Home Blog Page 301

चुंचाळ्यात आज गुरुशिष्य पुण्यतिथी अनोखा सोहळा

0

 

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

यावल तालुका प्रतिनिधी
विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील गुरु रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुध्द बारसला समाधिस्थान झाले या गुरु व शिष्य यांच्या पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी दि.१३ रोजी श्री समर्थ वासुदेव बाबा दरबार येथे होईल
श्री सुकनाथ बाबा हे श्री क्षेत्र काशी येथुन चुंचाळे येथे आले येथे त्यांनी अखंड बारा वर्ष तप केला म्हणून चुंचाळे हे गाव सुकनाथ बाबा यांची तपोभुमी म्हणून ओळखली जाते तसेच त्याचे चिरंजिव रघुनाथ बाबा यांचा जन्म याच भुमीत झाला म्हणून हे गाव त्यांची जन्मभुमी म्हणूनओळखली जाते व वासुदेव बाबा यांची कर्मभुमी या नावाने हे गाव प्रसिद्ध आहे सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे या पावन नगरीत महाराष्ट्रासह गुजरात,एम.पी व परिसरातील गावामध्ये देखील यांचे शिष्यमंडळी आहे

 


याच पिता पुत्राच्या एकाच मंदीरात समाधीचे स्थान वर्डी ता.चोपडा येथे आहे सुकनाथ बाबा यांनी १९३५ मध्ये तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये वर्डी ता.चोपडा या गावात समाधिस्थ झाले त्यांचे शिष्य वासुदेव बाबा हे गुरु रघुनाथ बाबांन बरोबर १९८० मध्ये चुंचाळे येथे बालपण अवस्थेत घर शिरपुर सोडुन बाबाची आणि पुरातन असलेली समाधी यांची स्नान .पुजापाट .आरती .करीत मंदिरात भक्ती केली व वासुदेव बाबांनी गावकरी आणि शिष्यमंडळीच्या सहकार्याने गावात मंदिर बांधण्यास प्रारंभ केला आणि आज हे येवढे मोठे भले मंदिर उभारले मंदिरात २१ किलो चांदीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सन २००० मध्ये करण्यात आली या मंदिराचा कळस ६१ फुट उंचीचा आहे


असा साजरा होतो अनोखा सोहळा – वासुदेव बाबा हे नेहमी वैशाख शुध्द बारसला त्यांचे गुरु रघुनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करत होते तेव्हा ते भक्ताना सागायचे की मी समाधिस्त झाल्यावर सुद्धा माझ्या गुरुची पुण्यतिथी साजरी करीत जा पंरतु गावातील गावकरी व शिष्यगण तुम्ही जसे तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात तशिच आम्ही तुमचीही पुण्यतिथी साजरी करत जाऊ आपल्या गुरुची आपल्यानतरही पुण्यतिथी व्हावी म्हणूनच आपल्या गुरुच्या पुण्यतिथी दिवशीच वासुदेव बाबा समाधिस्थान झाले तर २००१ पासुन असा गुरु शिष्य पुण्यतिथीचा सोहळा होऊ लागला या सोहळ्यासाठी मध्यप्रदेश .गुजरात.कर्नाटक येथील भाविकांचा यात समावेश आहे
असा होईल कार्यक्रम -पहाटे ५ ला मुर्तीचे स्नान व समाधी स्नान ६ ला मारुती अभिषेक दुपारी १२ ला महाआरती सायंकाळी ७ ला आरती सकाळी ८ ते रात्री पर्यंत आरतीवेळ सोडून भजन.भारुड सुरु राहतील दुपारी १ ते रात्रीपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल
भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगण व भंजनी मंडळ आणि गावकरी मंडळीने केले आहे
फोटो…कृपया फोटो घेणे दोन पासपोर्ट व मंदिराचा फोटो

अमित मेश्राम यांची कांग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ति

0

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली

यावेळी नाना पटोले यांनी अमित मेश्राम यांना नियुक्तीपत्र देऊन फुल गुच्छा व शाॅल देऊन स्वागत केले
नियुक्ती करते वेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड, सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाति जमाती अध्यक्ष सिध्दार्थ हातीहंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते नाना पटोले यांनी दिलेली जबाबदारी पुर्णपणे पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहिल महाराष्ट्रामध्ये परिवहन विभागाच्या माध्यमातून कांग्रेस कशापद्धतीने बळकट होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या काळात राबवेल असे मत अमित मेश्राम यांनी व्यक्त केले

प्रतिनिधी जावेद शाह अमरावती

राजीव रतन चौक ते म्हातारादेवी पर्यंत रोड चे मोठे-मोठे खड्डे बुजवा

0

 

घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड चे इमरान खान यांची मागणी

घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथील म्हातारदेवी रस्त्यावर जडवाहतूक रोखन्यात आली. यामार्गांवर मागील काही

दिवसापासून जडवाहतुक होत आहे. हा मार्ग जीवघेणा ठरला आहे. या मार्गवर नेहमी मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते व मोठ्या प्रमाणात अपघात होतात.या मार्गावर म्हातारादेवी

लॉयड मेटल वस्तीगृहा पर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे धूळ डस्ट असतात. संतप्त नागरिकांनी वाहतुक रोखून धरली यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,वसीम भाई,अक्रम खान,जाहीद हाजीजी,युनूस खान,दिलशाद शेख,इम्तियाज खान,जावेद खान,राकेश दिंडीगाला,इर्शाद शेख उपस्थित होते.

नवनीत राणांचे मूख्यमंत्रीला थेट आव्हान! उद्भव ठाकरे यांच्यात दम असेल तर

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक असदपूर मो.9921400542

दिनांक 11 मे अमरावती

मूंबई ः अमरावती च्या संसद खासदार नवनीत राणा चे मूख्यमंत्रीला थेट आव्हान माध्यमाशी बोलताना म्हणाल्या उद्भय ठाकरे मूख्यमंत्री याना आव्हान !
रूग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यानी माध्यमाशी बोलतानां म्हटले मी उद्भय ठाकरे यांना आव्हान करते कि तूमचात दम असेल तर त्यांनी लोकामध्ये येवून निवडून येवून दाखवावे महाराष्टाती कोणत्याही जिल्हातील मतदारसंघ निवडाला तरी मी त्याचा विरोधात उभी राहून निवडून दाखविल तेव्हा त्याना जनतेची ताकद काय आहे ते कळल येणार्‍या काळात मूंबईची जनता आणी राम भक्त त्याची जागा दाखवून देतिल मी पूर्ण ताकदीने मूंबई पालिका निवडनूकीत उतरेल शिवसेनेने मूंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार लंका तयार केली ती लंका आम्ही नष्ट करू असे म्हणत राणा यांनी शिवसेने उद्भय ठाकरे याना दिले आव्हान ! तसेच नवनीत राणा पूढे म्हणाल्या क्रूरपणे एका महीलेवर हनूमान चालीसा चा पाठ केल्या मूळे जे कार्यवाही एका महीलेवर केली तुरुगात माझ मानसिक शोषण झाले जो अन्याय माझावर झाले तो मूख्यमंत्री उद्भय ठाकरे नी मूळे लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यानी पून्हा ठाकरे सरकार वर हल्ला बोल केला
न्यूज रिपोर्ट उषा पानसरे अमरावती

मातृदिनाच्या दिवशीच आई जेव्हा मुलाला पोरकं करून जाते 

0

 

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त मुर्तीकर हरीभाऊ राऊत यांच्या पत्नी चे दु:खद निधन* सर्व पत्रकार बांधवाकडुन राऊत परीवार यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट_ !

मेहकर प्रतिनिधी ता. आई खरचं काय असते, लेकराची माय असते,वासराची गाय असते,दुधाची साय असते,लंगड्याचा पाय असते,धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही, खरंच जन्माला आल्यानंतर ती स्वतःसाठी कधी जगतच नाही ते आपले कुटुंब यासाठी जगत असते खरंतर मातृदिन हा आईच्या प्रेमातून उतराई होण्याचा एक दिवस असतो परंतु त्याच दिवशी कुटुंबातील सर्वच मुलांना आईला माझीच्या जाण्याने पोरक होण्याची वेळ आली असा प्रसंग देऊळगाव माळी येथील राऊत परिवाराला आला सविस्तर वृत्त असे की मातृदिनाच्या दिवशी मुलगा आईचं स्टेटस ठेवतो वाढदिवसाची तयारी करतो आणि त्याच रात्री आईला अचानक मध्यरात्री हृदयविकाराचा झटका येऊन आई जगाचा निरोप घेत आहे यापेक्षा दुर्दैव कोणता असू शकत , देऊळगाव माळी येथील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त मूर्तिकार हरिभाऊ राजाराम राऊत यांच्या पत्नी व पत्रकार कैलास हरिभाऊ राऊत यांच्या मातोश्री शांताबाई हरीभाऊ राऊत वय वर्ष 78 यांचे ८मे रोजी मातृदिनाच्या रात्री जेवण करून सर्वांना अतिशय मनमोकळेपणाने बोलतात आणि झोपी जातात परंतु दुसऱ्या दिवशी झोपेतून उठवताना उठत नाही मात्र कायमच्या चिरनिद्रिस्त होता यापेक्षा दुर्दैवी धक्का असू शकत नाही,राञीत्यांचा तीव्र धक्का येऊन त्यांचा मृत्यू होतो असं एकाकी जाण्याची दुर्दैवी वेळ कोणावर येऊ नये , यावेळी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जेष्ठ पञकार. सिद्धेश्वर पवार , पञकार उद्धव फंगाळ, पञकार अंकुश राठोड ,पञकारअनिल मंजुळकर , पञकार किसन लाटे , पञकार,संदीप ढोरे, पञकार गजानन सरकटे, पञकार राजेश मगर यासह अनेक पत्रकार बांधवांनी राऊत कुटुंबियांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन त्यांचे सांत्वन केले, खरतर शांताबाई राऊत यांनी आयुष्यासाठी स्वतः निरक्षर असतानासुद्धा मुलांना उच्चशिक्षित करूर त्यांच्या वर सुसंस्कार केले ,कुटुंब सांभाळत असतांनाच शेती प्रती एकनिष्ठ असलेल्या शांताबाई राऊत यांचे दुःखद निधन झाले त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा दिनांक 11 मे 2022 वार बुधवार रोजी सकाळी ९ वाजता स्मशानभूमी, देऊळगाव माळी ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथे होणार असून याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे परिवाराच्या वतीने करण्यात आले, सर्व मित्रमंडळींना नोंद घ्यावी

टाकळी नागझरी शिवारात आग शेतातील तयार कांद्याचे नुकसान 

0

 

शेतातील तयार कांदा कांद्याचे गंजीला आग

शेतकऱ्याचे नुकसान

अर्जुन कराळे शेगाव

श्री क्षेत्र नागझरी ता शेगाव : जवळच असलेल्या टाकळी नागझरी शिवारात गावाला लागून असलेल्या शेतात अचानक आग लागली.यात शेतात कापून ठेवलेला कांदा जळून खाक झाला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटना सोमवारी दुपारी तीन ते चार वाजे दरम्यान घडली.

या आगीमध्ये शेतातील टाकळी नागझरी येथील विष्णू भराटे यांचे  शेतातील कांद्याच्या गंजीला अचानक आग लागली यामध्ये या  शेतकऱ्याचा जवळपास 150 क्विंटल  कांदा जळाला.लाखो रुपयाचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी टाकळी नागझरी गावात ला लागून असलेल्या शेतात अचानक आग लागण्याची वार्ता पसरताच परिसरातील शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. उपस्थित शेतकऱ्यांनी आज विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला घटनास्थळावर शेगाव, बाळापुर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्याची माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यानी दिली.

आगीचे स्वरूप खुप मोठे होते शेतीपासून गावापर्यंत 100 मीटरचा परिसर आणीबाणी आला होता.

@ अगोदरच कांद्याला भाव नसल्याने शेतकर्याचे

डोळ्यात पाणी आणले आहे.त्यात आता आगीत कांदा जळाल्याने होते नव्हते सगळे नष्ट झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.तर नुकसान ग्रस्त शेतकर्यास शासकीय आर्थिक मदत मिळावी ,अशी मागणी होत आहे.

@ तलाठी श्रीकांत हाके यांची टोलवा टोलवी…..

शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे लाखो लाखो रुपयांचे नुकसान झाले परंतु या भागाचे तलाठी श्रीकांत हाके यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे देण्यास टाळाटाळ  केली.

घुग्घुस शहरातील विजेचा लपंडाव १५ दिवसात थांबवा, अन्यथा MSEB विरोधात तीव्र आंदोलन!

0

 

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा विद्युत वितरण कंपनीला निवेदनातून इशारा..

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

येत्या पंधरा दिवसांत समस्या निकाली काढण्याचे अधिक्षक अभियंत्यांचे आश्वासन.

गेल्या महिन्या भरापासून घुग्घुस शहरात सातत्याने सुरू असलेला विजेचा लपंडाव तातडीचे थांबवून स्थानिकांना होणारा त्रास कमी करावा. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांना भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.

महिन्या भरापासून घुग्घुस शहरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐण उन्हाळ्यातच वारंवार शहराची बत्ती गुल होत असल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने येथे वेकोलीसह अनेक मोठ्या कंपन्या आहेत. आणि विजेच्या अशा लपंडावाने त्यांनाही याचा फटका बसत आहे. शहरात पाऊस सदृश स्थिती किंवा कोणतेही वादळ, वावटळ नसतांना सुद्धा केव्हाही विज खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे.
त्यामुळे या समस्येला गांभीर्याने घेऊन तातडीने शहराचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा स्थानिक विज वितरण केंद्रावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बैठकीदरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एमएसईबी प्रशासनाला दिला.

यावेळी बोलताना, घुग्घुसच्या या गंभीर समस्येच्या सोडवणूकीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. तसेच या संदर्भातील तांत्रिक कामे जवळपास पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आणि येत्या पंधरा दिवसांत आम्ही ही समस्या निकाली काढू असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांनी दिले.

यावल येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालती मध्ये २७ प्रकरणांचा निपटारा ,तीस लाखांची वसुली

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी दिनांक ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात संपन्न झाले या लोकअदालतीला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला , या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये दिवाणी,फौजदारी व दाखल होण्यापूर्वी चे विविध वित्तीय संस्थाचे एकूण १ हजार ८७७ प्रकरण ठेवण्यात आले होते तर यातील २७ प्रकरणांमध्ये तडजोड करीत निपटारा करण्यात आला व २९ लाख ९२ हजाराची वसुली झाली आहे.
यावल येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली यात पॅनल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे तर पंच न्यायाधीश म्हणून एड. के.डी. सोनवणे, एड. डी.आर. बाविस्कर यांनी कामकाज पाहिले या पॅनल समोर दिवाणी ७९फौजदारी १९२ व दाखल होण्यापूर्वी चे १हजार६०६ असे एकूण १हजार ८७७ प्रकरण ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी खटल्यात १३ प्रकरणात तडजोड करून निपटारा करण्यात आला व १८ लाख ०३ हजार ३४८ रुपयांचा वसूल करण्यात आला तसेच फौजदारी प्रकरणात सात केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या व यात ४ लाख २६ हजार ५९८ रुपयांचा वसूल करण्यात आला तर दाखल होण्यापूर्वीचे सात प्रकरण निकाली काढण्यात आले व ०७ लाख ६५ हजार ५४३ रुपयांचा वसूल न्यायालयासमोर करण्यात आला. तेव्हा एकूण या राष्ट्रीय लोक अदालतिच्या पॅनल समोर ठेवण्यात आलेल्या १ हजार ८७७ पैकी २७ प्रकरणात आपसात तडजोड करुन निपटारा करण्यात येऊन २९ लाख ९२हजार ४८९ रुपयाची वसुली करण्यात आला आहे या राष्ट्रीय लोक अदालत साठी न्यायालयीन अधीक्षक सुनील शुक्ल, सहाय्यक अधीक्षक सी.एम. झोपे, आर. एस. बडगुजर, आर. व्ही. आमोदकर,एस. आर. तडवी, एस.जी सूर्यवंशी, ए.बी. बागुल, डी.ए..गावंडे, एस.ए.ठाकूर, एस. एस. वाघ, जी.एस.लाड, एम.डी.जोशी, एम.एस. सपकाळे यांनी कामकाज पाहिले.– पूर्ण फोटो आहे

काल मृत झालेल्या कामगारांचा स्नेहा कंपनी तर्फे उपचार काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी ने केला भांडाफोड

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

चंद्रपूर रोड वर स्नेहा फूडस या ऑईल रिफायनरी कंपनीने परत एकदा कंपनीत झालेल्या अपघाताला लपविण्याचा प्रयत्न केला.
मात्र काँग्रेसने या प्रकरणाचा भांडा फोड केला आहे

08 मे रोजी सकाळी साडे दहा वाजता स्नेहा कंपनी मध्ये सुरक्षा साधनां शिवाय AP 16,- TQ 1555 क्रमांकाच्या ट्रक मध्ये सोयाबीन पावडरचे जड असलेले मोठे – मोठे बॅगा भरत असताना उंची वरून खाली पडून गंभीर रित्या जखमी झालेल्या नंदी पेटी बाबू या चाळीस वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

मात्र सदर घटनेची माहिती कंपनी तर्फे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला
कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी तर कहरच केला काल दुपारी मृत झालेल्या त्या कामगारांचा नागपुरात उपचार सुरू असल्याची खोटी माहितीच दिली.

मात्र काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर हे दिनांक 09 मे रोजी कार्यकर्त्यांसह कंपनीत गेले तेथून ज्या वाहनात सोयाबीन पावडर भरताना अपघात घडला त्यांच्या मालकाशी संपर्क साधून कामगारांच्या मृत्यूचा भांडाफोड केला.

गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी स्नेहा कंपनीत विद्युत शॉक लागून एका परप्रांतीय कामगारांचा दुर्देवी रित्या मृत्यू झाला असता सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला होता.

या कंपनीत सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून 80% परप्रांतीय कामगार कामावर घेतले असून त्यांना कुटल्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता त्यांना बंधवा मजुरा सारखी वागणूक दिल्या जात आहे.

आज घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे कंपनीच्या मुख्य गेटवर जोरदार निर्दर्शने व घोषणाबाजी करण्यात आली.

या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याची मागणी काँग्रेसने केली
कंपनी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी घुग्गुस पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले याप्रसंगी रोशन दंतलवार, मोसिम् शेख, रफिक शेख,देव भंडारी,रोहित डाकुर, आरिफ शेख,कपिल गोगला, साहिल सैय्यद, सुनील पाटील,अंकुश सपाटे, बालकिशन कूळसंगे व पदाधिकारी उपस्थित होते

भरधाव बसवर अचानक झाड कोसळल्याची घटना दुपारी घडली आहे. यात १२ प्रवाशी जखमी झाले

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

प्रवाशांना घेवून जात असलेल्या भरधाव बसवर अचानक झाड कोसळल्याची घटना दुपारी घडली आहे. यात १२ प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल आगाराची बस क्रमांक (एमएच २०, बीएल २५४२) ही आज दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात असतांना रस्त्यावरील पाटचारीजवळ अचानक मोठे झाड बसवर कोसळले. यात चालकासह १२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन रा. यावल, इच्छाराम टिकाराम राजपूत (वय-७०) रा. सांगवी खुर्द, पंडित लक्ष्मण परणकर (वय-६६) रा. यावल, शकुंतला विलास चौधरी (वय-६०) रा. धानोरा, सुशिलाबाई किसन धनगर (वय-६०)रा. मुक्ताईनगर, जोवरा रशीद खाटीक (वय-५०) रा. आडावद, सुरेश पंढरीनाथ महाजन (वय-५२), पद्माबाई रमेश कोळी (वय-५०), मंगला रामदास चौधरी (वय-५५), कल्पना संतोष चौधरी (वय ५५), दीपक टोपलु वानखेडे (वय-२४), आणि आणि नीलम शैलेंद्र पाटील (वय-१७) असे १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी.बारेला व डॉ. मनिषा महाजन यांनी उपचार सुरू केले.