Home Blog Page 315

पालांदूर जमी येथील सव्वाकोटीची पाणीपुरवठा योजना ठरली फाेल

0

 

 

देवरी दि.27: १ कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी खर्चून जल जीवन मिशन ही योजना देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल ग्रामपंचायत पालांदूर जमी येथे मंजूर करण्यात आली. कंत्राटदारच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांना या योजनेनंतरही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन विहिरी
आहेत; पण यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जल जीवन मिशन योजना
पालांदूर गावला मंजूर झाली; पण संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या योजनेत जुन्याच पाइपलाइनला या
योजनेची पाइपलाइन जोडली. या गावालगत असलेल्या चूलबंद नदीत निकृष्ट दर्जाची विहीर बांधल्याने
गावकऱ्यांना आता पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
अनामत रक्कम केली परत
– ग्रामपंचायत पालांदूर जमीअंतर्गत १ कोटी १० लक्ष रुपयेनिधीची जल जीवन मिशन योजना कार्यान्वि त
करण्यात आली होती. या योजनेंतर्गत हर घर नल, हर घर जल या उद्दिड्टाची पूर्तता करण्यात आली; परंतु
संबंधित कंत्राटदाराने व ग्रामपंचायतीने या योजनेची योग्य अंमलबजावणी न केल्यानेही योजना निष्फळ ठरली.
मात्र, ग्रामविकास अधिकाऱ्याने योजना सुरू असल्याचे दाखवून कंत्राटदाराची जमा असलेली १० लाख रुपयांची
अनामत रक्कम परत केल्याची माहिती आहे.

गावकऱ्यांची केली दिशाभूल
– या योजनेंतर्गत गावातीलच नळजोडणीधारकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. मात्र, ही योजना सुरळीत
सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवून गावकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कंत्राटदाराने केलेल्या बोगस
कामाची मौका तपासणी करून गावकऱ्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
वर्षभरापासून योजना ठप्प
– पालांदूर जमी येथील ग्रामपंचायतने पाचशे रुपये द्या नळ कनेक्शन देतो असे सांगत गावातील अनेक
नागरिकांच्या घरी नळ जोडणी केली. जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली केवळ दोन दिवस गढूळ पाण्याचा
पुरवठा करण्यात आला. त्यानंतर नळ योजना बंद पडली.
गावात एक कोटी दहा लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. नदीवर बांधलेली विहीर बांधकाम
करतानाच फुटली. त्याची दुरुस्ती करून नळ योजना सुरू झाल्याचे सांगितले. कंत्राटदार आणि ग्रामसेवकाने
मिलीभगत करून गावकऱ्यांची दिशाभूल केली.- द्वारकाप्रसाद गुप्ता, गावकरी
कंत्राटदार आणि ग्रामपंचायतच्या दुलर्क्षित धोरणामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत
आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी करून दाेषींवर कारवाई करण्यात यावी.-यशवंत गुरुनुले, गावकरी

यावल तालुक्यात तापी पूर्णा वृत्तपत्र संघटनेचा मेळावा सांगवी बुद्रुक येथे आज संपन्न झाला

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

या मेळाव्यात मालेगाव येथील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे संघटक सचिव रवींद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना जळगाव उपाध्यक्ष गोपाळ चौधरी, तापी पूर्णा वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष संजय निंबाळकर व तापी पूर्णा वृत्तपत्र संघटनेचे यावल तालुका सदस्य खुशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले वृत्तपत्र विक्रेता यांच्या अडचणी व समस्या बाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली व संघटनेचे पुढील ध्येय या विषयावर सुद्धा मंथन करण्यात आले या मेळाव्याचे आयोजन यावल तालुका तापी वृत्तपत्र संघटना यांनी केले
या मेळाव्यात संघटनेचे सचिव गणेश पाटील महेश वाणी नितीन बानाईत पांडुरंग बारी, तुषार साळुंके अजय गडे, संजय पाटील चीनावल येथील विजय सैतवाल भुसावळ येथील श्रीकांत कुलकर्णी येथील वाघोदा येथील कमलाकर माळी जामनेर येथील सुनिल सोनी, जिवन चौधरी , उज्वल मराठे , विकास पाटील
अतुल जैन धनराज पाटील ,किरण कुलकर्णी ,जानेश्वर विचवे ,प्रमोद पाटील ,डिगंबर धनगर ,विनोद सौतवाल ,सुभाष कुलकर्णी जामनेर ,भुसावळ, मुक्ताईनगर बोदवड, रावेर ,यावल तालुक्यातील असंख्य वृत्तपत्र विक्रेते बांधव उपस्थित होते

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घूस येथे भव्य नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन, १२०० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

0

 

आरोग्य शिबीर हे सेवेचे माध्यम – आ. किशोर जोरगेवार

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

कामांबारोगरच सामाजिक उपक्रमही गरजेची असून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या जात आहे. क्रिडा, सांस्कृतीक, शैक्षणीक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रावरही आमचा भर आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित केल्या जात असून खर पाहता आरोग्य शिबिर हे सेवेचेच माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेड घूग्घूस शाखेच्या वतीने घुग्घूस येथील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस कमेटीचे घुग्घूस शहराध्यक्ष राजू रेड्डी, म्हातारदेवीच्या सरपंचा संध्या पाटील, म्हतारदेवी ग्रामपंचायत सदस्य प्रिया गोहणे, नकोड्याच्या ग्रामपंचायत सदस्य, ममता मोरे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते पंकज गुप्ता, बहुजन महिला आघाडी घुग्घूस शहर अध्यक्ष उषा आगदारी, आदिवासी महिला आघाडी शहराध्यक्ष उज्वला उईके, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते ईमरान खान, प्रेम गंगाधरे, मुन्ना लोढे, स्वप्निल वाढई, अन्वर सय्यद, राजू नातर आदिंची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड हि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली आहे. चंद्रपूरसह घुग्घूस शहरातही संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे. कोरोना काळात संघटनेने कौतुकास्पद काम केले. सोबतच नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दिशेनेही आमचे प्रयत्न सुरु आहे. आजवर यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही विविध भागात 80 हून अधिक आयोग शिबिरांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी मोठे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बदलत्या युगात मोबाईल आणि टिव्हीच्या अतिवापराचा दुष्परिणाम डोळ्यांवर होत आहे. त्यामुळे घुग्घुस येथे हा भव्य नेत्रचिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप कार्यक्रम आपण येथे आयोजित केला. या शिबिराला घुग्घूस वासीयांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यामूळे पूढेही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून जनहिताचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
आज पार पडलेल्या आरोग्य शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या १२०० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली यातील 900 रुग्णांना सदर शिबिरात निशुल्क चष्मे वितरीत करण्यात आले तर पात्र ठरलेल्या 80 रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीया बिंदुची निशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या परसाडे येथील मजुर व्याक्तीच्या कुटुंबाला शासकीय मदती पासुन वंचीत राहावे लागणार का ?

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना विषाणु संसर्गाच्या अत्यंत धोकादायक अशा संकटकाळात अनेकांनी आपल्या कुटुंबातील कमाविते प्रमुख व्याक्ती गमावले असुन ,तालुक्यातील परसाडे येथील राहणारे भागवत सावळे यांचा देखील कोरोना पॉझीटीव्ह आल्याने उपचारा दरम्यान दुर्देवी मृत्यु झाला असुन , असे असतांना मात्र त्यांच्या कुंटुंबाला तांत्रीक अडचणींच्या गोंधळामुळे शासनाकडुन मिळणाऱ्या मदती पासुन वंचीत राहावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . या संदर्भातील वृत्त असे की , यावल तालुक्यातुन २०२१च्या कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटकाळात सुमारे १३०हुन अधिक नागरीकांनी आपला जिव गमावला असुन , परसाडे तालुका यावल येथे राहणारे भागवत सावळे यांचा देखील दिनांक १० / ४ / २o२१ रोजी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने जळगाव येथील शासकीय कोवीड रुग्णालयात मृत्यु झाला असुन , दरम्यानच्या काळात कोरोनामुळे मरण पावलेल्या व्याक्तीच्या कुटुंबास राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली , यावेळी विविध प्रशासकीय यंत्रणेकडुन गाव पातळीपासुन तर शहरी विभागातुन कोरोनामुळे मरण पावलेलेल्यांची संपुर्ण माहीतीसह आकडेवारी काढण्यात आली , यात मात्र परसाडे तालुका यावल येथील रहीवासी भागवत सुपडू सावळे वय५५ वर्ष यांचा देखील या काळात मृत्यु झाला असुन , त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातुन उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता त्यांचा दिनांक १o एप्रिल २०२१ रोजी उपचारार्थ दाखल केले असता मृत्यु झाला , मात्र त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातुन पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्याची नोंद नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मदतीसाठी प्रस्ताव मान्य होईल का नाही याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे . या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ बी बी बारेला यांनी या विषयी माहीती सांगीतले की कोरोना काळात संसर्गामुळे मरण पावलेल्यांची नांव हे पॉर्टल व स्थानिक महसुल प्रशासना यंत्रणेकडुन करण्यात आली त्यामुळे सदरच्या मरण पावलेल्या व्यक्तिची नोंद किंवा तांत्रीक अडचणीमुळे नोंदणी ही उशीरा झाली असावी , मयत भागवत सावळे यांना यावल हुन जळगाव पाठवितांनाच त्यांना तसा दाखला देण्यात आला असेलच असे त्यांनी सांगीतले . या सर्व गोंधळामुळे कोरोना मुळे मरण पावलेल्या मजुर व्याक्तीच्या कुटुंबास शासकीय मदतीपासुन वंचीत राहावे लागणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .

भिष्णूर येथील रेती घाटातील अवैध रेती उत्खननाची चौकशी होऊन कारवाई व्हावी.

0

 

सरपंच यांचे एस .डी.ओ.यांना निवेदन.

आष्टी तालुक्यातील मौजे भिष्णूर येथील रेतीघाट लागू असून मशिनच्या साह्याने उत्खनन चालू आहे. याबाबत तहसीलदार व तलाठी यांना पत्र देऊन व तोंडी सूचना देऊनही उत्खनन सुरूच आहे. त्यामुळे जनावरांना पाणी पिण्याकरता अडचण होत आहे.व महसुलचे नुकसान होत आहे. तरी याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी. अशा प्रकारचे निवेदन भिष्णूर ग्रामपंचायतचे सरपंच यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मौजे भिष्णूर येथे रेतीघाट लागून या रेती घाटाला लागूनच मौजे चांदुर ढोरे ता. तिवसा जि अमरावती येथील रेती घाटाचा लिलाव झालेला आहे. सदर ठिकाणी मशिनच्या साह्याने रेती उत्खनन चालू आहे. परंतु सदर मशीनद्वारे भिष्णूर येथील रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात करीत आहेत. सदर उत्खननाची माहिती दि. 11/ 2 /2022 रोजी तहसीलदार आष्टी यांना लेखी पत्र देऊन व तलाठी आठवले यांना सुद्धा तोंडी सूचना देऊन माहिती देवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याकरता हे पत्र देत आहोत .तरी आपण सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. या उत्खननामुळे जनावरांना पाणी पिण्याकरता अडचण निर्माण होत आहे. तसेच भिष्णुर येथील महसूलचे सुद्धा नुकसान होत आहे. सदर निवेदनाच्या प्रति ह्या महसूल मंत्री ,पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविल्या असून निवेदनावर सरपंच ग्रामपंचायत भिष्णूर यांची सही आहे.

वेकोली प्रदूषण विरोधात 2 तास काँग्रेसचा रस्ता रोको

0

 

वेकोलीला लाखो रुपयांचा फटका काँग्रेस – भाजप आमने सामने

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : वेकोलीच्या सि.एच.पी जुना बंकर व न्यू सायडिंगच्या प्रदूषणा विरोधात परिसरातील नागरिकांना घेवून घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत कारगिल चौक रेल्वे गेट समोर सुमारे दोन तास बैठा आंदोलन करण्यात आला.
वेकोली मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या वाहतूक रोखून धरण्यात आली.
यामुळे परिसरात वाहनांच्या रांगाच लागल्या यामुळे वेकोलीला लाखो रुपयांचा फटका बसला आहेत.
दुपारी एक वाजता वेकोली सब एरिया मॅनेजर फुलारे यांनी ठाणेदार बबनराव पुसाटे, काँग्रेस पदाधिकारी,व नागरिका समक्ष आठ दिवसांत प्रदूषण नियंत्रण करण्याचे लिखित आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
काँग्रेसने आंदोलनाचे रीतसर निवेदन देऊन
प्रसार माध्यमातून पोर्टल व बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
मात्र भाजप नेत्यांनी कुठल्याही प्रकारे सूचना न देता सकाळीच
प्रदूषण विरोधात आंदोलन शुरू केल्याने काँग्रेस व भाजप आमने – सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकाच मागणीला घेवून रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते बसल्याचे आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले आहे.
काँग्रेसच्या वतीने युवा नेते सुरज कन्नूर, इर्शाद शेख, इदरीस भाई,आफताब अली सदर,सैदू भाई,मोसीम शेख,रोशन दंतलवार,देव भंडारी,अनुप भंडारी,रफिक शेख, रोहित डाकूर,अय्यूब कुरेशी,कपिल गोगला,संजय कोवे, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

शिधापत्रिका शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

 

संग्रामपूर मित्र परिवार प्रहार जनशक्ती पक्ष व महसुल विभागाच्या वतीने आज दि 25/3/2022रोजी शिधापत्रिका शिबिराला संग्रामपूर शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

आज सकाळी 11वा संग्रामपूर येथील आठवडी बाजारात शिधापत्रिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्व प्रथम संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार मा श्री वरणगावकर साहेब, संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा शंकर भाऊ पुरोहित,नायब तहसीलदार श्री चव्हाण साहेब,पुरवठा अधिकारी श्री शेगोकार साहेब, संग्रामपूर च्या प्रथम नारीक तथा नगराध्यक्षा सौ उषा सिध्दार्थ सोनोने, उपनगराध्यक्ष श्री संतोष काशिनाथ सावतकार,प्रा हरिभाऊ तायडे सर व सर्व नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,शहिद भगतसिंग, यांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली*…*या शिबिरात तब्बल 210 शिधापत्रिकेचे प्रकरण निकाली काढण्यात आले…त्यात 38 प्रकरण विभक्त नविन, 5 प्रकरण नाव कमी करणे, 97 प्रकरण नाव वाढवणे,व 70 प्रकरण दुय्यम नुतनीकरण चे निकाली काढण्यात आले*.. *संग्रामपूर मित्र परिवाराने जो उपक्रम घेतला ते प्रशंसनीय आहे असे शिबिर वेळोवेळी घेण्यात यावे आम्ही संग्रामपूर मित्र परिवार ला सहकार्य करु असे आश्वासन मा तहसिलदार श्री वरणगावकर यांनी बोलताना सांगितले या शिबिराला पुरवठा अधिकारी मा शेगोकार,मंडळ अधिकारी श्री भिसे साहेब,अशोक पाटील,दयाल सिंग चव्हाण, रघुनाथ राजनकार,सि एस सि सेंटर संचालक उमेश राजनकार,श्री शेटे सर्व नगरसेवक व संग्रामपूर मित्र परिवाराच्या सर्व सम्मानिय सदस्यांनी परिश्रम घेतले

 

मोहता उद्योग समूहाचे गिमाटेक्स् मध्ये शॉर्टसर्किटने आग , दुसरीकडे वर्धापन दिन साजरा

0

 

हिंगणघाट दि.२५ मार्च

मोहता उद्योगसमुहाचे शहरातील गिमाटेक्समधे सायंकाळी ५.१५ चे दरम्यान एसी मधे शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना गिरणीपरिसरात घडली.
सदर गिरणी प्रभाग १२ डॉ. मुजुमदार वार्ड /राम मंदिर वार्ड काळी सडक या प्रभागात येत असून संध्याकाळी ५.१५ च्या दरम्यान एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका रूम मध्ये आग लागली. आग लागताच हिंगणघाट नगर पालिकेच्या अग्निशामक दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवळपास १ तासानन्तर ६.२५ वाजताचे दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याची माहिती मिळाली.सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मोहता उद्योगसमुहाचे हिंगणघाट येथील उद्योगाला आज नेमके १२५ वर्षे झाली असून मोहता उद्योगसमुहाच्या सर्वच प्रतिष्ठानात याबद्दल समारोह आयोजीत करण्यात आला आहे.
परंतु नेमकी यादिवशीच आगिची घटना घडल्याने एकप्रकारे अपशकुनच घडला असल्याची प्रतिक्रिया काही कामगारांनी अंधश्रद्धेतुन व्यक्त केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक असदपूर मो.9921400542
26 मार्च

ठाणे, कल्याण : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट महा मेडिकल कॅम्प कल्याण येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उपाध्यक्ष डॉ. वाघ यांनी सदर शिबिराचे आयोजन केले होते. सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्याचा लाभ मिळावा व त्यांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये जापानीज मशीनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी, पथोलॉजी लॅब तर्फे रक्ततपासणी, दंतरोग तज्ञ डॉक्टर बोराडे यांच्याकडून दातांची तपासणी व टेक्निशियन प्रकाश वाघ यांनी डोळ्यांची तपासणी केली. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी एस वाघ, उपाध्यक्ष डॉक्टर सुरज चौधरी, डॉक्टर महाजन सर, सविता वाघ, श्री युवराज खैरनार, डॉक्टर ललित बोराडे, श्री प्रकाश वाघ, योगेश पाटील, कु पूजा वाघ, शर्मिला गायकवाड तसेच पॅरामेडिकलचे सर्व विद्यार्थी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर अमरावती

वेकोली प्रदूषणा विरोधात उद्या काँग्रेसचा रस्ता रोको आंदोलन:राजू रेड्डी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : वेकोलीच्या जुना बंकर कोल हँडलींग प्लांट मधुन रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धूळ सोडल्या जाते.
यामुळे बँक ऑफ इंडिया परिसरात राहणाऱ्या जुन्या तलाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात धुळाचे लोंढेच्या लोंढे पसरतात नागरिकांच्या जेवणात बिछान्यावर सर्वत्र धुळच धूळ पसरते यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहेत.
तसेच व न्यू कोल सायडिंग मूळे
व शालीकराम नगर येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरात ही धूळच धूळ पसरते शहरात वेकोलीचे खाण नसतांना ही कोळशाच्या वाहनामूळे गावातील नागरिकांना रसत्यावर चालणे ही धोकादायक झाले असल्याने या प्रफ
प्रदूषणाच्या विरोधात मा.पालकमंत्री विजय वड्डेटीवार,खासदार बाळु धानोरकर,जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता न्यू सायडिंग मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून नागरिकांनी बहुसंख्येने प्रदूषण विरोधी लढ्यात शामिल व्हा असे आवाहन केले आहे.