Home Blog Page 29

Policenews / चोरी गेलेली मोटारसायकल सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत; गाडी मालकाने मानले पोलिसांचे आभार .

0

 

Policenews:बुलढाणा: जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टुनकी गावाचे रहिवासी तथा पत्रकार प्रभूदास पारस्कार यांची एमएच २८ बि.एम ३१९० ह्या क्रमांकाची दुचाकी १८ जानेवारी २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. स्थानिक पोलीस स्टेशन सोनाळा येथे २० जानेवारी २०२२ रोजी दुचाकी हरविल्याची तक्रार सोनाळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यात आला व अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील दोन चोरटे जेरबंद करण्यात आले. सदर दुचाकीचा रंग जेनी ग्रे मेटॅलिक हा होता मात्र चोरट्यांनी दुचाकीचा रंग बदल करून पेट्रोल टाकी साईट पॅनल बदल करून काळ्या लाल रंगात करून पुर्णतः बदल केला होता .

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा..दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण (gajukubde)

मात्र पोलीसांनी खाकी दाखत चोरट्यांचा छळा लावत जेरबंद केले . संबंधित पोलिसांच्या तपासाअंती स्थानिक पोलीस स्टेशन सोनाळा येथून संबंधित सोनाळा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ विशाल गवई व पोहेकॉ मोहनसिंग पवार यांनी १५ एप्रिल रोजी प्रभुदास पारस्कार यांना भ्रमणध्वनी वरून चोरट्यांकडून दुचाकी जप्त केल्याची माहिती देण्यात आली.

न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय संग्रामपूर यांच्या कडे अर्ज सादर करून सदर प्रथम श्रेणी न्यायालय कडून कायदेशीर आदेश प्राप्त करून घेत प्रभुदास पारस्कर यांनी सोनाळा पोलीसांत सादर केले.

Policenews:त्यांनतर सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी प्रभुदास पारस्कर यांना सदर दुचाकी ताब्यात दिली. या वेळी प्रभूदास पारस्कर यांनी पोलिसांचे आभार मानले.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा..दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण (gajukubde)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट:- रुग्णमित्र गजू कुबडे यांनी स्वतःची इंडिगो विकून त्यांला रुग्णवाहीकेचे रूप देऊन त्या रुग्णवाहिकेचे आज 1 जूनला काही दिव्यांगाच्या हस्ते समाजासाठी अर्पण करण्यात आली.

शहरातील अत्यावश्यक रुग्णांना मदत मिळत नव्हती. हीं गरज ओळखून गजू कुबडे यानी लोकवर्गणी करून त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेली इंडिगो वाहनाला रुग्णवाहिकेत परावर्तीत करून शहरातील गोरगरीब जनतेला सोयीचे व्हावे म्हणून आज तिचे लोकार्पण राजू पपंनवर, पिंटू कावळे, या दिव्यांगा च्या हस्ते करून एक आदर्श निर्माण केला आहे.

घरकुला संदर्भात हलगर्जी खपवून घेणार नाही – आमदार अमोल जावळे(gharkulyojna)

Hingnghat:हीं रुग्णवाहीका राष्ट्रीय महामार्गवरील अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयापर्यन्त व रस्त्यावर बेवारस म्हणून भटकणाऱ्या मतिमंद व्यक्तींना आश्रमापर्यन्त पोहचविण्यासाठी हीं रुग्णवाहीका मोफत देण्यात येणार आहे.
गजू कुबडे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.

घरकुला संदर्भात हलगर्जी खपवून घेणार नाही – आमदार अमोल जावळे(gharkulyojna)

0

 

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीरित्या संपन्न

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

“अंत्योदय हीच लोकसेवेची खरी दिशा असून, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे,” असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात केले.

प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम केल्यास शासन आणि जनतेतील अंतर नक्कीच कमी होईल, असे ते म्हणाले. यावेळी यावल पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, घरकुल योजना ही ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडित आहे आणि यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

आरोग्य उपकेंद्र नियमित सुरु करा अन्यथा उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू (andolannews)

यावल तालुक्यातील महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन दिनांक १ जून रोजी डोंगरकठोरा येथील श्री खंडेराव मंदिर ट्रस्टच्या सभागृहात करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जावळे बोलत होते. या शिबिरात एकाच छताखाली २५ शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमातून एकूण ८८८ लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आल्या.

शिबिरात उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, “शासनाच्या प्रत्येक यंत्रणेने पारदर्शकतेने सेवा पोहोचवली तरच वास्तविक अंत्योदय साध्य होईल.”

तहसीलदार मोहनमला नाझीरकर यांनी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कटिबद्ध आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.

लाभार्थ्यांना मिळालेल्या प्रमुख सेवा – विभागनिहाय तपशील:
महसूल विभाग:
जिवंत ७/१२ – १५२
ई-हक्क नोंदणी – १२८
दुरुस्ती – १९

मतदार यादी अद्ययावतीकरण:
फॉर्म ६ – २२
फॉर्म ७ – १३
फॉर्म ८ – ४

इतर महत्त्वाच्या योजना व सेवा:
संजय गांधी योजना (DBT लाभार्थी) – १५२
आरोग्य तपासणी – ५४
शिधापत्रिका लाभ – ८४
सेतू केंद्राद्वारे विविध दाखले – १८३
(उत्पन्न – ६६, जातीचे – ७२, वय/रहिवास – ४५)
लेक लाडकी, जननी सुरक्षा, ICDS योजना – ४

gharkulyojna:या शिबिरास माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, श्याम महाजन, भरत पाटील, यदु पाटील, पंकज चौधरी, शरद कोळी, योगेश भंगाळे, रुपेश पाटील, डिगंबर खडसे आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्य उपकेंद्र नियमित सुरु करा अन्यथा उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू (andolannews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

andolannews:सविस्तर वृत्त असे कि, लोणार तालुक्यातील मौजे चोरपांग्रा, गोवर्धन नगर येथे जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून उपकेंद्र अस्तित्वात आहे. मात्र या आरोग्य उपकेंद्राकडे कोणताही वरिष्ठ अधिकारी फिरकत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी, कर्मचारी या उपकेंद्राकडे कानाडोळा करतात. व आठवड्यातून एकदाच उपकेंद्र उघडण्यात येते.

या संदर्भात स्थानिक नागरिक शिलवंत इंगळे यांनी तालुखा वैद्यकिय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी तोंडी माहिती देऊन कळवले मात्र या निगरगठ्ठ अधिकाऱ्यावर काहीच असर झाला नाही.

अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना…(FarmerNews)

आता पावसाळ्याचे दिवस सुरु होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास त्यांना बीबी येथे न्यावे लागते परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो बीबी ते चोरपांग्रा तीन ते चार किलोमीटर अंतर असल्याने रुग्ण दगवण्याची शक्यता नाकारतायेत नाही.

andolannews: त्यामुळे चोरपांग्रा येथील शिलवंत इंगळे यांनी लोणार तालुका आरोग्य अधिकारी यांना दि.3 जुन 2025 रोजी निवेदन देऊन मागण्या मान्य न केल्यास 15 जुन 2025 पासून तालुखा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनसमोर आमरण उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा शिलवंत इंगळे यांनी दिला आहे

अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना…(FarmerNews)

0

 

FarmerNews:उद्या दिनांक ४ जून रोजी मुंबई येथे पिक विमा संदर्भामध्ये मंत्रालय मध्ये अतिशय महत्त्वाची पीक विमा संदर्भामध्ये कृषीमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित असून त्या बैठकीसाठी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी अखेर रवाना..

मागील काही दिवसांपूर्वी सिंदखेड राजा येते हजारो शेतकरी घेऊन दिनांक १४ मे रोजी उपविभागीय कार्यालयावर पिक विमा व कर्जमाफी या संदर्भामध्ये भव्य मोर्चा निघाला असून तसेच लोणार तहसील कार्यालयावर मागील त्याला पिक विमा द्या मागेल त्याला कर्जमाफी द्या यासंदर्भामध्ये २६ मे रोजी शेकडो शेतकरी घेऊन मोर्चा निघाला होता.

नवनिर्वाचित संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांचे हस्ते सत्कार.(drsanjaykute)

FarmerNews:वरील दोन्ही मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या दोनच मागण्या असून अद्याप कुठलेही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्याने अखेर शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबई येथे कृषी मंत्री श्री माणिक दादा कोकाटे यांना भेटण्यासाठी अखेर रवाना….

शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा.

नवनिर्वाचित संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांचे हस्ते सत्कार.(drsanjaykute)

0

 

drsanjaykute:संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक दिनांक 31 मे रोजी पार पडली त्याचा निकाल काल 1 जुन रोजी घोषित करण्यात आला असुन यामध्ये शेतकरी परिवर्तन पॅनेल चा दणदणीत विजय संपादन केला आणि १५ पैकी या पैनल चे १४ संचालक विजयी झाले.

या सर्व विजयी संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढ़ा भरवून त्यांचे निवास स्थानी उत्सहात सत्कार करण्यात आला.

निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनेल ची विजयी पताका फडकवन्या साठी झटलेले संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आ डॉ कुटे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ही निवडणूक लढल्या गेली यावेळी सूक्ष्म नियोजन करीत संग्रामपूर तालुका अध्यक्ष तथा कृऊबास सभापती भाऊराव पाटील यांच्या नविनतम कार्यकाळात भाजपा प्रणित पॅनेल ची ही पहिलीच निवडणूक संग्रामपूर तालुक्यात लढली गेली.

यामध्ये विरोधी पॅनेल ला सोसायटी मतदारसंघातून एकच जागा निवडून आणता आली तर इतर सर्व मतदारसंघात शेतकरी पॅनेल चे छत्री या निशाणी वर एकूण 14 संचालक निवडून आले. निकाल जाहीर झाल्या नंतर परिवर्तन पॅनेल चे सर्व विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, ढोलताशे वाजवीत मोठा जल्लोष साजरा केला होता.

यावेळी कार्यकर्त्याच्या जोरावर आपण संग्रामपूर तालुक्यालतील सहकार क्षेत्र पुर्णपणे काबीज केले असुन ते निरंतर टिकवाण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे.

drsanjaykute:तसेच या निवडणुकी मधे शेतकऱ्यांनी पॅनेल वर दाखवलेला विश्वास आणि परिवर्तन पॅनेल मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर हा भरघोष विजय संपादन करता आला असुन सर्व विजयी संचालकांनी संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने विकासात्मक व शेतकरी हिताची कामे करावी असे प्रतिपादन केले.

निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

0

 

प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुका विलास सावळे

MurtijapurNews:मूर्तिजापूर शहरात विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळ मूर्तिजापूरच्या उत्साही सदस्यांनी एकत्र येऊन पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. नुकताच, हरियाणा नगरमधील डॉक्टर विक्रम शर्मा हॉस्पिटलच्या परिसरातील मोकळ्या जागेत या मंडळाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

या उपक्रमात केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचा उद्देश होता.

या कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली, ज्यात वड, पिंपळ, लिंब आणि इतर सावली देणाऱ्या तसेच औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचा समावेश होता. मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन अत्यंत आनंदाच्या वातावरणात वृक्षारोपणाचे काम केले.

प्रत्येकीने आपल्या परीने योगदान देत या उपक्रमाला यशस्वी बनवले.या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रश्मी शर्मा होत्या, ज्यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले आणि महिलांच्या या योगदानाला गौरवले. तसेच, उपाध्यक्ष संतोषजी खंडेलवाल यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि त्याचे दूरगामी फायदे सांगितले. सहउपाध्यक्ष किरण जोशी, सचिव बरकाजी तिवारी आणि कोषाध्यक्ष कल्पना तिवारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय भूमिका घेतली.

याव्यतिरिक्त, मंडळाच्या सदस्य मीना नागवान, सुनिता नागवान, शितल जोशी, रेखा उपाध्याय, काजल तिवारी आणि शशी नागवान यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने या उपक्रमात सहभाग घेतला.

MurtijapurNews:विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांनी एकत्र येऊन केवळ वृक्षारोपण केले नाही, तर त्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीने इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात असे अनेक उपक्रम राबवले जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.आपल्या परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता?

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनधिकृतपणे गृहप्रवेश,घरफोडीचा प्रयत्न व संभाव्य जीविताला धोका असल्याने निवेदन कर्त्याचे रक्षण होण्याबाबत.(crimenews )

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

बुलढाणा:-गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनधिकृतपणे गृहप्रवेश,घरफोडीचा प्रयत्न व संभाव्य जीविताला धोका असल्याने निवेदन कर्त्याचे रक्षण होण्याबाबत.
तक्रार जितेंद्र देवचंद कायस्थ पत्ताः शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक, बुलढाणा,व्यवसायः केबल नेटवर्क व पत्रकार यांनी शहर पोलिस निरीक्षक बुलढाणा यांना सादर केले आहे.
तक्रार करताना निवेदनात म्हटले आहे.

की,मी खालीलप्रमाणे तक्रार दाखल करीत आहे की,मी शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक,बुलढाणा येथे माझ्या परिवारासह राहतो. माझे दोन फ्लॅट असून मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. पहिल्या मजल्यावर संजय कुलकर्णी राहतात व त्यांच्या फ्लॅटसमोर व्यापारी मीटिंग हॉल आहे.
दिनांक 26 मे 2025 रोजी दुपारी अंदाजे 1.00 ते 1.30 दरम्यान चार अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसम परिसरात आले.त्यातील एक इसम शर्मा आरो सेंटर येथे थांबून पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली.

प्रभाग 12 (राम मंदिर/मुजुमदार वार्ड ) मध्ये लाखों रुपये खर्च केलेली व्यायाम शाळा केव्हा सुरु होणार !(rammandir)

त्याला केमेरा दिसताच तो तेथून निघून गेला.त्या आलेल्या अज्ञात इसमान पैकी बाजूलाच असलेल्या बंद श्रीराम हॉटेलच्या पायऱ्यांवर चढला, व उरलेले दोन इसम माझ्या घराकडे येणाऱ्या पायऱ्यांकडे वळले.त्यापैकी एकाच्या हातात नायलॉनची मोठी पिशवी होती.

ते दोघे वर जाऊन संजय कुलकर्णी यांच्या घरासमोरील मीटिंग हॉलचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला.या आवाजामुळे कुलकर्णी यांच्या घरातील आजारी वृद्ध पालकांनी आरडाओरड केली. त्यांचा नातू चिन्मय धावत हॉलजवळ गेला असता त्याने कुलूप तोडलेले पाहिले.त्याने दरवाजा उघडताच आत लपलेला एक अज्ञात इसम बाहेर येऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने चिन्मय हल्ल्यात बचावला.
दरम्यान, या अज्ञात इसमांपैकी एक इसम माझ्या मी माझ्या परिवारा सह राहत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटकडे आला होता. माझा नातू त्याच वेळी माझ्या समोरील फ्लॅटमध्ये जेवण करत असलेल्या आई व आत्याला पोळी देऊन परत आला. त्याला पाहून तो अज्ञात इसम तात्काळ खाली उत्तरला.
ही संपूर्ण घटना माझ्या सीसीटीव्ही केमेरा मध्ये कैद झाली आहे.

संबंधित फुटेज मी शहर पोलीस स्टेशनमध्ये सादर केले आहे.मी पत्रकार असून मी वारंवार समाजातील भ्रष्टाचार व अवैध धंद्यांबाबत माझ्या माध्यमातून सत्य उघडकीस आणतो. याआधीही या जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. याबाबत मी दिनांक 29/01/2023 रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली होती.त्या मागील कालावधीत माझ्या चार चाकी आरामदायी गाडीला आग लावण्याचा प्रयत्न झाला होता.

crimenews:वरील घटना पाहता, दिनांक 26/05/2025 रोजी आलेल्या या अज्ञात इसमांचा सटे गंभीर व घातपातपूर्ण होता, असा माझा ठाम संशय आहे. त्यामुळे, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही विनंती. मला व माझ्या परिवारातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याने रक्षण करावे व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगला झोप देऊन भविष्यातील होणारा अनर्थ टाळावा असे निवेदन सादर करण्यात येत आहे.

प्रभाग 12 (राम मंदिर/मुजुमदार वार्ड ) मध्ये लाखों रुपये खर्च केलेली व्यायाम शाळा केव्हा सुरु होणार !(rammandir)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

rammandir:हिंगणघाट :- शहरात अनेक योजनेतून शहरात समाज मंदिर, ,व्यायाम शाळा बांधकाम करण्यात आले उद्देश हा लोकहितार्थ आज लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. आज अनेक ठिकाणी लोकहितार्थ इमारत बांधकाम करण्यात आले आहे. याचा उपयोग होताना दिसत नाही?

हिंगणघाट शहरात प्रभाग 12 ( राम मंदिर/ मुजुमदार वार्ड मध्ये व्यायाम शाळा चे नावाने इमारत बांधकाम करण्यात आले परंतु आजही याचा उपयोग प्रभागातील युवा वर्गाला झाला नाही.

मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर ( morcha)

उलट सगळीकडे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची बदली झाल्यामुळे प्रभागात सगळीकडे दारू, सट्टा, व्यवसाय मोठया प्रमाणात वाडले त्यामुळे प्रभागातील युवा पिडी ही गैरमार्गांवर जाताना दिसत आहे.

rammandir:त्यामुळे प्रभागातील व्यायाम शाळा सुरु होणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन व्यायाम शाळा ही लवकरात लवकर सुरु करावी अशी प्रभागातील जनतेची मागणी आहे.

मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पिक विमा द्या किसान ब्रिगेड,आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर ( morcha)

0

 

सय्यद जहीर लोणार /बुलढाणा

morcha:दिनांक २६/५/२०२५ रोजी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याकरिता व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळाला नसल्यामुळे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले

असून पंचायत समिती लोणार येथून दुपारी १२.०० वा. या संदर्भात मा. तहसील कार्यालय लोणार यांना निवेदन देण्या करीता मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी उपस्थित राहून राज्य सरकारकडे प्रत्येक शेतकरी कर्जमाफीचे निवेदन देणार असून ग्रामीण भागामध्ये

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)

कर्जमाफीचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून स्वतः शेतकरी फॉर्म भरून घेत आहे, तसेच किसान ब्रिगेडचे सर्वेसर्वा श्री प्रकाश पोहरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मागील त्याला पिक विमा द्या शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा दोन्ही संघटनेच्या नेतृत्वाखाली वरील दोन्ही मागण्या संदर्भात मोर्चाचे आयोजन केले आहे.

प्रत्यक्ष शेतकरी स्वतः निवेदन देणार आहे याची संपूर्ण माहिती दिनांक 22 मे रोजी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन लोणार यांना निवेदनाद्वारे दिली आहे , निवेदन आपण आपल्या स्तरावर स्वीकारावे प्रत्येक शेतकऱ्याला त्याची पोच देण्यात यावी याकरिता आपण या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना कुठे अडथळा येऊ नये म्हणून आपण आपल्या स्तरावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व तसेच आमच्या या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फक्त पिण्याचे पाणी आपल्या कार्यालामार्फत उपलब्ध करून देण्यात यावी अशी निवेदनामध्ये मागणी केली.

या मोर्चाचे आयोजन शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांनी केले असून यांनी संबंधित संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.

morcha:की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी या मोर्चात सामील व्हा असे आव्हान शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे, श्री दिलीप चौधरी, श्री गजानन जायभाये व इतर शेतकऱ्यांनी केली आहे