Home Blog Page 30

Crimenews /हिंगणघाटमध्ये मॅफेड्रॉनसह दोघे अटकेत – 1.93 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

 

हिंगणघाट :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना मॅफेड्रॉनसह अटक करण्यात आली असून एकूण ₹1,93,560/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पो.उपनि. हरीहर सोनकुसरे व त्यांच्या पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे समजले की केतन कृष्णा देशपांडे (वय 20, रा. यशवंत नगर, हिंगणघाट) हा मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत आहे. माहितीच्या आधारे, विशाल मॅगी पॉइंट, सर्व्हिस रोड, हिंगणघाट येथे सापळा रचण्यात आला.

त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांना थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
1. 10.13 ग्रॅम मॅफेड्रॉन (किंमत ₹18,560)
2. हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल (MH-32-H-5791) – ₹20,000
3. Apple कंपनीचे दोन आयफोन – ₹1,55,000

 

एकूण जप्त मुद्देमाल: ₹1,93,560/-

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

केतन कृष्णा देशपांडे, वय 20, रा. यशवंत नगर, हिंगणघाट
प्रियांश रवी येणकोतकर, वय 19, रा. पोथरा कॉलनी, हिंगणघाट
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत खालील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते:policenews

Crimenews /पो.ह. अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, राहुल साठे, सतीश घवघवे, उमेश लडके, रवी घाटुर्ले, अनंता हराळ, दीपक मस्के, भारत बुटलेकर, राकेश इतवारे, प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि संगीता हेलोडे करीत आहे

Devendrafadnsvis/”फडणवीस पॅकेजवर होळी आंदोलन; शेतकरी संघटनेची ५० हजार हेक्टरी मदतीची मागणी”

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा (दि. १६ आक्टोबर २०२५):
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे शेतकरी पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने करत, वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅकेजच्या शासन निर्णयाची “होळी” करत तीव्र आंदोलन छेडले.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अॅड. वामन चटप, माजी आमदार सरोज काशीकर, मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, उल्हास कोंटबकर व सतीश दाणी आदींनी केले.
शासनाने जाहीर केलेल्या मदतीत मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी मदत कमी करण्यात आल्याचे सांगत, कोरडवाहू पिकांसाठी १३,६०० ऐवजी ८,५०० रुपये व बागायतीसाठी ३६,००० ऐवजी ३२,५०० रुपये दिले जात असल्याचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारने आयात धोरण, निर्यातबंदी व वायदेबाजार बंदीमुळे शेतीमालाचे दर कोसळले असून, कडधान्य व कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच, २०१८ मध्ये विहीर दुरुस्तीला मिळणारी १ लाख रुपयांची तरतूद या पॅकेजमध्ये फक्त ३०,००० रुपये करण्यात आली आहे, यावरही संताप व्यक्त झाला.

Devendrafadnsvis /शेतकरी संघटनेने हे पॅकेज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असून, “५०,००० रुपये हेक्टरी तातडीची मदत जाहीर करा” अशी स्पष्ट मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत सादर करण्यात आली.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या समारोपात पिपरी पोहना, पानवाडी व सालोड हिरापूर येथील कार्यकर्त्यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Yavalnews/यावल पंचायत समितीत दहिगाव गण या मतदारसंघातून पंचायत समिती साठी सौ. यशश्री देवकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी जनतेची जोरदार मागणी

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण असून परिसरात पंचायत समिती निवडणुकीची राजकीय तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. यशश्री देवकांत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जनतेतून व कार्यकर्ते कडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

सौ. यशश्री देवकांत पाटील या सचिव – छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन, यावल तसेच मा. सदस्य – संजय गांधी निराधार समिती, यावल असून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.

फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले, तर निराधार समितीच्या माध्यमातून गरीब, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत.

तालुकास्तरावर वैद्यकीय दाखले मिळावेत यासाठी , तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरीब गरजू लोकांना व्हावा यासाठी तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करून च्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
त्यांच्या कार्यात ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांचेही मोलाचे योगदान आहे. हे दाम्पत्य उच्चशिक्षित, प्रामाणिक व समाजाच्या सुखदुःखात सहभागी राहणारे कार्यकर्ते असून शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक सर्वच क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

लोकांच्या मनात आपुलकी, सेवाभाव आणि प्रामाणिक नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सौ. यशश्री देवकांत पाटील या दहिगाव गण येथून पंचायत समिती साठी सर्वात योग्य महिला उमेदवार ठरत आहेत, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व युवक वर्गात त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून, भविष्यात पक्षाकडून संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करून जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करत नागरिकांनी म्हटले आहे.

Yavalnews /की, “लोकहितासाठी समर्पित असलेली आणि विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू शकणारी महिला म्हणजेच सौ. यशश्री देवकांत पाटील.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशा पात्र, जनसेवाभावी व लोकाभिमुख महिलेला संधी मिळावी हीच जनतेची अपेक्षा राहील उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचे सोने करून व सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे या दांपत्याने विश्वास व्यक्त केला आहे.

Banknews/कर्मचाऱ्यांच्या खिश्याला कात्री लावून नेत्यांचे वाढदिवस साजरे केल्या जातात. 

 

मुख्य संपादक: अनिलसिंग चव्हाण

[ ही प्रथा बंद होईल का?]

संग्रामपूर ः- दिवसेंदिवस लोकप्रियतेसाठी आज-काल वाढदिवसाची साजरे करण्याची परंपरा दृढ होत आहे. खाजगी, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक ,सहकार व इतरही क्षेत्रात यांची चांगलीच दाटी पाहायला मिळते. परंतु यामध्ये अनेक पुढारी,नेते,पदाधिकारी त्यांचा वाढदिवस साजरा करीत असतांना काही स्वखर्चातून तर काही सामाजिक आणि राजकीय, सहकार क्षेत्रात संबंधित सामाजिक कार्यकर्ता व राजकीय क्षेत्रात संबंधित राजकीय नेते यांचे वाढदिवस कार्यकर्ते साजरा करत असतात.

परंतु अशी एक अर्थ संस्था आहे की जे विश्वातील सातही खंडात मान्यता प्राप्त आहे .आणि या अर्थसंस्थेचे अर्बन सह शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य आहे. म्हणून या संस्थेची उलाढाल ही अर्बोखर्बो मध्ये असते. या संस्थेत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अगणित आहे.

विश्वातील सात खंडात असलेला सर्वात मोठा खंड आशिया खंड या आशिया खंडातील नामवंत अशा संस्थेत, जेव्हा त्यांच्या आला चे वाढदिवस साजरे करतात, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावल्या जाते. अशी संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तसेच सहकार ,खाजगी शिक्षण संस्था मध्ये बोल्ड चर्चा दिसून येते.

व अधिकारी ,कर्मचारी दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमाह कमवणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्याचा घर खर्च भागवतांना किती धावपळ होत असेल अशातच वर्षाकाठी आला (आपले नेते) यांचे तीन ते चार वाढदिवस साजरे करावे लागतात. याची चांगलीच चर्चा कर्मचारी वर्गात दिसून येते.

Banking /तरी व्यवस्थापन मंडळ कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक लुटीचा विचार करून त्यांच्या मानगट्टीवर करीत असलेले हे वाढदिवस बंद करेल काय ?

Atulvandile /वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून नियुक्ती

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती स्वीकारण्यात आली.
या नियुक्ती प्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी आमदार सुनिल भुसारी, माजी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुल वांदिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सामाजिक चळवळींसाठी आणि युवकांच्या संघटन कार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुण, राजकीय दूरदृष्टी आणि संघटन कौशल्याचा गौरव करत प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे म्हणाले, “वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ही संघटन बळकट करण्यासाठीचा ठोस निर्णय आहे.”

या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नव्या उत्साहाने आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या पक्ष म्हणून उभा राहील, असा विश्वास नव नियुक्त जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी व्यक्त केला.

Atulvandile/वांदिले यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषदा आणि ग्रामीण भागातून अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर “योग्य व्यक्तीला मिळालेली योग्य जबाबदारी” अशा शब्दांत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले जात आहेत

Crimenews/मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीवर वर्धा गुन्हे शाखेची कारवाई — पाच जणांच्या अटकेसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :माननीय पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाईचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले.

दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, वैष्णवी नगर येनोरा माता मंदिर रोड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचण्यात आला. त्यावेळी एक सिल्व्हर रंगाची महिंद्रा एक्स.यु.व्ही. 500 (क्र. एम.एच. 43 ए.एल. 9294) वाहन पकडण्यात आले.

तपासात आरोपी (1) अक्षय विनोद डेहणे, (2) सुजीत अशोकराव गावंडे, आणि (3) मोहन हरिभाऊ टिचकुले, हे तिघेही हिंगणघाट येथील रहिवासी असून, ते संगणमताने मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळले. पुढील तपासात हा माल आरोपी (4) निखील रामनवार व (5) स्वप्नील शर्मा (दोघेही हिंगणघाट) यांच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले.

कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 08.53 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, कार व मोबाईलसह रु. 10,42,120/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

/Crimenews/ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी व पथकातील कर्मचारी मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, विनोद कापसे व अखिल इंगळे यांनी केली.

Hingnghatnews /विकास विद्यालय, हिंगणघाट – सत्र 1993 च्या विद्यार्थ्यांचे 32 वर्षांनंतर भव्य स्नेहसंमेलन संपन्न

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट: विकास विद्यालय, हिंगणघाटचे इ.10 वी सत्र 1993 चे विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न करून तब्बल 32 वर्षांनंतर एक भव्य स्नेहसंमेलन 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केले. या विशेष प्रसंगी निवृत्त शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानाने कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरीनाथ शिंदे सर होते. त्यांच्यासोबत मंचावर अंकुश खोके सर, गावंडे मॅडम, नांदुरकर मॅडम व खुपसरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे मुलींना चोळी, बांगडी व साडी देऊन ‘भाऊ’ म्हणून सन्मानित करणे — यामुळे संपूर्ण शिक्षकवर्ग भावूक झाला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सन्मानाने भारावून जाऊन सांगितले, “आम्ही घडवलेले विद्यार्थी आज ज्या प्रकारे आमचा सन्मान करत आहेत, तोच आमच्यासाठी खरा गुरुदक्षिणेचा क्षण आहे.”
विद्यार्थ्यांनी आपापल्या जीवनप्रवासातील सुख-दुःख शेअर केले, कुटुंबियांचा परिचय करून दिला. या स्नेहसंमेलनाचा प्रमुख उद्देश होता – बालपणीचे मित्र पुन्हा एकत्र आणणे, शिक्षकांचा सन्मान करणे आणि नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण करणे.

कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले – अनिल निकोडे, किशोर ठाकरे, करीम खान, विनोद वाघमारे, रुपेश नेहरोत्रा, छोटू खापरे, जगदीश चंदनखेडे, गजानन वराडे, जागेश्वर कोरडे, जगदीश सटोणे, मुनेश्वर उरकुडे, नरेश चाटगे, राजू शिंदे, रवी धात्रक, सीमा परबत (झाडे), अनिता घरट (खांडवये), गीता राऊत (भोरे) आदींचा मोलाचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व संकल्पना सादरीकरण करीम खान यांनी केले.

Yavalnews/अँटी करप्शन अँड मीडिया इन्वेस्टीकेशन जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी श्री भूषण नगरे सर यांची निवड करण्यात आली

 

यावल तालुका (प्रतिनिधी,) विकी वानखेडे

अँटी करप्शन अँड मेडिया इन्वेस्टीकेशन जळगाव ” जिल्हा अध्यक्ष पदी नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्षव श्री संजय बसल साहेब यांनी सांगितले आहे.

भूषण नगरे सर हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी आहेत ते भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी पाठपुरावा करत असतात *जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, विजिलेन्स डिपार्टमेंट, इतर विभागातील, सेवानिवृत्त पोलीस व अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड , आणि परिवहन विभाग (आरटीओ)*, त्यांचे व त्यांच्या कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी ते *पोलीस बॉईज असोसिएशनच्या व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या* माध्यमातून सतत कार्य करत असल्यामुळे त्यांच्या

कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय बसल साहेब यांनी भूषण नगरे यांच्यावर ” जळगाव जिल्हा अध्यक्ष ” पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते व सर्वांच्या सुखदुःखात कामात येणार श्री भूषण नगरे सर त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Devendrafadnsvis/फडणवीसांच्या ‘पॅकेज’ची होळी; शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन वर्ध्यात १६ ऑक्टोबरला!

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा:राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे पॅकेज हे आकड्यांची हेराफेरी असून, शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांपासून दूर असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या शासन निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पॅकेज होळी आंदोलन’ करण्यात येणार आहे.

शेतकरी संघटनेच्या नेत्या माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी शैला देशपांडे, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर व युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी या आंदोलनाचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मागील वर्षीपेक्षा यंदा कोरडवाहू व बागायती पिकांच्या मदतीत मोठी कपात झाली आहे. मागील वर्षी कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ₹१३,६०० मिळाले असताना, यावर्षी फक्त ₹८,५०० जाहीर करण्यात आले आहेत. बागायतीसाठीची रक्कम ₹३६,००० वरून ₹३२,५०० करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी सरकारवर आयात-निर्यात धोरण, वायदेबाजारांवरील बंदी, आणि बाजारभाव घसरवण्याचे आरोप करत सांगितले की, हीच “शेतकऱ्यांकडून लूट” झालेली रक्कम परत द्यावी. या मागणीसाठी हेक्टरी ५०,००० रूपयांची मदत तातडीने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Devendrafadnsvis/शेतकरी संघटनेने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पक्षीय भेद विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.

फडणवीसांच्या ‘पॅकेज’ची होळी; शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन वर्ध्यात १६ ऑक्टोबरला!

Amarkale/”कलोडे चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी – अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, खासदार अमर काळे यांची भेट

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशी प्रवेशले असून, खासदार अमर काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.

संत तुकडोजी वार्डातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून (२०१२ पासून) कलोडे चौकातील सर्वे क्र. १७६/२ येथील अवैध झोपडपट्टी हटविण्याची मागणी करीत आहेत. न्यायालयाचे आदेश असूनही (जून २०१७ व जुलै २०२२) प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यालाच आता अन्नत्याग आंदोलनाचे स्वरूप देण्यात आले आहे.

या आंदोलनाला महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय पाठिंबा असून, “उपोषणकर्त्यांना काही झाले तर जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल”, असा स्पष्ट इशारा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक सामाजिक आणि राजकीय नेते सहभागी झाले असून, आंदोलकांची मागणी आहे की अतिक्रमण हटवताना दुसरीकडे पुनर्वसनाची योग्य व्यवस्था व्हावी.
प्रमुख उपस्थिती: माजी आमदार राजू तिमांडे, अतुल वांदिले, अनिल जवादे, प्रवीण उपासे, मोहम्मद रफीक, सुनील डोंगरे, दशरथ ठाकरे, अशोक पराते, बालू वानखेडे, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, राजेश भाईमारे, सीमा तिवारी, मीना सोनटक्के, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, परम बावने, सुरेंद्र बोरकर, पुरुषोत्तम कांबळे, पंकज भट, सूरज खोंडे, अमित रंगारी, विजय हजारे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Amarkale/निवेदनात दिला इशारा:
“जर लवकरच योग्य तो निर्णय न घेतल्यास, संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना जबाबदार शासन/प्रशासन असेल