Home Blog Page 237

शब्दांचा अतिसार झालेला व थिल्लर राज्यपाल महाराष्ट्राला लाभावा हेच दुर्दैव!

0

 

प्रतिनिधी:(जालना)राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व दिलीप धोत्रे,प्रकाश महाजन,संतोष नागरगोजे,अशोक तावरे राज्य,सतेनाम गुल्हाटी,गजानन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णा खलसे यांच्या अध्यक्षतेखाली विरेगाव येथे आंदोलन करण्यात आले.मा.राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला.राज्यपाल महोदय यांनी संभाजीनगर येथील कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त,शिवप्रेमी यांचे मन दुखवल्यामुळे राज्यपाल यांचा निषेध नोंदवण्यात करिता विरेगाव येथे मंगळवारी दहा वाजता तीव्र स्वरूपाचा निदर्शने व आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला आहे.यावेळी उपस्थित कृष्णा खलसे,ॲड.हरीदास लांडे,श्रीकांत राठोड,कृष्णा पिसोरे,राम कातकडे,महादेव भोकरे,ऋषिकेश कावळे,सुनील चव्हाण,बाळासाहेब जाधव,अनिल जाधव,शिवाजी जाधव,गणेश बाहेरकर,गणेश जाधव,राम गुंजाळ,रामेश्वर जाधव,मचिंद्र राठोड,शरद जाधव,गोवर्धन जाधव,बालासाहेब जाधव,आकाश खरात,बालासाहेब देवडे,विलास घाटे,दिपक राऊत,कृष्णा काटकर,जिवा जाधव आदी शिवप्रेमी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

सांगवी खुर्द येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात वाद एका वयोवृद्ध व्याक्तीस मारहाण चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्री मध्ये नाचण्यावरून वाद झाला यात एका ६० वर्षीय वृद्धास फावडयाच्या दांडाच्या मारहाणीत जबर जख्मी करून इतर दोन जणांना मारहाण केले असुन, तीन जणांना चौघांनी मारहाण जख्मी केल्याची घटना घडली असुन, यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या संदर्भातील मिळालेली माहीती की सांगवी खुर्द ता.यावल या गावात हळदीचा कार्यक्रम होता, लग्न आले म्हणजे वाजंत्री आली वाजंत्री आली म्हणजे नाचणाऱ्यांचा गोंधळ झाला , अशाच प्रकारे गावात एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. वाजंत्री नाचणारे व त्यात झालेल्या गोंधळ या मध्ये नाचण्यावरून वाद झाला व कल्पेश रमेश पवार, राहुल विजय सावळे, विनायक सुरेश पवार व केदार विजय सावळे रा. सांगवी खुर्द या चौघांनी नारायण बारकू चौधरी व त्यांची मुलगी प्रमिला विनोद पाटील ,लहान मुलगा पंकज नारायण चौधरी यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी फावड्याच्या लाकडी दांडाने दुखापत केली व आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी व पोलीस करीत आहे.

धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील शेतकरी मजुरांची आत्महत्या

0

 

संदीप राऊत धारणी

धारणी मुख्यालय पासुन अवघ्या तीन की मी अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील युवक नानकीलाल सावरू भिलावेकर वय 38,याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली म्रुताची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली असता रात्री नानकीलाल घरी एकटाच होता शेजारी आई वडील,काका काकु चे घर आहे सकाळी नानकीलाल ला उठायला उशीर झाला म्हणून आई त्याला उठवायला त्यांच्या घरात गेली असता मुलगा नानकीलाल घरात फाशीवर लटला दीसला असता त्यांच्या आईने टाहो फोडला तसेच वडील व शेजारी धाऊन आले आनी सदर बाब धारणी पोलीस स्टेशन ला कळवीले माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेन्द्र बेलखेडे यांनी त्यांचे अधिकारी पि एस आए, श्रीखंडे, पोलीस अंमलदार जांबु,व मोहीत आकाशे यांना घटनास्थळी पाठवले पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले गावातील मित्र व नातेवाईक च्या चर्चेत म्रुत नानकीलाल ने सोलापूर अकलुद ऐथील ऐका शेतकऱ्यां कडुन ऊस तोडणी करीता पैसे घेतले होते परंतु स्वाता च्या शेतातील कामे करण्याकरिता तो सोलापूर ला जाऊ शकत नव्हता असे बोलले जात आहे धारणी तालुक्यात शेकडो परप्रांतीय लोकांनी कामांकरिता जास्त पैशाचे प्रलोभन दाखवून मेळघाटातील शेकडो गावातील मजुरांना कामावर घेऊन जाण्याकरीता पैसे वाटले आहे अशी सुद्धा माहेती मिळाली आहे पुढील तपास धारणी पोलीस करत आहे सध्या

बाळापूर तालुक्यातील निबा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

यंदा खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेतकरयांना सरसकट 25 हजार रुपये मदत देण्यात यावी ,पीक विमा,सह अनेक मांगण्या संदर्भात निंबा फाट्या वर शिवसेना नेते उमेरश जाधव उपजीलाप्रमुख रवींद्र पोहरे तालुका सचिव महेश बोर्डे . उपतालुका प्रमुख उमेश उबाळे . उल्पसंख्यक शहझाद खान . बबलु देशमुख – गणेश देशमुख . गोपाल पाटिल व सर्व
पदअधीकारी यांच्या नेतृत्व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उरळ पुलिसांचा कडक बंदोबस्त लावन्यात आला होता उरळ पुलिस ठाणेचे ठाणेदार अनंत राव वडत कार
उप निरिक्षक गोमासे . व इतर कर्मचारी उपस्थित होते

जालना शहराचे वैभव असलेला “बडीसडक” रस्त्यासाठी  रु.५.७५ कोटी मंजूर:

0

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना- शहराचे वैभव असलेला ‘बडीसडक’ नावाने ओळखला जाणारा रस्ता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक पर्यंत रस्त्यासाठी दिनांक 18/11/2022 रोजी महाराष्ट्र शासनाने रु.५७५ लक्ष मंजुर केल्याची माहिती केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.निवेदनामध्ये पुढे असे म्हटले आहे की, 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असताना ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरातील विविध सिमेंट रस्त्यासाठी रु.70 कोटी मंजूर केले होते, या मंजूर निधीतून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहेत. जालना शहराला सिमेंट रस्ते ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखविले. अगोदरच्या काळामध्ये जालना शहरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले होते,नागरिकांना याचा खूप त्रास होत होता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला होता, परंतु ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी मंजूर करून आणलेल्या रु.70 कोटी निधीमधून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले त्यामुळे शहरातील नागरिकांनी ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे धन्यवाद देऊन आभार मानले.परंतु दरम्यानच्या काळात 2019 मध्ये बहुमत येऊनही भाजपा सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे शहरातील महत्त्वाचा आणि जालना शहराचे वैभव असणारा “बडीसडक” या नावाने ओळखला जाणारा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक(मुर्गी तलाव) पर्यंतचा रस्ता सिमेंटीकरण करण्याचे राहून गेला,आघाडी शासनाच्या काळातही या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडली होती, हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नव्हता आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला या रस्त्यावरून जावे लागत असे एवढा हा रस्ता महत्त्वाचा होता.दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडी शासनाची सत्ता जाऊन भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत आले आणि या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या, आपल्या रस्त्याचे भाग्य उजळणार ना.केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणणार असा विश्वास त्या भागातील नागरिकांमध्ये निर्माण झाला.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे हा रस्ता जालना शहराचे वैभव असतानाही जाणून बुजून दुर्लक्ष तर होत नाही ना ? शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटची बनली मग  बडीसडक साठी निधी मंजूर का होत नाही असा प्रश्न करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली.त्यामुळे ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे बंधू मा.भास्कर (आबा) दानवे यांना त्या परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन समस्या जाणून घेण्याचे सांगितले.त्यानुसार मा.भास्कर (आबा) दानवे यांनी श्री.मनीष बगडिया, चेतन देसरडा व विजय कामड यांच्यासह श्री.धानवाला यांच्या घरी दोन वेगळ्या दिनांक १७/११/२०२२ रोजी रात्री ८.०० वा त्या परिसरातील नागरिकांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घेतल्या, बैठकी मधील सर्व नागरिकांनी बडीसडक हा रस्ता खूपच खराब झाला असून हा रस्ता चांगल्या पद्धतीने भूमिगत नालीसह बनवावा अशी विनंती केली.या बैठकीचा अहवाल मा.भास्कर (आबा) दानवे यांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांना फोनवर कळविला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दिनांक 18/11/2022 रोजी सदरील रस्त्यासाठी रु.575 लक्ष महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याची माहिती ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.जालना शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रलंबित असलेले दोन प्रश्न ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी चुटकीसरशी सोडविले. जालना शहरातील कन्हैयानगर समोरील रस्त्याचा प्रश्न व जालना शहराचे वैभव असलेला रस्ता बडीसडक या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सदरील दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहिले नव्हते, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते, या रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झाले होते तर चार ते पाच नागरिकांचा बळीही या रस्त्याने घेतला होता. मात्र भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत येताच ना.रावसाहेब पाटील दानवे ॲक्शन मोड मध्ये आले आणि कन्हैयानगर समोरील रस्त्यासाठी वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, जालना यांच्या कॅबिनमध्ये मीटिंग घेतली आणि तात्काळ सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले व प्रत्यक्षात काम सुरूही झाले आहे. “बडीसडक” या रस्त्यासाठी रु.575 लक्ष निधी मंजूर करून आणल्याने हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रलंबित दोन प्रश्न केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी चुटकीसरशी सोडविला,हे फक्त दानवे च करू शकतात असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

गोवर्धन कोल्हे,स्वीय सहाय्यक
(ना.रावसाहेब पाटील दानवे)

अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन सुध्दा नेर व इतर काही मंडळ का वगळण्यात आले,ते तात्काळ नुकसान ग्रस्त बाधीत यादीत समाविष्ट करण्यात यावे असा इशारा मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहेत:

0

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना-जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कपाशी,सोयाबीन,तसेच फळ पिकाची अतोनात नुकसान झाले होते.सदर नुकसान होऊन सुद्धा शासन-प्रशासने ते जाणून-बुजून दुर्लक्ष करून वगळण्यात आले आहेत.याचे काय कारण आहेत.नेर व इतर काही मंडळ अतिवृष्टीमुळे बांधीत यादीमध्ये तात्काळ समाविष्ट करावे व गोरगरीब,कष्टकरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी.असा इशारा मनसेतर्फे तहसीलदार जालना यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.अन्यथा मनसेच्या वतीने येत्या दोन दिवसात आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनात जे काही बरे वाईट किंवा अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील,याची आपण नोंद घ्यावी. या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड,तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे,मधुकर कुरेवाड,राजेश राठोड यांच्या स्वाक्षरया आहेत.

शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक येथे निषेध आंदोलन

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक हिंगणघाट येथे आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंग कोषारी व भाजपा खासदार शुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्याबाबद राज्यातील जनता सर्विकडे रोष व्यक्त करत आहे राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा व तसेच खासदार त्रिवेदी यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे व्यक्तव राज्यातील जनतेकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द राष्ट्रवादी युवक काँग्रेस कदापी सहन करणार नाही. करीता कारंजा चौक हिंगणघाट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला..
यावेळी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, जिल्हा सचिव नितेश नवरखेडे,विध्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष राहुल जाधव, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष तेजस तडस, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर,तालुका संघटक आकाश बोरीकर, शहराध्यक्ष पंकज पाके, लिलाधार मडावी,गौरव तिमांडे, पंकज पाराशर, राहुल कोळसे, युवराज माऊस्कर, रितू मोघे, अमोल तडस, हर्षल तपासे, अभिजित लोखंडे, पवन काकडे, दिपाशु ढेगले, आदित्य बुटे, अमित मुळे, जनक पटेल, मो.शाकीब, मनोज हुमाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या बेताल विधानाचा मा जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा शिवसेनेच्या वतीने केला निषेध.

0

 

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले. यामुळे महाराष्ट्रासह तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. या विधानाचा निषेध म्हणून बुलडाणा विधानसभा शिवसेनेच्या वतीने मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हाप्रमुख बुलडाणा यांच्या नेतृत्वात म. आ. जिल्हा संघटिका सौ जिजताई राठोड, उप जिल्हा प्रमुख संजय हाडे, मा तालुका प्रमुख डॉ मधुसूदन सावळे, उप जिल्हा संघटिका नंदिनीताई रिंढे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा येथे आज दिनांक २१/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन करून त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भगत सिंह कोश्यारी हे वारंवार बेताल विधाने करत असून त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावत आहे. त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नसून, महाराष्ट्रातील जनता यापुढे हे कदापि खपवून घेणार नसल्याचे मनोगत याप्रसंगी तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पं. स. मा सभापती सुधाकर आघव, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, वै.आ. तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, शहर संघटक जगदीश मानतकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, आशिष बाबा खरात, गजानन उबरहंडे, सतीश राजपूत, अनिल रिंढे, किशोर कानडजे, बबन खरे, संदेश वानखेडे, रामदास काकडे, पद्माताई परदेशी, राहुल जाधव, विनोद तोटे, राहुल शेलार, रवींद्र भोंडे, सचिन मिसाळ, विकी जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
◼️♦️◼️♦️◼️♦️◼️♦️◼️

राज्यपाल कोशारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदी विरोधात निषेध आंदोलन पदावरून काढण्याची मागणी

0

 

विठ्ठल अवताडे शेगाव

आज स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा संभाजी ब्रिगेड यांच्या कडून निषेध आंदोलन करण्यात आले , छत्रपती शिवराय यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी तथा भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वर कारवाही करून त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी करत घोषणा बाजी देऊन कोषारी आणि त्रिवेदी यांच्या बॅनर ल पैदळी तुडवण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी ,तालुका प्रमुख दत्ता वाघमारे , माजी तालुका प्रमुख रमेश पाटील , माजी नगर सेवक आशिष गणगणे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे ,उमेश पाटील अवचार ज्ञानेश्वर निंबाळकर, भूषण मापरी ,युवासेना जिल्हा उपप्रमुख विशाल लहाने शहर प्रमुख शिवा कराळे , युवराज पाटील ,यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

कलाध्यापक उत्तम वानखेडे यांना ” राष्ट्रीय रत्न ” पुरस्कार प्राप्त उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे (केसरीमल नगर विद्यालय सिंदी रेल्वे) यांना युवभाग्य फुड्स लि.कंपनी,ढगा व डाॅ.मनोहर आडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “युवराज फुड्स चा पहिला वर्धापन दिनानिमित्त”राष्ट्रीय पुरस्कार व व्याख्यान

0

गुड्डू कुरेशी सिंधी रेल्वे

” दि .१९/११/२२ला स्थळ:- माधवराव काठावाले सभागृह अप्रोच रोड, वरुड, जिल्हा-अमरावती येथील आयोजित सोहळ्यात कार्यक्रम विशेष आकर्षण व अतिथी मिस इंडिया युनिवर्स, निर्माती व अभिनेत्री *रुपल मोहता* यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील कलाशिक्षणाबद्दल केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ” *राष्ट्रीय रत्न* ” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्री रोग व प्रसुती तज्ञ तथा सत्य शोधक फाउंडेशन चे माजी अध्यक्ष डॉ मनोहर आडे,व रोटरी क्लब च्या अध्यक्षा डॉ सोनाली आडे कार्यक्रमाचे अध्यक्ष जांयंट्स गृप ऑफ वरुड चे माजी अध्यक्ष श्री नितीन खेरडे प्रमुख अतिथी रितेश शहा, राजेंद्रजी आडे, रमेजी चिचकार, प्रफुल्लजी अनासाने, विलास कडू, अनिकेत फुटाणे, राहुल कुबडे, जनार्दन निंबुरकर, श्याम गावडे, अर्चना शिष्याने, मनोज ठेवले, आयोजक युवराजजी ठाकरे, नितिन ठाकरे, डायरेक्ट भाग्यश्री वानखेडे तर याप्रसंगी “शून्यातून विश्व निर्माण करणारी ….” आज ५०० करोडचा बिझनेस करणारी व २५०० महिलांच्या हाताला काम देणारी महिला ” सुपरिचित असलेल्या *कमल परदेशी* यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले.
या सोहळ्याप्रसंगी जांयंट्स गृप वरुड चे माजी अध्यक्ष नितीन खेरडे व निता खेरडे, दिलीप वानखेडे यांचा सत्कार घेण्यात आला…. तसेच देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकुण २५ व्यक्तीला व महिलांना *राष्ट्रीय स्तरावरील* *”राष्ट्रीय रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे हे आपल्या कलाशिक्षण क्षेत्रात विविध कला प्रयोग करीत असतात. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी नेहमी नवनवे प्रयोग, विविध स्पर्धा, परीक्षा, विविध उपक्रम राबवित असतात.व याच त्यांच्या अनोख्या कलाशिक्षण क्षेत्रातील प्रयोगामुळे, उपक्रमामुळे युवभाग्य फुड्स प्रोडुसर लि.कंपनी ढगा व डॉ मनोहर आडे मित्र परिवार यांनी कलाध्यापक उत्तम वानखेडे यांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील “राष्ट्रीय रत्न”पुरस्कार देऊन गौरविण्यात आले….
शाळेचे मुख्याध्यापक विलासराव येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर शाळेचे अध्यक्ष श्री अतुलभाऊ टालाटुले ,सचिव राजुभाऊ पात्रिकर, कोषाध्यक्ष अशोकराव दवंडे,सदस्या निताताई टालाटुले व इतर सदस्यगण, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पत्रकार , व्यापारी गण, विदर्भ साहित्य संघ शाखा सिंदी चे पदाधिकारी इत्यादींनी वानखेडे सरांच्या यशस्वीतेकरीता व सिंदी शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले बदल अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक केले ….