Home Blog Page 26

Tamgaonnews/इंदूरमधून अल्पवयीन मुलगी आणि संशयित युवक ताब्यात

 

तामगाव पोलिस स्टेशनमध्ये २०२२ मध्ये दाखल झालेल्या अपहरण प्रकरणाचा धागा बुलढाणा पोलीसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अखेर पकडला आहे. तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या संशयिताचा शोध मध्य प्रदेशातील प्रितमपूर (जि. इंदूर) येथे लावण्यात आला.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील अपहरण प्रकरणांच्या तपासात पोलिस दलाने मिळवलेले हे महत्त्वाचे यश मानले जात आहे.

पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व अपहरण प्रकरणांचा सखोल तपास करून पीडित मुले आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथकाला शोधमोहीम राबवण्याचे निर्देश दिले.

तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण हाताळण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी आणि संशयित विक्की प्रकाश गव्हांदे (वय २६, रा. वकाना, ता. संग्रामपूर) हे इंदूर जिल्ह्यात लपल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने प्रितमपूर परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली.

काही तासांच्या सततच्या शोधानंतर पथकाने अल्पवयीन मुलगी आणि आरोपी विक्की गव्हांदे यांना शोधून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर दोघांना सुरक्षितपणे तामगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास तामगाव पोलिस करत आहेत. या प्रकरणाच्या उलगड्यानंतर आता अन्य काही प्रकरणेही पोलिसांच्या रडारवर असून त्याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई एसपी निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

ऑपरेशनचे नेतृत्व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केले.

Tamgaonnews/पथकात पोलिस उपनिरीक्षक संजय ठाकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर बोरसे, अविनाश जाधव, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल निर्मला कंकाळ, चालक सचिन शेंद्रे, तसेच राजू आडवे सहभागी झाले होते.

Yavalnews /यावलचे माजी नगराध्यक्ष पाटील यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पत्नीसह शिवसेना ( उबाठा ) घेतला प्रवेश

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर पालीकेच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकी रणधुमाळी सुरू झाली असून,राजकीय वातावरण तापु लागले असुन,

यातच यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी त्यांच्या पत्नी व नगराध्यक्षपदाच्या सर्वाधीक चर्चेतील उमेदवार सौ छाया पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटात जाहीर प्रवेश घेतल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणुन त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा देखील या वेळी करण्यात आली .

 

 

पाटील यांच्या कृषी केन्द्रावर आयोजीत महाविकास आघाडीच्या मेळाव्यास माजी आमदार रमेश चौधरी ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले . शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, काँग्रेसचे हाजी शब्बीर खान

Yavalnews /तालुकाप्रमुख शरद कोळी , माजी शिवसेना तालुका प्रमुख कडू पाटील,काँग्रेसचे शहर अध्यक्ष हकीम शेख, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष खर्चे,पप्पु जोशी, योगेश चौधरी यांच्यासह मोठया संख्येत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . मेळाव्याचे सुत्रसंचलन शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले .

Nagarparishadnews/“जप्तीची नामुष्की आणि प्रशासनाचा धडा”

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- नगरपरिषदेवर आलेली जप्तीची वेळ ही केवळ एक घटना नाही, तर प्रशासनातील निष्काळजीपणाचा धडा आहे. आजंती बंधाऱ्यासाठी २००९ मध्ये लिला भेंडे यांच्या नावाची चार एकर जमीन नगरपरिषदेकडून अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र, त्या जमिनीचा मोबदला इतक्या वर्षांपासून न दिल्याने न्यायालयात याचिका दाखल झाली.

न्यायालयाने नगरपरिषदेला १२ लाख ३२ हजार ७३२ रुपये देण्याचा आदेश दिला, पण तरीही आदेशाचे पालन झाले नाही. शेवटी जप्तीची कारवाई सुरू झाली आणि नगरपरिषद कार्यालयावर नामुष्कीची वेळ आली. याच वेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी पुढाकार घेत पाच लाख ३२ हजार रुपयांचा धनादेश देऊन परिस्थिती आटोक्यात आणली. त्यांचा हा तत्पर निर्णय कौतुकास्पद आहे.

तरीसुद्धा मूळ प्रश्न कायम आहे — अशी वेळ येऊच का द्यावी? नागरी हक्क आणि प्रशासनिक जबाबदारी यांचा तोल बिघडल्यास नागरिकांचा विश्वास डळमळतो. जमिनीचा मोबदला देणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही, तर तो नैतिक कर्तव्यही आहे.

Hingnghatnews /हिंगणघाटची घटना सांगते की विकासाच्या नावाखाली प्रशासनाने पारदर्शकता आणि संवेदनशीलता गमावली, न्यायालय आणि जप्तीची वेळ येते,पुढे पण येईल या सर्वाना जनता जवाबदार आहे.

Buldhanaurban/बुलढाणा अर्बन बँकेने गोखले बिल्डरला दिलेल्या नियमबाह्य कर्जाची चौकशी व्हावी.

 

मुख्य संपादक (अनिलसिंग चव्हाण )

बुलडाणाः- जिल्ह्यात व इतर जिल्ह्यातही अग्रेसर नामांकित असलेल्या बुलडाणा अर्बन बँक अनेकांना कर्ज देते.परंतु कोणत्या आधावर देते.

हे समजू शकत नाही.गरजू गरीब अनेकांना कर्ज मिळत नाही.त्यासाठी अनेक चाचक अटी असतात.परंतु विशेषतः बँकेचे पदाधिकारी असणाऱ्या संचालक, वरीष्ठ अधिकारी यांचे जवळच्याच असलेल्या लोकांना मात्र तात्काव कर्ज मंजूर करुन दिल्या जाते.

ह्यापैकी एक प्रकार म्हणजे कदाचित जवळची व्यक्ती नसेलही परंतु बिल्डर गोखले नामक कर्जदार म्हणून नियमबाह्य कर्ज दिल्याचे अधिकृत समजते.

Buldhanaurban/दिलेल्या कर्जाबाबत बुलडाणा अर्बन बँकेची चौकशी होणे गरजेचे आहे,अशी चर्चा सुरु आहे,

Hingnghatnews /नगराध्यक्षपदासाठी पत्नी उमेदवार, पण कारभार पतीदेवांचा!

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असून, सर्वच पक्षांमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. मात्र यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने, या निवडणुकीचे रूप वेगळे झाले आहे.

पण, ज्या प्रकारे काही महिला उमेदवारांच्या नावांचा उल्लेख होत आहे, त्यावरून एक प्रश्न सरळपणे डोळ्यांसमोर उभा राहतो — उमेदवार पत्नी की कारभारी पती?
सामाजिक किंवा राजकीय क्षेत्राशी फारसा संबंध नसलेल्या, पक्षसंघटनेच्या कार्यात पाऊलही न ठेवलेल्या काही महिला आज उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. मात्र, त्यामागे त्यांचे पतीच प्रमुख सूत्रधार असल्याचे उघड आहे.

पतींच्या राजकीय पुण्याईवर पत्नींना उमेदवारी मिळावी, अशी मागणी काही ठिकाणी उघडपणे होत आहे. ही परिस्थिती हिंगणघाटच्या राजकारणात चिंतनास पात्र आहे.

‘नाव तिचं, काम त्याचं’ ही प्रवृत्ती पुन्हा डोकावते आहे. आरक्षण महिलांसाठी असले तरी, प्रत्यक्षात सत्तेची लगाम पतींच्या हातातच राहणार हे चित्र जनतेलाही चांगले समजले आहे.

नगराध्यक्षपदाचे राजकारण हे जनसेवेसाठी असते, कौटुंबिक वारसदारीसाठी नव्हे, हे उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींनी लक्षात ठेवावे.
या निवडणुकीत मतदारही अधिक सजग झाले आहेत. “पतीदेवांच्या छायेत असलेली नामधारी नगराध्यक्षा नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिलेल्या महिला हव्याच,” असा सूर सामान्य जनतेत उमटताना दिसतो आहे.

Wardhanews /हिंगणघाटच्या राजकारणात या वेळचा निकाल केवळ नगराध्यक्ष ठरवणार नाही, तर ‘पतीछत्राखालील महिला राजकारणाला जनता नकार देते का?’ याचे उत्तरही देईल.

Sivshenanews /शिवसेना-राष्ट्रवादीत फूट; भाजपकडे हिंगणघाटेत एकहाती सत्तेची शक्यता!

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- हिंगणघाट शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.

शहरातील प्रमुख राजकीय पक्ष — भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच अपक्ष उमेदवार अशा अनेक पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन प्रमुख पक्षांत गटबाजी निर्माण झाल्याने मतविभाजन होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील भाजप कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद आणि विकासकामांवर आधारित प्रचार यामुळे पक्षाचा जनाधार मजबूत झाला आहे.
काँग्रेस आणि इतर पक्षांनी मात्र स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली आहे.

Sivshenanews /राजकीय निरीक्षकांच्या मते, या वेळी हिंगणघाट शहरात बहुकोनी लढत होईल, परंतु विरोधकांची विभागलेली मते भाजपच्या बाजूने सत्ता झुकवू शकतात.आता अंतिम निकालच सांगेल की हिंगणघाटच्या मतदारांचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने लागतो.

Sharadpawar /राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारांचा उत्साह!

 

वर्धा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांसाठी तब्बल ३१० इच्छुकांचे अर्ज दाखल

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :-आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने तब्बल ३१० इच्छुकांनी अधिकृतपणे आपले अर्ज पक्षाकडे दाखल केले आहेत.

वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, कारंजा, पुलगाव, सेलू, सिंदी रेल्वे आणि समुद्रपूर या नगर परिषदांमध्ये इच्छुकांची चुरस वाढली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांनी राजकारणात पदार्पणाची तयारी दाखवली असून, अनुभवी माजी नगरसेवक आणि समाजसेवकांनीही पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया उत्साहवर्धक आणि स्पर्धात्मक ठरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले.

प्राप्त अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार असून, स्वच्छ प्रतिमा, जनतेसाठी काम करण्याची वृत्ती आणि विकासाभिमुख विचारसरणी या निकषांवर उमेदवार निश्चित केले जातील. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय स्थानिक नेतृत्व आणि जिल्हा पातळीवरील समन्वय समितीच्या बैठकीनंतर घेण्यात येईल.

अतुल वांदिले म्हणाले, “जनतेच्या विकासाचा विचार, स्वच्छ प्रशासन आणि प्रामाणिक सेवा या तत्वांवर आमचा पक्ष ठाम आहे. कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि जनतेचा उत्तम प्रतिसाद पाहता, आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्थिती वर्धा जिल्ह्यात अधिक मजबूत होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाचे कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून जनतेशी थेट संपर्कात राहून काम करत आहेत.

Sharadpawar/स्थानिक विकास, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर पक्ष जनतेचा विश्वास संपादन करत आहे. सध्या सर्व नगर परिषदांमध्ये निवडणुकीचा माहोल रंगू लागला असून, उमेदवारांची घोषणा होताच प्रचार मोहीमेला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Hingnghatnews /हिंगणघाट नगरपरिषदेसाठी मनसेचे ४ संभाव्य उमेदवार जाहीर

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तयारीचा बिगुल वाजवला आहे. जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर यांच्या नेतृत्वात आज हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, मनसेकडून चार दमदार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
जाहीर करण्यात आलेले संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे –
1️⃣ केतन तायवाडे
2️⃣ सतीश चतुर
3️⃣ श्रीकांत तळवेकर
4️⃣ हर्षल गुंडे
या चौघांनाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी देखील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, हिंगणघाट तालुका अध्यक्ष पवन तडस, समुद्रपूर तालुका अध्यक्ष विठ्ठल तळवेकर, विधानसभा संघटक अमर बकाणे, देवा काटकर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष श्रीकांत तळवेकर, हिंगणघाट शहराध्यक्ष केतन तायवाडे, शेतकरी सेना शहराध्यक्ष सतीश चतुर, तसेच योगेश नासरे, केशव उमाटे, हर्षल गुंडे, अभिजीत तायवाडे, अनिकेत वानखडे, स्वप्निल दाते आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटी, मतदारसंघनिहाय नियोजन आणि पक्षविस्तारावर सविस्तर चर्चा झाली.

Wardhanews /कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, हिंगणघाटमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कमपणे उभी राहत असल्याचे चित्र या बैठकीत स्पष्टपणे दिसून आले.

Hingnghatnews /रोटरी क्लब हिंगणघाट तर्फे महिलांसाठी कॅन्सर जनजागृती सेमिनाराचे आयोजन

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (ता. ७ नोव्हेंबर) — राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिनानिमित्त रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कॅन्सर जनजागृती सेमिनाराचे आयोजन करण्यात आले.

या सेमिनारमध्ये प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. प्रणाली सायंकार यांनी महिलांच्या आरोग्यविषयक माहिती, कॅन्सरची लवकर ओळख, तसेच प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.

महिलांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल प्राची पाचखेडे यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी आणि पूर्व अध्यक्ष माया मिहानी यांची उपस्थिती लाभली.

Hingnghatnews /कार्यक्रमाचे संचालन रोटेरियन जया मुनोत यांनी केले आणि त्यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

रोटरी क्लब हिंगणघाट हे समाजसेवा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, या सेमिनारद्वारे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृतीचा संदेश दिला गेला.

Dharashivnews /बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात ऐतिहासिक संघदिन मोठ्या उत्साहात साजरा

– – – – – – – – – – –
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : (वा) बौद्ध जगतात वैशाख पौर्णिमेला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व कार्तिक पौर्णिमेचें आहे. जगभरात तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार कार्तिकी पौर्णिमेला झाला. हा दिवस ऐतिहासिक संघदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो असे प्रतिपादन धम्मचारी प्रज्ञाजित यांनी केले. शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात बुधवारी ऐतिहासिक संघदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला या वेळी ते बोलत होते.

या वेळी धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की,तथागतच्या ज्ञान प्राप्ती नंतर त्यांचे समकालीन असलेले पंचवर्गीय भिक्षु बुद्ध झाले पण यश यांच्या धम्म दीक्षेनंतर संघाची निर्मिती झाली.तथागत भगवान बुद्धांनी चरीत भिख्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश आपल्या भिक्षुंना दिला, बहुजनांच्या कल्याणासाठी भिक्षुना दाही दिशेला जाऊन धम्म सांगण्याचा, सर्वांप्रती करुणा हृदयात ठेवून त्यांचे दुःख दूर करण्यासाठी भ्रमण करत रहा,

असा संदेश दिल्यानेच आज जगभरात बौद्ध धम्म पोहोचला असल्याचे ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला शरण जाऊन त्यांच्या शिकवणीला प्रतिज्ञा बद्ध होऊन आचरण करून लोकांच्या समोर एक आदर्श धम्मसेवक भिक्षु असावा लोकांनी त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे आणि तो लोकांची सेवा करणारा असावा, स्वतः धम्माचे आचरण करून इतरांना धम्म सांगणारा असावा असे म्हणाले.

१९५० साली महाबोधी पत्रिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नवा धम्मसेवक कसा असावा यांचे विवेचन केले आहे.त्या धम्मसेवकांनी बुद्ध धम्माचा प्रचार करणे,
लोकांचे दुःख नाहीसे करणे,तसेच जागतिक संघाची निर्मिती करणे व बौद्धांचा संयुक्त वेगळा धर्मग्रंथ असावा असे सांगितले आहे.बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी माझे जीवन समर्पित करणार आहे असा बाबासाहेबांनी मनोदय व्यक्त केला होता, त्यास अनुसरून प्रत्येकाने की बौद्ध धम्म प्रचार- प्रसारा करिता स्वतःचे योगदान देणे आवश्यक आहे, तरच प्रबुद्ध भारताचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल असे ते म्हणाले.

Umrganews /त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सर्व ठिकाणी कार्तीक पौर्णिमा संघ दिन म्हणून जगभर साजरी केली जाते,अनेकांचे दु:ख करण्यासाठी आपण कृतिशील राहू या हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.या प्रसंगी जी.एल.कांबळे तानाजी कांबळे,चद्रकांत कांबळे,राजेंद्र सुरवसे,उत्तम गायकवाड, संतोष दलाल,वगरसेन कांबळे,मंदाताई टिळे,संघप्रिया कांबळे आदी धम्ममित्र उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी धम्मभूषण यांनी केले आभार धम्मचारी विबोध यांनी मानले.