Home Blog Page 324

किराणा दुकानात वाइन विक्रीला विरोध (गुरुदेव सेवा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन)

0

 

कारंजा घाडगे /प्रतिनिधी :-पियुष रेवतकर

कारंजा :-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजा (घाडगे) च्या वतीने सोमवारी कारंजा (घा) तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी हिताचे कारण पुढे करून राज्याचा महसूल वाढवा म्हणून सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णया विरोधात गुरुदेव सेवकांनी रोष व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेव्श्वर महाराज अशा विविध संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी हाल अपेष्ठा सहन करून अभंग व किर्तनातून समाज प्रबोधन केले. तेव्हा महाराष्ट्र राज्याला व्यसन मुक्त राज्य करण्यासाठी तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखणे अपेक्षित होते. पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतूने व काही वाईनरीज मालकाच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी हिताचे कारण पुढे करून १०० चौ.फुटाचे सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीचा निर्णय महाराष्ट्र मंत्री मंडळाने (बैठक क्रमांक ९८) दिनांक २७ जानेवारी २०२२ ला घेतलेला आहे.
सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफल्य ग्रस्त तरुणाच्या हातात वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जाईल. ज्यामुळे समाजात गुंडप्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल. या निर्णयामुळे शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढून कायदा – सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजा (घाडगे) च्या वतीने किराणा दुकान व सुपर मार्केट मध्ये वाईन (मराठी अर्थ ‘दारू’) विक्रीला मंत्रिमंडळाने दिलेले मंजुरी तत्काळ थांबवावी, अशी विंनती करण्यात आली आहे. सदरचा निर्णय परत न घेतल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा, इशारा या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत देण्यात आलेला आहे.
यावेळी तालुका सेवाधिकारी बाबाराव बारई,माजी ग्रामसेवाधिकारी जानराव लोखंडे, भीमराव बाळापुरे, देविदास चौधरी,रविकांत गाडरे, सागर बारई, अमर जसुतकर, अझहर शेख, दर्शन जाधव, प्रिया काळे, नंदा जसुतकर, ज्योती यावले, प्रज्ञा ढोले उपस्थित होते.

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी जेसिआय अमरावती गोल्डन प्रिन्सेस चे कौतुक – मा. एकनाथ आव्हाड

0

 

उषा पानसरे असदपूर मू.का. सपादक मो.992140042

दिनांक 3 मार्च

दिनांक २७ फेबुवारी रोजी जेसिआय अमरावती गोल्डन प्रिन्सेस व कैवल्य एज्युकेशन फौंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शब्द गंगा आपल्या घरी …लेखक आपल्या दारी व राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शब्द गंगा आपल्या दारी या कार्यक्रमाला सकाळी १०. ३० वाजता सुरवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.एकनाथ आढाव ,सुप्रसिद्ध लेखक, कवी मुंबई यांना आमंत्रित करण्यात होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जेसी.सपना विधळे यांनी केले.जेसी. मा. दीपाली बाभुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. एकनाथ अढाव सरांची मुलाखत जेसी. मा. सपना विधळे यांनी सुरवात केली. त्यांचे बालपण कसे राहिले? त्यांच्या बालपणातील काही आठवणीना उजाळा देत केली, लेखनाचे वेड कसे लागले? त्यांनी लिहिलेली पुस्तके,कविता , त्याना मिळालेले पुरस्कार इत्यादी वर प्रकाश टाकत बहारदार चर्चा घडवून आणली. त्यांची भाषेवर असणारी पकड व अनुभवाचे बोल त्यांच्या मुलाखतीतून दिसत होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जेसी. डाॅ. स्वाती टोंगळे यांनी केले.

महापुरुषांचे विचार आत्मसात करून गुण्यागोविंदाने रहावे – भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ

0

 

लोणार/जगन पाटील

लोणार तालुक्यातील शिंदी या गावी मागील काही वर्षापासून दोन समाजातील जातीय तेढ निर्माण झाली होती त्यामध्ये अधुन मधून दोन समाजांमधील वाद नेहमीच होत असत 2009 पासून या वादाची ठिणगी पडली होती गावाच्या मध्यभागी असलेली सहा गुंठे जागा या वादाचा प्रमुख मुद्दा आहे या सहा गुंठे जागा वर जागेवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सदरील जागाही महामानवांच्या स्मारकासाठी आरक्षित करून ठेवली होती परंतु गावातील मराठा समाजाने यावर आक्षेप घेतला आणि सदरील जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आहे या दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहातून सदरील दोन समाजातील वाद हा पेटला होता या वादाच्या पोलीस स्टेशन ते न्यायालय असा या वादाचा प्रवास पूर्ण झालेला असतानाही हा वाद मिटवण्याचे नाव घेत नव्हता‌.
शेवटी दोन्ही समाजातील नेत्यांनी हा वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी व हितासाठी दोन जाती मधला वाद हा योग्य नाही त्या अनुषंगाने या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस प्रशासन नेतेमंडळी पंचायत समिती या सर्वांच्या पुढाकाराने हा वाद मिटविण्यात आला व शेवटी 70 टक्के जागा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तर उर्वरित 30 टक्के जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी अशी विभागणी केली गेली गावकऱ्यांच्या दृष्टीने हा वाद संपविण्यात आला.दोन महापुरुषांच्या स्मारकासाठी वाद न घालता त्यांचे विचार आत्मसात करून गुण्यागोविंदाने राहून गावाचा विकास करावा.
हा वाद मिटवीसाठी प्रमुख्याने भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.बळीरामजी मापारी,कृषी उत्पन्न बाजार �

नवाब नव्हे, हा तर दाऊदचा गुलाम; त्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारवर दबाव..संभाजीराव पाटील निलंगेकर

0

 

लातूर /निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात मात्र, कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम आहे.
ईडीच्या आरोपपत्रातंतून हे आता स्पष्ट होत असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार त्या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. निलंगेकर म्हणाले, सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे. नवाब मलिकने केलेला व्यवहार हा त्या षडयंत्राचाच एक भाग होता, हे ईडीच्या आरोपावरून स्पष्ट होत असून पुढील तपासात आणखीही काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
असे असतानाही, नवाब मलिक याचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकास संरक्षण देत आहेत, असा आरोपही निलंगेकर यांनी केला. संपूर्ण ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय, असा सवाल करतांनाच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, असेही निलंगकेर म्हणाले.
नवाब मलिक यास वाचविण्याकरिता आणि सत्ता टिकविण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करत असून देशद्रोह्याची तरफदारी करत आहोत, याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे. आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखविण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याएवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा सल्लाही निलंगेकर यांनी ठाकरे सरकारला दिला.

हणमंतवाडी मुगाव येथे हमी भावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ.. !

0

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी मुगाव येथील रानबण ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासनाने हरभऱ्याला ठरवून दिलेल्या 5230 प्रमाणे हरभरा खरेदीचा शुभारंभ पत्रकार राजकुमार सोनी निटुरकर यांच्या हस्ते दि. 1 मार्च 2022 रोजी पहिल्या पोत्याचे पुजन करून व नारळ फोडून करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात रानबन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दासराव पाटील यांच्यासह नाफेड च्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. रानबन कंपनीकडे हरभरा विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन केले असून ऑनलाईन केलेल्या अनुक्रमे शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाणार आहे. निटूर परिसर व निलंगा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम रानबन कंपनी ने केले असून या हमीभाव खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

यावेळी कुमार पाटील, सोनेराव जाधव, विठ्ठल मोगरगे, संदिपान कावळे, युवराज पाटील, प्रताप झरे, दिगंबर सावंत, महमद गस्ते, सिध्देश्वर सोमवंशी, विजय जाधव, खुदबुदिन शेख, विठ्ठल कावळे, हणमंत माने, दत्ता शिरमाळे, तुकाराम घारोळे, हंसराज पाटील, शाहुराज पाटील, योगेश कावळे, व्यंकट कावळे, उमाकांत देशमुख, हणमंत पाटील, विठ्ठल जाधव, रामकिशन जाधव, तुकाराम बोरोळे व पत्रकार नामदेव तेलंगे, माधवराव शिंदे, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी आदीसह मसलगा, मुगाव, हणमंतवाडी, आंबेगाव, अंबुलगा मेन, गौर, ताजपुर, शेंद व निटुर येथील हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केली समीरच्या शस्त्रक्रियेस 14 लाखाची मदत

0

 

प्रहार रुग्ण सेवा समिती, मुंबई आली धाऊन,उमेश खापरे यांचा पुढाकार.

कारंजा( घा) :-प्रतिनिधी :पियुष रेवतकर.

कारंजा: तालुक्यातील परसोडी येथील मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा चालविणारे नामदेव कामडी यांचा मुलगा समीर ४ ते ५ वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होता त्यास नागपूर येथे उपचारार्थ भर्ती केले असता डॉक्टरांनी ९ ते १० लाख रुपये खर्च सांगितला परंतू येवढा मोठा पैसा कुठून आणणार. त्यावेळी त्यांना कोणत्याही योजनेची माहिती नव्हती किंवा कोणी सांगितली नाही आणि तो कोणत्याही योजनेत बसत नव्हता करीता समीरला गावी परत आणण्यात आले.
परंतु समीरला या आजाराचा खूपच त्रास वाढला, ही बाब गावातील माजी सरपंच श्री. दशरथजी पठाडे यांना माहीत पडताच त्यांनी प्रहारचे उमेश खापरे (प्रहार अपंग क्रांती आंदोलन, उपाध्यक्ष वर्धा जिल्हा) यांच्या कानावर टाकली उमेश खापरे यांनी लगेच बच्चुभाऊ कडू यांचेशी संपर्क साधून वरील बाब सांगितली भाऊंनी लगेच मुंबईला जा मी सर्व बघतो असे सांगितले. समीरला मुंबई येथील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये भरती करुन समिरवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याचा खर्च १४ लाख रुपये आला असून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
समिरकरीता प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रतापभाऊ तायडे तसेच गोपालभाऊ सुळे, वैभव कर्डीकर, उमेश खापरे हे धाऊन आले.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू तसेच प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई हे देवाच्या रुपात येऊन माझा मुलगा समीर कामडी वय १८ वर्ष यास पाठीच्या मणक्याच्या आजार होता आजारावरील उपचाराचा खर्च लाखोच्या घरात असल्यामुळे जो मला कधीच शक्य झाला नसता पण ते बच्चुभाऊ कडु मुळे
शक्य झाले उपचारासाठी प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई अध्यक्ष मा. प्रतापभाऊ तायडे आणि गोपाळभाऊ सुळे, वैभव कर्डीकर, उमेश खापरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

राजकीय नेत्यांच्या चमकोगिरीत चिमुकल्याचा जीव धोक्यात ?

0

 

प्लस पोलिओ राबविणाऱ्यावर कारवाईची मागणी

(घुग्घुस प्रतिनिधी)
रमेश सुध्दाला

घुग्घुस: शहरात नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहे.
निवडणूकिचा लाभ घेण्यासाठी राजकिय पक्षाचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवीत आहे.
अश्यातच गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट राजकीय पक्षाचे नेते हे शासकीय योजना अथवा खाजगी उद्योग किंवा त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा श्रेय घेण्यासाठी तळफळत असल्याचे दिसून येत आहे.
घुग्गूस नगरपरिषदेत आग लागली असतांना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या हातातून पाण्याचा बंब घेवून हे स्वतःच चमकोगिरी करत असल्याचे दिसले होते.
परत त्या घटनेची पुनरावृत्ती वेकोली वसाहतीत लागलेल्या आगीत यांनी केले.
आता तर हद्दच झाली प्लस पोलियो अभियानात वैद्यकीय अधिकारी परिचारिका यांच्या कडून पोलियो ड्रॉप घेऊन लहान – लहान मुलांना कुठल्याही प्रकारे मास्क अथवा सुरक्षितपणा न बाळगता यांनी आपली चमकोगिरी दाखवून चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केला आहे.
यांच्या राजकिय चमकोगिरीत सहकार्य करणाऱ्या परिचारिका व सहकार्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांत तर्फे होत आहे.

घुग्घुस रेल्वे क्रॉसिंग येथे बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलीया जवळ दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करा

0

 

यंग चांदा ब्रिगेड तर्फे प्रेम गंगाधरे यांची मागणी

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आर .के. कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे घुग्गुस येथे रेल्वे क्रॉसिंग जवळ फुलीयाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने तेथील अवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहतूककिना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व वारंवार वाहतूक कळंबोली जाते. तसेच वाहतुकीमुळे या ठिकाणी अपघात सुद्धा गळत आहे.

 

व बांधकाम करण्याचे मटेरियल सुद्धा खूप जास्त प्रमाणात येत असून. त्याची पाहणी करण्याकरिता सिक्युरिटी गार्ड नसल्याने ट्रॅफिक जाम निर्माण होत आहे. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपण आर. के. कंपनी कन्स्ट्रक्शन तर्फे त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी गार्ड उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी यंग चांदा ब्रिगेड तर्फे करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याचे माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे( प्रेम गंगाधरे, राजू नातर, मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

सूर्या मराठी न्यूज रमेश सुध्दाला घुग्घुस)

मराठी आरक्षणाचा प्रश्न पेटला..संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठींबा देत मंत्र्यांचा ताफा अडवल

0

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मराठा मावळा अजित अमित जाधव याने ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण नितीन राऊत साहेबांनी निवेदन न घेता मार्गस्थ झाले.
लोकशाही च्या मार्गाने व कोरोना प्रोटोकॉल पालन करून सुद्दा बाळ मराठा मावळ्या चे निवेदन न स्वीकारणाऱ्या मंत्र्यांचा जाहीर निषेध
यावेळी अमित वसंतराव जाधव,गणेश जाधव यांची उपस्थिती होती.

पत्नीकडुन अपमानास्पद वागणुक मिळत असल्याच्या कारणावरून पतीने केला लाकडी दांडाने खुन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे सायंकाळी घडली. खून करणारा संशयित पती हा स्वत:हून पोलीसात जमा झाला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) रा. थोरगव्हाण ता. यावल जि.जळगाव ह्या पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे घरात प्रकार पाटील आणि पत्नी इंदूबाई पाटील हे दोन्ही एकटेच होते.सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पती पत्नी यांच्या कौटूबिक कारणावरून तीव्र वाद झाला. यात संतापाच्या भरात प्रकाश पाटील यांनी पत्नी इंदूबाई पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकला. यात इंदूबाई पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेजारच्यानी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी पती प्रकाश पाटील याने खून केल्यानंतर स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.

 

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत संशयित आरोपी पती प्रकाश पांडूरंग पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पती, दोन मुले आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस करीत आहे.