Home Blog Page 341

महाविकास आघाडी सरकार सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या न्यायीक आणि धोरणात्मक समस्यांचे निराकरण करणार काय?

0

 

२० वर्षांनंतरही कंत्राटीच सेवा.

अनिल सिंग चव्हाण  सह विकी वानखेड़े

मुंबई:-महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या स्वायत्त संस्थे द्वारा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त अनुदानातून सन २००० पासून सर्व शिक्षा अभियान नावाचे शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले आहे.
अभियान काळापासूनच राज्यातील विद्यार्थी-शिक्षक व शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी जवळपास सहा हजार करार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.त्यामध्ये शाखा अभियंता,प्रोग्रामर,कनिष्ठ अभियंता,वरिष्ठ लेखा लिपिक, विषय साधनव्यक्ती,दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी संसाधन शिक्षक, विशेषतज्ञ,डाटा एंट्री ऑपरेटर सारखे पद निर्माण करून परिक्षा पद्धतीने जिल्हा निवड समितीमार्फत रितसर पदे भरून त्यांच्याकडून कंत्राटी स्वरूपात महत्त्वाची कामे करून घेतली जातात.
जसे-माहितीचे संगणकीकरण, अनुदानाचे समायोजन,सर्व प्रकारचे शिक्षकांचे प्रशिक्षण,मोफत पाठ्यपुस्तके,गणवेश योजना, विद्यार्थी गुणवत्ता,शाळांच्या दर्जात सुधारणा,माता प्रशिक्षण,पालक प्रशिक्षण, अंगणवाड्यांना मदत,शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण आणि सक्षमीकरण,दिव्यांग विद्यार्थ्यांच्या योजना,विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या इत्यादी महत्वपूर्ण कामे करवून घेतले जातात.
परंतु विस वर्ष लोटली तरी अजून कोणत्याही सरकारला संवेदणात्मक संवेदनशीलता निर्माण झाली नाही.या कर्मचाऱ्यांविषयी किती निष्ठुरता असू शकते?हे कल्पनेच्या पलीकडे आहे.हे कामे करीत असतांना किती तरी करार कर्मचारी मृत्यू पावले असून आज त्यांचा संसार उघड्यावर पडून पुर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.
अजून किती आणि कशाची प्रतिक्षा करता हो सरकार मायबाप?अशी आर्त हाक करार कर्मचारी मारतांना दिसून येत आहेत.
महाविकास आघाडी सरकार हे न्यायीक आणि धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या जीवनाच्या समस्या सोडवेल काय?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे‌.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांच्या हस्ते सत्कार

0

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चींचखेड येथे कार्यरत श्री. प्रमोद इंगळे, तसेच जि. प. म. प्रा. शाळा टाकळी नागझरी येथे कार्यरत श्री डिगांबर काकड शिक्षक यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जि.परिषद उच्च प्राथमिक शाळा बोंडगाव येथे शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, पुरस्कार मिळाल्या बाबत विनोद डाबेराव केंद्रप्रमुख मनसगाव, सौ कात्रे मॅडम खातखेड, श्री. घुले सर, श्री.सोनटक्के सर ई. त्यांचे अभिनंदन केले ,

तर एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. विशेष मुलांचे शिक्षक याच भावनेतून मुलांना शिकवीत असल्याने श्री. काकड सर आणि श्री. प्रमोद इंगळे सरांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी सागर थारकर, आकाश थारकर, योगेश थारकर, सुभाष कळसकर,
नंदू घोराडे,अजय अंदूरकर, ऋतिक इलामे ई. उपस्थित होते.

देशी दारू नाहरकत परवाना रद्द करण्यात यावे – शिवसेना घुग्घूस

0

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

आज दिनांक:25.01.2022 मंगळवार ला शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या आदेशानुसार घुग्घूस येथील नगरपरिषद येथे मा. मुख्याधिकारी नगरपरिषद घुग्घूस यांना निवेदनाद्वारे मागणी केली की मे.चिअर्स.प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत देशी दारू सुरु करण्याची नाहरकत परवाना रद्द करण्यात यावे अन्यथा शिवसेना घुगुस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख सतीश भाऊ बोंडे , उपतालुका प्रमुख गणेशजी शेंडे, चेतन बोबडे , सतीश गोहोकार आणि शिवसैनिक उपस्थित होते.

वर्धा के पास हायवे पर भीषण हादसा झायलो कार नदी में गिरने से मेडिकल कॉलेज के 7 छात्रो की मौत

0

 

मृतको में एक बीजेपी विधायक का पुत्र

वर्धा के सांसद रामदास तडस ने दि घटनास्थल को भेंट

अनिलसिंग चव्हाण  सह विकी वानखेड़े

नागपूर-तुलजापूर फोरलेन हायवे 361 पर सोमवार की रात वर्धा जिले के देवली शहर के निकट एक कार 30 फिट नदी में गिरने से कार में सवार 7 मेडिकल छात्रो की दर्दनाक मौत हो गयी. जिसमें भंडारा जिले के तिरोडा के विधायक विजय रहांगडाले का पुत्र 21 वर्षीय अविष्कार रहांगडाले का समावेश है.इस हादसे में मृत सभी छात्र समीप के ही सांवगी स्थित आचार्य विनोबा भावे मेडिकल कॉलेज में अध्ययनरत थे.

मिली जानकारी के अनुसार यह सभी छात्र यवतमाल से रात को झायलो कार क्र.OD 23 B 1117 से सांवगी कॉलेज लौट रहे थे. कार से नियंत्रण छुटने पर देवली के समीप सेलसुरा स्थित भदाडी नदी के पुलिया के दिवार से टकराई. 30 फिट नीचे नदी में कार गिरने से कार में सवार सभी छात्रो की मौत हो गयी. सभी के शव पोस्टमार्टम के लिये वर्धा सिव्हिल अस्पताल में भिजवाये गये.

घटनास्थल को वर्धा के सांसद रामदास तडस ने भेंट दे कर घटना के लिये दुःख जताया तथा मदद कार्य का जायजा लिया.

 

भारताचे आयध्य दैवत विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या खा . इम्तीयाज जलील यांचा जाहीर निषेध

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

देशाचे विर शिरोमणी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या संभाजी नगर एमआयएम या पक्षाचे खासदार इम्तीयाज जलील यांचा अखिल भारतीय क्षेत्रीय महासभाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे एक लिखित निवेदन यावलचे तहसीदार महेश पवार यांना देण्यात आले आहे . या संदर्भात अखिल भारतीय क्षेत्रिय महासभा ने दिलेल्या निवेदना म्हटले आहे की , छ्त्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे स्वातंत्र्याची मशाल पेटवली असे विर शिरोमणी महापुरुषाच्या अश्वरूढ पुतळयास जिल्हा नियोजन समितीच्या दिनांक ८ / १o / २०२१ अनुपालन अहवाल मुद्दा क्रमांक२८मध्ये मंजुर झालेल्या निधी दुसऱ्या कार्यास लावावा असे पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमत्री यांना देवुन पुतळ्यास विरोध केला असुन , खासदार इम्तीयाज जलील यांनी केलेल्या हिंदुसुर्य विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध केल्यामुळे देशाच्या संपुर्ण राजपुत समाजाच्या भावना दुखावल्या असुन , अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण करून आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्या लोकप्रतिनिधींचा समस्त राजपुत समाजाकडुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन एमआयएमपक्षाचे औरंगाबाद ( संभाजी नगर ) चे खासदार इम्तीयाज जलील यांनी संपुर्ण समाजाशी जाहीर माफी मागुन आपले शब्द आणि स्मारक उभारणी संदर्भात विरोधात दिलेले पत्र मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्या विरूद्ध राजपुत समाजबांधवांच्या वतीने निव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येवुन त्यांना धडा शिकवला जाईल असा ईशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला असुन, या निवेदनावर अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे जिल्हा संघटक निलेशसिंह पाटील , यावल तालुका अध्यक्ष तुषारसिंह परदेशी, युवा अध्यक्ष विशाल सिंह पाटील , अखिल भारतीय क्षत्रिप महासभा महीला मोर्चा तालुका अध्यक्ष विद्याताई पाटील , उज्जैनसिंह राजपुत, कृष्णा पाटील , यशपाल सुनिलसिंह वर्मा , मंगलसिंह कैलाससिंह पाटील , ललीत परदेशी , निलेश परदेशी , प्रज्वल पाटील, जगदीश पाटील ,ईश्वर पाटील आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.

राष्ट्रीय विषवगामी पत्रकार संघ लोणारच्या वतीने तहसीलदारांना निवेदन शहर प्रतिनिधी जगन मोरे लोणार

0

 

जगन मोरे लोणार

नागपूर येथील पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ आज लोणार तहसिल ार्यालयावर निषेध म्हणून राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले . निवेदन देताना रा . वी. पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते रा.वी.संघाचे जी.अध्यक्ष शेक सज्जाद.सर.ता.अध्यक्ष.उधवराव आटोळे. शहर अध्यक्ष भूषण शेटे.कोष्याधुक्ष मयूर सरकटे.प्रसिध्दी प्रमुख परमेश्वर मपरी .विजय मापरीं लोणार ता.सचिव जगन मोरे लोणार .विजय महाजन . सतीश मुलगे. सालार पठाण गणेश कुटे, लुकमन सर ,असे सर्वच रा
.वी. पत्रकार संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

देशी दारूच्या नवीन दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा : काँग्रेस

0

 

नगरपरिषदे विरोधात काँग्रेस छेळणार आंदोलन

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : जिल्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध कामगार नगरीत कामगारांचा मोठा भरणा आहे.
सात वर्षाच्या बंदी नंतर आता जिल्ह्यात रीतसर दारू विक्री शुरू झाल्याने शहरात देशी – विदेशी दारू धंद्याला उत आलेला आहे.
शहरात आधी पासून जवळपास सतरा वाईन बार व तीन देशी दारू भट्टी असतांना विलास भिकाजी टेंभूणे संचालक में.चिर्यस प्रा.लि.उल्हासनगर जि. ठाणा यांच्या स्थलांतरित दुकानास नगर परिषदेने परवानगी दिली असून
सदर दुकान हे घुग्गूस येथील आनंद वाईन बारच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येत आहे.
याठिकाणीच दहा ते पंधरा मीटर अंतरावर दिक्षा भूमी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक आहे.
व तीस मीटर अंतरावर माता माऊलीचे मंदिर आहे.
याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो याच परिसरात नागरिकांसाठी प्रस्तावित बगीचा व वीस फुट रस्ता आहे.
करिता सदर देशी दारूच्या विरोधात घुग्गूस शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता व गेल्या वर्षी आगस्ट महिन्यात दारू दुकानाला परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात आले होते.
असे असतांना ही सदर देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली सदर तातळीने रद्द करावी या करिता किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आले व परवानगी रद्द न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही काँग्रेसने दिला.
याप्रसंगी घुग्गूस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, प्रशांत सारोकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नांदुरा येथे महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी.

0

संग्रामपूरः- ज्यांनी भारत स्वातंत्र्य होण्यासाठी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले.असे महान स्वातंत्र्य सेनानी व आझाद हिंद संघटनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती दि.२३/जानेवारी रोजी नांदुरा येथे रेल्वे स्टेशन चौकात कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच उपस्थितीत साध्या स्वरुपात साजरी करण्यात आली.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आझाद हिंद संघटना विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईदभाई होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.वर्षा ताथरकर ,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, अनिलसिंग चव्हाण होते. प्रथम रेल्वे स्टेशन चौकातील सुभाषचंद्र बोस यांचे अर्ध पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार घालून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थितीतांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर कु.वैष्णवी सुसर ह्या तरुण युवतीने क्रातीकारी सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनावर प्रकाशझोत टाकून त्यांचेजीवनपट बद्दल माहिती दिली.त्यानंतर जेष्ठ पत्रकार यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देश्याच्या स्वातंत्र्याची जगाला गवसणी घालण्याचे कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस.नेताजींच्या विचारात एक वेगळीच उर्जा व शक्ती होती.यापुळे अनेक देशप्रेमी तरुणांच्या मनात जोश निर्माण झाला तो केवळ भारतासाठीच नव्हे तरजगासाठी प्रेरणा स्थान होते.”तुम मुझे खून दो!मै तुम्हे आजादी दुंगाॕ ह्या घोषणेने भारतीयांच्या मनात त्यांनी राष्ट्र प्रेमाची ज्योत फडकावली.त्याप्रमाणे आपण किमान ज्यांचेवर अन्याय होतो व गुलामगिरी केल्या जाते अश्यांना न्याय द्यावा.असे सांगितले . तर अध्यक्षीय भाषणातून आझाद हिंद सेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद भाई यांनी एकजुटीने राहून संघर्ष करुन गरीबांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. ह्यावेळी आझाद हिंद सेना शेतकरी संटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष शे.मझरभाई,  व नागरिक ,महिला पदाधिकारी प्रामुख्याने हजर होत्या.

विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार बिस्कीटच्या पुड्यात आढळली अळी, दोषीवर कारवाईची पालकाची मागणी..!

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

संग्रामपूर तालुक्यातील पळशी (झाशी )येथील ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळालेल्या बिस्किट पुड्यात अळी आढळली याबाबत विजय विठ्ठल ठाकरे विद्यार्थ्यांच्या पालकाने संग्रमपूर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे दिनांक 22 जानेवारी रोजी माहिती देऊन तक्रार दिली,त्यावरून दुसऱ्या दिवशी दिनांक 23 /जानेवारी रोजी पळशी झाशी येथे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील विद्यार्थी अमोल विजय ठाकरे हा जिल्हा परिषद.हायस्कूल संग्रामपूर येथील ८ व्या वर्गात शिकत असून त्याला शालेय पोषण आहार योजनेचे बिस्टिक खाण्याकरता दिले, त्यामध्ये अळी आढळून आल्याची तक्रार विद्यार्थ्यांचे पालक विजय ठाकरे यांनी दिली असता दुसऱ्या दिवशी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पळशी झाःशी येथे जाऊन पंचनामा केला असता त्यामध्ये बिस्किट कोरलेली आढळून आले व त्यामध्ये अळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे .सदर बाबीचा पंचनामा करुन सिलबंद केले. या प्रकरणी संबंधितावर सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी पालक विजय ठाकरे यांनी केली आहे.

 

पूर्णानगर येलकी पूर्णा येथिल रोड दूरस्ती करा! अली हेल्प ग्रूपची मागणी

0

 

उषा पानसरे असदपूर
मूख्य कार्यकारी संपादीका मो.9921400542

अली हेल्प ग्रूप पुर्णानगर यांनी बबलू भावु देशमूख अमरावती जिल्हा अध्यक्ष याना निवेदन देण्यात आले झोपडपट्टी पूर्णानगर ते येलकी पुर्णा पर्यत अतिवृष्टी पावसा मूळे रोड रखडलेले असून दूरस्ती करण्यात यावे ! या रोड वरून येलकी ,पुर्णा,सावळापूर, येसूर्णा,असदपूर ,कोल्हा काकडा, अंजनगाव सूर्जी दर्यापूर ईतर गावाचे वाहन या मार्गाने रात्र दिवस चालु असतात पावसामुळे दोन ते तिन फूटाचे खंडे बाजूला पडले आहे त्या मूळे या रस्तावर अनेक दूचाकी वाहणाचा अपघात होवून जखमी झाले तसेच कित्येक वेळा अपघात होवून दूरघाटना मध्ये मरण पावले !या रस्तावरिल होत असल्यामूळे प्रशासन कूंभकर्णीचे झोप घेत आहे मोठ्या अपघाताची वाट बघत प्रशासन दूर लक्ष करत आहे या अगोदर पुर्णानगर ग्राम पंचायत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाकडे दि.22 /12 /2017 मधे या रस्ताची मागणी केली होती दहा ते बारा वर्षा पासून कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही पूर्णा नागरिकांनी जिल्हा अधिकारी कार्यालय , अभियंता सार्वजिक बांधकाम विभाग अचलपूर याना निवेदन देवून मागणी केली होती अली हेल्प ग्रूप पूर्णानगर या संघटने ने निवेदन देवुन मागणी केली या विषयावर लवकरात लवकर मार्ग शोधून रोड ची दूरस्थी करण्यात यावी जेणे करूण नागरिकांना परिशानी चा सामना करावा लागणार नाही अली हेल्प ग्रेप ची मागणी श्रीधरावजी काळे (उपसभापती पंचायत समिती अचलपूर मूकद्दर भाई पठान भातकूली तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष अ. अलीम अ. तमीज समाज सेवक ईक्रामोद्दीन ,देवेंद्र ठाकरे ,अनसार भाई कूरेसी जावेद सौदागर आबीद काजी