Home Blog Page 344

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर महिलेला वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्यास दिरंगाई -प्रांजली धोरण

0

 

मलकापूर :- रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर महिलेला वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्यास दिरंगाई का होत आहे असा सवाल करताच मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडून तांत्रिक कारण समोर करण्यात येऊन पीडितेच्या प्रस्तावावर तातडीने आजच कार्यवाही अशी हमी देण्यात आल्याने जाणीव फाउंडेशनचे प्रयत्न सार्थकी ठरल्याचे दिसून आले.
मलकापूर तालुक्यातील मौजे बेलाड येथील सुनिता अर्जुन संबारे यांचा प्रस्ताव दाखल होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरीही अद्याप पावेतो त्यांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक साहाय्य मिळाले नाही यासंदर्भात यापूर्वी तसेच १६ जानेवारी रोजी पुण्यनगरीने वृत्त प्रकाशित करून वास्तव परिस्थिती मांडली होती. या वृत्ताची दखल घेत जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा प्रांजली धोरण यांनी थेट मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडक देत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिरंगाईबाबत जाब विचारला. दरम्यान अमाऊंट रिफेलेक्ट होत असल्यामुळे वेळ लगत होता परंतु आज सदर मदतीची रक्कम पीडित महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन देत रक्कम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांत्रिक अडचण येत होती. त्यामुळे थोडा उशीर झाला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मान्य केले. दरम्यान प्रांजली धोरण यांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या इतर पीडित प्रस्ताव धारकांच्या बाबत सुद्धा माहिती मागितली असता सदर माहिती सुद्धा आपल्याला देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले. यावेळी जाणीव बहुद्देशीय फाउंडेशनचे नितीन गवई, मनोज यादव, सचिन ढोण, मंगेश तायडे, गणेश वाघ आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उजड देणाऱ्या मेंणबत्तीनेच घराची केली राख- रांगोळी

0

 

काँग्रेसने केली आर्थिक मदद

(चंद्रपूर घुग्गूस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : येथील वॉर्ड क्रं. 02 येथे राहणाऱ्या मीना अजय आमटे ह्या अत्यंत हलाखीचे दिवस काढत असून उपजीविकेचे साधन म्हणून चहाची छोटीशी दुकान चालवितात त्यांना एक मुलगा असून तो मानसिक व शारीरिक रित्या कमकुवत आहे.
मुलगा घरी एकटा असतांना त्याने उजेडा करिता मेंणबत्ती पेटवली व घराच्या बाहेर गेला असता मेंणबत्तीने पेट घेतला व यात संपूर्ण घरच जळून राख झाला
आग एवढी भीषण होती की आगीत अन्न – धान्य, कपडे – लत्ते बिछाना सर्वच जळून गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
सदर घटनेची माहिती काँग्रेस महिला नेत्यां सौ. संगीता बोबडे यांनी तात्काळ शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांना दिली असता आज सकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
व पीडित कुटूंबाला अन्न – धान्य, साडी, व नगदी स्वरूपात मदद दिली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,ज्येष्ठ नेते किशोर बोबडे, सौ. संगीताताई बोबडे, कामगार नेते सैय्यद अनवर, विजय माटला, सुनील पाटील, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

यावल तालुका माजी सेवारत अर्धसैनिक कल्याण असोशिएसनच्या अध्यक्षपदी राजेश जगताप तर उपाध्यक्षपदी अय्युब तडवी यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी। वानखेडे

तालुका माजी/सेवारत अर्धसैनिक कल्याण एसोशियशन चे अध्यक्षपदी दहिगांव चे माजी सैनिक राजेश जगताप याची तर उपाध्यक्ष पदी सौखेडा सिमचे माजी सैनिक अय्युब तडवी यांची निवड करण्यात आली आहे . अर्धसैनिक सेवानिवृत/सेवारत सैनिक यांचे सुविधा व न्याय मिडवुन देने करिता दिल्ली येथील कोणफेडरेशन ऑफ एक्स पैरामिलेट्री फोर्स वेलफेयर एसोसिएशन व जलगांव जिला एसोशियशन यांचे कडून यावल तालुका सेवानिवृत/सेवारत अर्द्ध सैनिक यांचे समस्या चे निवारण करीता यावल तालुका अर्धसैनिक कल्याण एसोशियशन चे अध्यक्ष पदी दहिगांव तालुका यावल चे माजी सैनिक राजेश जगताप याची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पदी माजी सैनिक अय्यूब तडवी, सौखेडा तर सचिवपदी माजी सैनिक मोहन येऊल यावल, व उपसचिवपदी माजी सैनिक सुनील कदम यावल, तर कॉर्डिनेटर पदी यावल चे माजी सैनिक राजेश बाबूराव बारी याची निवड झाली आहे. दहीगांवचे माजी सैनिक राजेंद्र जगताप व सौखेडा चे माजी सैनिक अय्यूब तडवी याची ही निवड झालेने दहीगांव/सौखेडा/कोरपावली येथील सारे नागरिक यानी शुभेच्या दिल्या आहे सोबतच परिसरतिल माजी सैनिक/सैनिक यानीही शूभेच्या दिल्या आहेत यात विरावली चे माजी सैनिक मुकेश पाटिल, सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल, प्रदीप अड़कमोल, अमोल अड़कमोल, प्रशांत अड़कमोल , संकेत अड़कमोल व दहीगांव येथिल सैनिक चंद्रकांत साळूके,
तुषार सरोदे व मोहन अशोक चौधरी तसेच कोरपावली चे माजी सैनिक महेंद्र पाटिल व उज्ज्वल महाजन यानी कार्यकारणीचे स्वागत केल आहे.

असदपुर येथिन पशू वैधकिय दवाखाण्याला दिली भेट- उषा पानसरे

0

 

उषा पानसरे असदपूर

असदपूर येथिल पशू वैधकिय दवाखाना ला दिली भेट काही नागरिकांना सम्मस्या जानून डाॅ.जावेद खान पशू वैधकिय अधिकारी यांची बदली संप्टेबंर मध्ये चिखलदरा या परिसात झाली असता नागरिकांना काही परिशानी चा सामना करावा लागतो ।डाॅ.खान याचा जागेवर डाॅ.मूकेश खैरकार यांनी नोव्हेंबर मधे पद भार सांभाळले ,पशु वैधकिय अधिकारी डाॅ.मूकेश खैरकार याना लगभग दहा गाव बघावे लागतात असदपूर सेन्टर पशु वैधकिय दवाखाना असून या सेन्टर मध्ये येणारे गाव कोल्हा,नरसिंगपूर.सावळी वडगाव सावळी खूर्द, निभांरी रंगारवासनी ,शहापुर. रायपुर असे काही गाव बघावे लागतात त्या मूळे डाॅ. मूकेश याना आठवड्या तून केवल दोन दिवस शनिवार बूधवार दयावे लागतो त्या मूळे नागरिकानां परिशानीचा सामना करावा लागत आहे! डाॅ. जावेद खान हे अधिकारी डेली दरोरज दवाखान्यात येत होते त्या मूळे नागरिकाना अडचण जात नोहती परंतु असदपूर सेन्टंर असून सूध्दा या ठिकानी डाॅ. केवल आठवडयात दोन दिवस सूविधा मिळतात बाकी दिवस परिशानी भोगावी लागतो तसेच पशू वैधकिय कर्मचारी सूरेश राठोड हे डाॅ. नसून सूध्दा अगदी मनोभावे पशू जनावराला ते 24 तास सेवा देतात पशु च्या प्रती त्याचे प्रेम भावना एक कर्मचारी असून सूध्दा दवाखाना संभारळतो
सेन्टर असून पाण्याची व्यवस्था नाही ,पाठी मागे व डावी बाजूला सर्व भिंती पडल्येला असून वाल कंपाॅउन्ट नाही ,सफाई कर्मचारी सूध्दा नाही !पंचायत समिती अचलपूर अधिकारी व जिल्हा परिषद अमरावती अधिकारी यांनी असदपूर पशू वैधकिय सेन्टर कडे लक्ष देवून सर्व सोई मंजूर करुन देण्यात याव्या जेने करून नागरिकांना पशु उपचार करिता त्रास होणार नाही । सूरेश राठोड स्वःता दवाखान्याची सफाई करतात पंचायत समिती अचलपुर व जिल्हा परिषद यानी या कडे लक्ष देण्यात यावे
उषा पानसरे प्रेस संपादक पत्रकार सेवा महीला जि. अध्यक्ष
व सुर्या न्यूज मु.का. संपादीका

अवैध वृक्षतोड कधी थांबणार? वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले वरती हात.जंगल होणार भुईसपाट.

0

 

जंगल हा प्राणी,पक्षी,कीटक आणि मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.वनविभाच्या संरक्षण करण्यासाठी वनविभागाची निर्मिती करण्यात आली आहे.त्या वनविभागात बऱ्याच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवली गेली आहे.आणि उत्तम, प्रामाणिक,कर्तृत्वाची ठिणगी निर्माण करून समाजासाठी आणि शासनासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून वनविभागाच्या माहितीच्या संदर्भात अपेक्षा सुद्धा केल्या आहेत.परंतू बुलढाणा जिल्यातील मोताळा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणा-या अवैध वृक्ष तोडी च्या संबधाने आमच्या पत्रकाराने आपला जीव धोक्यात आणुन तेथील वनरक्षक दादगाव बिट बावने मैडम ह्याना दुरध्वनी वरुन अवैध वृक्षतोड संदर्भात माहिती दिली.
त्यावर उचित कारवाई करतो असे तात्पुरती आश्वासन महिला अधिकाऱ्यांकडुन त्या पत्रकाराला थातुरमातुर उत्तर मिळाले. पन चौथी दिवस परत काय कारवाई झाली?ह्या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न पत्रकाराने केली असता पत्रकारालाच अधिकारी महिला अधिकाऱ्यांच्या नाहक रोषाला बळी पडावे लागले .
आम्ही महीला आहोत, आमच्यावर कुणी दबाव टाकू शकत नाही?आम्हाला जसे काम करायचे तसे काम आम्ही आमच्या मनमर्जीने करणार, संपूर्ण वृक्षतोड झाली तरी तुम्हाला काय करायचे आहे?अशी मल्लीनाथी ह्या वनपरिक्षेञ व वनरक्षक या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या तोंडी कर्तव्यदक्षपणा दिसून आला.रक्षक तर भक्षक होणार नाही ना?असे चित्र तर निर्माण होणार नाही ना?असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकाराला अवैध वुक्ष तोडून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांच्या रोषाचा बळी ठरविण्यात आले.वनविभागात अशा महिला अधिकारी जर असतील तर कसे काय वनांचे संरक्षण होईल?याची चिंता पर्यावरण विभागाला भेडसावण्याचे दृश्य पहायला मिळत आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यासाठी लोणार तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन

0

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथील सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी या आशयाचे निवेदन आज १८ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्हा सचिव निर्मल संचेती यांच्या नेतृत्वात लोणार तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आली यावेळी माजी शहराध्यक्ष अविनाश शुक्ल, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुंदर संचेती, मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बनमेरू, प्रधानमंत्री जनकल्याण योजना तालुकाध्यक्ष विनोद थोरवे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दीपक चौधरी, विषाल सोनाग्रा, रवी नागरे,विशाल वर्मा, खरात व इतर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी

0

 

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जिल्हा भंडारा येथील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. नाना पटोले यांनी दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना “आता आपली ताकद वाढली असून, आपण पंतप्रधान मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो.” अशा वल्गना करत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात आज मंगळवार 18 जानेवारी रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घुस येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची विनंती केली.
यावेळी माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, विनोद चौधरी, श्रीकांत पांडे, नरेंद्र कांबळे यांसह अनेक मंडळी सोबत उपस्थित होते.
काही दिवसांआधी, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करण्याची सडकी मानसिकता काँग्रेसची होती मा. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेसी नेत्यांमध्ये किती असूया भरली आहे. हे अशा निंदनीय घटनांमधून वारंवार सिद्ध होते.
भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. पंतप्रधान पदावरची व्यक्ती कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षापुरती मर्यादित राहत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करणे. हे प्रत्येकाचं कर्त्तव्य आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी IAS नेहा भोसले यांची नियुक्ती

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदाचा पदभार स्विकारला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी निलेश पाटील यांची चार महिन्यापुर्वी नाशिक येथील कळवण येथे शासकीय बदली करण्यात आली होती. तेव्हा पासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते. तेव्हापासून सहाय्यक गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती केले आहे. मंगळवारी १८ जानेवारी रोजी नेहा भोसले यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचा पदभार सकाळी १० वाजता स्विकारला. नेहा भोसले ह्या आयएएस अधिकारी असून आगामी काळात शासकीय योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचे लक्ष गाठणे हे आपले प्रमुख लक्ष राहणारचे नेहा भोसले यांनी सांगितले.

नाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य मुळे लोणार भा, ज, प, चे वतीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत ची तक्रार

0

 

 

लोणार पोलिस स्टशनमध्ये देण्यात आली तक्रारीवरून नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भा, ज, प,शहर अध्यक्ष गजानन मापरि, विजय मापरी , उद्ध वराव आटोळे, शे,निसार भाई बाबाराव मुंडे सानप साहेब भा, ज, प, चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक.

0

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

भाजपा प्रदेश सचिव श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषद हे लोकांच्या समस्या सोडवण्याचे आणि विकासकामांचे एक उत्तम व्यासपीठ आहे आणि मतदारांनी या व्यासपीठावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे, सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.
निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, सदस्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदारसंघात नियमितपणे पोहोचण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. संपर्काच्या या काळात गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना देणे आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आवश्यक आहे.
राज्यात सत्ता नसताना आपले केलेले कार्य आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या जनहिताच्या कामासोबतच सर्वसामान्यांना झालेला फायदा हेच आगामी निवडणुकीत त्यांच्या निवडीचे रहस्य आहे. अधिकाधिक लोकांनी संपर्क मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी केले आहे.