता चौहान, प्रेमकुमार पालीवाल , मीना आडकीने यांच्या मार्फत मोहिम राबविण्यात येत असून. दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ,रोजी कचरा वेचणायांचे पाल्य ,संत ज्ञानेश्वर वार्ड, रिठे काँलोनी परीसरमध्ये एकुण 9 शाळाबाह्य विद्यार्थी आढलुन आले,त्या विद्यार्थियांना जवळील शहालंगड़ी प्राथमिक शाळा हिंगनघाट.

येथिल शाळेत दाखल करण्यासाठी तेथिल मुख्याध्यापक श्री सिंगोटे, कविता घोड़े (विषय तज्ञ) ,सुनीता गजभिए (बालक संरक्षक) पंचायत समिति हिंगनघाट व नगर परिषदे तर्फे प्रवीण काळे, प्रशासन अधिकारी (शिक्षा विभाग) नगर परिषद हिंगनघाट. प्रेमकुमार पालीवाल सहायक शिक्षक, श्रद्धानंद हिंदी प्राथमिक शाला ,कविता चौहान व मीना आडकिने सहायक शिक्षिका लोकमान्य तिलक नगर परिषद प्राथमिक शाळा हिंगनघाट

यांचा उपस्थिति विद्यार्थियांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी दाखल करण्यात आले.तसेण ईतर शहरामधे कुठे शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्यास श्री मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक यांच्या दूरध्वनी क्रमांक: 9970566880 या वर माहिती देण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

कोरपावली विरावली रस्त्यावर पादचाऱ्यास धडक देत मृत्युस कारणीभुत अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल

0

 

यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली विरावली दरम्यान पादचारी व्याक्तीला धडक देवुन झालेल्या भिषण अपघाती मृत्यु बाबत यावल पोलीसा ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भातील मिळालेली अशी की , काल दिनांक २८ नॉव्हेबर रोजी दुपारी १२वाजेच्या सुमारास कोरपावली येथील राहणारे फिरोज लतीफ तडवी वय ४२ वर्ष यांचा कोरपावली ते विरावली रस्त्यावरील महेलखेडी येथील शेतकरी मधुकर रायभान पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याने जात असतांना यावल कडून कोरपावलीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच १९डीव्ही ७२२९या वाहनास नांव गाव माहीत नाहीत अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अविचाराने वाहन चालवित विरावली कडील रस्त्याच्या डावीकडे पायदळ शेतात जाणाऱ्या फिरोज तडवी यांना जोरदार धडक देत दुखापत करून मृत्युस कारणीभुत ठरला असून , अपघातातील मयताचे भाऊ रशीद लतीफ तडवी वय ४५ वर्ष यांनी दिनांक २९ नॉव्हेबर रोजी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय देवरे हे तपास करीत आहे . दरम्यान अपघातास कारणीभुत वाहनास पोलीसांनी जप्त केले आहे .

युवासेना उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची निवड*

0

 

 

इस्माईल शेगाव  प्रतिनिधी

आगर:-युवासेना अकोला उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची नियुक्ती करण्यात आली असून,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे युवासेना सचिव वरुन सरदेसाई शिवसेना संपर्क प्रमुख श्री. प्रकाश शिरवाडकर याच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री. नितीन देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गोपाल दातकर तसेच युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनात ओम साकरकार यांची नियुक्ती करण्यात आली. अंशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण या विचारातुन कार्य करावे व तसेच या पदावरून जनतेच्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून द्यावा तसेच जन कल्याणकारी कार्य करुन पक्षाची प्रतिमा उचावण्यास हातभार लावावा.

असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर यांनी ओम साकरकार यांना नियुक्ती पत्र देताना अकोला येथील शासकीय विश्राम गृहामध्ये केले.यावेळी नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख व युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे, विशाल घरड,आदित्य चावरे,उज्वल काळणे,शुभम चावरे,अतुल साकरकार, गोपाल निवाणे,चेतन गोरले,पंकज वासनकार,लकी गावंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ओम साकरकार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय सर्व पदाधिकारी व सर्व तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.

हिंगणघाट येथे महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी साजरी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-दि. 28 नोव्हेंबरला नंदोरी चौक येथे अखिल भारतीय महात्मा फूले समता परिषद च्या वतीने महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी कार्यक्रमात मा. कविता ताई मूंगले (जिल्हाध्यक्ष)यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या जीवना बद्दल माहिती दिली तसेच या वेळी कार्यक्रम ला उपस्थित सुजाता जाभूळकर, कविता भोमले ,लता भूते , आरती काळे, कविता सलामे,
प्रकाश मेश्राम, ओम दानदी शूभम हिवंज, कैलाश ठाकूर विनोद शंभरकर अतिश ओमकार, अतुल ओमकार सूर्यभान बगीले ,राहुल गुप्ता उपस्थित होते

Police Bharti पोलिस भरती प्रक्रियेतील तांत्रीक व्यत्यय थांबवा भरती इच्छुक उमेदवारांचे प्रशासनाला निवेदन

0

 

Akola प्रतिनिधि अशोक भाकरे

Akola अकोला, दि २८: महाराष्ट्र शासन जी पोलीस भरती प्रक्रिया घेत आहे त्यामधील तांत्रीक बिघाड दुर करुन तरुण तरुणींचे भविष्य वाचवावे असे आवाहन एका निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाला करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील Police Bharti पोलीस भरती करिता फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून भरती प्रक्रिया ही अनेक वर्षांनी होत असून अनेक उमेदवारांना या भरतीमध्ये फॉर्म भरण्याच्या तयारीत अडचणी येत असून फॉर्म भरण्याकरिता इंटरनेटची साईट वारंवार बंद चालू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म हे वेळेत भरणे शक्य होत नसून अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत तासनंतास इंटरनेटवर बसून रहावे लागत आहे .

याबाबत लोकसेवा करिअर अॅकाडमीने जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर गंभीर समस्येबाबत लक्षात आणून दिले व पोलीस भरती फॉर्म ची प्रक्रियेच्या साईटची माहिती घेऊन पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून या फॉर्मची भरण्याची तारीख वाढवून द्यावी अशी लेखी मागणी करण्यात आली यावेळी लोकसेवा करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. डाॅ. गजानन वाकोडेंसह शेकडो फॉर्म भरणारे उमेदवार आणि पालक आवर्जुन उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांमार्फत या मागणीचे निवेदन गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,(gruh rajymantri Mumbai सचिव गृह राज्यमंत्री मंत्रालय मुंबई, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही देण्यात आले.

Police Bharti “पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी”

0

 

“पोलीस भरती अर्ज Police bharti करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या कडे मागणी”

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.फॉर्म भरण्यासाठी अवघे एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून केली आहे.

“अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होतं आहे. ही संधी गेले तरी काही उमेदवाराच वय देखील संपत आलं आहे तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागत असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.”

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.फॉर्म भरण्यासाठी अवघे एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून केली आहे.

“अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होतं आहे. ही संधी गेले तरी काही उमेदवाराच वय देखील संपत आलं आहे तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागत असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.”

Pik Vima Nuksan पिक विमा काढलेल्या परंतु पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम द्या

0

 

संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ए आय सी AIC कंपनीकडून आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला आहे व या विमा कंपनीकडून पिक विम्याचे पैसेही काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा pik Vima काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रकमेचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडे पैसे मिळालेले आहेत व काही शेतकऱ्यांनी पिक विमा काढला मात्र त्यांना अद्याप पर्यंत ही पीक विमा चे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे तात्काळ पिक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या या मागणणीसाठी शिवसेना किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना 28 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना जी विमा रक्कम मिळालेली आहे ती अत्यंत तोकडी आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रक्कमेचे पैसे आलेले नाहीत तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे .

त्यामुळे पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे फोटो विमा कंपनीचे साईडवर अपलोड केले त्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम (क्लेम) मिळालेला नाही तर काही शेतकऱ्यांना प्रीमियम पेक्षाही विमा रक्कम कमी मिळालेली आहे तसेच नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करीत असताना विमा कंपनीच्या साईडवर काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करता आले नाही त्यामुळे विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम (लाभ) दिलेला नाही त्यामुळे विमा काढल्यानंतरही बरेचसे शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे तात्काळ विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम द्या ,अन्यथा आम्ही संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे , शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप तालुकाप्रमुख, राहुल मेटांगे, शिवाजी अढाव , धनंजय आवचार, बाबुराव जाधव ,नितीन भिसे ,सुनील मुकुंद, रवींद्र मारोडे विशाल बांगर, शेख अब्दुल शेख लुकमान, पुंडलिक खानझोड अमोल देशमुख आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

रामनगर-जैतापूर,बाजीउम्रद-तलाव सावंगी,मानेगाव-लालदेव फाटा रस्त्यांची दुरावस्था,तिन्ही रस्त्यांना तात्काळ मंजूरी देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री Ravsaheb Danve यांना साकडे

0

 

Jalna जालना:(प्रतिनिधी)-तालुक्यातील रामनगर परिसरात असलेल्या रामनगर ते जैतापूर फाटा 13 कि.मी,बाजीउम्रद-तलाव सावंगी 10 किमी.आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा 3 कि.मी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून,या तिन्ही रस्त्यांच्या कामांना मंजूरी देवून तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.

,अशी मागणी भाजपा ग्रामीण,भाजपा तालुका युवा मोर्चासह ग्रामस्थांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे(Ravsaheb Danve Patil )यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

आहे.यानिवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,जालना तालुक्यातील रामनगर ते जैतापूर फाटा 13 कि. मी रस्ता,बाजीम्रद ते तलाव सावंगी फाटा 10 कि.मी रस्ता तर मानेगाव (जा) ते लालदेव फाटा या तिन्ही मार्गांवरील रस्ते पूर्णतः खड्‌ड्यात गेले असून,दळण – वळणासाठी या रस्त्याव्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसह कष्टकरी वर्गाच्या विकासाला खोडा बसत आहे, रामनगर ते जैतापूर फाटा या दरम्यान मौजपुरी, भिलपुरी,निरखेडा,मानेगाव (खा), मानेगाव(जा),गणेशपूर यासह मोतीगव्हाण, दहिफळ, तलाव सावंगी,जैतापूर,अंतरवाला,पाहेगाव आदी 30 ते 35 गावांचा संपर्क येतो.तर बाजीउम्रद – तलाव सावंगी फाटा मराठवाडा – विदर्भ सीमा जोडणारा रस्ता आहे.आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा रस्ता या भागातील शेतकऱ्यांना दळण – वळणासाठी एकमेव रस्ता असून, या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत तर या रस्तावरील पुल पूर्णतः खचल्याने या रात्री – उपरात्री शेतात ये – जा करणे जिकिरीचे झाले आहे.जालना हे जिल्हा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा तालुक्याशी दररोजचा संपर्क येत असून,शेतकऱ्यांनासह, व्यापारी,दुकानदार,शालेय विद्यार्थी आदिनां वरील तिन्ही रस्तावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.खड्डे चुकविण्याच्या नादात दररोजच किरकोळ अपघात होत.

असून,महिला,प्रवाशी, रुग्ण यांना हि मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या भागातील ग्रामस्थांना रात्री – अपरात्री गरज पडल्यास वाहनचालक टाळाटाळ करतात. कारण रस्तावरील खड्‌ड्यामुळे वाहने नादुरुस्त होत आहेत.या तिन्ही रस्त्यांची ऐकून परिस्थिती पाहिल्यास या खराब रस्तामुळे या भागाच्या विकासालाच खोडा बसला असून रामनगर ते परेगाव फाटा, बाजीउम्रद ते तलावसावंगी फाटा आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा या तिन्ही रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.

, अशी मागणी करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष पांडूरग पोहेकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय डोंगरे,भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परसराम तळेकर,नारायण मोहिते,नारायण जाधव,तुकाराम राठोड,बी.एस.शेळके,सतीश हांडे,दौलतराव भुतेकर,दत्ता जाधव,विष्णू गुळवे,नारायण वाघचोरे,गोरक्षणाथ गायकवाड,राजेश कुरलीय यांच्यासह बाजीउम्रद,भिलपुरी,मानेगाव (खा),मानेगाव(जा),गणेशपूर,दहिफळ,मोतीगव्हाण,पाहेगाव,तलाव सावंगी,अंतरवाला आदी गावांमधील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

साकळीच्या महीलेस मोबाईलवरून शिवीगाळ करणाऱ्या अज्ञात व्याक्ती विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR दाखल

0

 

यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , जयश्री गोकुळ अडकमोल वय २८ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे आपल्या घरात करीत असतांना त्यांना मोबाइल क्रमांक७८८७५८५६८या मोबाइलवरून एका अज्ञात व्या वक्तीने कॉल केला ,दरम्यान जयश्री अडकमोल यांनी संबधीत फोन करणाऱ्यास आपण कोण बोलत आहे असे विचारले असता , फोन करणाऱ्या त्या व्याक्तिने नांव न सांगितल्याने महीलेने त्यास पुन्हा आपण कोण असे त्या व्यक्तीस विचारणा केल्यावर त्या व्याक्तीने कुठलेही कारण नसतांना फोन स्विकारणाऱ्या महिलेस शिवीगाळ केली म्हणुन , जयश्री अडकमोल यांनी यावल पोलीस ठाण्यात त्या मोबाईलवरून शिविगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन .

पुढील तपास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत असुन , दरम्यान पोलिसांनी या संदर्भात सदरच्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता हा क्रमांक दुर्ग मध्य प्रदेशातील व्याक्तीचा असल्याचे लोकेशन दिसुन येत असल्याचे पोतीसांनी सांगीतले .

आशिषसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

0

जळगाव जामोद :दि- 26 तालुक्यातील सूनगाव येथे राहणारे युवा उद्योजक आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत यांना नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले .

सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे राहणारे आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत हे कॉस्मेटोलॉजी मध्ये एम. टेक. असून कॉस्मेटिक सायन्सच्या फिल्डमध्ये ते सध्या देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा सौंदर्य प्रसाधनांसाठी लागणारा कच्च्या मालाचा उद्योग सध्या भरभराटीस आलेला आहे.

 

अतिशय ग्रामीण भागातून व बिकट परिस्थितीतून शिक्षण घेत प्रथम एक वर्ष नोकरी करत व नंतर लगेच स्वतःचा व्यवसाय उभा करत आज या क्षेत्रात आशिष सिंह देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, दिल्ली व देशाबाहेरही सौंदर्यप्रसाधन उत्पादने पाठवल्या जात आहेत. दिनांक 26 ला संध्याकाळी पुणे

स्व. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित एका शाही कार्यक्रमात जगप्रसिद्ध सरपंच पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार आशिषसिंह यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी मंचावर कृषिरत्न डॉक्टर संजीव माने, योगातज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील,

व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे हे असून महाराष्ट्र व गोवा या ठिकाणहून विविध क्षेत्रातील विशेष प्रगती करणारे युवा उद्योजक व तज्ञ यांना नॉमिनेट करत यातून एका तज्ञ समितीने हे पुरस्कार साठी योग्य व्यक्तींची निवड केली याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना आशिषसिंह यांनी तरुणांना बारावी सायन्स झाल्यानंतर कॉस्मेटिक्स क्षेत्रात बी टेक व एम टेक हे शिक्षण घेऊन या क्षेत्राकडे वळण्याची विनंती केली.

ते समाजकार्यात अग्रेसर असुन मोटिवेटर यूटुबर मोटिवेतर youtuber आहेत. आपल्या यशाचे श्रेय ते आपले कुटुंबीय व मित्र यांना देतात.याप्रसंगी सर्व स्तरातून आशिषसिंह यांचे कौतुक होताना दिसत आहे.