Home Blog Page 235

कालखेड ची कन्या बनली PSI

0

 

शेगाव प्रतिनीधी अर्जुन कराळे

शेगाव तालुक्यातील कालखेड येथील गणेश चोखंडे यांची मुलगी कु,पूजा हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI ( पोलीस उपनिरीक्षक) बनली आहे. त्यामुळे कालखेड गावात आनंदाची लाट पसरलेली आहे.

कालखेड येथील पुजा गणेश चोखंडे ह्या विद्यार्थिनीने महाराष्ट लोकसेवा आयोगाची psi पदासाठी परिक्षा दीली होती. या परिक्षेत पुजाने यश संपादन केले असुन ती पोलीस उपनिरीक्षक बनली आहे.

कु. पुजाचे वडील जळगाव जा. तालुक्यातील मडाखेड येथे प्राथमीक आरोग्य केद्रांत शिपाई पदावर कार्यरत आहेत. ग्रामीन भागातील तरुणी पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पूजा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडीलाना आणि गुरूंना देत आहे।
ग्रामीन भागातील युवक-युवतींनी पुजाचा आदर्श व प्रेरना घेऊन शैक्षणीक वाटचाल केल्यास यश निश्चीतचं दूर नाही. एवढे मात्र नक्की.

सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिल्यामुळे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या !

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट : भेटायला न आल्यास सोशल मीडिया वरून बदनामी करू अशी धमकी दिल्याने एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सदर तरुणी शहरातील महात्मा फुले वॉर्ड येथील रहिवासी असून नुकताच दि.२६ नोव्हेंबर रोजी तिचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला.

सदर घटना उघडकीस आल्यानंतर मृतक मुलीचा भाऊ रितिक किरण करोसिया मु. महात्मा फुले वार्ड ,स्वीपर कॉलनी याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली असून आरोपी आदित्य गजराज महतो रा. रामनगर पांढराबोडी नागपूर, सनी गायकवाड रामबाग झाटूरली, नागपुर यांचे विरोधात पोलीसांनी भादंवी च्या कलम ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेतील आरोपी तसेच मृत तरुणीची ओळख असल्याने आरोपी नागपूरवरून तीला हिंगणघाट येथे भेटण्याकरिता यायचे.

घटनेपुर्वी आरोपी यांनी सदर तरुणीला भेटण्यास बोलविले होते, भेटावयास आली नाही तर व्हाट्सअप , फेसबुकच्या माध्यमातून तुझी बदनामी करू अशी धमकी आरोपींनी तीला दिली. बदनामीचे भीतीने तरुणीने उंदीर मारण्याचे औषध घेत आत्म हत्या केली होती.
यावेळी तरुणीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे नागपूर येथे वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते.

या तरुणीचा दि. २६ नोव्हेंबर रोजी तिचा दुदैवी मृत्यू झाला.
घटनेतील आरोपी आदित्य महतो व सनी गायकवाड यास अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला करीत आहे.

प्रा.डाॅ.बबन मेश्राम यांच्या जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन पुस्तकाचे लोकार्पण

0

 

गोंदिया:- एन.एम.डी महाविद्यालयतील समाजशास्त्र विभाग प्रमुख,रातुम नागपुर विद्यापिठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व साहित्यिक प्रा.डाॅ.बबन मेश्राम लिखित जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन या पुस्तकाचा लोकार्पण संविधान दिनी २६ नोव्हेंबर ला

उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या दक्षिणेला व अयोध्येच्या उत्तरेस राप्ती ( अचिरावती ) नदीकाठी बसलेल्या बौद्धांच्या पाली वाङ्‌मयात सावित्थी असा श्रावस्तीचा उल्लेख असलेल्या, जैन वाङ्मयात त्यास चंद्रपूर वा चंद्रिकापुरी संबोधले जाते,तर विष्णुपुराण व हरिवंशपुराण यांच्या मतानुसार युवनाश्व राजाचा मुलगा श्रावस्त याने वसविलेल्या, श्रावस्ती येथे भगवान बुद्ध यांनी अधिक वर्षापर्यंत, वर्षवास निमित्त निवासी होते अशा बौद्ध धम्माच्या सर्वात पवित्र ठिकाणी करण्यात आले.

महिला सशक्तिकरण संघ द्वारा श्रावस्ती येथिल म्यानमार मोनास्ट्रि येथे आयोजित चतुर्थ आंतराष्ट्रीय बौद्ध सम्मेलनात डॉ.बबन मेश्राम यांच्या पुस्तकाचे लोकार्पण सम्राट अशोक सुभारती स्कूल ऑफ बुद्धिस्ट,सुभारती विश्वविद्यालय मेरठचे पाली विभाग प्रमुख डॉ.चंन्द्रकिर्ति यांच्या हस्ते कुशिनगर येथिल अग्नमहापंडित भदन्त ज्ञानेश्वर, भदन्त देवेन्द्र, भदन्त नंदरत्न थेरो, दिल्ली चे भदन्त करुणाकर, म्यानमार येथिल भदन्त ओभाषा, भदन्त नायका, भदन्त पंडिताभिवंसा,लंडन चे डॉ.मंजुलाल, डॉ.निलीमा बागडे,भंन्ते विनाचार्य, डॉ.अश्विर गजभिए डॉ.शुशांत चिमणकर, सामाजिक कार्यकर्ता आतिष बागडे यांच्या उपस्थित करण्यात आले.

सदर पुस्तकाचे प्रकाशक वैनगंगा व्हॅली लोटस अॕन्ड कोब्रा पब्लिशिंग हाउस नागपुर हे आहेत.डाॕ.मेश्राम यांच्या संशोधनावर हि पुस्तक असून विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच संशोधनकर्ता, आदिवासीच्या जिवनावर अध्ययन करणारे अभ्यासक यांना उपयुक्त असणारे पुस्तकात जनसंवाद माध्यमे व सामाजिक परीवर्तन, आदिवासी, आदिवासीतील सांस्कृतिक व धार्मिक बदल, आदिवासीतिल सामाजिक व आर्थिक बदल यासारख्या विषयांवर सखोल संशोधन मांडण्यात आले आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात पांढरे सोन्याची सर्रास चोरी

0

 

शेतकरी शेतामध्ये राबराब राबून पीक मोठे करतो, कष्ट घेतो, पैसा ओततो, दुसरीकडे मालाचे भाव पडतात अशातच जळगाव जामोद परिसरामध्ये या पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याची अर्थात कापसाची रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे सर्रास चोऱ्या करत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

महागाई वाढतच असताना आसमानी, सुलतानी संकटासोबत भुरट्या चोरांचे संकट जळगाव जामोद परिसरात निर्माण झाले आहे जळगाव (जा) तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी संतोष महादेव फाटे यांनी 3 डिसेंबर ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की शेतातील कापूस वेचणीचे काम सुरू आहे

अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये कापूस वेचणी करता गेलो असता अज्ञात व्यक्तीने अंदाजे 50 किलो कापूस अंदाजे किंमत 4000/- चोरून नेल्याचे निदर्शनास आले यावरून जळगाव जामोद पोलिसांनी कलम 379 नुसार गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील करीत आहेत.

दिव्यांगानी संघटिपणे संघर्ष केला नसता? माजीमंत्री बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते ?तर दिव्यांग मंत्रालय निर्मिती झाली नसती? दिव्यांगाना न्याय मिळाला नसता?

0

 

असे मत दिव्यांग, वृ.नि.मि.मंडळ चे संस्थापक डाकोरे पाटिल यांनी माहुर येथे जागतिक दिनी मेळाव्यात केले

 

माहुर येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी माहुर शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिव्यांगाचा मेळावा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण जिजखमाता चौक येथे दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे,माहुरचे नगरअध्यक्ष फेरोजभाई दोसानी, नायब तहसिलदार, मा.आमदार केरामचे प्रतिनिधी,कॉग्रेसचे प.स.माजि सभापती किसनकाका राठोड,गोरसेंनेचे जिल्हा सचिव अर्जुन पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी, भाजपाचे जेष्ठ नेतेअनिलभाऊ वाघमारे, पत्रकार पदमा मॉडम,पत्रकार तळणकर मॉडम दिव्यांग सं.सर्वपदाधिकारी, शाखा प्रमुख अनेक मान्यवराच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरण करून डॉ.बाबासाहेब अंबेडकर चौकाच्या बोर्डाला पुष्पहार घालुन पेढे वाटुन फटाके फोडुन उत्साह,आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
कपिलेश्वर धर्मशाळा माहुर येथे दिव्यांगाचा मेळ्याव्यात वरील मान्यवराच्या हस्ते दिप प्राजलन करून मान्यवराचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,तर ऊदघाटक माहुरचे नगर अध्यक्ष फेरोजभाई दोसानी,प्रमुख पाहुणे नायब तहसिलदार माहुर, मुख्यकार्यकारी माहुर माजी सभापती किसनकाका राठोड,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.ऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार पत्रकार पदमा मॉडम, पत्रकार तळणकर मॉडम, सरपचअनेक मान्यवर दिव्यांग बांधवासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दिव्यांगाचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंलन सरपंच अर्जुन पवार,यांनी केले
प्रस्ताविक मार्गदर्शन ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचा ऊध्देश सर्व बांधवाना दिव्यांग जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
ऊदघाटक माहुरचे नगर अध्यक्ष फेरोजभाई दोसानी यांनी दिव्यांग जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपणास संघटित करण्यासाठी डाकोरे साहेबानी प्रयत्न केल्यामुळे आज आपल्या संघर्षामुळे मंत्रालय करण्यात आले या सरकारचे मी आभार व्यक्त करतै नुसते मंत्रालय झाल्याने प्रश्न सुटत नसतात म्हणुन आपण सर्वानी चंपतराव डाकोरे सोबत लाढाईत सामिल व्हावे गरज पडल्यास मला आवाज द्या मी आपल्या सोबत आहे नगरपंचायतचा दिव्यांग निधी,घरकुल चे वाटप केले आहे आपल्या समस्या मी सोडविण वरीष्ठ पातळिवर पक्षासमोर मांडुन न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले

माजी सभापती राठोड सरानी जागतिक दिनाच्या शूभेच्छा देऊन माहुर आदिवाशी डोगराळ भागातिल दिव्यांगाना न्याय मिळावा म्हणुन मा. चंपतराव डाकोरे पाटिल माहुर तालुक्यात दरमहा मिटिंग ,निवेदन पहिला मोर्चा दंवडी मोर्च्या काढला होता त्यावेळी मी सभापती होतो त्यावेळी गटविकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन दिव्याग निधी दिला व प्रत्येक वेळि मी डाकोरे पाटिल यांच्या चळवळी सोबत आहे पुढे पण दिनदुबळ्याना सहकार्य करण्याचे अश्वासन दिले
यावेळी पत्रकार पदमा गिरे मॅडम ,प्रहार संघटनेचे शिवचरण दिव्यांग स जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले ईत्यादीचे मार्गदर्शन झाले


अध्यक्षिय मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन शासनाने अनेक वेळा कायदे,शासन आदेश देऊन न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्टृ या संघटनेच्या वतीने सर्वानी संघटित करण्याचा प्रयत्न केला आपण सर्वानी मला सहकार्य केल्यामुळे आज आपणास कुठेतरी न्याय मिळत

आहे,गावपातळीवर निधी,सवलती,एवढेच नव्हे तर आपल्या व्यंगावर बोलणे सुध्दा बंद झाले ते शासनाने दिव्यांग कायदा २०१६ च्या कलम ९२,९३ प्रमाणे आपल्या शरीराच्या व्यंगावर बोलले फार मोठा गुन्हा नोंद होतो त्यांची माहिती आपणास व्हावी म्हणुन गाव तिथे दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे अनावर नांदेड जिल्यात १८१ व्या बोर्ड शाखेचे अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

देशातील पहिले दिव्यांग मंत्रालयाची घोषणा आपल्या सर्वाच्या संघटित संघर्षामुळे व आपले दिव्यांगाचे कैवारी माजी मंत्री बच्चुभाऊ कडुमुळेच आपणास मंत्रालय झाले बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते तर मंत्रालय मिळाले नसते सतेत आपला प्रतिनिधी असल्याशिवाय
न्याय मिळत नाहि या शासनाच्या सर्व मंत्रीमंडाचे ,बच्चुभाऊचे जाहिर आभार व छोटिशी विंनती कि या मंत्रालयात सेवक ते वरीष्ठ अधिकारी,व मंत्री पण दिव्यांगासाठी राखिव ठेऊन भर्ती केल्यास खऱ्या अर्थाने दिव्यांगाना न्याय मिळेल.

कारण या म्हनीप्रमाणे *पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशा तेंव्हाची कळे
त्या दिव्यांगाना काय दु:ख होते त्याच्या वेदना सर्व सामान्याना कसे कळतिल एखादा हजारात बच्चुभाऊ कडु सारखा असतो पण एखाद्याने संघर्ष केल्यास न्याय मिळत नसतो म्हणुन सर्वानी संघटितपणे संघर्ष करावा असे अव्हाहण अध्यक्षिय समारोपात डाकोरे पाटिल यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार ता.उप अध्यक्ष ऊमेश भगत यांनी केले
या कार्यक्रमास किनवट ता अध्यक्ष अंकुश राठोड,हदगाव सचिव चव्हाण,धनगरे,अर्धापुर बबन पाताळे, अनिस मिर्झा
ता् अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण ,ता ऊपअध्यक्ष ऊमेश भगत,ता. सचिव अरविंद राठोड,शहर अध्यक्ष दादाराव कांबळे, महिला अध्यक्ष बबिता मारबते,म.सचिव वनिता पेटकुले नरवाडे सागर नरसिमलु, सुखळकर,रेवा राठोड ईत्यादीने केले असे प्रसिध्दी पत्रक दिले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडीचे उपक्रमशील शिक्षक एम.सी.बेडके “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित…!

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील 14 उपक्रमशील आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ला जिल्हा परिषद हायस्कुल गडचिरोली च्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आला.

जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक विभागातील 12 व माध्यमिक विभागातील 2 असे एकूण 14 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी श्री.एम,सी,बेडके हे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडी या शाळेत कार्यरत आहेत.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून शाळा डिजिटल केले व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले.शाळेची पटसंख्या 8 वरून 123 पर्यंत वाढवण्यात त्यांचा सिंहाची वाटा आहे.

एकेकाळी या शाळेत फक्त 8 विद्यार्थी शिक्षण घेत होते,ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती.पण बेडके यांनी अतिशय मेहनत करून या शाळेला पुनरुज्जीवन केले त्यामुळे आता या शाळेत 123 विद्यार्थी या शिक्षणाच्या आनंदवनात शिक्षण घेत आहेत.

अतिशय दुर्गम व नक्षलग्रत भागात पण मूलभूत सोयी सुविधा नसताना सुद्धा या शाळेला शिक्षणाचे आनंदवन तयार केले. या शाळेचे गुणवत्ता व इतर उपक्रमांचे या परिसरात चर्चा आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात 10 पेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून या शाळेत प्रवेश घेतला.

ही पुरस्कार त्यांना मिळाल्याने त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली चे आभार मानले.बेडके यांनी पुरस्काराची श्रेय दीपक देवतळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली,पुरकलवार शिक्षण विस्तार अधिकारी,शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य,शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व मित्रमंडळी याना दिले आहे.

अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान दिव्यांगांच्या सर्वेक्षण कार्याची दखल राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

0

 

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि. ३ जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्ह्याचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०२१’ने गौरविण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दिल्लीतील विज्ञान भवनात आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना’निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने वर्ष २०२१ आणि वर्ष २०२२ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ.

विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि श्रीमती प्रतिमा भौमिक उपस्थित होते.
अपंगत्वावर मात करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य आणि जिल्हा आदींना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिव्यांगांच्या सशक्तीकरणाकरिता शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत अकोला जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले.

अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील दिव्यांगव्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे.

सांघिक भावनेने केलेल्या कार्यातूनच अकोला जिल्हा परिषदेने दिव्यांगांचे सर्वेक्षण कार्य पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगिता अधाऊ, मुख्य कार्यकारी सौरभ कटीयार यांच्या नेतृत्वात हे सर्वेक्षण कार्य पार पडले. या कार्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सातत्यपूर्व मार्गदर्शन आणि सहकार्य केले. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता व त्यांची टीम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आदिंचा यात सहभाग लाभला.

या कार्यक्रमात एकूण १४ श्रेणीत विविध व्यक्ती तसेच शासकीय व अशासकीय संस्थांना
वर्ष २०२१ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारा’ने गौरिविण्यात आले. यामध्ये अकोला जिल्हा परिषदेसह महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा समावेश आहे…

समाजसेवक श्रीधर रमेश गोपणारायन हे खेकडी, नवथळ आणि परीतवाडा (जिल्हा-अकोला) गावात सरपंच पदाचे उमेदवार

0

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

सामाजिक कार्यात घेतात सक्रीय सहभाग

अकोला दि.०१ रोजी खेकडी गावचे सुजाण नागरिक म्ह्णून नावलौकिक असलेले श्रीधर रमेश गोपणारायन यांनी थेट जनतेतून सरपंच पदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज भरून उभे आहेत, त्यांनी गेली १० वर्षे स्वतः आणि त्या अगोदर २५ वर्षे त्यांचे वडील बोधाचार्य रमेश पायरुजी गोपणारायन यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सोबत आई सौ.साधना रमेश गोपणारायन ह्यांनी उपसरपंच पद यशस्वीपणे सांभाळले आहे असा तीनही गावातील लोकांचा विश्वास आहे, आणि यावेळेस जनतेतून सरपंच निवडून द्यायचा असल्याने खेकडी, नवथळ आणि परीतवाडा या गावातील सर्व तरुण, वृद्ध, जाणकार मंडळी तसेच संपूर्ण महिलांना असे प्रामाणिक पाने वाटते आहे की श्रीधर गोपणारायन हेच सरपंच पदासाठी योग्य माणूस आहे.

श्रीधर गोपणारायन हे गावातच नव्हे तर तालुका व अकोला शहरात सामजिक कार्यात सक्रिय असतात, पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील महिलांना शिलाई मशीन मिळवून देने, शेतकऱ्यांना फवारणी पंप, ताडपत्री मिळवून देणे, शेतकऱ्यांना पीक विमा, बियाणे वाटप या संदर्भात मदत करणे, लहान मुलामुलींच्या आरोग्यासाठी काम करणे, आबालवृद्ध लोकांना योग्य ती मदत मिळवून सेने त्यामध्ये श्रावण बाळ योजना मिळवून देणे, विधवा महिलांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देणे अशी कार्य श्रीधर गोपणारायन सातत्याने करीत असतात.

नालंदा बुद्ध विहार समितीला मार्गदर्शन करणे, सर्वधर्म समभाव राखणे, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणे, तंटामुक्ती समितीला सल्ला देणे, गावातला वाद- विवाद गावातच मिटवणे, शेतीचे, जागेचे, रस्त्याचे, पाण्याचे भांडण-तंटा मिटवणे अशी कामे तसेच शासकीय योजना गावात कश्या राबता येतील याकडे श्रीधर गोपणारायन यांकगे संपूर्ण लक्ष केंद्रित असते.

निवडणूकिती विरोधाला विरोध म्हणून जरी उमेदवार उभे असले तरी सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून श्रीधर गोपणारायन हेच खरे तीनही गावाचे प्रतिनिधित्व करु शकतात, व गावाचा योग्य तो विकास करू शकतात अशी संपूर्ण गावकरी मंडळींची पक्की धारण आहे.

खेकडी, नवथळ आणि परीतवाडा या तीनही गावाच्या हक्काचा माणूस म्हणून श्रीधर गोपणारायन यांची घ्याती आहे, आगामी काळात पंचायत समिती तथा जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये श्रीधर गोपणारायन यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

वखारी येथे दिव्यांग दिन साजरा व साहित्याचे वाटप:

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना तालुक्यातील वखारी ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग दिनानिमित्त १८ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

सदर महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे.

त्यामुळे प्रहार पक्षाचे नेते तथा आमदार बच्चु कडु यांनी यासाठी खूप मेहनत व परिश्रम तसेच लक्षवेधी आंदोलन ही केली आहे.

त्यामुळे अपंग,विधवा,दिनदुबळ्या, गोरगरीब दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.त्यामुळे आमदार बच्चु कडु यांनी शासनाला वेळोवेळी लक्ष केंद्रित करून दिले आहे.

त्यामुळे या योजनेचे जनक म्हणून बच्चु कडु यांना दिव्यांग बांधवांनी श्रेय दिले आहे.आज वखारी ग्रामपंचायत येथे दिव्यांगदिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच काका पाटील घुले,ग्रामसेवक वझरकर साहेब,भारतीय जनता पार्टी अपंग सेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड,बाळु वाटोळे,छगन खैरे,भुजंगराव घुले,नामदेव घुले,रघुनाथ घुले,संजय पवार व अन्या गावकरी मंडळी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची सात,समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येण्याची गरज असे आवाहन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

0

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-वाटुर-अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी 05 टिकाणी वीटभट्टी व साखर कारखाना ३ ते ६ वयोगटातील बालकांच्या करीता ( डे – केअर सेंटर) चालविल्या जातात.या वर्षी देखील संस्थेने जालना जिल्हयातील 2 साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या करीता डे केअर सेंटर सुरु आहेत.

तसेच परतुर मंठा जालना घनसावंगी येथील वीटभट्टी कार्यस्थळावर 08 या टिकाणी डे केअर सेंटर सुरु केले आहेत.यामध्ये ३ ते ६ या वयोगटातील 167 तसेच ६ ते १४ वयोगटातील 584 बालकांना शाळेच्या प्रक्रियेत आणण्याचे काम करीत आहोत.757 बालकांना उबदार कपड्यांची गरज आहे.

सधा खूप थंडी असल्यामुळे थंडीत कुडकुडणाऱ्या वीटभट्टी व उसतोड कामगारांच्या चिमुक्यांना संरक्षण मिळावे.या करीता अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना संस्थेमार्फत जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था,पदाधिकारी इत्यादी.वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता थंडीत कुडकुडणाऱ्या जीवांना कपड्याच्या माध्यमातून माणुसकीची उब देण्यासाठी अधार संस्था आपल्याला आवाहन करीत आहेत.

या उपक्रमात सहभागी होवून उबदार कपडे,स्वेटर,ब्लॅकेट,शैक्षणिक सहित्य स्वरुपात अधार संस्था वाटुर मो.9421327814/8888853624 या वर संपर्क करूण अपन मदत करू शकतात.तसेच संकलीत झालेले स्वेटर,ब्लॅकेटस शैक्षणिक सहित्य जालना,जिल्ह्यातील वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या 757 बालकांना वाटप करण्यात येणार आहे.

वीटभट्टी ऊसतोड कामगारांच्या कुंटूंबाना ब्लॅकेटस वाटप करण्यात येणार आहे.या सामाजिक कार्यात आपला देखील सहभाग हवा आहे.या कार्यक्रमाचे संयोजक पोग्राम ऑफिसर राजेश राउत,सुरेश बच्छीरे,एकनाथ किटाळे,विठ्ठल सुभेदार,सचिन चव्हाण,राजेश वाघमारे,चंदु कवळे व सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन बालकाना उब देऊ शैक्षणिक सहित्य व समुपदेशन करूण शैक्षणिक प्रवाहात आण्यासाठी प्रयत्न केली जाणार आहे.

श्रीमती अनिता राऊत अध्यक्ष अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना.चला तर आपण देखील सहभाग व्हा…..🙏🏻