Home Blog Page 235

साकळीच्या महीलेस मोबाईलवरून शिवीगाळ करणाऱ्या अज्ञात व्याक्ती विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR दाखल

0

 

यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , जयश्री गोकुळ अडकमोल वय २८ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे आपल्या घरात करीत असतांना त्यांना मोबाइल क्रमांक७८८७५८५६८या मोबाइलवरून एका अज्ञात व्या वक्तीने कॉल केला ,दरम्यान जयश्री अडकमोल यांनी संबधीत फोन करणाऱ्यास आपण कोण बोलत आहे असे विचारले असता , फोन करणाऱ्या त्या व्याक्तिने नांव न सांगितल्याने महीलेने त्यास पुन्हा आपण कोण असे त्या व्यक्तीस विचारणा केल्यावर त्या व्याक्तीने कुठलेही कारण नसतांना फोन स्विकारणाऱ्या महिलेस शिवीगाळ केली म्हणुन , जयश्री अडकमोल यांनी यावल पोलीस ठाण्यात त्या मोबाईलवरून शिविगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन .

पुढील तपास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत असुन , दरम्यान पोलिसांनी या संदर्भात सदरच्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता हा क्रमांक दुर्ग मध्य प्रदेशातील व्याक्तीचा असल्याचे लोकेशन दिसुन येत असल्याचे पोतीसांनी सांगीतले .

आशिषसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

0

जळगाव जामोद :दि- 26 तालुक्यातील सूनगाव येथे राहणारे युवा उद्योजक आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत यांना नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले .

सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे राहणारे आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत हे कॉस्मेटोलॉजी मध्ये एम. टेक. असून कॉस्मेटिक सायन्सच्या फिल्डमध्ये ते सध्या देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा सौंदर्य प्रसाधनांसाठी लागणारा कच्च्या मालाचा उद्योग सध्या भरभराटीस आलेला आहे.

 

अतिशय ग्रामीण भागातून व बिकट परिस्थितीतून शिक्षण घेत प्रथम एक वर्ष नोकरी करत व नंतर लगेच स्वतःचा व्यवसाय उभा करत आज या क्षेत्रात आशिष सिंह देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, दिल्ली व देशाबाहेरही सौंदर्यप्रसाधन उत्पादने पाठवल्या जात आहेत. दिनांक 26 ला संध्याकाळी पुणे

स्व. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित एका शाही कार्यक्रमात जगप्रसिद्ध सरपंच पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार आशिषसिंह यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी मंचावर कृषिरत्न डॉक्टर संजीव माने, योगातज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील,

व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे हे असून महाराष्ट्र व गोवा या ठिकाणहून विविध क्षेत्रातील विशेष प्रगती करणारे युवा उद्योजक व तज्ञ यांना नॉमिनेट करत यातून एका तज्ञ समितीने हे पुरस्कार साठी योग्य व्यक्तींची निवड केली याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना आशिषसिंह यांनी तरुणांना बारावी सायन्स झाल्यानंतर कॉस्मेटिक्स क्षेत्रात बी टेक व एम टेक हे शिक्षण घेऊन या क्षेत्राकडे वळण्याची विनंती केली.

ते समाजकार्यात अग्रेसर असुन मोटिवेटर यूटुबर मोटिवेतर youtuber आहेत. आपल्या यशाचे श्रेय ते आपले कुटुंबीय व मित्र यांना देतात.याप्रसंगी सर्व स्तरातून आशिषसिंह यांचे कौतुक होताना दिसत आहे.

मुंबई २६ /११च्या भ्याड दहशदवादी हल्ल्यात हिंगोणा गावातील शहीद चौधरींच्या स्मारकावर सैनिक व ग्रामस्थांनी वाहीली श्रद्धांजली

0

यावल/Yawal ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

मुंबईच्या२६/११ (mumbai 26/11 terror attack) रोजी दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी ( Muralidhar Chaudhari)यांच्या शहीद स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

यावल तालुक्यातील हिंगोणा या गावचे रहीवासी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांचा मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज (CST station Mumbai) रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर कार्यरत असतांना चौदा वर्षापुर्वी २६/११च्या दहशदवादी भ्याड हल्यात नागरीकांचे रक्षण करतांना दहशदवाद्यांशी लढतांना प्रथम गोळी लागून वीरमरण आले होते. अशा हया देशासाठी आपले बलीदान देणाऱ्या शहीद जवानाला आज त्यांच्या मुळ हिंगोणा गावातील त्यांच्या शहीद स्मारकावर आज भावपुर्ण श्रद्धांजलि वाहन्यात आली.

हिंगोणा येथे शहीद मुरलीधर चौधरी यांचे स्मारकावर श्रद्धांजली प्रसंगी दहिगाव येथील पैरामिलेट्री फोर्स वेलफेअर एसोशिएशन यावल तालुका चे अध्यक्ष राजेश जगताप, माजी सैनिकासह उपाध्यक्ष सौखेडा सिमचे माजी सैनिक अय्युब तडवी, सचिव माजी सैनिक मोहन येऊल यांचे सह परिसरातिल सैनिक माजी सैनिका सह हिंगोणा ग्रामपंचायतचे सदस्य शांताराम तायडे, छबू तड़वी आणि जावेद तड़वी सह मोठया संख्येत ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहून शहीद सैनिकास श्रध्दांजली अर्पण केली.

दानापूर येथे संविधान दिन साजरा

0

दानापूर – गोपाल विरघट

येथिल ग्रामपंचायत भवनात आज संविधान वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ.सपना धम्मपाल वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत चे लिपिक अशोक रहाणे यांनी संविधाचे सार्वजनिक वाचन करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .
यावेळी मा, ग्रामपंचायत उपसरपंच साहेबराव वाकोडे, माजी सरपंच महादेवराव वानखडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश येऊल , वसुदेव खवले, रविंद्र तायडे, भास्कर दांदळे, गणेश खडसान, राम हागे , पांडुरंग मानकर, गोपाल विरघट , बाळकृष्ण श्रीनाथ आदींची उपस्थिती होती.तसेच सिद्धार्थ नगर येथे संविधान उद्धेशिकेचे वाचन करण्यात आले रुपनंदा महिला मंडळ , सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय संविधान दिनानिमित्य प्रदीपकुमार नागपुरकर यांचे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, नांदगांव येथे विद्यार्थांना हस्ताक्षर सुधाराचे धडे

0

 

सचिन वाघे प्रतिनिधि

हिंगणघाट:- येथील बहुआयामी व्यक्तिमत्व युवा-संस्कार मासिकाचे संपादक तथा भारतभर हस्ताक्षर सुधार प्रकल्प प्रचारक म्हणून लाखो विद्यार्थी वर्गाचे हस्ताक्षर सुधार करणारे प्रदीपकुमार नागपुरकर यांचे जिल्हा परिषद संचालित पंचायत समिति, हिंगणघाट अंतर्गत नांदगांव(बोरगांव) उच्च माध्यमिक शाळा येथील वर्ग ५ ते ८ चे विद्यार्थांना भारतीय संविधान दिनानिमित्य भारतीय युवा संस्कार परीषदेचे वतीने एक दिवसीय हस्ताक्षर सुधार शिबीराचे आयोजन *चला हस्ताक्षर सुधार व संविधान वाचन करु* या उपक्रमा अंतर्गत स्वयम हस्ताक्षर सुधार वर्गाचे मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी विद्यार्थी भावा-बहिनींना *”मी सरळ, माझी रेषा सरळ, रेषा सरळ, माझे अक्षर सुलेखन सरळ यासह जीवन सरळ”* हा मुलमंत्र देत प्रयोगात्मक भुमिका समजावून सांगतांना विद्यार्थ्यांना सोप्या व सहज भाषेत ग्रामगीता, दासबोधात सांगितलेले ओव्यांचा कित्ता देत सरळे, वाटोळे (गोलाकार) व मोकळेपणा हा त्रिसूत्री प्रयोग देवून हस्ताक्षर सुधार करण्याचे तंत्र-मंत्र विद्यार्थ्यांनकडून गिरवून घेतले. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगांव शाळेचे मुख्याध्यापक शंकर निमसरकार, तर प्रमुख मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर व सतिश घोडे गुरुजी प्रमुख अतिथी, शिबीर वर्ग संयोजक अंकित दारुंडे, यासह शाळेचे माजी विद्यार्थी साहिल बुरबुरे,सुमित तेलंग, हर्षल, जयेश बुरबुरे,आदी मान्यवर मंचासीन होते.हस्ताक्षर वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी एक दिवसीय दोन तासाच्या सत्रात विद्यार्थ्यांना अक्षरात प्रयोगात्मक बदल घडवून जीवन कसे सरळ जगता येते हे अक्षराच्या सरळ समांतर रेषांचा परिपाठ शिबीरार्थी विद्यार्थी वर्गाकडून करवून घेतला.*सुंदर लिहिणे अक्षर ओळी, स्पष्ट वाचणे पुस्तक सगळी। जरा न दिसावी टाळाटाळी, कुठेही विद्यार्थ्यांची।।* रेषा सरळ उंची समान अक्षराचा यातच प्राण हा सिध्दांत देत नागपुरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वर्गाचे सुत्रसंचालन अभय लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल थुल याने मानले, यशस्वितेसाठी संकल्प पाटिल, अभिजीत फुसाटे, सुजीत दारुंडे, मिहिर खोंडे, जयदेव दारुंडे, भोला मस्कर, प्रशांत वादाफळे, सिमा बेले, ज्योति महाबुधे, मिनाक्षी घोडमारे, वनमाला तेलंग, माया वाघमारे, आदीने सहकार्य केले.

सिंदी (रेल्वे) गुंज कॉन्व्हेंट तालुकास्तरी व्हॉलिबॉल स्पर्धेत विजयी

0

 

शालेय तालुकास्तरीय 17 वयोगटात व्हॉलिबॉल स्पर्धेत गुंज कॉन्व्हेंट नी गुड शेफर्ड कॉन्व्हेन्ट सेलू यांना अंतिम सामन्यात हरवत विजयी मान पटकविला या चमू मध्ये अभय मडावी, हमराज गावडे, पवण तलांडे,आर्यन हीचमी,राजेश होळी,रोनित हेडो,अर्जुन वेलदा,आकाश वेलाडी या विद्यार्थ्यांनी उत्तम असा खेळ करत विजय प्राप्त केला सर्व विद्यार्थ्याचे संस्थापक संजय भन्साली मुख्याध्यापक श्रीकांत घोडमारे व कोच भोवेश नागफासे सर, राजेश बोंगाडे सर, मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

संविधान दिवसाचे औचित्यसाधून अतुल वांदिले, अनिकेत कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती हार घालून केले अभिवादन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व अनिकेत कांबळे यांनी संविधान दिना निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती हार घालून अभिवादन केले.
भारतीय सविधानाने स्वातंत्र्य ,समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य प्रदान केली.या मूल्याची जपवणूक करत समाजातील उत्कर्षासाठी कटीबद्ध राहण्याचा निश्चय करू असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित फोटो प्रदर्शनीला भेट दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कांबळे, नितीन भुते, किशोर चांभारे, गजू महाकाळकर,अजय परबत,राहुल जाधव, सुशील घोडे, प्रशांत मेश्राम,पंकज भट्ट, आकाश बोरीकर, दिनेश नगराळे, शाहरुख बक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिन लोकोत्सव व्हावा”

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित बदनापूर जि.जालना राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत
‘ ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा कराण्यात आला.यावेळी शाळेतुन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.त्यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या-१.जब तक सूरज चाँद तब तक संविधान २. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात ३. समता,बंधुता,लोकशाही संविधाना शिवाय पर्याय नाही ४. कर्तव्य,हक्कांचे भान मिळवून देते संविधान ५. संविधान एक परिभाषा है मानवता की आशा है ६.संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती देई आम्हा अभिव्यक्ती ८.मिळून सारे देऊ ग्वाही सक्षम बनवू लोकशाही ९.संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू १०. सर्वांचा निर्धार संविधानाचा स्वीकार.असे विविध घोषणाने गाव दणाणून टाकले तसेच शाळेत विद्यार्थांनी गाणे म्हणाले इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यानी कु.प्रिया जाधव,कु.आरती जाधव,आठवी इयत्ता मधुन कु.दिपाली जाधव,कु.नेहा जाधव ह्या विद्यार्थ्यींनी छान प्रकारे भाषणे दिली.भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली.त्या घटनेला ७३ वर्षे होत असून,२६नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या,असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मा.वाघमारे सी.जी.केले आहे.यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की घटना परिषदने २६नोव्हेंबर१९४९रोजी राज्यघटना देशाला अपर्ण केली.त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सूरू झाली.आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली.त्यांचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.तसेच ते पुढे म्हणाले की,देश पातळीवर हा दिवस साजरा केला जात असुन,संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा.
मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही,समता,स्वातंञ्य,बंधुभाव ही मूल्ये आणि एकात्मता बळकट करावी,असे आवाहान शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी केले आहे.तसेच २६/११/२००८ च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली.तसेच यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

मोहता शाळा नवीन इमारत मधील पीओपी ढाचा पडला त्या मागे शाळा व्यवस्थापक यांचे दुर्लक्ष !

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी
दि.25 नोव्हेंबर
हिंगणघाट :- शहरातील ऐतिहासिक मोहता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आठ कोटी ब्यांशी लाख रुपयांचा खर्च करून बांधण्यात आला. या इमारतीचे उद्घघाटन मा. नितीन गडकरी यांनी केले होते. सहा महिन्यातच इमारतीच्या पीओपीचा ढाचा कोसळला ? प्रतिनिधी यांनी शाळेत भेट दिली असता पाईपलाईन लिकेज असल्यामुळे ते पाणी स्लॅपला पाझरत होते ते पाणी पीओपी शोषून घेत होती त्यामुळे पीओपी चा ढाचा पडला. याशिवाय अनेक बाबतीत मुख्याध्यापक यांचे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात येते .

मुख्याध्यापक गंगाधर ढगे :- आम्ही या विषयावर अनेकदा इंजिनियर यांना कळविले आहे त्यांनी या ठिकाणी भेट दिली.

हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड :- पाईप लिकेज झाल्यामुळे पीओपीने पूर्ण पाणी शोषून घेतले. जिथे जिथे पाईपलाईन लिकेज झाली त्या ठिकाणी पीओपी पडले ठेकेदारास पीओपी फिटिंग व नळ पाईपलाईन चेक करून बदलण्याचे निर्देश दिले. या अगोदर मुख्याध्यापक यांनी कोणतीही लिखित तक्रार केली नाही . मुख्याध्यापक यांनी लेखी तक्रार पीओपी ढाचा पडल्यानंतर दिली.

3 डिसेंबर अंपग जागतीक दिनी अंपगासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

0

 

शेगाव प्रतिनिधी इस्माईल

3डिसेंबर 2022 रोजी अंपग जागतीक दिवस म्हणुन सपुर्ण जगात साजरा करण्यात येतो या दिनी अंपगाचे छोटे मोठे कार्यक्रम शासन व सामाजिक संघटना यांच्या मार्फत करण्यात येतात ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अनेक अंपगाच्या समस्या व मागण्या असतात व त्याच्यासाठी 5%निधी सुद्धा अंपग पुर्णवसन करण्यासाठी राखीव ठेवण्यात येतो परंतु अनेकवेळा ग्रामसभामध्ये अंपगाच्या समस्या संदर्भातील बाजु ऐकल्या जात नसुन अंपगाच्या समस्येचे निराकरण होत नाही म्हणुन 3 डिसेंबर अंपग जागतीक दिन असुन या दिवशी अंपगासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अंपगाच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे व ग्रामसभेत फक्त अंपगांचा सहभाग असावा असे आपल्या स्तरावर सर्व गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत सचिवांना आदेशीत करावे असे निवेदन अंपग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यानी दिले करामत शाह अकोला अध्यक्ष, रुपाली टेकाडे, इम्रान पांडे, शेख हुसेन अझरवसी ,