Home Blog Page 240

सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था संदर्भात,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी केली पाहणी:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी नागरिकांची दिवसेंदिवस मागणी होत आहे.तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. की काय अशी भावना नागरिकांच्या मनात वारंवार निर्माण झाली आहे.तसेच मागील बऱ्याच दिवसापासून सोशल मीडिया,प्रिंट मीडिया तसेच युट्युब चायनल च्या माध्यमातून अनेक जणांनी या रस्त्या संदर्भात शासन- प्रशासनावर आरोप- प्रत्यारोप केले आणी पहावयास मिळाले.तसेच सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर व पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्ड्त रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती निर्माण झाली आहे.तसेच ऐजा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच एसटी बस सेवा देखील मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे.सदर ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवासांना व खाजगी वाहनांना जास्त प्रमाणात प्रवाशी भाडा द्यावा लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील ऐजा करणारे नागरिकांना व वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होत असून,याचा नाहक भुर्दंड त्यांना सोसावं लागत आहे.या रस्त्यावरुन दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना विलंब लागत असल्यामुळे अनेकांना आपलं जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार म्हणावे लागतील.या भागातील रस्त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती व डाग-डुगी करावी व नवीन व सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे.अशी मागणी मानेगाव व मौजपुरी सर्कल तसेच जालना तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल.तसेच
या रस्त्यासाठी दिनांक ०७/११/२०२२ रोजी सोमवारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन देण्यात आले होते.पण काही प्रमाणात प्रशासनाला जाग आली व अधिक प्रमाणात जाग करण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी दिनांक १६/११/२०२२ रोजी जिल्हाधिरी कार्यालय जालना येथे सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने उपोषणाला उपस्थित राहावे असे आवाहन रस्ता संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे.

आदिवासी तांड्यावर रिपाई ने केला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अनोखा बालदिन साजरा…

0

 

जळगाव जामोद येथील वाडी खुर्द येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाचे औचित्य साधून रिपाईच्या वतीने शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या परंतु सद्यस्थितीत शिक्षण प्रवाह उच्चणाऱ्या पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा म्हणून रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी नाविन्यपुर्ण उपक्रम वाडी खुर्द येथील पारधी तांड्या वरील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य ज्ञानवर्धक साहित्य यासह गुलाब पुष्प व खाऊचे वितरण करून या पारधी तांड्यावरील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी पारधी तांड्यावरील शिक्षणापासून वंचित असणारे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना रिपाई चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांच्यासह भास्कर भटकर अजब आगरकर अरुण शिरसाठ सतीश तायडे यांच्यासह पारधी तांड्यावरील विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र. ०८ मधील ४०० लाभार्थ्यांचे ‘धन्यवाद, मोदीजी !’ शुभेच्छा पत्र

0

 

सोलापूर प्रतिनीधी : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनहिताचे लोककल्याणकारी निर्णय घेऊन, विविध योजना आणून कार्यान्वित केल्याअसून. सोलापुरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी जनआधार फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अष्टोप्रहर मेहनत घेत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थांकडून झालेल्या एक हजार लाभार्थ्यांतील सर्व योजना मिळुन 400 लाभार्थ्यांनकडुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कृतार्थ भावनेने आभार व्यक्त करण्यासाठी आभारपत्रं पाठवून देणार असल्याचे आनंद गोसकी यांच्याकडुन सांगण्यात आले.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंर्गत सामान्य घटकातील रुग्णाला शासनाने निश्चित केलेल्या काही खासगी रूग्णालयात ५ लाख खर्चापर्यंतचे मोफत उपचार होतात. या योजनेसाठी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आणि भाजपचे कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी शिबीराच्या माध्यमातून एक हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड बनवून दिले.

पी. एम. स्वनिधी योजनेंतर्गत फेरीवाले, भाजीवाले, चहा कॅन्टीन अशा छोट्या-छोट्या व्यवसायांना चालना मिळावी, या उद्देशाने पी.एम. स्वनिधी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिका युसीडी विभागामार्फत अनेकांना सीएसी सेंटरच्या माध्यमातून जनआधार फाऊंडेशनने अर्ज भरून देऊन, १४० लाभार्थ्यांना, १० हजार रूपयांचं मिळवून दिले. दुसऱ्या टप्यात पी.एम. स्वनिधीच्या माध्यमातून २० हजार रूपयांचे कर्ज मिळवून दिले. कोरोनाच्या काळात कोव्हिड लसीकरण शिबीर राबवुन दिलेल्या नागरीकांकडुनही मोदीजींचे आभार व्यक्त केले.

‘चुल मुक्त भारत’ या अभियानांतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून २९० गॅस कनेक्शन, गॅस, शेगडी, रेग्युलेटर, लाईटरचे सेट लाभार्थांना देण्यात आले, या सर्व लाभार्थांक देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जूना प्रभाग क्र. ०८ नविन प्रभाग क्र १५ व जनआधार फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक्ष घरोघरी जाऊन प्रभागातील नागरीक कुठल्या योजनेचा लाभ याची विचारणा करून केंद्रसरकार च्या योजनेचा लाभ गेतलेल्या अशा सर्व लाभार्थ्यांकडून, ‘धन्यवाद मोदीजी ! शुभेच्छा पत्र लिहून घेऊन भाजप शहर कार्यालयात शहराध्यक्ष विक्रम देशमुख शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख , प्रशांत फत्तेपुरकर आणि ‘धन्यवाद, मोदीजी’ उपक्रमाचे संयोजक दत्ता पाटील सर दत्ता बडगु यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘धन्यवाद, मोदीजी’ लाभार्थ्यांकडुन भरून घेतलेले पोष्ट कार्ड सोलापूर भाजपा शहर कार्यालयातुन प्रदेश कार्यालयात पाठणार आल्याची माहिती भाजपा कार्यकर्ते धन्यवाद मोदीजी या अभियानाचे सहसंयोजक आनंद मधुकर गोसकी यांनी दिली.

रानमांजरच्या पिल्लाला समजले बिबट्याची पिल्ले

0

 

@ बटवाडी शिवारात पसरले होते भीतीचे वातावरण

बाळापुर तालुक्यातील बटवाडी शेतशिवारात एका शेतकऱ्याना दोन पिल्ले दिसली ती पिल्ले बिबट्यांची समजुन लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी पिल्ला सोबत बिबट व मादी पण असेल म्हणून तो रस्स्त्याच बंद केला होता. या बाबत त्वरीत गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले यावेळी वनविभागाचे अधिकारी आर एफ ओ राजसिंह ओवे यांनी वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक संघपाल तायडे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, यशपाल इंगोले, अक्षय पांढरे व मोहोड या रेस्कू टिमला घटनास्थळी पाठविले असता बाळ काळणे यांनी सदर पिल्ले हातात घेऊन शाहनिशा केली असता ती पिल्ले रानमांजराची निघाली ती अंत्यंत छोटी व चांगल्या अवस्थेतअसल्याने तिथेच सोडणे योग्य असल्याने सदर पिल्लांना शेतातच सोडण्यात आले यावेळी वन विभागाच्या चमुने उपस्थित गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले व त्यांच्या मधली भीती दूर केली या प्रसंगी ज्ञानेश्वर आखरे, दत्ता आखरे, जगन्नाथ आखरे, अंकुष मते, अरविंद कोकाटे,आदी गावकरी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

सुर्या न्यूज तालुका प्रतिनिधी संतोष काळे बाळापूर अकोला
_________________________________

विरेगाव ग्रामपंचायत एक पाऊल पुढे थेट डोर टू डोर आयुष्मान कार्ड के वाय सी योजना.

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-सिईओ मॅडम यांनी विरेगाव ग्रामपंचायतला भेट दिली आणि आविष्यमान कार्ड विषयी माहिती घेऊन चर्चा केली. आणि येत्या आठ दिवसांत सर्व डाटा झिरो झाला पाहिजे असे आदेश दिले आणि लगेच हि दखल आमचे ग्रामपंचायत आपरेटर विषाल मोठे यांनी घेतली आणि त्यांनी सहकार्यांना सोबत घेऊन डोर टू डोर आविश्यमान कार्ड योजनेंतर्गत जनतेला जनजागृती करून थेट योजनेंतर्गत माहिती दिली आणि त्यांच्या घरी जाऊन थेट आँनलाईन प्रोसेस सर्व लाभार्थी यांच्या घरीच करून अशक्य काम क्षणात शक्य करून दाखवले. विषाल मोठे याचं कौतुकास्पद कामगिरी ग्रामपंचायत कधीही विसरणार नाही असे सरपंच अमोलभैय्या जाधव हे म्हणले. त्यांना सहकार्य म्हणून आशा शेविका अगंनवाडी शेविका महिला बचतगटांच्या प्रमुख महिला तसेच आमच्या ग्रामपंचायत सचिव शारदा साबळे ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी ही वेळोवेळी लक्षवेधी सूचना करत सहकार्य केले आहे अश्या सर्व पदाधिकारी यांचे सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी आभार मानले आणि भविष्यात जनहितासाठी नेहमीच आपण सोबत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी काम करूयात- सरपंच अमोलभैय्या जाधव.

यावल चोपडा मार्गावर मालट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यु पोलीसात गुन्हा दाखल

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल चोपडा राज्य मार्गावरील रस्त्यावर वाहनचालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात एका मृत्यु झाला असुन , पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार दिनांक ९नॉव्हेबरच्या रात्री ९ वाजता यावल चोपडा मार्गा वरील केसरबाग हॉटेल जवळ ट्रक वाहन चालक राजु गोविंदसिंग ( गब्बर भाई ) राहणार इधलपुर तालुका मणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची १० चाकी मालट्रक वाहन क्रमांक आरजे ११जीए ७३८०हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मोबाईल बोलत भारद्याव वेगाने वाहन चालवित असतांना , चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने मालट्रक मधुन निघुन उडी मारीत असतांना रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या एका झाडावर मालट्रक आदळुन झालेल्या भिषण अपघातात स्वत गंभीर जख्मी होवुन मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत ठरला आहे . याबाबत महावीर कन्हैलाल राजपुत वय २८वर्ष राहणार ईधलपुर तालुका माणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वाहनचालक राजु गोविंदसिंग यांच्या विरूद्ध भादवी कलम३o४ ( अ ) २८९ , ३३७, ३३८ कलमासह मोटर वाहन कायदा नियम १८४ ( सी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या अपघाताचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

ठाकरे गटाचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांच्या जामीनवर सुटका झाल्याचा आनंद शिवसेनेकांनी फटाकेच्या आतिषबाजीत जल्लोषात केला आनंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शिवसेनाच्या वतीने शिवसेने(ठाकरे गट )ची मुलुक मैदान तौफ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने त्यांची ईडीने भाजप सरकारच्या ईशारावर केलेली अटक ही न्यायलयाने बेकायद्याशीर दाखवुन त्यांचा जामीन मंजुर करून घेतल्याचा आनंद जल्लोष शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी , तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे व शहरप्रमुख जगदीश कवडीवाले माजी नगराध्यक्ष दिपक बेहडे यांच्या नेतृत्वाखाली यावल चोपडा मार्गावरील भुसावळ टी पॉईटवर शिवसेनिकांच्या वतीने भाजपा सरकारच्या विरूध्द घोषणा देत फटाकेच्या आतिषबाजीच्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला यावेळी तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शरद कोळी ,शहर उपप्रमुख संतोष धोबी , माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , पप्पु जोशी , संतोष वाघ , आदीवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, योगेश चौधरी , अजहर खाटिक , शकील पटेल यांच्यासह मोठया संख्येत शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पंचायत समितीतील प्रभारी राजमुळे तालुक्याचा विकास खुंटला— शेखर पाटील

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

येथील पंचायत समिती मध्ये गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या प्रभारी राज मुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समिती मधील विविध विभागाच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्या असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी गट नेते शेखर पाटील यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

येथील पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षापासून गटविकास अधिकारी हे प्रभारी राहीले असल्याने पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच अधिकाऱ्यांकडे हा प्रभार राहिला पंचायत समितीच्या विविध विभागाच्या १५ तक्रारी पंचायत समितीच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये केल्या मात्र संबंधित विभागाकडून त्याचे अद्यापही निराकरण होत नसल्याचा आरोप शेखर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे पंचायत समिती मधील ग्रामविकास विभाग ,बांधकाम विभाग, कृषी विभाग , यासह महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या सुमारे १५ तक्रारी मासीक बैठकीत करण्यात आल्या होत्या ह्या तक्रारी मासिक बैठकीतही पटलावर ठेवण्यात आल्या होत्या मात्र वेळोवेळी तत्कालीन प्रभारी अधिकारी यांचेकडे चौकशीची मागणी केली. मात्र प्रभारी गटविकास अधिकारी सतस बदलत राहिल्याने तसेच विविध विभागात असलेल्या प्रभारी राज मुळे त्या तक्रारी तशाच प्रलंबित राहिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले . वरिष्ठांकडेही तक्रारी सादर करून तक्रारींचे निराकरण झाले नसल्याचे सांगत पंचायत समितीच्या कोणत्याही विभागात अधिकारी/ कर्मचारी नियमित हजर राहत नसल्याची तक्रारही त्यांनी करत यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप केला आहे.

तक्रारी प्रलंबित नाही

याबाबत गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले गेल्या दोन महिन्यापूर्वी शेखर पाटील यांनी एक तक्रार केली होती त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत माझ्याकडे दोन महिन्यापूर्वीच पदभार आला असून मागील काळातील त्यांचे तक्रारी संदर्भात माझ्याशी बोलणे झाले नाही. तरीही त्यांच्या प्रलंबित तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल.

Eknath Shinde मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

0

 

शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार बच्चू कडू, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी दिलेले निर्देश…..

गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार. सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधी यांच्या अर्थसहाय्याने हे दिव्यांग भवन बांधण्यात येणार

दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येईल, त्यासाठी

सिईओ मॅडमची,जालना जिल्ह्यातील पहिली भेट विरेगाव ग्रामपंचायतला – सरपंच अमोलभैय्या जाधव.

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-मा.सीईओ मॅडम,यांनी ग्राम पंचायत कार्यालय,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र,आणि जिल्हा परिषद शाळा,विरेगाव येथे आयुष्मान भारत कॅम्पच्या भेटीच्या माध्यमातून भेट देऊन गावातील विविध ठिकाणी पाहणी केली तसेच रेशन पासून थेट रोजच्या दैनंदिन दळणवळणाची चौकशी करत थेट जनतेला विचारणा केली की,रोज पाणीपुरवठा,होतो का? तसेच राशन मिळते का? ग्रामसेवक तलाठी शिक्षक ई.पदाधिकारी वैवस्थित काम करताय का? तसेच रमाई आवास योजनेंतर्गत आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच गायराण जमीन इ. विषयावर जनतेला चौकशी करत संबंधित पदाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत,तसेच आविष्यमान कार्ड विषयी जनतेला जनजागृती केली,आणि सूचना दिल्या की सर्व कामे जबाबदारीने पार केल्या पाहिजे अश्या सूचना दिल्या कर्मचाऱ्यांना,तसेच गावातील बरेचशे रोड खराब आहे.तर प्रपोज केलं का अशी ग्रामपंचायला विचरणा केली. आणि विस्तार अधिकारी,बिडीओ यांना सूचना दिल्या की तत्काळ प्रस्ताव मागणी करून आयोजन करण्यात आले पाहिजे अश्या थेट सूचना दिल्या आहेत.या वेळी गावातील सरपंच अमोलभैय्या जाधव,ग्रामविकास अधिकारी साबळे मॅडम,विस्तार अधिकारी सुर्यवंशी साहेब,डि.एच.ओ.डॉ. खेतगावकर,टि.एच.ओ.सोणी मॅडम,मेडिकल आफिसर डॉ. सूरज राठोड,डॉ.झूकते मॅडम,डॉ. आढावसर,डॉ.मस्के,डॉ.शेक,डॉ. हनवते, डॉ .ए.सी.शिंदे साहेब,डॉ. देशमाने ग्रामसेवक डोईफोडे सर,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत आपरेटर विषाल मोठे,बंडू शिंदे,आशा शेविका गायके,मोठे,अंगणवाडी सेविका,बचत गट महीला,इ ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ, उपस्थित होते.सिईओ मॅडम,यांनी विरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी भेट देऊन बर्याच ठिकाणी दैनंदिन दळणवळणाचा अभ्यास करून कौतुक ही केले. तसेच बर्याच चूका लक्षात आणून देत पदाधिकार्यांना ठनकाऊन दूरूस्त करण्यास ही सांगितले. असे सरपंच अमोलभैय्या जाधव, यांनी सांगितले.शेवटी अमोलभय्या,यांनी सिईओ मॅडम यांचे आभार मानले आणि विरेगाव ग्रामपंचायत वतिने ग्रामपंचायत कार्यालय येथे शाब्दिक स्वागत करत आभार मानले आणि मॅडम शी विरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विषयावर चर्चा करताना जिल्ह्यात आपण आपल्या दौऱ्यात पहीले माझे गाव निवडले.आपण गावात येऊन बर्याच विषयावर लक्षवेधी चर्चा केली आपल्या विचारातून भरपूर दिलासादायक विकसित सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा दिसते.आपल्यामध्ये,आम्हाला ही जनहितासाठी काम करायला आवडते मॅडम आम्ही ही मा.आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय.भविष्यात सर्व सहकारी पदाधिकारी ग्रामस्थ यांना सोबत घेऊन सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन दैनंदिन जनहित दैनंदिन दळणवळणाची धैयधोरणे राबविण्यात आम्ही चोखपणे काम करूयात.असे सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी सांगितले आहे.