Home Blog Page 386

ARYAN KHAN: आर्यन खानला जामिन न मिळण्याच कारण काय?

0

 

SURYA MARATHI NEWS

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख( shahrukh khan खानचा मुलगा आर्यनला aryan एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (NCB) तीन ऑक्टोबरला अटक केली होती.

जवळपास तीन आठवड्यांनंतरही हे प्रकरणं चर्चेत आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही.
मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं 20 ऑक्टोबरला आर्यन खान आणि इतर दोन आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.
आर्यन खानकडे कोणतंही ड्रग्ज आढळलेलं नाही. तरीही त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे बंदी असलेले अंमली पदार्थ असल्याची माहिती त्याला होती. तसंच ते दोघं सोबतच होते, त्यामुळं या प्रकाराला ‘कॉन्शियस पझेशन’ (ड्रग्ज असल्याची माहिती असणे) समजलं जाईल, असं कोर्टानं जामीन फेटाळताना म्हटलं.
अरबाज मर्चंटकडून सहा ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं होतं. शिवाय NCB न्यायालयासमोर सादर केलेल्या व्हाट्सअॅप चॅटचा उल्लेखही जामीन नाकारताना केला होता.
आर्यन खान ड्रग्ज संदर्भात अज्ञात लोकांशी चर्चा करत होता. त्यात ड्रग्जचं अधिक प्रमाण आणि हार्ड ड्रग्जबाबत चर्चा सुरू होती, हेही त्यावरून स्पष्ट होतं, असं न्यायालयानं म्हटलं.
त्यामुळं आर्यन खान ( aryan khan) प्रतिबंधित अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या संपर्कात होता आणि नियमितपणे मादक पदार्थांशी संबंधित अवैध कृत्यांमध्ये त्याचा समावेश होता, हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
त्यामुळं जामीनावर असताना आर्यन खान पुन्हा असं कृत्य करणार नाही, याबाबत न्यायालयानं साशंकता व्यक्त केली.
या प्रकरणात प्रथम दर्शनी पाहता, कट रचल्याचे (नियोजनबद्धरित्या सर्व काही केल्याचे) पुरावे आहेत आणि सुनावणीदरम्यान यावर सखोल चर्चा केली जाईल, असंही विशेष न्यायालयानं म्हटलं.
या प्रकरणी आर्यन खानच्या aryan khan विरोधात काहीही पुरावे नसल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं होतं. मात्र सर्व आरोपी एकाच धाग्यानं जोडलेले असून ते एका मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं.
आर्यन खानला एनसीबीनं NCB तीन ऑक्टोबरला ड्रग्जशी संबंधित एका छाप्या प्रकरणी अटक केली होती.
एनसीबीनं मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूजवर छापा मारून आर्यन खानसह अनेकांना ड्रग्जचं सेवन आणि कट रचल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्यन खानसह इतर आरोपींना एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी) सह 20 बी (खरेदी), 27 (विक्री), 28 (गुन्हा करण्याचा प्रयत्न), 29 (चिथावणी देणे, कट रचणे) आणि 35 (सदोष मानसिक स्थितीची शक्यता) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणाशी संबंधित मोठे प्रश्न
आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. तसंच तो ड्रग्ज सेवन करत असल्याचाही पुरावा देण्यात आलेला नाही, मग त्याला जामीन कोणत्या आधारावर नाकारला जात आहे? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे.
Midea मीडिया हाईप आणि एनसीबीच्या भूमिकेमुळं आर्यन खानला जामीन मिळण्यात अडचणी येत असल्याचं सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विकास सिंग म्हणाले.
“हा कायदा प्रामुख्यानं आरोपीकडे ड्रग्ज मिळण्यासंदर्भात आहे. आरोपीकडून किती प्रमाणात ड्रग्ज जप्त झाले त्यावरूनच शिक्षादेखील ठरते,” असंही ते म्हणाले.
”या प्रकरणात आर्यन खान ग्राहक असेल, तर ग्राहकासाठी हा गुन्हा जामीनपात्र आहे. ग्राहक म्हणून आर्यन खान विरुद्ध हे प्रकरण कमकुवत असण्याचं कारण म्हणजे, त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही, किंवा त्याच्या रक्ताचे नमुने अथवा हेअर फॉलिकल्सदेखील घेण्यात आलेले नाही.”
आश्चर्यकारक बाब म्हणजे, एनसीबीनं आर्यन खानला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं मात्र, त्याच्या रक्ताचे, लघवीचे अथवा हेअर फॉलिकल्सचे नमुने घेण्यात आले नाही.
ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपीच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यांसह हेअर फॉलिकल टेस्टद्वारे केसांचे नमुने घेऊन अंमली पदार्थांच्या सेवनाची माहिती मिळवली जाते.

सर्व परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते एनसीबीचा संपूर्ण खटला हा आर्यन खान ड्रग्जची तस्करी आणि संपू्र्ण कटात सहभागी होता यावर आधारित आहे. या आरोपांमुळं न्यायालयाकडून त्याला जामीन मिळणं कठीण ठरणार आहे.
दरम्यान, वकील आशिमा मंडला यांच्या मते, सरकारी पक्षाच्या खटल्यात अनेक कमतरता आहेत.
“आरोपींवर लावलेली कलमं, ड्रग्ज बाळगणे आणि वापराशी संबंधित आहेत. मात्र हे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करता आलेले नाहीत,” असं त्या म्हणाल्या.
(NCB)एनसीबीनं आधी आर्यन खानकडे (ARYAN kHAN) ड्रग्ज आढळल्याचं म्हटलं आणि नंतर त्याला नकार दिला, असं मंडला म्हणाल्या.
नंतर असं सांगण्यात आलं की, तो ड्रग्जचा वापर करत होता, मात्र ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही वैद्यकीय पुरावे नाहीत.
“म्हणजे तो पेडलर आहे, असं एनसीबीला म्हणायचं आहे का? जर हा आरोप असेल तर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं प्रमाण कमी असल्यानं हे सिद्ध करणंही कठीण ठरेल,” असंही त्या म्हणाल्या.
जामीनाचा निर्णय हा केवळ न्यायालयासमोर ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे केला जातो, प्रकरणाच्या गुण-दोषांच्या आधारावर नाही, असंही त्या म्हणाल्या.
शिवाय जर प्रकरण कॉन्शियस पझेशनचं असेल तर क्रूजवरील इतरांवर हा आरोप का लावला नाही? केवळ 20 लोकांपुरतंच हे प्रकरण मर्यादीत का ठेवण्यात आलं, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण प्रकरण व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित?
तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत या प्रकरणात समोर आलेली माहिती पाहता, एनसीबीचा या आरोपींच्या विरोधातील खटला केवळ व्हॉट्सॅप चॅटवर आधारित आहे.
गेल्या वर्षी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (reya chakrvati) हिच्या अटकेच्या वेळीदेखील अशाच प्रकारचा घटनाक्रम पाहायला मिळाला होता. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्सशी संबंधित एका प्रकरणात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अटकही केली होती.
28 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टानं जामीनावर सोडलं होतं.
आर्यनच्या वकिलांनीही हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
व्हॉट्सअप चॅट पुरेसे आहेत का?
या प्रकरणातही आर्यन खानला जामीन नाकारण्याचं कारण हे, व्हाट्सअॅप चॅटच असल्याचं सांगण्यात आलं. त्यात आर्यन खान अज्ञात लोकांशी ड्रग्जबाबत चॅटिंग करत असल्याचं सांगण्यात आलं.
म्हणजे केवळ व्हाट्सअॅप चॅटच्या आधारे आर्यन खानचा जामीन अर्ज नामंजूर होऊ शकतो का?
द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातील 15 जुलैच्या एका वृत्तानुसार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठानं एका प्रकरणाच्या सुनावणीत, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मॅसेजला काहीही महत्त्वं नसल्याचं म्हटलं होतं.
या वृत्तानुसार सोशल मीडियावर सध्या काहीही तयार केलं किंवा हटवलं जाऊ शकतं. न्यायालय व्हाट्सअॅप मॅसेजला महत्त्व देत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.
आशिमा मंडला यांच्या मते, जर एनसीबीकडे व्हाट्सअॅप चॅटमध्ये आरोपींच्या विरोधात पुरावे असतील, तर त्यांनी नावं जाहीर न करता न्यायालयासमोर ती सादर करून, स्पष्टपणे आरोप लावावा.
अधिक माहितीसाठी वाचा – व्हॉट्सअॅप चॅट आरोपीविरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतं?
‘मीडिया ट्रायल अधिक, तपास कमी’
कायदा कडक आहे की नाही हा मुद्दा या प्रकरणात नाही. तर त्या कायद्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे का? हा मुद्दा आहे, असं वकील विराग गुप्ता म्हणाले.
“या प्रकरणावर मीडिया ट्रायल जास्त होत आहे, आणि ज्या गांभीर्यानं अशा गुन्ह्याच्या विविध पैलूंची चौकशी व्हायला हवी, तेवढी होताना दिसत नाही,” असंही ते म्हणाले.
”जर आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असेल, तर अटकेच्या एवढ्या दिवसांनंतरही त्याच्या संबंधित ठिकाणांवर छापे आणि बँक खात्यांची चौकशी करणंही गरजेचं आहे. त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.”
मात्र, एनसीबीनं आर्यन खानवर तो एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या समुहाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं त्याला जामीन मिळणं कठिण आहे, असं गुप्ता म्हणाले.
आरोपी आणि त्याचं कुटुंब प्रसिद्ध आणि चर्चित असल्यानं पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असं सांगून एनसीबी जामीनाला विरोध करत आहे.
लक्ष वेधून घेण्याचा प्रकार?
“हा दावा खरा असेल तर मग, व्हॉट्सअॅप चॅट आणि आरोपींच्या कबुली जबाबांशिवाय एनसीबीनं इतर पुरावे गोळा करण्यासाठी का प्रयत्न केला नाही, असं विराग गुप्ता म्हणाले.
”आर्यनशी संबंधित बँक खाते सील करण्याबरोबर घरी छापे मारून, महत्त्वाची कागदपत्रं का जप्त करण्यात येत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तसं केल्यास रॅकेटचा भांडाफोड होईल आणि संपूर्ण टोळीला शिक्षा देता येऊ शकेल?
एनसीबीकडून हाय-प्रोफाईल अटक ही माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा कधी-कधी दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी केली जाते, असं विकास सिंह म्हणाले.
“गेल्या वर्षीही एनसीबीनं अनेक सेलिब्रिटींना बोलावत त्यांची अनेक दिवस चौकशी केली होती,” असंही ते म्हणाले.
एनसीबी केवळ लोकांना त्रास देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचं, विकास सिंह म्हणाले.
“ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या मोठ्या माशांना सोडून, गुन्ह्यात शिकार ठरलेल्या लोकांच्या मागं लागण्यावर एनसीबीनं NCB लक्ष केंद्रीत केलं आहे,”असंही सिंह यांनी म्हटलं.

SURYA MARATHI NEWS

खाजगी वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडी मालकाच्या संमतीशिवाय वाहन दुसऱ्याला दिले नांदुरा पोलीस यांचा पराक्रम

0

 

प्रकरणात गौडबंगाल असल्याचा संशय…

नांदुरा:-स्वतःच्या मालकीची चार चाकी वाहन मित्रांना घेऊन जात असताना नांदुरा पोलिसांनी ते तपासणीच्या नावाखाली थांबविले आणि नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये ते ठेवायला सांगितले सदर प्रकरणात गाडीमालकाने ही गाडी आपली असून याबाबत काय गुन्हा केला अशी विचारणा केल्यानंतर ती गाडी परत देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आणि यानंतर ही गाडी त्रयस्थ माणसाला मालकाची संमती न घेता परस्पर दिल्याने या प्रकरणी नांदुरा पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून सदर प्रकरणात काय गौडबंगाल आहे याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास बरेच काही काळेबेरे उजेडात येईल यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गाडी मालकाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतुन केली आहे..
याबाबत सविस्तर असे की अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या मनात्री येथील रहिवासी अनंत शंकरराव थोरात हे शेगाव येथील सामान्य रुग्णालयात रूग्णवाहीकेवर चालक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 6 /9/ 2021रोजी श्री थोरात हे आपल्या मित्रांसमवेत गाडी क्रमांक एम एच 28 ए.एन. 2827 या अर्टिका गाडीने शेगाव येथून त्रंबकेश्वरला दर्शनासाठी जात होते नांदुरा शहरात तेथील पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून गाडीची कागदपत्रे मागितली कागदपत्रे दाखल केल्यानंतर गाडी पोलीस स्टेशन मध्ये लावण्यास त्यांनी बजावले. यानंतर गाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा कागदपत्र व मालकी हक्काबाबत ठाणेदार गावंडे, चौकशी अधिकारी दौंड यांना सर्व कागदपत्रे दाखविले. त्यावेळी ठाणेदार गावंडे यांनी सदर कागदपत्रे मला नको दाखवू गावातील प्रतिष्ठित नागरिक लाला भाऊ यांना दाखविण्यास सुचविले. ठाणेदार ठाणेदार यांचे बोलणे त्यावेळी मला आश्चर्यकारक वाटले माझी स्वतःची गाडी असताना व सर्व कागदपत्रे सोबत असताना गाडी अडविण्याचा उद्देश काय याबद्दल मला शंका आल्याने मी गाडीची कागदपत्रे दिल्यानंतर गाडीची मागणी केली असता संबंधितांनी मला गाडी देण्यास नकार दिला.. यानंतर अनंत थोरात हे निराश होऊन शेगावला परतले.. सदर प्रकाराची माहिती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांना दिल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री निलेश घोंगे यांच्याशी संपर्क साधून आपण सर्व घटनाक्रम त्यांना कळविला यामुळे निलेश घोंगे यांनी त्यांचे मित्र युवराज देशमुख यांना सोबत घेऊन नांदुरा पोलिस स्टेशन गाठले . संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार देऊन थोरात यांना वाहन पाहिजे असेल तर त्यांनी न्यायालयात जावे परंतु न्यायालयात जाण्यासाठी पोलिसांचे कोणतेही कागदपत्र देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर नांदुरा पोलिस स्टेशन मध्ये सदर प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता नांदुरा पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करून नकार दिला. या प्रकरणात गुरुवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी नांदुरा पोलिस स्टेशन मधून सातव साहेब यांचा फोन आला होता व त्यांनी गाडीचा व्यवहार काय आहे असे विचारून मला त्यांनी अपमानजनक वागणूक देऊन तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट आला आहे असे म्हणून माझ्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.. दिनांक 6. 9. 2021 रोजीही या अधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ करून अपमानीत केले होते. येथे वकिली करू नको अशी मल्लीनाथीही त्यांनी केली. सदर प्रकरणाची तक्रार दिनांक 1/10/2021. रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्या नंतर दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी चौकशी अधिकारी दौंड यांचा फोन आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणात आपले काहीही स्वारस्य नसून आपण ठाणेदार यांच्या लेखी आदेशाने केले ती सर्व कार्यवाही ठाणेदारांच्या लेखी आदेशाने केल्याने आपण ठाणेदारांशी संपर्क साधावा असे सुचविले. ही गाडी अजूनही गाडीच्या मूळ मालकाला परत मिळालेली नसून पोलिसांनी ती परस्पर दुसऱ्याला दिली असावी किंवा तेच वापरत असावेत अशी शंका येऊ लागली असून या प्रकरणात पोलिसांनी इतके स्वारस्य का दाखवावे याबद्दल आता शंका वाटू लागली आहे सदर प्रकरणाची उच्चाधिकार अधिकारी मार्फत चौकशी करण्याची मागणी श्री थोरात यांनी केली असून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्याकडे सदर प्रकरणी चौकशी करावी म्हणून थोरात यांनी नीलेश घोंगे यांच्यामार्फत संपर्क साधल्याची माहिती त्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेनेची बुलंद आवाज मा.खा.संजयजी राऊत साहेब व नासिक जिल्हा संपर्क नेते मा.भाऊसाहेब चौधरी यांचे उद्या २४ आॅक्टोंबर रोजी नांदगाव मतदारसंघात आगमन

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

उद्या दि.२४ आॅक्टों.रविवार रोजी नांदगाव मतदारसंघात शिवसेना पक्षाचे खासदार मा.संजयजी राऊत साहेब तसेच नासिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे विकासकामांच्या
उद् घाटनासाठी शहरात आगमन होणार आहे.आॅक्सिजन प्लांट, मनमाड व नांदगाव तसेच १५ व्या वित्तआयोगातुन १४ कोटींच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन मा.संजयजी राऊत व भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते होणार असल्याचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासअण्णा कांदे यांनी सांगीतले असुन त्याप्रसंगी कार्यकर्ता मे़ळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक ,महीला आघाडी यांच्यासह नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरा – बायकोचा अश्लील व्हिडीओ कॉलचा धंदा ; ब्लॅकमेल करून लाखोंची कमाई !

0

 

SURYA MARATHI NEWS

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था लोकांचे नग्न व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या गँगचा गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गँगचा म्होरक्या योगेश गौतम आणि त्याची पत्नी सपना गौतम यांना अटक केली. हे पती पत्नी अन्य राज्यातील लोकांना ब्लॅकमेल करत होते. आतापर्यंत यांनी अनेकांकडून कोट्यवधी रूपये उकळले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बऱ्याच काळापासून हा ग्रुप लोकांना ठगत होता. गाझियाबाद पोलिसांनी राजकोटच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर या गँगचा पर्दाफाश केला. तुषार नावाच्या व्यक्तीनं राजकोटमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून ८० लाख रूपये उकळण्यात आले

 

या गँगकडून अनेक पॉर्न व्हिडीओ, आपत्तीजनक सामग्री, लॅपटॉ, मोबाईल, अश्लिल सीडी, मेमरी कार्ड, पेन ड्रायईव्ह, रोख रक्कम, चादीचे दागिने जप्त केले असून ८ बँक खात्यांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. ही गँग नाशिक, दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रिय होती. राजकोटमधील एका व्यक्तीला ठगून त्यांनी लाखो रूपये लूटले होते.

या गँगच्या म्होरक्याची पत्नी काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याची आयडिया मिळाली. दोन वर्षांपासून पती पत्नी मिळून ही गँग चालवत होते. हे दोघं मुलांना पैसे देण्याचं आश्वासन देऊन अश्लिल व्हॉईस कॉल आणि न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास सांगत होते. यात जे लोक अडकायचे त्यांना पर्सनल व्हॉट्सअॅप क्रमांक देऊन अश्लिल व्हिडीओ चॅट करत होते, अशी माहिती गाझियाबाद सिटी एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली.

जी मुलगी व्हिडीओ चॅट करायची तिला महिन्याला २५ हजार आणि जी केवळ कॉल करायची तिला महिन्याला १० हजार रूपये दिले जात होते. एका वेबसाईटवर आपला बनावट आयडी तयार करून हा प्रकार केला जात होता. एखाद्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढून नंतर धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली जायची असंही पोलिसांनी सांगितलं.

किनगावात तहसिलदारांचे पीएम किशानचे खाते हॅक करीत ३८ जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चाल काने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किशानचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन तहसिल कार्यालयात पीएम किशान संर्दभातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या व तरी देखील ३८ नोंदी झाल्या कशा या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला व हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसिल कार्यालयातील लिपीक दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तीन वर्षापासुन तहसिल कार्यालयात त्यांच्या कडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्याअनुशंगाने ते मागील दोन वर्षापासुन पि.एम.किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज पाहत आहेत. सदर योजनेत शेतकऱ्यांचे नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन), आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे, चुकीचा खाते क्र.असल्यास ते दुरुस्त करणे, शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाइन पि.एम. किशानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसिलदारांच्या आदेशाने करत होते. मात्र दिनांक १४ ते ३० सप्टेंबर या कलावधीत तहसिलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसिलदार महेश पवार यांच्या परवानगीनेचं उपलब्ध् व्हायचे म्हणुन ते देखील बंद होते दरम्यान दिनांक १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पिएम किशान संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शना आले व त्यांनी या बाबत थेट तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली तेव्हा तहसिलदारांच्या लॉगीन आय-डी या पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हँक करून ललित नारायण वाघ रा.किनगाव ता.यावल यांना कोणतेही अधिकार नसतांना ३८ शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले व या प्रकरणी आयटी अँक्ट सह विविध कलमान्वये ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.
आधी पण नोंदी केल्याचा संशय.
पैसे घेवुन पि.एम.किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या म्हणुन आपण आपल्याचे कर्मचाऱ्यांवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याच्या सुचना केल्या तेव्हा ३८ नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावुन त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतल्याचे त्यांनी सांगीतंले तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसुल प्रशासन बदनाम होते.असे तहसिलदार महेश पवार यांनी सांगीतले- आहे

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

0

 

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वेबलिंकद्वारे उपरोक्त माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे: (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. (२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. (३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे. (४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.

महसूलमंत्र्याच्या या तालुक्यातील बैंकेत 56 लाखाचा अपहार

0

 

SURYA MARATHI NEWS

अहमदनगर ऑक्टोबर 2021 :- या बैंकेत बनावट कागदपत्र तयार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतले व बँकेच्या पैशाचा स्वतःच्या फायद्या करिता अपहार (गोटाला )करून चक्क एक बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर शहरातील तत्कालीन युनियन बँकेच्या व्यवस्थापकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन कुमार, रूपेश धारवाड (दोघांचा पत्ता माहीत नाही) व विलास एल. कुटे (गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत समाधान सीताराम पवार (वय ३५, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
की सन २०११ ते २०१३ दरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाचे (पूर्वाश्रमीची कार्पोरेशन बँक) तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, सिंगल विडो ऑपरेटर रूपेश धारवाड व मध्यस्थ विलास कुटे यांनी संगनमताने १५ जणांच्या नावावर शेतीसाठी कर्जप्रकरणे मंजूर केली होती.
या कर्ज खात्याच्या अनियमिततेमुळे चौकशीसाठी आलेल्या पुणे येथील विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रश्नाच उडवाउडवीच्या उत्तरामुळे संशय बळावल्याने, बैंक शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांना सविस्तर चौकशी करण्यास सांगितले.
यामध्ये बँकेच्या तत्कालीन शाखाधिकारी नितीन कुमार यांनी दि. १/१/२०११ ते दि. ३१/२२/२०१३ बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करून ५६ लाखांचा अपहार केला. या कामासाठी त्यांना रुपेश आर. धारवड, विलास एल कुटे (रा. गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) दोघांनी सहकार्य केले.
हा अपहार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, रुपेश आर. धारवड, विलास एल. कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरु आहे

SURYA MARATHI NEWS

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची बिनविरोध निवड

0

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

निलंगा मतदार संघाचे लोकप्रिय नेते. मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल निटूर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भैय्यासाहेबांचा सत्कार करून सन्मान केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,यावेळी सुरेंद्र धुमाळ, रामभाऊ गायकवाड,दिलीप हुलसुरे,दिनकर निटूरे,बापूसाहेब मोगरगे,रमेश मोगरगे,विष्णु पाटील, अशोक निटूरे,जब्बार चाऊस,नर्सिंग ढाकणे,सत्यप्रकश होळीकर, ज्ञानेश्वर पिंड,राम बिराजदार,विकास पाटील,शेख नवाब,दिलीप सुर्यवंशी आदी कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

खुनाच्या आरोपाखाली सजा भोगत असलेल्या संगीत इंगळेचा सख्ख्या मुलानेच केला खात्मा (मर्डर)

0

 

SURYA MARATHI NEWS

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत राजाराम इंगळे ह्याचा त्याच्या सख्या मुलानेच एका मित्राच्या मदतीने गुरुवार दी.21आक्टोबर च्या रात्री घरातील लाकडी दांड्याने डोक्यावर जोरदार प्रहार करुन राहत्या घरातच खुन केल्याची घटना दुसरे दिवशी सकाळी गांवकर्यांना समजताच सर्वत्र खळबळ माजली .
ह्या घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की ,मागील दहावर्षापुर्वी संगीत राजाराम इंगळे ह्याचे हातुन गावातील च गणेश मुकींदा इंगळे ह्याचा गुप्तीने भोसकून खुनकरण्यात आला होता .त्या प्रकरणात तेव्हापासून संगीत हा जेल मध्ये सजा भोगत होता .अलीकडे काही दिवसांपूर्वी तो पँरोल वर काही दिवसासाठी घरी आला होता .त्याला दोन मुली आणि एक मुलगा असुन मोठ्या मुलीचे लग्न दोन वर्षांपूर्वी आटोपले आहे. संगीत हा गावात आल्यावर त्याच्या मित्रांसोबत राहत असतांना पुर्वी प्रमानेच मोठ्या प्रमाणात मद्यपान करीत होता .त्याचा प्रचंड त्रास पत्नी ,मुलगी आणि मुलाला होत होता .पैशासाठी तो आपल्या पत्नीला तसेच मुलाला नेहमी त्रास देत असायचा तसेच घरात भांडण तंटा सुद्धा करायचा .दोन महिण्यापुर्वी बाप लेकांमध्ये कडाक्याचे भांडण सुद्धा झाले असून एकमेकांनी तामगांव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी सुद्धा केल्या आहेत .घटनेच्या दोन दिवस अगोदर सुद्धा बापलेकांमध्ये खडाजंगी झाली होती .
बाप दारू पिवुन आपल्या आईला ,बहीणीला दररोज शिविगाळ करतो आणि मारुन टाकण्याच्या धमक्या देतो ही बाब मुलाच्या आवाक्या बाहेर गेल्याने त्याने शेवटी बापाचा कायम काटा काढण्याच्या इराद्याने राहत्या घरातच लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून तेथेच मारुन टाकले .आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मित्राचा सहारा घेवुन मयत संगीत याला चादरी मध्ये गुंडाळून घरापासून अर्धा किलो मिटर अंतरावरील जळगाव वरवट रोडच्या कडेला टाकून पोबारा केला.अशी माहिती मिळाली आहे .
तामगांव पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान रात्री तिन ,साडेतीन च्या दरम्यान संग्रामपूर वरुन वरवट कडे येतांना मधुकरराव बकाल ह्याच्या शेता जवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला संगीत चे प्रेत दिसून येताच त्याच क्षणापासून पोलिसांचे तपास चक्र सुरु झाले .पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून सकाळ पासून च झालेल्या तपासणी त रस्त्यावर रक्ताचे निशाण दिसुन आले .नवु वाजताच्या सुमारास स्वान पथक दाखल झाले असता पथकातील स्वानाने थेट मयताचे घरच गाठले तसेच मयताला ज्या चादरी त गुंडाळून नेल्या गेले होते तसेच मारहाणीत जो लाकडी दांडा आणि दगड वापरात आणला होता त्या सर्व वस्तू पोलिसांच्या लक्षात आणून दिल्या .
पोलिसांनी ह्या घटणेत आरोपी अप क्रमाक 323,/2021कलम 302,221,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करून असलेल्या संगीत च्या मुलाला ताब्यात घेतले असुन त्याला सहकार्य करणारा दुसरा आरोपी फरार असल्याचे सांगितले आहे .पुढील तपास पो,नि, उलेमाले यांचे मार्गदर्शन खाली पो,उ,नि, श्रीकांत विखे करीत आहेत

 

नियोजन शुन्य आमदार आणि खासदाराची बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत व जनतेच्या इतरही कामाबाबत अनास्था

0

 

विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांचा आरोप
भविष्यात नागपूर ते वर्धा पर्यंत मेट्रो सुरू केल्या जाईल अशी घोषणा केंद्रीय परिवहन व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी देवळी येथे नगर परिषद द्वारा प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण समारंभात केली.
नागपूर ते वर्धा मेट्रो जर सुरू झाली तर वर्धा शहर आणि परीसरातील जनतेला याचा फायदाच होणार आहे.पण हा फायदा केवळ वर्धा शहाराच्या परीसरातील जनतेलाच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त परीसरातील गावांना , लोकांना कसा होईल याचा विचार होणे गरजेचे आहे.या समारंभाला वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती.गडकरी साहेबांनी वर्धा ते नागपूर अशी मेट्रो चालवीली जाईल अशी घोषणा केल्यानंतर खासदार महोदयांनी गडकरी साहेबांशी चर्चा करून वर्धा ते नागपूर अशी मेट्रो सुरू करण्यासोबतच ती हिँगणघाट मार्गे चंद्रपूर-बल्लारपूर- नागपूर अशी करावी अशी विनंती करणे गरजेचे होते.पण मतदार संघाच्या विकासाचे कसलेही नियोजन खासदार महोदयांकडे नसल्यामुळे ते तसे करू शकले नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे.नागपूर -वर्धा -वर्धे वरून हिंगणघाट- चंद्रपूर -बल्लारशहा व बल्लारशहा वरून परत नागपूर अशी मेट्रोची जाणे आणि येण्याची एक फेरी जरी चालविली तरी या परीसरातील जनतेला या मेट्रोचा चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो.त्यानिमित्ताने या परिसरात नवीन औद्योगिक प्रकल्प येण्याची शक्यता निर्माण होऊन त्यातून तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकतो.पण अशी विकासाची दृष्टीच मुळात खासदार महोदयाँकडे नसल्यामुळे ते तशी मांडणी करू शकले नाही.
विशेष म्हणजे देशाचे महत्वाचे मंत्री आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घेणारे आपले हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते. राजकीय चमकेगीरी शिवाय आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा कोणताही विचार त्यांच्या डोक्यात नाही.तो असता तर आवर्जून ते गेले असते आणि गडकरी साहेबांना सांगितले असते की प्रस्तावीत मेट्रोचा फायदा माझ्या हिँगणघाट तालुक्यातील जनतेलाही झाला पाहिजे.त्यासाठी इथे रेल्वे ट्रॕक आहे.तीन लाईन आहे. त्यामुळे इथपर्यंत मेट्रो सुरू करायला काहीही हरकत नाही.असे केल्याने या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो .पण असे विचारच डोक्यात न येणारी ही मंडळी आहे.
याच आमदार महोदयाच्या विधान सभा क्षेत्रात आणि खासदार महोदयाच्या लोकसभा क्षेत्रात दहेगाव नावाचे गाव आहे.त्याला तुळजापूर रेल्वे स्टेशन या नावाने संबोधले जाते.हे गाव रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेल्याने ग्रामस्थांना आणि शाळकरी मुलांना दररोज रेल्वे लाईन ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो.त्यासाठी इथे पादचारी पूल निर्माण व्हावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार -खासदार महोदयांकडे मागणी केली .आंदोलने उभारली. रेल्वे मंत्री यांना चारदा भेटून निवेदने दिली-रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदार निधीतून १० लाख रूपये जिल्हा प्रशासनामार्फत रेल्वे कडे जमा करण्यास सांगितले होते .पण १० लाख रूपये खासदार निधीतून हे खासदार महोदय रेल्वेला देऊ शकले नाही .यावरून त्या परिसरातील गावकऱ्यांच्या प्रती मा.खासदार महोदयांना किती आस्था आहे हे दर्शवीते.आमदारही त्याच पक्षाचे]खासदारही त्याच पक्षाचे ]केंद्रात सरकारही त्यांच्याच पक्षाचे असतांनांही गावकऱ्यांच्या या जीवघेण्या प्रश्नाची ते सोडवणूक करू शकत नाही इतकी अनास्था जनतेप्रती यांच्या मनात आहे.यांना जनतेच्या प्रश्नांशी,समस्येशी काहीही देणे घेणे नाही.त्यांना फक्त लोकांना मुर्ख बनवून स्वतःचे राजकारण चमकवीणे यातच जास्त रस आहे.
प्रस्तावीत मेट्रोचा मार्ग कसा राहिल हे सर्वेसर्वा असलेले गडकरी साहेब ठरवतीलच .पण लोकप्रतीनिधी या नात्याने या मेट्रोचा लाभ संबंध वर्धा जिल्ह्यातील जनतेला कसा होईल याचा विचार आमदार -खासदार महोदयांनी त्यांच्याकडे मांडणे गरजेचे होते.पण ही संधी नियोजनशून्य असलेल्या खासदार महोदयांनी rlsp आपल्या हिंगणघाटच्या स्वनाम धन्य कार्यसम्राट आमदार महोदयांनी सभेला गैरहजर राहून गमkवीली हे वर्धा लोकसभा क्षेत्रातील जनतेच दुर्दैव्यच म्हणावे लागेल.
हिंगणघाट येथील गडकरींच्या एका कार्यक्रमात आमदार महोदयांनी वणा नदीच्या खोलीकरणाचा आणि सौंदर्यीकरणाचा विषय मांडला होता .तेव्हा गडकरी साहेबांनी खंत व्यक्त केली की]याला आता खुप उशीर झाला आहे.या अगोदर हे खातेच माझ्याकडे होते.त्यावेळेला हा विषय आमदार समीर कुणावार ;akuh माझ्याकडे आणला असता तर केव्हाच हा प्रश्न निकाली निघाला असता. म्हणजे इथे देणारे तयार आहे पण घेणारे तयार नाही. आणि हे सर्व कशामुळे घडते आहे तर जनतेनी निवडून दिलेल्या या लोकप्रतीनिधींच्या मनात जनतेच्या कामाप्रती असलेल्या अनास्थेमुळे घडते आहे.असे हे नेतृत्व आपल्या वर्धा जिल्ह्याला लाभल्यामुळे जिल्ह्यात ना नवे उद्योग येऊ शकले ना तरूणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकल्या.
आता तरी जनतेने अशा सामाजिक बांधीलकी नसलेल्या ]जनतेच्या कामाप्रती आस्था नसलेल्या नेतृत्वापासून सावध रहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे विदर्भ विकासआघाडीचे अनिल जवादे यांनी जनतेला केले आहे.
सूर्या मराठी न्यूज सचिन वाघे वर्धा