Home Blog Page 327

चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावा या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे आरोग्य व शिक्षण सभापती पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन करून सुरुवात

0

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

अखेर तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंत रस्त्याच्या जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या निधीतुन रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामास आजपासून सुरूवात करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव हा सुमारे चार किलो मिटरच्या मार्गावरील रस्त्याची मागील काही दिवसापासुन ठीकठिकाणी मोठमोठे सोड्डे निर्माण होवुन अत्यंत दयानिय अवस्था झाली होती . यावेळी या रस्त्याच्या झालेल्या बिकट अवस्थेकडे वेळी वेळी ग्रामस्थानी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते तर भिम आर्मी या सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन राज्य सचिव सुपडु संदाशिव, रमाकांत तायडे, डोली श्रीकांत वानखेडे यांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते.

यावेळी आंदोलनक्रर्त्यांना जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ) यांनी रस्त्याच्या कामास आपण करू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचा शब्द पाळीत अखेर आज १४ लाख रुपये निधीतील डांबरीकरण रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन व कुदळ मारून करण्यात आले.

या प्रसंगी भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , गावाचे माजी.सरपंच.नितिन राजपुत , देवचंद कोळी, चंद्रकांत तेली, प्रेमराज चौधरी, दिपक वानखेडे, सुधीर चौधरी, भिमआर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव,रमाकांत तायडे, नंदन तायडे, करण ठाकरे, संदीप वानखेडे, शिवाजी गजरे यांच्यासह कॉन्ट्रक्टर चेतन आर पाटील यांच्यासह चुंचाळे व बोराळे गावातील ग्रामस्थ प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते. रस्त्याच्या उर्वरीत भागाची देखील तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई बॉम्ब खटल्यातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या साथीदार सोबत व्यावसायिक संबंध – लोकेश राठी

0

 

बुलढाणा- महाराष्ट्र राज्यातील सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यवहार करुन राज्याशी गद्दारी केली त्या प्रकरणात अटक झाली. अशा या मंत्र्यांना राज्यमंत्री मंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना निष्कासित करावे या करीता माजी मंत्री, विद्यमान आमदार डॉ श्री संजुभाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली वरवट बकाल येथे निर्देशन केले यावेळी तालुका अध्यक्ष लोकेश राठी, श्री पांडुरंग हागे, राजुभाऊ ठाकरे, गजानन भाऊ दाणे, ज्ञानदेव भारसाकळे जि प सदस्य, डॉ. गणेश दातिर जिल्हा सदस्य, तालुका सरचिटणीस प्रमोद गोसावी,संजुभाऊ उमाळे,सुभाषभाऊ हागे, प्रकाश पाटील, श्रीकृष्ण भालतिडक, सुनिल दातार,शाम आकोटकार, युवा मोर्चा अध्यक्ष, गुणवंत खोडके,निलेश टिकणार, सुधिर लव्हाळे,गणेश गोतमारे,नरसिम्हा पिंजरकार, वासुदेव सडतकार, अविनाश धर्माळ,यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस यांनी आंदोलकांना अटक केली.

पाळधी येथील महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी युवासेनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन

0

 

उषा पानसरे मू,का, संपादक मो.9921400542 असदपूर

दि.२३/ फेब्रूवारी
जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील पाळधी ता.जामनेर येथील नाचणखेडा चौफुली येथे नवीन महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणावरुन शाळेचे विद्यार्थी आणि अनेक ग्रामस्थांचा वावर आहे आणि वेगात येणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग पार करतांना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खुद्द शिक्षक महामार्गवर उभे राहुन विद्यार्थ्यांना सहकार्य करतात.
हा धोका लक्षात घेता आणि रोजच होत असणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी पाळधी येथील नाचणखेडा चौफुली आणि जुणे बस स्थानक परिसरात गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १५-२० दिवसांनंतर संपूर्ण गाव व परिसरात मिळुन आंदोलन पुकारण्यात येईल यासंबंधीचे निवेदन शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने अपर जिल्हा अधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले.
प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील,शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया,युवा तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव,ग्रा.पं.सदस्य आसिफ पठाण, राष्ट्रवादी पदवीधर सेलचेप्रदेश चिटणीस संदिप पाटील हे उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

वाघोदा येथे एका तरूण विवाहीत शेतकऱ्यांने पाटचारी जवळ केली गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वाघोदा येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाने पाटचारी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे बुधवार (ता.२३) सायंकाळी उघडकीस आली. सदरच्या मयत विवाहीत तरुणाचे नाव जगदीश हिरामण पाटील (वय३५) असे आहे. त्याने मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यावल तालुक्यातील वाघोदा येथील जगदीश हिरामण पाटील या तरुणाने सकाळी शेती कामाला जात आहे असे सांगून घरून निघून गेला होता. जगदीश हा सायंकाळ झाली तरी घरी परत आला नसल्याने तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या वतीने शोधाशोध केली असता साकळी शेती शिवारातून मार्गस्थ होणाऱ्या पाटचारी जवळ जगदीश पाटील हा झाडाला गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलीस पाटील अशोक पाटील, वाघोदाचे माजी पोलीस पाटील प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाटील, जळगावचे मधुकर पाटीलसह मयताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. मयताने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. त्यात त्याने मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येत कोणाचाही काहीही संबंध नाही असा उल्लेख केला आहे. तरी कोणाला त्रास होईल असे वागू नये ही विनंती. असे मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. या तरुणाच्या अशा आत्महत्येमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गाडगे महाराज जयंती साजरी

0

 

अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच संत गाडगेबाबांचे ध्येय- सौ. किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात श्रीसंत योगी गजानन महाराज प्रगट दिन व थोर संत, समाज सुधारक गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत गजानन महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच संत गाडगेबाबा यांचे ध्येय होते त्यांच्या एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडक असायचे ते जिथे जात असत तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम करायचे त्यांनी समाजाला शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
यावेळी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, पियुष भोंगळे, आचल कांबळे, जया हस्ते, सविता ठाकरे, संगीता जेऊरकर, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, भारती परते, स्वाती गंगाधरे, उमेश दडमल, दुर्गा साहू, लता आवारी, स्नेहा कुम्मरवार उपस्थित होते.

शिवणी लख गावातील सर्व महिला गावातील दारू बंद करण्याचा निर्णय घेतला 

0

 

 

किल्लरी पोलीस ठाण्यात त्यांनी आपला निवेदन दिले। आणि आज सकाळी दारूच्या दुकानाची झडती घेती आणि दारू पकडली ।
गावातील सर्व महिलेचा माता मुले झाले ।
अनिता मोरे माया जमादार गीता शिंदे आशय सर्वं महिलांनी खप दिवस पासून। निर्णय घेतला आणि आज ते सर्व एकत्र येऊन दारू बंद केली ।गवती सर्व महिला नी। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तरी पण। दारू बबंद झाली नाही ।शेवटी महिलांनी दारू बंद करण्याचा निर्णय घेतल्या

उपोषणकर्त्यांच्या जिवीताला धोका झाल्यास प्रशासन जबाबदार – ऋषिकेश म्हस्के

0

 

रस्त्यासाठी गांगलगाववासीयांचे तिसऱ्या दिवशी उपाषण सुरूच
चिखली : गांगलगाव ते कोलारा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी मागील २१ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण गांगलगाव येथील नागरीकांनी सुरू केले आहे . उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून प्रत्यक्ष कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी गावकऱ्यांनी भूमिका आहे . चिखली मेहकर राज्य महामार्ग ५४८ सी ला जोडरस्ता असलेल्या गांगलगाव कोलारा हा जोडरस्ता आहे . सदर रस्ता हा गांगलगाव गावठाण जवळील २७० मीटर रस्ताला पांदण रस्त्याला लागून झाडे झुडपे असल्यामुळे या रस्त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे . पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होवून गावकऱ्यांना त्रासदायक ठरतो . विशेष म्हणजे येथे सेंट्रल बँक असून बँकेत कामकाजा निमित्त येणाऱ्या ग्राहकांना तसेच शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून येतांना प्रचंड त्रास होत आहे . मागील ५५ वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न कायम प्रलंबीत आहे . यापूर्वी याच रस्त्याचा प्रश्न विधीमंडळात सुध्दा गाजला होता . मात्र अजूनही या रस्त्याच्या रुंदीकणाचा व मजबुतीकरणाचा मुहर्त प्रशासनाला सापडला नाही . शेवटी या रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग पत्कारला आहे . २१ फेब्रुवारी पासुन गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे . दररोज या उपोषण मंडपात उपोषणकर्त्यांची संख्या वाढत आहे . याबाबद जिल्हाधिकारी व तहसीलदार चिखली यांना वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही . दरम्यान रस्त्याकामला सुरूवात होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी मागे न हटण्याची भूमिका घेतल्याने हे उपोषण चिघळत आहे . सध्या गावकऱ्यांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक गणेश म्हस्के , नितीन म्हस्के , गजेंद्र म्हस्के , राजेंद्र म्हस्के व ऋऋषिकेश म्हस्के , प्रल्हाद म्हस्के , सुनील म्हस्के यासह सुमारे २०० च्या वर ग्रामस्थ उपोषण करीत आहेत .
——————-कोट———
गांगलगाव ते कोलारा या रस्त्यासाठी गांगलगाव वासियांनी मागील तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही . आता प्रशासनाने उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये , अन्यथा गावकऱ्यांच्या या मागणीसाठी आपण लोकशाहीच्या मार्गाने पुन्हा तिव्र आंदोलन करू –ऋषीकेश बबनराव म्हस्के सामाजिक कार्यकर्ते , गांगलगाव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी मिळवून दिला शेतकऱ्यांना न्याय

0

 

लोणार/जगन पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या विरोधात लोणार तालुका कृषी कार्यालयात ठीय्या आंदोलना दखल केले त्याची दखल घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा 2021 चा खरीप हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी, शेतकऱ्यांसह दिनांक 6 जानेवारी रोजी लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते,तरी आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्याचे रिलायन्स कृषी विमा कंपनीच्या वतीने एका पत्राद्वारे सहदेव लाड यांना कळविण्यात आले आहे,
यावर्षी झालेल्या संततधार पावसामुळे संबंध शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पिक विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ होत होती तरी लोणार तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नव्हता अशा काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासोबत संपर्क साधला यावेळी सहदेव लाड यांनी त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन लोणार तालुका कृषी कार्यालय मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती आंदोलनावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या वरिष्ठांनी सोबत चर्चा करून आम्हाला थोड्या दिवसाचा अवधी द्यावा अशी विनंती केली होती तरी विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन सहदेव लाड यांनी त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे घेतले होते तरी आंदोलनामध्ये सह

वेकोलीने घेतली काँग्रेसच्या आंदोलनाची दखल

0

 

न्यू रेल्वे सायडिंग प्रदूषण नियंत्रणा करिता वेकोलीतर्फे उपाययोजना करा:राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्गूस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : वेकोलीच्या न्यू रेल्वे सायडिंगलाच लागून शालिकराम ही लोकवस्ती आहे.
सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशा गाडीयाच्या माध्यमातून येत असतो व याठिकाणी कोळश्याची साठवणूक होऊन ती रेल्वे द्वारे इतरत्र पाठविण्यात येते
यामुळे याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कोळश्याची धूळ निर्माण होते व या धुळीमूळे परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
ही धूळ नियंत्रणा करिता 24 तास वॉटर टँकरने पाणी मारण्यात यावे, सायडिंग परिसरात सर्पिक्लर लावण्यात यावे विंडशीट लावण्यात यावे, सरंक्षक भिंत निर्माण करण्यात यावे यासह अन्य मागण्यांना घेवुन 22 फेब्रुवारी रोजी राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज रेल्वे सायडिंगवर वेकोलोचे सब एरिया मॅनेजर फुल्लारे, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व नागरिक यांची सामूहिक चर्चा होऊन समस्या निकाली निघाली असून वेकोलीने नागरिका समक्ष
संपूर्ण मागण्या मान्य केल्या
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, सुकुमार गुंडेट्टी,रोशन दंतालवार,रोहित डाकूर, विजय माटला,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,बालकिशन कुळसंगे,राजू शेट्टी, व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कुठं दडलय शाळेचे बांधकाम।विद्यार्थ्यांसह पालकांचा उपोषणाचा इशारा।

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

गोळेगाव
शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळेच्या एक वर्ग खोली चे भूमिपूजन 31 डिसेंम्बर 2021रोजी होऊनसुद्धा अद्यापही बांधकाम चालू झाले नसल्याने गावकरी व पालकांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी शाळेला कुलूप ठोकले आणि शाळेत विद्यार्थी पाठवणे बंद केले परंतु अद्याप कसलाही निर्णय न झाल्याने पालकांनी आज दिनांक 22,02,2022 रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शेगाव यांना निवेदन देऊन सात दिवसात शाळा बांधकाम चालू न झाल्यास सात दिवसानंतर कोणत्याही क्षणी विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात दिले आहे ,तसेच सदर निवेदनाच्या प्रतीलीपी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शेगाव, माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जि प बुलढाणा, माननीय शिक्षण अधिकारी जि प बुलढाणा ,पोलिस स्टेशन शेगाव शहर, जिप सदस्य राजाभाऊ भोजने, पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव पाटील, आदिना निवेदनाच्या प्रती दिल्या ।
सदर खोलीचे बांधकाम मंजुरात होऊन भूमिपूजन होऊन सुद्धा काम का चालू होत नाही हे काम कुठे दडलंय यामध्ये कोणाचे राजकारण असू शकते का असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे गोळेगाव बुद्रुक येथील दोन खोल्या शिकस्त झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वर्गात प्रवेश करावा लागतो सदर गंभीर प्रश्नाबाबत मुख्याध्यापक एस एस पिलात्रे यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून कागदोपत्री शिकस्त खोलांच्या बाबतीत नवीन इमारत बांधण्याकरिता कागदोपत्री माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहे परंतु संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गेल्या तीन चार वर्षापासून येथील जि प शाळेकडे दुर्लक्षच असल्याने आता पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी आपल्या पाल्यासह उपोषणाचा इशारा दिला आहे। शाळेला कुलूप ठोकण्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात येथील गटशिक्षणाधिकारी आणि त्यांचे सहकारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळेत आले असता पालकांनी व गावकऱ्यांनी शाळेचा व्यथेचा पाळा त्यांच्यासमोर मांडला शाळेच्या दोन्ही खोल्या अतिशय शिकस्त झालेले आहेत ,मुत्रीघर ,स्वच्छालय पडक्या अवस्थेत आहे, शाळेला कंपाउंड नाही, लाईट अभावी ई-लर्निंग बंद आहे ,अंगणवाडी सुद्धा पडली पडली आहे ,ती दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीत भरत आहे, भाडे न मिळाल्याने ती सुद्धा आज रोजी बंद आहे असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्या कडे सांगितल्यानंतर त्यांनी तुमचे प्रश्न रास्त असल्याचे सांगून तुमच्या गावातील शाळे संबंधित समस्या मी लवकरच सोडणार असल्याचे सांगितले तसेच सदर खोली बांधकाम हे गोळेगाव बुद्रुक ऐवजी गोळेगाव खुर्द झाल्याने सदर काम रखडले असल्याचे सांगितले आणि सदर कामाचा प्रस्ताव दुरुस्त करून लवकरच खोली बांधकाम करू असे आश्वासन दिले परंतु पालकांना आश्वासनामुळे समाधान न झाल्याने त्यांनी सदर बांधकाम लवकर चालू होण्याकरता उपोषणाचा पवित्रा घेतला आहे।सदर निवेदनावर शाळा समिती अध्यक्ष, पालक वर्ग आणि गावातील नागरिकांच्या सह्या आहेत,
शासनाने संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेऊन गोळेगाव बुद्रुक येथील शाळा बांधकाम त्वरित चालू करावे आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी गावकऱ्यांची शासनाला ओरड आहेसहाय्यक गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शेगाव यांना निवेदन देतांना पालक