Home Blog Page 331

यावल तालुक्यातील अतिक्रमीत जागा व दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी अंतर्गत झालेल्या गोंधळा विषयी निळे निशानची निदर्शने

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल पंचायत समिती अंतर्गत शासनाकडुन मिळणाऱ्या वंचीत गरजु लोकांच्या विविध समस्या तसेच तालुक्यात अनेक कुटुंब ही आज ही अतिक्रमीत जागेत आपत्या कुंटुबास वास्तव्यास असुन त्यांची अतिक्रमीत घरे कायम गाव नमुना ८ला लावुन त्यांना घरकुलांचे लाभ देण्यात यावे तसेच दलीत वस्ती सुधार योजनांचा निधीचा तालुक्यात मोठया प्रमाणावर गैर उपयोग होत असल्याच्या व विकास कामात होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधात आज यावल पंचायत समिती समोर निळे निशान या सामाजीक संस्थेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंनद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय निर्दशने करण्यात आली, गटविकास अधिकारी यांनी येत्या आठ दिवसात सदरच्या मागण्याकडे लक्ष देवुन समस्या न सोडविल्यास या ठीकाणी पुनश्च मोठया प्रमाणावर आंदोलन करण्यात येइल असा ईशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला असुन , याप्रसंगी निळे निशान संस्थेच्या नियोजन विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश तायडे, सामाजीक व रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे , जिल्हा नियोजन उपप्रमुख सदाशिवनिकम, जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , फैजपुर विभागाचे अध्यक्ष भगवान आढाळे, तालुका अध्यक्ष विलास भास्कर तालुका उपाध्यक्ष अब्दुल सलाम , युवकचे तालुका अध्यक्ष विशाल तायडे , प्रमोद पारधे , सुभाष तायडे , गणेश भालेराव , लक्ष्मीताई मेढे यांच्यासह मोठ्या संख्येत महीला व कार्यकर्ता याप्रसंगी उस्थित होते, संस्थेच्या वतीने पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मागण्या संदर्भातील विविध योजनांची सद्य स्थिती ची माहीती त्यांनी दिली व प्रशासनाच्या वतीने योग्य तो निर्णय घेण्यात येवुन समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .

स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

0

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात महत्वपुर्ण योगदान देणारे विकासपुरुष, काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय घेणार द्रष्टा राजकारणी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा अखेरपर्यंत जपणारे निष्ठावंत नेतृत्व, सर्वच क्षेत्रात आपल्या नैतिकतेचा दबदबा निर्माण केलेले नैतिकतेचे महामेरु स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या संकुलात संपन्न झाला. स्व.निलंगेकर यांनी महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना करुन तळागाळातल्या लोकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहंचवली त्याच शिक्षण समितीच्या प्रांगणात स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारकाचे भूमिपूजन झाले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी स्व.डॉ. निलंगेकर यांच्या पत्नी सुशिलाबाई पाटील निलंगेकर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. शरदराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे चिटणीस अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अरुण डावळे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. सर्वेश पाटील निलंगेकर, संगिताताई अशोकराव पाटील निलंगेकर, वृषालीताई विजय पाटील निलंगेकर, व सर्व कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. भूमिपूजन समारंभ स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. स्मारक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भागवत पौळ, सचिव दिलीपराव धुमाळ, सदस्य प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, मुख्याध्यापक मोहन नटवे, मुख्याध्यापक गुंडादेव पाठक, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गोरे, डॉ. भास्कर गायकवाड, शिला देशमुख, सय्यद आदींनी परिश्रम घेतले. यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघातील प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महाराष्ट्र शिक्षण समितीतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकळी येथे आदिवासी अविवाहीत युवकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील ‘साकळी’ येथे २१ वर्षीय आदीवासी अविवाहीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, ” मोहमंद इसा तडवी रा.साकळी, ता.यावल जि.जळगाव या २१ वर्षीय युवकाने आज गुरुवार, दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘साकळी’ येथील आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी वडील इसा तडवी हे मजुरीसाठी कामानिमित्त शेतात गेले होते. ते घरी आल्यावर त्यांना मोहमंद इसा तडवी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस स्टेशनचे सफौ युनस तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. या युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी मयताचे वडील ईसा अन्वर तडवी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहेत. यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

हद्दवाढ कृती समितीने घातला मनपाला घेराव

0

 

वर्षा मोरे अकोला

अकोला – हद्दवाढ कृती समिती च्या वतीने मनपाला घेराव आंदोलनात महापालिकेची महासभा सूरु असतांना कृती समितीचे पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्विकारुन चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेता व सर्व विरोधी पक्ष नगरसेवकांनी सभा काही वेळा साठी तहकूब करून महापौर व आयुक्तांना मागणी केली,ही पालिकेतील ऐतिहासिक बाब होती.

त्यानुसार कृती समितीच्या शिष्टमंडळाशी महापौर व आयुक्तांनी चर्चा करताना पाणी कर हा चूकीच्या पध्दतीने आकारला असुन त्याची देयके पुर्वीच्या १८०० प्रतीवर्ष या प्रमाणे देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व संपत्ती करा बाबतीत पुन्हा नव्याने फेर आढावा घेवून कर आकारणी करण्याचे आश्वशित केले.वरील बाबी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा यावेळी देण्यात आला व तात्पुरते आंदोलन स्थगित केले.

या आंदोलनात जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे, नगरसेवक मंगेश काळे, प्रमोद मुरूमकार, राजेश वगारे, डॉ. प्रविण पाटील, प्रदिप वखारिया, वसीम भाई, प्रविण खाडे, हरिभाऊ वाघमारे, गोपाल शिंदे, श्रीकांत पिंजरकर, नंदू कनोजा, छोटू पाटील, अजय शेळके, डॉ. प्रकाश गोंड, प्रविण वाहुरवाघ, विशाल कपले, दिपक गावंडे आदी सह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारा

0

 

भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

गुरुवार 17 फेब्रुवारीला घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांची कार्यालयात भेट घेतली व या विषयावर चर्चा केली तसेच निवेदन देऊन मागणी केली आहे.
घुग्घुस नगर परिषदेचे निर्मिती झाली असून लवकरच नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे नवनिर्मित घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने घुग्घुस शहराची लोकसंख्या मोठी आहे. घुग्घुस शहर वासियांच्या मनात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आदराचे स्थान आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हा नगर परिषदेमध्ये भेद देणाऱ्या सर्वांना नवीन ऊर्जा प्रदान करेल तसेच शासन कर्त्यांना सुद्धा आपले कर्तव्य बजावतांना व निर्णय घेतांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालया समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, सिनू इसारप, शरद गेडाम, सतीश कामतवार, पियुष भोंगळे उपस्थित होते.

असदपुर येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

0

 

उषा पानसरे मूख्य.का. संपादक मो,9921400542
असदपूर!

अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील नरेंद्र येऊतकर यांच्या निवासस्थानी चर्मकार समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असदपूर ग्रामपंचायत सरपंच सौ.ममताताई येऊतकर या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आकाश देऊळकर सामाजिक कार्यकर्ते अ.कलाम शे.हसन हे होते. यावेळी संत रविदास महाराज यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून सर्व समाज बांधवांनी अभिवादन केले. यावेळी दीपक तायडे,प्रमोद चांगोले,विशाल चांगोले, संजय सावळे गिरीश चापके,निलेश चापके आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

लग्न जुळत नसल्याचे नैराश्यातून स्वतःला जाळून गेली आत्महत्या, पळशी खुर्द येथील घटना

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

खामगांव : तालुक्यातील पळशी खुर्द येथील २७ वर्षीय युवकाने लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत खामगाव ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळशी खुर्द येथील रहिवासी महेंद्र नामदेव बेलसरे वय २७ वर्ष या युवकाचे लग्न जुळत नसल्याच्या कारणावरून नैराश्यातून त्याने पळशी खुर्द येथे बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव येथील गणेश नगरमध्ये राहणारे धनंजय गोविंदा शेंडे वय ४३ वर्षे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता तक्रार दिली असून पोलिसांनी कलम १७४ सीआरपीसी नुसार मर्ग दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव हे करीत आहेत.

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ची नोंदणी २८ फेब्रुवारीपर्यंत करावी: तहसीलदार सैपन नदाफ

0

 

सतीश मुलंगे लोणार प्रतिनिधि

पीक पाहणी मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे . महसूल विभागाचा ई – पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे . सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्यवाही सुरु आहे . रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई – पीक पाहणी चे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे . सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे . रबी हंगामाच्या प्रत्यक्ष ई – पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी हि अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती . राज्याच्या काही भागात कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकर्यांना आपली पीक पाहणी पूर्ण करता आली नाही याचा विचार करून जमाबंदी आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्थरीय अंमलबजावणी समितीच्या दिनांक १५ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत , ई – पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे शेतकरी स्तरावरील पिक पाहणीची कालमर्यादा १५ फेब्रुवारी वरून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी रबी हंगाम २०२२ ची पीक पाहणी वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत ई – पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे आपली पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार सैपन नदाफ यांनी १६ फेब्रुवारी रोजी केले आहे.

तांबोळा येथे संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

0

 

जगन मोरे लोणार

तांबाळा येथील समाज बांधवांकडून श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली संत रविदास महाराज यांची शिकवण ही तत्कालीन समाज व्यवस्थेतील तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा,जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा,अशीच विचारधारा,मानवतावाद, बंधुत्ववादी विचार प्रिय होते.अश्या या महान संताची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तांबोळा येथील संत रोहिदास महाराज मित्र मंडळ अध्यक्ष आकाश सरसरे,उपाध्यक्ष अमोल सरसरे,सदस्य समाधान सरसरे,भगीरथ सरसरे,राहुल सरसरे,सिताराम सरसरे,रोहिदास सरसरे,नितीन सरसरे,विजय सरसरे,संतोष सरसरे,सुमित सरसरे
यांनी ग्रामपंचायतला संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली,यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रवि राठोड,ग्रामपंचायत सदस्य उध्दव आटोळे, प्रकाश जाधव,गणेश सरसरे,समाधान सरसरे, विठ्ठल खरात,राहुल मोरे विकास सरसरे,बाबुलाल सरसरे,गजानन सरसरे इतर गावकरी मंडळी हजर होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जा च्या आर्थिक नुसकानास कारणीभुत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत तक्रार दाखल,,

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शासनाच्या अन्नधान्य वाहन पावतीचा सेस बुडवून स्वतःचा आर्थिक फायदा करून कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आर्थिक नुसकानाला कारणीभूत असलेल्या कर्मचार्यांची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत अनिल शंकर इंगळे यांच्या कडून जिल्हा निबंधक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय जळगाव जामोद येथे तक्रार करण्यात आली,,
सदरचे प्रकरण असे की
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद येथे मुख्य प्रशासक,प्रशासक व सचिव यांच्या संगतमातीने मोठ्या भांडवल व्यापाऱ्यांकडून अन्नधान्य वाहन पावतीचा सेस चुकवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत व कर्त्यव्यास कसूर करून आर्थिक नुसकानाला कारणीभूत ठरत कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद चे मोठ्या प्रमाणात नुसकान केले आहे आणि करत राहतील.
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद अंतर्गत मोठ्या प्रमाणात मालाची आवाक असून अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचा नियमाप्रमाणे सेस न आकारता काही प्रमाणात सूट देऊन आर्थिक फायदा करून घेत आहेत,सर्रासपणे जो जास्त आर्थिक लाभ प्रशासक यांना करून देतील त्यांचे वाहने विना सेस ची सोडल्या जातात,अश्या कर्त्याव्यास कसूर कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आर्थिक दृष्टिकोनातून न्याय व हितासाठी योग्य आहे.संबधित तक्रार प्रकरणातील सर्व प्रकारचे ऑडिओ क्लिप स्वरूपातील पुरावे माझ्याकडे असून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे,,