जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर
बोदवड बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादीत मालाची खरेदी विक्रीचे मागणीला यश
कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांचे कडे तालुका संघटक शांताराम कोळी सह शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदनात
बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादित कळधान्य मका, ज्वारी, कापूस,कांदा, मिरची इत्यादी शेती मालाची खरेदी विक्री करणेसाठी मलकापूर व इतर बाजार समित्यांच्या धर्तीवर व्यापारी व शेतकरी यांना प्रोत्साहीत करून सुविधा पुरविणेत यावी याबाबत मागणी केली असता प्रशासक साहेब यांनी दि१७/०९/२२ ला बोदवड परिसरातील व्यापारी बांधव यांची यांचे सोबत मिटिंग घेण्यात आली असता व्यापारी बांधव यांनी अळचन व त्यावर उपाययोजना सांगण्यात आल्यात त्या मध्ये व्यापारी यांची मुख्यमागणी बाजार समितीमध्ये अडते असणे आवश्यक असल्याचे निर्दशनात आणून दिले असता बोदवड येथील व्यापारी श्री गणेशजी कोटेच्या यांनी अडत चालवण्यास अनुकूलता दर्शवली असता शिवसेना परिवारासह सर्व व्यापारी बांधव,शेतकरी बांधव, हमाल मापडी बांधव ,यांनी आनंद व्यक्त करून गणेशजी कोटेच्या यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला
बाजार समितीचे आवारात शेती मालाची खरेदी विक्री ला सुरुवात झाल्यास शेतकरी यांना चांगला भाव मिळेल व्यापारी यांना एकाच ठिकाणी मला मिळेल व हमाल व मापाडी यांचे सह वाहन धारक चहा नसता विक्रेते यांना रोजगार मिळेल तसेच स्थानिक पातळीवर्ती शेतीमालाची खरेदी विक्री झाल्यास शेतकरी बांधव यांच्या कडे आलेल्या पैशातून जे काही खरेदी होईल ती स्थानिक बाजारपेठेत होईल त्या मुळे आपल्या स्थानिक बाजारपेठेतही सुगीचे दिवस येतील बाजारपेठ मध्ये चांगली उलाढाल होईल त्या मुलेही रोजगार ही मोठ्या प्रमाणात निर्माण होईल
सर्व शेतकरी बांधव यांना विनंती आहे त्यांनी आपला शेती मला बाजार समितीच्या आवारात खरेदी विक्री साठी आणावा जेने करून शेतीमालाला चांगला भाव मिळेल इतरांना ही मोठा रोजगार मिळेल
गणेशजी कोटेच्या यांचा सत्कार करतांना तालुका संघटक
शांताराम कोळी , अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख कलीम शेख, शहर प्रमुख राहुल शर्मा, तालुका अल्पसंख्यांक सादिक पटवे, अल्पसंख्यांक शहर प्रमुख अप्पू भांजा, कैलास सूर्यवंशी, तोसिफ पिंजारी, योगेश भोई, भास्कर गुरचल,शेतकरी उत्तम भाऊ मेंबर राजू भाऊ वाघ ,संतोष देठे, योगेश माळी, विलास काजळे, अजय पाटील ,रघुनाथ जवरे, अजय शेळके, रमेश गावंडे ,भिकू रेंगे, कैलास वाणी, गोपाळ बडगुजर ,रवींद्र बांगर, शरीफ मण्यार ,अजय राजपूत, रोहित पांडे, सनी पाटील, इम्रान खान, लियाकत कुरेशी, पंकज वाघ, शेख सोईल, शेख जाबीर खा, सुमित भोई,धनराज माळी, निरंजन चंदनकार,सहा नागरिक उपस्थित होते





आपल्या दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन म्हटले आहे की , राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागु नाही त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर शासकीय कर्मचारी हा आयुष्याच्या उतार वयात दवाखाना खर्च , कौटुंबीक कार्यक्रम उदारणार्थ , मुलांचे शिक्षण , लग्न ईत्यादी कौटुंबीक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात सेवानिवृत्ती नंतर काहीच रक्कम उपलब्ध होत नसल्याने चरीतार्थ चालविणे देखील कठीन होत . त्यामुळे देशातील काही राज्याप्रमाणे शासनाने आपल्या राज्यात देखील जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी संघटनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्यभरात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठीकठीकाणी मोटरसायकल रॅली आयोजन करण्यात आले होते त्याच प्रमाणे यावल तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पी. व्ही. तळेले, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष बी.के .पारधी यांच्या नेतृत्वाखाली यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया पासुन पंचायत समिती व तहसील कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली यात ग्रामसेवक संघटनेचे हितु महाजन ,राजु तडवी, शिवाजी सोनवणे , भोयराज फालक , आर .टी. बाविस्कर , सुबोध सोये , दिपक तायडे , पी .आर . चव्हाण, गुरुदास चौधरी , बाळु वायकोळे, उदय पाटील , आर . यु . कोठोके , के .जी . पाटील , व्ही .एल . पाटील , प्रविण चौधरी आदी ग्रामसेवकांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी तहसील कार्यालयात नायब तहसीदार आर डी पाटील , यावल पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी यांनी मागण्यांची निवेदन देण्यात आली .



