Home Blog Page 335

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0

 

लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त- विवेक बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

सोमवार 7 फेब्रुवारीला घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी लतादीदींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रविवारला सकाळी स्वरलता, गानकोकिळा, गानसरस्वती अशा अशा अनेक विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला.
याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले लतादीदींनी संगीतजगताला आपल्या सुरांनी सजविले आपल्या आवाजामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले अवघ्या वयाच्या १३ व्या वर्षा पासून गायनाला सुरुवात केली. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, फिल्मफेयर, नॅशनल फिल्मफेअर, असे अनेक पुरस्कार मिळाले. लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त झाला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी पंस.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, संजय भोंगळे, मल्लेश बल्ला, शरद गेडाम, गणेश खुटेमाटे, सिनू कोत्तूर, सुशील डांगे, पियुष भोंगळे, राजेंद्र लुटे, मधुकर धांडे, मंगेश राजूरकर, सय्यद मुस्तफा, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, लता आवारी, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, भरती परते, खुशबू मेश्राम, अजय लेंडे, उमेश दडमल उपस्थित होते.

घुग्घूस चे पद्मशाली समाज चा वतीने शिवमार्कंडा जयंती निमित्त महामुनी मार्कंडय्या ची मुर्ती स्थापना करण्यात आली ।

0

 

या निमित्त घुग्घूस ची पद्मशाली समाज चा वतीने मुर्ती स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला । या कार्यक्रम मधे घुग्घूस चे सर्व पद्मशाली समाज मोठ्या संखेने लोग उपस्थिती होते । याच कार्यक्रम मध्ये दि. 6 फरवरी रोजी, चंद्रपूर विधानसभा चे लोकप्रिय आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार जी यांची उपस्थित दर्शूहून कार्यक्रमाची शोभा वडविली।प्रेम गंगाधरे,इम्रान खान,पंकज धोटे या कार्यक्रमाचे आयोजन घुग्घूस चे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवासजी गुडला, कोषाध्यक्ष श्रीरामलुजी मामीडाला, अशोकजी गुंटुकवार, विलासजी कत्तुलवार, राजुजी चिप्पावार, मुशम रवीजी, कुमारस्वामीजी गुडला, सिनुजी ताला, पोलू राजेशमजी एवं घुग्घूस के सर्व्ह पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते.

जानोरी ग्रामपंचायत चा उपक्रम स्वनिधीतून 26 दिव्यांगांना सौर कंदील वाटप

0

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतच्या वतीने स्वनिधीतून स्वामी रामभारती महाराज यांचेहस्ते गावातील 26 दिव्यांगांना सौरकंदील वितरित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ अर्चना मंगेश ढोले ह्या होत्या
यावेळी उपसरपंच शंकर रामदास सोळंके , ग्रा प सदस्य नंदाकिशोर गावंडे, रमेश डांगे, सौ लता घेंगे , सौ सुरेखा घेंगे, सौ दुर्गा बोरसे, सौ दिक्षा भोजने, शेख रेहाना यांच्या उपस्थिती होती.
दीन दुबळ्यांची व गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून असेच लोकहितार्थ उपक्रम गावात सातत्याने राबवायला हवे,लोकहित साधणे हेच लोकप्रतिनिधी चे कार्य असल्याचा उपदेश करून ग्रा प च्या उपक्रमांची प्रशंसाही स्वामी रामभारती महाराज यानी यावेळी मनोगतातून केली.आभार ग्रा प सचिव आर पी गावडे मानले.

यावल येथे उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजीत शरद युवा संवाद यात्रेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आगमन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उद्या यावल शहरात ” शरद युवा संवाद यात्रा “चे आयोजन करण्यात आले असुन , या कार्यक्रमास तालुक्यातील युवकांनी मोठया संख्येत सहभागी होण्याचे आवाहन युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड देवकांत पाटील व शहर अध्यक्ष हितेश गजरे यांनी केले आहे .

उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सोमवारी यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने यावलच्या खरेदी विक्री सहकारी संघाच्या परिसरात सकाळी १o वाजेला शरद युवा संवाद यात्रा चे आयोजन केले आहे . राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, यांच्या सोबत ‘शरद युवा संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आलेली आहे.
या यात्रेची सुरुवात जळगांव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान मौजे आसोदा ता.जि.जळगांव येथून दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ संध्याकाळी ५ वाजता झाली ही यात्रा सर्व जळगांव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोहचत असून, यावल तालुक्यात ही यात्रेचे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी १० वाजेला यावलच्या खरेदी विक्री संघातील परिसरात आगमन व आयोजन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष सह सर्व आजी- माजी आमदार, सर्व सेलचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत . यात्रेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचा मानस आहे. नव्याने राजकारणात येऊ पाहणारी युवकांची संख्या लक्षणीय आहे! त्यांना राजकीय प्रक्रियेच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची ‘राष्ट्रवादी विचारांची’ व विकासात्मक दृष्टिकोन असणारी फळी महाराष्ट्रात नव्या जोमाने निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही संवाद साधणार आहोत! या शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून नव्या ऊर्जेने युवकांच्या सोबत संवाद साधणार आहेत.. यावल तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.

पातुडाँ येथील विशाल जम्मा जगरण संपन्न

0

 

संग्रामपुर तालुक्यातील पातुडाँ बु येथे रामदेवबाबा यांच्या जीवन पाटावर जम्मा जागरण संपन्न झाला असून हजारो भक्तांनी यांचा लाभ घेतला
राजस्थान राज्यातील रामदेवरा नगरी मध्ये रामदेवबाबा बाबा याचे भव्य मंदिर आहे रामदेव बाबा याना माननारा वर्ग देशातील कान्या कोपऱ्यात असून पातुरडाँ येथे पण आहे,पातुडाँ येथील रामदेवबाबा सेवा समिती कडून माघ महिन्याच्या वसंत पंचमी निमित्य दि 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता पासून बालाजी मंदिर मध्ये विशाल जम्मा जागरण चे आयोजन प्रसिद्ध जम्मा गायक गोपाल शर्मा हारे अकोला यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी बालाजी मंदिर मध्ये अभिषेक,पूजा अर्चना,मंत्रोउच्च्यार सह पंडीत यांच्या कडून करण्यात आले तर राजस्थानी महिला मंडळ यांनी सुदरकांड चे आयोजन केले होतें या कार्यक्रम ला आलेल्या भक्तांना सकाळी व सायंकाळी महाप्रसाद देण्यात आला अखंड ज्योत चे भक्तांनी दर्शन घेतले
या जम्मा जागरण चा हजारो भक्तांनी लाभ घेतला,जम्मा जागरण मध्ये अखंड ज्योत,भजन संध्या,अखंड होम,रामदेव बाबा यांचे चमत्कार हे सर्व दाखविण्यात आले या जम्मा जागरण ला आलेले प्रसिद्ध गायक गोपाल शर्मा हारे यांचा व त्यांच्या सर्व टीम चा रामदेवबाबा समिती पातुडाँ बु कडून शाल,श्रीफळ व हार टाकून सत्कार करण्यात आला या जम्मा जागरण मध्ये वानखेड, कवठल,सगोडा, शेगाव, खामगाव, वरवट बकाल, संग्रामपुर, खेरडा, जळगावजामोद,आसलगाव,तेल्हारा,अडगाव बु,अकोट, अकोला,यवतमाळ, माटरंगाव,काटोल,मोर्शी,अअश्या बऱ्याच शहरातून भक्त आले होते,गोपाल शर्मा यांनी सांगितले की रामदेवबाबा या कलयुगातील सर्व धर्म,जात पंतांचे देव आहेत,त्यांना आसा कोणताही समाज नाही जो मानत नाही प्रत्येक समजातील घरात त्याचा फोटो आहे व दररोज त्याच्या फोटोची पूजा करतो सर्व समाज,रामदेवबाबानी आपल्या जीवनात कोण कोण ला साक्षात चमत्कार दिला त्याचे सर्व किस्से सांगितले व सोबतच भजन संध्या करून भक्तांना त्याच्या गाण्यावर थिरकविले व त्याची आरती करून जम्मा जागरण संपन्न केला

कार्यक्रम मधील झाकीया

मदन तापडिया व सौ कांचन तापडिया(रामदेव बाबा चे आई,वडील) कु समर्थ न्यानेश्वर धर्माळ(लहान रामदेव बाबा),अक्षय अग्रवाल सौ शिवानी अग्रवाल(मोठे रामदेवबाबा व त्यांच्या पत्नी नेतलबाई),सौ शीखा निलेश चांडक व सौ उजवला संजय चांडक(ला छाबाई,सुगनाबाई,रामदेवबाबा च्या बहीनी),अनुष्का व्यास(डालीबाई),पियुष चांडक(भानू),विधी राठी-स्वरस्वती,रिया गांधी-लक्ष्मी,गौराग भुतडा-गणेश या प्रकारच्या झाकी तयार करण्यात आल्या होत्या व गणेश राठी,लोकेश राठी,शरद राठी,प्रदीप राठीं,दामोदर राठी, कमल राठी,विष्णू गांधी,मुन्ना गांधी,सुरेश अग्रवाल,हरीश तापडिया, मदन तापडिया, प्रकाश दवे,अजय व्यास,सतीश शर्मा,निखिल चांडक,रमेश चांडक,आईदान चांडक,शिवकुमार चांडक,लतीश भूतडा,दामोदर भुतडा, हेमंत भुतडा, आनंद वर्मा,मनीष शर्मा,कृष्णा भुतडा, रमण सेवक, संजय चांडक,रामचंद्र राठी, निलेश चांडक,भगवान राठी,महेश गोयल,मनीष पालिवाल, सुरेश पालिवाल, कृष्णा चांडक, दिनेश चांडक, सुरेश चांडक,आकाश पालिवाल,लोकेश पालिवाल याच्या सहकार्यने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

नरेश बाबा यांची विशेष उपस्थिती
पांढरी धाम येथील रामदेव बाबा यांच्या मंदिर चे मुख्य व महंत श्री नरेश बाबा यांची पातुडाँ येथील जम्मा जागरण ला विशेष उपस्थिती लाभली होती त्याचा रामदेवबाबा सेवा समिती कडून सत्कार करण्यात आला व भक्तांना दर्शनाचा लाभ भेटला

0

 

 

मुंबई- सुर्या मराठी न्यूज

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून मान्यवरांसह सर्वसामान्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

 

लता मंगेशकर यांनी आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. यानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून या कालावधीत सर्व शासकीय कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे लतादिदींच्या निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह समाजाच्या विविध स्तरांमधील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

 

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

लता मंगेशकर यांचं पार्थिव १२.१५ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी बाहेर नेण्यात येईल. १२.३० ते ३ पर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

शैक्षणीक क्षेत्रात राजकीय हसाक्षेप करणारा काका छायदा रद्द करा : सचिन देशमुख

0

 

इन वृत्तसेवा सतीश मुलंगेलोणार दि 6फेब्रु २०२२

मविद्या सरकारने विद्यार्थ्यांच्या जिवनाशी खेळणारा विद्यापीठ स्वायत्ततेवर गदा आणणारा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचेकडे लोणार भेटी दरम्यान निवेदनाद्वारे केली आहे.

उच्च शिक्षण क्षेत्रात प्रागतिक पुरोगामी व सदैव प्रयोगशील म्हणून महाराष्ट्र राज्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा आहे राज्यात नुकताच करण्यात आलेली विद्यापीठ कायद्यातील दुधारणा राज्यातील विद्यापीठाच्या स्वायत्ततेला राजकीय हस्तक्षेपाचा धोका निर्माण करणारा आहे यामुळे विद्यापीठ स्वायत्ततेवर गदा येणार आहे. दिनांक १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने

विद्यापीठ स्वायत्ततेवर स्वतः चे नियंत्रण आणण्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करत काही निर्णय घेत मंकीमंडळात मंजुर केले आहेत. सदर प्रस्तावित निर्णयाचे येत्या अधिवेशनात कायद्यात रूपांतर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे, या निर्णयानुसार राज्या अंतर्गत असलेल्या सर्व विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असुन देखिल कुलपतींची थेट नियुक्ती गुरु शकणार नाहीत. राज्य सरकारने सुचविलेल्या नावापैकीच कुलगुरूची निवड राज्यपालाना छरावी लागणार आहे. प्र. कुलगुरू करून हे पद निर्माण त्यावर राज्याचे उच्च व तंशिक्षण मंत्री यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे बदल म्हणजे राज्यातील विद्यापीठा च्या स्वायत्ततेवर घाला घालणारे आहेतया निर्णयामुळे विद्यापीठांच्या कामकाजात अवाजवी राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता अधिक आहे. सर्व विद्यापीठाचे प्रमुख असलेल्या राज्यपालांच्या अधिकारां ● ना कमी करण्याचा हा प्रयत्न राज्य सरकार कडून होत आहे या बाबीचा विद्यापीठातील गुणवत्ता धारक विद्यार्थी,

प्राध्यापक यांचेवर होणार आहे. यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा धरण्याची घसरण्याची भिती आहे म्हणून हा कायदा रद्द करावा अशी मागणी देशमुख यांनी लोणार एम. टी. डी.सी. येथे निवेदन देक व्दारे केली आहे.

यावेळी देशमुख यांचेसोबत भाजयुमो जिल्हा

उपाध्यक्ष सुंदर संचेती, तालुकाध्यक्ष शुभम बनमक, शहराध्यदन दिपक चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य किरण जोशी, विनोद योखे आदि कार्यकर्ते उपस्थित होले

घुग्घुस येथील वेकोलीच्या (wcl) कामगार वसाहतीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

भाजपच्या पाठपुराव्याला मोठे यश

शनिवार 5 फेब्रुवारी पासून वेकोलीच्या रामनगर, इंदिरा नगर, सुभाष नगर, गांधी नगर, राजीव कॉलनी या कामगार वसाहतीच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या घुग्घुस भाजपाच्या मागणीला मोठे यश आले आहे.
वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस भाजपाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन वेकोली वणी क्षेत्राच्या विविध वसाहतील रस्ता दुरुस्ती करणे, क्वार्टरची दुरुस्ती करणे, साफसफाई करणे अशी मागणी करण्यात आली.
त्याअनुषंगाने भाजपाच्या मागणीची तात्काळ दाखल घेत रामनगर वसाहतीत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले तसेच इतर कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, भाजपाचे मल्लेश बल्ला, श्रीकांत सावे विक्की सारसर, मास्टर बहुराशी यांनी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली व रस्त्याचे काम सुरु केल्याबद्दल वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे तथा उप क्षेत्रीय प्रबंधक श्री. ओमप्रकाश फुलारे यांचे आभार व्यक्त केले.

मंदीरात गेल्यानं मागासवर्गीय समाजावर बहिष्कार

0

 

(लातूर/ निलंगा) प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

पुरोगामी महाराष्ट्रात २१ व्या शतकातही विचार अजूनही जातीच्या विळख्यात गुंतलेली आहेत. निलंगा येथील ताडमुगळी गावात मागासवर्गीय असलेल्या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तीन दिवसांपूर्वी गावातील मागासवर्गीय समाजातील तरुणाने मंदिर प्रवेश केल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मागासवर्गीय समाजाने मंदिराच्या बाहेरुन दर्शन घ्यावे ही प्रथा गावात होती. ही प्रथा मोडल्यामुळे समाजात तेढ निर्माण झाला. यामुळे गावातील संपूर्ण मागासवर्गीय सामाजावर बहिष्कार टाकण्यात आला.
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी या समाजासाठी गावातील दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे . शेतातील मजूरीसाठी बोलावने बंद करण्यात आलं. दोन दिवसांत याची चर्चा पोलिसांपर्यंत गेली. औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त लावला. सर्वाशी चर्चा करत प्रकरण तुर्तास तरी मिटवले आहे.

पिंप्री गवळी फाटा येथे नाकाबंदी करुण 5 पेटी देशी दारू सह 53हजाराचाचा मुद्देलाम जप्त .खामगाव पोलीसांची कारवाई.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

खांमगाव – अपर पोलीस अधीक्षक खामगांव , यांना आज दि.५/फेब्रुवारी रोजी गुप्त माहिती मिळाली कि ,स्कूटी क्रमांक MH-28 AH-1606 वर देशी दारुची कोलोरी ते खामगांव मार्गावर अवैध वाहतूक होत आहे. त्या प्रमाणे अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील पोलिस अंमलदार पो. हे. काॕ. गजानन बोरसे, पोलीस नाईक गजानन आहेर , रघुनाथ जाधव , संदिप टाकसाळ , पोलीस कॉन्स्टेबल राम धामोडे यांनी पिंप्री गवळी फाटा येथे नाकाबंदी करुण सदर वाहन पकडून वाहनावरील 5 पेटी देशी दारू किंमत 15हजार रुपये वाहन ,व वाहन बाॕटलसह सह 53 हजार 40/- चा मुद्देलाम जप्त करुण आरोपी विरुद्ध पो. स्टे .खामगांव ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रस्तुत कारवाई श्री . अरविंद चावरिया ( भा.पो.से. ) पोलीस अधीक्षक , बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्रवण दत्त एस , अपर पोलीस अधीक्षक , खामगांव यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय , खामगांव यांचे पथकातील पोलीस पोलीस अंमलदारांनी केली आहे.