Home Blog Page 353

निलंगेकरांचे पत्र देशमुखांकडून दखल अन् मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू

0

 

डी.एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

लातूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि विद्यमान पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्याला नवा नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीत तर हा संघर्ष अधिकच उफाळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीतही निलंगेकरांनी (संभाजीराव पाटील निलंगेकर) देशमुखांवर जोरदार टीका केल्याचे पहायला मिळाले होते.
असे असले तरी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान नको म्हणून निलंगेकर यांनी प्रवेश प्रक्रिये संदर्भात पाठवेल्या एका पत्राची दखल अमित देशमुख यांनी घेतल्याचे दिसून आले आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा क्रमप्राप्त असून याचा निकाल लागून दीड महिना लोटला आहे. मात्र राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केली नव्हती.
देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनानेही प्रवेश प्रक्रिया सुरु करून विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत करावी अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे २४ डिसेंबर रोजी पत्राद्वारे केली होती. निलंगेकर यांच्या पत्राची दखल घेत वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी क्रमप्राप्त असलेल्या नीट परीक्षेचा निकाल दीड महिन्यापुर्वी लागेलेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्याने राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली नव्हती. या याचिकेवर ६ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. याचिका दाखल झालेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासह गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यास स्थगिती दिलेली नाही.
ही बाब निलंगेकर यांनी पत्राद्वारे राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली होती. देशातील गुजरात, कर्नाटक, केरळ यासह इतर राज्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

कार्यालयीन व्हाट्सॅप गृपवर अश्लील मॅसेज टाकल्याप्रकरणी, शेगांवचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट निलंबित

0

 

शेगाव : शेगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारीपदाचा प्रभार पहुरजिरा येथील केंद्रप्रमुख प्रकाश केवट यांच्याकडे होता. यावेळी पंचायत समितीअंतर्गत कार्यालयीन कामकाज असलेल्या व्हॉट्सॲप गृपवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांनी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी अश्लील मॅसेज टाकला होता. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी २० डिसेंबर रोजी आदेश कडून तब्बल ८० दिवसांनंतर निलंबित केले आहे. त्यानुसार प्रकाश केवट यांचे मुख्यालय जळगाव जामोद पंचायत समिती ठेवण्यात आले आहे.
कार्यालयीन कामकाजाच्या व्हाट्सॲप गृपवर एका महिलेच्या नावासह अश्लील मजकूर होता. त्यामुळे गृपमध्ये असलेल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापकांची कुचंबणा झाली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यानेच मॅसेज टाकल्याने अनेक मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काहींनी केवट यांना माहितीही दिली होती की, आपल्याकडून व्हाट्सअप गृपमध्ये अश्लील मॅसेज टाकण्यात आला आहे तो डिलीट करावा मात्र डिलिट एव्हरीवन करण्याऐवजी त्यांनी डिलीट मी केला त्यामुळे तो मॅसेज तसाच राहिला. या घटनेनंतर काही शिक्षक महिला आणि शिक्षकांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला यावेळी अश्लील मेसेज मध्ये उल्लेख असलेल्या महिलेने तक्रार केल्यास कारवाई होऊ शकेल असे सांगत त्यावेळी परत पाठवण्यात आले होते. मात्र असे असतानाही तब्बल ८० दिवस उलटल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढून शेगाव गटशिक्षण अधिकारी प्रकाश केवट यांना निलंबित केले आहे

संग्रामपूरात थंडीचा कडाका, हुडहुडी भरली. थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार.

0

,संग्रामपूर (अनिलसिंग  चव्हाण)ः- तालुक्यात
वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या 2ते3 दिवसांपासून तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊसआला नाही. ढगाळ वातावरणामुळे जवळपास थंडी गायबच झाली होती. मात्र आता वातावरणात बदल झाल्याने थंडीची लाट आल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान तापमानात देखील घट झाली आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी संग्रामपूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी शेकोट्यांचा आधार महिला व बालकांसह नागरिक घेत आहेत .आजही दिवसभर थंडी जाणवत होती.
पुढील आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अनेक जण थंडीत घराबाहेर पडणे देखील टाळत आहेत.डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तर गेल्या 4ते 5 पाच दिवसांपासून गुलाबी थंडीची चांगलीच चाहुल लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे शहरासह तालुक्यात सर्दी, खोकल्यासारखे आजार व व्हायरल इनफेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.सध्या थंडी वाढल्याने हरभरा, गहू या रब्बी पिकांना देखील फायदा होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत .पण धुक्यासारखे वातावरण राहिल्यास सर्वच पिकांना धोका आहे.

संग्रामपूर नगरपंचायत ४प्रभाग निवडणुकी करीता आज गुरुवारला दुसऱ्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल नाही.

0

 

संग्रामपूर नगरपंचायतचे ४ प्रभागासाठी दि.१८/जानेवारी २०२२ला निवडणूक होत असून आज गुरुवारला ३०/डिसेंबर रोजी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही.
संग्रामपूर नगरपंचायत अंतर्गत १७प्रभाग असून १३ प्रभागाची दि.२१/डिसेंबर /२०२१ निवडणूक पार पडली आहे. आता सर्वसाधारण जागेसाठी ४ प्रभागाकरीता दि.१८/जानेवारी २०२२ला निवडणूक होत असून दि. २९/ डिसेंबर /२०२१ ते ३/जानेवारी २०२२ पर्यंत ४जागेसाठी नामांकन अर्ज भरण्याची मुदत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज दुसरा दिवस असून एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही .अशी माहिती संग्रामपूर नगरपंचायतचे शरद कोल्हे याःचे कडून माहिती मिळाली आहे.
आज सुद्दा जरी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी कदाचित उद्या दि.३१/डिसेंबर रोजी कोण व किती नामांकन अर्ज दाखल करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.तसेच भाजप,महाविकास आघाडी ,प्रहार ,वंचित व अपक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल. याकरीता अजुनही उमेदवाराची चाचपणी सुरु असून विरोधकांना कोण टक्क देणार यामुळेच कदाचित उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर होत आहे.संग्रामपूर शहरात चर्चा होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त संतापले प्रकल्पांच्या कामाला लागणार ब्रेक……..

0

 

अमरावती… अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे कामं निर्माणाधिन असुन प्रकल्पाच्या निर्माण कार्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमीनी व घरे अत्यंत कवडीमोल दराने शासनाने संपादित केले आहे. अनेक गावे यामध्ये विस्थापित झाझे असुन मिळालेल्या तोगड्या मोबदला रकमेत प्रकल्पग्रस्तांना नव्याने आपले संसारीक जीवन योग्य रितीने करता येने कठीण झाले आहे. प्रकल्पांसाठी लागणारी शेतकऱ्यांची जमीन
आधीच सरळ खरेदी पद्धतीच्या नावाखाली शासनाने गिळंकृत केली असुन प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. आजच्या तारखेला पुनर्वसनाची कारवाई होत असताना कायदा मात्र 1999 चा जुनाच वापरल्या जात आहे.शासन ,प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या जिवावर उठले की काय असाच प्रत्येय प्रकल्पग्रस्तांना येत आहे.
जनप्रतिनीधींनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे.
हिवाळी अधिवेशनात जनप्रतिनीधी आपले मुद्दे सभागृहात मांडतील अशी आशा प्रकल्पग्रस्तांना होती परुंतु एकाही आमदारांने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित केले नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये जिल्ह्यातील स्थानिक आमदारांविषयी नाराजी व असंतोष निर्माण झाला असून येणाऱ्या काळात याचा भयंकर उद्रेक होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत आज भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्पाचे सुरु होणार होते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तशी जय्यत तयारी सुध्दा केली होती आपल्या संपूर्ण ताफ्यासह ते प्रकल्पावर पोहचले होते परंतु प्रकल्पग्रस्त आधिच हजारोंच्या संख्येने प्रकल्पावर उपस्थित होते संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्तांमधे चांगलीच जुंपली अधिकाऱ्यानी वेळीच सावध भुमिका घेतल्याने अनर्थ टळला. सध्या तरी काम बंद केले असून प्रकल्पग्रस्तांमधे शासन प्रशासन,व जनप्रतिनीधीं विषयी रोष खदखदतो आहे. सरकारने या संदर्भात सकारात्मक पावले न उचलल्यास संपूर्ण विदर्भातील प्रकल्पांवर प्रकल्पग्रस्तांची हिच भुमिका असनार असल्याचे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी सुचोवात केले.

जनाधार फाउंडेशन ” दिनदर्शिका 2022″ चे थाटात प्रकाशन सोहळा

0

 

सोलापूर जन आधार फाउंडेशन मार्फत दिनदर्शिका 2022” चे थाटात प्रकाशन सोहळा सोलापूरचे लाडके नेतृत्व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार श्री विजयकुमार जी देशमुख मालकांच्या शुभास्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने व भारत मातेच्या जय घोषात करण्यात आले सदर शुभप्रसंगी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी शारगंगाधर हैदळे, कुलकर्णी,सभागृहनेते शिवानंद पाटील,नागेश भोगडे,राकेश उदगिरी,अनिल देवनपल्ली,येमुल आदी उपस्थित होते सदर शुभप्रसंगी प्रशासकीय योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणारे रुग्णसेवक तथा जनाधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री आनंद गोसकी यांच्या कार्याची विशेष स्तुती करून त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पदे येतात जातात परंतु सातत्याने मानव सेवा घडलीच पाहिजे असे सांगुन विजयकुमार देशमुख मालक यांनी जमलेल्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद सलगर तर जनाधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री आनंद गोसकी यांनी आभार प्रकट केले उपस्थित जनआधार फाऊंडेशनचे महेश दासी,शुभम मिठ्ठा,आकाश बुर्ला,लोकेश आंबट,श्रीकांत शिंदे,पवन गोसकी,विराज वग्गा,वेणुगोपाल सामल,अंबादास,दुर्गम,मोहन पेगड्याल,दत्ता येलुर ,चंदन पेगड्याल,विनायक आंबट,राहुल रासकोंडा अन्य परीसरातील सर्व नागरीक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

एकदा ‘सह्याद्री’ कृषी पर्यटन केंद्रावर याच..! – नंदकुमार पालवे

0

 

 

मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण

खामगाव – उंद्री – जालना रोड तसा गजबजलेला रोड. नियमित वाहनांची ये-जा… सर्वांचं आयुष्य गाडीच्या चाकांना गुंढाळलेलं.. जस जसे गाडीचे चाकं फिरतात तस तसं आयुष्यही पुढे सरकतं.. बालपण, शिक्षण, विविध ट्यूशन, classes, त्यानंतर नोकरी, घर, यामध्ये संपत आलेलं तारुण्य व सुरू झालेलं प्रौढत्व असंच पुढे सरकत जातं.. प्रौढत्व ही संपून मग उतारवय सुरू होतं आणि सुरू होतो खरा प्रवास.. जीवनाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावतांना उतारवयात लक्षात येतं की आपलं तर जगायचंच राहून गेलं..
आपण सर्व सुखाच्या मागे धावत सुटलो पण ते ही आपल्यापासून दूर जात राहिलं, ‘शेतकरी शहाणा होतो दिवाळीला’ तसंच माणूस शहाणा होतो उतारवयात..
हे सर्व व्याप विसरून जर तुम्हाला जगायचं आनंद घ्यायचा असेल तर आमच्या अमोल भाऊ साठे व पवन भाऊ साठे यांनी रक्ताचं पाणी करून निर्माण केलेल्या ‘सह्याद्री’ वर अर्थात ‘ सह्याद्री कृषी पर्यटन’ केंद्रावर नक्की या..
सह्याद्री वर पोचले की सर्वात प्रथम तुमची नजर पडते शिवरायांच्या भल्यामोठ्या मूर्ती वर..मराठी मनाचा केंद्रबिंदू छत्रपती शिवराय व संबंधित ढाल तलवारी, भाले पाहून तुम्हाला जाणीव होते या केंद्राचं ‘सह्याद्री’ नाव किती सार्थ आहे..
इथे उंच झोक्यांवर झुलतांना तुमच्या बालपणीचा पिंपळाच्या झाडाला टांगलेला नागपंचमीचा झोका तुम्हाला आठवेल, त्याचा आनंद तुम्हाला कुठल्याच बंगाईत मिळणार नाही.. शेकोटीच्या अवतीभोवती शेकता शेकता चहा घेतांना तुम्हाला तुमचे पारावर गप्पांची मैफिल भरवणारे मित्र भेटतील, ओढे नाल्यांवर तुम्ही व मित्र परिवाराने बालपणी केलेल्या दंग्यांचा अनुभव तुमच्या मुला मुलींना तुम्हाला सह्याद्री वर देता येईल.. ससे व कुत्र्यांचा तंदुरुस्त पिल्ल्यांसोबत तुमचे बच्चे कंपनी भूक विसरून जातील.. अलगद एखादा कबुतर किंवा मोर तुमच्या खांद्यावर येऊन बसेल तेव्हा तुम्हाला आपण प्रेमळ माणूस असल्याचं प्रमाणपत्र आपसूक मिळेल ( पशु पक्षी प्रेमळ माणसांजवळच येतात असं म्हणतात.
या वैरागड च्या माळरानावर बॉटल पाम, नारळी सारखे उंच झाले डौलाने डोलत आहेत, ठिकठिकाणी कमळ फुललेले आहेत, माझ्यासारखा 100 किलो चा माणूस झोपू शकेल अश्या भल्यामोठ्या ब्रम्हराक्षसाच्या पानाला पाहून त्याच्या सोबत सेल्फी घेण्याची मोह एखादा इंद्रजित च आवरू शकेल. विविध वेस्ट वस्तूंपासून बनवलेल्या बेस्ट वस्तू तुमचं लक्ष वेधून घेतात.. छोटा झुलता पूल, बांधातून तयार झालेला सुरेख धबधबा, आजूबाजूला उंचच उंच डोंगर, सगळंच अप्रतिम…
बांबू च्या कलाकुसरीने बनलेल्या अनेक वस्तू साठे बंधुद्वयाचं कलाप्रेमी तुम्हाला दिसेल.. याठिकाणी एक ही वस्तू इथे वाया जाऊ देत नाही. लोप पावत चाललेली दमनी, बैलगाडी मनाला अनामिक आनंद देऊन जातात.
ज्यांना मराठी संस्कृती, गड किल्ले व शिवरायांच्या रुची आहे त्यांनी अमोल भाऊ च्या आईंना जरूर भेटावं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या आवर्जून भेटतात आणि मग ते पाहुणे ‘पाहुणे’ राहत नाहीत तर सौभाग्यवती गिताआजी जगन्नाथ साठे यांच्या भल्यामोठ्या परिवाराचा, सह्याद्री परिवाराचा घटक होतात. गिता आजीचं वय आज केवळ 71 वर्ष.. ‘केवळ 71 वर्ष’ का म्हणतोय याचा प्रत्यय तुम्हाला त्यांना भेटल्यावर येईल. मागच्या वर्षी आजी रायगडावर जाऊन आल्या.. अंगभरून नेसलेलं नऊवारी पातळ, कपाळावर लखलखनारं कुंकू, गोऱ्यापान चेहऱ्यावरील स्मितहास्याला कष्टातून आलेली तेजाची लकेर, करारी डोळे, अस्सल मराठी पोशाखात वावरणाऱ्या आजी जेव्हा समोर येतात तेव्हा आपसूक आपले हात त्यांच्या पायाकडे झुकतात. “पोरांनो आता जेवण केल्या शिवाय जाऊ नका” म्हणताना त्यांच्या डोळ्यातील माया आपल्याला दिसते.
शिवरायांचा इतिहास सांगतांना त्यांचं अफाट वाचन , दांडगा शब्दसंग्रह, त्या शब्दांचा लीलया वापर व छत्रपतींच्या केवळ नावामुळे त्या माऊलीच्या डोळ्यात आलेला अभिमान, स्वाभिमान आपल्याला त्यांच्या शब्दा शब्दांत दिसतो.
सह्याद्री कृषी पर्यटन नवीन आहे, अनेक गोष्टी बनवायच्या बाकी आहेत, कुठलंही शासकीय अनुदान नाही, केवळ आपल्या सारख्या माणसांच्या भेटींवर हा शिवधनुष्य साठे बंधू पेलत आहेत. आपण या, पहा आणि आपल्या अनुभवाच्या शिदोरी तुन ‘सह्याद्री कृषी पर्यटन’ अधिक सुंदर करायला मदत करा.. मराठी माणसाने चालू केलेल्या ह्या पर्यटन केंद्राला आपण जाऊन नक्की त्यांचा उत्साह वाढवावा. अस्सल मराठी जेवणाचा आस्वाद घ्यावा..
आपल्या परिवारातील जन्मदिवस, लग्नाचे वाढदिवस किंवा इतर मंगल प्रसंग याठिकाणी सेलिब्रेट करावे.. मी ग्वाही देतो सह्याद्री वरील एक दिवस आपल्या कायम लक्षात राहील.

एक उनाड दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तो फक्त जगता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे.. ,
जर तुम्हाला सापडत नसेल तो उनाड दिवस तर मी त्याचा पत्ता तुम्हाला देतो, एक दिवस सहज जाऊन पहा, बघा तुम्हाला तुमचा ‘एक उनाड दिवस’ सापडतो का?
पत्ता लिहून घ्या !
सह्याद्री कृषी पर्यटन,
वैरागड, ता. चिखली जि. बुलडाणा
खामगाव जालना मार्गावर, उंद्री च्या जवळ..
संपर्क :अमोलभाऊ साठे: 9850368705, 9373007144
पवनभाऊ साठे : 9851166935

नंदकुमार पालवे

कोनसरी केंद्राची केंद्रस्तरीय “शिक्षण परीषद” कढोली येथे संपन्न.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी:-दिनांक २९ डिसेंबर,
गट साधन केंद्र पंचायत समिती चामोर्शी तालुक्यातील केंद्र कोनसरी येथील शिक्षकांची “केंद्रस्तरीय शिक्षण परिषद” जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते,गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के यांच्या प्रेरणेतून कोनसरी केंद्राची शिक्षण परिषद केंद्र प्रमुख सी एम गोटीपर्तीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शिक्षण परिषदेच्या उद्घाटक विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते होते तर प्रमुख अतिथी प्रथम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक श्रीकांत पावडे, विषय साधनव्यक्ती कु. सरलक्ष्मी यामसनी,संसाधन शिक्षक कु.रिता चव्हाण,मुख्याध्यापिका सहारे,मुख्याध्यापक बळगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण परीषदेमध्ये शिक्षकांची नोंदणी,बालभवनातील साहित्यांचे सादरीकरण,मागील परीक्षेतील स्तरनिहाय विद्यार्थ्यांचे गट तयार करून सुलभन,फुलोरा संबंधित शिक्षकांना येणाऱ्या समस्यावर चर्चा,शिक्षकांना विद्यार्थी स्तर बदलविण्याकरीता केलेल्या विविध बाबींवर सादरीकरण, विषय साधनव्यक्ती यांनी केलेल्या निरीक्षणावर चर्चा,केंद्रप्रमुख यांचे प्रशासकीय विषय,आधार कार्ड
शा पो आ चे मागील वर्षीचे खाते क्रमांक,सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती,नवोदय विद्यालय फार्म,संकलित चाचणी,विविध उपक्रम,विविध योजना,भौतिक सुविधाचे ठराव इत्यादीबाबत माहिती देण्यात आली.
शिक्षण परिषदेचे सुलभक केंद्र प्रमुख गोटीपर्तीवार,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,कु.यामसनी,चव्हाण, मुख्याध्यापक बडगे,जुवारे,कु पेंदाम,बालमवार,सहारे मॅडम,बुरगुटे यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेचे सूत्रसंचालन प्रदीप सेडमेक यांनी केले,प्रास्ताविक कोडापे मु अ कढोली,आभार प्रदर्शन तलांडे यांनी मानले.
शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी कोनसरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

अवैध गावठी हातभट्टीच्या दारूचा सुळसुळाट…

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

कासारखेडे येथे सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या दारूवर बंदी करावी या मागणीसाठी गावातील आदीवासी महिलांनी यावल येथील तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन दिले आहे

“तालुक्यातील कासारखेडे गावात व परिसरात मागील अनेक दिवसापासून अवैध गावठी हातभट्टीच्या दारूचा सुळसुळाट झाला असून या दारुमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कमाविता कुटुबप्रमुख दारूच्या व्यसनामुळे मरण पावल्याने अनेकांचे कुटुंब उघडयावर पडत आहे. गावात सार्वजनिक ठिकाणी सहजरित्या मिळत असलेली गावठी दारू ही सतत पीत असल्याने पुरुष व तरूण यांचे मानसिक संतुलन बिघडत असून गेल्या काही दिवसात गावात दोन-तीन जणांच्या आत्महत्या केल्याचे प्रकार झाले आहेत, गावातील महीला त्या दारू विक्री करणाऱ्यांना गावात दारू विकू नये असे सांगायला गेल्यास दारू विकणारे हे गुंडगिरीची भाषा वापरून महीलांना धमकावतात.” असे महीलांचे म्हणणे आहे .

गावात ही दारूविक्री सतत सुरू राहिली तर भविष्यात अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही तरी गावातील अवैध दारू विक्री बंद करावी. अशा आशयाचे निवेदन कासारखेडे येथील आदीवासी महिलांनी तहसीलदार महेश पवार व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना दिले असून तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी दुरध्वनीव्दारे सूचना देवुन अशा प्रकारे दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करावी असे सांगीतले. या तक्रार निवेदनावर आशा नवाज तडवी, नजमा हमीद तडवी ,सायरा फत्तू तडवी, साबिराबाई तडवी, शानजान तडवी, जैनूर तडवी यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरी आहेत.

मराठवाड्याचे जालना जिल्ह्याचे सुपुत्र प्रशिक सम्राट जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित.

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादिका मो.9921400542

भारतीय संविधानाचा जागर करीत असलेल्या लेक लाडकी अभियान अंतर्गत नुकतेच२७ डिसेंबर २०२१ रोजी सायं.७ ते ९ या कालावधीत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात विवीध वैशिष्ट्यपुर्ण चेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यातआले.
याप्रसंगी उपस्थित मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार- भाई जगताप यांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडीच्या युवती नेत्या डॉ. मोनिका जगताप, सिने अभिनेत्री नृत्यांगना शिल्पा ठाकरे यांच्या वतीने सिने अभिनेत्री नृत्यांगना पाठक, सिने दिग्दर्शक- प्रसाद तारकार, स्त्री भ्रूण हत्या विरोधी कार्य करणारे डॉ. प्रदीप निचत, मिस युनीवर्स महाराष्ट्र२०-२० वृषाली प्रविण, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष- नरेंद्र वाबळे आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी राज्यातील ४० मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये सामाजिक, सांस्कृतीक, आणि धार्मिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे, मराठवाड्यातील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक जालना जिल्ह्याचे सुपुत्र- प्रशिक सम्राट यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक गोपीनाथ कदम सह धम्मबंधु- किशोर शिंदे, देठे प्रतिष्ठान चे अध्यक्ष – आयु. शांताराम देठे, वरिष्ठ पत्रकार – संजय पारडे, विलास जाधव, यांचेसह छायाचित्रकार- उदय कासारे. आदि मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.समाजभिमुख कार्य करीत असताना कार्यकर्त्यास फार मोठ्या अग्नी दिव्यातुन जावे लागते, त्यासाठी साथ देणाऱ्या स्नेहमित्रांचे आशिर्वाद पाठीशी असणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या कार्याची नोंद आज कार्यक्रमाचे आयोजक- सुरज भोईर यांनी घेऊन लेक लाडकी अभियान अंतर्गत आमचा हा सत्कार घडवून आणला त्याबद्दल त्यांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन प्रशिक सम्राट यांनी केले.