Home Blog Page 350

बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिन साजरा

0

——————————-
नांदगाव खंडेश्वर तालुका मराठी पत्रकार संघ च्या वतीने आज दिनांक ६जानेवारी २०२२ ला स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र कार्यालय येथे मराठी पत्रकार संघ व स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर चे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे,व खांन्नदे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर देशमुख विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सुरवातीला बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला विविध न्यूज चॅनल व वृत्तपत्रा मध्ये काम करणारे पत्रकार उपस्थित होते व मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी यावेळी हजर होते या कार्यक्रमाला सुनिल भाऊ तायडे स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र मुख्य संपादक व मराठी पत्रकार संघ जिल्हा प्रतिनिधी सुनिल भाऊ बंनसोड मराठी पत्रकार संघ तालुका सचिव, गणेश शिंगणजुडे उपाध्यक्ष जितेंद्र आखरे प्रसिद्धी प्रमुख व सदस्य हंसराज उके सुर्या न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी संजय मंडवधरे रविभाऊ मारोटकार किशोर कणसे तुषार तायडे स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक पत्रकारिता करित असताना पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते व शासन दरबारी ग्रामीण भागातील पत्रकार ला नोंद नाहीं तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन बातमी संकलन करण्याचे काम हा ग्रामीण भागातील पत्रकारच करु शकतो तरी पण शासन दप्तरी नोंद नाही या करिता सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन शासनाला कायदा करण्याची गरज आहे असे उदगार मंडवधरे व्यक्त केले व आभार प्रदर्शन नंदकिशोर इंगळे तालुका अध्यक्ष यांनी मानले

घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

0

 

असंख्य अनाथांचे छत्र हरपले – सौ. किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्याअनुषंगाने येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पावन स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण केली.
त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे छत्र हरपले आहे.त्यांनी अनाथांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचे आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे.
यावेळी माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, कुसुम सातपुते, भाजपाचे संजय तिवारी, विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, तुलसीदास ढवस, सुरेंद्र जोगी, आनंद आसमपेल्ली, मधुकर धांडे, पियुष भोंगळे उपस्थित होते.

अमरावती विभागात पहिल्यांदाच प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीतून रस्ता निर्मिती

0

 

उषा पानसरे .कार्यकारी संपादीका मो.9921400542

आ.सौ .सुलभाताई खोडके यांच्या दूरदृष्टीतून शहर विकासाला तंत्रज्ञानाची जोड

प्रायोगिक तत्वावर पठाण चौक ते भातकुली मार्गावर रस्ता निर्मितीला सुरुवात

अमरावती ३० डिसेंबर: विकासाच्या संकल्पनेत सुसज्ज रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे निर्माण करणे महत्वपूर्ण असून यातूनच सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाला चालना मिळते. त्यामुळे शहरातील अनेक लहान-मोठे रस्ते एकमेकांना जोडून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे काँक्रीट जाळे पसरविण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतल्याने शहरातील मुख्य रस्ते त्याचबरोबर शहरातून जाणारे जिल्हा प्रमुख मार्ग, राज्यमार्ग, महामार्ग तसेच लोकवसाहतीमधील अंतर्गत रस्ते आदी मार्गांचा कायापालट झाला आहे . याच शृंखलेत महानगरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता व पुढे भातकुली तालुक्याला जोडणाऱ्या पठाण चौक ते भातकुली रस्ता प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीतून कात टाकणार आहे. बुधवार दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी आ. सौ सुलभाताई खोडके यांनी पाहणी केली असता या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. .
अमरावती – भातकुली रस्ता राज्यमार्ग २८० हा मार्ग शहरातील पठाण चौक मधून गेलेला आहे. या मार्गावर अमरावती महानगर क्षेत्रातील लोकवसाहती , वाणिज्य क्षेत्र असून भातकुली रस्त्यावरील अनेक गावांमधील शेतकरी , दूध विक्रेते , कामगार , कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना अमरावती शहरामध्ये येण्याकरिता याच मार्गाचा अवलंब करावा लागतो . मात्र या अतिवर्दळीच्या व बहूपर्यायी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथून अवागमन करतांना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जड व अवजड वाहतूक करतांनाही मोठी कोंडी उद्भवत असल्याने या मार्गावर सुरक्षित वाहतुकीला घेऊन अनेक समस्या उद्भवत आहे. दरम्यान या रस्त्याचे निर्मिती कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असता काँक्रिटीकरणाच्या
कामाला २८ दिवसांचा क्युरिंग पिरेड लागणार होता.. या मार्गावर संभाव्य धोका व वाहतुकीची समस्या टाळता यावी व नागरिकांना सुरक्षित अवागमन करता यावे , यासाठी आ . सौ. सुलभाताई खोडके यांनी जातीने लक्ष घालून या मार्गाच्या कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सदर काम हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असता आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामास्थळी प्रत्यक्ष भेट व पाहणी करून सदर रस्त्याचे काम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना केल्यात . विशेष म्हणजे आ .सौ .सुलभाताई खोडके यांच्या दूरदृष्टीतून शहर विकासाला तंत्रज्ञानाहीची जोड मिळत असल्याने शहराचा कायापालट होत आहे. अमरावती प्रादेशिक विभागात पहिल्यांदाच प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीचा प्रयोग करून अल्पावधीतच हा रस्ता पूर्ण होऊन नागरिकांना सुरक्षित अवागमनाची सुविधा मिळणार आहे. याच दरम्यान भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम तत्काळ करणे बाबतच्या सूचना सुद्धा मजीप्राचे सहाय्यक उपअभियंता शिवहरी कुलट यांना देण्यात आल्या . यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष – संजय खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे – कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपविभागीय अभियंता – तुषार काळे, शाखा अभियंता – सुनिल जाधव, महानगरपालीकेचे उपविभागीय अभियंता – प्रदिप वानखडे, भुयारी गटार योजनेचे – शिवहरी कुलट, वेलस्पन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी जफरूद्दीन सय्यद , कुमार बिल्डर – डॉ . अमीन सय्यद , सनाउल्ला खान ठेकेदार, यश खोडके, हाजी रफीक, ऍड. शोएब खान, आहद अली, सनाउल्ला सर, गाजी जहरोष, हबीब खान ठेकेदार, अफसर बेग, अफझल चाैधरी, सादीक रजा, हाजी इरफान सेठ, कन्नुभाई ठेकेदार, दिलबर शाह, राजु पहेलवान, अफसर भाई, सत्तार राराणी, सैय्यद साबिर, समिउल्ला खाॅ पठाण, फहीम मॅकेनिक, फारुक मंडप, मोईन खान, अबरार साबिर, आरीफ मेमन, सैय्यद वसिम, हमीद खान, जाहीद खान, फिरोज अहमद, शेख सलिम, शेख शकील, शफीक शाह, युनुस भाई, जहीर भाई, नाजीम सर, ईलीयास खान, नसिम पठाण, फिरोज अहमद, जाहीद खान आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्ता उपस्थित होते .

अनाथांची माय सिंदुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विक्की वानखेड़े

मुंबई : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. बालविवाह झालेल्या सपकाळ यांनी नवऱ्याने केलेल्या अत्याचारांनंतर घर सोडलं. त्यानंतर अत्यंत अनाथांचा सांभाळ करणं हे त्यांनी आयुष्याचं ध्येय बनवलं. (Latest News on Sidhutai Sapkal)

आज त्यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गॅलक्झी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्याच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.”

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई (Sindhutai) यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले.

सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित झाल्या.

सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगायच्या की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.

र्पैश्यांसाठी गहाण ठेवलेली दुचाकी चक्क अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार..

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

र्पैश्यांसाठी गहाण ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार यावल -चोपडा रोडवरील साई हॉटेल येथे २५ डिसेंबर रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, समीर जहाँगीर तडवी (वय-२९) रा. हरीओम नगर यावल ह.मु. तडवी कॉलनी रावेर जि.जळगाव हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे एमएच १९ डीसी १८७५ क्रमांकाच मोपेड दुचाकी आहे. त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याने यावल-चोपडा रोडवरील साई हॉटेलचे मालक धिरज पाटील यांच्याकडून १५ हजार रूपये घेवून ९ सप्टेंबर २०२१ रोजी दुचाकी गहाण ठेवली व दुचाकी हॉटेलजवळ पार्किंगला लावली होती. दरम्यान २५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची ८० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी आढळून आली नाही. अखेर आठ दिवसानंतर ३ जानेवारी रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

मौजे जांब व मौंढाळा येथे मा जालिंधर बुधवत यांनी दिली भेट. गावातील समस्यांबाबत केली चर्चा.

0

 

मौजे जांब व मौंढाळा येथे मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांनी आज दि ४/१/२०२२ रोजी भेट दिली. जांब व मौंढाळा येथील गावकऱ्यांनी गावातील अंतर्गत रस्ते, शाळा खोली, शेतरस्ते, स्मशानभूमी बाबत समस्या, आरोग्य विषयक समस्याबाबत मा जालिंधर बुधवत यांच्याशी आपल्या व्यथा मांडल्या. मा जालिंधर बुधवत यांनी गावातील रस्ते, शाळा खोली, शेतरस्ते याबाबत आपण लवकरच जिल्हा परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, राजु मुळे, दिनेश काळे, अनिल सुसर यांच्यासह जांब व मौंढाळा येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.

१९ वर्षीय महिलेचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

शेगांव : येथील जुन्या महादेव मंदिरासमोरून जाणाऱ्या १९ वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील  डोबाळवेस भागात राहणाऱ्या १९ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली की, मी दोन जानेवारीच्या रात्री नऊ वाजेदरम्यान जुना महादेव मंदिरा जवळून जात असताना अनिल दिंडोकार यांच्या दुकानासमोर राजेश गजानन घाटोळ हा इतर मुलांसोबत उभा होता. त्यावेळी मला पाहून त्याने एका मुलाला बाजूला करून वाईट उद्देशाने माझा डावा हात धरला आणि शिवीगाळ करुन केस मागे घे अशी धमकी दिली. यावेळी मी माझ्या पतीला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा तो तिथून निघून गेला होता मी आणि माझे पती त्याच्या घरी आई-वडिलांना समजून सांगण्यात गेलो असता गजानन घाटोळने मला आणि माझ्या पतिला शिवीगाळ करून राजेश घाटोळ तसेच शिवा घाटोळ यांनी मला आणि माझ्या पतिला विट मारून जखमी केले. यावेळी माझा दीर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला सुद्धा खुर्ची ने मारहाण करण्यात आली. त्यामुळे माझ्या पतीचे उजव्या डोळ्यावर आणि उजव्या हाताला मार लागला माझ्या दिराच्या दोन्ही हातावर कपाळावर मार लागून जखमी केले. यावेळी आरोपींनी जीवाने मारुन टाकू अशा धमक्या दिल्या. या तक्रारीवरून राजेश गजानन घाटोळ, शिवा गजानन घाटोळ,गजानन घाटोळ सर्व राहणार डोबाळवेस यांच्याविरुद्ध कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई हे करीत आहेत.

संग्रामपूर येथे घराला आग लागुन घरातील साहित्याचे नुकसान.

0

 

संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने 1 तासातच दिली रोख 21 हजाराची मदत.
———————————————–
संग्रामपूर –  वार्ड क्र 11 मधे दि. 2/ जानेवारी रोजी रात्री 11 वा.सुमारास अचानक शॉट सर्किट झाल्याने प्रदिप सोनोने यांच्या घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. घटना घडताच रात्रीच 12 वा. एका तासात संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने 21 हजार रुपयाची रोख मदत देण्यात आली.

संग्रामपूर शहरातील वॉर्ड क्र.11 मधील रहिवाशी प्रदिप श्रीरंग सोनोने यांच्या घराला दि.2/जानेवारी रोजी रात्री 11 वा.सुमारास शाॅटसर्किट मुळे आग लागुन घरातील फ्रिज, मिक्सर सह इतर सहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्याची माहिती समजताच रात्री 12वाजता संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकर पुरोहित व सहकारी मित्र धावून गेलेत. सोनोने दाम्पंत्याला 21 हजार रु.ची रोख मदत देण्यात आली.
प्रत्येक वेळी काही नैसर्गिक घटना घडून आपत्ती निर्माण होवून नुकसान झाल्यास संग्रामपूर मित्र परिवाराचे सहकारी सदस्य हे धावून जातात.व वेळीच संबंधिताला , व परिवाराला आधार मिळावा म्हणून सहकार्य करुन आर्थिक मदतही करतात.त्यामुळे त्यांचे कौतुक करुन आभार मानतात.

संग्रामपूर न्यायालयाचे लिपिक डोसे यांचे सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

दिवाणी व फौजदारी न्यायालय संग्रामपुर मधील लिपिक ए.डी.डोसे हे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना न्यायालयाचे कर्मचारी व संग्रामपूर तालुका वकील संघाच्या वतीने त्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर दि. 1/ जानेवारी रोजी नववर्ष दिनानिमित्त तसेच न्यायालयाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल ए.डी.डोसे क. लिपीक यांचा वकील संघाचे बार रुम मध्ये त्यांचे सहकारी मित्र यांचेसह ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येवून निरोप देण्यात आला. यावेळी संग्रामपुर तालुका वकील संघाचे अॕड.बी.पी.खंडेराव, अॕड.व्ही.पी.वानखडे ,अॕड. किर्तने,अॕड जी.ए.क्षीरसागर,व इतर तसेच दस्तऐवज लेखक देवानंद इंगळे ,पत्रकार दयालसिंग चव्हाण ,गोकुल गावंडे व सहकारी मित्र उपस्थित होते.

आता व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करायला बंदी; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश!

0

 

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला नवे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर वर्तमानपत्रांच्या ऑनलाईन एडिशन अर्थात ई-वर्तमानपत्रे शेअर करणारे ग्रुप बंद करण्यात यावेत, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मेसेजिंग अ‍ॅपवर पोस्ट होणारा मजकूर आणि त्याची सत्यासत्यता या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीमुळे लागू होणाऱ्या निर्बंधांचीही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं व्हॉट्सअ‍ॅपला हे निर्देश दिले आहेत.

ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर
“बेकादेशीरपणे आणि त्यासंदर्भातले अधिकार नसतानाही अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे”, असं न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी आदेशामध्ये नमूद केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर २४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्देश दिले.

ग्रुपची माहिती न्यायालयात
या याचिकेमध्ये एकूण ८५ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची माहिती दिलेली आहे. तसेच, याशिवाय असे अनेक ग्रुप असतील जिथे ई-वर्तमानपत्रे बेकायदेशीररीत्या शेअर केली जातात, असंही याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २ मे २०२२ रोजी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला हवे होते न्यायालयाचे आदेश!
काही वर्तमानपत्रांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोणतेही अधिकार नसताना अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केली जात असताना त्याविरोधात त्यांनी दाद मागितली होती. यासंदर्भात न्यायालयाचे आदेश सादर करा असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. वाचकांना या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. तसेच, वर्तमानपत्रांचा खप वाढण्यासाठी देखील ही बाब महत्त्वाची ठरते. वाचक निश्चित असे शुल्क भरून ई-वर्तमानपत्रांचं हे सबस्क्रिप्शन घेत असतात. यामध्ये वाचकांना ई-वर्तमानपत्र डाऊनलोड करण्याचा किंवा ते इतरांना पाठवण्याचा अधिकार नसतो”, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.