Home Blog Page 334

हिंगणघाट न्यायालयाचा पहिलाच ऐतिहासिक निर्णय विक्की उर्फ विकेश नगराळेला आजन्म कारावासाची शिक्षा

0

 

अंकिता जळीत हत्याकांड

अनिलसिंग चव्हाण, विकी वानखेड़े  प्रतिनिधि

हिंगणघाट-संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर बी भागवत यांनी आज या प्रकरणात काल दोषी ठरविलेला आरोपी विकी उर्फ विकेश नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रु दंड ठोठावला आहे.
आज सायनकाली 5 वाजता न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणात आपला निर्णय जाहीर केला.या निर्णयाची माहिती विशेष सरकारी वकील एड उज्वल निकम यांनी न्यायालयाचे बाहेर येऊन प्रसार माध्यमाना दिली.
दरम्यान आज सकाळी 11 वाजता न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात झाली.त्यांनंतर विशेष सरकारी वकील एड उजवल निकम यांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी जोर देऊन मच्छी सिंग विरुद्ध पंजाब सरकार व बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार या मागील निर्णयाचा दाखल देत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी विंनती केली.
आरोपीचे वकील एड भुपेंद्र सोने यांनी यावेळी युक्तिवाद करतांना दावा केला की खरा गुन्हेगार हा मोकाट फिरत असून एका निर्दोष युवकाला दोषी ठरविण्यात येत आहे.त्यामुळे सदर प्रकरणी या अभियुक्ताला शिक्षा देतांना सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती न्यायालयासमोर केली.
या दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण घेतल्या नन्तर जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश राहुल भागवत यांनी आरोपीला जन्मठेपची शिक्षा सुनावली.
आज या प्रकरणाला दोन वर्षे सात दिवस पूर्ण झाले व दोन वर्षांपूर्वी आजच्या 10 फेब्रुवारीला उपचारा दरम्यान अंकिताची प्राणज्योत मावळली होती.व आज तिच्या दुसऱ्या स्मृती दिनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे ( वय ३२) याला न्यायालयाने शिक्षा सूनावली हा दुर्दैवी योगायोग आहे.
आज या प्रकरणाचा निकाल असल्याने न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक श्री प्रशांत होळकर हे जातीने या बंदोबस्तावर नजर ठेवून होते.अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोलनकी,येथील उपविभागीय अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.न्यायालय परिसराकडे येणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले होते. जवळपास 15 पोलीस अधिकारी व 125 पोलीस न्यायालय परिसरात बंदोबस्तासाठी होते.या शिवाय न्यायालय परिसरात क्यूआरटीचे चार कमांडो तैनात होते.व दंगल निरोधक पथक तैनात ठेवण्यात आले होते.सकाळी 11 वाजता न्यायाधीश श्री आर बी भागवत हे आपल्या आसनावर स्थानापन्न झाले.त्याआधी 10 वाजून 58 मिनिटांनी विशेष सरकारी वकील एड उजवल निकम यांचे आगमन झाले.त्या पाठोपाठ आरोपीचे वकील एड भुपेंद्र सोने हे न्यायालयात उपस्थित झाले.त्यांनतर प्रचंड पोलीस संरक्षणात आरोपी विकेश नगराळे याला नागपूर येथून घेऊन पोलीस आले.जवळपास चार गाड्यांचा ताफा त्याच्या मागेपुढे होता.आरोपी न्यायालयाच्या समोर उपस्थित झाल्यानन्तर ११ वाजून ३० मिनिटांनी न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात झाली.यावेळी न्यायालयाने 3 फेब्रुवारी 2020 ला अंकिता पिसुड्डे हिच्या अंगावर सकाळी पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकरणी दोषी असल्याचे सांगितले होते.
आज या खटल्याचा औत्सुकपूर्ण निकाल ऐकण्यासाठी प्रसार माध्यमानी न्यायालय परिसरात एकच गर्दी केलेली होती.न्यायालयानचे आजचे कामकाज सकाळी पहिल्या सत्रात 11 ते 12.30 पर्यन्त चालले. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने साय 5 वाजेपर्यन्त निकाल राखून ठेवला होता.साय 5 वाजता न्यायाधीश राहुल भागवत यांनी आरोपी व दोन्ही वकील यांच्या समक्ष निकालाचे वाचन करून शिक्षेची घोषणा केली.त्यांनतर सरकार पक्षा तर्फे एड उजवल निकम यांनी सकाळी 11 वाजे पासून व्यायालयाचे प्रांगणात तिष्ठत उभे असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शिक्षेची माहिती दिली.
****************

विकेश वर घोर अन्याय झाला

एड भुपेद्र सोने

हा खटला सर्वात आधी मिडियासमोर चालला होता.मीडियाने हा निकाल दिला होता व मिडीयाचा निकाल न्यायालयाने कायम ठेवलेला आहे याचे मला अत्यन्त दुःख होत आहे. जे साक्षीदार तपासण्यात आले त्या पैकी सर्वांचे बयान लिखित फॉर्म मध्ये आहे त्या आधारे निर्णय लागत असेल ते हा घोर अन्याय आहे. एका निर्दोष व्यक्तीला यात गोवण्यात आले असून उद्या या कोर्टात मी या विषयावर आर्ग्युमेंट करणार नाही मी हायकोर्टात या विरुद्ध दाद मागणार असल्याचे आरोपीचे वकील एड भुपेंद्र सोने यांनी सांगितले.(तभा वृत्तसेवा)

नांदुरा खामगाव महामार्गावरिल नवीन बांधलेल्या पुलाच्या भिंती पडल्या

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

नांदुरा खामगाव राष्ट्रीय महामार्ग ग्राम.आमसरी येथील हनुमान मंदिर जवळील नवीनच बाधकाम होऊन जडवाहतुकीसाठी सुरु केला होता या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भिंती व सोबतच अरधा रस्ता खचला ही.घटना दि.9फेब्रुवारी रोजी12वाजता घडली या दरम्यान दोन्ही कडिल वाहतूक चार तास ठप्प झाली होती याबाबत सविस्तर माहिती असे की सदर महामार्ग वरील पुलाच्या बाजुस.दुसऱ्या पुलासाठि जेसीबी दवारे माती खोदकाम सुरु होते यावेळी वरिष्ठ अधिकारी व अभियंताचे दुर्लक्षनामुळे कोनतेहि नियंत्रण नसल्याने अशिक्षित यंत्र चालकाने पुलाचे दोन्ही भिंती व अरधा रस्ता अचानक खचला सुदैवाने प्रानहानि झाली नाही या .गैरप्रकार मुळे महामार्ग वरिल जड वाहतूक काही तास बंद पडली होती दरम्यान दुपारी12वाजता या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी दक्षपने घटनास्थळी पोहचून वाहतुक सुरळीत केली काही तास खोळंलेने काही वाहने पि.राजा. मार्गाने वळविण्यात आली

सुनगाव येथील सी आय एस एफ जवानाचा अपघातात दुर्देवी मृत्य

0

 

सूनगाव गावावर पसरली शोककळा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पडला पार

गजानन सोनटक्के
जळगाव जा

चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर रोडवरील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव चे रहिवासी आहेत मागील काही वर्षापासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापूर कडे जात होते दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच 34 एम 41 62 ने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या बातमीने सुनगाव परिसरात शोककळा पसरली त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर हे सुनगाव येथे काल रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले त्या वेळी लोकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती व त्यानंतर स्वर्ग रथ हार फुलांनी सजवून या जवानाची वाजत गाजत मिरवणूक यावेळी गावातील रस्त्यांवर स्त्रियांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या यावेळी सुनगाव हे अश्रुंच्या पुरात न्हाऊन निघाल्यासारखे झाले व सुनगाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सुनगाव ते जळगाव रोडवरील त्यांच्या स्वतःच्या मळ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला यावेळी बुलढाणा येथील जवानांनी आपल्या तालासुरात जवानाला अखेरची सलामी दिली व हवेत फैरी झाडल्या यावेळी जळगाव जामोद महसूल मंडळ कर्मचारी आमदार डॉ संजय कुटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेंनजित पाटील, शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील, कॉग्रेसचे अविनाश उमरकर, जिल्हापरिषद सदस्य रूपालिताई काळपांडे पंचायत समिती सभापती रामेश्वर राउत, उपसभापती महादेवराव धुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, गरमपंचायत सदस्य माजी सरपंच पुंडलिक पाटील याच्यासह तालुक्यातील हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे

वेकोलीच्या कोटनका कंपनी विरोधात उद्यापासून काँग्रेसचे बेमुद्दत कामबंद आंदोलन

0

 

तीन वर्षांपासून वेतनात वाढ नाही
कामगारांचे शोषन: राजु रेड्डी

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : वेकोली सब एरिया अंतर्गत कार्यरत कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करणारी कोटेनका (सिम्फर) या कंपनीने कामगारांना वेकोली निर्धारित हाय पॉवर कमिटीने दिशा निर्धारित केलेले किमान वेतन द्यायला हवे होते.
वेकोलीतर्फे सॅम्पलिंगचे टेंडर सिम्फर कंपनीने घेतले व कोटनका कंपनीला परस्पर काम देऊन टाकले मात्र कोटनका कंपनी हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण करत आहे.
कामगारांना नियमानुसार वेतन दिल्या जात नाही
कुठल्याही प्रकारे सुरक्षा साधने उपलब्ध केल्या जात नाही.
कामगारांच्या हक्कासाठी घुग्गूस शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असून या अन्यायकारक कंपनी सोबत वेकोलीची देखील हात मिळवणी असून कामगारांचे शोषण करणाऱ्या कोटनका कंपनीवर कुठलीच कारवाई केली नसल्याचे निषेधार्थ वेकोली अधिकाऱ्यांना देखील घेराव घातला जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

दुसखेडा ग्रामसेवकाने नमुना नं.8 व नमूना 9चे वाचन केले भुसावळ शासकीय विश्रामगृहात ?

0

 

गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार.

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दि.9फेब्रुवारी2022 रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज सुटीवर असून सुद्धा दुसखेड़ा ग्रामपंचायतीचे दप्तर नमुना नंबर आठ व नमुना नंबर नऊ हे भुसावळ शासकीय विश्रामगृहात घेऊन गेले व सरपंच यांचा मुलगा व ग्रामसेवक यांनी विश्रामगृहात त्या मंजूर घरकुल यादीचे वाचन केले,म्हणजे घरकुल यादीचे वाचन हे ग्रामपंचायत मध्ये आणि ग्रामसभेत न करता आपल्या सोईनुसार मनमानी करून अनाधिकृत ठिकाणी यादीचे वाचन केले याची आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही खालील सह्या करणारे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात गेले असता त्या ठिकाणी ग्रामसेवक व सरपंच यांचा मुलगा मंजुर घरकुल यादी ची छाननी करीत असताना आम्ही प्रत्यक्ष बघितले.तरी यांनी शासकीय सर्व नियम धाब्यावर ठेवून घरकुल यादीचे वाचन दुसखेडा ग्रामपंचायत येथे न करता दुसऱ्या तालुक्यात म्हणजे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात केले असे दिलेल्या तक्रार अर्जात दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुभाष दगडू सोनवणे,महेंद्र गंगाराम बारे यांनी नमूद केले आहे त्यामुळे आता यावल पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास IAS अधिकारी नेहा भोसले काय कार्यवाही करतात याकडे यावल तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवकांचे,राजकारणाचे,दुसखेडा ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.

मनपा आयूक्त आष्टीकर च्या अंगावर शिवप्रेमी महीलाने फेकली स्याही

0

 

उषा पानसरे असदपूर
अमरावती दिनाक 9 फेब्रूवारी

महानगरपालिका आयुक्त यांच्या अंगावर स्याही फेकली

अमरावती शहरातील राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिवसें दिवस वेगळी आक्रमक आंदोलने करीत असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असताना आज युवा स्वाभिमान महिला संघटनेच्या पदाधिकारी साक्षी उमक यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्या अंगावर शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार आज राजा पेठ येथे घडला साक्षी उमक महानगरपालिका आयूक्ता यांचा अंगावर स्याही फेकण्याचा धक्कादायक प्रकरण राजा पेठ रेल्वे अंडरपास मधे ही धक्कादायक घटना घडली घटना स्थळी पोलीसांनी शिवपप्रेमी महीलांना ताब्यात घेण्यात आहे

सुपर मार्केट मॉलमधे “वाईन” विक्रीचा निर्णय रद्द करण्याची मागणी.

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

ज्येष्ठ समाजसेवक
अण्णा हजारे प्रणित भ्र.वि.जन आंदोलन न्यासचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

जळगाव दि.9
महाराष्ट्र शासनाने किराणा दुकान सुपर मार्केट व मॉलमधून “वाइन” विक्रीचा निर्णय घेतला आहे तो निर्णय महाराष्ट्र सरकारने तातडीने रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दि.8 फेब्रुवारी2022 रोजी देण्यात आले.
सदरचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना दिले आहे या निवेदनामध्ये नवीन युवा पिढी,सामान्य जनता व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण झाल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्यामुळे राज्य शासनाने रद्द करावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्ह्याच्या वतीने तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध प्रकारचे आंदोलन छेडण्यात जाईल असा इशारा सुद्धा या वेळी देण्यात आला.
निवेदन देताना कोरोना नियम पाळून जळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते,वाईन दारू सुपर मार्केट मॉल मध्ये विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राज्यात 90 टक्के स्री-पुरुष,तरुण मुलं-मुली,विद्यार्थी,विद्यार्थिनी समाज सेवक पुरुष व महिला मंडळ,बचत गटातील महिला सदस्यांमधून राज्य सरकार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा दिला जाणार असल्याची बोलले जात आहे.

महाराष्ट्र शासन हे किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी देत असून हा निर्णय अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणारा आहे : भीम आर्मीची संविधान रक्षक दल मागणी

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

राज्यसरकारने नुकतीच किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिली आहे,मात्र ह्या अवसानघातकी तुघलकी निर्णयाने अनेक परिवार उघड्यावर येतील ,विद्यार्थ्यांच्या भविष्यावर भयंकर दुष्परिणाम होतील , ह्या सर्व बाबींचा कोणताही विचार न करता केवळ महसूल मिळवण्याच्या नादात केंद्र सरकार इथे खुलेआम मरणाला विकण्याचीच परवानगी देत असून ,हा तद्दन अविवेकी विचार सरकारने ताबडतोब रहित करावा , अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संवैधानिक आंदोलन छेडावे लागेल असा गर्भित इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्याचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुपडू संदानशिव यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
राज्यसचिव सुपडू संदानशिव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की ,अगोदरच खेडोपाडी,ग्रामीण भागात अनेक परिवारांचे दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त झाले आहेत,आज सुद्धा दारूच्या आहारी जावून अनेकांचे कौटुंबीक वाद आपण रस्त्यावरती होतांना दिसतात, ग्रामीण क्षेत्रात संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे . असे असतांना त्यात भर म्हणून की काय , राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिल्याने भर पडली आहे,त्यामुळे ग्रामीण भागात,गरिबांच्या घरी दुःखाचा स्फोट होण्यास कोणी अडवू शकत नाही. त्याच बरोबर ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांनी ही जागरूक होणे गरजेचे आहे,जर किराणा दुकानात वाईन सहज उपलब्ध झाली तर मुलांवर याचा काय दुष्परिणाम होईल याचा सारासार विचार करून ह्यावर आज आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात दारूपीडित परिवाराचे व पाल्यांचे भविष्य उध्वस्त होईल,म्हणून राज्य सरकारने हा तुघलकी निर्णय तत्काळ मागे घ्यावा , असा निर्वाणीचा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी दिला आहे.

शेतरस्ता मोकळा करून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0

 

लोणार/जगन मोरे

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अडवलेला शेत रस्त्याची मागील वर्षी मोका पाहाणी झाली आहे तरी सदर रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी तहसिलदारांना निवेदन दिले असल्याची माहिती 9 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे
चिंचोली सांगळे येथील गट नंबर 318 ते गट नंबर 270 पर्यंतचा संपूर्ण रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे या दोन्ही गटांमधुन जाणारा शेत रस्ता नकाशाप्रमाणे सरकारी आहे सदर रस्त्यावरून किमान 50 ते 70 शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जनवारे, बैलगाडी, पेरणीसाठी खते बी-बियाणे, इतर शेती संबंधी अवजारे,नेण्यास शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याची मागील वर्षी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी झालेली आहे यावर्षी सदर रस्ता मोकळा करून रसत्याचे पांदन रस्ता योजनेमध्ये समावेश करून रस्ता करून द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे सह या शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरुन पेटला वाद;

0

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगांव. बुलढाणा जिल्ह्यात मोदींविरोधात विरोधात काँग्रेसची निदर्शने
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी निदर्शने सुरू आहेत शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केलीत. आणि जोरदार घोषणाबाजी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवण्याचे काम केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात आणि राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून आज भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचे काल सांगण्यात आले होते. दरम्यान आज बुधवारी शेगाव शहरासह जिल्हा भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्याविरुद्ध शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. . मोदी यांनी जनतेची माफी मागावी कारण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. दरम्यान या ठिकाणीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.