Home Blog Page 294

तात्काळ खतांचा साठा उपलब्ध करून बोगस बियाणे विक्री करणार्यांवर कारवाई करा” हर्षल पाटील फदाट यांची कृषी अधिकारी यांच्या कडे मागणी.

0

 

जाफ्राबाद:- सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे . बाजारपेठेत जास्त प्रमाणात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकर्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे
पेरणीच्यावेळीच मोठ्या प्रमाणावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने तोंडाशी आलेली पेरणी करायची तरी कशी? असा सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला आहे
हर्षल पाटील फदाट यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करुन खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे .
खतांचा तुटवडा भासत असल्याने याचा फायदा घेत कृषी सेवा केंद्र चालक शेतकर्यांची लुट करत आहे अशा लुट करणार्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करुन परवाना रद्द करण्यात यावा.
तालुक्यामध्ये कोणी बोगस बियाणे विक्री करत असेल तर त्यांच्या नजर ठेवून अशा घटना उघडकीस आल्या तर बोगस बियाणे विक्री करणार्यांवर व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी,कृष्णाजी माकोडे , उमेश फदाट, मयुर बोरगावकर, , रविराज जाधव,रवी फदाट ,संदेश फदाट, यांची उपस्थिती होती..
सततचे लॉकडाऊन , वाढलेला उत्पादनाचा खर्च, पडलेल्या शेतीमालाच्या किंमती, व आत्ता पेरणीवेळीच खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे
तात्काळ खतांचा साठा उपलब्ध करून , बोगस बियाणे विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी.
खतांचा तुटवडा भासत असल्याने, कृषी सेवा केंद्र चालक याचा फायदा घेत, शेतकर्यांची लुट करत आहे अशा लुट करणार्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करुन परवाना रद्द करावा
लवकरच तालुक्यातील शेतकरी बांधवाचे प्रश्न घेऊन राजाचे कृषीमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याशी चर्चा करणार .
– हर्षल पाटील फदाट

तालुक्यात बियाणे व रासायिक खतांचा मुबलक साठा शिल्लक आहे

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे परंतु पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप हंगामाची कामे खोळंबलेली आहेत. अशातच रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे . पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये व तालुक्यात.पुरेसा बियाणे व रासायनिक खतांचा साठा असल्याने कुणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन कृषी विभागामार्फत शेतकर्यांना करण्यात येत आहे. तसेच शेतकर्यांनी एकाच खताचा आग्रह न धरता संतुलित खतांचा वापर करावा म्हणजे उत्पन्नात वाढ होईय व अनावश्यक खर्चात बचत होईल. काही माध्यमातून खताच्या टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरविण्याच्या बातम्या पसरविण्यात येत आह त्यात तथ्य नसल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे.

तालुक्यात खतांचा व बियाण्यांचा पुरेसा साठ असून खतांची कृत्रिम टंचाई
निर्माण करण्याचा व अधिक किमतीत खतांची विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास
भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. ज्या शेतकर्यांना शक्य असेल त्यांनी
आवश्यक खतांची खरेदी करून घ्यावी धीरज हिवराळे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पं.स.यावल
पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये व तालुक्यात.पुरेसा बियाणे व रासायनिक खतांचा साठा असल्याने कुणीही अफवांना बळी पडू नये सागर सिनारे तालुका कृषी अधिकारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून कलोडे चौकातील अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची मागणी. अतुल वांदिले

0

 

हिंगणघाट :- कलोडे चौक येथील ,मौजा पिंपळगांव सर्वे क्र. १७६/२ या शासकीय जागेतील दुकाने व झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्याबाबतचे पत्र उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा चांच्या कार्यालयाद्वारे सर्वं दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारकांना मिळाले आहे. परंतु हे दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारक गेल्या २०-२५ वर्षापासून त्या जागेवर राहत असून व्यवसाय व रोजमजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करित आहे. आता जर हे अतिक्रमण हटविण्यात आले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल व ते सर्व दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारक हे बेरोजगार होतील तसेच त्यांचा संसार उघड्यावर पडेल. त्यामुळे सदर अतिक्रमण हे रद्द करण्यात यावे, किंवा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा यांच्या पत्रानुसार त्या जागेवर बचत गटांना उत्पादित मालाची विक्री करण्याकरीता वर्धिनी विक्री केंद्राचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर जागेवर जर आपण सदर अतिक्रमणधारकांना वर्धिनी विक्री केंद्रामध्ये दुकानदारांना १०x१० चे गाळे काढून दिले व त्या गाळ्यांमध्ये यांना स्थाई केले तर अतिक्रमणधारक हे बेरोजगार होण्यापासून वाचतील व त्यांचा रोजगार हा कायम राहील तसेच त्यांचा संसार उघड्यावर येणार नाही व झोपडपट्टी अतिक्रमणधारकांना त्यांच्या राहण्याकरीता स्थाई पट्टे देण्यात यावे. तसेच आपण दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारक यांच्याशी भेट घेवून व चर्चा करून यावर यथोचित मार्ग काढण्यात यावा.
अतिक्रमणधारकांचा व त्यांच्या परिवाराचा विचार करुन हे अतिक्रमण थांबविण्यात यावे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कलोडे चौकातील अतिक्रमण धारक यांनी मा. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन दिले.

चुंचाळे येथील एका 60 वर्षीय वृद्ध इसमाचा शेत विहिरीत पडून मृत्यू झाला

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील एका 60 वर्षीय वृद्ध इसमाचा शेत विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून मयत इसमाचे नाव डिगंबर सदु कोळी असे आहे.
चुंचाळे ता. यावल येथे डिगंबर सदु कोळी वय 60 वर्ष हे राहतात सोमवारी सकाळी नऊ वाजता ते गावालगत असलेल्या संजय पाटील यांच्या शेत गट क्रमांक 3 मध्ये शेत विहिरी जवळ काम करत होते दरम्यान त्याच वेळी त्यांचा पाय घसरून ते शेत विहिरीत पडले सदर प्रकार शेतमजुरांच्या निदर्शनास येतात त्यांनी तातडीने विहिरीजवळ धाव घेतली मात्र डिगंबर कोळी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तातडीने नागरिकांना माहिती देण्यात आली व डिगंबर कोळी यांचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णा

फायनान्स कंपनीच्या कंटाळुन कोरपावलीतील शेतकऱ्याच्या तरुण मुलाने केली विष घेऊन आत्महत्या

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील कोरपावली येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याच्या तरुण मुलाने स्वतः व वडील कर्जबाजारी असल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दिनांक १२ जुन रोजी झाला, या तरूणाचा रुग्णालयात उपचार असताना तो दिनांक १६ जुनच्या रात्री मयत झाला, तरूण शेतकऱ्याच्या अशा दुदैवी मृत्यु मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरपावली येथील संजय ऊर्फ बाळू रमेश महाले वय ३८ याचे वरती एका खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते . तसेच त्याचे वडिलांवर देखील बँकांचे कर्ज आहे या कर्जाचा डोंगर पेलवला जाणार कसा यामुळे त्याने त्याचे राहते घरात दिनांक १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान आई वडील व कुटुंब जेवण करीत असताना निवांत त्यांना समजू न देता विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्याने तात्काळ त्यास तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तो १६जुन चे रात्री मयत झाला याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयताचे पश्चात आई वडील पत्नी मुलगी मुलगा भाऊ असा परिवार आहे फायनान्स कंपनी सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असताना शेतकऱ्यांना कर्जफेड करता येत नसल्याने फायनान्स कंपन्या या शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांचा आर्थिक व मानसिक छ्ड करीत असुन , अशा प्रकारे फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करण्याची यावल तालुक्यातील ही तिसरीफार घटना आहे . शासना तात्काळ अशा प्रकारे नागरीकांचा मानसिक व आर्थिक छड करणाऱ्या बेलगाम झालेल्या फायनान्स कंपन्यांवर तत्वरीत कार्यवाही करावी अन्यथा अशा छ्डाला त्रस्त होवुन अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही तरी अशा या फायनान्स कंपन्यांवर कारवाई व्हावी अशा अनेकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत .

जळगाव जामोद येथे 2 देशी कट्टे पकडले.तसेच गुट्खा,वरली व अवैध दारु पकडणे गरजेचे!

0

 

 

जळगाव जा. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या बुरहानपुर रोडवरील निमखेडी फाटा नजीक दिनांक 16 जुन रोजी संध्याकाळी पाच वाजता दरम्यान नाकाबंदी करीत असताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना एक संशयास्पद लाल रंगाची तवेरा गाडी येताना दिसली गाडीला थांबवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये परशुराम रमेश करवले वय 23वर्ष राहणार सोमवार पेठ ,कराड जिल्हा सातारा ,

तर दुसरा आरोपी अभिजीत दिलीप येडगे वय 19 राहणार अहिल्यानगर मलकापूर ,तालुका कराड, दिनेश विजय बुरुंगले वय 22 वर्ष राहणार सातारा, तर चौथा आरोपी कुणाल बाबुराव हिवरे वय 23 राहणार रेहटे तालुका कराड जिल्हा सातारा हे चार आरोपी मिळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार मोबाईल यासह तवेरा गाडी एम एच 11 ए एल 9594 असा एकूण सहा लाख पंधराशे रुपये चा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस त्यांची कस्टडी ची मागणी करणार आहेत. याच तपासकामी सातारा जिल्हा एलसीबी चे पथक जळगाव जामोद येथे आले आहे. ही कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, अमोल वनारे, सुनील वावगे, निलेश पुंडे, उमेश शेगोकार,  सचिन राजपूत,  प्रशांत डांमरे यांनी ही कारवाई केलेली आहे. सदर हे आरोपी बुऱ्हाणपूर येथून देशी कट्टे घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये काही कटकारस्थान रचत तर नाही ना? असा प्रश्न येथील एलसीबी पथकाला पडला असावा, त्यामुळेच जळगाव जामोद येथे हे पथक दाखल झाले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत ठाणेदार सुनील अंबुलकरव चमू  यांनी केलेल्या या  कारवाई ची एकीकडे कौतुक होताना,याच पदधतीने तालुक्यातील गुट्खा,दारु,वरली,सट्टा,मट्का ,इत्यादी अवैध धंदे ही बन्द करावे ही समाजहिताची व बरेच दिवसाची  रखडलेली मागणीही जनतेतून होत आहे.

इमारत शिकस्त

0

श्री.संत रुपलाल महाराज पालखीचे वरवट बकाल नगरीत स्वागत

0

 

सालाबाद प्रमाणे श्री संत रुपलाल महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वरवट बकाल येथे स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी श्री.क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथून संत रुपलाल महाराजांच्या पायदळ दिंडी सोहळा अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे. दिनांक 16 जुन रोजी महाराजांची पालखी वरवट बकाल नगरीत दाखल झाली असता सांप्रदायिक भजन मंडळाद्वारे गावातून मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी भक्तिमय वातावरणात पालखीचे पूजन करण्यात आले. श्री.संत रुपलाल महाराज मंदिर तसेच गजानन ढगे माजी सभापती ,लक्ष्मण डाबरे,समाधान डाबरे,प्रशांत दामधर,डॉ.अमोल धूड़ेॅ यांच्याकडून मिष्ठांणासह अल्प अहाराची मेजवाणीची व्यवस्था करण्यात आली. या पालखी सोहळ्याच्या निमित्याने वरवट बकाल नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण गावातून प्रदक्षणा झाल्यानंतर दिंडीने वानखेड पातुर्डा शेगाव मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले.
यावेळी संत रुपलाल महाराज समिती वरवट बकाल चे अध्यक्ष पांडूरंग ढगे सचिव गोपाल रौंदळे वरवट बकाल च्या सरपंच सौ.प्रतिभा इंगळे उपसरपंच सौ.नंदा रौंदळे सदस्य सौ.मीना इगोकार,,अजय बकाल ग्राप सदस्य नगरीतील कैलास हागे,पांडुरंग टाकळकर, ,काशीराम रौंदळे,श्याम डाबरे,नंदकिशोर रेखाते, पुरुषोत्तम हागे,प्रल्हाद अस्वार गावातील असंख्य भाविक यांनी पालखी सोळ्यात सहभाग घेतला उपस्थित होते.

 

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांना दिले निवेदन

0

 

हिंगणघाट:- मागील चार महिन्यापासून आशा व गटप्रवर्तक केंद्र शासनाच्या नियमित कामाचा मोबदला मिळालेला नाही. पोलिओ,कुष्ठरोग,शयरोग,आरोग्य वर्धिनीचा मोबदला मिळालेला नाही.कोविड लसीकरण मोहीमेत दिवस-रात्र काम करून देखील यांच्या शासनाकडून कोणताही मोबदला मिळालेला नाही. मागील ”हर घर दस्तक” मोहिमेची आशा व गटप्रवर्तकांनी सर्व माहिती शासनापर्यंत दिलेली आहे. १ जून २०२२ पासून शासनाने पुन्हा ”हर घर दस्तक” मोहीम सुरू केलेली आहे. या कामासाठी शासनाने कोणताच मोबदला जाहीर केलेला नसून आशा व गटप्रवर्तकांनी विनामोबदला काम करावे अशी शासनाची भूमिका आहे शिवाय मार्च २०२२ पासून कोविड -19 च्या सर्वेचा मोबदलाही बंद करण्यात आलेला आहे. आशा व गटप्रवर्तकांना वेळेवर व नियमित केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असताना त्यांच्याकडून आरोग्य विभागातील अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून दबाव टाकून जबरदस्तीने हे काम करण्यास सक्ती केली जात आहे.

वरील सर्व परिस्थिती गंभीर असून यामुळे आशा व गटप्रवर्तक कामामध्ये नाराजी आहे तीव्र नाराजी आहे वरील सर्व बाबींचा विचार करून आशा व गटप्रवर्तक कांचन काम त्यांच्या कामाचा मोबदला नियमित व वेळेवर मिळवून देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांना निवेदन देण्यात आले ..
यावेळी वर्धा जिल्हा आशा -गतप्रवर्तक अध्यक्ष अलका जराते,सचिव अर्चना घुंगरे, कार्याध्यक्ष मीनाक्षी गायकवाड उपस्थित होते… नईम मलक हिंगणघाट

भारतीय जनता युवा मोर्चाव्दारा आयोजित विकास तिर्थ यात्रेचा हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शुभारंभ आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते पार पडले.

0

 

नईम मलक हिंगणघाट

हिंगणघाट। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार कुणावार यांनी पंतप्रधान श्री.नरेंन्द्रजी मोदी यांच्या मागील 8 वर्षाच्या लोकाभिमुख विकासकामांविषयी माहिती देत जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकासाची माहिती पोहचवण्याचे आवाहन केले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ गफाट, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी, भाजपा हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, भाजपा समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक,माजी सभापती गंगाधरराव कोल्हे,सौ.शारदाताई आंबटकर, भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत, भाजयुमो जिल्हा महामंत्री कवी इंगोले भाजयुमो शहराध्यक्ष सोनू पांडे, आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .