Home Blog Page 237

चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ पोलीस स्टेशनला यश.

0

 

Akola प्रतिनिधी
अशोक भाकरे

अकोला -:चोरीला गेलेले 94,736 /- रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात,उरळ येथील पोलीस स्टेशनला यश.
अधिक माहिती अशी कि,अकोला जिल्ह्यातील बाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ येथे आज रोजी दिनांक -: 30 नोव्हेंबर रोजी पोस्ट परिसरातील मागील चार ते पाच महिन्यापासून फिर्यादी यांनी आपले मोबाईल मिसिंग झाल्या बाबत उरण पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या.

त्याबाबत पोलीस स्टेशनं चे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शना खाली एक पथक तयार करण्यात आले. मोबाईलचा सायबर सेलची मदत घेऊन सदर मोबाईल तात्काळ शोध लावण्यात उरळ पोलीस स्टेशनला यश आले. व आज 30 नोव्हेंबर रोजी सदर फिर्यादी नामे कुणाल भीमराव तायडे राहणार. निंबा ,
संजय महादेव वानखडे राहणार.

गायगाव,विशाल श्रीपत परघरमोर रा. स्वरूपखेड,
विष्णू रामेश्वर बोर्डे राहणार शिंगोली,
अशपाक अहमद देशमुख राहणार. लोहारा, रोहित भास्कर चवरे राहणार.

अंत्री मलकापूर,नागेश राजू पाटील रा. खंडाळा. अधिक दोन इसम असे एकूण, 09 लोकांचे मिसिंग झालेले एकूण 09 मोबाईल.
सदर मोबाईल यांची अंदाजे किंमत 94,736/- रुपये व तसेच फिर्यादी माणिकराव रामभाऊ टाले रा.बादलापूर यांचे गुन्ह्यातील 21000/- रुपये रोख हे त्यांना परत करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे उरळ पोलीस स्टेशन ने फिर्यादी यांचा मुद्देमाल हा त्यांना परत करण्यात आला आहे.


सदर कामगिरी करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार, पोलीस अंमलदार राजाराम राऊत,अशोक पटोकार,शैलेश घुगे, सुनील सपकाळ आदी.

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण प्रभारी श्रीरामजी मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन:

0

 

Jalna प्रतिनिधी:(जालना)भाजपा भटके विमुक्त आघाडी चे राज्यव्यापी अधिवेशन २२ डिसेबंर रोजी नागपूर येथे घेण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची पूर्व तयारी म्हणून संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी चे सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण चे प्रभारी श्रीरामजी मुंढे हे आज दिनांक ३० नोव्हेबंर रोजी जालना जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना दौऱ्यावर आले होते.त्यांनी सांगितले की,नागपूर येथील भटके विमुक्त आघाडीचे अधिवेशनासाठी जास्तीत-जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेत व राहिलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी व अहवाल लवकरात-लवकर पाठवावेत अशा प्रकारची मागणी त्यांनी भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश तारगे यांना सांगितले आहे.तसेच जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी,युवा जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,महिला आघाडीच्या पदाधिकार्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन मुंढे यांनी केले आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ.रमेश तारगे,उद्धव जायभाये,दिलीप जाधवर,सुहास मुंढे,वसंत शिंदे,तुकाराम राठोड,रामनाथ राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड तसेच शहरातील दिलीप जाधव आणि वडार समाज बांधव व त्यांचे सहकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jalna

आमदार,नगराध्यक्ष, कंत्राटदार मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

दि.२८नोव्हेंबर
हिंगणघाट :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नगरपरिषद हिंगणघाटच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जी. बी. एम .एम कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्लॅब व छताचे पाणी मुरल्यामुळे लावण्यात आलेल्या सिलिंग सीट पडले हे माहीत झाल्यावर शिव सेनेच्या वतीने पाहणी केल्यावर आमच्या पाहणीत आले कि या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे दरवाजे, सिलिंग च्या शीट,शौचालय चे बोगस काम करण्यात आले आहे हे आमच्या निर्देशनात आले म्हणून
त्या करिता वर्धा जिल्हाप्रमुख अनिल भाऊ देवतारे तथा बाळाभाऊ शहागडकर ,यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सोनोले मॅडम यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देतांना वर्धा जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक श्रीधर कोटकर, मनीष देवडे ,भास्कर ठवरे ,बंटी वाघमारे ,शंकर मोहम्मारे ,शहर संघटक मनोज मिसाळ,यांचे उपस्थितीत होते. निवेदन देण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली असता शाळेचे काय आर्थिक नुकसान झालेले आहे . तेथील सर्व फोटोग्राफ घेण्यात आले व पडलेल्या भागाची पाहणी करण्यात येऊन , तिथे विद्यार्थ्यांची विचारपूस करून चौकशी केली असता कुठलीही जीवित हानी झाली नाही याची खात्री करून घेतली. पंरतू नगर परिषदेने तब्बल चार वर्षांपूर्वी आराखडा मंजूर करून, नगरपरिषदची शाळा नव्याने बांधकाम हाती घेण्यात आले होते. त्या बांधकामा करिता शासनाकडून 8 कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले व ती शाळा नव्याने बांधण्यात आली व तिचे लोकार्पण घाईघाईने केंद्रीय मंत्री श्री .नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले .स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी स्थानिक लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व येथील लोकप्रतिनिधी(आमदार) तसेच नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता इमारत लोकार्पण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिली .परंतु सदर इमारतीत एवढा दोष असतांना सुद्धा येथील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याची या लोकप्रतिनिधीना व प्रशासनाला कोणी अधिकार दिला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने नगरपरिषद चे मुख्यधिकारी यांनी आपल्या विभागा कडून जाहीर स्पष्टीकरण दिले की, कंत्राटदाराचे सुरक्षा राशी जमा ठेवलेली आहे .परंतु आमचे म्हणणे असे आहे की, कॉन्ट्रॅक्टदाराच्या सुरक्षा राशी असून सुध्दा एकाद्या विद्यार्थी चा जीवितहानी झाली तर ती भरून निघेल का ? याबद्दल मुख्याधिकारी साहेबांनी, खुलासा करावा यानंतर देखील अशा परिस्थितीत असे लक्षात येते की, या घटना पुनश्य: होऊ शकते.याला नाकारता येत नाही, याचे कारण आम्ही जरी टेक्निकली नसलो तरी वरतून छताचे जे पाणी टीप टीप गळत आहे त्यावरून असे आम्हाला जाणवले. यावेळी जीवित हानी झाली नाही परंतु असे काही घडल्यास याला जबाबदार कोण राहील याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी कंत्राटदार व लोकप्रतिनिधी आमदार यांनी द्यावी! अन्यथा लोकार्पण घेणाऱ्या आमदार,नगराध्यक्ष, कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.असे केले नाही तर आम्ही शिव सैनिक मुख्याधिकारी साहेबांचा घेराव करू हे मात्र नक्की.निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे उपशहर प्रमुख- संजय पिंपळकर, शंकर झाडे, जयंत रोहनकर, लक्ष्मण बकाने, नरेंद्र गूळकरी,विभाग प्रमुख – रुपेश काटकर, सचिन मुळे, मोहन तुमराम,नितीन वैद्य, दिनेश धोबे,अनंता गलांडे, सुनील आष्टीकर,दिलीप चौधरी, आशिष जैस्वाल,देवा शेंडे, भास्कर मानकर,हिरामण आवारी,बलराज डेकाटे,चंदू भुते, गोवर्धन शाहू मोठया संख्येने उपस्थित होते

शेतकऱ्यांचे जळालेले ट्रांसफार्म २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या. अन्यथा आंदोलन :- अक्षय पाटील

0

 

जळगाव जा. :- यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात केली त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हरभरा,गहू, कांदा व इतर भाजीपाला पिके पेरलेली आहे.

ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची साधन म्हणून बोर,वीर आहे. ते शेतकरी आपल्या पेरलेल्या पिकाला पाणी द्यायच्या तयारीत आहेत. परंतु महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील काही गावातील शेतकरी मात्र हैराण होतांनी दिसतात त्याचे कारण असे की काही ठिकाणी शेतातील ट्रान्सफॉर्म हे बंदअवस्थे मध्ये पडलेले आहे. तर काही ठिकाणी डिपीमध्ये ऑइल कमी व इतर तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही.

जे ट्रान्सफॉर्म जळालेले आहेत असे ट्रान्सफॉर्म दुरुस्त करा याकरता महावितरण कडे अनेक गावातील शेतकरी मागणी करीत आहेत. यामध्ये पाटण शिवारातील बेद्रे डिपी व तरोडा खु. शिवारामधील गावातील शेतकऱ्यांनी बिलाचा पैसा गोळा करून महावितरण कडे पैसे जमा सुद्धा केले.

परंतु पैसा भरून सुद्धा दाहा-पंधरा दिवस उलटून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्म भेटत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

खरंतर उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहील जाते त्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास जर महावितरण तर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापिही सहन केल्या जाणार नाही ही मागणी घेऊन आज महावितरण कार्यालय गाठत जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी धडक दिली. जर २ दिवसांमध्ये शेतकऱ्यानां ट्रान्सफॉर्म दिले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपकार्यकारी अभियंता यांना दिला.

यावेळी तालुक्यातल व वडशिंगी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

नगर परिषद हिंगनघाट द्वारा राबविण्यात येत आहे शाळाबाह्य विद्यार्थी मुहिम

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिला परिषद वर्धा , यांचे पत्र क्रमांक शिक्षण/सशिअ/307/202. दिनांक: 14 /11/2022 अनव्ये नगर परिषद, हिंगनघाट Hingnghat द्वारे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलाना शालेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी नगर परिषदे तर्फे कलोडे भवन जवल ,वडर वस्ती कारखाने व बांधकामाचे क्षेत्र ,स्टेशन फैल ,वस्ती कारखाने व बांधकाम क्षेत्र, वीट-भट्टी क्षेत्र ,बस स्टॉप जवडील क्षेत्र , कारखाने व बांधकामाचे क्षेत्र व नंदोरी रोड व नागपुर Nagpur रोड वरील कारखाने व बांधकाम क्षेत्र ,विट-भट्टी क्षेत्रामध्ये जावुन ,दिनांक 20 नोव्हेबर 2022 ते दिनांक. 5 दिसेंबर 2022 या कालावधी मध्ये सर्वेक्षण करण्या साठी श्री हर्षल गायकवाड मुख्य अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांची आदेशानुसार श्री प्रवीण काळे प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद हिंगनघाट

यांचा नियंत्रणामध्ये श्री निलेश शिंदे प्रशासकीय अधिकारी नगर परिषद हिंगनघाट यांच्या देखरेखे खाली, शहर मध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असुन नगर परिषदेतर्फ या कामासाठी मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक नगर परिषद प्राथमिक शाला नगर परिषद हिंगनघाट ,यांच्या वति ने सहायक शिक्षक व शिक्षिका कल्पना कारामोरे, अरविंद निमजे, छाया राईकवार ,पिंकी बघेल, आरती माहुरे, एस के मस्के, सुनीता भूमर नीलिमा तेलतुंबरे, विजय बोरकर, कविता चौहान, प्रेमकुमार पालीवाल , मीना आडकीने यांच्या मार्फत मोहिम राबविण्यात येत असून. दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ,रोजी कचरा वेचणायांचे पाल्य ,संत ज्ञानेश्वर वार्ड, रिठे काँलोनी परीसरमध्ये एकुण 9 शाळाबाह्य विद्यार्थी आढलुन आले,त्या विद्यार्थियांना जवळील शहालंगड़ी प्राथमिक शाळा हिंगनघाट.

येथिल शाळेत दाखल करण्यासाठी तेथिल मुख्याध्यापक श्री सिंगोटे, कविता घोड़े (विषय तज्ञ) ,सुनीता गजभिए (बालक संरक्षक) पंचायत समिति हिंगनघाट व नगर परिषदे तर्फे प्रवीण काळे, प्रशासन अधिकारी (शिक्षा विभाग) नगर परिषद हिंगनघाट. प्रेमकुमार पालीवाल सहायक शिक्षक, श्रद्धानंद हिंदी प्राथमिक शाला ,कविता चौहान व मीना आडकिने सहायक शिक्षिका लोकमान्य तिलक नगर परिषद प्राथमिक शाळा हिंगनघाट

यांचा उपस्थिति विद्यार्थियांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी दाखल करण्यात आले.तसेण ईतर शहरामधे कुठे शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्यास श्री मधुकर बावने पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक यांच्या दूरध्वनी क्रमांक: 9970566880 या वर माहिती देण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

कोरपावली विरावली रस्त्यावर पादचाऱ्यास धडक देत मृत्युस कारणीभुत अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल

0

 

यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली विरावली दरम्यान पादचारी व्याक्तीला धडक देवुन झालेल्या भिषण अपघाती मृत्यु बाबत यावल पोलीसा ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भातील मिळालेली अशी की , काल दिनांक २८ नॉव्हेबर रोजी दुपारी १२वाजेच्या सुमारास कोरपावली येथील राहणारे फिरोज लतीफ तडवी वय ४२ वर्ष यांचा कोरपावली ते विरावली रस्त्यावरील महेलखेडी येथील शेतकरी मधुकर रायभान पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याने जात असतांना यावल कडून कोरपावलीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच १९डीव्ही ७२२९या वाहनास नांव गाव माहीत नाहीत अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अविचाराने वाहन चालवित विरावली कडील रस्त्याच्या डावीकडे पायदळ शेतात जाणाऱ्या फिरोज तडवी यांना जोरदार धडक देत दुखापत करून मृत्युस कारणीभुत ठरला असून , अपघातातील मयताचे भाऊ रशीद लतीफ तडवी वय ४५ वर्ष यांनी दिनांक २९ नॉव्हेबर रोजी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय देवरे हे तपास करीत आहे . दरम्यान अपघातास कारणीभुत वाहनास पोलीसांनी जप्त केले आहे .

युवासेना उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची निवड*

0

 

 

इस्माईल शेगाव  प्रतिनिधी

आगर:-युवासेना अकोला उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची नियुक्ती करण्यात आली असून,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे युवासेना सचिव वरुन सरदेसाई शिवसेना संपर्क प्रमुख श्री. प्रकाश शिरवाडकर याच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री. नितीन देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गोपाल दातकर तसेच युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनात ओम साकरकार यांची नियुक्ती करण्यात आली. अंशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण या विचारातुन कार्य करावे व तसेच या पदावरून जनतेच्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून द्यावा तसेच जन कल्याणकारी कार्य करुन पक्षाची प्रतिमा उचावण्यास हातभार लावावा.

असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर यांनी ओम साकरकार यांना नियुक्ती पत्र देताना अकोला येथील शासकीय विश्राम गृहामध्ये केले.यावेळी नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख व युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे, विशाल घरड,आदित्य चावरे,उज्वल काळणे,शुभम चावरे,अतुल साकरकार, गोपाल निवाणे,चेतन गोरले,पंकज वासनकार,लकी गावंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ओम साकरकार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय सर्व पदाधिकारी व सर्व तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.

हिंगणघाट येथे महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी साजरी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-दि. 28 नोव्हेंबरला नंदोरी चौक येथे अखिल भारतीय महात्मा फूले समता परिषद च्या वतीने महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी कार्यक्रमात मा. कविता ताई मूंगले (जिल्हाध्यक्ष)यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या जीवना बद्दल माहिती दिली तसेच या वेळी कार्यक्रम ला उपस्थित सुजाता जाभूळकर, कविता भोमले ,लता भूते , आरती काळे, कविता सलामे,
प्रकाश मेश्राम, ओम दानदी शूभम हिवंज, कैलाश ठाकूर विनोद शंभरकर अतिश ओमकार, अतुल ओमकार सूर्यभान बगीले ,राहुल गुप्ता उपस्थित होते

Police Bharti पोलिस भरती प्रक्रियेतील तांत्रीक व्यत्यय थांबवा भरती इच्छुक उमेदवारांचे प्रशासनाला निवेदन

0

 

Akola प्रतिनिधि अशोक भाकरे

Akola अकोला, दि २८: महाराष्ट्र शासन जी पोलीस भरती प्रक्रिया घेत आहे त्यामधील तांत्रीक बिघाड दुर करुन तरुण तरुणींचे भविष्य वाचवावे असे आवाहन एका निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाला करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील Police Bharti पोलीस भरती करिता फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून भरती प्रक्रिया ही अनेक वर्षांनी होत असून अनेक उमेदवारांना या भरतीमध्ये फॉर्म भरण्याच्या तयारीत अडचणी येत असून फॉर्म भरण्याकरिता इंटरनेटची साईट वारंवार बंद चालू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म हे वेळेत भरणे शक्य होत नसून अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत तासनंतास इंटरनेटवर बसून रहावे लागत आहे .

याबाबत लोकसेवा करिअर अॅकाडमीने जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर गंभीर समस्येबाबत लक्षात आणून दिले व पोलीस भरती फॉर्म ची प्रक्रियेच्या साईटची माहिती घेऊन पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून या फॉर्मची भरण्याची तारीख वाढवून द्यावी अशी लेखी मागणी करण्यात आली यावेळी लोकसेवा करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. डाॅ. गजानन वाकोडेंसह शेकडो फॉर्म भरणारे उमेदवार आणि पालक आवर्जुन उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांमार्फत या मागणीचे निवेदन गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,(gruh rajymantri Mumbai सचिव गृह राज्यमंत्री मंत्रालय मुंबई, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही देण्यात आले.

Police Bharti “पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी”

0

 

“पोलीस भरती अर्ज Police bharti करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या कडे मागणी”

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.फॉर्म भरण्यासाठी अवघे एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून केली आहे.

“अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होतं आहे. ही संधी गेले तरी काही उमेदवाराच वय देखील संपत आलं आहे तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागत असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.”

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.फॉर्म भरण्यासाठी अवघे एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवून केली आहे.

“अनेक उमदेवारांचे अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने काही उमेदवारांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारांना अडचणी येत आहे. सतत शासनाची वेबसाइट स्लो झाल्याने अर्ज कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा राहिला आहे. अनेक वर्षानंतर ही भरती होतं आहे. ही संधी गेले तरी काही उमेदवाराच वय देखील संपत आलं आहे तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातून अनेक उमेदवारांना सायबर कॅफेतमध्येच अर्जासाठी रात्र काढावी लागत असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.”