Home Blog Page 288

वाघोदे खुर्द ता.रावेर येथे अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन मैदानात

0

 

 

 

भीम आर्मी भारत एकत मिशनची रावेरला धडक पिडीत कुटुंबाचे पुनर्वसनाचे तहसीलदारांनी ग्रामसेवकांना दिले तात्काळ आदेश

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

रावेर “भिम आर्मी” भारत एकता मिशन संस्थापक प्रमुख,बहुजन हृदय सम्राट भाई चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यनेतृत्वावर विश्वास ठेवून.. “भिम आर्मी” भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे यांचे नेतृत्वात नुकतीच वाघोदे खुर्द ता.रावेर येथे अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो पदाधिकारी यांनी भेट दिली असता तहसिलदारांनी लागलीच दखल घेऊन पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत आज दि.१९ जुलै रोजी “भिम आर्मी” जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे हे आपल्या स्वतःच्या वाहनात पीडित कुटुंबाला घेऊन रावेर तहसील कार्यालय येथे धडकले असता……पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी अश्या स्वरूपाचे निवेदन दिले असता……मा.तहसीलदार मॅडम यांनी घटनेचे गंभीर्य बघून तेथे उपस्थित वाघोदे खु. गावचे ग्रामसेवक यांना नोटिस स्थगित करून पीडितांना न्याय देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायत हद्दीतील जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले व सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या . “भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट ने तेथील हुकूमशाही ग्रामपंचायत प्रशासनाचा कुटील डाव हाणून पाडला आहे याप्रसंगी शेकडो पदाधिकारी हजर होते. अशी माहिती “भिम आर्मी” भारत एकता मिशनचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्धजी खरे यांनी दिली आहे…

राशन दुकान बनी हनुवतखेडा वासियो की दुष्मन दुकानदार बदलने की मांग 

0

 

अचलपूर /अशोक वस्तानी

एक ओर मोदी सरकार जनता को मुफत मे राशन देकर उनकी
सहायता की योजना कार्यान्वित कर रही हैं वही कुछ ऐसे भी राशन दुकानदार हैं जो मोदी सरकार की ऐसी जनउपयोगी योजनाओ को धता बताते हुवे न केवल नागरोको का अनाज हजम कर रहे बल्की वही अनाज खुले बाजार मे जादा दाम लेकर बेच रहे हैं क्योकी पीछली सरकार के दौर से ऐसे भाष्ट राशन दुकानदारो के मुह को भ्रष्टाचार का खून जो लगा हैं
अचलपूर तहसील के हनुवतखेडा मे हजारो की जनसंख्या होने पर भी मात्र एक हि राशन की दुकान को अनुमती दि गयी हैं जिसके चलते इस कथित दुकानदार ने “हम करे सो कायदा “की तर्ज पर मन बोलेगा तब दुकान खोलना मन बोलेगा ऊस ग्राहक को मनबोलेगा उटना राशन देना किसीसे भी सीधे मुह न बोलना कभी मशीनबंद तो कभी अभि राशन अया नही के बहानेबाजी कर ग्रामवासीयो को मानसिक
परेशान करना ये इस गाव के राशन दुकानदार कृष्णा राऊत का नित्यकर्म बनने से और राशन समय पर ना मिलनेसे गाव के 90%जनता को बाजार से जादा पैसे खर्च करआठ /दस की. मी. दूर जाकर राशन लाना पडता हैं
गावकी इस एकमात्र राशन दुकान को अचलपूर आपूर्ती विभाग का आशीर्वाद प्राप्त होने से दुकानदार राशन दुकान के सभी नियम को पैरो तले कुचलकर मनमानी कर रहा हैं
राशनदुकान के नियम के अनुसार दुकान सुबह 9से 12बजे तक और दोपहर मे 4से 6बजे तक खुली रख कर नागरिकोको राशन वितरित करना चाहिये लेकिन यहाँ का राशन दुकानदार केवल सुबह के समय हि दुकान खोलता है वो भी नियमित नहीं ईतनाही नहीं तो ग्रामवासीयो का विरोध देख दुकानदार कृष्णा राऊत खुद दुकान पर हाजीर नहीं रहकर अपनी जवान लडकी को दुकान पर बैठता है ताकी कोयी उससे
बहस ना करे
इस राशन दुकानदार से पुरा गाव परेशान है इस दुकानदार की अनियमितता के खिलाफ शेकडो ग्रामवासि्योने अचलपूर अपूर्ती अधिकारी देशमुख, तहसीलदार, जिलाधिकारी के पास भी शिकायत कर इस भ्रष्ट दुकानदार से मुक्ती की मांग कर दुकानदार बदलने की मांग की है
अग्गर फिर भी ग्रामवासियोको न्याय नहीं मिला तो ग्रामवासी आंदोलनका मार्ग आपनाने की भी तयारी मे है

संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या पाच जणांच्या वारसांना राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटीच्यावतीने आर्थिक साहाय्य देण्यात आले

0

 

. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील शहीद जवान राहुल श्यामराव मुळे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. संस्थेचे कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके यांनी मृताच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन मदत सुपूर्द केली. जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ येथील पंजाबराव उत्तमराव उगले व निंभोरा येथील सागर नामदेव दिगडे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील संजय उत्तमराव मारोडे, रवी संजय भाळतडक यांनाही वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागला. चौघेही व्यक्ती घरातील कमावते होते. त्यांच्यावर कुटुंबाचा प्रपंच चालायचा. काळाने त्यांनाच हिरावल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजर्षी शाहू परिवार अशा परिस्थितीत नेहमीच नागरिकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मदतीचा हात पुढे करीत आपले सामाजिक दायित्व निभावले आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना करीत मृतांच्या वारसांना रोख मदत देण्यात आली. यावेळी मनोज वाघ, यश इधोकार, डॉ. सहदेवराव गोतमारे, कैलास मारोडे यांच्यासह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावल तालुक्यात सर्वत्र विषारीद्रव्याने तयार केलेली पन्नीची व गावटी दारूची सर्रास विक्री : प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यात सर्वत्र अत्यंत विषारीद्रव्य मिश्रण केलेली पन्नीची व गावठी दारूची अवैद्य मार्गाने सर्रास विक्री करण्यात येत असुन या सहज मिळणाऱ्या दारूमुळे अनेक तरुणाचे कुटुंब व आयुष्य उध्वस्त होत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष वेधुन कारवाई करावी अशी मागणी मोठया प्रमाणावर महिला वर्गाकडुन करण्यात येत आहे. यावल शहर व तालुक्यातील विविध गावा मध्ये मोठया प्रमाणावर सार्वजनिक ठीकाणी मानवी जिवनास अत्यंत धोकादायक असे विषारीद्रव्य वापरून तयार केलेली पन्नीची व गावठी दारूची खुल्लेआम विक्री करण्यात येत असुन, अगदी सहज मिळणाऱ्या तिव्र स्वरूपाचा नशा देणाऱ्या या दारूच्या व्यसनाच्या आहारी जावुन अनेक अल्पवयीन शाळकरी मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी होतांना दिसत असुन , सामान्य कुटुंबातील मजुरी करणारे तरुण दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले आहे तर काही तरूण हे व्यसनाधीन होवुन गुन्हेगारीकडे वळत आहे . अत्यंत विषारी अशा पदार्थांनी बनविली जाणारी ही पन्नीची व गावटी दारू कायमची बंद व्हावी या साठी ग्रामीण पातळीवरील महीलांनी अनेक तक्रारी व आंदोलन केले असुन असे असतांना देखील प्रशासनाच्या स्वार्थी व दुर्लक्षित कारभारामुळे या पन्नी व गावटी दारूच्या अवैध विक्रीवर कुणाचे नियंत्रण राहीले नसल्याचे दिसत आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाने व स्थानिक पोलीस प्रशासनाने या अनेक सर्वसामान्य महीलांच्या कुटुंबाशी निगडीत अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष केन्द्रीत करून तात्काळ ही सर्व अवैद्य पन्नी व गावटी दारूची थांबवावी अशी मागणी आहे .

कार आणि दुचाकीची धडक 6 लोकांचा मृत्यू तर एक गंभीर

0

 

अचलपूर /अशोक वस्तानी

परतवाडा-बैतुल मार्गावरील निंबोरा फाट्याजवळ रात्री 11 ते 12वाजताचे च्या दरम्यान इनोव्हा कार क्र.MH,20,DJ 8003 आणि होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र.MH,27/,S 4670 यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार ष पोलीस कर्मचारी रात्रीच्या सुमारास निंबोरा फाट्याच्या पुलावर गस्त घालत असताना कारमधून खाली उतरून आजूबाजूला पाहिले. अपघातग्रस्त कार आणि मोटारसायकल दिसली, पोलिसांनी तात्काळ कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि सर्व जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासा अंती ६ जणांना मृत घोषित केले तर एक जन गँभीर असल्याचे सांगितले जात आहे.
संजय गजानन गायने वय (22) रा.बोदळ ता.चांदूरबाजार असे गंभीर जखमी झालेल्या yuvkache नाव असून, मृत्यू झालेल्यांमध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे वय (30) रा.बोदळ, सतीश सुखदेव शनवरे वय (30, रा.बहिरम कारंजा, रा. सुरेश विठ्ठल निर्मळे वय (25, रा. खरपी), इनोव्हा कार चालक रमेश धुर्वे वय (30) रा. सालेपूर
यात सर्व मृत इनोव्हा कार मधील समावेश आहे,
मोटार सायकल स्वार जखमी चालक प्रतीक दिनेशराव मांडवकर, वय (26) अक्षय सुभाष देशकर वय (26) दोघेही रा. बोदळ, असे सांगितले जात असून, मोटारसायकलवर बसलेले दोघे आणि कारमध्ये बसलेल्या 5 पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेतील मृत व जखमींना मदत दिली पुढील चौकशी शिरजगाव कसबा पोलिस करित आहे.

यावल येथे एका विवाहीत तरूणाची राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिथी ) विकी वानखेडे

येथील शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तिस वर्षीय विवाहीत तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या बाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , सागर बापु पाटील वय३० वर्ष याने आज दिनांक १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात कुणी नसतांना घरातील छताला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली , मयताची पत्नी शेतात कामास गेली होती तर त्यांचा चार वर्षाचा मुलगा हा शाळेत गेला होता .पत्नी शेतातुन कामावरून घरी आल्यावर घराचे दार उघडवावर सागर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला , पत्नीने आरडाओरड केल्याने त्वरीत परिसरातील राहणाऱ्या तरूणांनी त्याला खाली उतरवुन तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणत असतांना रस्त्यात तो मरण पावला , ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ . सचिन देशमुख यांनी तपासणी केली गळफास घेतल्याने गळयातील स्वास नलीका तुटल्याने मरण पावल्याचे घोषीत केली . मयत तरूण सागर हा यावल येथे बस स्टॅन्डच्या परिसरातील एका बॅटरीच्या दुकानावर कामास होता मी घरून जेवण करून येतो असे तो दुकान मालकास सांगुन गेल्याचे समजते . सागर पाटील व त्याचा मोठा भाऊ पवन पाटील हे दोघ भाऊ लहान असतांनाच आई वडील मरण पावल्याने ते यावल येथील आपल्या मामाकडेच राहात होते . मयत सागर यास एक चार वर्षाचा मुलगा आहे . मयत सागर पाटील याने आत्महत्याका केली हे कारण मात्र स्पष्ठ होवु शकले नाही .

12 तासने शुरू असलेले पाउसामुढे पुराची शेकेता ,, प्रशासन ने लोकांना सुरक्षति जागते केली इस्थान्तर, ,,,

0

 

हिंगणघाट मलक नईम

गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यासह शहरात सततदार पावसाने सुरुवात केली आहे रोज पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारा फळ उडाली आहे शहरातील वन नदी भागात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वणा नदी ही आपली मर्यादा ओलांडून वाहाण्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठावरील लोकांना स्थलांतरित करीत शाळेमध्ये आश्रय देण्यात आलेला आहे वन नदीला मिळणाऱ्या सगळ्यात धरणाचे दरवाजे खोलण्यात आले आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे त्यामुळे नदीला आणखी पूर येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे .आताच तुंब भरून वाहणारी नदी आणखी उसळी भरून वाहण्याची शक्यता दिसत आहे हवामान खात्याकडून आणखी काही दिवस पर्जन्य स्थिती कायम राहण्याच्या सूचना देण्यात आले आहे तेव्हा. शहेराचे निशनपुरा, पीली मस्जिद या वार्ड मधील लोकाने घरात पानी भरला आहे है हिंगणघाट प्रशासन कडुन योग्य ते उपाय योजना आपण आखण्यात येत आहे. लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करीत आहे 30 ते 50 परीवाराना स्थांलातर करण्यात आले आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवू आहे उपविभागीय अधिकारी याच्या मार्गदर्शनात तहसीलदार सतीश मासाळ यांच्या नेतृत्वात प्रशासन तालुक्यात लक्ष ठेवू आहे

चिखली येथे सहा दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर संपन्न चिखली येथे गुरुपौर्णिमा स्पेशल आनंद अनुभूती शिबीराचा समारोप

0

 

सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग एक प्रभावी ऊर्जेचा स्रोत-प्रशांत पाटील

चिखली – दि.१२ ते १७ जुलै दरम्यान स्थानिक श्री शिवाजी विद्यालय येथील हॉल मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने सहा दिवसीय गुरुपौर्णिमा स्पेशल आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग एक प्रभावी ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे म्हटले आहे ,
या सहा दिवशीय शिबिरात योग, प्राणायाम, ध्यान व अमूल्यध्यानाद्वारे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे,शांत व तणावमुक्त मन,सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी निर्णय क्षमता,मानसिक स्वास्थ्य हे जिवन जगण्याची कला सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून शिकवल्या जात असून सुदर्शन क्रिया हे आरोग्य, आनंद,शांती आणि जिवनाच्या पलीकडे असलेल्या ध्नयानांचे अदभुत,अध्यात रहस्य असून आपण जन्माला येताच सर्वप्रथम श्वास घेत असतो व याच श्वासोच्छ्वासात जिवनाचे खरे रहस्य दडलेले असून श्री श्री रविशंकर यांनी सुदर्शन क्रियेद्वारे अगदी सहज लयबद्धपणे शरीर,मन,भावना यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी विशिष्ट नैसर्गिक रित्या श्वासोच्छ्वासात लयाचा वापर करत शांत आणि एकाग्र मनाने सखोल विश्रांती, तणाव,थकवा, राग,निराशा, नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होऊन उर्जायुक्त शरीराद्वारे आनंदी जिवन प्रवास कसा करायचा हे सांगितले
सदर शिबिरात भूतकाळ,भविष्य काळात न जगता आहे त्या परिस्थितीत वर्तमानात आनंदी जगण्याची शिकवण दिली ,आपण भूतकाळात जगत असतांना आपल्याला आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप होत असतो तर भविष्याचा विचार केला तर चिंता आपल्याला सतावत असते त्यामुळे आपण दुःखी होत असतो म्हणून भूतकाळ व भविष्यात जगल्यास आपण दुःखीच होणार त्यामुळे वर्तमानात आनंदी जीवन जगण्याची शिकवण देऊन विरोधाभासी मूल्य एकमेकास कसे पूरक असते याचे स्पष्टीकरण देत असतांना आयुष्यात दुःख असेल तरच सुख येणार रात्र असेल तरच दिवस उजडणार असे उदाहरण देऊन विरोधाभासी मूल्य एकमेकास कसे पूरक असतात हे समजावून सांगितले,दुसऱ्याच्या चुकांमध्ये कारण शोधत बसू नका जो व्यक्ती जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा प्रत्येक जण तुमच्या सारखाच किंवा तुम्हाला अपेक्षित मुळीच नसणार म्हणून तो जसा असेल तसाच स्विकार करा असे सांगितले, दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करत बसू नका व वेळ वाया घालवू नका,मोठ्या मनाने माफ करायला शिका व मला गुरुदक्षिणा जी दयाल त्यात कुणाबद्दल जी घृणा, तिरस्कार असेल ती मला दया,त्याच बरोबर तुम्हाला कुठली चिंता सतावत असेल तर ती मला गुरुदक्षिणा म्हणून दया, दुसऱ्याच्या आयुष्यात सुख,समाधान निर्माण करा,सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे श्री श्री रविशंकरजी यांनी व्हिडीओ ग्राफीच्या माध्यमातून सांगितले या शिबिरासाठी भगवानराव सावळे सर,सुनील भोजवणी,भास्कर राठोड,गीता भोजवणी,खुशी भोजवणी, उदय शेटे हे शिक्षक म्हणून लाभलेले होते तर या शिबिरास राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी तणावमुक्त,सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग एक प्रभावी ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे म्हटले आहे, याप्रसंगी डॉ.बी.आर.पाटील,प्रशांत राठोड,,नलिनी पाटील,अश्विनी प्रशांत पाटील,रुद्र पाटील,सुरेखा काकडे, विनायक राठोड,राजेश यंगड,सचिन आरमाळ,प्रतिभा पिटकर,सोनाली चेके आदींनी मनोगत व्यक्त केले.

जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून ‘अतुल वांदिले’ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. शरद पवार साहेब यांनी घेतला आढावा ……!

0

 

हिंगणघाट :- मलक नईम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय खासदार मा.श्री शरदचंद्र पवार साहेब विदर्भात नागपूर येथे आले असता हॉटेल रँडिसन ब्लू येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते, प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्याकडून पक्ष संघटन वाढविण्याबाबत आढावा घेण्यात आला.
विदर्भात व वर्धा जिल्ह्यातील गावखेड्यापासून पक्ष मजबुत करण्याच्या दृष्टीकोनातून आढावा घेण्यात आला. यावेळी अतुल वांदीले यांनी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदि रेल्वे या भागात पक्षसंघटन मजबूत करीत, पक्षाला बळकट करन्यासाठी सूरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती सादर केली .वॉर्ड तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता अशा अनेक उपक्रम राबवित संघटनात्मक कामाची माहिती देखिल देण्यात आली. तालुक्यातील अनेक जागी कार्यकर्त्यांचा बैठकी घेत , येणाऱ्या नगर पंचायत, जिल्हा परिषद असो की नगर परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निवडणूक लढवेल आणि चांगल्या मताधिक्याने निवडून सुद्धा येतील. तसेच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी बैठक देखिल पार पडली यासंदर्भात पक्षसंबधित जिल्ह्याचा आढावा खा. शरद पवार साहेब यांना दिला.
यावेळी माजी नगरसेवक प्रलय तेलंग, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अमोल बोरकर, सुनील भुते,प्रशांत घवघवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळापूर तालुक्यातील गुंड प्रकृतीचे दोघे भाऊ तडीपार

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या उरळ पोलीस ठाण्यांतर्गत गायगाव येथील गुंड प्रकृतीच्या दोघा भावांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सर यांनी दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे गायगाव येथील इमदाद खान अफरोज खान वय 26 आणि अतिक खान अफरोज खान वय 20 यांच्या विरुद्ध गुन्ह्याची मालिका पाहता त्यांच्याविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सर यांच्याकडे पाठविला होता पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही गुंडांना शनिवारी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे आतापर्यंत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सर यांनी एमपीडीअंतर्गत 69 गुंडांवर तर तडीपाराची 422 गुंडांवर कारवाई केली आहे