Home Blog Page 338

नायगाव येथील पंतप्रधान आवास योजना ( ड यादी )यात पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात येवुन अपात्र लाभार्थ्यांची घरकुल मंजुर ग्रामस्थांची बिडीओकडे तक्रार

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेची ड यादीत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून त्यांना तात्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे. तसेच अपात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम पंचामतच्यावतीने दि. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतु, दि. २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली आहेत. ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आले आहे. त्यांची घरकुल मंजूर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा, अपंग आणि बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी, विनोद बाबु तडवी, लुकमान महारू तडवी, सुभान इमाम तडवी, छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी, रशीद निजाम तडवी, फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी,IAS नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेची ड यादीत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून त्यांना तात्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे. तसेच अपात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम पंचामतच्यावतीने दि. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतु, दि. २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली आहेत. ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आले आहे. त्यांची घरकुल मंजूर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा, अपंग आणि बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी, विनोद बाबु तडवी, लुकमान महारू तडवी, सुभान इमाम तडवी, छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी, रशीद निजाम तडवी, फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

कृषिपंपाची वीज बंद केल्याने शेतकरी आक्रमक वीज बिल घ्या पण लाईन द्या शेतकऱ्यांची मागणी

0

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : तालुक्यातील वरखेड बुद्रुक जवळा टाकळी नागझरी परिसरातील कृषिपंपाची वीज पुरवठा बंद केल्याने शेतकरी आक्रमक होऊन शेगाव येथील वीज कार्यालयावर धडकले सुरू करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरले
शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक जवळा नागझरी टाकळी शिवारात यांचे कृषी पंप आहेत सध्या रब्बी पिके जोरात असून पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी वीज पुरवठा गरजेचा असून द्यायला तयार आहोत मात्र वीज पुरवठा बंद करू नका वीज पुरवठा सुरू ठेवा अशी मागणी शेतकऱ्यांनी उप विभागीय अभियंता शरद भोसले यांच्याकडे केली परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी पंप धारक शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे प्रथम शुक्रवारी एका डीपीवरील बंद केला नंतर दुसऱ्या डिलिव्हरी बंद पुरवठा बंद करण्यात आला त्यावर सोमवारी परिसरातील शेतकरी एकत्र येऊन आम्ही विज बिल भरण्यास तयार आहोत मात्र आमचे वीज पुरवठा बंद करू नका अशी मागणी करत आम्हाला बिल द्या आम्ही बिल भरतो असे असे सांगून त्यावर उपविभागीय अभियंता यांनी ग्रामीण विभागाच्या कार्यालयात येऊन त्यांना दिलं दोन हात बिल भरणा करून घेतो करून घेत करून घेतला तत्पूर्वी कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत केला यावेळी काँग्रेस नेते केशवराव हिंगणे यानी शेतकर्याची व्यथा उपविभागीय अभियंता शरद पोतले यांना समजावून सांगितली.
यावेळी बंडू पाटील,अशोक पाटील, गोपाळ पाटील,सिध्दार्थ इगळे,प्रसाद सावरकर,वासुदेव हिंगणे,विलास थोंबे,प्रशांत ठाकरे,निलेश हिंगणे,विनायक हिंगणे,गजानन ठाकरे,नवल सावळे आदीसह 150 चे जवळपास शेतकरी उपस्थित होते.
@ विज बिल नियमित भरल्यास ताण कमी होतो.त्यामुळे विज पुरवठा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.विज पुरवठा नियमित करणे हे कर्तव्य आहे. शेतकरी अन्नदाता आहे.त्यांच्या सेवेत विज कार्यालय सदैव तत्पर आहे.नियमानुसार  बिल भरणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
– शरद पोतले
उपविभागीय अभियंता
@ सतत नापिकी अतिवृष्टी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला मात्र सद्यस्थितीत रब्बी पिकाला पोषक वातावरण असून पिकेही चांगले आहेत पाणी पुरेसा आहे तेव्हा वीज पुरवठा आवश्यक असून वीज बिल भरून घ्या,शेतकरी बिल भरण्यास तयार आहे मात्र एकही दिवस विज पुरवठा बंद करू नका.
– केशवराव हिगणे
शेतकरी नेते,

पिळोदा बु॥ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंचानी खोटा ठराव करून गायरान जमीन दिली भाडयाने चौकशीची निळे निशान संघटनेची मागणी

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Iतालुक्यातील पिळोदा बु॥ ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन खोटा ठराव करून विक्री करण्यात आली असुन , या सर्व कारभाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निळे निशान सामाजीक संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . निळे निशान या सामाजीक संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना दिनांक १फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील पिळोदा बु॥ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणी सरपंच यांनी संगनमताने ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन गट क्रमांक व उपविभाग५६८हे बाहेरील सदस्यायांना भाडे कराराने दिली आहे . सदरचा हा प्रकार ग्रामसेवक आणी सरपंच यांनी गावकऱ्यांना अंधारात ठेवुन खोटा प्रोसेडींग बुक नंतर लिहुन खोटा ठराव करण्यात आल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे या प्रकारामुळे पिळोदा बु॥चे ग्रामस्थ हे अडचणीत आले आहे . याशिवाय ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्तीची कामे हे इतर ठीकाणी अत्यंत निकृष्ठ प्रति ची करण्यात येत असल्याची ही ग्रामस्थांची ओरड आहे .पिळोदा बु॥ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणी सरपंच यांच्या मनमानी कारभाराने गावातील ग्रामस्थांना शासनाच्या योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे . ग्रामपंचायतीने गायरानची जमीन विक्री केल्याने गावातील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या काही जणांकडे बकऱ्या , गायी, म्हशी असे पाळीव जनावरे असुन ,या जनावरांना लागणारा चारा हा गायरान नसल्यामुळे गुराढोरांच्या चाऱ्यांची टंचाई झाली आहे . तरी ग्रामपंचायतीने केलेला गायरान जमीनी बाबत विक्री बाबतचा घेतलेला खोटा ठराव आणी ग्रामसेवक व सरपंच यांनी व ग्राम पंचायत विस्तार अधिकारी यांची संगनमताने केलेल्या कारभार करून आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांची तात्काळ ७ दिवसाच्या आत चौकशी करण्यात येवुन संबधीतांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसे न झाल्यास आपण आपल्या पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणास करणार आहे असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे .

आठवडी बाजार दुकानासमोरील उघड्यावर मटन विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

0

 

 

शेगाव, ता.३१ आठवडी बाजार दुकानासमोरील उघड्यावर करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर करवाई करा अशी मागणी
आठवडी बाजार येथील आ.क्र. ३५ मधील सर्व १९ दुकानदार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. पालिकेने करवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. निवेदनात नमूद आहे की दिलेल्या दि. ११/०४/२०१८ च्या नोटीस नूसार आम्ही आ.क्र.३५ मधील दुकानांचा आगाऊ ताबा चाबी देवून घेतला आहे. सदर दुकानांचा ताबा घेतल्यावर जेव्हा आम्ही तिथे नविन व्यवसायास प्रारंभ करण्यास गेलो तेव्हा दुकानांसमोर खुल्यावर मास विक्रीची अंदाजे ३० ते ४० दुकाने आहेत.मास विक्री ही अवैध व उघड्यावर होत आहे. दुकानांसमोरील मांस विक्रीची दुकाने हटवावी दुकानांमध्ये येणाऱ्या दुर्गंधीमुळे कोणीही ग्राहक फिरकत नाही व आम्ही पण आमच्या दुकानात बसु शकत नाही.याबाबत पालिकेने २५ फेब्रुवरी २०२१ रोजी सर्वानुमते आरोग्याच्या तसेच कायदा व सुव्यवथेच्या प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टिने शहरातील मलनिस्सारण केंद्राच्या बाजूला खुल्या जागेत मटण विक्रेत्यांची व्यवस्था करण्यांत यावी. याबाबत येणा-या खर्चात ही सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करीत आहे. पुढील नियमानुसार कार्यवाही मुख्याधिकारी यांनी करावी. असा ठराव सुद्धा पारित केला होता.पण त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अवैध मांस विक्रीमुळे आमच्या दुकानदाऱ्या ठप्प झाल्या आहेत. उघड्यावर असलेली मास विक्रीची अवैध दुकाने ही कायमस्वरुपी बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.निवेदनावर मोहन नावकार,संजय नावकार, संजय राजुस्कर,फिरोज सैफुद्दीन बुरहाणी,राजेश गणेश,दिलीप निकुळे,असमोल हक्क, मुरलीधर काळे,विजय कराळे,संतोष खंडारे,राजेंद्र तायडे,अनुराधा पाटील,संजय धनोकार,रत्नप्रभाबाई मसने, उज्वला मसने,जिजाबाई दिंडोकार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वाईन सोबतच शेतकऱ्यांना गांज्याची शेती करण्यास परवानगी द्या

0

 

करनी सेनेची मूख्यमंत्र्याकडे मागणी

संग्रामपूरः- राज्य सरकारने माॅल, किराणा दुकानावर वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याच प्रकारे शेतकऱ्यांना गांजा, अफू तसेच मोहाची शेती करण्यास परवानगी देण्याची मागणी करनी सेनेतर्फे संग्रामपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी राजपूत करनी सेनेचे विदर्भ अध्यक्ष सागर उर्फ दादा ठाकूर यांनी निवेदन देऊन केली. संग्रामपूर तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत न केल्याने जगाला पोसणाऱ्या जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशी पोटी झोपण्याची वेळ आली आहे. निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची गरज असतांना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निसर्गाचा संकटाचा झेलण्याय्रा बळीराजाला सूल्तानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी राज्य सरकारने वाईन सोबत गांजा अफू तसेच मोहाची शेतीच्या परवानगी सह हातभट्टीची दारू पाडण्याची परवानगी देण्याची मागणी राजपूत करनी सेनेच्या विदर्भ युवा अध्यक्ष सागर उर्फ दादा ठाकूर यांनी मूख्यमंत्र्याकडे केली आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 30 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता घुग्घुस येथील मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बबनराव बोढे यांच्या मार्गदर्शनात वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी घुग्घुस परिसरातील नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात परिसरातील गोरगरीब गरजू रुग्णांची सेवा करने सुरु आहे. सातवी तुकडी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामच्या नेत्ररुग्णालयात पाठविण्यात येत आहे. घुग्घुस व पोंभुर्णा येथे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत होते परंतु दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे गर्दी करता येत नसल्याने महाआरोग्य शिबीर थांबले. तरी सुद्धा गोरगरिब जनतेची आरोग्य विषयक सेवा करण्याचे कार्य निरंतर चालू आहे. त्याअनुषंगाने परिसरातील गोर गरीब गरजू लोकांना आरोग्याची सुविधा मोफत देत आहोत. भविष्यात गोर गरीब गरजू लोकांना आरोग्याच्या संदर्भात अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली आहे. केंद्राचे संचालक श्री. विवेक बोढे यांच्या नेतृत्वात गोर गरिबांची सेवा अविरत पणे सुरु आहे.
घुग्घुस परिसरातील अमराई वार्ड, बँक ऑफ इंडिया, इंदिरा नगर, आंबेडकर नगर, शांती नगर, विद्या टॉकीज, शास्त्रीनगर, श्रीराम वार्ड, साखरा व शेणगाव येथील 20 रुग्णांना मोती बिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज पाठविण्यात आले.
यावेळी भाजपाचे धनराज पारखी, श्रीनिवास कोत्तूर, सुशील डांगे व अजय लेंडे उपस्थित होते.

जळगाव जिल्हाता १०१गावां माध्ये तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतची अटल भूजल योजनेत निवड

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

बोराळे येथील अटल भूजल सर्वेर्क्षण विभाग यंत्रणा यांच्यावतीने शासनाने निवडलेल्या जळगाव जिल्हाता १o१गावां माध्ये तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतची अटल भूजल योजनेत निवड झाल्यामुळे गावात एक दिवशीय कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले यावेळी सरपंच वंदना विनोद चौधरी, यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली यावेळी अटल भूजल योजने विषयी भूजल सर्वेक्षण विभाग जळगाव व श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ जळगाव यांचे मास्टर ट्रेनर श्री दीपक शिंपी, रियाज तडवी ,समीर तडवी ,यांनी प्रशिक्षण दिले बोराळे गावचे उपसरपंच उज्जैन सिंग राजपूत, ग्रामसेवक राजू तडवी ,आशा वर्कर सुनयना राजपूत ,पोलीस पाटील माधुरी राजपूत, मोना राजपूत, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास सिंग राजपूत, ग्रामपंचायत विमलबाई चौधरी, उषाबाई राजपूत, पूनम सिंग राजपूत, सुरेश राजपूत, मोना बाई राजपूत विनोद चौधरी कुंदा सिंह राजपूत मायाबाई राजपूत ,यांची उपस्थिती होती कार्यशाळेत पाणीची बचत भविष्यात साठी किती महत्वाचे आहे याबाबत प्रोजेक्टर द्रारे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी यांनी सहकार्य विकी वानखेडे पत्रकार, व अमर वानखेडे, गणेश राजपूत ,यांनी केले

सुनगाव वासियांचे पाण्यासाठी हाल ग्रामपंचायत पाणीपुरवठा 8 ते 10 दिवसांपासून बंद

0

 

गावकरी पित आहेत बोअरचे धोकादायक पाणी

140गाव पाणीपुरवठा योजना कागदावरच

गजानन सोनटक्के
ता.प्र./जळगाव जा

/दि1फेब्रु
तालुक्यातील सुनगाव चे नागरिक सध्या पाण्यासाठी वणवण फिरत असुन आठवडाभर पासुन ग्रामपंचायत ग्रामवासियानां पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.
त्यामूळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व प्राधिकरण कार्यालय गाठुन पत्रकारासमवेत आपली समस्या मांडली .
सविस्तर वृत्त असे की,
सद्य स्थितीत कागदपत्रे तपासले असता 2017 च्या करारानुसार सुनगाव हे प्रादेशिक 140 गाव पाणीपुरवठा योजना मधे समाविष्ट असून येथे करारानुसार वारी हनुमान चे पाणी पोचायला पाहिजे परंतु प्रत्यक्ष जाणून घेतले असता आजही140गाव योजना वारी हनुमानचे पाणी सुनगाव करांच्या नशिबात नसून गावच्या विविध दिशेने वेगवेगळ्या बोर मधून चार-पाच ठिकाणचे आरोग्यास धोकादायक पाणी जमा करून ते वितरित केल्या जात आहे आणि हे पाणी वितरण करीत असतांना सुद्धा त्यामध्ये नियमितता नाही ,
चार पाच दिवसातून नळ येतात त्यातही महिन्यातून एक-दोन वेळा पाइपलाइन फुटून पाणीपुरवठा मध्ये खंड पडतो हीच परिस्थिती सतत दोन वर्षापासून आहे याविषयी सरपंच व प्रभारी ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या म्हटल्यानुसार एकशे चाळीस गाव योजनेच्या पाईपलाईन मधून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही व आम्ही आजपर्यंत कधीही पूर्ण टाकी भरून हे पाणी वितरित केले नाही ,ही योजना टाकी भरण्यास असमर्थ असुन त्यामूळे आम्ही जुने योजनेतून पाणीपुरवठा करतो असे संगितले,त्याचप्रमाणे जे पाणी आम्ही वापरलेच नही त्याचे 32 लाख रुपये बिल कसे काय दिले असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी पत्रकारांसह प्राधिकरण ऑफिस गाठले असता ,
शाखा अभियंता यांच्याशी संवाद केल्यावर त्यांच्या माहितीनुसार 2017 पासून नियमित सूनगावला पाणी पुरवठा सुरू असून ग्रामपंचायतचे कोणत्या कारणाने हे पाणी वापरत नसावी व पर्यायी पाणीपुरवठा करत असावी याविषयी आश्चर्य व्यक्त केले तसेच आमच्या योजनेत कुठलाही दोष नसून सुनगावला पाणी पुरवण्यास ही योजना समर्थ आहे ,
मात्र मागील तीन महिन्यापासून बिल न भरल्यामुळे आम्ही हे कनेक्शन बंद केले आहे .
ग्रामपंचायतीने बिल भरल्यास आम्ही पाणी नियमित करू असे सांगितले.
ग्रामपंचायत व प्राधिकरण यांनी ही परस्पर विरोधी मते व्यक्त केल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र तहानेने व्याकूळ होत कसेतरी मिळेल त्या धोकादायक पाण्याने आपली तहान भागवत आहे,तरी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी व जल योद्धा म्हणून प्रसिद्धी पावलेले माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यामध्ये लक्ष घालतील काय ? व सुनगाव वासियांना वारी हनुमान चे 140 गाव योजनेचे शुद्ध पाणी मिळवून देतील काय?
ही मागणी जोर धरत आहे!
विशेष म्हणजे गावातून पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य स्थानिक असताना यांचे मौन का त्यांनीही मागील तीन वर्षात हा प्रश्न सोडवण्यासाठी मागील ग्रामपंचायत समिती सह कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही,
नवीन आलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्यापुढे हे 32 लाख रुपये बिल कसे भरावे हे संकट उभे असून लवकरच ते काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
====================
लक्षवेधक मुद्दे
*2017पासुन गावात 140गाव योजना लागू आहे तर आजपर्यंत नियमित पाणी का मिळाले नाही?
*पाणी मिळाले नाही तर ग्रामपंचायत ने ही योजना परत का केली नाही?
*प्राधिकरणात 87600रु अनामत रक्कम भरल्यावरही पाणी न मिळाल्याने वेळेवर प्राधिकरणास का कळवले नाही.
*पाणी च येत नाही तर 32लाख रुपये बिल कसे आले?
*गावकरी नागरिकांनी भरलेले पाणी कर चे पैसे कोणत्या कामात वापरले गेले?
*बोअर चे आरोग्यास धोकादायक पाणी पिउन गावात कीडणी पेशण्ट वाढल्यास जबाबदार कोण?
*सुनगाव कराना वारी हनुमानचे शुध्द पाणी केव्हा मिळनार?
====================
###################
मी पदावर आल्यापासून एक ही दिवस 140गाव योजनेच्या पाण्याने टाकी भरु शकली नाही,कमी प्रेशर असल्याने व वारंवार पाईपलाईन फुटल्यने आम्ही ही योजना वापरत नाही ,जर प्राधिकरण चमुने 8 दिवस सतत टाकी भरुन दाखवल्यास आम्ही ट्प्याने बिल भरुन या योजनेचा स्विकार करू
-रामेश्वर अंबड़कार सरपंच सुनगाव
##################
ग्रामपंचायत सुनगावला आम्ही 2017पासुन योजना कार्यान्वीत असून,आमची पाईपलाईन व्यवस्था व पुरवठा सज्ज असुन आम्ही गावापर्यंत पाणी पोचवुन ठेवलं आहे,तसेच त्याची ट्रायल देखील ड़ेमो देऊन केलेली आहे,आज रोजी व्याजासह सदर सुनगाव ग्रामपंचायत वर आमचे विभागाचे 31,96,891रु थकित आहेत. त्यामूळे 3 महिन्याने पाणि रोखण्यात आले आहे,जर आम्हाला ट्प्याने जरी बिल मिळाले तरी आम्ही पूर्ववत पाणी सूरु करू.
-मुकेश वैद्य
शाखा अभियंता
140 गाव प्रादेशीक पाणीपुरवठा योजना जळगाव जामोद
===================

भर दिवसा धूर्यावरून दुचाकी लंपास

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : कांदा पिकाबद्दल
मार्गदर्शन करण्यासाठी धुऱ्यावर मोटारसायकल लावून शेतात गेलेल्या सुमिटूमो केमिकल्स कंपनीच्या मार्केटिंग कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्याने गायब केली. शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गुलाबराव गाडगे (२८, रा. पाटील मंडळी पातूर जि.) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. मनसगाव (ता. शेगाव) शिवारातील कैलास वाकर यांच्या शेतातील धुऱ्यावर ही घटना २८ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.

गाडगे हे सुमिटूमो कंपनीच्या शेतकी विभागात मार्केटिंगचे काम करतात. ते हीरो कंपनीच्या एचएफ डिलक्स मोटारसायकलीने (MH 30 AW9965, किंमत २५ हजार रुपये) अमोल पाटील (रा. काजीखेड ) यांच्या शेतात आले होते. कैलास वाकर (रा. काजीखेड) यांच्या मनसगाव शिवारातील शेताच्या धुऱ्याजवळ मोटारसायकल लावून ते पाटील यांच्या शेतात कांदा पिकाचे मार्गदर्शन करण्यासाठी गेले. थोड्या वेळाने परत मोटारसायकलजवळ आले असता मोटारसायकल दिसली नाही. आजूबाजूला परिसरात शोध घेऊनही मिळाली नाही. त्यामुळे काल, ३० जानेवारीला शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार गाडगे यांनी केली. तपास ASI शुल्का साहेब करत आहेत.