Home Blog Page 339
0

 

 

मुंबई- सुर्या मराठी न्यूज

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून मान्यवरांसह सर्वसामान्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

 

लता मंगेशकर यांनी आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. यानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून या कालावधीत सर्व शासकीय कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे लतादिदींच्या निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह समाजाच्या विविध स्तरांमधील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

 

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

लता मंगेशकर यांचं पार्थिव १२.१५ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी बाहेर नेण्यात येईल. १२.३० ते ३ पर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

शैक्षणीक क्षेत्रात राजकीय हसाक्षेप करणारा काका छायदा रद्द करा : सचिन देशमुख

0

 

इन वृत्तसेवा सतीश मुलंगेलोणार दि 6फेब्रु २०२२

मविद्या सरकारने विद्यार्थ्यांच्या जिवनाशी खेळणारा विद्यापीठ स्वायत्ततेवर गदा आणणारा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचेकडे लोणार भेटी दरम्यान निवेदनाद्वारे केली आहे.

उच्च शिक्षण क्षेत्रात प्रागतिक पुरोगामी व सदैव प्रयोगशील म्हणून महाराष्ट्र राज्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा आहे राज्यात नुकताच करण्यात आलेली विद्यापीठ कायद्यातील दुधारणा राज्यातील विद्यापीठाच्या स्वायत्ततेला राजकीय हस्तक्षेपाचा धोका निर्माण करणारा आहे यामुळे विद्यापीठ स्वायत्ततेवर गदा येणार आहे. दिनांक १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने

विद्यापीठ स्वायत्ततेवर स्वतः चे नियंत्रण आणण्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करत काही निर्णय घेत मंकीमंडळात मंजुर केले आहेत. सदर प्रस्तावित निर्णयाचे येत्या अधिवेशनात कायद्यात रूपांतर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे, या निर्णयानुसार राज्या अंतर्गत असलेल्या सर्व विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असुन देखिल कुलपतींची थेट नियुक्ती गुरु शकणार नाहीत. राज्य सरकारने सुचविलेल्या नावापैकीच कुलगुरूची निवड राज्यपालाना छरावी लागणार आहे. प्र. कुलगुरू करून हे पद निर्माण त्यावर राज्याचे उच्च व तंशिक्षण मंत्री यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे बदल म्हणजे राज्यातील विद्यापीठा च्या स्वायत्ततेवर घाला घालणारे आहेतया निर्णयामुळे विद्यापीठांच्या कामकाजात अवाजवी राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता अधिक आहे. सर्व विद्यापीठाचे प्रमुख असलेल्या राज्यपालांच्या अधिकारां ● ना कमी करण्याचा हा प्रयत्न राज्य सरकार कडून होत आहे या बाबीचा विद्यापीठातील गुणवत्ता धारक विद्यार्थी,

प्राध्यापक यांचेवर होणार आहे. यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा धरण्याची घसरण्याची भिती आहे म्हणून हा कायदा रद्द करावा अशी मागणी देशमुख यांनी लोणार एम. टी. डी.सी. येथे निवेदन देक व्दारे केली आहे.

यावेळी देशमुख यांचेसोबत भाजयुमो जिल्हा

उपाध्यक्ष सुंदर संचेती, तालुकाध्यक्ष शुभम बनमक, शहराध्यदन दिपक चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य किरण जोशी, विनोद योखे आदि कार्यकर्ते उपस्थित होले

घुग्घुस येथील वेकोलीच्या (wcl) कामगार वसाहतीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

भाजपच्या पाठपुराव्याला मोठे यश

शनिवार 5 फेब्रुवारी पासून वेकोलीच्या रामनगर, इंदिरा नगर, सुभाष नगर, गांधी नगर, राजीव कॉलनी या कामगार वसाहतीच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या घुग्घुस भाजपाच्या मागणीला मोठे यश आले आहे.
वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस भाजपाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन वेकोली वणी क्षेत्राच्या विविध वसाहतील रस्ता दुरुस्ती करणे, क्वार्टरची दुरुस्ती करणे, साफसफाई करणे अशी मागणी करण्यात आली.
त्याअनुषंगाने भाजपाच्या मागणीची तात्काळ दाखल घेत रामनगर वसाहतीत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले तसेच इतर कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, भाजपाचे मल्लेश बल्ला, श्रीकांत सावे विक्की सारसर, मास्टर बहुराशी यांनी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली व रस्त्याचे काम सुरु केल्याबद्दल वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे तथा उप क्षेत्रीय प्रबंधक श्री. ओमप्रकाश फुलारे यांचे आभार व्यक्त केले.

मंदीरात गेल्यानं मागासवर्गीय समाजावर बहिष्कार

0

 

(लातूर/ निलंगा) प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

पुरोगामी महाराष्ट्रात २१ व्या शतकातही विचार अजूनही जातीच्या विळख्यात गुंतलेली आहेत. निलंगा येथील ताडमुगळी गावात मागासवर्गीय असलेल्या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तीन दिवसांपूर्वी गावातील मागासवर्गीय समाजातील तरुणाने मंदिर प्रवेश केल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मागासवर्गीय समाजाने मंदिराच्या बाहेरुन दर्शन घ्यावे ही प्रथा गावात होती. ही प्रथा मोडल्यामुळे समाजात तेढ निर्माण झाला. यामुळे गावातील संपूर्ण मागासवर्गीय सामाजावर बहिष्कार टाकण्यात आला.
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी या समाजासाठी गावातील दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे . शेतातील मजूरीसाठी बोलावने बंद करण्यात आलं. दोन दिवसांत याची चर्चा पोलिसांपर्यंत गेली. औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त लावला. सर्वाशी चर्चा करत प्रकरण तुर्तास तरी मिटवले आहे.

पिंप्री गवळी फाटा येथे नाकाबंदी करुण 5 पेटी देशी दारू सह 53हजाराचाचा मुद्देलाम जप्त .खामगाव पोलीसांची कारवाई.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

खांमगाव – अपर पोलीस अधीक्षक खामगांव , यांना आज दि.५/फेब्रुवारी रोजी गुप्त माहिती मिळाली कि ,स्कूटी क्रमांक MH-28 AH-1606 वर देशी दारुची कोलोरी ते खामगांव मार्गावर अवैध वाहतूक होत आहे. त्या प्रमाणे अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील पोलिस अंमलदार पो. हे. काॕ. गजानन बोरसे, पोलीस नाईक गजानन आहेर , रघुनाथ जाधव , संदिप टाकसाळ , पोलीस कॉन्स्टेबल राम धामोडे यांनी पिंप्री गवळी फाटा येथे नाकाबंदी करुण सदर वाहन पकडून वाहनावरील 5 पेटी देशी दारू किंमत 15हजार रुपये वाहन ,व वाहन बाॕटलसह सह 53 हजार 40/- चा मुद्देलाम जप्त करुण आरोपी विरुद्ध पो. स्टे .खामगांव ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रस्तुत कारवाई श्री . अरविंद चावरिया ( भा.पो.से. ) पोलीस अधीक्षक , बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्रवण दत्त एस , अपर पोलीस अधीक्षक , खामगांव यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय , खामगांव यांचे पथकातील पोलीस पोलीस अंमलदारांनी केली आहे.

घुग्घुस येथे श्री. शिवमार्कंडेय महामुनी मूर्ती प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील घुग्घुस-वणी मार्गांवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जवळ पद्मशाली सामाजिक बहूउद्देशीय संस्था घुग्घुसच्या वतीने श्री महर्षी मार्कंडेय जयंती निमित्त श्री शिवमार्कंडेय महामुनी मूर्ती प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वणी येथील पद्मशाली समाजाचे दानशूर समाजसेवी अध्यक्ष रमेश सुंकुरवार, उपाध्यक्ष भारत कुरेवार, सरपंच संतोष नुने माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा भाजपाचे अमोल थेरे, सिनू इसारप, पूजा दुर्गम, अनिल मंत्रिवार, काँग्रेसचे नेते शेखर तंगलपेल्ली राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष दिलीप पिट्टलवार उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मंदिराला मूर्ती दान करणारे रमेश सुंकुरवार यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी स्वागत केले.
यावेळी पूजनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सिनू गुडला, उपाध्यक्ष शंकर कटकूरवार, सचिव राहुल पप्पूलवार, कोषाध्यक्ष श्रीरामलू मामीडाला व समाज बांधवानी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन शंकर नागपुरे यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते.

एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी सरपंच परिषदच्या पोलीसांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींवर कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अश्या मागणीचे निवेदन सरपंच परिषद यांच्यातर्फे यावल पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक जितेन्द्र खैरनार यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी  देण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुले व एका तरूण यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले व तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेतील तीनही संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि पीडीत मुलीला आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आले.

या निवेदनावर सरपंच परिषद तालुका सचिव अजय अडकमोल, तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद, तालुका उपाध्यक्ष भूषण पाटील, माहिला तालुकाध्यक्ष अलका पाटील, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, अजय भालेराव, प्रदीप कोळी, नवाज तडवी, निलेश कोळी, वर्षा कोळी, समाधान पाटील, रामकृष्ण सोळंके, दिपक चौधरी, गोपाळ सोळंखे, युवराज पाटील, सुनिल कोळी, आधार खडके, राहूल झगडे, अरूण माळी, विकास सोळंखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केली लोणार सरोवराची पहाणी

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेडे

बुलडाणा = लोणार सरोवर हा आमचा अमूल्य ठेवा आहे. या परिसराचा चांगला विकास झाल्यास हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक या सरोवराला पाहण्यासाठी येतील. त्यामुळे येथील आर्थिक स्थिती सुधारेल लोणार सरोवराच्या विकासासाठी यशोचीत कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे आज शुक्रवार, दि.४ फेब्रुवारी रोजी ‘बुलडाणा’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली. या सरोवरासंदर्भाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली.

अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून लोणार सरोवर ओळखलं जातं. भूगर्भशास्त्र खगोलिय अभ्यासासह जैविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व सर्वश्रृत आहे. बेसॉट खडकापासून निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर जगविख्यात आहे जैविविधतेच्या दृष्टीनेही लोणार सरोवराचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार सरोवराचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निटूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीची मागणी

0

 

(लातुर/निलंगा) प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

जाहिराबाद लातूर महामार्गाचे काम सुरु आहे. यात रस्त्यालगत असलेल्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. संरपचाने हे पाईप बदलून नवीन पाईप त्या ठिकाणी लावत ते पाईप शासकीय रक्कमेतून खर्च दाखवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
निलंगा तालूक्यातील निटूर ग्रामपंचायतीने महामार्गावरील पाईपलाईनचा अपहार केला आहे. ही पाईपलाईन अवजड वाहनामुळे फुटली होती. ती पाईपलाईन कंत्राटदाराने दुरुस्त करून दिली. मात्र यात ग्रामपंचायतने नवीन पाईपलाईनसाठी शासकीय खर्चातून दुरुस्त केली आहे असे पवार यांचे म्हणने आहे.
निलंगा तालूक्यातील मोठी ग्रा. पं. म्हणून निटूरकडे पाहिले जाते माञ या ग्रा. पं. चा कारभार याना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतो .जहिराबाद निटूर लातूर या महामार्गाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे एक दोन ठिकाणी पाईप लाईन अवजड वाहनामुळे फुटली होती आणि ती कंपनी ने दुरूस्त ही करून दिली होती. माञ ग्रा. पं. ने महामार्गाचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स या कंपनी ला पञव्यव्हार करून तुमच्या वाहनामुळे अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली आहे असे सांगून एकूण तीन हजार फूट पेक्षा जास्त पाईपलाईन तसेच रेड्युसर वाॕल दहा अशा प्रकारचे साहित्य कंपनीकडून फुकटात घेतले होते. त्याचा वापर सरपंचाने वैयक्तिक फायद्यासाठी करून काही पाईप शासकीय योजनेत वापरून सरकारी निधी हडप केला असल्याचे तक्रातीत म्हटले आहे. तसेच घेतलेल्या साहित्याची नोंद साठा रजिस्टर मध्ये ही करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे .
दरम्यान घेतलेले सर्व पाईप एकतर स्वतः च्या वैयक्तिक कामासाठी वापरले आहे आणि कांही शासनाच्या योजनेत हेच पाईप वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारदार पवार यांनी म्हटले आहे त्यामूळे शासनाने एक समिती नेमून अपहार करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

हळदी – कुंकू कार्यक्रमातुन महिला सक्षमीकरणाचा “,नारा’

0

 

महिला काँग्रेसनी दिली पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड

( चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : महिला शहर काँग्रेस तुकडोजी नगर वॉर्ड क्रं सहाच्या वतीने दिनांक 03 फेब्रुवारी रोजी तीळ – गूळ व हळदी – कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. विजयाताई बंडीवार,सौ. पदमाताई राजूरेड्डी,सौ.पुष्पाताई नक्षिणे,सौ.दीपा बोकडे यांनी केले असून सदर पारंपरिक कार्यक्रमाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण,स्वरक्षण, यावर जनजागृती करीत महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता नृत्य, गायना सह विविध कार्यक्रम आयोजित केले
कार्यक्रमाचे उदघाटक चित्राताई डांगे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूरेड्डी शहर अध्यक्ष घुग्गूस काँग्रेस हे होते.
प्रमुख अतिथी सौ.नम्रता ढेमस्कर प्रदेश सचिव महिला काँग्रेस, सौ.संगीताताई बोबडे या होत्या कार्यक्रमाचे उदघाटन राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रम शुरू करण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जवळपास 400 ते 450 महिलांनी सहभाग घेतला.
उपस्थित महिलांची ओटी भरूण वाण वाटप केले.
महिलांना संबोधीत करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांनी महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणा बाबत जनजागृतीपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटीका महिला प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर यांनी महिलांना कुटुंब सांभाळीत राजकारणात पुढे यावे प्रत्येक अन्याय,अत्याचारा विरोधात भस्मासूरा सारख्या वाढलेल्या महागाई विरोधात महिलांनी पुढाकार घेण्याचा आवाहन केले.
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी महिलांना स्वयंरोजगारातुन व्यवसाय उभे करण्या संदर्भात मार्गदर्शन करून आपल्यापरीने भरघोस मददतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रस्ताव सौ.पुष्पा नक्षिणे यांनी केले.
तर सूत्र संचालन चैताली गोहोकार यांनी केले तर
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सौ.माधुरी ठाकरे,सौ. सरिता गोहोकार,सौ. राजश्री बोबडे,सौ.शुभांगी नांदे,सौ. स्नेहा बांदूरकर,सौ. सुनिता राखुंडे यांनी केले आहे.