Home Blog Page 322

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित असेल : आ.निलंगेकर

0

 

लातूर/ निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भारतातील हजारो वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्वदेशी परतावे लागले आहे. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असल्याने त्यांना आता भवितव्याची काळजी असेल मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लवकरच भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये त्यांना सहभागी करून त्यांचे शिक्षण पुर्ण करून त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यात येईल अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
वेदांत शिंदे, मोक्षदा कदम, तुषार म्हेत्रे, पल्लवी म्हेत्रे, ऋतुजा देशमाने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी संवाद साधून सुरक्षित स्वदेशी परत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे युक्रेनमधून भारतातील जे विद्यार्थी वैद्यकीय
शिक्षण घेण्यासाठी तेथे गेले होते त्यांना सुरक्षीत परत आणने याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने प्राधान्य दिले असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकरांनी ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतातील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षीत परत आणण्यात येईल असा विश्वास व्यक्त करून देशातील प्रत्येक जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते त्यांना परत आणण्याकरीता केंद्र सरकारने जी मोहिम उघडली होती त्या मोहिमेत भाजपच्या मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच विद्यार्थी सुखरुप परत येऊ लागले असून लातूर जिल्ह्यातील कांही विद्यार्थी आतापर्यंत परत आलेले असले तरी उर्वरित विद्यार्थी लवकरच परततील अशी माहितीही आ. निलंगेकरांनी यावेळी दिली. युद्ध परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असले तरी त्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित रहावे याकरीता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल आणि त्यांचा उर्वरीत वैद्यकीय अभ्यासक्रम कसा पुर्ण करता येईल या दृष्टीनेही केंद्र सरकारने कार्यवाही सुरु केले असल्याचे सांगत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत असेल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत युक्रेनमध्ये भारतासह अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेच भारतातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोहिम राबविली असल्याचे सांगितले. इतर देशानी मात्र याबाबत कोणतीच जबाबदारी उचलली नाही. त्यामुळेच आम्ही भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान असून आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने आम्ही सुखरुप परत आलो असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रदेश भाजयुमोच्या सरचिटणीस प्रेरणा होनराव, लातूर भाजयुमोचे सरचिटणीस तानाजी बिराजदार आदीची उपस्थिती होती.

इतर राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी

कारंजा( घा ):-गेल्या एक वर्षा अगोदर कारंजा मध्ये संभाजी ब्रिगेड ची शाखा स्थापन करण्यात आली .सतत एक वर्ष सामाजिक कार्य करून जनतेच्या समस्यांसाठी लढा देत संभाजी ब्रिगेड ने तालुक्यात एक मजबूत राजकीय अस्तित्व निर्माण केलेल आहे .शंभर टक्के राजकारण व शंभर टक्के समाजकारण या धोरणावर चालत असलेल्या संभाजी ब्रिगेड कडे तालुक्यातील जनतेचा कौल पाहायला मिळत आहे .संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास करून कारंजा तालुक्यातील ढाबा या गावातील 100 वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश झाला व कारंजा शहरातील अनेक महिला कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश झाला .संभाजी ब्रिगेडच्या वेगवेगळ्या पदावर अनेक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली .तालुक्यात सर्वात जास्त गतीने वाढणारा पक्ष संभाजी ब्रिगेड आहे व येणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हापरिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेड यश प्राप्ती करणार असल्याचे संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर म्हणाले .तालुक्यात संभाजी ब्रिगेड ला मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाला पाहून येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकीय वातावरण त्रिकोनिय पाहायला मिळणार .

चंद्रपूर काँग्रेस पर्यावरण तालुका अध्यक्षपदी महेश किन्नाके यांची नियुक्ती

0

 

काँग्रेस पर्यावरण विभाग तळमळीने कार्य करेल :शहर अध्यक्ष राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अंतर्गत कार्यरत काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर काँग्रेस कमेटी तर्फे जनसंपर्क कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

चंद्रपूर तालुक्यात प्रदूषणाची गंभीर समस्या असून पर्यावरण संवर्धनासाठी काँग्रेस पर्यावरण विभाग तळमळीने कार्य करेल असा आशावाद शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी व्यक्त केला

जागतिक महिला दिनानिमित्त अंजनी खुर्द येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन

0

 

लोणार प्रतिनिधी जगन पाटील

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त ह.भ.प.श्री.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा हरीकिर्तन सोहळा दि. 9 मार्च 2022 रोज बुधवार ला जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनी खुर्द ता.लोणार जि.बुलढाणा येथे रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे मुळे अण्णा सोशल फाउंडेशन संभाजीनगर औरंगाबादचे संस्थापक अध्यक्ष रमेश अण्णा मुळे यांच्या सौजन्याने तसेच ह.भ.प.दामू अण्णा महाराज शिंगणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
सदर कीर्तनाच्या कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान रमेश अण्णा मुळे यांनी ५ मार्च रोजी केले आहे

गुणवत्तेच्या शिखर संस्थेतील अधिकारी-कर्मचारी नियमित पगारापासून पाच महिन्यांपासून वंचित—!

0

 

अधिकारी-कर्मचारी उपाशी,सरकार मात्र तुपाशी…..!

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-महाराष्ट्र शासनाच्या कला व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि या मातृत्व संस्थेच्या अधिनस्त जिल्हा स्तरांवर शैक्षणिक गुणवत्ता, विविध प्रशिक्षणे,नियोजन व संशोधन,मूल्यमापन,अनुधावन,विविध आराखडे,दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न,केंद्र प्रमुख,विषय साधनव्यक्ती यांचे सक्षमीकरणासाठी कार्यरत
असलेल्या संस्था म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या आहेत.
मात्र उपरोक्त महत्वाची कामे करणाऱ्या संस्थेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या वर उपासमारीची पाळी येते तेव्हा शासन गुणवत्तेच्या प्रति किती संवेदनशील आहे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी असो केलेल्या सेवेचा त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना प्रोत्साहित करणे अभिप्रेत आहे.मात्र असेही दिवस पुरोगामी महाराष्ट्रात पहायला मिळतील अशी कल्पना सुद्धा कुणी केली नसावी.
“एकच निर्धार,नियमित पगार” या मागणीसाठी सदर संस्थेतील अधिकारी-कर्मचारी राज्यस्तरावर साखळी उपोषणास बसले आहेत.परंतू अजूनही शासनाच्या संवेदना जागृत झाल्याचे चित्र दिसून आले नाही.
कुटुंबातील सदस्यांचे उदर निर्वाह,गृहकर्ज,मुलांचे संगोपन आणि शैक्षणिक खर्चाची तरतूद,विविध विमे,किराणा दुकानाची उधारी,पेट्रोल-डिझेल खर्च,गृहभाडे इत्यादी महत्वपूर्ण आणि मुलभूत गरजांची पूर्तता करावी कशी?जगावे की मरावे?अशी स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे शासन या महत्वपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्यायीक समस्या कधी सोडवेल?या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप आमदाराने नाना पटोले यांना दिले थेट आव्हान

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

निलंगा : हिम्मत असेल तर राज्यात नव्हे तर केळव लातूर जिल्ह्यात काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
निलंगा तालूक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काल मुंबई येथे काॅँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पलटवार केला असून नाना भाऊ तुम्ही राज्यात सोडा फक्त लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणूका लढवून दाखवा असे आव्हान केले असून भाजप आणि काँग्रेसचे नेते मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकापूर्वी एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.येणाऱ्या काळात कोण कोणावर भारी पडणार हे येणारा काळच सांगणार आहे.
पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.राजकारणात हे तर होतच असते याला न जुमानता आपण पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्षवाढ करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यानी शेवटी सांगितले.

भाजप आमदाराने काँग्रेसला दिले ‘हे’आव्हान

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

निलंगा : हिम्मत असेल तर राज्यात नव्हे तर केळव लातूर जिल्ह्यात काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
निलंगा तालूक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काल मुंबई येथे काॅँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पलटवार केला असून नाना भाऊ तुम्ही राज्यात सोडा फक्त लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणूका लढवून दाखवा असे आव्हान केले असून भाजप आणि काँग्रेसचे नेते मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकापूर्वी एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.येणाऱ्या काळात कोण कोणावर भारी पडणार हे येणारा काळच सांगणार आहे.
पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.राजकारणात हे तर होतच असते याला न जुमानता आपण पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्षवाढ करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यानी शेवटी सांगितले.

गोपनीय माहितीच्या आधारे ८ क्विंटल ७० किलो सालई गोंद जप्त

0

 

सोनाळा वन्यजीव विभागाची कारवाई

 

वाहन सोडून चालक फरार ,चार लाख दहा हजार किमतीचा मूद्देमाल जप्त

अनिलसिंग चव्हाण
संग्रामपूर:–छूप्या मार्गाने अवैधरित्या सालई गोंदाची तस्करी करणाऱ्यावर नाकाबंदी करून वन्यजीव विभागाने कारवाई केली आहे. हि कारवाई रात्री उशिरा ३:३० वाजे दरम्यान करण्यात आली असून वाहन चालक आरोपी फरार झाला आहे. सोनाळा परिक्षेत्र अधिकाऱ्यांना संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथे चारचाकी वाहनाने सालई गोंदाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यापुष्ठभूमीवर वन्यजीव विभागाने मध्यरात्री नंतर नाकाबंदी करून रात्री ३:३० वाजे दरम्यान भरधाव वेगाने येत असलेल्या एम एच २७ एक्स ६७८६ क्रमांकाच्या चार चाकी वाहनाला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक वाहन न थांबवता सूसाट वेगाने धामणगाव रस्त्याने निघाला. तात्काळ वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचाय्रांनी भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान धामणगाव फाट्यावर वाहन सोडून चालक पसार झाला. वन्यजीव विभागाने वाहनावर ताबा मिळवत मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये सालई गोंदाने भरलेल्या २९ गोण्या आढळून आले. या गोंदाचे एकुण वजन ८ क्विंटल ७० किलो असून १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे आहे. तसेच चार चाकी वाहनाची किंमत २ लाख ५० हजार असे ऐकून ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनाळा परिक्षेत्र कार्यालयात अज्ञात आरोपीविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई वन्यजीवचे सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या नेतृत्वात वनपाल जि. टी. सोळंके, वनरक्षक एम. डी. गवळी, एस. आर. गलोले, के. एच. मोरे, वनमजूर अलीम केदार, नजीर पालकर यांनी केली आहे.

सरस्वती गावाजवळील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह..

0

 

 

लोणार/सतीश मुलंगे

दिनांक 4 मार्च लोणार तालुक्यातील सरस्वती या गावी कैलास आश्रुबा इंगोले वय 38 वर्षे राहणार सरस्वती हा मृतावस्थेत संजय दिनकर कराडे यांच्या शेतात आढळला.सविस्तर वृत्त असे की फिर्यादी साहेबराव इंगोले सरस्वती यांना कैलास इंगोले हे दिनकर कराडे यांच्या शेतात सकाळी सात वाजता मृतावस्थेत आढळले त्यांनी तात्काळ ही माहिती लोणार पोलीस स्टेशनला दिली ही माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सुरज काळे,गजानन सानप,विशाल धोंडगे सोबतच उप विभागीय अधिकारी निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली व प्रेत ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे पाठवले,पुढील तपास ठाणेदार प्रदीप ठाकूर यांच्या देखरेखीखाली पोलीस स्टेशन लोणार करत आहे.

रेवतकर शिवाजी महाराज वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

0

 

कारंजा (घा )/प्रतिनिधी

कारंजा (घा ):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य साथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कारंजा येथील पियुष रेवतकर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला .दृतीय हर्ष बागडे तर तृतीय क्रमांक सेलू येथील वैभव झाडे यांनी पटकावला .एकूण 56 स्पर्धकांनी भाग घेतला होता .स्वराज्य ,छत्रपती शिवाजी महाराज ,महाराजांच्या स्वप्नातील भारत या विषयावर स्पर्धा आयोजित केली होती .स्पर्धेचे प्रथम बक्षीस 5ooo हजार ,दृतीय 3000 हजार व तृतीय बक्षीस 2000 होते .दिनांक 5 मार्च 2022 ला स्पर्धा समन्वयक आणि संयोजन समितीचे वरून जयस्वाल यांनी आभासी पद्धतीने निकाल जाहीर केला .स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोहन ठाकरे ,अथर्व शिंदे यांनी सहकार्य केले .