Home Blog Page 321

यावलच्या शिक्षण विभागाला दहावी व बारावीच्या परिक्षा केन्द्रावर कुठलेही प्रकारचे भेटीचे आदेश नसतांना भेटी कशासाठी ? पं .स .मासिक सभेत चर्चा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

आज येथील पंचायत समिती सदस्यांची अखेरची मासिक सभा पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर विशेष करून लक्ष वेधणारी चर्चा करण्यात आली . या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात आदेश नसतांना तालुक्यातील बारावी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्याचे दिसून येत आहे . शिक्षण विभागाच्या भरारी पथकाचे कुठलेही आदेश नसताना परीक्षा केंद्रांना भेटी का दिल्यात ? आपली बीट सोडून दुसऱ्या बिट मध्ये शाळा तपासणी चा उद्देश काय ?आपल्याकडे गटसमन्वयकचा पदभार आहे परंतु गटसमन्वयकाचे कार्य हे एसएसए बाबत असताना आणि एसएसए मध्ये पैसा येत नाही त्याबाबत काम न करता आपण शाळा भेटी कोणत्या उद्देशाने करीत आहात गटसमन्वयक यांनी सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयात हजर राहायचे असते आपण कार्यालयात हजर राहत नाहीत याबाबत बी आर सी कर्मचारी व शिक्षण विभाग लिपिक यांना बोलावून विचारणा केली असता ते कार्यालयात येतच नाहीत असे सांगण्यात आले ,भरारी पथकामध्ये आपणास आदेश नसताना केंद्रांना भेटी देणे चुकीचे असल्याचे आज झालेल्या पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत पंचायत समितीचे विरोधीगटनेते शेखर सोपान पाटील व गटनेते दीपक अण्णा पाटील यांनी या बाबतीत शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख यांच्याशी विचारणा करीत त्यांच्या विभागाअंतर्गत होत असलेल्या अनधिकृत कारभाराविषयी विषयी विचारणा करीत कानउघाडणी केली . या विषयाची केंद्र शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार पंचायत समितीच्या सदस्य यांच्याकडे केली होती. शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र तपासणीचे अधिकार आदेश नसून . असे असतांना सुद्धा यावल तालुक्यात शिक्षण विभागाचा कोणता अधिकारी शाळा शाळांमध्ये फिरत आहे असून तपासणीच्या नावाखाली केंद्र संचालकांना त्रास देऊन पिळवणूक करीत आहे असे करण्यामागे त्या अधिकाऱ्यांचा काय उद्देश आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत . असे असुन, ही शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी एवढे मुजोर कसे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे . सदर यावल पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण विभागाच्या अशा प्रकारच्या कारभारा विषयी प्रश्न उपस्थित केल्याने या बाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व गटशिक्षणाधिकारी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे .

स्त्री ही कुटुंबाचा पाया ! स्त्री शिवाय कुटुंब नाही : प्रकाश देवतळे

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : स्त्री ही कुटूंबाचा पाया आहे स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबा शिवाय समाज नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले आहे.
घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 08 मार्च रोजी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे महिला दिनाचे कार्यक्रम काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला 08 मार्च 1908 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक निर्दशने केली.
सदर निदर्शने कामाचे तास कमी करणे, महिला सुरक्षितता इत्यादी मागण्यांना घेऊन करण्यात आले.
याची फलश्रुती 1910 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधीनी 8 मार्च हा महिला दिवस साजरा करण्याचा ठराव पास केला.
आज भारतात सरपंचा पासून ते राष्ट्रपती,पंतप्रधान,वैद्यकीय अधिकारी,पोलीस अधिकारी, सायकली पासून ते विमाना पर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे.
मात्र अजूनही महिलांन मध्ये अंधश्रद्धा,अशिक्षितपणा हे दूर करणे गरजेचे असून हुंडाबळी,
महिला अत्याचारा पासून लढा देण्यासाठी महिलांनी एकत्रित रित्या संघर्ष करणे गरजेचे आहे.
असे आवाहन रेड्डी यांनी केले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांनी स्त्री ही दोन कुटुंब सासर व माहेर जोडणारा सेतू असल्याचे भावना व्यक्त केल्या.
किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी महिलांनी राजकारणात पुढे येऊन देशाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी शासनाला धडा शिकविण्याचा आवाहन केले.
याप्रसंगी मंचावर सौ.संगीता बोबडे, सौ.पुष्पा नक्षिणे, सौ.पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील,अमिना बेगम,संध्या मंडल, सौ.पुष्पा कणकम,सौ.दीपा बोकडे,
उत्तर भारतीय सेल सचिव ब्रिजेश सिंग,अल्पसंख्याक सचिव किरण झुंजीपल्लीवार,पर्यावरण तालुकाध्यक्ष महेश किण्णाके,शामरावजी बोबडे, अनिरुद्ध आवळे,अलीम शेख,मोसीम शेख,किशोर बोबडे,भैय्या भाई,स्टीवन गुंडेटी,श्रीहरी शेंगारप,गणेश उईके, रिषभ दुपारे,लखन हिकरे, हे होते
कार्यक्रमाचे संचालन साहिल सैय्यद यांनी केले
आभार प्रदर्शन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले तर
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन दंतलवार, विशाल मादर, इर्शाद कुरेशी, सुकमार गुंडेटी,रोहित डाकूर,अनुप भंडारी,देव भंडारी,कुमार रुद्रारप,रमेश रुद्रारप, सुनील पाटील, रफिक शेख,बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,अंकुश सपाटे,अविनाश गोगुर्ले, यांनी केले
याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

राजकीय गुन्हेगारीला अटकाव घालणे आवश्यक अमरावतीत अतिरिक्त ठाणे व सीसीटीव्ही ची मागणी

0

 

उषा पानसरे मू.का. सपादच मो. 9921400542 अमरावती

गृहविभागाच्या मागण्यांवर विधानसभेत आ. सौ. सुलभाताई खोडके यांची चर्चा*.

मुंबई ८ मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारच्या सत्रामध्ये सभागृहात राज्याच्या गृहविभागाच्या विषयांवरील पुरवणी मागणींवर चर्चा घडवून आली . या चर्चेमध्ये अमरावतीच्या आ. सौ . सुलभाताई खोडके यांची सहभागी घेतला . अमरावती मतदार संघात निवडणुकीच्या काळात राजकीय गुन्हेगार सक्रिय राहत असून नेत्यांच्या राजकीय संरक्षणाने ते मोकाट फिरत आहे. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृतींद्वारा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केल्या गेला . कार्यकर्त्यांना धमक्या देऊन त्यांची अडवणूक केल्या गेली . अशा परिस्थितीत आपण निवडणूक जिंकली .आगामी मनपा निवडणूक काळात सुद्धा हे राजकीय गुन्हेगार सक्रिय राहून शांतता व्यवस्थेला धोका निर्माण करण्याची शक्यता आहे. याला नेत्यांचे संरक्षण असल्याने ते मोकाट फिरत आहेत . शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या असता , त्यांच्या घरातून बंदूक सारखे घातक शस्त्र साठे आढळून आले, या कुणालाही अटक झाली नाही , उलट बेल मिळाली अशी परिसथितीच अमरावतीत वातावरण आहे, हि बाब फार गंभीर आहे. याची चौकशी करून राजकीय गुन्हेगारावर कारवाईची मागणी आ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात केली . शहरात . त्यामुळे अशा राजकीय गुन्हेगारावर अंकुश लावण्याकरिता गृह विभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात गृहविभागाच्या विषयांवर चर्चा करतांना स्पष्ट केले . अमरावती मध्ये वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सद्याचे पोलीस ठाणे कमी पडत आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून अमरावती मध्ये अतिरिक्त पोलीस ठाणे स्थापन करण्याची गरज व पोलिसांचे अधिक मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे., असे सांगीत शहर सुरक्षेच्या दृष्टीने विविध भागात सीसीटीवी कॅमेरे बंसविण्यात यावे , अशी मागणी करीत आमदार महोदयांनी सभागृहाचे लक्ष वेधले . यासाठी आपण गृह विभागाकडे प्रस्ताव दिला असून यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली . गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावती मध्ये दंगल सदृश परिस्थिती उद्भवली असता अमरावती पोलिसांनी चोख भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली . त्याबद्दल अमरावती पोलीस व गृह विभागाचे अभिनंदन सुद्धा आ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने अधिवेशना दरम्यान बोलतांना करण्यात आले. .. दरम्यान अमरावती शहरातील पोलीस विभागाच्या अनेक बाबींविषयी सभागृहाला अवगत करतांना पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली काढण्यात यावा. मागील ३०ते ३५ वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला गृह विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली . दरम्यान अधिवेशनात गृह विभागाच्या कोरोना संकट काळात चोख भूमिका तसेच रस्त्यावर तैनात राहून योध्यांप्रमाणे काम करणाऱ्या पोलीस शिपायांना शिपायांना पदोन्नती देण्याचा शासनाचा निर्णय निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून आमदार महोदयांनी सरकारचे अभिनंदन केले. महिला अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा पारित केला याबद्दल सुद्धा आमदार महोदयांनी आभार मानीत अभिनंदन केले आहे.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

प्रियदर्शनी शाळा ते बेलोरा पर्यत मुख्य मार्गाची स्वच्छता करा :राजू रेड्डी

0

 

(ivrcl)आय व्ही. आर.सी.एल कंपनीला काँग्रेसची तंबी

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : चंद्रपूर ते वणी मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला धुळाचे ढीग निर्माण झाले असून यावरून जडवाहन जाताच धुळामूळे रस्त्यावर सर्वत्र धुळच – धूळ उडते याप्रदूषणाने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
रस्त्या वरील धूळ नियमितपणे स्वच्छ करण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या शिष्टमंडळाने धानोरा टोल येथे जाऊन रस्ता स्वच्छता,रस्ता द्विभाजक स्वछता बाबतव अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नियमितपणे स्वच्छता न केल्यास टोल विरोधात आंदोलनाचा इशारा दिला याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,बालकिशन कूळसंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन महीला अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला.

0

 

 

यावल – प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल पंचायत समितीच्या कार्यालयात यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या DNE 136 शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन कर्तृत्ववान माहिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यालयातील महीला अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. श्रीमती मंजुश्री गायकवाड-बोरसे, पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधी सदस्या कलीमा सायबु तडवी, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी विजय मोरे, पंचायत समितीच्या कार्यालयीन कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेल्या वरिष्ट सहाय्यक अंजनी लोहारो, कनिष्ठ सहाय्यक सुनिता सोनवणे, कनिष्ठ सहाय्यक वर्षा राऊत, भारती चौधरी, किर्ति चौधरी, डाटा एंट्री ऑपरेटर मनिषा खाचणे, कार्यालयीन शिपाई फुलवंती भादले, शिपाई अपशान तडवी, ऑपरेटर तनुजा तडवी यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय सेवेने आर्दश निर्माण करणाऱ्या कर्तृत्वान महीलांचे यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हा गौरव करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, हितू महाजन, ग्रामसेवक राजू तडवी यांच्यासह आदी उपस्थित होते.

शेगावात नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन.

0

 

अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप कदम; उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाड ; दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

अर्जुन कराळे शेगाव

शेगाव, दि. ७ : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या वतीने नाभिक समाजाचे एक दिवसीय द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विघ्नहर्ता हॉल मध्ये दि. १२ मार्च २०२२ ला संपन्न होणार आहे.

या संमेलनाच्या संमेलनाध्यस्थानी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम असतील. ते अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील. सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड हे या संमेलनाचे उद्घघाटन करतील. नाभिक समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या ‘विशेष स्मरणिकेचे विमोचन या संमेलनात होईल. तसेच समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात येईल.

नाभिक समाजाची संस्कृती, समस्या आणि भविष्याच्या वाटचाली’वर चर्चा अपेक्षित असणाऱ्या या संमेलनात समाजाला दिशादर्शक ठरलेल्या आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर उदय टके, स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे यशस्वी लेखक ‘के सागर’ सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई पवार, अलिबागचे सुप्रसिद्ध हेअर डिझायनर सुशील भोसले, अहमदनगरचे अशोक औटी, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक समाजाचे भालचंद्र गोरे, क्रांतीकारक विचारांचे कार्यकर्ते गोविंद दळवी, सुधाकर सनसे, अखिल भारतीय सेन समाजाचे पुखराज राठोड, नाशिकचे समाधान निकम, समाजातील जळगावचे प्रथम आयएएस सौरभ सोनावणे, व-हाडी शब्दकोशकार शिवलिंग काटेकर, नागपूरच्या मराठी वाडमयाच्या अभ्यासक रिता धांडेकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल.

दि. १२ मार्च ला सकाळी ९ वाजता प्रतिनिधींची नोंदणी होईल. १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व स्मरणिकेचे विमोचन होईल. दुपारी साडेबारा वाजता नाभिकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात, या विषयावरील प्रा. यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखालील परीसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पारपल्लीवार, वर्धेच्या अर्चना धानोरकर सहभागी होतील.

दीड वाजता श्रीधर राजनकर व नितेश राऊत यांचे कथाकथन होईल. अडीच वाजता निमंत्रीतांचे कविसंमेलन होईल. संध्याकाळी ४ वाजता बक्षीस वितरण, साडेचारला संमेलनाचा समारोप होईल. पुण्याचे मारूती यादव यांची हास्यजत्रा ५ वाजता सादर होईल.

संमेलनाच्या यशस्वीतेसीठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शेगावची स्थानिक आयोजन समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या संमेलनाला राज्यभरातील समाजबांधवांनी उपस्थित राहून साहित्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदरून ग्रामपंचायत कार्यालया समोर छावा क्रांतीविर संघटनेचे आमरण उपोषण!

0

 

उषा पानसरे असदपूर मू.का. सपादक मो,9921400542

दिनांक 8 मार्च दर्यापूर

विविध मागण्यांसाठी विद्याधर श्रीरंग रायबोले बसले उपोषणाला

दर्यापूर -तालुक्यातील नांदरून ग्रामपंचायत कार्यालयासमोर येथील छावा क्रांतीविर संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य विद्याधर श्रीरंग रायबोले हे आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहे. गावात झाडे कमी असून कामावर मजूर जास्त असल्याबद्दल व आम्ही पाच सदस्य असून काम मागण्याचा अर्ज करून सुद्धा एकही काम मंजूर न करून घेतल्याबद्दल
गावातील छावा क्रांतीवीर सेनेच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी काम मागणीचा अर्ज करून सुद्धा एकही काम मंजूर न करुन घेतल्याबद्दल ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण करण्यात येत आहे.यामध्ये ग्रामपंचायत सदस्य विद्याधर श्रीरंग रायबोले,उमा सागर पवार, जयश्री विशाल बगाडे, गणेश सोलंकी,सुजाता रूपेश तेलंग यांचा समावेश आहे.
या उपोषणाला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरज बाप्पु देशमुख व दर्यापूर तालुका अध्यक्ष विशाल बगाडे उपस्थित होते

कारंजा येथे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांची भेट

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी

कारंजा( घा ):-लवकरच होऊ घातलेल्या पंचायत समिती ,जिल्हापरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष व कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे .संभाजी ब्रिगेड चे नेते तथा वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांनी सुद्धा काल शहरास भेट देऊन संभाजी ब्रिगेड पक्षाच्यावतीने पंचायत समिती, जिल्हापरिषद लढविण्यासंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांची काय रणनीती राहील हे जाणून घेतले .यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली .येत्या पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेड चे युवा नेतृत्व स्थानीक नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड पक्ष आपले उमेदवार योग्य त्या जागांवर आपल्या पूर्ण ताकदीने लढवेल असा निर्धार सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केला .

कारंजात रंगला कीर्तन सोहळा

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर .

कारंजा (घा ):-येथील प्राचीन तथा जागृत महादेव मंदिरात भागवतकर विलास कोरडे महाराज नागपूर यांच्या ओजस्वी वाणीतून सात दिवस शिवपुराण ग्रंथाचे पूजन करून कोरडे महाराजांनी केले .त्यांना तबला वादक म्हणून सुरेश गायकवाड ,पेटी वादक म्हणून रमेश जेवडे तर गायक म्हणून नरेंद्र जयसिंगपुरे यांनी उत्तम साथ दिली .सती खंड ,पार्वती खंड ,कार्तिकी जन्म ,श्रीगणेश जन्म ,तारकासुर वध व शिवशंकरच्या पराक्रमाच्या कथा सांगून शंकरांनी केलेल्या धर्मरक्षण कार्यावर प्रकाश टाकला .समारोप दिनी टाळ मृदंगचे गजरात ,शिवग्रंथ दिंडी व पालखी काढण्यात आली .त्यानंतर कोरडे महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले .महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मानकर ,मारोतराव कुरमती ,आयुष्य सातपुरे ,रोशन नांदेकर ,सचिन नानोटकर ,देविदास विरुळकर ,सुधाकर चौधरी ,प्रमोद नानोटकर ,प्रतीक चाफले ,नाना मानकर ,प्रकाश मानकर आदींनी परिश्रम घेतले .

बिबी येथे नांफेडच्या हरभरा खरेदीला सुरुवात

0

 

जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021- 22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5230 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदीला बिबी येथे विदर्भ एग्रीकल्चरल अँड अलाईड प्रोडूसर कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत शासन मान्य आधारभूत हमीभाव खरेदी नाफेड अंतर्गत शेती सेवा ऍग्रो प्रोडूसर कंपनी यांच्यामार्फत या खरेदीला 4 मार्च रोजी बिबी येथे सुरुवात झाली आहे
हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा, ऑनलाईन पीक पेरा सह बँक पासबुकासी आधार लिंक केलेली झेरॉक्स मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रासह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करिता नोंदणी करावी असे आवाहन गोपाल काबरा यांनी केले यावेळी रमेश काबरा यांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले संचालक गोपाल काबरा यांनी प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केलायावेळी बद्रीनारायण काळुसे,रामदास खंदारे,अशोक फड,भुजंगराव,घोडके,अंबरसिंग,बुरकुल,शेख फयुम सह अनेक शेतकरी उपस्थित होते