Home Blog Page 241

किनगाव गावातुन मामाने दिलेली मोटरसायकल भाच्याच्या घरून अज्ञात चोरट्यांनी नेली चोरून पोलीसात तक्रार दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव गावातुन आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्या घरून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला असून , पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली मिळालेली माहीती अशी किनगाव खु॥ तालुका यावल येथील राहणार सरफराज युनुस पिंजारी वय२५ वर्ष यांने आपले मामा शेख नईम शेख सलमी पिंजारी राहणार आमोदा तालुका यावल यांची बजाज कंपनीची अंदाजीत ७ हजार रूपये किमतीची पॅलेटिना मॉडेलची काळया रंगाची एमएच १९ एटी८८५०या क्रमांकाची मोटरसायकल दिनांक ६ नोव्हेबर रोजी घरासमोर लावलेली असतांना रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार दिनांक ७ नोव्हेबर रोजी सकाळी समोर आला आहे. सरफराज पिंजारी हे नेहमी प्रमाणे पाणी भरण्यास बाहेर आले असता हा प्रकार दिसुन आला याबाबत पिंजारी यांनी तक्रार दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन,पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .सरफराज पिंजारी यांनी आपले मामा यांच्याकडुन ही मोटरसायकल शेतीच्या कामासाठी वापरण्यास घेतली होती त्यामुळे मामाची मोटरसायकल ही भाच्याच्या घरून चोरीस गेल्याचा हा प्रकार बोलला जात आहे .

मुख्यमंत्री शिंदेंनी कान टोचल्यानंतर अब्दुल सत्तार अज्ञातवासात

0

 

प्रतिनिधी
अशोक भाकरे

अकोला -:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर सत्तार यांनी आजचा बुलढाणा जिल्ह्यातला दौरा रद्द करत अज्ञातवासात गेल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्तार चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
सत्तार आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. त्यानंतर चांगेफळ येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार होते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला.
अब्दुल सत्तार यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर काही वेळातच सॉरी म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर निदर्शने केली. घरावर दगडफेक केली. वाढता प्रक्षोभ पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले. तसेच पुन्हा माफी मागण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. आता त्यांना अज्ञातवासात राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन केले नाही. शिवाय सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हर्षल पाटील फदाट यांचा इशारा

0

 

राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.या वक्तव्यावरून आमदार,महिला नेत्या आणि कार्यकर्त्याही चांगल्याच संतापल्या आहेत.
हर्षल पाटील फदाट यांनीही अब्दुल सत्तारांना महाराष्ट्र फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.हर्षल पाटील म्हणाले की, शिंदे सरकारमधील मंत्री सातत्याने राजकारणातील महिलांविषयी अपशब्द वापरत आहेत. आज अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. अब्दुल सत्तार आपण किती दलिंदर विचारांचे आहात. आपण मंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात का? आपण जाणूनबुजून महिलांबाबत जे बोलता हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. तुम्ही सुप्रिया सुळे यांची माफी मागा,नसता यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तुमची मंत्री होण्याची लायकी नाही, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षल पाटील फदाट यांनी दिली आहे.

हिंगोणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे तिन तेरा शासनाचे४७ लाख पाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गावाला कवडीमात्र फायदा नाही

0

यावल तालुका प्रतिनिधी .
विकी वानखेडे

हिंगोणा गावात पाच जलकुंभ असून ते जलकुंभांना चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाल्यामुळे त्या जलकुंभांची मुदत संपली असून जलकुंभ तात्काळ पाडून नवीन बांधकाम करण्यात यावे अशी तक्रार गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतीला नेहमी करीत होते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने सन १७/१८ या कालावधीमध्ये शासनाला पत्र दिले की मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत गावात नवीन जलकुंभाची उभारणी करावी गावात सन १८/१९या वर्षात १लाख लिटरचे जलकुंभ या योजनेत मंजूर झाले हिंगोणा ग्रामपंचायतीने रितसर जागेचा ठराव पाठवून हे जलकुंभ वि का सोसायटी परिसरात उभारणीचे काम ठरवीले परंतु काही ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यावल यांच्याकडे अर्ज दिले की ठेकेदार हे कामावर पाणी मारत नसून संपूर्ण निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी तीन महिने काम बंद केलेले होते मुख्यमंत्री पेयजल योजना ही ४७.३५लाख अंदाजीत रक्कम असून या योजनेत डोंगर हाड र्चौकातील २. लाख लिटर जलकुंभाची दुरुस्ती करणे गावात वितरण व्यवस्था करणे नवीन एक लाख लिटर जलकुंभाला तार कंपाऊंड करणे असे काम या योजनेत आहे परंतु एकही काम झालेले नाही फक्त पिण्याच्या टाकीचा सांगाडा उभा केलेला दिसत आहे भर उन्हाळ्यात हिवाळात पाण्याची टंचाई असल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो येथे चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पेजल योजना मंजूर होऊन आज तीन वर्षे पूर्ण होत आहे तरीदेखील या योजनेचे काम अपूर्णावस्थेत असून भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना या योजनेचा काय फायदा असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत असून ते पूर्ण न करता पाईपलाईनचे काम ज्या भागात पाहिजे त्या भागात केली नाही ती पाईपलाईन दुसऱ्याच भागात केली गेली आहे पण ते सुद्धा मोजकीच केलेली आहे अशा योजनेचा गावाला फायदा काय ही योजना फक्त अधिकार्यांच्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी आहे का असे हिंगोणा परिसरातून व गावातून बोलले जात आहे की ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे होत आहे काम अपूर्णावस्थेत असून सुद्धा पाईपलाईनचे काम करणे व सात टक्के बिल काढणे हे कितपत योग्य आहे तात्पुरत्या स्वरुपाची दुसर्या भागात पाईपलाईन टाकून ते पाण्याच्या टाकीला जोडण्यात आले आहे का याची सुद्धा वरीष्ठ पातळी वरून चौकशी झाली पाहिजे तसेच गुलदस्त्यात आहे तरी काय .आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी या योजनेचे गत हिंगोणा गावात झाली आहे या योजनेअंतर्गत 47 लक्ष एवढा निधी प्राप्त झाला आहे परंतु पाण्याच्या टाकीचे काम हे बद असल्याने या योजनेचा ग्रामस्थांना काही एक फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच पाणी पुरवठा योजनेचे कर्मचारी यांचे सुद्धा दुर्लक्ष असून याकडे भिजत घोंगडे करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत
प्रतिक्रिया
प्रतिष्ठित शेतकरी मनोज भाऊ वायकोळे हिंगोणा
हिंगोणा गावात सत्तेचाळीस लाख रु मुख्यमंत्री पेयजल योजनेचा निधी येऊन बरेच दिवस होऊनसुद्धा ठेकेदार व अधिकार्यांच्या दुर्लक्षतेमुळे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे हिगोणा गावांचा पाणीप्रश्न केव्हा सुटेल यांची खंत वाटत आहे
प्रतिक्रिया
माजी ग्रामपंचायत सदस्य विजय सिंग रुपसिंग पाटील हिंगोणा
महाराष्ट्रात हिंगोणा ग्रामपंचायत ही दोन नंबर ग्रामपंचायत असून या गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेचे तीनतेरा झाल्याचे दिसत आहे
प्रतिक्रिया
देविदास फालक हिंगोणा
महाराष्ट्र शासनाच्या दृष्टिकोनातून गावोगावी पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना हे गावात मंजूर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे व ठेकेदारचा हलगर्जीपणामुळे या योजनेचे काम शुन्य प्रतीचे दिसत आहेत अशा कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी

राजोरा येथे भाजपा युना मोर्चा व जनसेवा हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील राजोरा गावातील सामाजीक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जनसेवा हॉस्पीटल व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते . भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन लोकहिताचे सामाजीक व विधायक उपक्रम म्हणुन यावल येथील डॉ कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटलच्या सौजन्यातुन गावातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते .राजोरा येथील एल एम पाटील विद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात १४५ नागरीकांच्या विविध आजारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली , या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात यशस्वी करण्यासाठी मधुकर नारखेडे . नागेन्द्र लोखंडे , प्रविण लोखंडे , सुर्वणा महाजन , कल्पेश पाटील , मयुर महाजन , रघुनाथ धनगर , सदाशिव कोळी, सुजित वानखेडे , सचिन पाटील , घनश्याम कोळी , सुनिल कोळी , बापु कोळी यांचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सागर कोळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील राजोरा गावातील सामाजीक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जनसेवा हॉस्पीटल व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते . भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन लोकहिताचे सामाजीक व विधायक उपक्रम म्हणुन यावल येथील डॉ कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटलच्या सौजन्यातुन गावातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते .राजोरा येथील एल एम पाटील विद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात १४५ नागरीकांच्या विविध आजारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली , या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात यशस्वी करण्यासाठी मधुकर नारखेडे . नागेन्द्र लोखंडे , प्रविण लोखंडे , सुर्वणा महाजन , कल्पेश पाटील , मयुर महाजन , रघुनाथ धनगर , सदाशिव कोळी, सुजित वानखेडे , सचिन पाटील , घनश्याम कोळी , सुनिल कोळी , बापु कोळी यांचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सागर कोळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .

सावंगी तलाव-पाहेगाव चौफुली ते नेर-पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दिनांक ०७/११/२०२२ रोजी सोमवारी १२ वाजता निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन:

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी नागरिकांची दिवसेंदिवस मागणी होत आहे.तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे जाणून-बुजून दुर्लक्ष होत असून,आता परिसरातील नागरिकांनीच जन आंदोलन करण्याची ठरवले आहे.बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. की काय अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.तसेच मागील बऱ्याच दिवसापासून सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर व पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्ड्यामध्ये पाणीच पाणी साचले आहे.तसेच ऐजा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच एसटी बस सेवा मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे.सदर ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवासांना व खाजगी वाहनांना जास्त प्रमाणात प्रवाशी भाडा द्यावा लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील ऐजा करणारे नागरिकांना व वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होत असून,याचा नाहक भुर्दंड त्यांना सोसावं लागत आहे.या रस्त्यावरुन दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना विलंब लागत असल्यामुळे अनेकांना आपलं जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार म्हणावे लागतील.त्यामुळे या भागातील रस्त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती व डाग-डुगी करावी व नवीन व सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे.अशी मागणी मानेगाव व मौजपुरी सर्कल तसेच जालना तालुका ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने होत आहे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल.तसेच
या रस्त्यासाठी दिनांक ०७/११/२०२२ रोजी सोमवारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन देण्यात येणार आहेत.तरी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती.

माजी आमदाराच्या मार्गदर्शनाखाली तथा विद्यमान आमदारांच्या उपस्थिती विकासकामांचे भूमिपूजन

0

 

विकी वानखेड़े यावल

मौजे कोरपावली येथे पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे माजी आमदार चंद्रकांत दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामाचे उद्घाटन .
माजी आमदार माननीय चंद्रकांत दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपावली येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गावामध्ये माननीय आमदार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात स्वागत गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सदरील काम हे पाटील वाडा परिसरात असून अंदाजित किंमत ही 5 लक्ष आहे. सदर कार्यक्रमास सरपंच विलास अडकमोल, मोहराळा सरपंच नंदा गोपाळ महाजन, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, जुम्मा तडवी, शाखा अध्यक्ष भरत चौधरी शाखा उपाध्यक्ष प्रविण अडकमोल, अविनाश अडकमोल, भिमराव इंधाटे, किसन तायडे, समाधान अडकमोल, मनोज अडकमोल, अजय अडकमोल, उमेश जावळे, गजानन कोळी, सूर्यभान पाटील, भरत चौधरी सर, प्रकाश कोळी, समाधान कोळी, अरुण भालेराव, विक्की अडकमोल, सचिन भालेराव, माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाटिल, दत्तात्रय महाजन, युगल पाटील, प्रमोद महाजन, विनायक पाटील विशेष करून या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. तसेच या विकास कामांच्या प्रसंगी माननीय आमदार लताताई सोनवणे तसेच माजी आमदार चंद्रकांत दादा सोनवणे यांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सरपंच विलास अडकमोल यांनी आभार मानले. तसेच विकास कामांचे उद्घाटन झाल्याने संपूर्ण गाव हे माननीय आमदारांचे कौतुक करत आहे.

राज्यातील भटके विमुक्त आघाडी च्या लोकांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पृयत्न करणार-मा.आ.नरेंदृ पवार

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना राज्यातील भटके विमुक्त आघाडी च्या लोकांना न्याय देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जालना येथे भटके विमुक्त आघाडी च्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.यावेळी बैठकीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे तर प्रमुख अतिथी म्हणून सरचिटणीस अशोक चोरमले, गोविंदराव गुंजाळ कर,महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा डॉ उज्वला हाके,मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर,डॉ उज्वला दहिफळे,शहर अध्यक्ष राजेश राऊत,संध्या देठे-महिला पृदेश उपाध्यक्ष,भटके विमुक्त आघाडी जालना जिल्हा अध्यक्ष डॉ रमेश तारगे,पवन झुगें,तुकाराम राठोड आदी उपस्थित होते.यावेळी आपल्या भाषणात पवार म्हणाले की,राज्यातील भटक्या समाजातील लोकांची अवस्था फार वाईट असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.मोठ्या प्रमाणावर घरकुलाचे प्रश्न आहेत.अनेक भटके लोक पालाच्या घरात राहतात.त्यांच्या साठी निधी उपलब्ध करावा लागणार आहे.आपण शासन दरबारी पाठपुरावा करुच परंतु कार्यकर्ते मंडळी ना ताकद देण्याची गरज आहे.ती ताकद जिल्हा अध्यक्ष आमदार संतोष दानवे देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.धन्यवाद मोदीजी अभियान चे पोस्ट कार्ड लाभार्थ्यांच्या मार्फत पाठवले जातील.यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. अध्यक्षीय भाषणात आमदार संतोष दानवे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जालना जिल्ह्यात याआधी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. त्यामध्ये पाचशे सामुदायिक विवाह सोहळा,दुष्काळी परिस्थिती मध्ये खोलीकरणाची कामे या सारखे खुप मोठे काम त्यांनी केले.सातत्याने काम करत असताना राज्यात मोठ्या प्रमाणावर संघटन उभे केले आहे. यावेळी सरचिटणीस अशोक चोरमले यांनी कामांचा आढावा घेतला.भविष्यात कामासाठी सुचना केल्या,यावेळी गोविंदराव गुंजाळ कर,महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उज्वला हाके,डॉ.उज्वला दहिफळे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष डॉ.रमेश तारगे यांनी करताना सांगितले की,धन्यवाद मोदीजी अभियान चे एक हजार पोस्ट कार्ड भटके विमुक्त आघाडी च्या वतीने पाठवण्यात येतील असे आश्वासीत केले.यावेळी काही पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन उद्धव जायभाये यांनी मानले.

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नांची लवकरच मंत्रीपातळीवर चर्चा उपमुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला (संलग्न भारतीय मजदूर संघ) आश्वासन

0

यावल ( प्रतिनिधि)विकी वानखेडे

महाराष्ट्रातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे अनेक महत्वपूर्ण विषयांवर मागील सरकारने पुर्णपणे निक्रीयता दाखविल्यामुळेच कामगारांचे प्रश्न प्रलंबितच राहीले आहेत , त्यामुळे प्रलंबित प्रश्नांबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा सोबत लवकरच सविस्तर बैठक आयोजित करून निश्चीतच कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या शिष्टमंडळाला मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले आहे.

या शिष्टमंडळात कोथरुड विधानसभेच्या माजी आमदार व राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मा.प्रा.डॉ.सौ:मेधाताई कुलकर्णी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई, संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरूण पिवळ, उपमहामंत्री प्रशांत भांबुर्डेकर इत्यादी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने कामगारांचे महत्वपूर्ण मागण्या बाबतीत सविस्तर निवेदन ऊर्जामंत्री यांना दिले आहे. इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कायम करावे याची सुरुवात वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पासून करावी असे निवेदनात नमूद आहे. या साठी विशेष पाठपुरावा करण्याचे आश्वासन मा.प्रा.डॉ.सौ:मेधाताई कुलकर्णी यांनी संघटनेला दिले आहे.
सचिन भावसार प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ महानिर्मिती व भुषण सुरवाडे जिल्हाध्यक्ष जळगांव जिल्हा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ

यावल येथे एका व्यक्तिची निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद एका आठवडयातील आत्महत्याची पाचवी घटना

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहरातील धनगरवाडा परिसरात राहणार आहे का व्यक्तीने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर कचरे वय ५२ वर्ष धंदा मजुरी हे आपल्या कुटुंबासह राहत असून दिनांक ५ / ११ / २०२२ रोजी आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शोभाबाई कचरे यांना जाग आल्याने त्यांना राजेन्द्र कचरे हे खाटीवर मिळवुन आले नाही तेव्हा त्यांचा शोध घेतले असता तेव्हा कचरे हे आपल्या घरा समोरील धनगरवाडयातील स्वस्त धान्य दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या निंबाच्या झाडाला दोरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसुन आले आहे . या संदर्भातील मयत राजेन्द्र कचरे यांचा मुलगा धनराज राजेन्द्र कचरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . मयत राजेन्द्र कचरे यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले . घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . यावल तालुक्यातील आठवडयाभरातील आत्महत्या करण्याची ही पाचवी घटना सर्वत्र चर्चचा विषय .