Home Blog Page 24

revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी

0

 

revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीडीए कायद्यांतर्गत पंढरपूर तालुका पोलिसांनी केले स्थानबद्ध

अँकर : मंगळवेढा तालुक्यातील मूढवी
येथील कुविख्यात वाळू तस्कर आणि गुंड भैय्या उर्फ आकाश रोकडे, यास पंढरपूर तालुका पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक स्थानबद्ध केले. त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. गुरुवारी पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला स्थानबद्ध केले , आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

Policenews/ आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

भैय्या उर्फ आकाश रोकडे( वय 26) हा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात वाळू तस्करी करत होता. चोरी आणि दहशत पसरवणे अशा प्रकारचे गंभीर सहा गुन्हे त्याच्यावर होते.

हा कुठल्याही प्रकारचा वैध व्यवसाय करत नव्हता. पंढरपूर तालुका हद्दीतील ओझेवाडी, पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि आसपासच्या परिसरात भीमा नदी आणि मान नदीपत्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री तो करत होता.

यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत भेटीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणे, भीतीचे वातावरण तयार करणे यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचे वागणे त्रासदायक झाले होते.revenuenews

पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळूतस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केले होते त्याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, मंगळवेढा पोलीस ठाणे येथे येथे वाळू तस्करीचे पाच आणि
सरकारी कामात अडथळा आणणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल होते.

 

भैय्या रोकडे त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

revenuenews/जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार ,भैय्या रोकडे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन या कायद्याअंतर्गत कारवाई करून
त्यास अखेर पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन ,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

Policenews/ आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

0

 

जालना : आंदोलकास लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचा सवाल, प्रशासन मौन का?

Policenews:जालना येथे स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या घटनेमुळे जिल्हा तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

ताब्यात घेतलेल्या आंदोलकास पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत येत पाठीमागून कमरेत लाथ घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या घटनेवर प्रशासनाच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गोपाल चौधरी नावाचा आंदोलक कौटुंबिक वादात न्याय मिळावा म्हणून मागील अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होता. स्वातंत्र्य दिनी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

त्या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता उपअधीक्षक कुलकर्णी यांनी लाथ मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला आंदोलकाने न्याय न मिळाल्याने आत्मदहनाचा मार्ग पत्करल्याची खंत आहे, तर दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे प्रशासनाची प्रतिमा डागाळली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रशासन व गृहमंत्रालय मात्र अद्यापही मौन बाळगून आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की –गृहमंत्री कारवाई करतील का?
जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) साहेब या घटनेची दखल घेणार का?

आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई होणार का
व्हायरल व्हिडिओमुळे हा विषय जनतेमध्ये चर्चेचा ठरला असून “सामान्य माणसाने न्यायासाठी आंदोलन केल्यास त्याला अशा प्रकारे लाथा घालून वागवले जाते का?”

Policenews:असा सवाल आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे.या घटनेत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांना दुसरी कडे स्थायी पट्टे दया वॉर्डातील नागरिकांची मागणी(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट: संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांना दुसरी कडे स्थायी पट्टे द्या या प्रमुख मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

संत तुकडोजी वॉर्ड येथील कलोडे सभागृह समोरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे संत तुकडोजी वॉर्डातील रहिवाश्यांना अतिशय त्रासदायक ठरत आहे. येथील काही दुकानांमध्ये व झोपडपट्टीमध्ये दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येते. तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमीच छेड काढल्या जाते.

Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग

अतिशय खराब शब्दात बोलल्या जाते. तसेच कुठल्याही सामूहिक सणाला येथे दारू पिवून शिवीगाळ व भांडणे होता. तसेच झोपडपट्टीमध्ये कुठलीही परवानगी न घेता रात्री १२ वाजेपर्यंत डिजे वाजविला जातो. त्याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळे संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या रोगाचा सामना करावा लागतो. तसेच घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोर आणून टाकतात.

याबाबत हटकल्यास अंगावर मारायला धावून येतात. हा त्रास नेहमीचाच झाला असून, येथील झोपडपट्टीला दुसरीकडे जागा वा घरे देऊन स्थलांतरीत करा या मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून
आठ दिवसात अतिक्रमन न काढल्यास आक्रमक आंदोलन करू असे निवेदन संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

Hingnghat /यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोबे, दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक राजू भाईमारे, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, दिलीप बालपांडे,राम मेंढे,शरद ढोकपांडे,नितीन कोल्हे,लक्ष्मण राऊत, राहुल झाडे,रमेश राऊत,शीतल राऊत, प्रभा घिये,मेंढे, दम्यंती घुळघाणे, शीतल चेले,उमा भोयर, प्रज्ञा राऊत यांच्यासह संत तुकडोजी वॉर्डातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई येथे आझाद मैदानावर १४ जुलै २०२५ रोजी राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थ्यांचा भव्य छत्री मोर्चा घेण्याचा निर्धार (morchanews)

0

 

विकी वानखेडे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जळगाव जिल्ह्यातर्फे मा. आपले प्रशिक्षणाचे आधारस्तंभ तुकाराम बाबा यांनी सर्व युवा प्रशिक्षणातील संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या १४ जुलै २०२५ च्या मुंबई येथील मोर्चाच्या नियोजनासाठी सुरु केलेल्या सवांद दौऱ्याची सुरवात जळगाव येथून करण्यात आली.

दि. १२जुलै २०२५ रोजी जळगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष साबिरा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा. तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीला सुरवात झाली.

याप्रसंगी श्री तुकाराम बाबा यांचा भव्य सत्कार जळगाव
जिल्ह्याच्या वतीने युवा प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात आला. बैठकीला प्रमुख विषय म्हणजे येणाऱ्या आगामी काळात प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळवून द्यावा हा सर्वात मोठा विषय यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

मा. सरिता ताई यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणार्थी यांना विषेश संदेश या ठिकाणी दिला ते असे कि, जळगाव जिल्ह्यांनी सर्वात अगोदर प्रशिक्षणार्थीच्या हितासाठी झटणारे पहिले एकमेव संघटन म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी जळगाव चे नाव सदैव स्मरणात राहील, तसेच उंचशिखरा पर्यंत

पोहोचेल यासाठी प्रशिक्षणार्थीनी रोजगाराच्या मागणीसाठी व न्याय हक्कासाठी मुंबई येथे तत्पर उपस्थिती दर्शवावी. तसेच १४ जुलै ला होणाऱ्या महामोर्चासाठी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. येणाऱ्या १४ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या मुंबई विधानभवनावर एकदिवशीय छत्री आंदोलणासाठी मोठ्या संख्येने एकजुटीने हजर राहावे असे संबोधन केले.

पुढिल मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष हर्षाली साळुंखे यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थीना मुंबई येथे विधानभवनावर आणण्याचे नियोजन व भविष्यात येणाऱ्या रोजगार विषयी व्यथा मांडल्या व पुढील कामे कसे चिकाटीने करता येईल त्यावर मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. तुकाराम बाबा यांनी बैठकीला नवीन प्रारूप निर्माण केले, बैठकी दरम्यान प्रशिक्षणार्थी यांनी रोजगारासंबंधी

कश्या पद्धतीचे कामे जिल्ह्याच्या नेतृत्वानी केले पाहिजे हे त्यांनी सांगितले, प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी पर्यंत पोहचण्याचे काम केले पाहिजे, आंदोलनासंबंधी वर्तमानपत्रात जाहिराती, प्रत्येक तालुक्यात दोन बॅनर, आणि जिल्ह्याच्या स्थानिक स्तरावर जाऊन बैठकी घेण्याचे आणि आंदोलनासंदर्भात जनजागृती करावी. येणाऱ्या १४ जुलै २०२५ रोजी मुंबई मध्ये होणाऱ्या एकदिवशीय छत्री मोर्चा मध्ये जळगाव चे प्रशिक्षणार्थी एकजूट झाले पाहिजे, किमान निम्मे प्रशिक्षणार्थीची साथ असली पाहिजे अशी ग्वाही प्रशिक्षणार्थी कडून करून घेतली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पाटील, मोहिते यांनी केले. याप्रसंगी मयूर पाटील, भरत चौधरी विकी वानखेडे हेमंत पाटील, समीर तडवी, गौरव जोशी, देवयानी जगताप, हर्षाली कोळी, सुधीर पाटील,संदीप साळुंखे, आकाश सोनार, तुषार शिंदे ,महेंद्र सर ,संतोष पाटील, विनोद चौधरी ,निकिता तायडे ,योगिता साळुंखे ,शेखर पाटील

चे तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, महिला-भगिनी उपस्थित

आंजती ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार(brekingnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

brekingnews/हिंगणघाट :- मौजा आंजती हद्दीत येत असलेला हिंगणघाट परीसरातील काहीभाग, तसेच रीमडोह, चिचघाट (राठी) कोल्ही (बोरगाव )जुनोना MIDC हा परीसर येतो. या परीसरात मोठ्या प्रमाणात औधोगिक व्यवसाय आहे.आजच्या तारखेला हिंगणघाट पंचायत समिती मध्ये सर्वात जास्त महसूल कर आंजती ग्रामपंचायत त्या नंतर नांदगाव ग्रामपंचायत आहे.

आंजती ग्रामपंचायतचा हिशोब घेतला असता सर्वात जास्त भ्रष्टाचार सुद्धा याच ठिकाणी सुरु आहे. आंजती ग्रामपंचायतला औद्योगिक व्यवसाय कर आकारणीतुन जास्त उत्पन्न मिळते आज या ठिकाणी औद्योगिक व्यवसाय कर आकारणी करतांना ग्रामपंचायत सचिव, स्थानिक सरपंच /सदस्य यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आंजती ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले औद्योगिक व्यवसाय बांधकाम परवानगी नसतानाही कारवाई करण्याची हिम्मत करत नाही,

यामध्ये वरिष्ठ अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येते त्यामुळे या ठिकाणी चौकशी केल्यास अनेक औद्योगिक व्यवसाय कर तसेच अनेक व्यवसाय कागदोपत्री असल्याचे समोर येऊ शकते आज एकीकडे शासन अनाधिकृत

brekingnews/बांधकामावर बुलडोजर चालवत असतांना दुसरीकडे अशा विनापरवानगीच्या बांधकामाला अभय मिळत असल्याने यामध्ये वरीष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसबंध गुंतले असण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केल्या जात आहे.

ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील मुलींचा फुटबॉल संघ पोहोचला विभागीय स्तरावर(Hingnghatnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews/हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने दि. 11 जुलै 2025 शुक्रवार, रोजी वर्धा येथे घेण्यात आलेल्या सुब्रोतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन येथील 17 वर्ष गटातील मुलींच्या फुटबॉल चमूने 1-0 ने स्पर्धक खेळाडूंचा पराभव करून घवघवीत यश संपादन केले. तसेच नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तराकरिता आपले स्थान निश्चित केले.

फुटबॉल संघात कनक जामुनकर,तिलाष्का राठोड, श्रावणी बोरकर, श्रावणी वाणे, लीना घिये, पल्लवी मुडे, धनश्री मोहाड, दिशा पाटील, तनुजा डफ, ज्ञानाई खारपाते, अनन्या चौधरी, आरती शिरजोरकर, नंदिनी डेहणे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणासोबत क्रीडेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

म्हणूनच शाळेचे संस्थापक गिरधर राठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करतात. क्रीडा शिक्षक योग्य तालीम देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता सक्षम करतात. ही खास उल्लेखनीय बाब.

विद्यार्थ्यांच्या विक्रमा बद्दल गिरधर राठी (संस्थापक- हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट द्वारा संचालित ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट व वाघोली), अर्पणा राठी ( अध्यक्षा), रशेष राठी (सचिव ), प्रवीण धोबे

Hingnghatnews/(कोषाध्यक्ष), अभिनव जयस्वाल (मुख्याध्यापक- ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड ( क्रीडा शिक्षक), पायल तळवटकर (क्रीडा शिक्षिका) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी फुटबॉल खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा क्षेत्रात उच्चांक गाठण्याचा संकल्प केला.

Atulvandile /अतुल वांदिले यांच्या निवेदनानंतर ना गडकरी यांच्या दणक्याने उड्डाणं पुलाच्या दुरुस्तीला वेग

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Atulvandile/हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणं पुलावर एका वर्षात दोनवेळा पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या बाबत पुराव्या सहित माहिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून दिल्यानंतर ना. गडकरी यांनी त्वरित राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यां ह्या उड्डाण पुलाबाबत माहिती देऊन सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला ताबोडतोब ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले.

ना. गडकरी यांचा आदेश येण्याच्या आधी ज्या पद्धतीने थातूर मातुर काम सुरु होते ते बंद करून वरिष्ठ महामार्ग अधिकारी हें स्वतः आपल्या तांत्रिक अधिकारी वा कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी येवून या पुलाची स्थायी स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

SarpanchNews/संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

यांच बरोबर उपजिल्हा रुग्णालयाजवळील व कलोडे चौक येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाकडेही या राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष दिसत आहे. दि. 7 जुलैला ना. नितीन गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत निवेदन दिल्यावर व ना. गडकरी यांनी त्वरित दखल घेतल्याने हिंगणघाटचे सर्वसाधारण नागरिक या दोघांनाही धन्यवाद देत आहे. यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी हें उपस्थित होते.

Nitingadkariयेथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालया जवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करण्याच्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने करूनही पक्ष भेद विसरून या दोन्ही मागणीची त्वरित दखल ना गडकरी यांनी घेतली हें विशेष! यावेळी राकाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.

SarpanchNews/संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

0

 

[ जनतेतून सरपंच पदाची थेट निवडणूक होत असल्याने निवडणूक चुरशीची होणार!]

SarpanchNews/संग्रामपूर (अनिलसिंग चव्हाण )ः- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रा.प.च्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सन २०२५ – २०३० ह्या कालावधीसाठी आज दि.९ / जुलै रोजी पार पडली. सरपंच पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार!

Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

जि प हायस्कूल संग्रामपूरच्या प्रांगणातील सभागृहात आज दु.१२ वा. जळगाव (जामोद ) उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ५० ग्रा.पं.चे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ह्यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील नामदेव जुनघरे, निवासी ना.तह. तहसीलदार राहुल वसावे,सं.गां.नि.यो.चे नायब तह. विकास शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्व प्रथम तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सन २०२५ – २०३० ह्या वर्षासाठी सरपंच पदाकरीता सरपंच पदातून काढण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देवून तालुक्यातील ५० ग्रामपंचायती करीता अनु. जाती स्त्री – ४ , अनु. जमाती स्त्री -३ , ना.मा.प.प्रवर्ग स्री- ५ , सर्वसाधारण स्री- १३ एकूण महिला सरपंच पदासाठी २५ , तर सर्वसाधारण – १० , ना.मा.प्र.- ६ , अ.जमाती- ५ , अ.जाती- ४ , एकूण २५ असे ५० सरपंच पदासाठी सन २०२५ – २०३० करिता नवीन आरक्षण काढण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते इश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये खालील प्रमाणे आरक्षण काढून जाहीर करण्यातआले.

SarpanchNews/ह्या आरक्षण सोडत साठी निवडणूक विभागाचे सहा. महसूल अधिकारी जी.पी. ठाकरे , योगेश खारोडे , महसूल सहा. नितीन गोरे , निवडणुक विभागाचे संगणक परिचालक गोपाल बोंबटकार व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आज आरक्षण सोडतीचे वेळी सुद्धा रिमझिम पाऊस सुरू होता.तरीही अनेक आजी ,माजी सरपंच तसेच महिला सरपंचाचे पती,इतर राजकीय पदाधिकारी,कार्यकर्ते ,नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग वरील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करण्यास अतुल वांदिले यांच्या मागणीवर ना.गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश Hingnghatnews 

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळील लोखंडी पूल येथील वणा नदीवर स्थानांतरीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज दि. 7 जुलैला ना. नितीनजी गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत दिले. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत त्वरित या पुलाबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले व पूल उत्तम स्थितीत असल्यास तो वणा नदीवर स्थानातरीत करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.त्याचप्रमाणे नांदगाव येथील उड्डाण पुलावर दोन वेळा पडलेल्या भगदाडा बाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना या पुलावरील या गड्डया बाबत कायमस्वरूपी तोडगा काढून दुरुस्त करावा व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.

येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालया जवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानातरीत केल्यास वणा नदीवरील गाडगेबाबा समाधी व 51 फूट उंचीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे भाविकांना सोयीचे होणार आहे.

Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

जर या ठिकाणी शक्य नसल्यास राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड जवळ हा पूल स्थानातरीत केल्यास हायवेवर मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टळू शकतात त्यामुळे हा पूल वणा नदीवर किंवा छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात यावा अशी आमची मागणी वजा विनंती अतुल वांदिले यांनी ना. गडकरी यांना भेटून केली. यावेळी ना गडकरी यांच्यासोबत अर्धा तास झालेल्या चर्चेत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व मनसेचे राज्यचिटणीस हेमंत गडकरी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गवर प्राधिकरण यांनी अंदाजे तीन वर्षापूर्वी या उपजिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी पाहून पायी जाणाऱ्या व्यक्तीसाठी हा पूल तयार करण्यात आला होता. परंतु आता या चौकात व कलोडे चौकात राष्ट्रीय महामार्ग कडून उड्डाणं पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

त्यामुळे भविष्यात या पुलाचा कोणताही ऊपयोग नसल्याने हा पूल या ठिकाणावरुन उचलून वणा नदीवरील गाडगेबाबा समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर उभारल्यास नदीला पाणी असते त्यामुळे असंख्य भाविकांना या परिसरातील 51 फूट श्री विठ्ठलाच्या व संत गाडगेबाबा यांच्या समाधीजवळ जाण्यास भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Hingnghatnews:त्यामुळे हा तयार पूल जर या उपरोक्त जागेवर उभारल्यास असंख्य भाविकांची व नदीपल्याड अनेक गावातील जनतेची सोय होऊ शकते. ठिकाणी शक्य नसल्यास शहरातील अन्य कोणत्याही वर्दळीच्या जागेवर स्थानातरीत केल्यास जनतेची सोय होऊ शकते अशी राकाचे अतुल वांदिले यांनी केली. या मागणीची त्वरित दखल ना नितीन गडकरी यांनी घेतली.यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी,राकाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.

Foreshtnews /पोलिस स्टेशन आकोट येथे सहायक वनसंरक्षक नम्रता टाले यांच्या विरोधात सोमंत रजाने यांची तक्रार दाखल.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

Foreshtnews/अकोट:-अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील प्रकरणासंदर्भात गैर अर्जदार यांच्या विरोधात फिर्यादीने पोलिस स्टेशन अकोट येथे कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे.प्रकरण असे आहे की,
फिर्यादी सोमंत वसंतराव रजाने वय ३५ वर्ष,धंदा- शेती रा.बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला व गैरअर्जदार नम्रता टाले,सहाय्यक वनसंरक्षक (वने) अकोला वनविभाग अकोला व इतर संबंधीत वनअधिकारी गैरअर्जदाराच्या विरुध्द गुन्ह्याची नोंद करुन कायदेशिर कार्यवाही करणेबाबत लेखी तक्रारीच्या व्दारे मागणी केली आहे.policenews

त्याचप्रमाणे मला व माझ्या कुटुंबाला पोलिस सरंक्षण मिळण्याबाबत सुद्धा फिर्यादी यांनी मागणी केली आहे.
प्रकरण असे आहे की दिनांक ०६.१२.२०२० रोजी सोपान गणेश रेळे याची दु-व्हिलर बाईक स्लिप झाल्यामुळे त्याचा अपघात झाला होता. त्याला मी ग्रामीण शासकीय रुग्णालय अकोट येथे उपचारा करीता नेले होते.

हिंगणघाट नजीकच्या कोल्ही शिवारात परवानगी न घेता ३ मोठ्या गोदामांची निर्मिती!..सबंधित विभागाचे दुर्लक्ष.brekingnews 

आवक पोलीस लिपीकर बयान नोंदविण्याकरीता दोन कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. तसेच संबंधीत वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावने यांनी सदरच्या घटने संबंधी अधीनपरीक्षेत्र अधिकारी थोरात यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये माझे बयाण नोंदवून माझी सही सुध्दा घेतली होती.परंतु जेव्हा मी ते बयाण वाचले असता ते खोटे व चुकीचे दिसले होते. कारण घटना ही मोटार अपघाताची असतांना माझे बयाण हे वनप्राणी हल्ला प्रकरणा संबंधी नोंदविले होते.

म्हणून मी माझे बयाण परत मागितली होते. परंतु दिनांक 3/7/2025 प्रेषक लिपीक जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांनी सदरहू बयाण परत देता येत नाही असे म्हटले होते व सदरहू बयाण आम्ही रेकॉर्डला लावणार नाही असे सुध्दा त्यांनी म्हटले होते.

जेव्हा मला वर्तमान पत्राव्दारे माहिती पडले होते की, सोपान गणेश रेळे चे वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईचे प्रकरण मंजूर झाले आहे. तेव्हा माझ्या बयाणाचा वन विभागांने दुरुपयोग केला असे मला वाटले म्हणून मी वनपरीक्षेत्र अधिकारी यांना माझे बयाण परत करण्याची फोनव्दारे विनंती केली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात येण्याचे सांगितले होते. मी व माझ्यासोबत शेख मुन्ना आम्ही दिनांक २२.०६.२०२५ रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या कार्यालयात गेलो असता दिसून आले नाही.

त्यांना वारंवार फोन सुध्दा लावण्यात आले होते.परंतु त्यांनी माझा फोन नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्याचे लक्षात आले. शेवटी मी हताश होवून कोर्टाच्या रोडच्या बाजुने असलेल्या कॅटीनवर चहा पित असतांना तेथे अॅड. एस.जी. खंडारे यांच्याशी ओळख झाली व त्यांना सदरच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती सांगितली तेका त्यांनी असे म्हटले होते की तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकविण्याची शक्यता आहे.

Foreshtnews/करीता माझा कसले प्रकारचा दोष नसताना मला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे?म्हणून सदर प्रकरणात आपण योग्य ती चौकशी करून मला न्याय द्यावा व गैर अर्जदारांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावा अशी विनंती फिर्यादी आणि केली आहे.