Home Blog Page 323

प्रवेशद्वारावरील नावामुळे स्व.गजाननदादांचे कार्य कायम स्मरणात राहील – हभप तुकाराम महाराज

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

स्व.गजाननदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती “प्रवेशद्वार लोकार्पण” सोहळा
अर्जुन कराळे
शेगाव:बाजार समितीने उभारलेल्या प्रवेशद्वाराला स्व.गजाननदादा पाटील यांचे नाव दिल्याने याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला त्याने नेहमी स्मरण होत राहील व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल असे उदगार हभप तुकाराम महाराज इलोरा यांनी येथे काढले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व गजाननदादा पाटील प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा 3 मार्च रोजी
हभप तुकाराम महाराज यांचे शुभहस्ते फित कापून व नामफलकाचे अनावरनाने पार पडला.या कार्यक्रमाला सहकार नेते पांडुरंगदादा पाटील,काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाशबापू देशमुख,दयारामभाऊ वानखडे,माजी नगराध्यक्ष साहेबराव कलोरे,अरुण चांडक,काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील,शेगाव चे माजी नगराध्यक्ष अभयसिंह मोहता,शैलेंद्रदादा पाटील,शिवसेनेचे रमेश पाटील,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रघुनाथ भांबेरे,युवराज देशमुख,वंचितचे शहराध्यक्ष राजेंद्र शेगोकार,हमीद सेठ ,विठ्ठल गजाननदादा पाटील,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संजयसेठ टीबडेवाल, पं स चे बीडीओ सतीश देशमुख, सहाय्यक बिडीओ चव्हाण, यांच्यासह बाजार समितीचे सभापती शेषराव पहूरकार, उपसभापती पुंडलिक भिवटे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हभप तुकाराम महाराज व मान्यवरांचे हस्ते श्रीं चे प्रतिमपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रास्तविकात बाजार समितीचे कार्याचा थोडक्यात आढावा सचिव विलासराव पुंडकर यांनी सांगितला.यावेळी अरुण चांडक,दयारामभाऊ वानखडे,प्रकाशबापू देशमुख, व ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी स्व.गजाननदादाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक श्रीधरराव उन्हाळे,निलेश राठी,रामरतन पुंडकर,सुरेश पाटील कराळे,संचालिका सौ नंदाताई रमेश पाटील,श्रीमती पंचफुलाबाई जवंजाळ,खरेदी विक्री संघाचे संचालक,शेगाव शहर व तालुक्यातील शेतकरी बांधव ,अडते व्यापारी,हमाल मापारी,परिसरातील कृषी केंद्राचे संचालक आणि व्यवसायिक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी,प्रतिष्ठित नागरिक,खरेदी विक्रीचे व्यवस्थापक मनोहर ताठे, कर्मचारी प्रदीप ताथोड बाजार समिती कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस शहराध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन बाजार समितीचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर,लेखापाल विनोद पुंडकर, कुळकर्णीभाऊ व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अखेर चुंचाळे विकासोच्या निवडणूकीचा बिगुल वाजला ३ एप्रिल ला होणार निवडणूक

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)
विकी वानखेडे

 

तालुक्यातील चुंचाळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची सन २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून दि.३ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार आहे. मागील वर्षी कोरोना महामारीचा संसर्ग पाहता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून निवडणूक कार्यक्रम न घेता मागील कार्यकारिणीला संबंधित विभागाकडून वाढीव कालावधी देण्यात आलेला होता.त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. दि २ मार्च २०२२ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून तेरा जागांसाठी निवडणूक होणार आहे या संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वांची लक्ष वेधले गेले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणुका समिती नियम २०१४ चा (नियम १९)प्रमाणे राज्य सहकारी निवडणुक प्रधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडून विविध टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार दि.२ ते ८ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे तर दि.९ मार्च २०२२ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दि. १० मार्च २०२२ रोजी छाननी झालेल्या उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.त्याचप्रमाणे दि.१०/३/२०२२ ते दि. २४ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे त्यानंतर दि.२५ मार्च २०२२ रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.यानंतर
दि.३ एप्रिल २०२२ रोजी मतदान होऊन लागलीच मतमोजणी होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी पर्यंतचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय (यावल) येथे होणार आहे तर उर्वरित कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत नंतर जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २९७ सभासद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.बी.गाढे(सहकार अधिकारी) हे कामकाज पाहणार आहेत.
सदर निवडणूक ही १३ जागांसाठी होणार असून यात कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदारसंघ आठ ,महिला राखीव दोन , इमाव राखीव एक ,अनुसूचित जाती- जमाती राखीव एक तर विजा/भज व विमाप्र राखीव एक यानुसार उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे.
गेल्या कार्यकाळात या संस्थेवर शेतकरी पॅनलची सत्ता होती व त्यावेळीही निवडणुकी अगोदर बिनविरोध होण्यासाठी गावातून मोठे प्रयत्न झालेले होते.मात्र दुदैवाने त्या प्रयत्नांना अपयश आले होते.आता ही निवडणूक ही प्रत्यक्षात होणार की बिनविरोध होणार हे काळवेळ ठरवणार आहे तथापि संस्थेचे हित पाहता व गाव राजकीय मतभेदांपासून दुर रहावे व गावात ऐकोपा नांदवा याकरता यंदाची निवडणुकही बिनविरोध होण्याची नितांत गरज आहे.अशी गावात चर्चा आहे

ग्रामविकासातून राष्ट्राचा विकास साध्य होईल’ – आमदार दादाराव केचे 

0

 

नितिन मनवर आर्वी

आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते नेरी मिर्झापुर येथे विकासात्मक कामांचे भूमिपूजन संपन्न 

आर्वी तालुक्यातील नेरी मिर्झापुर येथे आमदार दादाराव केचे यांनी
महीला बचत गटाच्या उद्योगा करीता उद्योग भवन बांधकाम किंमत १४,८०,३६७ रूपये व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत बौद्ध विहार किंमत १० लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजने केली.

आमदार दादाराव केचे यांनी मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, नेरी मिर्झापुर ग्रामपंचायतचा नाविन्यपूर्ण विकास कामे करण्यात आघाडीवर आहे याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. महिलांचे सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले उत्पादनाची प्रदर्शनी तथा विक्री करण्यासाठी महिला उद्योग भवन निश्चितच उपयोगी ठरेल. त्यामुळे महिलांच्या गृहउद्योकांना चालना मिळेल. यातून महिलांचे सक्षमीकरण घडेल असा आशावाद व्यक्त केला. तसेच बौद्ध विहारामुळे बौद्ध धर्मियांच्या अनुयायांना धार्मिक व सामाजिक कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

यावेळी विनय डोळे, सचिंन्द्र उर्फ राजूभाऊ कदम, धर्मेंद्र राऊत, अशोकबाबू भट्टड, अशोक तुमडाम, माजी सरपंच पदमाताई मुंद्रे, बाळाभाऊ सोनटक्के, राजाभाऊ वानखेडे, रविन्द्र शिरभाते, निलेश देशमुख, अफसर खान, दत्तुजी लवनकर, सुधीर जाधव, रामू निघोट, रंगरावजी वाळके, त्रिशूल काळपांडे, नरेंद्र कोल्हे, प्रशांत कडू, बाबाराव जाधव, बाबारावजी नागदेवते, सुधीर जाधव, आशिष पाटील, विशाल अरसड, बंटी कोल्हे, मनीषभाऊ उभाड, उकंडराव भांगे, सविता कठाणे, लता दांडेकर, वैशाली सोनटक्के, जोती नासरे, विजया काळपांडे, शोभा वाटकर, शुभांगी तुमस्कर, सिमा तुमस्कर, शशिकला सोनटक्के, जयश्री भांगे, कल्पना कठाणे, ग्रामपंचायत कर्मचारी शामराव अट्टेल, प्रल्हाद ठाकरे, पद्माकर बनसोड, लीलाधर काळकर, सागर ठाकरे, निखिल खोंडे, रोशन राऊत यांच्यासह महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.

घुग्घुस येथील प्रा.आ.केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या तत्काळ उपलब्ध करून द्या

0

 

घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांची मागणी

( चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन महिन्यापासून मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नाही ही समस्या लक्षात घेत घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांनी शिष्टमंडळासह प्रा. आ. केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेतली व या संदर्भात चर्चा केली तसेच निवेदन देऊन प्रा.आ.केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या पन्नास हजारांच्या जवळपास आहे तसेच घुग्घुस येथील प्रा.आ. केंद्रास परिसरातील पंधरा गावे जोडलेली आहे त्यामुळे दररोज मोठया संख्येत गोर गरीब मधुमेहाचे रुग्ण प्रा. आ. केंद्रात तपासणी करिता येतात परंतु या केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने येणाऱ्या गोर गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मधुमेहाच्या रुग्णांना दररोज मधुमेहाच्या गोळ्यांचे सेवन करावे लागते त्यामुळे घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, पुष्पा रामटेके, वंदना मुळेवार, विना घोरपडे, वंदना गणफाडे, अर्चना लेंडे, नंदा चिमुरकर, अनिता परचाके, कांचन डांगे, सुनीता पाटील, सुनीता घिवे, दुर्गा जुमनाके, प्रतिमा बहादे, अंकिता बहादे, सुनंदा लिहीतकर व लता आवारी उपस्थित होत्या.

राष्ट्रवादी आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

आज गांधी भवन मुंबई येथे निलंगा मतदार संघाचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री. अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब या नेतृत्वाला प्रेरित होऊन निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.अजित माने , माजी नगराध्यक्ष श्री.हमीद शेख ,श्री विलास लोभे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चक्रधर शेळके, भाजपच्या महिला सरचिटणीस सौ. स्वाती जाधव व राष्ट्रवादी आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी मा.श्री.नानाभाऊ पटोले (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख(पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री),मा.ना.श्री.सूनिलजी केदार(पशु संवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री.अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी),मा.श्री.धीरज विलासराव देशमुख(आमदार,लातूर ग्रामीण), श्रीशैल्य उटगे आदी मान्यवर उपस्थित होते

तालुक्यातील हबर्डी येथील नबाब सूपडू तडवी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

0

 

यावल – प्रतिनिधी विकी वानखेडे

 

पंचायत यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एच. एन. तडवी यांचे वडील व पंचायत समितीचे ग्रामसेवक राजू अन्‍वर तडवी ग्रामसेवक यांचे आजोबा नबाब सुपडू तडवी (वय-७५) वर्ष यांचे वृद्धपकाळाने ४ मार्च रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा हंबर्डी तालुका यावल येथून त्यांच्या राहत्या घरापासुन दुपारी २ वाजता निघणार आहे. त्यांच्या मृत्यु पश्चात एक मुलगा, सुन, चार मुली, नातवंडे जावाई असा परिवार आहे.

फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल पंप जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असुन दोघांवरयावल ग्रामिण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे

यावल – फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळ पेट्रोल पंप आहे या पंपा जवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेला दुचाकी क्रमांक एम. एच. 15 बी. बी. 88 33 द्वारे छोटू एकलोसिंग बारेला वय 32 रा. रावेर हा यावल कडून फैजपूर कडे जात होता तर दुचाकी क्रमांक एम. एच. 39 एक्स. 0576 द्वारे अब्दुल हफिस अब्दुल हमीद वय 45 रा.मन्यार गली चोपडा हे फैजपूर कडून यावल कडे येत होते दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या दोघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावरून मार्गस्थ होणार साकळी येथील मेश इंडस्ट्रीचे मालक युनूस मन्सुरी व त्याचे मित्र मंडळींनी तातडीने दोघा गंभीर जखमींना उपचाराकरिता यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, अधिपरीचारिका दिपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर,मुराद तडवी,निरज झोपे,बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारूक तडवी,प्रविण बारी आदींनी प्रथमोपचार केले यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेवरून घटनास्थळावर हवालदार देविदास सुरदास, राजेश बऱ्हाटे, पोलीस नाईक महेंद्र महाजन यांनी भेट दिली दोघं वाहने त्यांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई पोलिस करीत आहे.

स्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा–प्राचार्य डॉ.विनित मत्ते यांचे प्रशिक्षणात प्रतिपादन.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण दोन दिवसीय जिल्हास्तर प्रशिक्षण,स्थळ:-DIET GADCHIROLI येथे दिनांक:-३ व ४ मार्च-२०२२ ला जिल्हास्तर सुलभक ज्ञानेश्वर कापगते(अहेरी) व विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते(चामोर्शी) यांचे मार्गदर्शनात घेण्यात येत आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितची रचना,गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समिती,बालकांचे हक्क व सुरक्षितता,निपुण भारत अभियान या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अधिव्याख्याता पुनित मातकर,प्रशिक्षणाचे सुलभक ज्ञानेश्वर कापगते व चांगदेव सोरते हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गिरडकर यांनी केले.
SMC ची कर्तव्य व जबाबदारी मध्ये शाळांच्या कामकाजावर संनियंत्रण,शासकिय योजनांची प्रभावी अंमलबजावणी,मुख्याध्यापक रजा व दिर्घ रजा शिफारस.पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहाय्य करणे या मार्गदर्शन केले.
शाळा ही समाजाने निर्माण केलेले संस्कार केंद्र आहे.गावचे शाळेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात.अनेक पिढ्यांना घडवणारी व सतत नवनवीन प्रयोग करणारी शाळा ही गावासाठी भूषण असते.तर शालेय विकासासाठी तत्पर असणारी शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेसाठी खूप मोठा आधार असतो.शालेय गुणवत्ता वाढवणे आणि टिकवणे ही जबाबदारी शाळेतील सर्व घटकांची असते तसेच शाळा व्यवस्थापन समितीची सुद्धा आहे.

शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका

0

 

कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर

कारंजा (घा ):-शिक्षण संस्थांना व शिक्षणाला धार्मिक रंग देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये ,अशी मागणी संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका कमिटीच्यावतीने करण्यात आली .कर्नाटकातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला .कारंजा शहरातील शासकीय विश्रामगृह कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला संभाजी ब्रिगेड चे स्थानीय नेते पियुष रेवतकर ,गौरव ढोले ,नितीन पाठे ,संभाजी ब्रिगेड कारंजा शहराध्यक्ष उमा राऊत ,सचिव गीता कळस्कर ,भाग्यश्री भगत ,मंजू मांडोकार व इतर संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका ,शिक्षणाचा कोणता धर्म नसतो ,कर्नाटकात घडलेल्या घटनेला संभाजी ब्रिगेड चा जाहीर विरोध आहे असे मत संभाजी ब्रिगेड चे स्थानीय नेते पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले .या बैठकीला इतरही विषयावर चर्चा करण्यात आली .

गळफास घेत संपविले जीवन

0

 

कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर .

कारंजा (घाडगे ):तालुक्यातील मोर्शी येथील 30 वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली .ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली .छत्रपती देविदास खवशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे .छत्रपती खवशी हा मागील बारा वर्षांपासून नागपूर येथे पत्नी व तीन मुलांसह राहत होता .घर बांधकामाचे काम करणारा छत्रपती हा अधूनमधून आपल्या मोर्शी या मूळ गावी यायचा .नुकताच त्याने नागपूर येथे एक भूखंड खरेदी केला .याच भूखंडाचे पैसे जुळत नसल्याने मागील काही दिवसांपासून तो विवंचनेत होता .अशातच मोर्शी येथे आलेल्या छत्रपती ने नारा मार्गावरील एआरसी पब्लिक स्कूल जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .याप्रकरणी कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून ,पुढील तपास सुरू आहे .