Home Blog Page 332

लोणार सरोवर परिसरातील शेतातील कोरड्या विहिरीत आढळला बिबट

0

 

जगन मोरे लोणार प्रतिनिधि

जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवरच्या चारही बाजूने घनदाट वृक्ष असल्याने लोणार सरोवरास लोणार अभयारण्य दर्जा प्राप्त असून सदरील अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी वास्तवास असून लोणार अभयारण्य मधील एक बिबट लोणार सरोवराच्या काठावरील नगर सेवक गुलाब सरदार यांच्या शेताजवळील एका कोरड्या अंदाजे २० फुट असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याने सदर बिबट्या याने डरकाळी मारल्या मुळे त्याचा आवाज एकूण शेजारील शेतातील नगर सेवक गुलाब सरदार यांनी कोरड्या विहिरी जवळ येवून पाहणी केली असता सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान कोरड्या विहिरीत एक बिबट्या असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी सदर बाब ही वनविभागातील अधिकारी यांना कळवताच वनविभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी येवून पाहणी करून बुलडाणा येथील रेस्कू टीमला एका कोरड्या विहिरीत वन्यप्राणी बिबट पडला असल्याबाबत कळविताच रेस्कू टीम यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन बिबट्यास काढण्या करीता रिस्कू करून सीडीच्या द्वारे बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेवेळेस बिबट्या याने सिडीद्वारे विहिरीच्या बाहेर येवून पळ काढला. अश्या प्रकारे वनविभागाच्या बुलडाणा येथील रिस्कू टीमने एका बिबट याचे सुखरूप प्राण वाचविले आहे. सदर बिबट्या पाहण्या करीता लोणार शहरातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी यांनी गर्दी केली असून गर्दीमुळे तेथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. त्यासाठी लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप ठाकूर हे घटनास्थळी त्यांचा पोलीस बांधवासह उपस्थित होते. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रत्यक्षस्थळी येवून पाहणी केली. बुलडाणा रेस्कू टीम मध्ये समाधान मांटे वनरक्षक, प्रविण सोनुने, पवन वाघ, सागर भोसले, दिपक गायकवाड, संदीप माळवी वाहन चालक तसेच लोणार येथील रेंजर पी. डी. सावळे, आर.एफ.ओ. सुशांत पाटील, कायंदे वनपाल, चौधरी वनरक्षक, विणकर वनरक्षक, वाहन चालक पवार या वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने अखेर दुपारी २.३० वाजेदरम्यान बिबट बाहेर काढण्यास यश मिळविले. यादरम्यान बिबट हा साडेचार घंटे कोरड्या विहिरीत असून सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे तिथे उपस्थितांनी वनविभाग कर्मचारी यांचे आभार मानले.

सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल याचा संत्कार उषा पानसरे याचा हस्ते

0

 

उषा पानसरे असदपूर मूख्य का. संपादक मो.9921400542 अमरावती

आसेगांव पुर्णा पोलीस स्टेशन नविन ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल आसेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 1/2/2022 रोजी आपले पदभार साभाळले असदपूर शाहपूर रंगारवासनी तील गरिब आम नागरिक नविन ठाणेदार आल्या मूळे अतिशय खूश ठाणेदार मिलन कोयल याचा संत्कार प्रेस संपादक पत्रकार सेवा सघ महाराष्ट राज्य च्या महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी शाल पूंष्पू गूंच्छ देवून संत्कार केला त्यावेळी आसेगाव पोलीस मनिष , काटोकर राहूल, गोरखेर अमीत मूळे मोहन टोनके संतोष मोरे ललिता मॅडम संतोष लहाने ईतर पोलीस कर्मचारी हजर होते तसेच रंगारवासनी शाहापूर येथिल दिलीप भावू पोटे संजय कपाटे , विकी पानसरे ,निलेश झोले अलीम शेख झोले उपस्थित होते

घुग्घूस कॉ.न.२ बैरम बाबा देवस्थानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा : राजु रेड्डी

0

 

काँग्रेसची (Wcl) वेकोली प्रशासनाला मागणी

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : शहराचे आराध्य कुल दैवत बैरम बाबा यांचे देवस्थान कॉलरी नंबर 2 येथे असून याठिकाणी जिल्ह्या भरातून भाविक – भक्त दर्शनासाठी येतात
नवस फेडतात व स्वयंपाक करतात.
मात्र याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागतो.
याठिकाणी वेकोलीच्या सि.एच.पी येथून एक पाईप लाईनच्या माध्यमातून नळ घेण्यात आले होते.
मात्र सदर कनेक्शन तुटल्याने हे नळ बंद झाले असून सदर पाईपलाईन तातळीने दुरुस्त करून नळ चालू करावे अशी वेकोली सब एरिया फुल्लारे यांना निवेदनातुन काँग्रेस तर्फे मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिष्टमंडळात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,विशाल मादर,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी,बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,सचिन कोंडावार,सुनील पाटील,आरिफ शेख,रफिक शेख,रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस महाराष्ट्र उत्तर भारतीय प्रदेश सचिव पदी ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती

0

 

काँग्रेस कार्यलयात शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

( चंद्रपूर घुग्गूस) प्रतिनिधि
रमेश सुध्दाला

घुग्गूस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अंतर्गत कार्यरत उत्तर भारतीय सेल तर्फे मुंबई येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ब्रिजेश सिंग यांना उत्तर भारतीय प्रदेश सचिव पदावर नियुक्ती करण्यात आले.
सिंग यांच्या घुग्गूस आगमना निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अजय पाटील, शैलेंद्र वनकर, यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,विजय माटला,सुकुमार गुंडेटी,बालकिशन कुळसंगे,कपिल गोगला,आरिफ शेख,सुनील पाटील, रफिक शेख,संजय कोवे, कुमार रुद्रारप,प्रदीप आसेकर,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे
व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मुख्याध्यापक शिवाजी पांढरे यांचा सपत्नीक शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

 

(लातूर /निलंगा)प्रतिनिधी
डी एस पिंगळे

महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द झाल्यापासून सबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली असून याच धर्तीवर अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे याचाच भाग म्हणून आज निलंगा येथे धानोरा गावचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पांढरे यांनी सपत्नीक शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली .
आज निलंगा येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य तालुकाप्रमुख अविनाश रेशमे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शहर संघटक हरिभाऊ सगरे महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी उपशहर प्रमुख शाहूराज फट्टे महिला शहर संघटिका दैवता सगर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मौजे धानोरा गावचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पांढरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सविता शिवाजी पांढरे यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून शिवसेनेच्या नेतृत्वा सोबत शिवसेनेच्या विचाराने पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे वचन दिले.

पुलवामा शहिदांना काँग्रेसने वाहिली श्रद्धांजली

0

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर जाणाऱ्या भारतीय सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर दाहशतवाद्यांन तर्फे आत्मघाती हल्ला करण्यात आला यात सी.आर.पी.एफचे जवळपास 45 जवान शहीद झाले हा दहशतवादी हल्ला पुलवामा जिल्ह्यात करण्यात आला होता.
आज शहर काँग्रेस कमेटी तर्फे पुलवामा हल्ल्यातील जवानांना पुष्पगुच्छ व मेणबत्ती अर्पण करूम श्रद्धांजली वाहण्यात आले.
“शहिद जवान अमर रहे” च्या घोषणा देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, उत्तर प्रदेश सेल सचिव ब्रिजेश सिंग,अजय पाटील, शैलेंद्र वनकर,तिरुपती महाकाली,रोशन दंतालवार,विशाल मादर,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,विजय माटला,आरिफ शेख,रफिक शेख,संजय कोवे,सुनील पाटील,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,विशाल लोनगाडगे,सचिन गोखरे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले . नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

0

 

 

तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले. त्वरीत लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतू ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत आहे. मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

 

या निवेदनावर लता कोळी, विमल तडवी, ज्योती कोळी, मंगला धर्माधिकारी, सुनंदा मराठे, अर्चना धनगर, शोभा गोसावी, कस्तूरबा कोळी, सुभद्रा कोळी, सुकदेव मराठे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मी गढीवाला नाही वाडेवाला आहे; अशोकराव पाटील निलंगेकरांचे देशमुखांना आव्हान?

0

 

(लातूर/निलंगा) प्रतिनिधी
डी.एस.पिंगळे

कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा खरा वारसदार मीच असून त्यांची स्वप्नपूर्ती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या जयंती निमित्ताने दिली.
जिल्हा काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर मी गढीवाला नाही, पण वाडेवाला आहे;असा टोला देखील त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना नाव न घेता लगावला.
लातूर जिल्ह्यात पक्षातंर्गत निर्णय, नियुक्त्या निलंगेकर यांना विश्वासात न घेता परस्पर केल्या जात असल्यामुळे ते सध्या नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत कार्यपद्धतीचे गाऱ्हाणे देखील मांडले. त्यानंतर सोशल मिडियावर अशोकराव पाटील निलंगेकरांचा वाडा आणि बाभुळगावच्या गढीच्या वादाची चर्चा रंगू लागली आहे.
सध्या निलंगा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अंतर्गत धुसफुशीची जोरदार चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांच्या काळात काॅंग्रेसमध्ये कायम दबदबा होता. श्रेष्ठीसह सर्वच स्तरावर त्यांना विचारल्याशिवाय कुठलेच निर्य घेतले जात नव्हते. पण कालांतराने निलंगेकरांच्या वाड्याचे महत्व कमी होऊन आता बाभुळगांवच्या वाड्याचे महत्व वाढल्याचे जिल्ह्यातील अनेक घटना घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय वारसा प्रदेश सरचिटणीस असलेले अशोकराव पाटील निलंगेकर हे चालवत असल्याचे बोलले जाते. मात्र जिल्ह्याच्या काँग्रेसकडून त्यांना नवा पर्याय निर्माण करण्याच्या हालचाली पक्षातंर्गत विरोधकांकडून सुरू आहेत. मतदार संघातील बहूतांश निर्णय त्यांना विश्वासात न घेता होत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्यामुळे आगामी जिल्हापरिषद व नगरपालीका निवडणुकांमध्ये उमेदवारी देतांना मोठ्या प्रमाणात गटबाजी होऊ शकते. हे टाळण्यासाठी निलंगेकर समर्थक एकवटले आहेत. त्यातच कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीदिनी अशोक पाटील निलंगेकर यांनी माध्यमासमोर जनता ऐऱ्या-गैऱ्या लोकांना भीक घालत नाही, जे काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात उघड लढले, येथे येऊन चुकीचे विष पेरले त्यांना कधीही माफ करणार नसल्याचे सांगत निशाणा साधला.
मी काँग्रेसचा महाराष्ट्र सरचिटणीस आहे पण जिल्हाध्यक्ष मात्र जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकरत असल्याचा आरोपही केला. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. मात्र हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हे जातीयतेचे विष पेरण्याचे काम करत आहेत. निलंगा विधानसभा मतदार संघातील जनता असल्या गोष्टीला थारा देत नाहीत.
कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आज जरी हयात नसले तरी त्यांची शिकवण ही जातीयवादाला खतपाणी घालणारी नव्हती. कधीही शिवाजीराव निलंगेकर यांनी जातियवाद केला नाही व कोणाला करू दिला नाही, असे सांगत जिल्हाध्यक्षांकडून होत असलेल्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली. यामुळे आता यापुढे देशमुख व निलंगेकर यांच्यातील संघर्ष अधिकच वाढणार असे दिसते.
गढी विरोधात वाडा असेच चित्र लातूर जिल्ह्यात सध्या निर्माण झाले असून याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,महापालिकाव नगरपालिका निवडणूकीतून दिसून येणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

जगदीश कवडीवाले यांची राज्यस्तरीय ‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या यावल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली

0

 

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शिवसेनेचे शहर प्रमुख व सोने चांदीचे सराफा व्यापारी जगदीश कवडीवाले यांची नुकतीच राज्यस्तरीय ‘गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन’च्या यावल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यावल शहरातील सोने चांदी व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव व यावल शहरातील अनेक बँकाचे सोने तारण व्हॅल्यूएशनचा अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिशनचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के, संघटक भैय्या भामरे यांच्या सयुंक्तिक स्वाक्षरीने जारी नियुक्ती पत्राद्वारे जगदीश रत्नाकर कवडीवाले यांची निवड करण्यात आली आहे. सर्व सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

न्हावीच्या एका तरुणास तीन तलवारींसह अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाई सर्वत्र एकच खळबळ

0

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणा-या तरुणास न्हावी तालुका यावल या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची ही कारवाई दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे .
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ जवळील यावल तालुक्यातील अकलूद या गावा जवळील एका हॉटेल जवळून गावठी कट्टा हस्तगत करण्यात यश मिळवले असता , त्यानंतर न्हावी गावातुन एका तरुणाकडे या तलवारी मिळून आल्याची कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .
न्हावी गावातील वाणीवाडा भागातील रहिवासी केतन मधुकर पाटील याच्या कब्जातून पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन तलवारी पोलीसांकडुन हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरचा तरूण हा तलवारीच्या धाकावर तो गावात व परिसरत दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे. कॉ. महेश महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय चौधरी यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. पथकाने केतन पाटील याचा शोध घेतल्यावर नंतर तो मिळवून आल्यावर त्यास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. केतन पाटील यास पुढील कारवाईसाठी त्याला फैजपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर व कॉन्स्टेबल राजेश बराटे हे करीत आहे