Home Blog Page 389

साईबाबा नागरी सह पत संस्थेची 18 वी सभा संपन्न .

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

आज दिनांक 17 /10/ 2021 रोजी यावल येथील खरेदी-विक्री संघातील सभागृहात साईबाबा नागरी सहकारी सकाळी 10 वाजेला साई बाबा नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेची 18 वी सर्वसाधारण सभा कोरोना चे सर्व नियम व अटींचे पालन करून आयोजन केले होते या 18 व्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी साईबाबा संस्थेचे संस्थापक चेअरमन आबासाहेब भाऊराव माणिकराव पाटील होते या सर्वसाधारण सभेला सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या उपस्थिती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम अध्यक्षांच्या व संचालक मंडळ च्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . मागील वर्षात मातृभूमीच्या संरक्षणासाठी वीरगती प्राप्त झालेले जवान सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते शिक्षणतज्ञ थोर नेते कलावंत तसेच संस्थेचे सभासद त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ठेवीदार हितचिंतक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर विभूती तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्ती कुरणात मृत्युमुखी पावलेल्या व्यक्ती यांच्या पवित्र स्मृतीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्व चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी आपली मनोगत व्यक्त करत गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार करत अध्यक्ष भाऊराव पाटील यानी कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तापिक साईबाबा पतसंस्थेचे माजी संचालक ऍड देवकांत पाटील यांनी तर संस्थेचे संचालक दिनकर क्षीरसागर यांनी सर्व उपस्थित सभासदाचे आभार मानले सभेसाठी प्रमुख मान्यवर विरावली वि का सा चे माजी चेरमन पीक संवरक्ष चे संचालक गोरख पाटील ,दहिगाव चे बी डि पाटील छत्रपती फाऊंडेशन चे संचालक गिरीष पाटील , राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष पवन पाटील आदी उपस्थित होते सभा घेण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक प्रफुल्ल देशमुख संस्थेचे कर्मचारी महेश बोरसे , हेमचंद्र मोरे ,चंद्रकांत बारी , रवींद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले

अल्पवयीन मुलींला रस्तायात अडवून विनयभंग

0

 

Surya marathi news

अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका प्रकरणात पिंपरी तर दुस-या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तिघांना आरोपीना अटक केली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन पीडित मुलीने शनिवारी (दि. 16) फिर्याद दिली. की त्यानुसार सैफी अस्लम शेख (वय 22, रा. दत्तनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपले दररोज वेलेनुसार ट्युशनसाठी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुण . 16 ऑक्टोबर रोजी मुलीला भर रस्त्यात अडवून तिचा हात पकडून माझे सोबत मैत्री करशील का, असे विचारले. मुलींना नकार देताच तिला धमकी देऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
निगडी पोलीस ठाण्यात देखील एका अल्पवयीन पीडित मुलीने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज दत्ता पाटील (वय 23), दत्तात्रय लहू पाटील (वय 47, दोघे रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांच्या विरोधात पन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी पृथ्वीराज हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपीने शुक्रवारी रात्री नऊ वाजता प्राधिकरण निगडी येथे मुलीवर नजर ठेवली. व तिला शिवीगाळ करुण मारहाण केली. सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट सुरु करून त्यावरून पीडित मुलीला धमकी दिली. निगडी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरु आहेत.

आवार गावातील विठ्ठल मंदिराच्या कळसावर वीज कोसळली मंदिरावरील घुमटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

 

आवार गावावरील संकट विठू माऊली ने तारले

बुलढाणा  जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आवार गावामध्ये रात्रीच्या वेळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला त्यातच रात्री सात वाजे दरम्यान गावातील मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिरावरील घुमटावर वीज कोसळल्याने मंदिराच्या कळसाचे घुमटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी रात्री सात वाजे दरम्यान घडली

आवार गावातील विठ्ठलाचे मंदिर गावाच्या मध्यभागी असून मंदिराला लागूनच बरेच नागरिकांचे घरे या मंदिराला लागूनच आहेत मात्र इतर कुठल्याही घरावर किंवा गावात इतर ठिकाणी कुठे वीज न पडता गावातील विठ्ठलाच्या मंदिरात वरच ही वीज कोसळल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाले
तसेच याच मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी सहा ते सात वाजे दरम्यान हरिपाठाचा कार्यक्रम असतो मात्र आज सहा वाजता पासुनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे मंदिरावरील हरिपाठाचा कार्यक्रम नागरिकांनी घेतला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली

अखेर चार दिवसानंतर माकडावर उपचार करून वन विभागाच्या केले स्वाधीन

0

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वन अधिकारी कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

डोणगांव येथे वननाक्यावर गेल्या तीन दिवसापासून एका माकडाला शेतामध्ये विद्युत शॉक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती त्या माकडावर सुनील पाटील आखाडे यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर बोलून उपचार केले होते. माञ त्यानंतर सदर माकड हे वन विभागाच्या त्याच्या मागील वन नाक्याच्या बाजुला तीन दिवसापासून गंभीर होते. सदर माकड काही खात पीत नव्हते अशा परिस्थितीमध्ये परिसरातील नागरिकांनी स्वाभिमानी चे युवा नेते देवेंद्र आखाडे यांना कळवले की सदर माकड विद्युत शॉक लागून आजारी असून काही खात पित नाही व त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.त्यांनी लगेच ही घटना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना सांगितले त्यांनी लगेच तातडीने स्वाभिमानीचे पदाधिकारी सह दाखल होत रेस्कू टीमचे प्रमुख बुलढाणा राहुल चव्हाण यांना माहिती दिली तसेच रेंजर घाटबोरी तोंडीलायता व संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांना तातडीने सदर माकडावर उपचार करावे लागणार असून गेल्या तीन दिवसापासून वन विभागाच्या नाक्याजवळ असताना देखील वन मजूर व संबंधित बीटचे कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले ही बाब संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी यामध्ये हलगर्जी करत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह दिनांक 16. 10. 2021 रोजी सकाळी अकरा वाजता डोणगाव वन नाक्यावर दाखल होऊन श्री आंबोरे यांच्या घरावर सदर माकड गच्चीवर बसलेले असताना श्री जाधव वनमजुर राठोड भालेराव मॅडम यांनी सदर माकडाला पकडून नाक्यावर आणले त्यानंतर सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावून त्या जखमी माकडावर उपचार करण्यात आले. सदर माकड पुढील उपचारासाठी वन विभागाच्या स्वाधीन करुन अकोला येथे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी अमोल धोटे पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन अग्रवाल देवेंद्र आखाडे, तालुका उपाध्यक्ष गणेश जुनघरे हबीब भाई गौतम सदावर्ते सर विवेक ठाकरे युसुफ खा पठाण,आकाश जावळे,सद्दाम शहा,किशोर खोडके.षसह गावकरी उपस्थित होते

यावल येथे तहसीलद्वारे अवैधरित्या गौणखनिज वाहतुकीतील महसुलने जप्त केलेल्या वाहनांचा होणार लिलाव

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखडे

। यावल तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. १८ ऑक्टोबर रोजी यावल येथे वाहनांचा लिलाव होणार असल्याची माहिती यावल तहसीलदार महेश पवार यांनी आज मंगळवारी १२ ऑक्टोबर दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

यावल तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी १८ ऑक्टोंबर, २०२१ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, यावल येथे जप्त केलेल्या पाच वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, यावल यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार महेश पवार यांनी आज मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

विरावली येथे विद्यार्थी युवकांसाठी विनामुल्य एसएससी / पैरा मिलीट्री स्टॉप सिलेक्शन भुर्तीपुर्व सराव कार्यक्रम संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील विरावली येथे एसएससी/पैरा मिलिट्री (स्टाप सिलेक्शन कमिशन) भर्तीची पुर्व तयारी करिता लेखी प्रशिक्षण सराव कार्यक्रम विनामुल्य गावात आज सकाळी १० वाजता सूरवात करण्यात आली . या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे तहसीलदार महेश पवार यांचे हस्ते करण्यात आले . याप्रसंगी तहसीलदार महेश पवार यांनी उपस्थित गावातील व परिसारातिल परीक्षार्थी युवकांना प्रतियोगिता स्पर्धा करिता तयारी बद्दल अनमोल असे मार्गदर्शन करून अशा प्रतियोगितेचे आयोजन राज्यपातळी सह तालुका पातळीवर ही झाल्या पाहिजे व ग्रामीण भागात असे प्रकारचे आयोजन केले बद्दल सैनिक महेंद्र पाटील सोबत आयोजकांचे विशेष कौतुक केले तसेच यावेळी सैनिक महेंद्र पाटील यानी विरावली गावात कोणतेही मोबाईलचे रेंज नसले कारणाने गावातिल विद्यार्थी हे सोशल नेटवर्किंग चे माध्यमातुन प्रतियोगिता स्पर्धाची तयारी तसेच सद्या कोवीड १९च्या प्रार्दुभावा मुळे सुरु असलेल्या ऑनलाईन शालेय अभ्यासक्रम हा नीट करू शकत नाही असे सांगुन आमचे विरावली गावात मोबाईल रेंज उपलब्ध करून देणे बाबत विनती केली. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्रा. संदीप सोनवणे सर, स्वयदिप क्लासेस जळगांव यानी आजच्या सत्रात गावातिल व परिसरातील उपस्थित परीक्षार्थी एसएससी कांस्टेबल जीडीच्या लेखी परीक्षाला येणाऱ्या अडचणी बद्दल खूप अत्यंत आवश्यक असे बहुमुल्य अनमोल असे मार्गदर्शन केले व सोबत परीक्षार्थींचे शंकांचे चे समाधान करून परीक्षार्थी ‌ना प्रश्नपत्रिका चा मॉडल समजावुन सांगितले आणि खूप आनमोल असे मार्गदर्शन केले हा उपक्रम नियमित सुरु आहे यात कोरपावली गावातील विध्यार्थी आज पासुन या परिक्षेत शामिल झाले आहेत.

जाम येथे अहमदनगर ते बांगलादेश सद्भभावना सायकल यात्रा चे स्वागत व सत्कार करण्यात आला

0

 

समुद्रपूर :- भारत-बांगलादेश सद्भभावना सायकल रॅली 2021 सद्द्भावना सायकल यात्रा महामार्ग जाम येथे दि. 15 ऑक्टोंबर ला पोहोचली असता सर्व सहभागी सायकल रॅली मधील प्रत्येक व्यक्तींचे आमच्या मार्फतीने सत्कार करण्यात आले तसेच पुढील प्रवासासाठी शुभकामना देण्यात आली. सदर रॅली ही अहमदनगर ते बांगलादेश असे 75 दिवस 3000 किलोमीटर असा प्रवास आहे प्रवास करीत असताना महामार्गावर होणारे अपघात याबाबत व तो टाळण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केले. सर्व यात्रेकरू यांना पुष्पगुच्छ देऊन व चहा , बिस्कीट , पाणी इत्यादी व्यवस्था करुन सत्कार करण्यात आले .सदर रॅली 2 ऑक्टोंबर ते 16 डिसेंबर 2021पावेतो आहे. सदर रॅली ही दिल जोडो भारत जोडो याबाबत आहे.माहिती
API संतोष सपाटे महामार्ग जाम जिल्हा वर्धा यांनी मा. पोलीस अधीक्षक नागपूरला कळविले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

घुग्घुस येथे विविध ठिकाणी बथुकम्मा उत्सवाचे आयोजन

0

 

घुग्घुस प्रतिनिधी
रमेश सुद्दाला,

घुग्घुस : बथुकम्मा म्हणजेच देवीचा धावा हा उत्सव तेलंगाना व आंध्रप्रदेश येथील पारंपरिक उत्सव असून हा उत्सव विशेषतः महिला वर्गा तर्फे साजरा केल्या जातो.
हा उत्सव फुलांचा सण म्हणून साजरा केला जातो.
महिला फुलांपासून बथुकम्मा बनवितात व याला महागौरीच्या रुपात पूजतात हा उत्सव येंगली बथुकम्मा पासून शुरू होतो व सददुला बथुकम्मा (दुर्गा अष्टमी)ला समाप्त होतो.
घुग्घुस येथील शास्त्रीनगर परिसर, गांधी नगर,सुभाष नगर,रामनगर, साई नगर,सह अन्य ठिकाणी या उत्सवाचे मोठया उत्साहात आयोजन करण्यात आले.
हा सोहळा उत्कृष्टपणे साजरा व्हावा याकरिता घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी राजूरेड्डी व विजय माटला यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, विशाल मादर, इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, आरिफ शेख,बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरूध्दा उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. यावर १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत सरपंच अपात्र करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील यावल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. यासंदर्भात ७ जुन रोजी चुंचाळे ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलवून सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. गावात येत्या १८ ऑक्टोंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदान केले जाणार आहे. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी व पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज हे राहणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान होवून नागरीक सरपंच या पदावर राहतीला का नाही हे ठरविले जाईल. तालुक्यात लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध अशाप्रकारे अविश्वास झाल्यानंतर ग्रामसभेतून अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासंदर्भातील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नांदगावची माऊली”संघर्ष गृप आयोजीत ‘ नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आनंदात साजरा

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव शहरातील हमालवाडा येथील आराध्यदैवत म्हणुन समजली जाणारी ‘नांदगावची माऊली’ संघर्ष गृपतर्फे सालाबादाप्रमाणे स्थापन करण्यात आली.आज गुरुवारी युवासेना शहर अध्यक्ष मुज्जुभाई शेख, जनसेवा मंडळाचे पदधिकारी विक्रांत (नानु) कवडे,युवा समाजसेवक सिध्दार्थभाऊ पवार तसेच मंडळाचे सदस्य अजयभाऊ गोरे यांच्याहस्ते आज देवीची श्रीआरती करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश पगारे उपाध्यक्ष प्रमोद पगारे नागेश दराडे ,उल्हास कदम, आशिष साळुंखे ,हेमंत साळुंखे, अतुल देवरे,विकी कदम,संजयभाऊ साळुंखे,अँड सचिनजी साळवे,मयुर सुळ,विजय कळमकर तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.