Home Blog Page 336

एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी सरपंच परिषदच्या पोलीसांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींवर कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अश्या मागणीचे निवेदन सरपंच परिषद यांच्यातर्फे यावल पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक जितेन्द्र खैरनार यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी  देण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुले व एका तरूण यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले व तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेतील तीनही संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि पीडीत मुलीला आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आले.

या निवेदनावर सरपंच परिषद तालुका सचिव अजय अडकमोल, तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद, तालुका उपाध्यक्ष भूषण पाटील, माहिला तालुकाध्यक्ष अलका पाटील, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, अजय भालेराव, प्रदीप कोळी, नवाज तडवी, निलेश कोळी, वर्षा कोळी, समाधान पाटील, रामकृष्ण सोळंके, दिपक चौधरी, गोपाळ सोळंखे, युवराज पाटील, सुनिल कोळी, आधार खडके, राहूल झगडे, अरूण माळी, विकास सोळंखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केली लोणार सरोवराची पहाणी

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेडे

बुलडाणा = लोणार सरोवर हा आमचा अमूल्य ठेवा आहे. या परिसराचा चांगला विकास झाल्यास हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक या सरोवराला पाहण्यासाठी येतील. त्यामुळे येथील आर्थिक स्थिती सुधारेल लोणार सरोवराच्या विकासासाठी यशोचीत कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे आज शुक्रवार, दि.४ फेब्रुवारी रोजी ‘बुलडाणा’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली. या सरोवरासंदर्भाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली.

अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून लोणार सरोवर ओळखलं जातं. भूगर्भशास्त्र खगोलिय अभ्यासासह जैविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व सर्वश्रृत आहे. बेसॉट खडकापासून निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर जगविख्यात आहे जैविविधतेच्या दृष्टीनेही लोणार सरोवराचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार सरोवराचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निटूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीची मागणी

0

 

(लातुर/निलंगा) प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

जाहिराबाद लातूर महामार्गाचे काम सुरु आहे. यात रस्त्यालगत असलेल्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. संरपचाने हे पाईप बदलून नवीन पाईप त्या ठिकाणी लावत ते पाईप शासकीय रक्कमेतून खर्च दाखवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
निलंगा तालूक्यातील निटूर ग्रामपंचायतीने महामार्गावरील पाईपलाईनचा अपहार केला आहे. ही पाईपलाईन अवजड वाहनामुळे फुटली होती. ती पाईपलाईन कंत्राटदाराने दुरुस्त करून दिली. मात्र यात ग्रामपंचायतने नवीन पाईपलाईनसाठी शासकीय खर्चातून दुरुस्त केली आहे असे पवार यांचे म्हणने आहे.
निलंगा तालूक्यातील मोठी ग्रा. पं. म्हणून निटूरकडे पाहिले जाते माञ या ग्रा. पं. चा कारभार याना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतो .जहिराबाद निटूर लातूर या महामार्गाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे एक दोन ठिकाणी पाईप लाईन अवजड वाहनामुळे फुटली होती आणि ती कंपनी ने दुरूस्त ही करून दिली होती. माञ ग्रा. पं. ने महामार्गाचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स या कंपनी ला पञव्यव्हार करून तुमच्या वाहनामुळे अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली आहे असे सांगून एकूण तीन हजार फूट पेक्षा जास्त पाईपलाईन तसेच रेड्युसर वाॕल दहा अशा प्रकारचे साहित्य कंपनीकडून फुकटात घेतले होते. त्याचा वापर सरपंचाने वैयक्तिक फायद्यासाठी करून काही पाईप शासकीय योजनेत वापरून सरकारी निधी हडप केला असल्याचे तक्रातीत म्हटले आहे. तसेच घेतलेल्या साहित्याची नोंद साठा रजिस्टर मध्ये ही करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे .
दरम्यान घेतलेले सर्व पाईप एकतर स्वतः च्या वैयक्तिक कामासाठी वापरले आहे आणि कांही शासनाच्या योजनेत हेच पाईप वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारदार पवार यांनी म्हटले आहे त्यामूळे शासनाने एक समिती नेमून अपहार करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

हळदी – कुंकू कार्यक्रमातुन महिला सक्षमीकरणाचा “,नारा’

0

 

महिला काँग्रेसनी दिली पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड

( चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : महिला शहर काँग्रेस तुकडोजी नगर वॉर्ड क्रं सहाच्या वतीने दिनांक 03 फेब्रुवारी रोजी तीळ – गूळ व हळदी – कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. विजयाताई बंडीवार,सौ. पदमाताई राजूरेड्डी,सौ.पुष्पाताई नक्षिणे,सौ.दीपा बोकडे यांनी केले असून सदर पारंपरिक कार्यक्रमाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण,स्वरक्षण, यावर जनजागृती करीत महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता नृत्य, गायना सह विविध कार्यक्रम आयोजित केले
कार्यक्रमाचे उदघाटक चित्राताई डांगे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूरेड्डी शहर अध्यक्ष घुग्गूस काँग्रेस हे होते.
प्रमुख अतिथी सौ.नम्रता ढेमस्कर प्रदेश सचिव महिला काँग्रेस, सौ.संगीताताई बोबडे या होत्या कार्यक्रमाचे उदघाटन राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रम शुरू करण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जवळपास 400 ते 450 महिलांनी सहभाग घेतला.
उपस्थित महिलांची ओटी भरूण वाण वाटप केले.
महिलांना संबोधीत करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांनी महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणा बाबत जनजागृतीपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटीका महिला प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर यांनी महिलांना कुटुंब सांभाळीत राजकारणात पुढे यावे प्रत्येक अन्याय,अत्याचारा विरोधात भस्मासूरा सारख्या वाढलेल्या महागाई विरोधात महिलांनी पुढाकार घेण्याचा आवाहन केले.
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी महिलांना स्वयंरोजगारातुन व्यवसाय उभे करण्या संदर्भात मार्गदर्शन करून आपल्यापरीने भरघोस मददतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रस्ताव सौ.पुष्पा नक्षिणे यांनी केले.
तर सूत्र संचालन चैताली गोहोकार यांनी केले तर
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सौ.माधुरी ठाकरे,सौ. सरिता गोहोकार,सौ. राजश्री बोबडे,सौ.शुभांगी नांदे,सौ. स्नेहा बांदूरकर,सौ. सुनिता राखुंडे यांनी केले आहे.

विदर्भवीर शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे नेते मा_आमदार_कै_भाई_के_आर. पाटील_यांची_जयंती_निमित्त

0

 

त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन तसेच भाई के आर पाटील यांचे खंदे समर्थक स्व. भाई वासुदेवराव मानखैर पाटील माजी जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांचे पुण्यस्मरण निमित्त अभिवादन करताना जि. प. मा. उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ(राजू पाटील) मा.जी प अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील,रा कॉ सरचिटणीस प्रसेनजीत अंजलीताई टापरे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष राजूभाऊ वानखडे, भाजपचे जानराव देशमुख,तेजराव मारोडे, काँग्रेस जळगाव जामोद तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ एड भालेराव, गणेश मानखैर, भगवान वानरे, नानाभाऊ पाटील, बाळासाहेब डोसे, श्याम अकोटकर ,राजूभाऊ राठोड,संतोषभाऊ टाकळकर ,सोपान पाटील असे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी भाई के आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन जयंती साजरी करण्यात आली

शेतकऱ्यांना लुबाडणार्या सुरेश पाईकराव विरोधात पोलीसात तक्रार दाखल ; घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध

0

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घूस (चंद्रपूर) : बि.आर.एस.पी जिल्हा महासचिवआणि सफेदझेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष व घुग्घूस रहवासी सुरेश पाईकराव यांच्या विरोधात 03 फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील सूब्बई (चिंचोली) येथील साठ – सत्तरच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी तीन वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनवर धडकले. पाईकराव यांच्यावर शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक केल्या प्रकरणी भादंवी 420 नुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पो.उप – निरीक्षक संजय सिंग यांना दिले.शेकडो कि.मी.चा प्रवास करून आलेल्या शेतकऱ्यांनी
बि.आर.एस.पी नेता सुरेश पाईकराव यांचा भंडाफोड केला.
राजुरा तालुक्यातील विरुर पो.स्टेशन अंतर्गत येणारे सूब्बई व चिंचोली गावातील 87 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सोबत वेकोली तर्फे शेतीचा मोबदला व नोकरी मिळवून देतो अशी भूलथापा देऊन चार लाख पस्तीस हजार रुपये लंपास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.या प्रकरणात 21 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांनी विरुर पो. स्टे.ला तक्रार दाखल केली होती.दहा दिवसां नंतरही कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसतांना शेतकऱ्यांना फसविणारा पाईकराव आता कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सोंग करीत असल्याचे निर्दशनास येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट घुग्गूस येथेच येऊन हल्लाबोल केला.

प्रकल्पग्रस्तां सोबत धोखा कशासाठी ?

गेल्या आठवड्या पासून एसीसी कंपनीच्या न्यू पॅकिंग हाऊस प्लांटच्या कामगारांच्या मागण्यांना घेऊन पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शुरु आहे. कंपनीवर पी.एफ चोरीचा आरोप लावून कारवाईची मागणी करीत असलेल्या पाईकरावने तक्रार दाखल झाल्याच्या दहा दिवसानंतर ही शेतकऱ्यांचे चार लाख पस्तीस हजार रुपये परत केले नाही.जो कामगारांच्या पि.एफला घेऊन मोठ्या – मोठ्या गोष्टी करत आहे.
त्यानेच लाखो रुपयाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्यावर कारवाई होत नसल्याने नेता व पोलिसांच्या हातमिळवणीनेच सदर प्रकार घडत असल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केला.तसेच या प्रकरणात क्षेत्राच्या खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू संसदेत उचलून धरावी असे आवाहन केले. पाईकराववर 420 चा गुन्हा दाखल न झाल्यास पाईकराव करीत असलेल्या आंदोलन मंडप शेजारीच आंदोलन शुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Wcl वेकोली कॉलनी चे दुरुस्ती करा. अन्यथा उपोषण करणार ..संजय तिवारी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस भारतीय जनता पार्टी चा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव संजय तिवारी याने वेकोली कॉलोनीचा दुर्दशा व दुरव्यवस्था मुळे गुरुवारी 27 जानेवारीला क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावले यांना निवेदन दिले आहे, निवेदनत शास्त्रीनगर, रामनगर, गांधी नगर ,सुभाश नगर ,इंद्रा नगर, बंगाली कॅम्प, मुख्य सडक आणि रोड शेतीग्रस्त आहे जागा जागी खड्डे असल्याने खूप परेशानी होत आहे.


किती वेडा वेकोलि ला निवेदन देऊनही आज पर्यंत काम केलेले नाही. पावसाळ्यात कॉटर्स ची छत, पाणी टपकत राहते खिडकी व दरवाजे शतीग्रस्त होऊन आहे केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता आहे .कॉटर मध्ये राहणाऱ्या वेकोली कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.संजय तिवारी यांनी निवेदन केले की लवकरात लवकर कामे पूर्ण करावे .नाही तर उपोषण करणार . यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा विवेक बोडे , सिनु ईसारफ,मल्लेश बल्ला, उपस्थित होते.

आडगाव येथे उधारीचे पैसे परत मागील्याच्या रागात एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण पोलीसात गुन्हा दाखल

0

 

कार्यकारी ( संपादक)विकी वानखेडे

तालुक्यातील आडगाव येथे उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सुरेश मकडू पाटील (वय-५०) रा. आडगाव ता. यावल जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी गावातील योगेश मुरलीधर पाटील याला उसनवारीने पैसे दिले होते. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी सुरेश पाटील यांनी उसनवारीने दिलेले पैसे योगेशकडे मागितले होते. याचा राग योगेशला आल्याने त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी दुपारी २ वाजता सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

नावाने 8 अ असून ग्रा.प .सचिवाने बेकायदेशीर गोठा पाडला ..

0

 

प्रतिनिधी जगन मोरे

श्री गजानन प्रल्हाद कोकाटे यांनी मुख्य कार्यकारि अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे आज दि .02/02/2022 ला तक्रार दिली आहे .त्या तक्रारी मध्ये त्याने असे नमूद केले कि माझ्या नावाने 4 ते 5 वर्षपासून सदरहू अतिक्रमण ग्रा .प .टिटवी येथे नोंदणीकृत आहे .त्या ठिकाणी माझा गुरांचा गोठा होता .ग्रामसेवक दीपक डोंगरदिवे ग्रा .प .टिटवी यांनी कोणतेही कारण नसताना किन्वा लेखी किंवा तोंडी नोटीस न देता सदरहू अतिक्रमण जागेत समशानभूमीची संरक्षण भिंत बांधायची आहे म्हुणुन हि जागा विशाल श्रीहरी राऊत यांची जे सी बी लावून बेकायदेशीरपणे माझ्या गुरांचा गोठा तोडला .याबाबत विचारले असता अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली .त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे .
ग्रामसेवक दीपक डोंगरदिवे ग्रा .प .टिटवी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व माझे आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्यात यावी .अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली

आ.समिर कुणावार यांचे पुढाकाराने आदिवासी बांधवांना शेतजमीनीचे पट्टे वितरित..

0

 

हिंगणघाट प्रतिनिधी, दि.०३
आदिवासी बांधवांचे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित शेतजमिनीचे पट्टे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांच्या अथक प्रयत्नामुळे आता आदिवासी बांधवांना मिळाले असून गावातील आदिवासी तसेच पारधी समाजाच्या नागरीकांनासुद्धा घरकुलासाठी पट्टे मिळालेले आहेत, यातील काही प्रलंबित प्रकरणात तात्काळ पट्टे देण्यात यावे,यासाठी आ. समीर कुणावार हे प्रयत्नशील असल्याचे दिसुन येत आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्ह्यातील सेलु तालुक्याअंतर्गत जुनोना येथील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या शेतजमीनीचे पट्टे नुकतेच वितरित करण्यात आल्याने या पट्टेधारकांनी आनंद व्यक्त करीत आ. समीर कुणावार यांचे आभार व्यक्त केले आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यासाठी आ. समीर कुणावार हे जिल्हाधिकारी तसेच वनविभागाचे अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून अतिक्रमणधारकास वनजमीनी तसेच रहिवासी भूखंडाच्या अधिकाराचे पट्टे मिळवून देण्याचे कारवाईत हिंगणघाट विधानसभा क्षेत्र अग्रेसर असल्याचे निदर्शनास येत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा