Home Blog Page 320

गोतस्करयांच्या दादागिरीला वचक बसविण्यासाठी बजरंग दल ची तक्रार

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

आज दिनांक 12 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका व शहर यांच्या वतीने माननीय ठाणेदार साहेब यांना लेखी तक्रार देण्यात आली.
शेगाव शहरात मागील काही महिन्यांपासून गोवंश यांची निर्दयतेने वाहतूक होत असून त्यांची कत्तल होत आहे शहरात प्रवेश करणार्‍या मार्गाद्वारे खामगाव ,वरवट खंडेराव व इतर मार्गे गोवंशाची वाहतूक होऊन ते कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात नेले जात आहे वाहतूक करणार्‍यांकडे त्यासंबंधी कुठलाच परवाना व त्याची विक्री व खरेदी याची कुठलीच नोंद उपलब्ध नसते असे आपल्या मागील काही प्रकरणातून निदर्शनास आले आहे गोमाता ही हिंदू समाजासाठी पूजनीय असून त्याची याप्रकारे होत असलेली विटंबना ही निंदनीय आहे महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून आपण याकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे वाहतूक करणारे वाहन कडे गोवंश वाहतुकीचा कुठलाच परवाना नसतो, त्यावर आळा घालण्यात यावा. काल परवाच घटनेमध्ये अशाच एका वाहनांमध्ये गोवंश कोंबून नेताना विहिंप पदाधिकारी यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर सुद्धा गाडी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या अशा वाढत्या दादागिरीमुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडू शकते. याचीही प्रशासनास माहिती असावी या सर्व घटनांवर आळा बसावा व या गोवंशाची वाहतूक करणारे व त्याच कत्तलीसाठी नेणारे यांना कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हा ठिकाणी शहर व तालुका ठिकाणी दामिनी पथक धरतीवर गो-स्कॉड निर्मिती करण्यात यावी. आम्हा गोरक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही याद्वारे आपणास करीत आहोत. शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचे सुद्धा प्रमाण वाढले आहे व त्यांना अभय देणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना खाकी हिसका दाखवावा , अशी तक्रार दाखल करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री योगेश जी भारद्वाज, विहिंप तालुकाध्यक्ष विजय राठी, शहर अध्यक्ष प्रवीण मोरखडे, बजरंग दल तालुका संयोजक सोमेश कांबळे शहर संयोजक शुभम ढगे ,शहर उपाध्यक्ष मनीष नारणोलीया,जिल्हा सह गोरक्षा प्रमुख सचिन हिवरे, नगर गोरक्षा प्रमुख हरिओम तिव्हाने, पवन बघे, अमोल शेगोकार ऋषिकेश हिंगणे, आकाश पाटील, शुभम अजाडीवाल ,शुभम देशमुख, विशाल ठेंग, सागर गलवाडे, सुरज थोरात, गणेश सोळंके, विशाल भिसे ,कृष्णा तिवारी, सौरभ स्वामी ,योगेश कडू, योगेश ठाकरे , गोपाल लखाडे,आदित्य शशांक शेंडे, ऋग्वेद चत्तेरकार चंद्रकांत माने, राज वाधवानी, गजानन परियाल, सौरभ पहुरकर, आशिष सावळे, आशिष ददगाळ, विठ्ठल पाटील, विशाल वाघ, श्रीकांत टोंगळे, गौरव लांजुडकर आदी बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.*

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार 12 मार्च रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वतंत्र सेनानी, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीर, चंद्रपूरचे सुपुत्र क्रांतिवीर नायक बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, आदिवासी समाजाचे नंदेश्वर पेंदोर, नकोड उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रामपंचायत सदस्य रजत तुराणकर, गणेश किन्नाके, अनिकेत गेडाम, प्रकाश नैताम, श्रीराम जेऊरकर, संगीता नन्नावरे, सुशील डांगे, लता आवारी, शीतल कामतवार, भारती परते, कुमकुम वर्मा, दुर्गा साहू, स्नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निववास्थानी सांत्वनपर भेट !

0

 

युसीएन चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी पत्रकार फहीम देशमुख यांचे वडील हाजी अब्दुल रहीम देशमुख यांचे नुकतेच दु खद निधन झाले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज शनिवारी त्यांच्या शेगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट देवुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार, ऍड जयश्री शेळके, काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोन्द्रे, संजय राठोड सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शेगाव येथे नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

समाजाचा एकत्रित आवाज म्हणजे साहित्य संमेलन असतात. त्यामूळे समाजाची भूमिका ही साहित्यातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच साहित्य हा समाजमनाचा आरसा ठरतो. त्यामूळे माणसाला साहित्याच्या आरशात स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब दिसावं’, असं प्रतिपादन शेगाव येथे आयोजित नाभिक समाजाच्या द्वितीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम यांनी व्यक्त केली. शेगावातील विघ्नहर्ता लॉन सभागृहातील ‘क्रांतीवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल साहित्यनगरीत हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड उपस्थित होते. ‘महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघानं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम, उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाड, अमरावती येथील पहिल्या संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, कलादर्पण संघाच्या सुनिता वरणकर, प्रा. अविनाश बेलाडकर आणि स्वागताध्यक्ष विलासराव वखरे उपस्थित होते.

संमेलनाचं प्रास्ताविक ”महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघा’चे अध्यक्ष शरद ढोबळे यांनी केलं. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाडांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी संत सेना महाराजांची खरी ओळख समाजाला आतापर्यंत करून न दिल्या गेल्याची खंत व्यक्त केली. ते ताकदीचे विचारवंत होते, परंतू त्यांचा वैचारिक वारसा साहित्यातून दिसत नसल्याचं गायकवाड म्हणालेत. महामानव डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात साठवून समाज घडवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रदीप कदम यांनी यावेळी संमेलनाध्यक्षपदाची सुत्रे स्विकारलीत. यावेळी बोलतांना मांडवकर म्हणालेत की, ‘साहित्य जगण्याचं बळ देतं, नवा विचार देतं, जगण्याचं बळ देतं. त्यामूळेच समाजाच्या जगण्याचं सार नाभिक साहित्यातून उमटायला हवं, अशी अपेक्षा मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली. संमेलनात नाभिक समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या ‘विशेष स्मरणिका कलादर्पण’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाभिक समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. उद्घाटन सत्राचं संचलन नांदेडच्या अशोक कुबडे आणि अश्विनी अतकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश बेलाडकर यांनी केले.
संमेलनाच्या दुसर्या सत्रात ‘नाभिकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात’, या विषयावर परिसंवाद झाला. प्रा.यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखालील परीसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पारपल्लीवार, वर्धेच्या अर्चना धानोरकर सहभागी झालेत. यानंतर श्रीधर राजनकर आणि नितेश राऊत यांच्या कथाकथनानं संमेलनात रंगत आणली. यानंतर निमंत्रितांच्या कवी संमेलनातील कवींच्या रचनांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. संमेलनाचा समारोप बक्षिस वितरण आणि पुण्याचे मारूती यादव यांच्या ‘हास्यजत्रा’ कार्यक्रमाने झाला. या संमेलनासाठी राज्यभरातील नाभिकबांधव संतनगरीत आले होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ‘महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघ’ आणि शेगावच्या स्थानिक आयोजन समितीने अथक परिश्रम घेतलेत.
आजच्या संमेलनात कोकणातील रत्नागिरीच्या नाभिक समाजातील ८५ वर्षीय ‘युट्युबर’ आज्जी गुलाबबाई पवार यांचा विशेष सत्कार आला. या आजीने युट्युबर ‘आपली मुलगी गौरी’ नावानं स्वत:चं ‘यट्युब चॅनेल’ सुरू केलं. तिचे यावर लाखो फालोअर्स आहे. ती या ‘चॅनल’च्या माध्यमातून मनोरंजन आणि कोकणातील खाद्य संस्कृतीची माहिती देणारे व्हिडीओ प्रसारित करते. या सळसळत्या उत्साहाच्या ‘युट्युबर आज्जी’चा यावेळी समाजाच्या वतीनं भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

चंद्रपूरचे 1857 स्वतंत्रता सेनानी बाबुराव शेडमाके यांना काँग्रेसचे अभिवादन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस ; ब्रिटिशां विरोधात 1857 स्वतंत्रता संग्रामात चंद्रपूर जिल्ह्याचे तरुणांनी देशाखातर हसत – हसत प्राणाचे बलिदान दिले आहे.
आदिवासी समाजातील शहीद क्रांतिसूर्य बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाला विशेष महत्त्व आहे.
शेडमाके यांनी जंगोम सेनेची निर्मिती करून ब्रिटिशा विरोधात तगडी झुंज दिली.
इंग्रजांनी कट कारस्थान रचुन अटक केली व चंद्रपूर येथील जेल मध्ये 21 ऑक्टोबर 1858 रोजी फाशी दिली
आज काँग्रेस कार्यलयात क्रांतिवीर बाबुराव शेळमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, बालकिशन कुळसंगे, संजय कोवे, रोशन दंतालवार,इर्शाद कुरेशी, सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,सचिन कोंडावार,रफिक शेख,प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालेपेल्ली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोळसा सॅम्पलरचे कामबंद आंदोलनाला सुरुवात

0

 

वेकोलीतर्फे निकृष्ट दर्जाचे कोळश्याचे महजेनकोला पुरवठा

वीजपुरवठ्यावर होईल वाईट परिणाम

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस :कोळशाचे उत्पादन करणारे कोल इंडिया आणि विद्युत निर्मिती करिता कोळशा खरेदी करणारे महाजेनको या कंपन्यांनी नियमानुसार कोळशाचे गुणवत्ता तपासणीचे कंत्राट संयुक्तपणे सिम्फर या कंपनीला दिले आहेत.
आणि सिन्फर या कंपनीने कोटनका इंस्पेकॅशन प्रा. लि या कंपनीला कंत्राट दिले.
कोटेनका ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सब एरिया कार्यालय परिसरातील कार्यालयातून घुग्घुस रेल्वे सायडिंग मधून कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करीत
आहे.
याठिकाणी जवळपास चौवीस कामगारांचा शोषण केल्या जात आहे.
त्यांना वेकोलीच्या हाय पॉवर कमेटीने निर्धारित केलेले वेतन दिल्या जात नाही.
साप्ताहिक सुट्टीचे वेतन मिळत नाही, यासोबतच धूळ भत्ता,मेडिकल सह अन्य कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी आज दिनांक 11 मार्च सकाळी 08 वाजताच्या पाळी पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
सदर आंदोलन काँग्रेस शहराध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली शुरू करण्यात आले आहे.
कोळशाची चाचणी तपासणी बंद पडल्याने वेकोली गुणवत्ता तपासणी न करता कोळशाच्या नावावर दगळ – धोंडे माती मिक्स करून महजेनकोला पाठविल्या जात असल्याने वीज केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन उन्हाळ्यात वीज खंडीत झाल्यास नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागणार आहे.
या गंभीर प्रकाराकडे वेकोली व महाजेंनकोने तातळीने लक्ष देऊन
सिम्फर या कंपनीस कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष देऊन कोटनका या कंपनीस कामगारांच्या वेतनात वाढ करण्यास बाध्य करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
आज कामबंद आंदोलनात सचिन कोंडावार, प्रणय लिंगमपेल्ली,प्रेम कालापेल्ली,अशोक सोनटक्के,विशाल जंगम,रवी भगत,प्रमोद मांढरे,बाबा जीवन,लीलाधर आत्राम,सुशांत वाघमारे,कुमार अंबाला,योगेश आरपवल्ली,सुधाकर जुंघरे,राजू कांबळे,राजू पाटील,प्रशांत तोंगे,महादेव मांढरे,विजय नागपुरे,सचिन मांढरे,अमित कामतवार, यांनी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बीबी येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न

0

 

प्रतिनिधी /जगन पाटील लोणार

तालुक्यातील येथे दिनांक 9 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की

श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद भाऊ दळवी, प्रदेश उपाध्यक्ष ध्यैर्यवर्धन पुंडकर अशोक भाऊ सोनोने, प्रदेश महिला उपाध्यक्ष सविता ताई मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव यांनी वंचित बहुजन आघाडी ने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात लोणार तालुका दौरा,
बिबी किनगाव जट्टू सर्कल मेळावा संपन्न.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविता ताई मुंढे प्रदेश महिला उपाध्यक्षा, यांनी किनगाव जट्टू बीबी सर्कल हे भारिप बहुजन आघाडीचे मागील पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य निवडून दिल्याची माहिती दिली आणि सर्व समाजातील बांधवांना सोबत घेऊन आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे आश्वासन दिले तसेच निलेश भाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष यांनी या सर्कल ला ऐतिहासिक वारसा असल्याचे कबूल केले तसेच गावागावात शाखा बांधणी पंचायत समिती गटनिहाय जिल्हा परिषद गटनिहाय असे आदेश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले दिलीप राठोड लोणार तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नेते, महेंद्र पनाड जेष्ठ नेते, बळी भाऊ मोरे ता.महासचिव, सुनिल भाऊ इंगळे वंचित नेते, गौतम भाई गवई युवा नेते, संघपाल पनाड, के बी इंगळे सर, जितेंद्र डोंगरदिवे, माधव भाऊ हिवाळे, समाधान भाऊ मोरे,गजानन सरदार, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.

बिबि प्रतिनिधी भागवत आटोळे बिबि

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक मो. 9921400542 असदपूर

पालघर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली व पालघर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांच्या मार्गदर्शनानुसार पालघर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्हा कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अमेय पिंपळे, जिल्हा समन्वयक श्री.अतुल वझे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष कोरे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र सावे, जिल्हा सरचिटणीस श्री. मुकेश सिंह, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री.परेश संखे, जिल्हा सहसचिव श्री.संजोग संखे, पालघर तालुका महिलाध्यक्षा सौ.उज्वला जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबवून पत्रकार व सामान्य कुटुंबांना मदत केली आहे. सन २०२२-२३ मध्ये पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवणे, सामान्य कुटुंबांना मदत करणे, वृक्षारोपण, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांनी सांगितले.
पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू ,युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत ताद लापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कोकण उपाध्यक्ष, योगेश भामरे, इल्यास पठाण, कोकण सरचिटणीस महेश महाजन, पंडित फंगाळ, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावल तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल ता.येथील पंचायत समिती च्या सभागृहामध्ये ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली तत्कालीन यावल तालुका अध्यक्ष खुशाल पाटील यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्ध प्रमुख पदी निवड झाल्याने तसेच यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री बाळू तायडे मारुळ यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी  निवड झाल्याने रिक्त झालेल्या पदाकरिता आज ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना  महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्धीप्रमुख खुशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री बाळू तायडे मारुळ हे उपस्थितीत होते सदरचा कार्यक्रम हा यावल पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटनेचे रजिस्ट्रेशन , व सभासद नोंदणी प्रक्रिये बाबतीत राज्य अध्यक्ष विलास जोगदंडे महासचिव राजेंद्र जिचकार कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे कार्यध्यक्ष देवदत्त साळवे त्यांच्या मार्गदर्शना नुसार संघटनेचे महत्व संघटनेची कार्यप्रणाली विषद करुन संघटन ही काळाची गरज असुन संघटना ही अन्यायाला वाच्या फोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी नुतन तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली तिला पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून चुंचाळे येथील ग्राम रोजगार सेवक दीपक कोळी ,उपाध्यक्ष विरोदा येथील वसीम पिंजारी ,मोहराळा येथील अनिल अडकमोल तालुका सचिव पदी वडोदा प्रया येथील सरफराज तडवी सहसचिवपदी वनोली येथील सुनील सोनवणे कोषाध्यक्षपदी शिरागड येथील कैलास साळुंके सहकोषाध्यक्ष मालोद येथील मेहरबान तडवी कार्याध्यक्ष सातोद येथील अनिल ढाके सहकार्य अध्यक्ष कठोरा येथील दिगंबर खडसे प्रसिद्धीप्रमुख कासवा येथील ईश्वर सपकाळे सह प्रसिद्धीप्रमुख वडोदा प्र सावदा येथील मुकेश सोनवणे तसेच सल्लागारपदी लूकमान तडवी, फकिरा तडवी, विजय सपकाळे,लक्ष्मण कोळी,विलास पाटील, शरीफ तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे मारुळ महाराष्ट्र राज्य संघटक व प्रसिध्द प्रमुख खुशाल दादा पाटील व नुतनकार्यकारणीच्या पदाधिकारीची मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या कामात मारुळचे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल ता. उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी सुखदेव साळुंखे, संजय कोळी, ईश्वर अडकमोल, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, निलेश तायडे आदी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते

भाजपा महिला आघाडी व प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे “सन्मान स्त्रिशक्तीचा” कार्यक्रम संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

मंगळवार 8 मार्च रोजी येथील प्रयास सभागृहात भाजपा महिला आघाडी घुग्घुस व प्रयास सखी मंच घुग्घुस यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त प्रतिभावंत महिलांचा सत्कार “सन्मान स्त्रिशक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी भारत माता, राजमाता जिजाऊ व माता रमाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमर शेट्टीवार, माजी जिप सभापती नितुताई चौधरी,माजी उपसरपंच संजय तिवारी, डॉ. अंक्षिता कुंडू, डॉ. वृषाली नांदे, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, पोलीस महिला कर्मचारी समीक्षा भोंगळे, वर्षा बावणे, वर्षा जाधव, मंजुषा काकडे, रंजना नैताम उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले स्त्रिचा समानार्थी शब्द सेवा होय. या जगामध्ये शुश्रुषा म्हणजे सेवा हे जर कोणी करत असेल तर ती स्त्रि आहे. पुरुषांपेक्षाही जास्त स्त्रि सेवा करते. कोरोना संकटात डॉक्टर, नर्स, महिला पोलीस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केली. समाजात सेवेचे काम स्त्रियांच्या माध्यमातून होते.
प्रास्ताविक घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरणताई बोढे यांनी केले.
याप्रसंगी गायन, नृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले
यावेळी घुग्घुस ग्रामपंचायत माजी सदस्या कुसुमताई सातपुते, नंदा कांबळे, पुजाताई दुर्गम, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, पुष्पाताई रामटेके, चंदाताई गेडाम, सुनीता पाटील, किरण जुनघरे, सौभाग्या तांड्रा, चंद्रकला मन्ने, शारदा गोडसेलवार, नाझिमा कुरेशी, सुनीता वर्मा, कीर्तीताई चरडे, अनिता लालसरे, सारिका भोंगळे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
संचालन माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे यांनी केले तर आभार वैशाली ढवस यांनी मानले.