Home Blog Page 239

मारूळ ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या भुमिगत गटारींचे काम निकृष्ठ प्रतिचे कामाची चौकश करावी

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मारूळ ग्रामपंचायत kअंतर्गत बांधण्यात आलेल्या भुमिगत गटारीचे बांधकाम हे संबधीत ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असुन या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे लिखित निवेदन रिपाई (आठवले गट )च्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष राजु रमजान तडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे . या संदर्भात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना दिलेल्या निवेदनात राजु रमजान तडवी यांनी म्हटले आहे की , मारूळ तालुका यावल येथील ग्रामपंचायती अंतर्गत गावात भुमिगत गटारींचे काम हे शासनाने ठरवुन दिलेल्या अंदाजपत्राकानुसार करण्यात आलेले नसुन ठेकेदाराच्या माध्यमातुन गावातील जुन्याच गटारींवर नवे बांधकाम दाखवण्यात येणार असल्याचे गोंधळ सद्या सुरु आहे . यामुळे ज्या उद्देशाने शासनाच्या लाखो खर्चाच्या निधीतुन मारूळ बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर भुमिगत गटारींचे काम होणे अपेक्षीत होते मात्र तसे होतांना दिसत नाही . तरी या सर्व निकृष्ठ व बोगस गटारींच्या कामांची तात्काळ चौकशी करण्यात येवुन संबधीत ठेकदाराकडुन योग्य प्रकारे व गुणवत्तापुर्ण करून घ्यावे तसेच संबधीत ठेकेदार जो पर्यंत शासकीय अंदाज पत्राकानुसार भुमिगत गटारींचे काम करीत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवु नये , पंचायत समितीच्या वारिष्ठांकडुन जर या कामांची चौकशी होवुन कार्यवाही न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )च्या माध्यमातुन यावल पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी यांनी निवेदन स्विकारले

अवैद्यरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक..

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट दि.१७ नोव्हेबर
शहरामध्ये पेट्रोलींग करीत असता बस स्थानक शेजारील शिवमंदीराचे परिसरात २ इसम अवैध गांजाविक्री करीत असतांना आढळले.
हिंगणघाट पोलिसांचे डीबी पथकाने त्यांना दि.१५ रोजी असता अटक केली असता त्यांचेकडून १०५ ग्राम वजनाचा सुमारे ११०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
सदर आरोपींची सागर उर्फ स्वागत दुर्गाप्रसाद यादव(२१)रा. रामनगर वार्ड व हिमांशु रमेशराव सोनकुसरे(२१) रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट अशी ओळख आहे.
आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ एका प्लास्टीक पन्नीमध्ये १०५ ग्रॅम वजनाचा गांजा एकुण किमंत १००० रू. चा माल मिळाला. उपरोक्त प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत अप. क्र. ११९३/२०२२ कलम ८, २०(ब) २९ एन.डी.पी.एस. अन्वये आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनात सपोनि. प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.

धारणी शहर मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

0

 

संदीप राऊत धारणी

धारणी पंचायत समिती कार्यालय मधे रक्तदान शिबिर कार्यक्रम मधे मध्यप्रदेशातील बुराहनपुर येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ब्लड कलेक्शन वैन घेऊन या रक्तदान शिबिर मधे आपल्या सहकारी डाक्टर सोबत आले तसेच धारणी ऐथील उपजिल्हा व तालुक्यातील रुग्णालय अंतर्गत जेवढे रूग्ण बुराहनपुर जिल्हा रुग्णालयात उपचार करीता जातात त्यांना दवाखान्यातील रेफर सिट वर ब्लड सुविधा व ऊपचर केला जातो आज धारणी पंचायत समिती कार्यालय अंतर्गत शिक्षक तसेच ग्राम सचिव, पंचायत समिती अधीकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबिर मधे ब्लड डोनेट केले यावेळी उपस्थित पंचायत समिती चे गटविकास अधिकारी महेश पाटील,मय्युर दलाल, सचिन राठोड वैद्यकीय अधिकारी, डॉ तिलोत्तमा वानखडे तालुका आरोग्य अधिकारी ,सौ कविता पवार विस्तार अधिकारी आरोग्य, तसेच बुराहनपुर डॉक्टर नसिम, डॉक्टर कमलेश सालवे, सुभाष चव्हाण, फारुख खान,स्वप्नील ढगे, लक्ष तीवारी व, अतुल जाधव यांनी ब्लड शिबिर मधे मोलाचे परीश्रम व योगदान दिले दुपारी चार वाजेपर्यंत 150 कर्मचारी नी ब्लड डोनेट केले व ब्लड डोनेट करणार्या कर्मचारी ची सारखीच गर्दी दीवसभर होती

धारणी नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व शुरु असलेले रोड नाली चे कामे निक्रुष्ठ

0

 

संदीप राऊत धारणी

धारणी शहर मध्ये सध्या आवश्यकता असलेले रोड सोडुन भलत्याच ठीकानी ठेकेदारांच्या मर्जी ने कामे शुरु आहे मात्र या कामावर नगर पंचायत कार्यालय चा ऐकही अभीयंता हजर नसुन ठेकेदार आपल्या मर्जीने कामे करत आहे परीनामी तीनच महीन्यात रोड नाली चे हाल समोर दीसत आहे प्रभाग क्रमांक पाच मधे जिव घेना खड्डा पडला आहे, तसेच पोष्ट आॅफीस रोड वर सहा महीन्यापासुन रोड चे हालच हाल झाले आहे व रोड वर सांड पाणी वाहत आहे पेव्हीगं ब्लॉक रोड वरून फुटुन पडले आहे मात्र नगर पंचायत अधिकारी आॅल ईज वेल,असल्याचा देखावा करत आहे धारणीत शुरु असलेल्या बोगस विकास कामावर ठेकेदार ने काम केल्यानंतर अभियंता ची हाजेरी लागते वास्तविक पाहता संपूर्ण कामे शाखा अभियंता च्या देखरेखीखाली झाली तरच धारणीचा रोड व नाली बांधकाम व्यवस्थीत रीत्या होऊ शकते असे सुज्ञ नागरिकांन कडुन बोलले जात आहे

दत्तापूर धांदरवाडी येथील आत्माराम राठोड यांचा रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू:

0

 

(तुकाराम राठोड)

प्रतिनिधी:(सिंदखेडराजा)तालुक्यातील दत्तापूर (धांदरवाडी) येथील रहिवासी आत्माराम राठोड वय ४५ वर्ष यांचा आज सकाळी ट्रक व मोटरसायकल दुर्घटने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.ही घटना माळसावरगाव घाटात घडली आहे.बेधुंद ट्रक चालकांने मोटरसायकला उडवल्याने आत्माराम राठोड यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.आत्माराम राठोड हे दुचाकीवरून माळसावरगाव घाटातून प्रवास करीत होते.एक्सीडेंट एवढा भीषण होता की,आत्माराम राठोड यांच्या गाडीला जोरात धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाले आहे.ही घटना अतिशय दुर्देवी व मन हेलावून टाकणारी आहे.या घटनेमुळे(दत्तापूर)धांदरवाडी या गावावर व तांड्यावर शोक-कळा पसरली आहे.आत्माराम राठोड यांच्या पश्चात-पत्नी,आई-वडील, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर राठोड परिवाराला या दुखातुन सावरण्याची सद्बुद्धी देवो.हि नम्र विनंती.”ओम- शांती- ओम”, “भावपूर्ण श्रद्धांजली”.

कुरूळ येथे जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-आज दिनांक १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे दैवत,प्रेरणास्थान, जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती परधान समाज कुरूड च्या वतीने मोठ्या उत्साहात,आनंदात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
जयंती निमित्ताने जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावात नाचत-गाजत रॅली काढण्यात आली.जनजागृती मोहीम राबवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.मिरवनुकीत परधान समाजातील सर्व पुरुष महिला,युवक-युवती व गावातील इतर नागरिक, तसेच बाहेर गावातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.
दरम्यान डॉ किरसान,महेंद्र ब्राम्हणवाडे,राजेश ठाकुर, सरपंच विनोद मडावी, मुख्याध्यापक बंडू सेडमेक,गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,देवळीचे डॉ मेश्राम,पोलिस पाटील यामिना भोयर,महेश परचाके,पांडुरंग तलांडे,सुरेश मरसकोल्हे,मोरेश्वर गेडाम,राजेंद्र गेडाम,सुभाष मडावी,कालिदास मडावी, प्रमोद परचाके,छगन टेकाम,रामदास सडमाके,महेश मडावी व सर्व विर बिरसा मुंडा आदिवासी परधान समाज संघटना कुरूड आणि गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ मेश्राम, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते व मुख्याध्यापक बंडु सेडमाके यांचे उपस्थित बहुसंख्य नागरीकांसाठी मार्गदर्शन लाभले.

हेडलाईन- ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एम आय एम) मार्फत शेगाव तहसीलदारांना निवेदन

0

 

शेगाव प्रतिनिधि इस्माइल

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाला मदत करण्यासाठी व समाजाच्या बेरोजगार तरुणांना शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुलांना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. परंतु या मंडळामार्फत फक्त शैक्षणिक कर्ज योजना राबवली जात आहे.
शैक्षणिक कर्ज योजने सोबतच बेरोजगार तरुणांना मंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज प्रकरण मंजूर करून, त्यांना कर्ज वाटप करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाने मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी स्वातंत्रपणे उघडण्यात यावे. व कर्ज मंजूर प्रकरण हे मुंबई ऐवजी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयातून करण्यात यावे. वरील मागण्या तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदय व संबंधित मंत्री यांनी आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चासत्र बोलावून तत्काळ मार्गी लावावा अन्यथा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ऑल इंडिया मजलीस फतेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. पुढील सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा इशारा देखील देण्यात आला. आपल्या सहिणीशी निवेदन देताना (एम.आय.एम) चे शहर अध्यक्ष शेख मुख्तार हाजी शेख बुढाण, शेख जहीर शेख जमीर, शेख इरफान शेख इकबाल ,शेख सावीर शेख सत्तार, शेख मोईन शेख मुनाफ,अजगर बेग अख्तर बेग,शेख निस्मिल्लाह शेख इस्माईल,मोहम्मद जावेद मोहम्मद इकबाल इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

भारत जोडो महाराष्ट्राच्या शेवटच्या सभेला सोनिया गांधी , शरदचंद्र पवार , उद्धव ठाकरे एकाच मंचावरून सांगता करतील ?

0

 

स्थानिक भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात असताना शेवटची सभा दिनांक १८-११-२०२२ रोजी शेगाव येथे संपन्न होणार आहे ,या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून शेगाव शहरात लगबग सुरू झाली असताना काँग्रेस पक्षाचे सर्वच बडे नेते शेगाव मध्ये येत जात असल्याचे दिसत होते तर या निमित्ताने संपूर्ण शेगाव शहर काँग्रेस मय झाल्याचे दिसत असताना आज सकाळ पासून या सभेला काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी राष्ट्रवादी चे शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हजेरी लावतील तर अशी चर्चा सुरू आहे ,तर या संदर्भात असे की महाविकास आघाडी स्थापन होऊन तीन वर्ष झाले आहेत आणि अश्यातान महविकस आघाडीची एकजूट दाखवून विरोधना एकप्रकारे शक्तिप्रदर्शन दाखवण्या साठी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना या सभेचे आमंत्रण दिल्या मुळे या सभेमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तीन ही मोठे नेते एकत्र येऊ शकतात यात शंका नाही ,सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार यांची उपस्थिती राहील असे समजते तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची आगामी काळात बुलढाणा जिल्ह्यात जाहीर सभा असल्या मुळे या विषयी स्पश्ट मत सांगता येणार नाही ,अवघ्या तीन दिवसावर सभा असताना आता मोठ्या नेत्यांची उपस्थितीच्या चर्चेने तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण दिसत आहे हे मात्र नक्की

येत्या दोन दिवसात भारत जोडो यात्रा संतनगरी शेगाव मध्ये दाखल होणार

0

 

इस्माइल शेगाव प्रतिनिधि

नफरत छोडो भारत जोडो या संकल्पनेने खा. राहुल गांधी भारत जोडो पदयात्रा संपूर्ण भारतामध्ये करत असून कर्नाटक येथून पदयात्रेचा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील जील्हातून लवकरच बुलढाणा जिल्ह्यात देखील दाखल होणार आहे ७ नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड येथून देगलूर या ठिकाणीं दाखल झाली. लवकरच पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे त्यात विशेष म्हणजे संत नगरी शेगाव येथे 18 नोव्हेंबर रोजी पदयात्रा दाखल होणार असून,मोठ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तसेच लाखोच्या संख्येने मोब जमेल याच कल्पनेने शेगाव मध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने समितीच्या आयोजन केल्या जात आहे.संत नगरी राहुल गांधीं यांच्या पोस्टरने गजबजली आहे राहुल गांधी राज्यात 14 दिवस असून मोठे पदाधिकारी तसेच विविध ठिकाणी पदयात्रेचे दरम्यान लोकांची संवाद साधतील येथे 18 11 2022 ते 20 11 2022 जिल्ह्यात होणाऱ्या राहुल गांधी लोकसभा सदस्य यांनी भारत जोडो पदयात्रेचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जलम जळगाव जामोद येथील येथून मध्य प्रदेश राज्यांमध्ये प्रवेश करणार आहे सदर पदयात्राही शेगाव जलब माटरगाव वडशिंगी जळगाव जामोद निमखेडी भिंगारा तूनखुटी या गावातून मुख्य मार्गाने जाणार असून सदर पदयात्रा पाहण्याकरिता सोबत चालण्याकरिता हजारो नागरिक येण्याची शक्यता असल्याने सदर मार्गावर वाहतूक सुरू असल्यास पदयात्रेस अडचण निर्माण होऊन एखादा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर मार्गावरील वाहतूक दिनांक 18 11 2022 दिनांक 20 11 2022 नमूद केल्याप्रमाणे पर्यायी मार्गाने वळवणे गरजेचे असल्याबाबत कळविल्या जात आहे दंड अधिकारी बुलढाणा मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहे

प्रचलित मार्ग 18.11.2022
शेगाव ते अकोला

पर्यायी मार्ग – शेगाव ते खामगाव ते बाळापूर ते अकोला या मार्गे किंवा शेगाव निंबा फाटा ते उरळ गायगाव मार्गे अकोला

२) प्रचलित मार्ग – शेगाव ते बाळापूर

पर्यायी मार्ग – शेगाव ते खामगाव ते बाळापूर

३) दिनांक 19 11 2022 प्रचलित मार्ग- शेगाव ते जलंब जाणे येण्याकरिता

पर्यायी मार्ग- शेगाव खामगाव मार्गे जलम शेगाव कालखेड फाटा येउलखेड मच्छिंद्र खेड मार्गे माटरगाव जलम

शेगाव ते खामगाव लांजुळ खोलखेड माटरगाव भास्तन ते जलम भास्तन सगोडा मनसगाव शेगाव जलम

४) प्रचलित मार्ग दिनांक 20 11 2022 भेंडवळ ते जळगाव जामोद जामोद

पर्यायी मार्ग- भेंडवड ते पातूर्डा जळगाव जामोद जळगाव जामोद नांदुरा जलम

वडशिंगी मराखेड चांगेफळ ते मराखेड संग्रामपूर कडून जळगाव जामोद चांगेफळ मार्गे भेंडवळ

अशा स्वरूपाची जिल्ह्यातील पदयात्रा संपन्न होणार असल्याचे दिसत आहे.

विरावली गावात मोठ्या प्रमाणात विविध समस्या . उपाययोजना करावी म्हणून यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा प सदस्य ॲड देवकांत पाटील यांनी दिले निवेदन.

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

विरावली गावात मोठ्या प्रमाणात समस्यांनी थैमान घातले असून वेळो – वेळी मासिक मीटिंगमध्ये तोंडी- लेखी सूचना देऊनही सरपंच ,सचिव याकडे दुर्लक्ष करत असून वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहेत गटारांची अवस्था अत्यंत खराब- दयनीय झाली असून नवीन गटार बांधकाम करावे विरावली गावातील मेन रस्त्याचा गटारीवरील धापा पाच ते सहा महिन्यापासून तुटलेला असून वाहने जे – जा करतांना अपघात झाल्यास शारीरिक – आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे , शिवाय रस्त्याने चालताना त्या गटारीच्या धाप्यावरून लहान मुल म्हातारे माणसे यांचे पाय गटारीच्या अस्वच्छ, दुर्गंधी , पाण्याने खराब होत आहे. वाहने त्या (ध्याप्यावर ) गटारीमध्ये आपटली जातात त्या वाहन खराब होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक पाण्याचे कुंड खराब अवस्थेत असून त्याच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात चिखल होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्याची दुरुस्ती करून तेथे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे , त्याचप्रमाणे पंधरा वित्त आयोग निधीतून खालचे गाव फ्लेवर ब्लॉक बसवणे त्याचप्रमाणे गावात जाणारा मुख्य रस्ता त्याचे कॉंक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड होऊन जाते लहान मूल म्हातारी माणसे यांना पायी चालणे शक्य होत नाही वाहन चालवताना देखील तारेवरची कसरत करावी लागते यापूर्वीही ग्रामपंचायतला सरपंच सचिव यांना निवेदन दिले आहे तरी या मुख्य रस्त्यावर कॉंक्रिटीकरण प्राधान्य क्रमाने करणे आवश्यक आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये सार्वजनिक मुतारी ची मागणी मासिक मीटिंगमध्ये अनेक वेळा केली गेली त्या कडेही दुर्लक्ष होत आहे. वार्ड क्रमांक एक मधील शेजारी असणाऱ्या नाल्यात सांडपाणी साचले जात असून त्यातून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी त्या सांड पाण्याचे सुनियोजन करून नाल्याचे खोलीकरण करणे गाळ काढणे आवश्यक आहे अशा अनेक महत्त्वाच्या या मागण्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा विरावली गावातील नागरिक व आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तरी आपण आमच्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन वरील सर्व मागण्या मान्य कराल ही अपेक्षा व मागणी यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा विरावली ग्रा प सदस्य ॲड देवकांत बाजीराव पाटील यांनी सरपंच सचिव ग्रामपंचायत विरावली यांच्याकडे केली आहे .