Home Blog Page 262

सेवा ही परमोधर्म,एका कामगाराची कैफियत:

0

 

प्रतिनिधी:(जालना)अनिल मिसाळ यांनी सांगितले की,काल माझ्या नोकरीच्या कामानिमित्त मी आणि माझी बायको मुंबईला तिकीट बुक करण्यासाठी जालना स्टेशनला गेलो होतो.मी स्टेशन कडे जात असताना मला कपिल दहेकर सर दिसले.मी माझ्या पत्नीला म्हणाले की,बोल की ते कपील दहेकर सर ओबीसी चे भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष आहेत.मी म्हणालो पत्नीला बोल की आपली अडचण,सरांना सांगा आपली कैफियत.तेव्हा मी लगेच दहेकर सर कडे गेलो.आणि माझा परिचय दिला.व माझी सर्व हकीकत कामगार विभाग येथे 6 महिने अगोदर नोकरीला होतो. काही कारणवस्त मला नोकरीहून कमी करण्यात आले आहे.मी घरात मोठा असल्याने माझ्यावर आई-वडिलांची माझ्या पत्नीची सर्वांची जबाबदारी आहे.मुंबईतील अधिकाऱ्यांनकडे वारंवार मी चकरा मारूनही मला रुजू करून घेत नाही.कामावर परत घेत नाही.आणि आताही मुंबईचीच मी वारी करण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी आलो होतो.तेव्हा आपण मला दिसला,आपण मला काही मदत केली तर बरे होईल.सरांनी तात्काळ सदर अधिकाऱ्यांचा नंबर माझ्याकडून मागून घेतला. आणि अधिकाऱ्यांना विनंती केली व सरांची ही विनंती अधिकाऱ्यांनी मान्य केली.आणि सांगितले की मुंबईला अनिल ला पाठवू नका.मी उद्या फॅक्स द्वारे पुन्हा नोकरीवर परत घेण्याचा आदेश फॅक्स करून पाठवून देतो.मग सरांनी मला सांगितलं की,तुला मुंबईला जायची गरज नाही.उद्या तुला तू कामावर जा, तुला नोकरीला परत घेण्याचा उद्या आदेश येऊन जाईल.आणि या आनंदाने क्षणात डोळ्यात पाणी आले.असे होऊ शकते का? ते झाले मी लॉऊस स्पीकर मोठा करून,सरांनी मला ते ऐकवलं आणि विश्वास बसत नव्हता. पण तसे झाले होते.मी आणि माझ्या पत्नी ने सरांचे खूप-खूप आभार मानले.यापुढे अशा काही अडचण आल्या तर मला सांगा असे कपिल दहीकर सरांनी मला सांगितले आहे. तसेच सरांना अशाच त्यांच्या सामाजिक,राजकीय कार्याला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा.देव त्यांना अशा सामाजिक कार्य करण्याची ताकद देवो हीच सदिच्छा.अशी भावना अनिल मिसाळ,रा.मांडवा,तालुका,बदनापूर,जिल्हा जालना यांनी आपल्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.

आई तुळजाभवानी ग्रुप तर्फे पाई ज्योत यात्रेचे आयोजन:

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील सावंगी तलाव येथे नवरात्र उत्सव निमित्त पायी ज्योत आणण्यासाठी आई तुळजाभवानी ग्रुप सावंगी तलाव येथील नागरिक हे दि.२०सप्टेंबर 2022 रोजी तुळजापूर कडे रवाना झाले आहे.ही परंपरा मागील आठ वर्षापासून अविरतपणे चालू असून,आता हे नव वर्ष आहे.गावातील सर्व जाती धर्मातील भक्तगण ज्योत आणण्यासाठी स्वखर्चातून,मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने तुळजापूरकडे जातात.आई तुळजाभवानी येथून ज्योत आणण्यासाठी-विठ्ठल जाधव,सोपान कळकुंबे,शिवाजी झोरे,संतोष राठोड,उत्तम शेजुळ, भगवान डिखुळे,रंगनाथ शेजुळ, संदीप खराडे,प्रदीप हरकळ, अनिल राठोड सह अनेक जण तुळजापूरकडे गेले आहे.

हिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टिमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे सर्वेक्षाकरुन पात्र शेतकऱ्यांना अनुदान दयावे

0

 

हिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टिमूले खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे सर्वेक्षण करुण पात्र शेतकऱ्यांना अनुदान दयावे अशी मागणी विनोदरराव वानखेड़े अध्यक्ष हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी यांनी मा उपविभागीय अधिकारी साहेब हिंगणघाट यांचे मार्फत मा,एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले या मधे या वर्षी जुलाई व अगस्त महिन्यात हिंगणघाट तालुक्यातील वडनेर सर्कल संपूर्ण गांवमधे मोठ्या प्रमाणात सतत अतिवृष्टि झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील असलेल्या सिंचन
विहिरी खचून पूर्णता बुजलेल्या आहे त्यासोबत पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकशान झालेले असून पिकांचे पुढील काळात संवर्धन करण्याकारिता ओलित करने अत्यंत गरजेचे आहे परंतु शेतमधील असलेली सिंचन विहीर खचून बुजल्यामुळे सिंचन करने शक्य नाही कारिता मनरेगा अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सिंचन विहिरी बुजलेल्या विहिरी उपासन्या व बाँधकमा करिता अनुदान मंजूर करुण देण्यात यावे शेतकरी बंधु अतिवृष्टि सतत सुरु असल्याने मोठ्या संकटात सापडलेला असून आपल्या परिवारचा गाड़ा कसा चालवाय चा या विवंचनेने असून आपन महाराष्ट्र राज्याचे कुटुम्ब प्रमुख असल्यामुळे शासनकड़ून शासना कडून शेतकऱ्यांना सिंचन विहिरी करिता मनरेगा अंतर्गत अनुदान मंजूर करण्यात यावे निवेदन देता ना सौ कविताताई विनोद वानखेड़े सरपंच वडनेर श्री नामदेवराव राउत सरपंच पोहना, श्री आशीष राउत सरपंच टाकली,श्री रमेशराव ढालें सरपंच कान्होली श्री प्रवीण शंभरकर ,सौ रमा ध शंभरकर सरपंच सस्ताबाद ,धर्मपाल शंभरकर हे सर्व उपस्तित होते ,

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तरीसुद्धा शिस्तीच्या नावाखाली यावल पोलिसाकडून वार्ताहरास धमकी,

0

 

पोलीसकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न यावल येथे काल तहसील कार्यालय मध्ये पोलीस कडून पत्रकाराला धमकी

यावल तालुका (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शिस्तीच्या नावाखाली यावल पोलिसाकडून वार्ताहरास धमकी,
यावल : येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता तेव्हा वृत्त संकलन करण्यासाठी तहसील कार्यात जाणाऱ्या वार्ताहरास पोलिसांनी अडवले व पोलिस निरिक्षकांना तहसिलदारांकडून परवानगी बाबत बोलणे करीत वार्ताहरास सोडले मात्र, पुढे पुन्हा पोलीस उपनिरीक्षक यांनी पुन्हा तुम्ही आत आलेच कसे ? असा प्रश्न निर्माण केला तेव्हा पोलिस निरिक्षकांनी खरचं तुम्हाला आत सोडले का ? याची खातर जमा करण्यासाठी त्यांनी एका कर्मचाऱ्याला सांगितले असता सदर कर्मचाऱ्यांनी तुम्ही आत्ताच खरं काय ते सांगा साहेबांनी नाही सांगितले तर तुम्हाला महाग पडेल असे सांगून शिस्तीच्या नावाखाली थेट धमकीच दिली. यामुळे पोलीस प्रशासनाच्या या वागणुकीचा पत्रकारांच्या वतीने निषेध केला जात आहे.
यावल तहसील कार्यालयात मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतचा निकाल होता सोमवारी वृत्त संकलन करण्यासाठी दिव्य मराठीचे प्रतिनिधी शेखरभाऊ पटेल हे जात होते तेव्हा गेटवरच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले व साहेबांना विचारल्याशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही असे सांगितले. तेव्हा तिथे थांबून पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे थेट तहसीलदार महेश पवार यांच्या सोबत बोलणं आत प्रवेश देण्यात आला व थोडं आत गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा तुम्ही आत आलेच कसे ? असा प्रश्न उपस्थित केला व त्यांना सांगितले की पोलीस निरीक्षकांनी तहसीलदारांशी बोलणे केल्यावर आत सोडले आहे मात्र, त्यांनी खात्री करण्यासाठी एका कर्मचाऱ्याला सांगितले की पोलीस निरीक्षक यांना विचारून या की खरचं त्यांनी सोडलं आहे का ? तेव्हा सदर कर्मचारी जाण्याच्या आधी म्हणाला की आताच खरं काय ते सांगा साहेबांनी नाही सांगितलं तर तुम्हाला खूप महाग पडेल . तेव्हा एकूणच वृत्त संकलनाच काम करत असतांना पोलिसांच्या वतीने अशा पद्धतीच्या वागणुकीचा पत्रकारांनी निषेध केला आहे

अमृत महोत्सवा निमित्य ‘सर्वासाठी घरे अंमलबजावणी करा-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

हिंगणघाट:- २० सप्टेंबर २०२२
७५ वा ‘आजादी का अमृत महोत्सव’ संपुर्ण देशात साजरा होत असतांना केंद्र व राज्य सरकारने ‘सर्वासाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबद माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
संपुर्ण देशामध्ये ७५ वा ‘आजादी का अमूत महोत्सव’ संपुर्ण देशात साजरा होत असतांना केंद्र व राज्य सरकारने ‘सर्वासाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करून भाडेपट्टयाने देण्याबाबद शासनाने वारंवार शासन निर्णय काढले असतांना जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत महसुल विभाग ठप्प बसला असुन सरसकट निर्णय घेऊन अमलबजावणी करण्यास असमर्थ ठरला आहे.
जुने परिपत्रक असतांना महाराष्ट्र सरकार नगर विकास विभाग नविन शासन निर्णय दि. ०७ फेब्रुवारी २०१९ अन्वये क.एम सी ओ २०१८/प्र.क्र.३०९/नदि -१४ असतांना सन २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहिम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतली आहे.
हर घर तिरंगा राबवुन संपुर्ण देशातील जनतेला स्वतंत्र याच्या आठवणी करून दिल्या. परंतु तिरंगा हा देशातील प्रत्येक मानसाच्या मनात जतन करून आहे. असे असतांना बहुतांश गोर गरीब जनतेजवळ आज्ही स्वतःहाचे घर तर सोडा साधी प्लांटचा पटटा देखील नाही. ज्या झोपडया अतिक्रमणावर किंवा वन जमीनीवर उभ्या आहेत त्यांना शासण निर्णयानुसार पटटे.सुध्दा महसुल विभाग देवु शकत नाही ही शोकांतिका आहे.
संपुर्ण देशात “१७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर” दरम्यान “सेवा पंधरवाडा” सुरू असतांना गोर गरीब जनतेसाठी कमीत कमी जमीनीचे पटूटे वाटप करण्यात यावी अशी सर्वसामान्य जनतेची आर्त हाक आहे.
प्रधानमंत्री आवास याजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व महसुल विभागाच्या अखत्यारितील सर्व प्रकारच्या शासकीय जमीनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमाकुल करण्याची कार्यवाही करण्यासाठी समित्या नमुद केल्या असुन अटी व शर्तीना अधिन राहुन अशी अतिकमणे नियमानुकुल करण्याबाबद कार्यवाही करावी असे सरकारचे आदेश आहेत.
दि. ०१.०१.२०११ किंवा त्यापुर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आलेले भुखंड नियमानुकुल करण्यास पात्र राहतील. अतिकमण करण्यात आलेले भुखंड कामल १५०० चौ. फुटाच्या मर्यादितच नियमानुकुल करावे. असे अतिक्रमण “भोगवटदार वग २” या धरणाधिकारावर नियमानुकुल करण्यात यावे. अशी अतिकमणे नियमानुकुल करतांना अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/इतर मागास वर्गीय प्रवर्गातील अतिक्रमण धारकाकडून कब्जे हक्काच्या रकमेची आकारणी करण्यात येवु नये. उर्वरीत प्रवर्गाच्या बाबती पहिल्या ५००चौ. फुट क्षेत्रापर्यत कब्जे हक्काच्या रकमेची आकारणी करण्यात येवु नये . मात्र उर्वरीत प्रवर्गाच्या बाबतीत अतिक्रमण नियमानुकुल करत असतांना ५०० चौ. फुट पेक्षा अधिकब परंतु १००० चै .फुट पर्यत जमीनीच्या प्रचलित वार्षीक दर मुल्य तक्त्यातील दरानुसार येणाऱ्या किमतीच्या १० टक्के आणि १००० चौ. फुट पेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी अशा जमीनीच्या प्रचलीत वार्षीक दर मुल्य तक्त्यातील दरानुसार येणा-या किमतीच्या २५ टक्के एवढी रक्कम कब्जे हक्काची रक्कम म्हणुन आकारण्यात यावी, अश्या प्रकारच्या अटी व शर्ती सरकारने केल्या आहे.
तरी केंद्र व राज्य सरकारने महसुल विभागाला सक्तीचे आदेश देवुन ७५ वा ‘आजादी का अमृत महोत्सव’ संपुर्ण देशात साजरा होत असतांना ‘सर्वासाठी घरे २२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबद शासन धोरण ठरवावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठाण्याचा पोपट काय म्हणतो वेदांत प्रकल्प गुजरातला नेतो, सह पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणेत सरकार विरोधी आंदोलन

0

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि

स्थानिक शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्या ,म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्या घेऊन रस्ता रोको करत धरणे आंदोलन करण्यात आले ,यावेळी शेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० मदत द्या ,वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा वापस आणावा , संजय गांधी योजनेतील २५ वर्षाच्या मुलांची अट रद्द करण्यात यावी , PM किसन योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित जमा करावा , जीवनावश्यक वस्तूं वरील भाव कमी करून GST कमी करावी असे मुद्दे घेऊन आज हे आंदोलन करण्यात आले , शेकडो कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून आपला रोष व्हेक्त करण्यात आला तर यावेळी तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे , शहर अध्यक्ष दिनेश साळुंके ,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, माजी शहर अध्यक्ष मनोज शर्मा , नितीन कराळे , यांच्या सह सर्वच पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आणि परिसरातील शेकरी उपस्थित होते

प्रलय तेलंग यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0

 

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक ‘प्रलंय तेलंग’ यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा आश्रम शाळा व उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना व आश्रमातील वृद्धांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.’अतुलभाऊ वांदिले ‘ यांच्या प्रमुख उपस्थितीत खाद्य पदार्थ व फळ वाटप करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन पराशर, शाहरुख बक्ष, अमित झामरे, नितीन साखरकर, शेखर भोयर, संदीप निंबाळकर, वज्रपाल बोधीले, प्रतिक वावरे, संजय बाराहाते, प्रदीप बागेश्वर, किशोर धनुषकर, सुभाष खैरकर, समीर भोसले, जयपाल तामगाडगे, घाटूर्ले काकाजी, सोनू चवरसिया, बालु बाराहाते, अरविंद दासडे, अरविंद बनसोड, सुनील रघूवंशी, संविधान चौक मित्र परिवार व प्रबुद्ध नगर येथील सदस्य उपस्थित होते..

Buldhana/संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या तालुका प्रमुख पदी अमोल ठाकरे यांची नियुक्ती

0

 

उद्धवजी साहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेवरून व नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते, जिल्हाप्रमुख बुलढाणा यांच्या आदेशावरून तसेच दत्तात्रय पाटील सहसंपर्क प्रमुख बुलडाणा ,वसंतराव भोजने शिवसेना जिल्हा प्रमुख बुलढाणा यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे किसान सेना तालुकाप्रमुख पदी अमोल विश्वासराव ठाकरे यांची नियुक्ती केली आहे

१९सप्टेंबर रोजी संग्रामपूर येथे
तालुका बैठक व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेले नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते जिल्हाप्रमुख बुलढाणा, दत्तात्रय पाटील सह संपर्कप्रमुख, वसंतराव भोजने शिवसेना जिल्हाप्रमुख , छगनराव मेहत्रे सहसंपर्कप्रमुख ,शुभम दत्तात्रय पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख, रवींद्र झाडोकार तालुकाप्रमुख यांनी अमोल ठाकरे यांना सदरचे नियुक्तीपत्र दिले यावेळी शुभम घाटे शहर प्रमुख ,कैलास कडाळे उपतालुका प्रमुख ,राहुल मेटांगे, विजय मारोडे ,धनंजय अवचार, नितीन भिसे, शिवाजी अढाव तसेच तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल ठाकरे यांचा तालुक्यामध्ये चांगला जनसंपर्क असून ते नेहमी सामाजिक, तसेच धार्मिक चळवळीमध्ये अग्रेसर असल्यामुळे तसेच त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने पक्षश्रेष्ठींनी सर्वांगीण विचार करून अमोल ठाकरे यांची नियुक्ती करून त्यांना शिवसेनेत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारातून तसेच पक्षातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मालोद ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी शिवसेनाच्या रमाबाई बारेला तर परसाडे सरपंचपदी अपक्ष मीना तडवी विजयी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी क्षेत्रातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतच्या झालेल्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाचे निकाल आज जाहीर झाला असुन, यात ग्रामपंचायत सदस्य निवड व लोकनियुक्त सरपंच पदासाठीच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय ईमारतीत शांततेत पार पडली . या निवडणुकीत मालोद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या रमाबाई भारसिंग बारेला ह्या विजयी झाल्या असून, परसाडे तालुका यावल येथील लक्ष वेधणाऱ्या ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत सरपंचपदी माजी पंचायत समितीच्या सदस्य मीना राजू तडवी ह्या विजयी झाल्या आहेत.

यावल तालुक्यातील मालोद येथील सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच, पदासह एकुण१३ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणी विजयी झाले आहे यात रमाबाई भारसिंग बारेला यांनी ७१२ मते मिळवून विजय मिळविला त्यांनी मयमुदाबाई बिस्मिल्ला तडवी यांचा ७५ मतांनी पराभव केला महमुदाबाई यांना ६३७ मते मिळाली आहेत. मालोद ग्रामपंचायत सदस्य पदी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १– दशरथ रमजान तडवी (१८३) ,परवीन भिकारी तडवी (३३१), प्रभाग क्रमांक २– पियया रुलसिंग बारेला (१७७),नजमा हमीद तडवी बिनविरोध , प्रभाग क्रमांक ३– , सुंदर सिंग गुलाब बारेला (४४५), सैनाज शरीफ तडवी (२५५), उर्मिला अनिल बारेला (४२४), प्रभाग क्रमांक ४– सलीम अकबर तडवी (९९), आबेदा सिकंदर तडवी (१५९), शकीला रणजीत बारेला (१४५), प्रभाग क्रमांक पाच जहागीर शेरखा तडवी ( ४८३) , भिका निजाम तडवी (३८५), मुन्नी जुम्मा तडवी (३५९), हे विजयी झाले आहेत

तालुक्यातील परसाडे येथील मीना राजू तडवी यांनी माजी सरपंच नजमा मजीद तडवी यांचा अटीतटीच्या निवडणुकीत अवघ्या १२ मतांनी पराभव केला आहे .मीना तडवी यांना ५३४ तर पराभुत माजी सरपंच यांना नजमा तडवी यांना ५२२ मते मिळाली आहेत. परसाडे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेले सदस्य व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक १– बाबासाहेब शंकर भालेराव (१७४), रमजान शंभू तडवी (१६३), खल्लोबाई युनूस तडवी (१६२) , प्रभाग क्रमांक २– सुलेमान काना तडवी (१९६), मुन्नाभाई इस्माईल तडवी (१९२), योगिता सतीश सावळे (१९५) प्रभाग क्रमांक तीन रोशन सुभान तडवी (२१२) , शकीला महमूद तडवी (१४५), मदिना सुभेदार तडवी(२२८), मते मिळाली आहे.
विजय उमेदवार झाल्यानंतर समर्थकांनी जोरदार , जल्लोष केला आहे मालोद येथील नवनिर्वाचित सरपंच रमाबाई बारेला यांच्या विजया नंतर येथील बाजार समिती समोर शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
तहसीलदार महेश पवार निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार आर डी पाटील, घरसाडे ग्रामपंचायतच्या निवडणुक अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी शेखर तडवीतर मालोद ग्रामपंचायत निवडणुक अधिकारी म्हणुन किनगावचे मंडळ अधिकारी सुधाकर पाटील यांचे नियंत्रणा खाली महसुल प्रशासनाच्या वतीने मतमोजणी सुरळीत पार पडली तर पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, फौजदार सुनीता कोळपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतमोजणी ठीकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हिंगणघाट शहरात देशी कट्टा विक्री प्रकरणात गुन्हे प्रगटीकरण पथकाची कारवाई

0

 

दि. 18 सप्टेंबर
हिंगणघाट पोलीसांना मुखबीर कडुन खात्रशीर माहिती मिळाली की, दोन ईसम जुनी डिस्कव्हर मोटारसायकलीने स्वताचे ताब्यात गावठी बनावटीचा देशी कटटा बाळगुन त्याची विक्री करण्याचे उद्देशाने हिंगणघाट शहराकडे येत आहेत. अश्या खात्रीशीर खबरे वरून वरीष्टांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा विवेक बनसोड व त्यांचे पथकाने नांदगाव चौकात छापा घालुन आरोपी नामे 1) सोनु अंबादासजी सोनटक्के वय 21 वर्ष रा. बुदधविहाराजवळ, घाटसावली. त. हिंगणघाट जि. वर्धा आणी 2) सुरज संजयराव करपे वय 23 वर्ष रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी क्रमांक 01 याचे ताब्यात एक चालु स्थितीत असलेला गावठी बनावटीचा देशी कटटा किंमत 15000/- रूपये मिळुन आला तसेच त्यांचे ताब्यातील वाहनाची पाहणी केली असता सदरचे वाहन हे पोलीस स्टेशन हिंगणघाट अप. क्रमांक 998/2022 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे निदर्शनास आल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 1) एक 08 एम.एम. लोखंडी बॅरल असलेला, लोखंडी मुठ व मुठीवर लाकडी कव्हर असलेला, चालु स्थितीत असलेला देशी बनावटीचा कटटा. किंमत 15,000/- रूपये. 2) बजाज डिस्कव्हर मोटारसायकल जीचे नंबर प्लेटवर एम.एच. 31/टी.सी./8903 असा असुन चेसीस क्रमांक MD2DSPAZZSWE32355 असा असुन ईजीन क्रमांक JBMBSE35371 असा असुन समोरील हेड लाईट फुटलेले असुन त्यावर एल.ई.डी. लाईट लावलेले किंमत 24,000/- रूपये. असा एकुण 39,000/- रू चा माल जप्त केला. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास श्री वसंत शुक्ला पोलीस उप निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार श्री. वसंत शुक्ला पोलीस उप निरीक्षक यांचे समवेत गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले आणी आशिष गेडाम यांनी केली.