Home Blog Page 238

Pik Vima Nuksan पिक विमा काढलेल्या परंतु पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम द्या

0

 

संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ए आय सी AIC कंपनीकडून आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला आहे व या विमा कंपनीकडून पिक विम्याचे पैसेही काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा pik Vima काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रकमेचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडे पैसे मिळालेले आहेत व काही शेतकऱ्यांनी पिक विमा काढला मात्र त्यांना अद्याप पर्यंत ही पीक विमा चे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे तात्काळ पिक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या या मागणणीसाठी शिवसेना किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना 28 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना जी विमा रक्कम मिळालेली आहे ती अत्यंत तोकडी आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रक्कमेचे पैसे आलेले नाहीत तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे .

त्यामुळे पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे फोटो विमा कंपनीचे साईडवर अपलोड केले त्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम (क्लेम) मिळालेला नाही तर काही शेतकऱ्यांना प्रीमियम पेक्षाही विमा रक्कम कमी मिळालेली आहे तसेच नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करीत असताना विमा कंपनीच्या साईडवर काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करता आले नाही त्यामुळे विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम (लाभ) दिलेला नाही त्यामुळे विमा काढल्यानंतरही बरेचसे शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे तात्काळ विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम द्या ,अन्यथा आम्ही संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे , शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप तालुकाप्रमुख, राहुल मेटांगे, शिवाजी अढाव , धनंजय आवचार, बाबुराव जाधव ,नितीन भिसे ,सुनील मुकुंद, रवींद्र मारोडे विशाल बांगर, शेख अब्दुल शेख लुकमान, पुंडलिक खानझोड अमोल देशमुख आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

रामनगर-जैतापूर,बाजीउम्रद-तलाव सावंगी,मानेगाव-लालदेव फाटा रस्त्यांची दुरावस्था,तिन्ही रस्त्यांना तात्काळ मंजूरी देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री Ravsaheb Danve यांना साकडे

0

 

Jalna जालना:(प्रतिनिधी)-तालुक्यातील रामनगर परिसरात असलेल्या रामनगर ते जैतापूर फाटा 13 कि.मी,बाजीउम्रद-तलाव सावंगी 10 किमी.आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा 3 कि.मी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून,या तिन्ही रस्त्यांच्या कामांना मंजूरी देवून तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.

,अशी मागणी भाजपा ग्रामीण,भाजपा तालुका युवा मोर्चासह ग्रामस्थांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे(Ravsaheb Danve Patil )यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

आहे.यानिवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,जालना तालुक्यातील रामनगर ते जैतापूर फाटा 13 कि. मी रस्ता,बाजीम्रद ते तलाव सावंगी फाटा 10 कि.मी रस्ता तर मानेगाव (जा) ते लालदेव फाटा या तिन्ही मार्गांवरील रस्ते पूर्णतः खड्‌ड्यात गेले असून,दळण – वळणासाठी या रस्त्याव्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसह कष्टकरी वर्गाच्या विकासाला खोडा बसत आहे, रामनगर ते जैतापूर फाटा या दरम्यान मौजपुरी, भिलपुरी,निरखेडा,मानेगाव (खा), मानेगाव(जा),गणेशपूर यासह मोतीगव्हाण, दहिफळ, तलाव सावंगी,जैतापूर,अंतरवाला,पाहेगाव आदी 30 ते 35 गावांचा संपर्क येतो.तर बाजीउम्रद – तलाव सावंगी फाटा मराठवाडा – विदर्भ सीमा जोडणारा रस्ता आहे.आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा रस्ता या भागातील शेतकऱ्यांना दळण – वळणासाठी एकमेव रस्ता असून, या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत तर या रस्तावरील पुल पूर्णतः खचल्याने या रात्री – उपरात्री शेतात ये – जा करणे जिकिरीचे झाले आहे.जालना हे जिल्हा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा तालुक्याशी दररोजचा संपर्क येत असून,शेतकऱ्यांनासह, व्यापारी,दुकानदार,शालेय विद्यार्थी आदिनां वरील तिन्ही रस्तावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.खड्डे चुकविण्याच्या नादात दररोजच किरकोळ अपघात होत.

असून,महिला,प्रवाशी, रुग्ण यांना हि मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या भागातील ग्रामस्थांना रात्री – अपरात्री गरज पडल्यास वाहनचालक टाळाटाळ करतात. कारण रस्तावरील खड्‌ड्यामुळे वाहने नादुरुस्त होत आहेत.या तिन्ही रस्त्यांची ऐकून परिस्थिती पाहिल्यास या खराब रस्तामुळे या भागाच्या विकासालाच खोडा बसला असून रामनगर ते परेगाव फाटा, बाजीउम्रद ते तलावसावंगी फाटा आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा या तिन्ही रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.

, अशी मागणी करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष पांडूरग पोहेकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय डोंगरे,भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परसराम तळेकर,नारायण मोहिते,नारायण जाधव,तुकाराम राठोड,बी.एस.शेळके,सतीश हांडे,दौलतराव भुतेकर,दत्ता जाधव,विष्णू गुळवे,नारायण वाघचोरे,गोरक्षणाथ गायकवाड,राजेश कुरलीय यांच्यासह बाजीउम्रद,भिलपुरी,मानेगाव (खा),मानेगाव(जा),गणेशपूर,दहिफळ,मोतीगव्हाण,पाहेगाव,तलाव सावंगी,अंतरवाला आदी गावांमधील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

साकळीच्या महीलेस मोबाईलवरून शिवीगाळ करणाऱ्या अज्ञात व्याक्ती विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR दाखल

0

 

यावल Yaval ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , जयश्री गोकुळ अडकमोल वय २८ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे आपल्या घरात करीत असतांना त्यांना मोबाइल क्रमांक७८८७५८५६८या मोबाइलवरून एका अज्ञात व्या वक्तीने कॉल केला ,दरम्यान जयश्री अडकमोल यांनी संबधीत फोन करणाऱ्यास आपण कोण बोलत आहे असे विचारले असता , फोन करणाऱ्या त्या व्याक्तिने नांव न सांगितल्याने महीलेने त्यास पुन्हा आपण कोण असे त्या व्यक्तीस विचारणा केल्यावर त्या व्याक्तीने कुठलेही कारण नसतांना फोन स्विकारणाऱ्या महिलेस शिवीगाळ केली म्हणुन , जयश्री अडकमोल यांनी यावल पोलीस ठाण्यात त्या मोबाईलवरून शिविगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन .

पुढील तपास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत असुन , दरम्यान पोलिसांनी या संदर्भात सदरच्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता हा क्रमांक दुर्ग मध्य प्रदेशातील व्याक्तीचा असल्याचे लोकेशन दिसुन येत असल्याचे पोतीसांनी सांगीतले .

आशिषसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

0

जळगाव जामोद :दि- 26 तालुक्यातील सूनगाव येथे राहणारे युवा उद्योजक आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत यांना नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले .

सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे राहणारे आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत हे कॉस्मेटोलॉजी मध्ये एम. टेक. असून कॉस्मेटिक सायन्सच्या फिल्डमध्ये ते सध्या देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा सौंदर्य प्रसाधनांसाठी लागणारा कच्च्या मालाचा उद्योग सध्या भरभराटीस आलेला आहे.

 

अतिशय ग्रामीण भागातून व बिकट परिस्थितीतून शिक्षण घेत प्रथम एक वर्ष नोकरी करत व नंतर लगेच स्वतःचा व्यवसाय उभा करत आज या क्षेत्रात आशिष सिंह देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, दिल्ली व देशाबाहेरही सौंदर्यप्रसाधन उत्पादने पाठवल्या जात आहेत. दिनांक 26 ला संध्याकाळी पुणे

स्व. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित एका शाही कार्यक्रमात जगप्रसिद्ध सरपंच पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार आशिषसिंह यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी मंचावर कृषिरत्न डॉक्टर संजीव माने, योगातज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील,

व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे हे असून महाराष्ट्र व गोवा या ठिकाणहून विविध क्षेत्रातील विशेष प्रगती करणारे युवा उद्योजक व तज्ञ यांना नॉमिनेट करत यातून एका तज्ञ समितीने हे पुरस्कार साठी योग्य व्यक्तींची निवड केली याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना आशिषसिंह यांनी तरुणांना बारावी सायन्स झाल्यानंतर कॉस्मेटिक्स क्षेत्रात बी टेक व एम टेक हे शिक्षण घेऊन या क्षेत्राकडे वळण्याची विनंती केली.

ते समाजकार्यात अग्रेसर असुन मोटिवेटर यूटुबर मोटिवेतर youtuber आहेत. आपल्या यशाचे श्रेय ते आपले कुटुंबीय व मित्र यांना देतात.याप्रसंगी सर्व स्तरातून आशिषसिंह यांचे कौतुक होताना दिसत आहे.

मुंबई २६ /११च्या भ्याड दहशदवादी हल्ल्यात हिंगोणा गावातील शहीद चौधरींच्या स्मारकावर सैनिक व ग्रामस्थांनी वाहीली श्रद्धांजली

0

यावल/Yawal ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

मुंबईच्या२६/११ (mumbai 26/11 terror attack) रोजी दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी ( Muralidhar Chaudhari)यांच्या शहीद स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

यावल तालुक्यातील हिंगोणा या गावचे रहीवासी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांचा मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज (CST station Mumbai) रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर कार्यरत असतांना चौदा वर्षापुर्वी २६/११च्या दहशदवादी भ्याड हल्यात नागरीकांचे रक्षण करतांना दहशदवाद्यांशी लढतांना प्रथम गोळी लागून वीरमरण आले होते. अशा हया देशासाठी आपले बलीदान देणाऱ्या शहीद जवानाला आज त्यांच्या मुळ हिंगोणा गावातील त्यांच्या शहीद स्मारकावर आज भावपुर्ण श्रद्धांजलि वाहन्यात आली.

हिंगोणा येथे शहीद मुरलीधर चौधरी यांचे स्मारकावर श्रद्धांजली प्रसंगी दहिगाव येथील पैरामिलेट्री फोर्स वेलफेअर एसोशिएशन यावल तालुका चे अध्यक्ष राजेश जगताप, माजी सैनिकासह उपाध्यक्ष सौखेडा सिमचे माजी सैनिक अय्युब तडवी, सचिव माजी सैनिक मोहन येऊल यांचे सह परिसरातिल सैनिक माजी सैनिका सह हिंगोणा ग्रामपंचायतचे सदस्य शांताराम तायडे, छबू तड़वी आणि जावेद तड़वी सह मोठया संख्येत ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहून शहीद सैनिकास श्रध्दांजली अर्पण केली.

दानापूर येथे संविधान दिन साजरा

0

दानापूर – गोपाल विरघट

येथिल ग्रामपंचायत भवनात आज संविधान वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ.सपना धम्मपाल वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत चे लिपिक अशोक रहाणे यांनी संविधाचे सार्वजनिक वाचन करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .
यावेळी मा, ग्रामपंचायत उपसरपंच साहेबराव वाकोडे, माजी सरपंच महादेवराव वानखडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश येऊल , वसुदेव खवले, रविंद्र तायडे, भास्कर दांदळे, गणेश खडसान, राम हागे , पांडुरंग मानकर, गोपाल विरघट , बाळकृष्ण श्रीनाथ आदींची उपस्थिती होती.तसेच सिद्धार्थ नगर येथे संविधान उद्धेशिकेचे वाचन करण्यात आले रुपनंदा महिला मंडळ , सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय संविधान दिनानिमित्य प्रदीपकुमार नागपुरकर यांचे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, नांदगांव येथे विद्यार्थांना हस्ताक्षर सुधाराचे धडे

0

 

सचिन वाघे प्रतिनिधि

हिंगणघाट:- येथील बहुआयामी व्यक्तिमत्व युवा-संस्कार मासिकाचे संपादक तथा भारतभर हस्ताक्षर सुधार प्रकल्प प्रचारक म्हणून लाखो विद्यार्थी वर्गाचे हस्ताक्षर सुधार करणारे प्रदीपकुमार नागपुरकर यांचे जिल्हा परिषद संचालित पंचायत समिति, हिंगणघाट अंतर्गत नांदगांव(बोरगांव) उच्च माध्यमिक शाळा येथील वर्ग ५ ते ८ चे विद्यार्थांना भारतीय संविधान दिनानिमित्य भारतीय युवा संस्कार परीषदेचे वतीने एक दिवसीय हस्ताक्षर सुधार शिबीराचे आयोजन *चला हस्ताक्षर सुधार व संविधान वाचन करु* या उपक्रमा अंतर्गत स्वयम हस्ताक्षर सुधार वर्गाचे मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी विद्यार्थी भावा-बहिनींना *”मी सरळ, माझी रेषा सरळ, रेषा सरळ, माझे अक्षर सुलेखन सरळ यासह जीवन सरळ”* हा मुलमंत्र देत प्रयोगात्मक भुमिका समजावून सांगतांना विद्यार्थ्यांना सोप्या व सहज भाषेत ग्रामगीता, दासबोधात सांगितलेले ओव्यांचा कित्ता देत सरळे, वाटोळे (गोलाकार) व मोकळेपणा हा त्रिसूत्री प्रयोग देवून हस्ताक्षर सुधार करण्याचे तंत्र-मंत्र विद्यार्थ्यांनकडून गिरवून घेतले. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगांव शाळेचे मुख्याध्यापक शंकर निमसरकार, तर प्रमुख मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर व सतिश घोडे गुरुजी प्रमुख अतिथी, शिबीर वर्ग संयोजक अंकित दारुंडे, यासह शाळेचे माजी विद्यार्थी साहिल बुरबुरे,सुमित तेलंग, हर्षल, जयेश बुरबुरे,आदी मान्यवर मंचासीन होते.हस्ताक्षर वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदीपकुमार नागपुरकर यांनी एक दिवसीय दोन तासाच्या सत्रात विद्यार्थ्यांना अक्षरात प्रयोगात्मक बदल घडवून जीवन कसे सरळ जगता येते हे अक्षराच्या सरळ समांतर रेषांचा परिपाठ शिबीरार्थी विद्यार्थी वर्गाकडून करवून घेतला.*सुंदर लिहिणे अक्षर ओळी, स्पष्ट वाचणे पुस्तक सगळी। जरा न दिसावी टाळाटाळी, कुठेही विद्यार्थ्यांची।।* रेषा सरळ उंची समान अक्षराचा यातच प्राण हा सिध्दांत देत नागपुरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वर्गाचे सुत्रसंचालन अभय लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल थुल याने मानले, यशस्वितेसाठी संकल्प पाटिल, अभिजीत फुसाटे, सुजीत दारुंडे, मिहिर खोंडे, जयदेव दारुंडे, भोला मस्कर, प्रशांत वादाफळे, सिमा बेले, ज्योति महाबुधे, मिनाक्षी घोडमारे, वनमाला तेलंग, माया वाघमारे, आदीने सहकार्य केले.

सिंदी (रेल्वे) गुंज कॉन्व्हेंट तालुकास्तरी व्हॉलिबॉल स्पर्धेत विजयी

0

 

शालेय तालुकास्तरीय 17 वयोगटात व्हॉलिबॉल स्पर्धेत गुंज कॉन्व्हेंट नी गुड शेफर्ड कॉन्व्हेन्ट सेलू यांना अंतिम सामन्यात हरवत विजयी मान पटकविला या चमू मध्ये अभय मडावी, हमराज गावडे, पवण तलांडे,आर्यन हीचमी,राजेश होळी,रोनित हेडो,अर्जुन वेलदा,आकाश वेलाडी या विद्यार्थ्यांनी उत्तम असा खेळ करत विजय प्राप्त केला सर्व विद्यार्थ्याचे संस्थापक संजय भन्साली मुख्याध्यापक श्रीकांत घोडमारे व कोच भोवेश नागफासे सर, राजेश बोंगाडे सर, मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

संविधान दिवसाचे औचित्यसाधून अतुल वांदिले, अनिकेत कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती हार घालून केले अभिवादन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व अनिकेत कांबळे यांनी संविधान दिना निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती हार घालून अभिवादन केले.
भारतीय सविधानाने स्वातंत्र्य ,समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य प्रदान केली.या मूल्याची जपवणूक करत समाजातील उत्कर्षासाठी कटीबद्ध राहण्याचा निश्चय करू असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित फोटो प्रदर्शनीला भेट दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कांबळे, नितीन भुते, किशोर चांभारे, गजू महाकाळकर,अजय परबत,राहुल जाधव, सुशील घोडे, प्रशांत मेश्राम,पंकज भट्ट, आकाश बोरीकर, दिनेश नगराळे, शाहरुख बक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिन लोकोत्सव व्हावा”

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित बदनापूर जि.जालना राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत
‘ ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा कराण्यात आला.यावेळी शाळेतुन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.त्यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या-१.जब तक सूरज चाँद तब तक संविधान २. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात ३. समता,बंधुता,लोकशाही संविधाना शिवाय पर्याय नाही ४. कर्तव्य,हक्कांचे भान मिळवून देते संविधान ५. संविधान एक परिभाषा है मानवता की आशा है ६.संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती देई आम्हा अभिव्यक्ती ८.मिळून सारे देऊ ग्वाही सक्षम बनवू लोकशाही ९.संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू १०. सर्वांचा निर्धार संविधानाचा स्वीकार.असे विविध घोषणाने गाव दणाणून टाकले तसेच शाळेत विद्यार्थांनी गाणे म्हणाले इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यानी कु.प्रिया जाधव,कु.आरती जाधव,आठवी इयत्ता मधुन कु.दिपाली जाधव,कु.नेहा जाधव ह्या विद्यार्थ्यींनी छान प्रकारे भाषणे दिली.भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली.त्या घटनेला ७३ वर्षे होत असून,२६नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या,असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मा.वाघमारे सी.जी.केले आहे.यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की घटना परिषदने २६नोव्हेंबर१९४९रोजी राज्यघटना देशाला अपर्ण केली.त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सूरू झाली.आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली.त्यांचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.तसेच ते पुढे म्हणाले की,देश पातळीवर हा दिवस साजरा केला जात असुन,संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा.
मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही,समता,स्वातंञ्य,बंधुभाव ही मूल्ये आणि एकात्मता बळकट करावी,असे आवाहान शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी केले आहे.तसेच २६/११/२००८ च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली.तसेच यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.