Home Blog Page 337

मॉंटेरिया व्हिलेज, एक अभिनव प्रयोगशील ठिकाण, शहरी प्रवाशांच्या स्वागताकरिता सज्ज

0

 

मुंबई आणि पुण्याबाहेर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एक नवीन पर्याय – ‘द व्हिलेज’

व्हिलेजमध्ये एक दिवस राहून तेथील कला, लोककला सादरीकरण तसेच अन्य पर्यायांसोबत समृद्ध संस्कृतीची मजा घ्या एक दिवस शेतकऱ्याचे जीवन जगून व्यापक अनुभव घ्या निसर्गासोबत नाळ जोडा आणि मुळांशी नाते दृढ करा

03 फेब्रुवारी 2022 : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सुमारे 35 एकर विस्तारलेल्या जागेत, मुंबई आणि पुण्यापासून अगदी दोनच तासांच्या अंतरावर मॉंटेरिया व्हिलेज नव्याने सुरू करण्यात आले आहे.
हा ब्रँड सर्वच वयोगटातील पाहुण्यांसाठी दिवसभर नवीन-डे-आऊटींग डेस्टीनेशन ठरतो आहे. एका गावात येणारे सगळेच अनुभव इथे येऊन घेता येतात. पाण्यात डुंबण्याकरिता तलाव, डोळे मिटून पडून राहण्यासाठी टांगण्यात आलेला झूला, लोकसंगीताचा आनंद देणारे सादरीकरण, आरोग्यदायी देशी आहार, मन रमवणाऱ्या बांबू आणि खाट विणकाम कलांची अनुभूती किंवा नेम धरायला लावणारा लगोरीचा खेळ अशी गंमत इथे अनुभवायला मिळणार आहे.

आठवड्याच्या धकाधकीतून क्षणभर वेळ काढून शहरालगत विकएंडची धमाल करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. इथे येऊन ग्राम संस्कृतीचा आनंद कला, संस्कृतीच्या माध्यमातून घेत, शेतातील पारंपरिक कामासोबत निसर्गाच्या संगतीत राहायला मिळते.
मॉंटेरिया रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापक संचालिका राही वाघाणी म्हणाल्या की, “मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रवेश करताच क्षणी पाहुणे गावच्या आठवणीत रममाण होतात. दिवसभर शेतकऱ्याचे जीवन जगण्याची संधी त्यांना मिळते, शिवाय घरगुती जेवणाची लज्जत चाखता येते. लगोरीचा डाव, झुल्यावर झोके घेण्याचा आनंद, तलावात पोहणे आणि तणावमुक्त जीवन निसर्गाच्या सानिध्यात जगता येणार आहे. त्यातच कौशल्यपूर्ण कारागीर आणि कामगारांच्या हाताखाली सर्जनशीलता जपण्याचा अनुभवही घेता येईल. शहराच्या वेगातून ‘फुरसत’ मिळवून दोन क्षणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, आपल्या जीवलगांसोबत एकत्र क्वालिटी टाईम व्यतित करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.”

तल्लीन करणारा कला अनुभव
याठिकाणी सुतार, फर्निचर घडवणारे, शिंपी, कुंभार, धातू तसेच दगडी काम करणारे कारागिर, बांबू आणि खाट विणकाम करणारे, लोहार, कातडी कमावणारे आणि सोनारांसोबत काम करता येईल. स्वत: कामाचा अनुभव घेऊन इथे तयार करण्यात आलेली कलाकृती सोबत नेता येणार आहे. त्याशिवाय न्हाव्याकडून केसांचा छानसा हेअर कट करता येईल, चंपी, मसाज करून घेता येईल. याठिकाणी महिला गृहउद्योगाद्वारे विक्रेत्यांनी तयार केलेल्या चविष्ट आणि लज्जतदार पापड, लोणची तसेच श्रीखंडाचा आनंद घेता येणार आहे.

शेतात वेळ घालवणे
मॉंटेरिया व्हिलेजचा कृषी भविष्यावर विश्वास आहे आणि त्यांनी शेतीच्या जुन्या पद्धतींसोबत हायड्रोपॉनिक्ससारख्या आधुनिक तंत्राचा अवलंबही केला आहे. पारंपरिक ग्राम तंत्रात बायोगॅस, गांडूळखत निर्मिती, शेण्या थापणे, गोमूत्र गोळा करणे तसेच ग्रीनहाऊसमध्ये फुलांची शेतीचा समावेश आहे. पर्यटकांना सर्वसमावेशक पद्धतीच्या धन्वंतरी गार्डनसारख्या शेतीविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल किंवा शेतातील ताज्या उत्पादनाचा गंध अनुभवण्यासाठी फेरफटका मारता येणार आहे.

अन्नपदार्थ आणि पेयपान
इथल्या मोकळ्या हवेत भटकंती करताना भूकेची जाणीव झाल्यास स्थानिक ठेल्यांवर चवदार पाणी पुरी, तोंडाला पाणी आणणारे चपटे चणे आणि चटकदार चाटप्रकार चाखता येतील. बर्फाचा गोळा आणि मडक्यातील दही मौज गारेगार करतील. तर तहान भागवण्यासाठी नारळपाणी, बडीशोप पाणी, कोकम सरबत, गोटी/मार्बल सोडा, ताक किंवा कटींग चहा/कॉफीचा पर्यायही असेल.

रेस्टॉरंट साबराजमध्ये घरगुती चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण घेता येईल. त्यासाठी शेतात पिकवलेल्या भाज्या किंवा मांस, गहू-बाजरी/ज्वारी आणि तांदळाच्या पोळ्या/भाकऱ्या, डाळ-भात, कढी-भात व पारंपरिक गोड पदार्थ ताटात वाढले जातील.

येथील मुख्य आकर्षण
याठिकाणी असलेली नक्षत्र बाग डोळ्यांना भुलवणारी आहे. अवकाशातील 12 नक्षत्रे किंवा राशी चिन्हांवर आधारलेली आहे. इथे प्रत्येक पाहुण्यांना निसर्गातील सकारात्मक स्पंदने अनुभवता येतील.

दीर्घ प्रवासाच्या आठवणीत नेणारी ग्रीन ट्रेन, स्विंग सर्कल आणि जायंट हारनेसची धमाल पोटात फुलपाखरं उडत असल्याचा भास निर्माण करतील, शिवाय बुलेट चकडोची रपेट मन प्रफुल्लित करेल. इथे फिरत असताना गुंफेतून भटकंती करता येईल. शिवाय बांबूच्या मचाणावर शांतीचा आनंद मिळेल. इथे लक्ष्मण झुल्याची प्रतिकृती देखील पाहता येईल.

मॉंटेरिया व्हिलेज आपल्याला लहानपणीच्या आठवणीत रममाण करेल. त्याचप्रमाणे लगोरी, गोट्या खेळणे किंवा टायरमागून पळणे भूतकाळात घेऊन जाईल.
संध्याकाळच्या रम्य वातावरणासाठी इथे आनंद मेळ्याचा आनंद घेता येईल. लोकसंस्कृतीचे दर्शन सोबतच मनोरंजन करणारे क्रियाकलाप दिवस साजरा करतील. येथील अँफी थिएटरमध्ये लोककलेचे सादरीकरण होते, ज्यामध्ये लोकसंगीतासोबत, नृत्य आणि रंगमंचीय कलांचा आनंद घेता येईल. हा सामाजिक संवादाचा, घरच्या मायेची ऊब देणारा सोहळा आहे.

प्रेक्षक- लक्ष्य
मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. ही ठिकाण प्रत्येक वयोगटाच्या दृष्टीने साजेसे आहे. इथल्या खुल्या वातावरणात मुलांसाठी बरेच क्रियाकलाप, झोपाळे, फिरण्याचे ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवून ठेवणारे, आरामदायक पर्याय आहेत. हे ठिकाण कॉर्पोरेट पार्टी, चर्चासत्रे आणि ऑफ-साईट भटकंतीकरिता योग्य आहे. इथे अभिनव पद्धतीने संकल्पना राबविण्यात आली असून व्यक्तिगत वेळेची सुसूत्र आखणी टीम-बिल्डिंगला प्रोत्साहन मिळते. या ऑफबीट ठिकाणी जोडप्यांना परस्पर नाते दृढ करण्याची संधी मिळते. खुल्या वातावरणात पारंपरिक आहार उपलब्ध असून एकावेळी 1500 पर्यटक लाभ घेऊ शकतात.

स्वच्छता
सध्याचा महासाथीचा काळ लक्षात घेता, याठिकाणी स्वच्छता विषयक सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून पाहुण्यांच्या सुरक्षेची हमी राहते. येथील सर्व कर्मचारी वर्गाने लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पर्यटकांना प्रवेश घेताना, बुकिंग दरम्यान लसीकरण प्रमाणपत्रे सादर करावे लागेल. सर्वच थांब्यांवर हात निर्जंतुक करण्याची सुविधा आहे.
इथल्या परिसरात प्रवेश घेताच क्षणी तुम्ही या गावाचा एक भाग होऊन जाता..

आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत.
मॉंटेरिया व्हिलेजमध्ये सर्व-समावेशक पॅकेजची सुविधा असून त्यात सकळचा नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि मॉंटेरिया व्हिलेज अनुभवाची सुविधा आहे. प्रती दिवस माशी खर्च रु 999 (मूल), रु 1499 (ज्येष्ठ नागरीक) आणि रु 1699 (प्रौढ) याप्रमाणे दर आहेत.
नोंदणीची माहिती: www.monteriavillage.com

मॉंटेरिया व्हिलेजविषयी
मॉंटेरिया व्हिलेज हे एक पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आदर्श ग्राम जीवनावर आधारलेले ठिकाण आहे. हे रायगड जिल्ह्यातील खालापूर शहरात सुमारे 36 एकरवर विस्तारलेले आहे. इथे निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना भारतीय गावातील नियमित जीवनासोबत संस्कृती, आहार वैविध्य, मनोरंजन, कला आणि परंपरेचा आनंद घेता येईल. इथे येऊन प्रत्येक वयोगटातील व्यक्ती पुन्हा बालपणात रमेल आणि मुळाशी जोडली जाईल. मॉंटेरिया व्हिलेज हा मुख्य हॉस्पिटलिटी फर्म Monteria Resort Pvt. Ltd. चा भाग असून मुंबईलगत असलेल्या लोकप्रिय रिसॉर्टपैकी एक आहे.

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या सामाजिक कार्यकर्त्यांन सह विद्यार्थ्यांची मागणी .

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

कारंजा (घा ) /प्रतिनिधी :इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली .तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये वर्धा जिल्ह्यातील वर्ग 10 व वर्ग 12 हे कोरोना संसर्गजन्य आजारामुळे मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन भरविण्यात आले आहे .सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले .ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या पालकांची इच्छा पाहता वर्ग 10 व 12 वी ची परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोना विषयक भीती दूर होईल कोरोना चा प्रादुर्भाव कमी करता येईल .या बाबी लक्षात घेता परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली .यावेळी सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर , राणा सिंग बावरी ,संकेत बानाइतकर ,प्रज्वल कडू ,रिपल डोंगरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस – राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू परतवाडा येथे मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ

0

 

 

उषा पानसरे( कार्यकारी संपादिका) विकी वानखड़े (कार्यकारी संपादक)

बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच जेवणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मध्यान्य भोजन योजना कामगारांना निश्चितच मदतनीस ठरणार, असा विश्वास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजनेंतर्गत मध्यान्य भोजन योजना राबविण्यात येते. अचलपूर उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार मदन जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभयकुमार बारब्दे, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे आदी यावेळी उपस्थित होते.

मजूरांना पूर्ण व सकस अन्न उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून श्री. कडू म्हणाले की, बांधकाम क्षेत्रातील मजूर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात येतात. कामानिमित्त मजूरांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणावर होते. कामाच्या अनिश्चिततेचा परीणाम त्यांच्या जेवणावर होतो. याचा परीणाम कामगारांच्या शारिरिक क्षमतेवर होतो. यासाठी कामगारांना रोज सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात येते. कोरोना काळ असल्यामुळे सध्या मध्यान्य भोजन योजनेत कामगारांना मोफत भोजन देण्यात येत आहे. नोंदणीकृत मजूरांची संख्या लक्षात घेऊन भोजनाची व्यवस्था करण्यात येते. परंतु नोंदणी अभावी एकही बांधकाम कामगार उपाशी राहू नये, याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. नोंदणी न झालेल्या बांधकाम कामगारांची त्वरित नोंदणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मध्यान्य भोजन योजनेमध्ये कामगारांना एका वेळच्या भोजनात बाराशे कॅलरीज मिळतील एवढा आहार देण्यात येतो. या आहारात पोळी, दोन भाज्या, डाळ, भात व इतर आहाराचा समावेश आहे. या योजनेमुळे कामगारांच्या स्थलांतरावर आळा बसून कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. परतवाडा येथे प्रथमच कामागारांसाठी मध्यान्य भोजन योजना सुरु होत असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मध्यान्य भोजन योजना सध्या अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु राहील. गरजेप्रमाणे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मजूरांना भोजन उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती राहुल काळे यांनी यावेळी दिली.

जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाला लवकरच नवीन इमारत

जिल्हा व अप्पर जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघामार्फत राज्यमंत्री श्री. कडू यांचा सत्कार करण्यात आला. वकील संघासाठी नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी संघामार्फत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. न्यायालयीन कामांना वेग येऊन प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी न्याय व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. न्यायदानाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज असावी. विधीज्ञांना बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र कक्षांचा त्यात समावेश करण्यात येईल. तसेच आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येऊन न्यायालय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कडू यांनी यावेळी दिले. वरिष्ठ विधिज्ञ ॲङ सुरेश गुलक्षे, संघाचे अध्यक्ष ॲङ विजय गोडबोले, उपाध्यक्ष ॲङ. मोहम्मद सलिम, सचिव ॲङ आशिष अग्रवाल तसेच विधिज्ञ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष हिवराळे तर आभार श्री. सलिम यांनी मानले.

श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परीसरातील रस्ते बांधकामाचा शुभारंभ

परतवाडा येथील श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परिसरात रस्ते बांधकाम, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण कामाचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हे विकास काम करण्यात येणार असून यासाठी 51 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता संस्थानामार्फत श्री. कडू यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मिश्रा चौक येथील गणपती सभागृह बांधकाम, टिळक चौकाचे डांबरीकरण, आठवडी बाजार ते पोलीस स्टेशन रोड डांबरीकरण तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

Bacchu Kadu

पुष्पा सिनेमा स्टाईलने चंदन तस्करी करण्याचा डाव फसला सुलतानपूर ते बोरखेडी रस्त्यावर चंदनाची तस्करी करताना

0

 

एकास अटक 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोणार /सतीश मुलंगे:

| सध्या सुरू असलेल्या पुष्पा सिनेमा ने धुमाकूळ | घातला आहे. त्याच स्टाईलने चंदन तस्करी | करण्याचा डाव सुलतापुर बोरखेडी रस्त्यावर फसला. सुलतापूर ते बोरखेडी रस्त्यावरून काही | लोक सुगंधित चंदनाची चोरून वाहतूक करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून | उपविभागीय पोलीस विलास यामावार यांना मिळाली होती.

त्यानुसार उपविभागीय पोलीस | अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई | करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने | सुलतानपूर बोरखेडी रस्त्यावर पथकाने सापळा

रचला. बोरखेडीकडून सुलतानपूरकडे पोलिसांना सह कलम २६ (१ (इ) भारतीय वनअधिनियम एक मोटारसायकल ट्रिपल सीट येताना दिसली मात्र पोलीस दिसताच मोटरसायकलवरील दोन जण हातातील पांढरे पोते टाकून पळून गेले तर मोटारसायकल चालक आसिफ खान फिरोज खान याला पोलिसांनी पकडले.

त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम सुगंधित चंदनाचा गाभा ( किंमत ३६०० रुपये ) सुगंधित चंदनाचा गाभा असलेली ७ लाकडेमेहकरच्या उपविभागीय पोलीस ( किंमत २३ हजार रुपये). एक मोटारसायकल दोन मोबाइल व लाकूड तोडीची अवजारे असा एकूण ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४भादवी

१९२७ प्रमाणे सह कलम १२८/१७७.३/१८१, १५८/१७७ गुन्हा दाखल केला आहे. आसिफ खानची चौकशी केली असता त्याच्याच गावचा मनोज उत्तम गवई व शेख शोएब शेख ईसा ( रा. नवीन घरकुल, लोणार) फरार झाल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आसिफ, मनोज आणि शोएबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिकाऱ्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मदन गीते पोहेकाँ खालिद खान पो. ना. कैलास मुदळकर, पोकों समाधान पवार, चालक पोकाँ विलास जायभाये यांनी केली.

पंचायत समिती देवणी येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामास मंजुरी

0

 

(लातुर/निलंगा)प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

देवणी येथे पंचायत समितीची नुतन व सुसज्‍ज इमारत तयार झालेली आहे. मात्र पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्‍थान नसल्‍याने त्‍यांची गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात येताच आमदार श्री.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांनी देवणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्‍या निवासस्‍थानासाठी प्रशासकीय मान्‍यता द्यावी व निधी उपलब्‍ध करून दयावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री ना.श्री.हसन मुश्रीफ यांच्‍याकडे पत्राद्वारे केली.
एवढ्या वरच न थांबता संभाजीभैय्यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कार्यासाठी १३ कोटी ३ लाख रूपयांच्या निधीसह प्रशासकीय मान्‍यता मिळवली. त्यामुळे देवणी पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आता एकुण २६ निवासस्‍थाने या निधीच्‍या माध्‍यमातून उभारली जाणार आहेत.अशी माहिती देण्यात आली.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,जिल्हा शिक्षण विभाग बैठक अमरावती कैवल्य एजूकेशन फाँडेशन बैठक

0

 

उषा पानसरे असदपूर मूख्य कार्यकारी संपादक
9921400542

याचीसंयूत्त विधमाने जिल्हा गूणवत्ता बैठक घेण्यात आली बैठकीची सूरूवात रूबिना सैफ कार्यक्रम व्यवस्थापक ,कैवल्य संस्था यांनी संस्थेची त्याचा कामाची ओळख करूण दिली कैवल्य एजूकेशन फाँउनडेशन ही संस्था ही शैक्षणित क्षेत्रा मध्ये दोन हजार आठ पासून देशात कार्यरत आहे संस्थेचा उद्देश शैक्षणित गूणवत्ता वाढ महीला सक्षमीकरण तसेच तांत्रीच सहकार्यातून शैक्षणित यंत्रणा ना सक्षम करण्या करिता सहकार्य या अनूषगाने हि संस्था काम करित आहे पवन कूमार यांनी या संस्थेच्या उपक्रमांची मांडणी केली तर मिलींद कूबडे प्राचार्य यानी सूरूवात उपक्रमाने ता. शिक्षण अधिकारी फेलो यांचे समन्वाने गाव पातळी वर शिक्षक ,मूख्यध्यापक यांच्या सोबत पारदर्शकता ठेवून कार्य करता येवु शकते या बैठकीला मिलींद कूबडे प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था अमरावती श्री गंगाधर मोहने उपशिक्षण अधिकारी ,जिल्ह परिषद अमरावती श्री प्राशांत डवरे जेष्ठ अधिव्याख्याता प्रविण राठोड अधिव्याख्याता पवन मानकर अधिव्याख्याता रूबिना सैफ प्रकल्य व्यवस्थापक कैवल्य संस्था ई मान्यवर उपस्थित होते तसेच 14 तालूक्यातील करूणा फेलोज पवन कूमार श्री स्वप्निल बनसोड, सिमा खान !जोत्याना मेहकरे प्रोग्राम लीडर सहभागी

यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. :-अजित पवार

0

 

SURYA MARATHI NEWS

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक) सह विकी वानखड़े (संपादक)

दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा साठ लाख नोकऱ्यांचं नवं गाजर दाखवण्यात आलं आहे. ‘एलआयसी’च्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणूका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेनं केंद्र सरकारनं काय केलं याच उत्तर आता तरी द्यावं. ‘मेक इन् इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरुन जातील, असं दिसतं. महागाईवाढ कमी करण्यासाठी आणि रोजगार वाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा नाही.कॉर्पोरेट टॅक्स १८ % वरून १५ % केला. मात्र, प्राप्तिकराची मर्यादा वाढवणं आणि कराचा दर कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा नसल्यानं मध्यमवर्गीय नोकरदारांची, सामान्य करदात्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त करण्याची घोषणा झाली. हिऱ्यांचे दागिने स्वस्त झाले. पण, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस या जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करायला केंद्र सरकार सोयीस्कर विसरलं. यातून त्यांचा प्राधान्यक्रम दिसतो. गरिबांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यावरील तसंच शेतकऱ्यांच्या खतावरील अनुदानाची रक्कम कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. गरीब, वंचित घटकांना, शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. सध्याचं केंद्रातलं सरकार हे प्रसिद्धीवर चालतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारच्या एका कार्यक्रमासाठी साठ-पासष्ट कॅमेऱ्यांचा सेटअप लावला जात असल्याचं आपण बघितलं आहे. या पार्श्वभूमीवर कॅमेऱ्याच्या लेन्सवरील कर कमी करण्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा निर्णय संयुक्तिक वाटतो. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी नवी केंद्र उभारण्याची घोषणा करताना सध्याच्या केंद्राच्या बळकटीकरणासाठी काय करणार, याबाबतही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणा चालू वर्षातंच नाही तर पुढच्या तीन वर्षांत तरी मार्गी लागतील का, याबाबत शंका आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे आणि सर्वसाधारण बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची तरतूद अपूरी आहे. अहमदाबादला ‘गिफ्ट सिटी’ची गिफ्ट किती वर्ष सुरु राहणार आणि केव्हा संपणार हे समजून येत नाही. अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील या बाबींव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सवलती देण्यात आल्या नाहीत. वंचित घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट म्हणजे क्रिप्टो करन्सीवर ३० टक्के कर आकारण्यात आल्यानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आर्थिक उद्योगाला फटका बसणार आहे. राज्यांना भांडवली खर्चासाठी देण्यात येणाऱ्या व्याजमुक्त ५० वर्षाच्या कर्जामध्ये केंद्र सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद दहा हजार कोटींवरुन १५ हजार कोटी करण्याच्या तसंच पुढील वर्षासाठी ही तरतूद १ लाख कोटी करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं स्वागत आहे. हे कर्जवाटप करताना अनावश्यक जाचक अटी लावू नये, अन्यथा राज्यांना याचा फायदा मिळणार नाही. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जानेवारी २०२२ मध्ये जीएसटीची वसूली सर्वोच्च झाली असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याचा फायदा राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तू व सेवाकराची वसूली वाढल्यामुळे राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा वाढवणं आवश्यक आहे. वस्तू व सेवाकराच्या वसुलीतील नुकसान भरपाई राज्यांना मिळण्यास पुढील ५ वर्षे मुदतवाढ देण्याची विनंती राज्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही; यानंही राज्यांची निराशा झालेली आहे. राज्याची वस्तू व सेवाकर नुकसान भरपाईची थकबाकी राज्याला त्वरित मिळावी.

अखेर वादग्रस्त ठाणेदार किशोर तायडे शिकायत कर्ता सोबत उददंड व्यवहार !शेवट बदली

0

 

उषा पानसरे असदपूर
दि.1 /फेब्रूवारी

आसेंगाव पूर्णा पोलिस स्टेशन ठाणेदार किशोर गोरख तावडे सहायक पोलीस निरिक्षक याची बदली करण्यात आली वादग्रस्त ठाणेदार फिर्यादी सोबत उद्धट वागणूक ,करून ठाण्यातून तक्रार दाखन , न करता हाकलून देत असल्यास ,व अवैद धंदे वाल्याना श्रेय देत असल्या , फिर्यादी याची बाजू न घेता आरोपी ची बाजू घेवून फिर्यादी ला पोलीस पाटील च्या मदतीने फिर्यादीलाच खोटया गून्हाची फाईल तयार करूण गून्हा दाखल करणार्‍या ठाणेदाराची ची शेवट बदली आम नागरिकांचा आरोप गरिब जनता खूश आसेगाव चे नविन ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल पोस्टे आसेंगाव येथे आले पोलीस अधिक्षक ग्रामीण श्री अविनाश बारगळ अमरावती प्रत मार्फत उपविभागिय पोलीस अधिकारी,उपविभाग अमरावती ग्रामीण प्रत माहितीस अपर पोलीस अधिक्षक पोलीस उप अधिक्षक उपविभागिय पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण प्रभारी अधिकारी पोस्टे आसेगाव / सी,आर,ओ / पी,आर ,ओ स्थागूशा जिवीशा अम ग्रा
प्रत सविनय सादर मा. पोलीस उप महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती कार्यवाही साठी प्रभारी अधिकारी पोस्टे सायबर अमरावती ग्रामीण सदर आदेश उपरोक्त संबंधितास ईमेल द्रारे आजच प्रसारित केले

जि, प,पूर्व माध्यमिक उर्दू शाळा पूर्णा नगर येथे 73, वा प्रजा सत्ताक दिन उत्साहात साजरा

0

 

उषा पानसरे असदपूर

जि,प.पूर्व माध्यमिक उर्दू शाळा पूर्णा नगर येथे 73 वा प्रजासत्ताक दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,, पूर्णा नगर, प, स, भातकुली अंतर्गत येणाऱ्या पूर्णा नगर येथील मुख्यधयपाक, मो, अशफाक अ, रज्जाक सर यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले, व पूर्णा नगर येथील श्री, गजेंद्र सिंह गहरवार, सरपंच, अ, अलीम अ, तमीज शेख, शाळा समिति अध्यक्ष, मो, नाज़िम काजी, शेख, महबूब, सदयस व नाजमीन बाजी यांनी आपले मनोगत व्यक्तत केले, तसेस शाळेतील शिक्षक, व शिक्षिका, अ, फारूक सर नवेद इक़बाल सर, नगमा बाजी,, नूरजहाँ बाजी, नाजिया बाजी, सायरा बाजी शबाना बाजी, उपस्थित होते, नवेद सर यांनी आभर प्र दशन केले,

नेहरू युवा केंद्राच्या वतीने…शेगावात युवक – युवती सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळा

0

 

शेगाव : युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नेहरू युवा केंद्राची भूमिका फार महत्वाची असून युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहरू युवा केंद्राची वाटचाल आहे त्यामुळे युवक युवतींनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र मध्यम करावे असावे असे मत तहसीलदार समाधान सोनवणे यांनी १ फेब्रुवारी रोजी केले आहे.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित सकारात्मक जीवनशैली व युवक युवती सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पंपंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. दिपप्रज्वलन व गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार समाधान सोनवणे तर परिविक्षाधीन तहसीलदार पवन पाटिल, विस्तार अधिकारी संदिप दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश चिंचोलकर, नानाराव इंगळे, युवा विकास केंद्र अध्यक्ष लक्ष्मणराव गवई, शीला मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समितीत ग्रामीण भागाचे कामकाज कशाप्रकारे चालते याचे अवलोकन उपस्थितांनी प्रत्यक्ष केले त्यानंतर सखोल मार्गदर्शन विस्तार अधिकारी संदिप दळवी यांनी केले त्यानंतर कोरोना विषयावर जनजागृती आपल्या मनोगतातून डॉ.प्रकाश चिंचोलकर यांनी केली. तर शीला मोहोड व नानाराव इंगळे यांनी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून महिलांसाठी असलेल्या योजनां सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कोमल बेडेकर, द्वितीय अंकिता झाडोकार व तृतीय गीतांजली शास्त्री यांनी पटकवल्याबद्दल त्यांना तहसीलदार समाधान सोनावणे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सुरज बोरसे, निशा हागे, शिवाजी हावरे, सुमित वाकोडे, दर्शन गवई मातृशक्ती संघटनेच्या वैशाली तायडे, मुक्ता ठाकूर, वर्षा भोंडेकर, नारीशक्तीच्या निता पाटिल, रिपाई गटाच्या राजकन्या रेवसकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोंडेकर यांच्यासह युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावित लक्ष्मणराव गवई तर संचालन पत्रकार अमर बोरसे यांनी व आभार स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी मानले.
# नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तहसीलदार समाधान सोनवणे, पवन पाटिल, विस्तार अधिकारी संदिप दळवी यांच्याहस्ते देण्यात आले.