Home Blog Page 329

यावल येथे डीवायएसपीच्या पथकाने केली अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; यावल पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डंपरचालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनगावकडून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार शरद शिंदे, पोलीस नाईक अल्ताफ अली आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांचे असे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास यावल शहराजवळील फॉरेस्ट नाका जवळ नाका-बंदी केली. त्यावेळी किनगावकडून यावलकडे जाणारा डंपर येतांना दिसून आला. त्यात चोरटी वाहतूक करतांना दिसून आले. त्यांची चौकशी केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे (वय-३२) रा. ममुराबाद ता. जि.जळगाव आणि डंपर मालक संदीप आधार साळुंखे रा. कोळन्हावी ता. यावल या दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन चव्हाण करीत आहे.

शिवाज्ञा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ! भव्य शिवजयंती महोत्सव जाहीर व्याख्यानात

0

 

उषा पानसरे मू.का, संपादक मो.9921400542 असदपूर

शिव जयती निमीत्य शिवाज्ञा प्रतिष्ठान महाराष्ट राज्य द्रारा आयोजित भव्य शिव जयंती मोहत्सव त्या निमीत्याने जाहीर व्याख्याञ!
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना अर्चना ताई पखान होत्या तर कार्यक्रमाचा अध्यक्षा सौ ममता येवूतकर सरपच होत्या
प्रमुख उपस्थिती महात्मा फुले ब्रिगेडचे स्वप्नीलभाऊ बोबडे,
श्री कोयल साहेब.(ठाणेदार आसेगाव)
पोलीस पाटील विनोद माहोरे,
शिवाज्ञा प्रतिष्ठान चे अध्यक्ष

पवन ताथोड, प्रथमेश झोले,राहुल ताथोड,चेतन उपासे ,ऋषिकेश भोपत, गणेश निबोकर ,आशिष पचारे, नितीन येवले,ऋषिकेश चराटे, रोहित ताथोड, गोपाल ढोके यांनी या कार्यक्रमात शिव विचार माडले पेरण्याची नवीन आदर्श समाजा पुढे ठेवण्यासाठी जी धडपड केली त्यांच्या प्रयत्नाला
कार्यक्रमात शोभा वाढवली संचलन आणि आभार प्रदर्शन देवानंदभाऊ भूस्कट यांनी केले.तसेच अनेक चिमूकले मावळ्याच्या वेश भूषत सह भागी होतू न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर अमरावती

घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी तर्फे कुष्ठरोगी बांधवाला आर्थिक मदद

0

 

निराधार योजनेसाठी गृहकर भरण्यास दिली मदद

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : येथील आंबेडकर नगर निवासी मारोती मुकुंदा हस्ते हे वयोवृद्ध नागरिक कुष्ठरोगी असून निराधार आहेत.
शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अर्ज दाखल करावयास रहिवासी दाखल्याची नितांत गरज होती.
मात्र गृहकर भरल्याशिवाय नगरपालिका गृहकर पावती देण्यास नकार देत होते.
अनेक वर्षाची थक्कबाकी असल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुकुंदा कर भरण्यास असमर्थ होते.
त्यांनी आपली समस्या काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी याना सांगितली असता त्यांनी तातळीने गृहकराची रक्कम दिली.
व शक्य त्या मददतीचे आश्वासन दिले
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतालवार,कुमार रुद्रारप,नबी शेख,कपिल गोगला, अंकुश सपाटे,संजय कोवे,बालकिशन कुळसंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वर्ष न वर्ष मृत्युचा सापळा असणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी…. मा.बाबुराव चांदेरे

0

 

मुळशी तालुक्यातील सुसगाव येतील स्मशान भूमी लागतचा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी माननीय नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे यांचा प्रयत्नांना यश आले असून काम जोरात चालू आहे तसेच आप्पा स्वतः तेथे दिवसभर उभे असतात कुटल्याच प्रकारचा अडथळा कामात येऊ नये असा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज कित्येक वर्ष हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. रस्ता अपुरा असल्या कारणाने नेहमी ॲक्सीडेन्ट होत होते. कुटलेच पक्ष असो अथवा कार्यकर्ते कोणीच त्याची दक्षता घेतली नव्हती. पण आप्पांनी ग्रामस्थांचा विचार करत त्या रस्त्याचा कामाला नारळ फोडला.. त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी महिला प्रतिनिधी पूनम ताई विधाते, राष्ट्रवादीचे प्रामाणिक नेतृत्व सुषमा ताम्हाणे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.वंदना गोपीनाथ चांदेरे, सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता अमित खांडेकर,आदी महिला वर्ग उपस्थित होता

प्रतिनिधी…..

सरकारचा अंकुश नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक : संभाजी निलंगेकर

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस.पिंगळे

राष्ट्रवादीचे रिमोट कंन्ट्रोल असल्यामुळे कारखानदारांची मक्तेदारी वाढली असून राज्य सरकारचा कोणताही अंकुश नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रविवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत केला. शिवाय मन्नथपूर (ता.निलंगा) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाची पाहणीही त्यांनी यावेळी केली. निलंगेकर म्हणाले की, सध्या जिल्ह्यासह तालुक्यातील शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून १६ महिने झाले तरी कारखाने ऊस घेऊन जात नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेने त्रस्त आहेत. शिल्लक ऊस राहिल्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत आहे. ऊसाला अधिक महिने झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कारखानदार मोठ्या प्रमाणात विक्रमी गाळप केले म्हणून सत्कार स्वीकारत आहेत. पारितोषिक घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिला म्हणजे कारखानदारांनी गेटकेनचा ऊस कमी भावात उचलला आहे. म्हणूनच आजही लातूर जिल्ह्यात ८० टक्के ऊस शिल्लक आहे. मराठवाड्यात उसाची परिस्थिती गंभीर झाली आहे. या शिल्लक ऊसाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी निलंगेकर यांनी केली. राज्य सरकारने ऊसाला दिलेल्या भावाची व अधिक महिने होऊनही ऊस उचल केला जात नाही. याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातील तफावत मधील रक्कम सरकारने अदा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपचे सरकार असताना राज्यात तूर पिकाचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे बाजारातील भाव कमी झाले. यावेळी शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम त्यावेळी राज्य शासनाने अदा केली होती.
त्याप्रमाणे ऊसाची एफआरपीची तफावत रक्कम राज्य शासनाने अदा करावी याबाबत आपण अर्थसंकल्पीय आधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरत असून ११ किंवा १२ महिने झालेल्या ऊसाची उचल करण्याची जबाबदारी कारखानदारांची आहे. मात्र दीडा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही ऊसाची उचल केली जात नाही. यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिवाय मन्नथपूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट फडावर जाऊन निलंगेकर यांनी व्यथा जाणून घेतल्या.

यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते झाले शिवरायांसमोर नतमस्तक आमदार किशोर जोरगेवार यांनी केली शिवरायांना मानवंदना

0

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवरायासमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले.
आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवरायांना माल्यार्पण करीत महराजांना अभिवादन केले. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, रयतेच्या मनातील सुराज्य स्थापन करणारे शिवराय हे जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक होते. त्यांच्या राज्यात जनता सुखावह होती. सर्व धर्मांना समान न्याय ही त्यांच्या राज्य कारभाराची विशेषता होती. त्यामुळेच आज ३९२ वर्षांनंतरही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, विलास वनकर, सायली येरणे, कौसर खान, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, माला पेंदाम, वैशाली मेश्राम, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, गौरव जोरगेवार, नकुल वासमवार, विश्वजित शाहा, आनंद रणशूर, तापोष डे, राम जंगम, दत्तू गवळी, रुपेश पांडेय, कल्पना शिंदे आदिंची उपस्थिती होती.

शिवजयंती दिनी काँग्रेसतर्फे मोदींचा जाहीर निषेध

0

 

देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत मोदींना पाठीविले पत्र

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रामूळे देशभरात कोरोना पसरला असा बिनबुडाचा व महाराष्ट्रद्रोही वक्तव्य केले.
सदर आरोप हे महाराष्ट्राचे बदनामी करणारे असल्याने प्रांताध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या सूचनेनुसार घुग्गूस काँग्रेस तर्फे पंतप्रधानांचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हजारो पत्र पाठवून मोदींनी महाराष्ट्राची जाहीर माफी मांगावी अशी मागणी केली.
फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजप पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हेतुपूर्वक महाराष्ट्राची बदनामी केली.
कुठल्याही प्रकारे विचार न करता
देशभरात लॉकडाऊन लावला यामुळे नागरिकांची कोंडी झाली
नागरिक रस्त्यावर उघडे पडले संकटाच्या या काळात काँग्रेस ही जनतेच्या मदती करिता रस्त्यावर उतरली आणि हेच कार्य काँग्रेस नेहमीच करीत राहील आपण आपल्या नेत्याला महाराष्ट्राची माफी मागून आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास बाध्य करावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीचा
अपमान मोदींनी केला आहे
आपण या पापाचे प्रायश्चित्त करावे असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर,किशोर बोबडे,अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर, इर्शाद कुरेशी,स्टीवन गुंडेटी, श्रीहरी शेंगारप,सुकुमार गुंडेटी,सौ.पुष्पा नक्षिणे,सौ.सरिता गौरकार,सरस्वती कोवे,सौ.दीपा बोकडे,लखन हिकरे,विजय माटला,देव भंडारी,रमेश रुद्रारप,कुमार रुद्रारप,विशाल लोणगाडगे,सुमेश रंगारी,सचिन कोंडावार,संजय कोवे,सुनील पाटील,सचिन नागपुरे,सुमेश रंगारी,अय्यूब कुरेशी,साहिल सैय्यद, शेरी कुम्मरवार,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे

0

 

कार्यकारी संपादक। विकी वानखेडे

भुसावळ शहरातील बहुचर्चित आणि बहु प्रतिक्षित अश्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ‘ वंचित’ तर्फेशिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्यांच्या सर्वधर्म समभाव,सहिष्णुता,आणि जन कल्याणासाठी ओळखले जातात .ज्यांनी आपल्या ‘ गनिमी काव्याने ‘ रयतेचे राज्य निर्माण केले. उभा महाराष्ट्र ज्यांच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतो. “लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे ” अशी भावना जन सामन्यात निर्माण झाली अश्या महान राज्याच्या पुतळ्याचा प्रश्न गेली पंधरा वीस वर्षे भिजत ठेवत पूर्णाकृती पुतळा ‘ वंचित ‘ ठेवला गेला आहे.शहरात पंधरा वीस वर्षात नवीन बगीचे, उद्यान निर्माण केले गेले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला नाही हे विशेष.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी रयतेच्या राज्याच्या पूर्णाकृती पुतळा उभारला जावा म्हणून सतत पाठपुरावा सुरू केला. बाजार पेठ पो स्टे जवळील प्रस्तावित जागेवर शिवरायाचा भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे अशी पालकमंत्र्यांच्या ताफा अडवून मागणी केली होती.
आज सदर जागेवर वंचीतचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सदर कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक,कामगार सरचिटणीस बालाजी पठाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा उपाध्यक्ष आशाताई सोनवणे,बंटी सोनवणे,निलेश जाधव, जिल्हा संघटक अरुण तायडे,महीला आघाडी जिल्हा संघटक शोभाताई सोनवणे,तालुका सचिव गणेश इंगळे, रुपेश कुऱ्हाडे, सुनिल ठाकूर, भुसावळ शहर उपाध्यक्ष अतुल पाटील,सुनील पाटिल, सागर खरात, जिल्हा उपाध्यक्षा मीराताई वानखेडे, मीनाताई भालेराव, संगीताताई तायडे, भारतीताई इंगळे,कुणाल सुरडकर, विजय मालविय,स्वप्नील सोनवणे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास मराठा समाज अध्यक्ष किरण पाटिल, संविधान आर्मीचे जगनभाई सोनवणे,भीम आर्मी भा ए मि जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, राकेश बग्गन,एड.तुषार पाटिल,मा.प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मा.प्रभारी नगराध्यक्ष राजू नाटकर, माजी नगरसेवक ललित मराठे, भरत परदेशी, छावाचे कृष्णा शिंदे, संजय शिंदे ,भीम आर्मी सं र द जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश महाजन, सोनी ठाकूर, महेन्द्र पाटिल ,सुनील सोनवणे मेजर, प्रमोद शिरसाठ आदी सह राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न हाती घेतल्या बद्दल कौतुक केले.

मनवेल आदीवासी आश्रमशाळेच्या वतीने सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

0

यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल येथील कै. सदाजी नाना प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत भारतीय सैन्य दलातून हवालदार , रेडीओ ऑपरेटर म्हणून १८ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले व मनवेल येथील रहिवाशी असलेले जवान ईश्वर भागवत पाटील यांचा मनवेल आश्रमशाळेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . मनवेल येथील आयोजीत सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बी. एल. देशमुख यांनी भूषविले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवान ईश्वर पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मनोगतातून जवान ईश्वर पाटील यांनी देशसेवेच्या भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव केला . शाळेतील विदयार्थ्यांना सैन्य दलात जायचे असल्यास आपण अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल असे सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी भारताची गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली .
कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव मीराताई पाटील , खजिनदार अ‍ॅडव्होकेट ललित पाटील , सभासद देविदास पाटील , मंगलराव पाटील , शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे , माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , अधीक्षक वसंत पाटील , अधिक्षिका सरीता तडवी यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राकेश महाजन तर आभार विजय चव्हाण यांनी मानले .

माझा राजाला दगडाच्या मंदीराची गरज नाही ?अब्जवधी लोकांचा ह्रदयात अधिराज्य गाजवनारा छत्रपती शिवाजी !

0

 

उषा पानसरे मूख्य का. सपादीका मो.9921400542 असदपूर!

दिनांक 19 फ्रेब्रूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या मानाचा मूजरा 19 फेब्रूवारी ला शिवाजी राजे यांची जयती मोठ्या धाटात उषा पानसरे संपादक पत्रकार याचा घरात मोठ्या थाटात एक मनात जिद्द ठेवून हिन्दू ,व मूसलिम भाई दोघे ही एक होवून शिव जयंती चा कार्यक्रमाची जिद्द पूर्ण सर्व प्रथम जिजाऊ माता,सावित्रीबाई फूले याचा प्रतिमेला हार अर्पण केले जिजा माते ने या देशाला शिवाजी दिला तर सावित्रीबाई नी मूलींना शिक्षण देवून त्याना नारी शत्ती काय आहे याचा अर्थ स्त्री समजावला छत्रपती शिवाजी महाराज च्या प्रतिमेला हार पूष्प अर्पण करुण जयंती साजरी करण्यात आली तसेच या कार्यक्रामा निमीत्य माजी पोलीस पाटील सजंय भूयार याना उषा पानसरे यांनी पूष्प गूंच्छ देवून संत्कार करण्यात आला या वेळी या कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील सजंय भूयार ,अली हेप्ल ग्रूप चे अध्यक्ष अलिम शेख पूर्णा नगर दिलीप भावु पोटे ,सजंय कपाटे , शाहपूर ग्राम पंचायत सस्दस्स सचिन नितनवरे वडगाव त्याची पत्नी गोलू काळे ,अनिल साबळे ,सागर पानसरे! हमिदूआ खान ,ठेकेदार रहेमखान , काली सूबान खान ,सापीकखान, अरूण काळे कंटोल वाले गूलाबराव भूक्सट साबिर उल्ला खान अमन खान प्रतिक बारबूद्दे ईफान पठान पिकी पानसरे बेबीताई दूर्ण अनेक जन उपस्थित होते शिव जयती आज पहील्यादाच दोन धर्म हिन्दू मूसलिम या दोन धर्म मिळून साजरी केली ही एकता आज या एक महीलानी करून दाखविली आहे उषा पानसरे च्या ,दोन वळी माझा राजाला दगडाच्या मंदीराची गरज नाही , रोज पूजाव लागत नाही बोग ही लागत नाही नवस बोलावा लागत नाही माजा राजेला सोण्या चांदीचा साज सूध्दा चढावा लागत नाही तरी सूध्द अंब्जवधी लोकांच ह्रदयात अधिराज्य गाजवतात हा यूग महा पूरूष ना जातीचे ना धर्माचे छत्रपती शिवाजी राजे रयतेचे