Home Blog Page 242

स्व. विनोदभाऊ बुल्ले स्मृती प्रित्यर्थ शिव छत्रपती क्रीडा मंडळ, हिंगणघाट तर्फ भव्य कबड्डी सामने

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट 5 ऑक्टोंबर
भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन S.S.M. कन्या विद्यालयात आयोजन करण्यात आले असून या कबड्डी सामण्यामध्ये ४० संघांनी सहभाग घेतला असून, उद्घाटन समरोह _ मा. श्री. गोकुल दासाजी राठी ( अध्यक्ष प्रोग्रेसिव अजुकेशन सोसायटी) तसेच मा. श्री. रमेशजी धारकर ( प्रोग्रेसिव आजुकेशन सोसायटी सचिव) तसेच मा. श्री. प्रेमजी बसंतानी (माझी नगराध्यक्ष हिंगणघाट. मा. श्री. अशोक अण्णाजी सोरटे. कार्यअध्यक्ष माझी वर्धा जिल्हा कबड्डी अससिएशन. मा. श्री. खडतकर सर (मुख्यद्यापक) श्री. अजयभाऊ रिठे (अखिल भारतिय खेळाडू) मा. श्री. धनंजय भाऊ बकाने ( नगरसेवक हिंगणघाट ) मा. श्री. हरिभाऊ राऊत ( भारतीय खेळाडू व मा. श्री. व्ही. व्हीं गिरी राष्ट्रपती सनमनित,मा. श्री. गजूभाऊ कुबडे ( रुग्ण सेवक) मा. श्री. प्रमोदभाऊ जुमडे (समाज सेवक) व श्री. अमोल भाऊ बोभाटे ( समाज सेवक) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे सर्व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष_ मा. श्री. राहुलभाऊ सोरटे ( माझी नगरसेवक) श्री. नरेश बुल्ले ( उपाध्यक्ष) श्री. सचिन येलगनधनवर(सचिव) श्री. अभय खोब्रागडे ( सह सचिव) श्री. संदिप रघाटाटे ( कोषाध्यक्ष) श्री. विवेक ढोकपांडे ( सहकोषद्यक्ष) श्री. नारायण साटोने ( सदस्य) श्री. अरुण लांजेवार (सदस्य)
यांनी सर्वांचे स्वागत केले या उद्घाटन सोहळ्या प्रितार्थ मा. श्री. रामेशजी धारकर भारतीय खेळ, राष्ट्रीय एकात्मता साठी देशाचे सर्व खेळाडू युवा शक्ती राष्ट्र शक्ति आहे . तसेच अशोक अण्णाजी सोरटे ( माझी कार्यअध्यक्ष वर्धा) यांनी आजच्या सर्व प्रकारच्या खेळातील खेळाडू हे देशाच्या युवा पिढीस आदर्श व शिस्त व अनुशासन राष्ट्राचे मुख्य आधास्तंभ आहे तसेच शिव छत्रपती क्रीडा मंडळाने हिंगणघाट तर्फे युवा खेळाडूंचा प्रोसहान देऊन या पूर्वी हिंगणघाट शहरात अनेक वर्षे अखिल भारतीय खेळाचे आयोजन करत होतो. त्यामुळे संपूर्ण भारतात हिंगणघाट क्रिडा नागरी म्हणून ओळखले जात होते .या शहराची देशकरिता अनेक खेळाडू करण्याचे भाग्य सर्व क्रिडा मंडळाला होते. तेच कार्य पुन्हा शिव छत्रपती क्रीडा मंडळ हिंगणघाट राष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे कार्य सुरू केले. तसेच सर्व खेळाडूंना प्रमुख उपस्थितीत शुभेछया देऊन उद्घाटन सोहळ्याच्या प्रथम फेरीचे कबड्डी सामने सुरुवात केली… या शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे प्रांगणात हजारो नागरिकांना उपस्थिती दर्शवली. कबड्डी खेळांच अनेक डोळ्यांचे पारणे फेडले. क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. श्री. महेशभाऊ ठाकूर ( अध्यक्ष) _गर्जना सामाजिक संघटना वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसियशनयांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या आयोजनसाठी सर्व मंडळ व सदस्य यांनी सहकार्य केले
शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे खेळाडू… निरव राऊत ओम जांभूतकार, मनीष तेलहांडे, आश्रय लांजेवार, यश तुमाने, यश साटोने, विशाल जेंघडे, ताहीर, अनुज नेवारे, अंकित नेवारे, युगल सिडाम, अमन खोब्रागडे, नितीन ढोकपांडे, आदित्य रघाटाटे, जय उगे, तसेच महिला खेळाडू _ हर्षिता निलेकर, हर्षा चाल्लिरवर, उमा टेंभूर्कर, अंजली तेंभुर्कर, यांनी सगळ्यांनी मिळून या सगळ्या सामने सुरुवात केली..
दि.३० आक्टोंबर रोजी १० वाजता शिव छत्रपती क्रीडा मंडळातर्फे बक्षिस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. समीरभाऊ कुणावर ( विधानसभा हिंगणघाट आमदार) मा. श्री. अनुपजी जायस्वाल (राष्ट्रीय बजरंग दल प्रांत अध्यक्ष) मा. श्री. डॉ. निर्मेशजी कोठारी ( हृयरोगतज्ज्ञ) मा.श्री.बसंतजी राठी ( उदोजक) मा. श्री. निलेशभाऊ ठोंबरे ( माझी नगरसेवक न. पा. हिंगणघाट) मा. श्री. राहुलभाऊ सोरटे ( माझी सभापती न. पा. हिंगणघाट व शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष) सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विजेता संघाला रोख रक्कम व चषक देण्यात आले तसेच सर्व संघाना सन्मानित करण्यात आले
१) प्रथम पुरस्कार विजेता _ १५००१- स्व. विनोदभाऊ बुल्ले व श्री. गजूभाऊ कुबडे व पवन विनोद गेडेकार यांच्या कडून
( संत कृपा क्रिडा मंडळ पिंपलखुटा) यांना देण्यात आले
२) द्वितीय पुरस्कार विजेता _१०००१ श्री.धनंजय भाऊ बकाने व श्री. अमोलभाऊ बोभाटे यांच्या हस्ते
( जय बजरंग क्रीडा मंडळ कोहळा) यांना देण्यात आला.
३) तृतिय पुरस्कार विजेता_ प्रमोदभाऊ जुमडे यांच्या कडून
( ग्रामविकास क्रिडा मंडळ परसोडी) यांना देण्यात आला.
४) चतुर्थ पुरस्कार विजेता _ स्व. रामदासजी कुबडे व. स्व. सुरेशरावजी भांडे यांच्या कडून
( समर्थ क्रीडा मंडळ चंद्रपूर) यांना देण्यात आला.
तसेच वैकतिक पुरस्कार
१) उत्कृष्ट खेळाडू_ सहिल उईके ( संत कृपा क्रिडा मंडळ पिंपळखुटा)
२) उत्कृष्ठ पकड _ यश बंडीवार ( समर्थ क्रीडा मंडळ चंद्रपूर) या दोन दिवसीय कबड्डी समण्याकरित्ता हिंगणघाट शहरातील नागिकांनि व खेळाडूंनी यांनी उपस्थिती दर्शवली सर्व सहभागी क्रिडा मंडळाचे स्वागत करून, त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. निसर्गरम्य क्रिडा गणावर मा. श्री. समीरभाऊ कुणावर विधानसभा हिंगणघाट आमदार शुभेच्या देत क्रिडा व कौशलपूर्ण ऊर्जेने व क्षमतेने प्रत्येक सामण्या आपल्या खेळाचे कौशल प्रत्येक खेळाडूंनी दाखवील व विजेता पदासाठी दावेदार बनवण्यासाठी उत्कृषटरित्या खेळाचे प्रदर्शन दाखविले सर्व प्रमुख पाहुण्यांनी सर्व क्रिडा मंडळाला शूभेछया दिल्या व सर्व खेळाडूंनी राहण्याची व्यवस्था व भोजन ची व्यवस्था शिव छत्रपती क्रीडा मंडळा तर्फे करण्यात आली.. या दोन दिवसीय कबड्डी समण्याकरिता सतत ८ दिवसापासून शिव छत्रपती क्रीडा मंडळांनी परिश्रम घेऊन पार पाडण्यात आला.

एमएसइबी चौकातील त्या खड्ड्यात पूजा करून मनसेचे आंदोलन

0

 

शेगांव/प्रतिनिधी शेख इस्माइल

गेल्या एक महिन्या पासून स्थानिक एम एस इबी चौकात पडलेला मोठा खड्डा दुर्लक्षित असल्याने अनेक वेळा अपघात झाले दुचाकी चालक गंभीर जखमी झाले पण प्रशासन कोणतीच कार्यवाही करत नसल्याने आज दि 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर खड्ड्याची हार टाकून पूजा केली बेशरम चे झाड लावून प्रशासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना तहसीलदारां मार्फत निवेदन सादर केले निवेदनात नमूद आहे की
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शेगांव शहरातील एम एस इ बी चौकात पेव्हर ब्लॉक उखडल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून 5 फूट खोल झालेल्या या खड्ड्यात अनेक अपघात झाले आहेत तरीही सदर विभाग या गंभीर बाबीकडे काना डोळा करीत आहे या खड्ड्या बाबत 24 तासाच्या आत उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर मनसे तालुका प्रमुख रवींद्र उन्हाळे, शहर अध्यक्ष अमित देशमुख, नारायण शेगोकार, परमेश्वर राहुडकर, मनीष जाणे, रामेश्वर भारती, बाळू भोईटे, विनोद टिकार भास्कर खेळकर,दिगंबर खेळकर यांच्या सह्या आहेत
विकास आराखडा मध्ये करोडो रुपये खर्च झाल्यावरही रस्त्यावर असे खड्डे पडल्याने रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे

मा.आ.नरेंद्र पवार साहेब (भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या जालना दौरा निमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय जालना येथे आढावा बैठक संपन्न:

0

 

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक ०३/११/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना येथे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये मा.नरेंद्र पवार-भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे दि.०५/११/२०२२ रोजी शनिवारी जालना येथे येणार आहेत.यानिमित्त संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली.व कार्यक्रमाची रूपरेषा व आढावा घेण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मा.भास्कर आबा दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सखोल असे मौलाचे मार्गदर्शन केले आहेत.तसेच जालना जिल्ह्यातील व तालुक्यातील भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.तसेच यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे,तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,गोवर्धन कोल्हे(स्वीय सहाय्यक),जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार,युवा अध्यक्ष उद्धव जायभाये व तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड,संजय रंधवे,विठ्ठल नरवडे,भारत मुटकुले याठिकाणी उपस्थित होते.

लंम्पी आजारामुळे वखारी येथील पटावरचा बैल दगावला:

0

 

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

जालना तालुक्यातील वखारी येथील शेतकरी रावसाहेब रंगनाथ खैरे यांचा पटावरचा बैल लंम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे.तसेच ग्रामीण भागामध्ये लंम्पी आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्याची व दवाखान्यांची कमतरता भासत आहे.तसेच काही जनावर दिवसेंदिवस लंम्पी रोगामुळे बिमार पडत आहे.त्यांचीही लवकरात लवकर वैद्यकीय उपचार पुरवावे व मदत करावी आणि लंम्पी लसीकरण करावे अशी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अपंगसेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड,शिवाजी राठोड,विष्णू राठोड यांनी केली आहे.

क्रेडिट अॅक्सिस तर्फे ग्रामीण विद्या उपक्रमाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनींना सायकल वितरण

0

 

वीक्की वानखेड़े यावल

जळगाव क्रेडिट अॅक्सिस इंडिया फाऊंडेशन तसेच क्रेडिट अॅक्सिस ग्रामीण लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीना एका कार्यक्रमात समारंभपूर्वक सायकल बॅग व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली क्रेडिट एक्सिस इंडिया फाउण्डेशन भारतातील सर्वात मोठी मायक्रो फायनान्स संस्था असून संस्थेचा प्रमुख कार्यक्रम ग्रामीण विद्या अंतर्गत जळगाव जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमन मित्तल यांच्या उपस्थितीमध्ये कुमारी कल्प श्री किशोर दलाल राहणार रावेर या विद्यार्थिनींना दोन हजार ते दोन हजार बावीस इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळवून ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे याची दखल घेऊन क्रेडिट ग्रामीण लिमिटेडने तिचा कौतुक सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडला या कार्यक्रमामध्ये क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेडची क्षत्रिय अधिकारी संजय द्वासे व राजकुमार बेड दीवार व तसेच यावल शाखेचे शाखाधिकारी योगेश पळसपगार व जामनेर शाखेचे शाखाधिकारी संतोष पवार उपस्थित होते गुणवंत विद्यार्थिनींची आईवडील सुद्धा कुटुंबासह उपस्थित होते
ग्रामीण विद्या या उपक्रमाद्वारे फाऊंडेशन सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींना एक वेळच्या गरजेनुसार आर्थिक गैर आर्थिक साहाय्य करते इयत्ता दहावीच्या पुढे अभ्यास करण्यास याद्वारे प्रोत्साहन दिले जाते

यावल ते कोल्हापुर व ईन्दौर बससेवा सुरू व्हावी व बसस्थानकाच्या ईमारतीचे नुतनीकरण व्हावे : प्रवासी संघटना व शिवसेना ( ठाकरे ) गटाची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मागील तिन वर्षापासुन प्रलंबीत बसस्थानकाच्या नवीन ईमारतीच्या कामास सुरुवात व्हावी तसेच प्रवाशांच्या विविध समस्याबाबत यावल शहर शिवसेना ( ठाकरे ) शहरप्रमुख तसेच प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगदीश कवडीवाले व त्यांच्या सोबत आदी महत्वाच्या पदधिकाऱ्यांनी यावलचे एसटी आगारप्रमुख डी बी महाजन यांची भेट घेत प्रवासांच्या विविध समस्या व नविन लांबपल्याच्या बसेस सुरू करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व बसस्थानकांच्या ईमारतींचे नुतनीकरण करण्यात आले असुन , मात्र नासिक विभागात उत्पन्नाच्या श्रेणीत कायम अग्रस्थानी असणाऱ्या यावलच्या बस स्थानकाचे कायापालट कधी होणार व यावल आगारातुन यावल ते कोल्हापुर, यावल ते इन्दौर( मध्य प्रदेश ) यांच्यासह आदी लांब पल्याच्या एसटी बसेस सुरू करण्यात याव्यात तसेच प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने यावल ते पुणे ही दुपारी चार वाजता सुटणारी बस ही सायंकाळी ७ वाजता नियमित सोडण्यात यावी अशा विविध प्रवासी समस्यांबाबत यावलचे नुकतेच रूजु झालेले एसटी आगाराचे व्यवस्थापक डी बी महाजन यांची भेट जगदीश कवडीवाले व शरद कोळी यांच्यासह संतोष धोबी , पप्पु जोशी , युवा सेनेचे सारंग बेहडे आदी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवुन प्रवासी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली . या विषयावर आगार व्यवस्थापक डी बी महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन ,शिष्टमंडळाशी बोलतांना महाजन यांनी सांगीतले की यावल आगारास येत्या डिसेंबर महीन्यात काही नविन बसेस येणार असुन त्या आगारात दाखल झाल्यावर आपण मागणीनुसार लांबपल्याच्या शेडुअल साठी बसेस सुरू करणार असल्याचे सांगीतले, प्रवासांच्या समस्यांसाठी आपण आपल्या सोबत असल्याचे ही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप करतांना सांगीतले तसेच लवकरात लवकर यावल एसटी बसस्थानकाच्या नविन ईमारतीच्या कामास मंजुरी मिळावी याचा आपण देखील पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले .

महेलखेडी गावातील येथे मानसिक तणावाखाली एका तरूणाने विहिरीत उडी घेत पाण्यात बुडून केली आत्महत्या

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील महेलखेडी येथील रहीवासी एका तरुणाने मानसिक तणावाखाली येत विहीरीत उडी घेत आत्महत्या करीत आपली जिवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना समोर आली असून यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की तालुका यावल येथील रहीम बिस्मिल्ला देशमुख वय २४ वर्ष या तरूणाने दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी महेलखेडी कोरपावली शिवारातील विलास भागवत पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे . रहीम देशमुख हा तरूण काल सायंकाळच्या ५ वाजेपासुन घराबाहेर निघाला होता तो रात्री घरी न आल्याने कुटुंबातील मंडळींनी गावातील वनांतेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळुन आला नाही दिनांक १ नोव्हेबर रोजी पुन्हा महेलखेडी गावच्या गावठाण शिवारात त्याचे नातेवाईक शोध घेत असतांना विलास पाटील यांच्या शेतातील विहीरी जवळ त्याची चप्पल दिसुन आली म्हणुन शोध घेणाऱ्यानी विहीरीत डोकावुन पाहीले असता विहीरीच्या पाण्यात त्याचा मृतदेह दिसुन आला . रहीम देशमुख याचा सहा महीन्यापुर्वीच लग्न झाले होते लग्नाच्या तिन महीन्या नंतरच त्याची फारकत झाल्याने विवाहीत जिवन पत्नीच्या घटस्फोटाने संपुष्टात आल्याने तो मागील काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली होता असे बोलले जात आहे . या बाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचे काका अब्दुल फतु देशमुख वय ४१ वर्ष यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . मयत रहीम देशमुख यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी केलेत.

मा.आ.नरेंद्र पवार साहेब(भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)यांचा विदर्भ व मराठवाडा दौरा:

0

 

प्रतिनिधी:(जालना)भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.आ.नरेंद्र पवार साहेब यांचा विदर्भ व मराठवाडा दिनांक ४,५,६ नोव्हेंबर दौरा संपन्न.दिनांक ५ नोव्हेंबर शनिवार
जालना शहर सकाळी- १० ते ११ मा.रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे साहेबांची भेट व संघटनात्मक चर्चा,ठिकाण:मा.मंत्री महोदय यांचे निवासस्थान जालना शहर.
सकाळी ११ ते १२:३० वाजता बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र वाटप बैठक स्थान:भाजप जालना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय बैठकीस वि.ज.भ.ज.जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अपेक्षित आहेत.वरील कार्यक्रमाची पूर्वतयारीसाठी बैठक दिनांक ०३/११/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या निमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मा.भास्कर आबा दानवे मार्गदर्शन म्हणून पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.तसेच जालना जिल्ह्यातील व तालुक्यातील भटके विमुक्त आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे साहेब,जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार,युवा अध्यक्ष उद्धव जायभाये व तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड यांनी केले आहे.

अकोला राणी सती यांचा753 वा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने दिपोत्सव लावून साजरा

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला येथील सामाजिक तसेच अध्यात्म ,भक्ती, श्रद्दे सोबत मानवतेचे कार्य राणी सती दादी भक्त .त्यांच्या प्रेरणेने करीत असल्यामुळे 753 वर्षानंतर सुद्धा त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो ही संस्कृती व परंपरा मातृ शक्तीने राजस्थान पासून महाराष्ट्र पर्यंत देशातील कोणाकोपऱ्यामध्ये पोहोचून ते कार्य केल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका चंदादेवी हरिप्रसाद तिवारी यांनी केले.गजानन महाराज यांच्या पावनस्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात गेल्या 80 वर्षाच्या परंपरेनुसार श्री राणी सती दादी यांचा जन्मोत्सव आवळा नवमीला साजरा करण्यात येतो या निमित्ताने श्री राणी सती दादी चे मंगल पाठ चार अध्यायाचे पठण सामूहिकरीत्या माञुशक्तीने करून भक्ती आणि श्रद्धेच पालन केलं यावेळी महाआरती व विशेष पूजा अर्चना करण्यात आली सुमन अग्रवाल , मंजू झुंझुनवाला हरिप्रसाद तिवारी निर्मला पंडित संगीता अग्रवाल विशाखा पोद्दार रतन गिरी माधव मानकर अजय गुल्हाने, जनक जोशी आदींनी कार सेवा करून उत्सव साजरा केला यावेळी विशेष पूजा अर्चना पंडित चेतन शर्मा गिरीश जोशी झलक शर्मा संतोष शुक्ला यांनी केली

टायगर ग्रुप मा. तानाजी भाऊ जाधव (पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- 2 नोव्हें
मा.तानाजी भाऊ जाधव(पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय व दीनदयाळ उपाध्याय अनाथ, बेघर आश्रम येथे फळवाटप करण्यात आले. तसेच वृक्षरोपण सुद्धा करन्यात आले. या वेळेस टायगर ग्रुप चे विशाल जयराज,सचिन उदासी,प्रीतम रेवतकर,रोहन सरोदे,नरेश मेसरे,अनूप पठारे,अजय सडमाके, सौरव साठोने,भगवान मडावी,ईश्वर डोमडे,प्रणीत सोरटे,जयेश मेशकर,तुषार भाकरे, आशु सोनकुवर, राजु इल्मलेवार,प्रणय थुल,अतुल कुमरे, उपस्थित होते