Home Blog Page 315

गोळीबाराने पून्हा हादरले नांदेड प्रसिध्द बाधंकाम व्यावसायिक संजय बियाणी याच्यांवर गोळीबार हल्लेखोरानी अनेक गोळ्या झाडल्या

0

 

उषा पानसरे मू.का. संपादीका मो. 9921400542 अमरावती

दिनाक 6 एप्रिल

नादेंड येथिल प्रसिध्द बिल्डंर संजय बियाणी याच्यावर मंगळवार दिनांक 5 एप्रिल ला
सकाळी साडेदहाच्या सूमारास गोळीबार झाला या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले दूचाकी वरून आलेल्या दोघानी बियाणी यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात संजय बियाणी याचां सह त्याच्यां वाहन चालकही जखमी झाला बियाणी व त्याचा चालकाला येथिल ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले संजय बियाणी हे सकाळी घराबाहेर पडताच त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरानी गोळीबार केला बियाणी यांच्या घरा समोर रक्ताचा सडाच पडला या घटनेची माहीती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रविण चिखलीकर यांनी रूग्णालयात धाव घेतली हल्लेखोर कोण आहेत याचा कसून शोध पोलीस घेत आहे तसेच काही दिवसा पूर्वीच संजय बियाणी त्याच्या गृह प्रकल्पाचा अत्यंत देखणा असा कार्यक्रम घेण्यात आला होता पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह नांदेड शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम लाभवण्यात आला होता संजय बियाणी यांच्यावर हंल्लेखोरानी गोळ्या झाडल्या ही धक्यादायक घटणा सी .सी. टीव्ही फूटेज कैमैर्‍यात कैद दोन हल्लेखोर कैमेरा मधे कैद

गडचिरोली जिल्ह्यातील कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली मार्फत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उपक्रमाची दखल.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी मराठी विभागाचा उपक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आभासी आँनलाईन कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
सदर कवी संमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील सतरा कवींनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवीला होता.
त्या निमित्ताने आज दिनांक ५ एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या येथे सहभागी कवींना संस्थेचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान डायट गडचिरोली येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख तथा अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,अधिव्याख्याता पुनित मातकर, विषय सहाय्यक डॉ विजय रामटेक, निलकंठ शिंदे,कुणाल कोवे, विठ्ठल होंन्डे, प्रदिप पाटील, समुपदेशक प्रभाकर साखरे व जिल्ह्यातील कवी उपस्थित होते.
प्रसंगी रवींद्र गजानन गेडाम,प्रतीक्षा पितांबर कोडापे,हर्षराज सहारे,मारोती आरेवार,सुजाता अवचाट,चांगदेव सोरते यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची आप-आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहाय्यक निलकंठ शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ विजय रामटेके यांनी व्यक्त केले.

तब्बल 25 दिवसा नंतर कोटनका कामगारांच्या आंदोलनाला यश

0

 

सिम्पर कोटेनका कंपनीला
घुग्घुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी चा दणका.

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस :वेतनवाढ व अन्य मागण्याच्या पुर्तते करिता 11 मार्च पासून सॅम्पलिंग कामगारांनी काम बंद पुकारला होता आज पंचवीस दिवसा नंतर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर व कंपनी अधिकारी सुनील लंका, मंगेश मांढरे व कामगारांच्या संयुक्त बैठकीत वेतनवाढ सह अन्य मागण्या सकारात्मक घेतल्याने कामगारांनी एकमताने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
याप्रसंगी उपस्थित कंपनी सुपरवायझर बंडू झाडे यांनी कामगारांना शरबत देऊन आंदोलन सोडविले
कोळशाचे उत्पादन करणारे कोल इंडिया आणि विद्युत निर्मिती करिता कोळशा खरेदी करणारे महाजेनको या कंपन्यांनी कोळशाचे गुणवत्ता (सॅम्पलिंग) तपासणीचे कंत्राट संयुक्तपणे सिम्फर या कंपनीला दिले आहेत.
आणि सिन्फर या कंपनीने कोटनका इंस्पेकॅशन प्रा. लि या कंपनीला कंत्राट दिले.
कोटेनका ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सब एरिया कार्यालय परिसरातील कार्यालयातून घुग्घुस रेल्वे सायडिंग मधून कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करीत
आहे.
याठिकाणी जवळपास चौवीस कामगारांचा शोषण होत होते.
त्यांना वेकोलीच्या हाय पॉवर कमेटीने निर्धारित केलेले वेतन दिल्या जात नव्हते
साप्ताहिक सुट्टीचे वेतन मिळत नाही, यासोबतच धूळ भत्ता,मेडिकल सह अन्य कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी दिनांक 11 मार्च सकाळी 08 वाजताच्या पाळी पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली होती.

 


आज आंदोलन स्थळी खालील कामगार सचिन कोंडावार, प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालापेल्ली,अशोक सोनटक्के,विशाल जंगम,रवी भगत,प्रमोद मांढरे,बाबा जीवन,लीलाधर आत्राम,सुशांत वाघमारे,कुमार अंबाला,योगेश आरपवल्ली,सुधाकर जुंघरे,राजू कांबळे,राजू पाटील,प्रशांत तोंगे,महादेव मांढरे,विजय नागपुरे,सचिन मांढरे,अमित कामतवार,उपस्थित होते.

परिविक्षाधीन (आयपीएस) अधिकारी ‘आशित कांबळे यांनी पदभार स्वीकारला

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल येथील पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या परिविक्षाधीन जागेवर यावल पोलीस निरिक्षकाचा प्रभारी कार्यभार उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एकरर्गा येथील आशित कांबळे ,(आयपीएस) अधिकारी यांनी पद स्वीकारला आहे

यावल पोलीस स्टेशन येथे १५, महिन्यापासून कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची विनंती वरून नासिक येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या ठिकाणी यावल चे पोलीस निरीक्षक म्हणून। परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी ‘आशित कांबळे यांनी पदभार स्वीकारला

त्यावेळी त्यांनी विविध विषयावरती पत्रकारांशी बोलताना सांगितले की आपण आपल्या कार्यक्षेत्रातील बेसिस्तपणा, गुन्हेगारी अवैध धंद्यांचा पिक नासाडीचा प्रश्र,वाढलेल्या अवैध धंदे कायमचीच बंद व्हावी असे आपले प्रयत्न राहणार आहे त्याच बरोबर बेशिस्त झालेल्या शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहकतुकीस शिस्त लावणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध प्रभागात उन्हाळ्यात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई बाबत निवेदन

0

 

हिंगणघाट :- 4 एप्रिल सध्या हिंगणघाट शहरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे नगरपालिकेच्या अख्त्यारित अमृत योजनेतील नवीन पाईप लाईन, नळजोडणी ,नवीन पाण्याच्या टाक्याचे ,निर्माण कार्य अजूनही सुरू असताना आपल्या प्रशासनाच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2021 ला मोठ्या स्वरूपात नगरपरिषदेच्या खर्चाने या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. हे पाण्याशी निगडित कामे अपूर्ण अवस्थेत असतांना सुद्धा लोकार्पण का घेण्यात आले. आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दि: 8डिसेंबर 2021 हिंगणघाट येथील मुख्य अधिकारी यांना सुचित केले की, अपूर्ण कामे असल्याचे माहिती देऊनच लोकार्पण घेण्यात यावा जेणेकरून योजनेसंबंधी गैरसमज होऊन उद्घाटकांचा रोष ओढविल्या जाणार नाही असे पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे दिसते. तरी नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी भाजप यांनी दबाव टाकून लोकार्पण सोहळा घेण्यात आला. शहरातील अमृत योजनेअंतर्गत नवीन 12 पाण्याच्या टाक्याचे काम, नवीन पाईपलाईनचे काम असे करोडो रुपयाची योजनेसाठी खर्च करताना नवीन टाक्या भरण्यासाठी पाणी साठवण्याची उपायोजना (बंधारा) न करता या योजनेवर खर्च कसा काय केला? याचे स्पष्टीकरण व चौकशी करण्यात आली पाहिजे. या सर्व चुकीच्या नियोजनामुळे आज लोकांना पाणी मिळत नाही असे निदर्शनास येते. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, 1)संत ज्ञानेश्वर वार्ड क्रमांक 3 व 4. आज संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक 5 ,6 व 16, शास्त्री वार्ड प्रभाग क्रमांक 18, इंदिरा गांधी वार्ड प्रभाग क्रमांक 19, तसेच निशान पुरा वार्ड मध्ये भोईपुरा, गोंडपुरा ,खाटीक पुरा व कोष्टी पुरा या भागातील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन पाईप लाईन, द्वारे पाणीपुरवठा केव्हा करणार याबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. वरील सर्व भागात 60 टक्के नळजोडणी केली परंतु उर्वरित भागात नळ जोडणी अजून पर्यंत केल्या गेली नाही. सध्या उन्हाळी दिवस असल्यामुळे जनता याबाबतीत मोठ्या प्रमाणात या प्रशासनाच्या कामात नाराजी व रोष व्यक्त करीत आहे. आपण जर जनतेसाठी अमृत योजनेतून नवीन पाण्याच्या टाक्या, फिल्टर प्लांट इत्यादीचे लोकार्पण केले तर आज पर्यंत जनतेला पिण्याचे पाण्याची सुविधा नवीन पाईपलाईनद्वारे का देण्यात आले नाही? याचे उत्तर देणे आवश्यक आहे. या सर्व समस्येबाबत आम्ही आपल्याला दोन वेळा निवेदन देऊन या समस्येबाबत अवगत केले. परंतु नगर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस नियोजन न करता. जी परिस्थिती या अगोदर होती तशीच्या तशीच आता सुद्धा आहे. यावरून असे लक्षात येते की ,आपल्याकडून शहरातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा मानस आहे. मागील नगरपरिषदेच्या भाजप सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक जनतेने का भोगावी, शिवसेना खपून घेणार नाही. जर नगर प्रशासनाने सदर विषयावर दिनांक 11 एप्रिल 2022 पर्यंत तोडगा काढला नाही तर शिवसेना शहरातील जनतेचे हित लक्षात घेता उग्र आंदोलन करण्यात येईल व साखळी उपोषणाला आपल्या कार्यालया समोर बसण्यात येईल याची दक्षता घ्यावी. निवेदन देण्याकरिता सर्वस्वी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसारे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, उपजिल्हा महिला संघटिका सौ नलिनी सोयाम, शहर संघटक मुन्ना त्रिवेदी ,मनीष देवडे ,भास्कर ठवरे ,शंकर मोहमारे, देवेंद्र पडोळे ,महेश खडसे,युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर ,समन्वयक युवासेना प्रकाश घोडे ,जयकुमार रोहणकर, तालुका संघटिका संगीता कडू ,शहर संघटिका सौ. माधुरी खडसे ,मोहन तुमराम, अमोल मानकर ,भास्कर मानकर, रुपेश काटकर ,सचिन मुळे ,मनोज कोटकर ,दिलीप चौधरी ,नरेंद्र गुळकरी,आशिष जयस्वाल, बंटी वाघमारे ,संजय सयाम,अनिल कावडकर ,बलराज डेकाटे,हिरामण आवारी,अनिल चाफले,राजू माडेवार,सौ निर्मला मानकर, शितल चौधरी ,माधुरी काळे ,श्वेता मानकर, सौ .तडस, इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

गुढीपाडवा उत्‍सव व सांस्‍कृतीक महिला सम्‍मेलनाचे आयोजन संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्‍गुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्‍गुस येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रिडा व सांस्‍कृतीक महोत्‍सवाअंतर्गत गुढीपाडवा उत्‍सव व सांस्‍कृतीक महिला सम्‍मेलनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये महिलांच्‍या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्‍यात आले. विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांच्‍या रूपात घुग्‍गुस मधील महिलांनी आपले कलागुण सादर केले. यामध्‍ये विविध प्रकारची नृत्‍ये, फॅन्‍सी ड्रेस कॉम्‍पीटिशन, देशभक्‍तीपर नृत्‍य, समुह नृत्‍य सादर करण्‍यात आली. यावेळी मंचावर भाजपा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा महिला प्रदेश उपाध्‍यक्षा वनिता कानडे, चंद्रपूरच्‍या महापौर राखी कंचर्लावार, चंद्रपूरचे उपमहापौर राहूल पावडे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य नितू चौधरी, भाजयुमो प्रदेश उपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजपा जिल्‍हा महासचिव नामदेव डाहूले, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, विजय पिदुरकर, संजय तिवारी, अनिल डोंगरे, विनोद चौधरी, संतोष नुने, निरीक्षण तांड्रा, साजन गोहने, मल्लेश बल्ला उपस्थिती होते. भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्‍गुसतर्फे दिनांक १ एप्रिल व २ एप्रिल रोजी प्रयास सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले. यामध्‍ये १ एप्रिल रोजी महिलांचे विविध कार्यक्रम करण्‍यात आले. ज्‍यामध्‍ये रांगोळी स्‍पर्धा, निंबू चमचा स्‍पर्धा, बोरा रेस स्‍पर्धा, रस्‍सी खेच स्‍पर्धा, संगीता खुर्ची स्‍पर्धा घेण्‍यात आली. याप्रसंगी देवराव भोंगळे यांचे यथोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी, संचालन सौ. किरण विवेक बोढे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. सुचिता लुटे यांनी केले.
या कार्यक्रमाआधी आ. मुनगंटीवार यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला भेट दिली. गेल्‍या अनेक वर्षांपासून या सेवाकेंद्राच्‍या माध्‍यमातुन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, उज्‍वला योजना, बचतगट, आयुष्‍यमान भारत, प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, पॅनकार्ड, उत्‍पन्‍न दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, अटल विश्‍वकर्मा सन्‍मान कामगार योजना, विवाह नोंदणी, जातीचा दाखला, जीएसटी नोंदणी, विदेशात जाण्‍यासाठी पोलिस क्‍लीरीयन्‍स, डोमिसियल सर्टीफिकेट, अन्‍न परवाना कागदपत्रे सुकन्‍या समृध्‍दी योजना, महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना, उद्योग आधार साठी आवश्‍यक कागदपत्रे, ई-श्रमकार्ड, शेतमजूर दाखला, राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजना या सर्व योजनांसाठी योग्‍य मार्गदर्शन केल्‍या जाते. या सेवाकेंद्राच्‍या माध्‍यमातुन केल्‍या जाणा-या कामांचे आ. मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक केले व असेच कार्य त्‍यांच्‍या हातुन होवो अशा शुभेच्‍छा दिल्‍या.
कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला घुग्‍गुस शहरातील महिलांनी घुग्‍गुस शहराच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच गुढीपाडव्‍यानिमीत्‍त भव्‍य मोटार सायकल रॅली काढली. या रॅलीत ३०० पेक्षा जास्‍त महिलांचा सहभाग होता. या रॅलीने घुग्‍गुस शहर दुमदुमले व शहरात चैतन्‍यमय वातावरण निर्माण झाले.
त्‍यानंतर देवराव भोंगळे यांच्‍या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की या कार्यालयाच्‍या माध्‍यमातुन मा. दिनदयालजी उपाध्‍याय यांच्‍या एकात्‍म मानववाद या आदर्शाला धरून समाजाच्‍या शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न व्‍हावा. समाजातील अविकसित, गरीब, शोषीत, पिडीत समाजाला जगण्‍यासाठी ज्‍या किमान गोष्‍टी लागतात त्‍या मिळवून देण्‍यासाठी या कार्यालयाच्‍या माध्‍यमातुन प्रयत्‍न व्‍हावे असेही आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले.
कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी वैशाली ढवस, सुचिता लुटे, पुजा दुर्गम, नज्‍मा कुरैशी, सरिता इसारप, शारदा गोडसेलवार, सारिका भोंगळे, सिमा पारखी, सुनिता पाटील, पुष्‍पा रामटेके, कुसुम सातपुते, चंद्रकला मन्‍ने यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्रातर्फे मोफत जलसेवेची सुध्‍दा सुरूवात करण्‍यात आली. कार्यक्रमाला ५ हजारच्‍या जवळपास महिला उपस्थित होत्‍या.

शहरातील पाणी समस्या इतर राजकीय पक्ष्यांचे नेते सुध्दा वॉटर- टँकर शुरू करावा

0

 

घुग्घुस नागरिकांची मांगणी{जल ही जीवन है

आपला शहर हा प्रदूषणात प्रथम क्रमांकावर आलेला आहे
मात्र पाणी टंचाईच्या बाबतींत आपला शहर प्रथम क्रमांका कडे जात आहे.

 


उन्हा – तान्हात नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून घुग्घुस ची पाणी समस्यां दूर करण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी स्वतःच्या दोन खाजगी वॉटर टॅंकरने संपूर्ण शहरात मोफत पाणी पुरवठा करीत आहे
पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे.घुग्घुस हा साठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावात दोन टँकर कमी पडत आहे. येथील नागरिकांचे म्हनने आहे की.
या गावात एकटे राजु रेड्डी असे नेते आहे. दुसरे कोणी नेते नाही जे आमचे वार्ड मध्ये येहून पाणीचा टँकरची सुविधा करून देत आहे. आपल्या शहरात खूप मोठे सत्तेत राहीलेले राजकिय पक्ष व त्यांचे मोठे मोठे राजकीय नेते आहे त्यांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना या भीषण उन्हाळ्यात भटकंती थांबविण्यासाठी मोफत पाण्याचा टँकरनी पुरवठा करावी.अशी मागणी घुग्घुस चे पाण्यासाठी त्रस्त नागरिक करत आहे.

केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढी केल्याबद्दल थाली आणि टाळी वाजवुन केंद्र सरकारचे अभिनंदन

0

 

उषा पानसरे अमरावती
मू.का. संपादक मो. 9921400542

जामनेर दिंनाक 3 एप्रिल के द्र सरकारच्या वतीने पैट्रोल डिझल दरवाढी केल्या बद्दल थाली व टाली वाजवून केद्र सरकार चे अभिनंदन
युवासेनेचे संपूर्ण
महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. राज्यव्यापी आंदोलनात जामनेर तालुका युवासेनेने सहभाग घेत जामनेर नगर परिषद चौकात थाळी नाद करुन व केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
यावेळी युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरतजी पवार ,शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक प्रा‌.ईश्वरजी चोरडिया,युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील,शिवसेना उपतालुका संघटक सुधाकर सराफ ,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव ,शिवसेना गटप्रमुख फत्तेपूर तोंडापुर तुकाराम गोपाळ, महिला आघाडी सदस्य मीना शिंदे,शिवसेना उपशहर प्रमुख कैलास माळी,सुरेश चव्हाण, दिपक माळी,युवासेना शहर कार्यकारिणी सदस्य अनस खान,जितू झाल्टे,मयूर राजपूत, ज्ञानेश्वर झोंड,नाना राठोड,देवराम जोशी यांच्यासह युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

जामनेर विज वितरण कंपनी चे उप अभियंता शैलेंद्र, एच.बागरे यांना निवेदन देण्यात आले

0

उषा पानसरे मू.का. संपादक मो.9921400542 असदपूर

यांना गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर या भागाची विज समस्या बाबत निवेदन देण्यात

जामनेर :दिनांक 3/४/२०२२ पवित्र रमजान महिना,सुरु होत आहे,परत गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर,या भागाची विज,समस्या दिवसें दिवस,वाडत आहे,वारंवार,वीज पुरवठा खंडित होत,असल्यामुळे नागरिक,त्रस्त झाले आहे. रमजान महिन्यात अशी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये,याची काळजी घ्यावी.आणि गांधी चौक जवळ असलेला ऑफिस जळगाव रोडवर,गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे,तरीही m.s.e.d बोर्डच्या एका दा ऑफीस नगरपालिका चौकत जवळ,या गांधी चौकात देण्यात यावे.अशी विनंती केली.आणि वीज कर्मचारी फोन उचलत नाही याची नोंद घ्यावी,असे निवेदन देण्यात आले यावेळी.शेख हारुन शेख नुरा,आलीयार खान,इम्रान बबलू खान,उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

ट्वेंटीवन शुगर मिलने निलंगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलेल्या कारखाण्याच्या मशनरीचे पूजन आलेल्या पालकमंत्री मा.अमित देशमुख यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव

0

 

लातूर /निलंगा प्रतिनिधी
डी.एस.पिंगळे

निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील मागच्या अनेक वर्षापासून बंद असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी साखर कारखाना
आता ट्वेंटीवन शुगर्सच्या वतीने चालविण्यात येणार आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज मशिनरीचे पूजन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत झाला .
बंद कारखाना चालू करण्याचा संकल्प करून आज निलंगा तालुक्यात विकासाची गुढी उभारली आहे.
या माध्यमातून मांजरा पट्टया प्रमाणेच तेरणा पट्टयाचाही सर्वांगीण विकास साधला जाईल.
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर,माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून उभारलेली साखर कारखानदारी आगामी काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू त्यांचे स्वप्न साकार केले जाईल.
आज मशीनरी दुरूस्तीचा प्रारंभ केला असून येत्या दसरा,दिवाळीला या कारखान्याच्या प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरूवात केली जाईल.
हा कारखाना फक्त साखर उत्पादनाच्या मर्यादेत न ठेवता या ठिकाणी वीज,इथेनॉल,बायोगॅस,इंधननिर्मीतीचेही प्रकल्प उभारले जातील.
डॉ.निलंगेकर साहेब यांनी लावलेले हे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत केले जाईल,त्यांच्या नावाला शोभेल असेच काम या कारखान्याच्या माध्यमातून होईल अशी ग्वाही ही या प्रसंगी बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
यावेळी अनेकांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावरती फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम अश्या प्रकारच्या डिजिटल माध्यमाद्वारे अभिनंदनाचा निलंगा झाला.