Home Blog Page 296

डॉ कुंदन फेगडे यांनी मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची केली पाहणी

0

 

यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

यावल व रावेर तालुक्यातील परिसरात दिनांक १० जुन शुक्रवार रोजी यावल आणी रावेर मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांचे व शेतकऱ्यांनाचे नुकसानीचा मोठा फटका बसला असून, सावखेडा तालुका रावेर येथे ग्रामपंचायत जवळ प्रल्हाद बाबुराव पाटील व समाधान पाटील यांच्या घरावर सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष पूर्वाचा जुन्या वटवृक्ष कोसळून घराचे नुकसान झाले. तसेच काही दिवसापूर्वी शेती मशागती साठी लागणारे ट्रॅक्टर सुद्धा या वृक्षा खाली दाबले गेले.अशा संकटाच्या काळात त्यांना दिलासा दिला व लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती संबंधित नायब तहसीलदार निलेश चौधरी ग्रामसेवक सरपंच यांना केली. व त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सामर्थ्य दिले या प्रसंगी डॉ. कुंदन फेगडे, श्रीराम फॉउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम दादा पाटील, उमेश इंगळे , पंकज इंगळे, मनोज धनगर यशपाल धांडे, संजू कोळंबे प्रल्हाद पाटील , समाधान पाटील, मधू पाटील तुषार बढे, यशवंत महाजन, लोकेश महाजन, रोहन सरोदे, कृषी साहाय्य एस. एम जाधव, तलाठी निलेश चौधरी, परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी कृषी अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल वांदिले यांचा अलखिदमत फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने सत्कार

0

 

नईम मलिक हिंगणघाट

हिंगणघाट शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यउपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अतुल वांदिले यांची राजकीय कार्य कुशलता लक्षात घेऊन अतुल वांदिले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्तीच नियुक्ती करण्यात आली आहे.

आज शनिवारी अलखिदमत फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने अतुल वांदिले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अलखिदमत फाऊंडेशन ग्रुप चे अध्यक्ष नुरुभाऊ शेख , सचिव नदिमभाई अली , व ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.

बारावीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शहरातील वैभव सिंघवीचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केले अभिनंदन

0

 

हिंगणघाट नईम मलक

बारावीच्या परीक्षेत हिंगणघाटचे वैभव कायम राखले शहरातील वैभव सिंघवीचे घरी आज शुक्रवारी १० जुन ला जाऊन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केले अभिनंदन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक ०८ जुन २०२२ ला ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. त्यामध्ये हिंगणघाटच्या जी.बी.एम.एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव मनोज सिंघवी याने ९७.३३ गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या बद्दल माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील शिक्षणाचा संदर्भात आव-विचार घेत भावी शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. वैभव सिंघवी याने जिल्ह्यातून प्रथम येत हिंगणघाटचे वैभव कायम ठेवत हिंगणघाटची मान आणखी उंचावले असे मत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले. तसेच आई-वडील व आजी यांनासुद्धा मुलाच्या यशाबद्दल अभिनंदन केले त्यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे,गौरव तिमांडे, अमोल त्रिपाठी,युवराज माऊस्कर,आदर्श त्रिवेदी,अक्षय भगत,रेहान सय्यद आदी उपस्थित होते.

हिवताप प्रतिरोध महीना हिवतापाबाबत दक्षता घेण्याचे आवाहन!

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक मो.9921400542असदपूर
दिनाक 11 जून मोर्शी
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे वतीने जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन पाळला जातो. हिवताप हा ॲनाफिलीस डासांच्या मादिपासुन पसरणारा असल्याने काळजी घेतल्यास हिवतापापासुन मुक्तता मिळवु शकतो.या करीता उपायजोजना करणे गरजेचे असल्याने दिनांक ०१ ते ३० जून पर्यंत हिवताप प्रतिरोध महिना पाळण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालय मोर्शी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक ०१ ते ३० जून हा महिना आरोग्य विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन पाळण्यात येतो ॲनाफिलीस डासांच्या मादिपासून पसरणारा हा आजार आहे. हा डास घरघुती पाणी, घरघुती भांडी, टाकी, रांजण, माठ,जुनाट टायर,फुटके डब्बे, फुटलेल्या बादल्या मध्ये साचलेल्या पाण्यात डास अंडी देतो, म्हणजेच पाण्यात तयार होणारा हा डास आहे.
हिवतापावर नियंत्रण ठेवण्याकरीता खालील उपाययोजना करणे जरुरी आहे.

१) ताप आल्यास व ताप कमी होत नसल्यास रुग्णाचे अंग ओल्या कापडाने पुसून काढावे तसेच रुग्णाला ताबडतोब जवळच्या सरकारी उपकेंद्र , प्रा. आ. केंद्र , ग्रामीण रुग्णालय, किंवा खाजगी डॉक्टर कडून उपचार करुन घ्यावा.
२) आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे, म्हणजेच घरगुती पाणी साठवण्याची भांडी, हौद, माठ,टँक व रांजण इत्यादी ६व्या दिवशी घासुन स्वच्छ कोरडे करावे व पुर्ण सुकल्यानंतर पाणी भरावे. पाण्याची कमतरता असल्यास पाणी जाड कापडाने गाळून घ्यावे. व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
३) घराच्या छतावर किंवा आवारात पडुन असलेल्या निकामी वस्तु जसे टायर, शिश्या, टिनडब्बे यांना नष्ट करावे किंवा विल्हेवाट लावावी.
४) प्रत्येकांनी आपआपल्या घरासमोरील नाल्या स्वच्छ ठेवाव्या.पाणी वाहते ठेवावे.
५) घराच्या परिसरात डबके किंवा गटारे तयार होऊ देवु नये. झाल्यास घरगुती उपाय म्हणुन पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे.
७) संडासच्या गॅस पाईपला पातळ कापड किंवा नायलॉनची पिशवी बांधावी.
८) डासापासून स्वरक्षणाकरीता मच्छरदाणीचा वापर करावा.
९) शक्य असल्यास दरवाजे व खिडक्यांना जाळ्या लावुन डासांपासून बचाव करावा.
१०) डासांपासून बचावासाठी संध्याकाळच्या वेळेस लांब लचक पुर्ण बाजु कपड्यांचा वापर करून परीधान करावे.

जनतेनी उपरोक्त उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास डासोपत्तीस आळा घालने व त्यापासून होणाऱ्या हिवपापापासून मुक्ती सहज शक्य आहे.
वरील बाबतीत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सहसंचालक अकोला डॉ. कमलेश भंडारी सर जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती
डॉ. शरद जोगी सर उपजिल्हा रुग्णालय मोर्शी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद चव्हाण यांनी केले. आरोग सहाय्यक अनिल जाधव, विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, विनोद पवार, नंदू थोरात हे हिवताप प्रतिरोध महिना कर्मचाऱ्याचा सहभाग आहे.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

कोळवद गावातील महिलांनी कायमच्या दारूबंदीसाठी सरपंचांना दिले निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील कोळवद ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम राजरोसपणे गावठी दारूची सर्रास विक्री होत असुन , सार्वजनिक ठीकाणी सहज मिळणाऱ्या या दारूमुळे मोलमजुरी करणारे नागरीकांपासुन तर अनेक तरुण हे व्यस्नाधीन झाले असुन अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले असुन , गावातील दारूबंदीसाठी महीलांनी पुढाकार घेतला असुन , या संदर्भात महीलांनी सरपंच यांची भेट घेत त्यांनी गावातील गावठी दारू कायमची बंद करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे . कोळवद ग्रामपंचायतचे सरपंच याकुब तडवी यांच्याकडे तक्रार निवेदन दिले असुन या निवेदनावर परविन फकीरा तडवी , यशोदा सपकाळे , आशा रमजान तडवी , सोनाली रतनलाल सोळुंके यांच्यासह गावातील महीलांनी आपल्या स्वाक्षरी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या गावात गावठी हातभट्टी दारूचे ११ ठीकाणी अड्डे असुन , गावातील सार्वजनिक ठीकाणी सहज मिळत असलेल्या दारूमुळे तरूण पिढी ही फार मोठया प्रमाणावर व्यसनाधिन होत असुन , गावातील असंख्य पुरुष हे दारू पिऊन आपल्या कुटुंबाला व गल्लीतील लोकांना रात्री झोपु देत नाहीत . या सर्व प्रकारामुळे अनेक ग्रामस्थांचे कुटुंब उध्वस्त झाले असुन , ही दारूडी मंडळी दारूच्या नशेत गल्लीतील लोकांना गालिच्छ भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घालतात, दारूच्या व्यसनामुळे अनेक जणांचा व तरूणा मृत्युमुखी पडलेले आहे . दारू पिणारे हे दारूच्या नशेत आपल्या पत्नी व कुटुंबातीत मंडळीला मारहाण करतात , तरी गावातील कुटुंबप्रमुख प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांनी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी गावातील दारू तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे . यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र गावटी हातभट्टीची व अत्यंत घातक रसायनाद्वारे तय्यार करण्यात येणारी पन्नीची दारू खुलेआम विक्री जात असुन , या पन्नी दारूच्या आहारी गेल्याने अनेक तरूण हे मृत्युच्या वेटींग लिस्टवर असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पन्नीची दारू व हातभट्टीची गावटी दारूच्या विक्रीवर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने बंदी घालावी अशी ही मागणी होत आहे

वर्धा जिल्ह्यात भाजप ,काँग्रेसला झटका तर राष्ट्रवादीचे पारडे जड !

0

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते माजी केंद्रिय मंत्री सुबोध मोहिते साहेब तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे वर्धा जिल्ह्यातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वर्धा जिल्ह्यातील सिंधीरेल्वे येथील भाजपच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा संगीता शेंडे, हिंगणघाट शहरातील नगरसेवक दादा देशकरी, माजी सरपंच , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ,माजी कॉंग्रेस जिल्हा सचिव प्रशांत घवघवे
वर्धा जिल्हा माजी उपाध्यक्ष भाजपा राजू गंधारे, वर्धा विभागीय शक्ती प्रमुख सुनील शेंडे व इतर मान्यवरांनी हाती घड्याळ बांधले. सर्व मान्यवरांचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या पक्षप्रवेशा दरम्यान माजी नगर सेवक, प्रलय तेलंग, अमोल बोरकर देखील प्रामुख्याने उपस्थित होते
या पक्ष प्रवेशाने भाजप सोबत काँग्रेसला देखील जिल्ह्यात मोठा झटका पडला आहे.
अतुल वांदिले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर पक्षाने त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी नियुक्त केल्या नंतर , मोठ्या प्रमानात पक्षप्रवेश सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून पुढेही सतत पक्षप्रवेश असाच सुरू राहील व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल अशे विचार अतुल वांदिले यांनी यावेळी व्यक्त केले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरात खुलेआम मद्यापन व गांजा शौकीन यांच्यामुळे खेळाडूं त्रस्त

0

 

हिंगणघाट शहरात खेळाडूंसाठी राखीव असलेले मैदान या ठिकाणी दारू शौकीन, गांजा शौकीन खुल्या मैदानात बसून दारू पितात ,गांजा चा नशा करतात व खाली शिशी हे फेकतात , हिंगणघाट शहरातील टाका ग्राउंड येथे खेळाडू प्रॅक्टिस करण्याकरिता दररोज येतात बऱ्याच खेळाडूंना धावते वेळी फुटलेल्या काचांची इजा देखील झालेली आहे. तसेच काही युवक मुलींना टोमणे मारून टवाळक्या देखील करतात. कोणी लपून व्हिडिओ सुद्धा बनवतात. त्यामुळे प्रॅक्टिस करायला येणाऱ्या युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रेमी युगल सुद्धा या परिसरात येतात .होत असलेल्या प्रकारातून काहीतरी अनुचित व आपल्या शहराला काळीमा फासणारी घटना घडण्याची संभावना आहे. म्हणून आम्ही सर्व खेळाडू आपणास विनंती करतो की येथे होत असलेल्या दारू गांजा मैदानात पिऊन टवाळकी करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करावा. या ठिकाणी अंधार होत असल्याने हे प्रकार जास्त घडत आहेत त्यामुळे टाका ग्राऊंडच्या चारही बाजूला लाईट ची व्यवस्था करण्यात आली तर हा प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. संबंधित निवेदन मा. उपविभागीय अधिकारी ,हिंगणघाट पोलीस निरीक्षक यांना दिले यावेळी शक्ति गर्ल स्पोर्टिंग फुटबॉल क्लब चे शबाना कुरेशी ताशिब शेक, राज भारती, खुशाल कामडी, विशाल मेश्राम, जाबिर कुरेशी, कार्तिक सोनटक्के, निहाल सोनटक्के, अयन अली, रक्षित जामभूडकर, कार्तिक जामभूडकर, शरफराज खान, नावेद शेख , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश मुडे, प्रशांत मेश्राम, निखिल कांबळे, अविनाश धनरेल, अमित रंगारी, प्रफुल मेश्राम उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

यावल कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यअभिषेक दिनाचा कार्यक्रम संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाव्दारे संचलीत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिना निमित्त इतिहास विभाग व विदयार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . महाविद्यालयाच्या दालनात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ए पी पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणुन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ अनिल पाटील यांनी रयतेचा राजा हिंदवी स्वराज्य संस्थेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देऊन राज्यभिषेकाचे महत्व, कारणे, परिणाम यांचे महत्वपूर्ण विवेचन केले, या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नरेंद्र पाटील यांनी केले तर या शिवराज्यअभिषेक कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मिलिंद बोरघडे यांनी मानले
सदरील कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, संतोष ठाकूर, डी डी पाटील, प्रमोद भोईटे, अनिल पाटील, तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावल येथे हिन्दवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य आभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील हिन्दवी स्वराज्याचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे एतिहासिक शिवराज्यभिषेक दिन एक दिवस महाराजांसाठी म्हणुन शहरातील युवकांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला . यावल शहरातील प्रमुख मार्गाने तरुण युवकांच्या वतीने आज विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रयतेचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक सोहळा मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला , या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवाजी महाराजांची पालखी लहान मुलांचे झांज पथक, डोक्यावर कळस घेवुन महीलांचा सहभाग , शिवकालीन वेशभुयेत लहान मुलांची दिंडी , अष्टप्रधान मंडळ , घोडयावर छत्रपती शिवाजी महाराज , आई जिजाऊ व संभाजी राजे यांच्यासह युवकांचे झांज पथक अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली , या शोभायात्रेचा समारोप शहरातील राजे निबांळकर यांच्या एतिहासीक किल्ल्यावर शिवरायांचा शिवराज्य अभिषेक सोहळा विधीवत पुजा यावलचे आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या हस्ते यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली . या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन कौस्तुभ पाटील व अभिषेक जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन शशीकांत वारूळकर व कैलास माळी यांनी केले. या संपुर्ण शिव राज्य आभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी डॉ . अभय रावते , योगेश वारूळकर , धनंजय बारी , निलेश पाटील , दिपक वारूळकर सौ . प्राची पाठक , अॅड गोविंद बारी , सागर चौधरी , राजेश श्रावगी , मयुर महाजन , लोकेश वाड, पवन खरचे, यशवंत काटकर आदी तरूणांनी परिश्रम घेतले .

पैशासाठी डॉक्टरांची रुग्ण पत्रकारासोबत असभ्य वागणूक , कारवाईसाठी पत्रकार संघटनेचे निवेदन

0

 

जळगाव(जामोद):दि.६ डॉक्टर हे रुग्णांसाठी खरोखरच देव असतात, देवदूत असतात. पैशाची पर्वा न करता निस्वार्थपणे रुग्णांची सेवा करणारे डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग, आनंदवन येथील आमटे कुटुंब यांनी तर आपल्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कित्येक डॉक्‍टरांनी पैशाला तिलांजली देऊन तदह्यात रुग्णसेवा केली. परंतु जळगाव (जामोद) वैद्यकीय पेशाला काळिमा फासणारा निंदनीय प्रकार दिनांक ६जून रोजी घडला. पोटात होणाऱ्या वेदनां असह्य झाल्यामुळे, रुग्ण तडफडत होता. त्रासामुळे वेदना असह्य झाल्याने त्यांना शहरातील डॉक्टर अजित जाधव यांचे रुग्णालयात पाठविण्यात आले आणि रुग्णालयात गेल्यावर रुग्णाने वैद्यकीय मदतीची याचना केली, परंतु डॉक्टरांच्या कंपाउंडरने अगोदर पैसे जमा करा, मगच काय ते उपचार होतील, अशी तंबी दिल्याने रुग्णाची तब्येत अधिकच खालावलेली.
हा प्रकार घडला जळगाव (जामोद) येथील दैनिक देशोन्नती चे शहर प्रतिनिधीविनोद चिपडे यांच्या बाबतीत. वेदना असह्य झाल्याने चिपडे हे संबंधित रुग्णालयात गेले. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष संजय पारवे आणि प्रहार जनशक्ती जिल्हा उपप्रमुख राजेश लहासे हेसुद्धा होते . विनोद चिपडे हे उपचारासाठी तळमळत असताना भर उन्हात साडेबारा ते एक च्या दरम्यान डॉक्टर मात्र उपचाराला टाळाटाळ करत होते. नंतर डॉक्टरांनी कंपाउंडर मार्फत उपचारापूर्वी पैशांची मागणी केली. संबंधित डॉ.जाधव यांनी सुद्धा कंपाउंडर च्या म्हणण्याचे समर्थन केले. विनोद पत्रकार असल्याने डॉ. जाधव यांनी पत्रकारानं बद्दल बद्दल सुद्धा असभ्य व उद्धटपणाची भाषा वापरून गैर शब्दाचा वापर केला. पोलीस तक्रारीची धमकी सुद्धा त्यांनी दिली. समाजात इतरांसाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी डॉक्टर अशा प्रकारची वर्तणूक करतात, तर मग सामान्य नागरिकांप्रति डॉक्टर कसे वागत असतील ?असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला. पैशासाठी संबंधित डॉक्टरांकडून असा प्रकार होणे ही गोष्ट लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. म्हणून दिनांक ६जून रोजी तालुका व शहरातील पत्रकारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नावे तहसीलदारांना निषेधाचे निवेदन सादर केले.असे प्रकार शहरात वारंवार घडू नये म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नोंद घ्यावी व संबंधित डॉक्टरांना समज द्यावी, असे निवेदन सादर करून झालेल्या घटनेचा निषेध सुद्धा पत्रकार मंडळींनी केला.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देतेवेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव पाटील प्रदेश कार्याध्यक्ष लियाकत खान प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपप्रमुख राजेश लहासे पत्रकार विनोद वानखडे विनोद चिपडे संपादक राहुल निर्मळ अनिल भगत अमर तायडे राजेश अश्विन राजपूत विठ्ठल गावंडे यांच्यासह तालुका व शहरातील पत्रकारांचा जाहीर निवेदन देतेवेळी उपस्थिती होती त्यांच्या वतीने नायब तहसीलदार मार्कंडेय यांनी निवेदन स्वीकारले