Home Blog Page 386

15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

0

 

SURYA MARATHI NEWS

 

नवी दिल्ली -एथिलब केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली  आहे. की एका अल्पवयीन मुलाने विकृतीचा कळस गाठला आहे. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे की या
केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली.की या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी कॉम्प्यूटर क्लाससाठी निघाली होती व अस असताना मुलाने तिचा पाठलाग केला. व त्या
अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. तर यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला. व त्या नंतर तसेच दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. व तिला जीवे मारण्यासाठी त्याने पर्यंत पन सुद्धा केलं. व या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आरोपीपासून सुटका करुन तर घेत तिथुन पळ काढला आणि घर गाठलं. व त्या
तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे
तर पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाला पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. व ही एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिलेले आहे.

Surya marathi news

जालन्यात बुलढाणा अर्बन बैंकवर दरोडा, भरदिवसा बैंक लुटली आरोपी CCTV मध्ये कैद

0

 

SURYA MARATHI NEWS

जालना:- पुण्यात येथील बँकेवरील दरोड्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात देखील तशीच एक घटना समोर आली आहे. व या
जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा बंदूक धाक दाखवत बँकेतील लाखो पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. व या संबंधित घटना ही आज (28 ऑक्टोबर) दुपारी घडली. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. व त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये नगद आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले.या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल तर झाले. व हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरी या
आरोपी ला तोंडाला रुमाल बांधून बँकेत शिरले मुळे आरोपीना
पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. है तीन आरोपी आहेत व या आरोपिचे तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली. व त्यामुळे कर्मचारी खुप घाबरले. या आरोपी जोरजोरात ओरडत कॅश काउन्टरजवळ आले.व त्यांनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर त्यांनी 25 लाखांची रोकड लंपास केली. व यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. त्यांनी किती किमतीचे दागिने पळवले याबाबतची अजुन माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरी पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केली. काही खातेदारांच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी चोरुन नेल्याची माहिती आहे. व पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न?
गेल्या आठवड्यात पुण्यात चार ते पाच चोरांनी महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकला होता. व विशेष म्हणजे दोन महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. त्या दरोड्यात तर बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही बँकेमध्ये सुरक्षा वाढवली जाताना दिसत नाहीय. तर याशिवाय पुण्यातील घटनेनंतर जालन्यात अशी घटना अवघ्या आठ दिवसात समोर आलाय म्हणजे चोरांचा हा दरोड्याचा नवा पॅटर्न आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

पुण्यात नेमकं काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं होतं. तरी आरोपी अजुन पर्यंत पोलिसांच्या हाती नसून पोलिसांनी तपास सुरु केले आहे .

थरारक जन्मदात्या बापाची सख्या मुलानेच केला ” मर्डर”

0

 

SURYA MARATHI NEWS

गाय पिळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. व हा वाद इतका की त्यामध्ये मुलाने वयोवृद्ध असलेल्या जन्मदात्या बापाला बांबूने जबरदस्त मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी घडली. असून या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेतील मयत विठ्ठल तुळशीराम हारदे वय ७२ वर्षे हे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे आपल्या कुटूंबासह राहत होते. व
त्यांचा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे हा शुल्लक कारणावरून नेहमी बापा सोबत भांडणे करीत असे. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ सुमारे वाजेच्या सुमारास यातील आरोपी ज्ञानेश्वर हारदे हा दारु पिवुन घरी आला होता. व त्याचे व त्याची पत्नी सविता यांच्यात गाय पिळण्याच्या कारणावरून वाद चालू होते. त्यावेळी त्याचे वडील विठ्ठल तुळशीराम हारदे हे आरोपी ज्ञानेश्वर हारदे यास म्हणाले की, तु नेहमीच दारु पित असतो.व आणि शुल्लक कारणावरून भांडण करत असतोस. असे म्हणालेचा मुलाले राग आल्याने तो त्याचे वडील विठ्ठल हारदे यांना म्हणाला की, तुम्ही नेहमीच माझ्या कामात अडथळा करतात. व
आज तुम्हाला जीवाने संपवुन टाकतो. असे म्हणून जवळच पडलेला बांबू उचलून घेवुन आला व विठ्ठल तुळशीराम हारदे यांना बांबुने पहिले जबरदस्त मारहाण करुन त्यांचा निर्घृण खूण केला. व विठ्ठल हारदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. तो मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.व या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव,
निरज बोकील आदिंसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. व त्यांनी त्या आरोपीला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. सर्जेराव महिपती हारदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याच्या विरोधात खुणाच्या मर्डर गुन्हयाची नोंद करण्यात आली. व या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भागचंद सुर्यवंशी हे करीत आहेत.

Surya marathi news

भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी केली कोळशाच्या जडवाहनांची होणाऱ्या नवीन मार्गाची पाहणी

0

 

घुग्घुस प्रतिनिधी
रमेश सुद्दाला,

घुग्घुस वासियांना प्रदूषण व वाहतुकीच्या त्रासापासून मिळणार मुक्ती – भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

गुरवार 28 ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे, भाजपाचे सिनू इसारप, भारत साळवे, तुलसीदास ढवस यांनी संयुक्तरीत्या कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक होणाऱ्या जिओसी कोळसा खाण, कॉ नं 2 येथील बहिरमबाबा मंदिराच्या मागुन बेलोरा पुला पर्यंत प्रगती पथावर असलेल्या नवीन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस शहरातून होणारी कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी यासाठी मार्गाची पाहणी करण्यात आली असून या मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. जवळपास 90% या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच घुग्घुस शहरातून होणारी जडवाहतूक बंद होणार आहे अवघ्या काही दिवसात शहरातून होणारी जडवाहतूक या मार्गाने सुरु होणार आहे. त्यामुळे घुग्घुस वासियांना प्रदूषणाचा व कोळशाच्या जडवाहतुकी मुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

दिनांक 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घुग्घुस शहरातून जाणारी कोळशाची जड वाहतूक त्वरित बंद करावी असे निर्देश लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. मागील काही महिन्यापासून घुग्घुस शहरातून जाणाऱ्या कोळशाच्या जडवाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण व अपघाताची शक्यता लक्षात घेत असे निर्देश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक 28 सप्टेंबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी संयुक्तरीत्या उसगाव ते नकोडा जिओसी कोळसा खाण मार्गे बेलोरा पुला पर्यंत पाहणी करून चर्चा केली होती.
दरम्यान वेकोली अधिकाऱ्यांनी नवीन मार्ग बनविण्यासाठी काही दिवसाचा वेळ मागितला होता.
काही दिवसा पूर्वीच जिओसी कोळसा खाण कारगिल चौक मार्गे बेलोरा पुला पर्यंत या नवीन मार्गाचे काम सुरु झाले त्यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने या मार्गाची पाहणी केली परंतु हे काम संथगतीने सुरु असल्याने दिनांक 24 ऑक्टोबर रोजी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांची भाजपाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या नवीन मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी निवेदनातून केली.
यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील महिन्याच्या 10 नोव्हेंबर पर्यंत हा मार्ग सुरु करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे भाजपाच्या मागणीला यश आले.
त्याअनुषंगाने आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांसोबत त्या
मार्गाची पाहणी केली.
तसेच या दरम्यान प्रदूषणापासून सुटका मिळण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांच्याशी चर्चा करून घुग्घुस शहरातील राजीव रतन चौक, बस स्थानक चौक ते वियान्नी विद्या मंदिर पर्यंतच्या रस्त्यावर टँकरने पाणी मारणे व धूळ साफ करण्याची त्यांना विनंती केली त्यांनी लगेच उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांना निर्देश देऊन टँकरने पाणी मारणे व धूळ साफ करण्यासाठी सांगितले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एसीसी सिमेंट कंपनीचे अधिकाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून एसीसी ते घुग्घुस बसस्थानका पर्यंतच्या रस्त्यावर टँकरने पाणी मारून धूळ साफ करण्याची मागणी केली व एसीसी प्रशासनाने सुद्धा मागणी मान्य करीत या रस्त्यावर पाणी मारून धूळ साफ करणार असल्याचे सांगितले.

अबब…या महिलेने दिला ५ मुलांना जन्म…

0

 

SURYA MARATHI NEWS

बिहारमधील सिवान येथील सदर रुग्णालयात आज गुरुवारी एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला. आहे व या जन्मलेल्या मुलांमध्ये तीन मुली आणि दोन मुले आहेत.है सध्या पाचही मुले निरोगी असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. व या
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी एका महिलेला सिवान येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान महिलेच्या पोटात पाच मुले असल्याचे डॉक्टर ला निष्पन्न झाले. व डॉक्टरांनी मोठ्या काळजीने सिझेरियन करण्याचा ताबड़तोब निर्णय घेतला. असून व या
सदर रुग्णालयाच्या उपअधीक्षक डॉ. रिता सिंघा यांनी सांगितले की,या महिला शहरातील इस्माईल टाकिया येथील रहिवासी मो. झुनाच्या पत्नीचे नाव फुलजहान खातून आहे. डॉ. रिटा सिंग यांनी सांगितले की, या महिलेच्या आधीच्या तपासणीत असे आढळून आले होते की, ही तिच्या पोटात पाच मुले आहेत, त्यामुळे महिलेचे सिझेरियन करण्यात आले. व या
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जुलै 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एका 22 वर्षीय महिलेने 4 मुलांना जन्म दिला होता. या महिलेला जिल्ह्यातील अजिंठा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी तिला एकाच वेळी तीन मुली आणि एका मुलाची प्रसूती केली. डॉक्टरांच्या मते, या जन्मलेल्या मुलीचे वजन 1.1 किलो असून आणि हे मुलगा आणि व इतर दोन मुलींचे वजन 1-1 किलो होते, जे पूर्णपणे निरोगी होते.

Surya marathi neww

Cruise party:- क्रुझ पार्टीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची मुलगी, मुलगा ?या नव्या दाव्याने खळबळ

0

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई – aryan khan प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता वेगळंच वळण येते व या लागण्याची शक्यता आहे. की या प्रकरणात NCB तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने वारंवार आरोप लावले.की बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्यासाठीच NCB चा वापर केला जात असून समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. परंतु त्यानंतर आता भाजपा नेते मोहित भारतीय यांनी या कारवाईबाबत मोठा दावा केला आहे. की मोहित भारतीय यांनी ट्विट करत क्रुझवरील पार्टीत(Cruise Rave Party) राष्ट्रवादी(NCP) मंत्र्याची मुलगी आणि राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ मंत्र्याचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत उपस्थित होता. मग शिप बोर्डिंग होण्यापूर्वीच ते पळून का गेले? असा सवाल मोहित भारतीय(BJP Mohit Bhartiya) यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात आणखी किती जण सहभागी होते यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. या
नवाब मलिकांच्या निनावी पत्रावरही संशय काही दिवसांपूर्वी नवाब मलिक(Nawab Malik) यांनी NCB अधिकाऱ्याचं निनावी पत्र ट्विट करत समीर वानखेडे यांच्या स्पेशल २६ प्रकरणात आरोप केले होते. की या पत्राचा हवाला देत मलिकांनी NCB ला पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी होती. मात्र हे पत्र ज्या लिफाफ्यातून आले होते त्यावर पोस्टल स्टॅम्प सगवट, बेगूसराय, बिहारचा उल्लेख होता. हे पत्र बनावट असल्याचा आरोपही मोहित यांनी केला. परंतु मोहित म्हणाले की, मुंबईत NCB मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने हे पत्र त्यांना पाठवलं असा मलिकांनी दावा केला होता. परंतु या निनावी पत्राचा लिफाफा पाहिला तर त्यावर बिहारचा स्टॅम्प आहे. मलिक यांनी स्वत: बनावटपणे हा स्टॅम्प लावून पत्र तयार केले होते असा आरोप भारतीय यांनी केला.
याबाबत आता NCB अधिकारी आणि चीफ पोस्ट मास्टर जनरल यांना मोहित भारतीय यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्राबाबत संशय निर्माण झाला असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर निनावी पत्राच्या आधारे कुठल्याही प्रकारची तपासणी करण्यात NCB ने नकार दिला आहे. मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
तरी या मलिकांचा समीर वानखेडेंवर आरोप
क्रुझवरील छापेमारीवेळी(Mumbai Cruise Drugs Case) एक दाढीवाला आणि त्याची गर्लफ्रेंड उपस्थित होती. तो दाढीवाला कोण? असा सवाल करत वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा दावा मलिकांनी केला. त्याला सोडून का देण्यात आले? असा सवालही मलिकांनी विचारला होता. मात्र आता यानंतर क्रुझवर राष्ट्रवादी मंत्र्यांची मुलगी आणि मुलगा उपस्थित असल्याचा दावा भाजपाच्या मोहित भारतीय यांनी करुन खळबळ माजवली आहे. त्यामुळे हे मंत्री कोण याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Surya marathi news

 

दोन भावंडे कालपासून बेपत्ता झाले होते. गुरूवारी दुपारी दोन्ही भावंडांचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

। तालुक्यातील चुंचाळे येथील दोन भावंडे कालपासून बेपत्ता झाले होते. आज गुरूवारी दुपारी दोन्ही भावंडांचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश आणि हितेश ही अनुक्रमे चार आणि तीन वर्षांची मुले आहेत. काल बुधवारी आपल्या आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले स्वत:च्या चुंचाळे शिवारातील शेत गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यात दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा शोध घेण्यात आला परंतू ते कुठेही आढळून आले नाही. याबाबत यावल पोलीसात रात्री उशीरा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच शेतातील विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी विहिरीजवळ प्रचंड आक्रोश केला होता. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोउनि जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान मयत झालेल्या बालकांचा चुलत काका हा मनोरूग्ण असल्याने त्यानेच विहिरीत मुलांना फेकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकाला संशय मधे घेयून  चौकशीसाठी यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शेतातील विहिरीजवळ चिंचोली गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी जमली होती.

संताप मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे / पुजा ताई मोरे

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

स्वाभिमानीच्या रणरागिणी पुजाताई मोरे यांचा जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झंझावात दौऱ्याला सुरूवात. श्री संत सखाराम महाराज संस्थान ईरोला येथुन आशिर्वाद घेऊन २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संताप मोर्चात शेतकऱ्यांनी आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी एकत्रित सहभागी व्हा असे आवाहन गावा गावात शेतकऱ्यांना करीत आहे. पुजाताई मोरे यांच्या जळगाव जामोद मतदारसंघात झालेल्या एंन्ट्रीने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणजे पुजाताई मोरे, राज्याच्या पटलावर गाजलेले अनेक आक्रमक भाषणे चर्चेला आहेत. उद्या जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा प्रश्नावर २९ ऑक्टोबरचा प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संताप मोर्चा हा ऐतिहासिक होणार असुन मोर्चात शेतकऱ्यांनी संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुजाताई मोरे यांनी केले आहे.

नवरी जोमात तर, नवरदेव कोमात,  अस काय झाल या 7 दिवसात “नवरदेवाला मोठा मानसिक धक्का”

0

 

SURYA MARATHI NEWS

नवी दिल्ली – राजस्थानच्या पोखरणमध्ये फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. तर या अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ही घटना घडल्याने नवरी जोमात आणि नवरदेव कोमात असंचं म्हणावं लागेल. तरी
यामुळे नवरदेवाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या लग्नानंतर नववधूने पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार दिल्याने लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून चक्क पसार झाली. व तसेच हे लग्न जमवणारा मध्यस्थी म्हणून असलेला व्यक्ती देखील तेव्हापासून गायब आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबूरामचं शांती नावाच्या एका तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही थोडा धक्का बसला. तिनेनलग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला होता. काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती.या पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. परंतु या
लग्नानंतर आठव्याच दिवशी संसार मोडला
व या लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यामध्ये पती-पत्नीसारखे कोणतेही संबंध नव्हते. लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत शांतीने उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयामध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा तिचा शोध घेऊन घरी आला, तेव्हा त्याच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने गायब होते. नवरदेवची सर्व संपत्ती लुटून शांतीने पळून गेल्याचं त्याच्या नवरदेवाची लक्षात आलं. म्हणून की घरातले
सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन नवरी पसार
पत्नीने आपली फसवणूक केल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यता वर्तवली आहे. बाबूरामने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन शांती पळून गेल्याचं म्हटलं आहे. व नवर देव ची घाव पोलीस स्टेशन मधे या दोघांचा सध्या शोध घेत असून अधिक तपास करत आहेत. ही एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. Surya marathi news

डॉक्टरकडून महिलेवर अत्याचार, अश्लील फोटो,व्हिडिओ वायरल करण्याचीही “धमकी”

0

 

SURYA. MARATHI NEWS

पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन एका महिलाच्या अत्याचाराचा एक प्रकार पुणे येथे उघडकीस आला. असून
या खोट्या एका व्यक्तीने डॉक्टर असल्याचे भासवून २९ वर्षीय विवाहितेचा विश्वास संपादन केला. व आणि वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच आपले म्हणणे ऐकले नाही तर माझे कड़े अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत त्या मि व्हायरल करनार असे धमकी दिली.
नायक रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव जाधव (वय ३३) असे अटक आरोपी करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात त्याच्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २९ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली. आहे की हा प्रकार मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०२१या काळातला असून वेळोवेळी घडला.
तरी याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने फिर्यादी महिलाला डॉक्टर असून ससून हॉस्पिटल येथे मि नोकरीला असल्याचे सांगितले. स्वतःचे नर्सिंग कॉलेज आणि फार्मसी कॉलेज असल्याचे सांगून विमाननगर परिसरातील फ्लॅटमध्ये फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. व तिथे त्याने या महिलेला खोटे आयकार्ड आणि वैद्यकीय डिग्रीचे बनावट कागदपत्रे दाखवून ती खरी असल्याचे महिलेला भासवले. त्यानंतर फिर्यादीच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. व तिच्यासोबत घरामध्ये जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर फिर्यादीच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १६ लाख ६५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या
दरम्यान काही काळानंतर फिर्यादीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपीने तु माझे ऐकले नाही तर माझे कड़े अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहे ति मि व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची आणि नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या व्यवहारांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सुरुवातीच्या काही काळात बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने तक्रार दिली नव्हती. परंतु आरोपीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे

Surya marathi news