Home Blog Page 391

खुनाच्या आरोपाखाली सजा भोगत असलेल्या संगीत इंगळेचा सख्ख्या मुलानेच केला खात्मा (मर्डर)

0

 

SURYA MARATHI NEWS

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत राजाराम इंगळे ह्याचा त्याच्या सख्या मुलानेच एका मित्राच्या मदतीने गुरुवार दी.21आक्टोबर च्या रात्री घरातील लाकडी दांड्याने डोक्यावर जोरदार प्रहार करुन राहत्या घरातच खुन केल्याची घटना दुसरे दिवशी सकाळी गांवकर्यांना समजताच सर्वत्र खळबळ माजली .
ह्या घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की ,मागील दहावर्षापुर्वी संगीत राजाराम इंगळे ह्याचे हातुन गावातील च गणेश मुकींदा इंगळे ह्याचा गुप्तीने भोसकून खुनकरण्यात आला होता .त्या प्रकरणात तेव्हापासून संगीत हा जेल मध्ये सजा भोगत होता .अलीकडे काही दिवसांपूर्वी तो पँरोल वर काही दिवसासाठी घरी आला होता .त्याला दोन मुली आणि एक मुलगा असुन मोठ्या मुलीचे लग्न दोन वर्षांपूर्वी आटोपले आहे. संगीत हा गावात आल्यावर त्याच्या मित्रांसोबत राहत असतांना पुर्वी प्रमानेच मोठ्या प्रमाणात मद्यपान करीत होता .त्याचा प्रचंड त्रास पत्नी ,मुलगी आणि मुलाला होत होता .पैशासाठी तो आपल्या पत्नीला तसेच मुलाला नेहमी त्रास देत असायचा तसेच घरात भांडण तंटा सुद्धा करायचा .दोन महिण्यापुर्वी बाप लेकांमध्ये कडाक्याचे भांडण सुद्धा झाले असून एकमेकांनी तामगांव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी सुद्धा केल्या आहेत .घटनेच्या दोन दिवस अगोदर सुद्धा बापलेकांमध्ये खडाजंगी झाली होती .
बाप दारू पिवुन आपल्या आईला ,बहीणीला दररोज शिविगाळ करतो आणि मारुन टाकण्याच्या धमक्या देतो ही बाब मुलाच्या आवाक्या बाहेर गेल्याने त्याने शेवटी बापाचा कायम काटा काढण्याच्या इराद्याने राहत्या घरातच लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून तेथेच मारुन टाकले .आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मित्राचा सहारा घेवुन मयत संगीत याला चादरी मध्ये गुंडाळून घरापासून अर्धा किलो मिटर अंतरावरील जळगाव वरवट रोडच्या कडेला टाकून पोबारा केला.अशी माहिती मिळाली आहे .
तामगांव पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान रात्री तिन ,साडेतीन च्या दरम्यान संग्रामपूर वरुन वरवट कडे येतांना मधुकरराव बकाल ह्याच्या शेता जवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला संगीत चे प्रेत दिसून येताच त्याच क्षणापासून पोलिसांचे तपास चक्र सुरु झाले .पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून सकाळ पासून च झालेल्या तपासणी त रस्त्यावर रक्ताचे निशाण दिसुन आले .नवु वाजताच्या सुमारास स्वान पथक दाखल झाले असता पथकातील स्वानाने थेट मयताचे घरच गाठले तसेच मयताला ज्या चादरी त गुंडाळून नेल्या गेले होते तसेच मारहाणीत जो लाकडी दांडा आणि दगड वापरात आणला होता त्या सर्व वस्तू पोलिसांच्या लक्षात आणून दिल्या .
पोलिसांनी ह्या घटणेत आरोपी अप क्रमाक 323,/2021कलम 302,221,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करून असलेल्या संगीत च्या मुलाला ताब्यात घेतले असुन त्याला सहकार्य करणारा दुसरा आरोपी फरार असल्याचे सांगितले आहे .पुढील तपास पो,नि, उलेमाले यांचे मार्गदर्शन खाली पो,उ,नि, श्रीकांत विखे करीत आहेत

 

नियोजन शुन्य आमदार आणि खासदाराची बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत व जनतेच्या इतरही कामाबाबत अनास्था

0

 

विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांचा आरोप
भविष्यात नागपूर ते वर्धा पर्यंत मेट्रो सुरू केल्या जाईल अशी घोषणा केंद्रीय परिवहन व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी देवळी येथे नगर परिषद द्वारा प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण समारंभात केली.
नागपूर ते वर्धा मेट्रो जर सुरू झाली तर वर्धा शहर आणि परीसरातील जनतेला याचा फायदाच होणार आहे.पण हा फायदा केवळ वर्धा शहाराच्या परीसरातील जनतेलाच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त परीसरातील गावांना , लोकांना कसा होईल याचा विचार होणे गरजेचे आहे.या समारंभाला वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती.गडकरी साहेबांनी वर्धा ते नागपूर अशी मेट्रो चालवीली जाईल अशी घोषणा केल्यानंतर खासदार महोदयांनी गडकरी साहेबांशी चर्चा करून वर्धा ते नागपूर अशी मेट्रो सुरू करण्यासोबतच ती हिँगणघाट मार्गे चंद्रपूर-बल्लारपूर- नागपूर अशी करावी अशी विनंती करणे गरजेचे होते.पण मतदार संघाच्या विकासाचे कसलेही नियोजन खासदार महोदयांकडे नसल्यामुळे ते तसे करू शकले नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे.नागपूर -वर्धा -वर्धे वरून हिंगणघाट- चंद्रपूर -बल्लारशहा व बल्लारशहा वरून परत नागपूर अशी मेट्रोची जाणे आणि येण्याची एक फेरी जरी चालविली तरी या परीसरातील जनतेला या मेट्रोचा चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो.त्यानिमित्ताने या परिसरात नवीन औद्योगिक प्रकल्प येण्याची शक्यता निर्माण होऊन त्यातून तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकतो.पण अशी विकासाची दृष्टीच मुळात खासदार महोदयाँकडे नसल्यामुळे ते तशी मांडणी करू शकले नाही.
विशेष म्हणजे देशाचे महत्वाचे मंत्री आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घेणारे आपले हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते. राजकीय चमकेगीरी शिवाय आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा कोणताही विचार त्यांच्या डोक्यात नाही.तो असता तर आवर्जून ते गेले असते आणि गडकरी साहेबांना सांगितले असते की प्रस्तावीत मेट्रोचा फायदा माझ्या हिँगणघाट तालुक्यातील जनतेलाही झाला पाहिजे.त्यासाठी इथे रेल्वे ट्रॕक आहे.तीन लाईन आहे. त्यामुळे इथपर्यंत मेट्रो सुरू करायला काहीही हरकत नाही.असे केल्याने या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो .पण असे विचारच डोक्यात न येणारी ही मंडळी आहे.
याच आमदार महोदयाच्या विधान सभा क्षेत्रात आणि खासदार महोदयाच्या लोकसभा क्षेत्रात दहेगाव नावाचे गाव आहे.त्याला तुळजापूर रेल्वे स्टेशन या नावाने संबोधले जाते.हे गाव रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेल्याने ग्रामस्थांना आणि शाळकरी मुलांना दररोज रेल्वे लाईन ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो.त्यासाठी इथे पादचारी पूल निर्माण व्हावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार -खासदार महोदयांकडे मागणी केली .आंदोलने उभारली. रेल्वे मंत्री यांना चारदा भेटून निवेदने दिली-रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदार निधीतून १० लाख रूपये जिल्हा प्रशासनामार्फत रेल्वे कडे जमा करण्यास सांगितले होते .पण १० लाख रूपये खासदार निधीतून हे खासदार महोदय रेल्वेला देऊ शकले नाही .यावरून त्या परिसरातील गावकऱ्यांच्या प्रती मा.खासदार महोदयांना किती आस्था आहे हे दर्शवीते.आमदारही त्याच पक्षाचे]खासदारही त्याच पक्षाचे ]केंद्रात सरकारही त्यांच्याच पक्षाचे असतांनांही गावकऱ्यांच्या या जीवघेण्या प्रश्नाची ते सोडवणूक करू शकत नाही इतकी अनास्था जनतेप्रती यांच्या मनात आहे.यांना जनतेच्या प्रश्नांशी,समस्येशी काहीही देणे घेणे नाही.त्यांना फक्त लोकांना मुर्ख बनवून स्वतःचे राजकारण चमकवीणे यातच जास्त रस आहे.
प्रस्तावीत मेट्रोचा मार्ग कसा राहिल हे सर्वेसर्वा असलेले गडकरी साहेब ठरवतीलच .पण लोकप्रतीनिधी या नात्याने या मेट्रोचा लाभ संबंध वर्धा जिल्ह्यातील जनतेला कसा होईल याचा विचार आमदार -खासदार महोदयांनी त्यांच्याकडे मांडणे गरजेचे होते.पण ही संधी नियोजनशून्य असलेल्या खासदार महोदयांनी rlsp आपल्या हिंगणघाटच्या स्वनाम धन्य कार्यसम्राट आमदार महोदयांनी सभेला गैरहजर राहून गमkवीली हे वर्धा लोकसभा क्षेत्रातील जनतेच दुर्दैव्यच म्हणावे लागेल.
हिंगणघाट येथील गडकरींच्या एका कार्यक्रमात आमदार महोदयांनी वणा नदीच्या खोलीकरणाचा आणि सौंदर्यीकरणाचा विषय मांडला होता .तेव्हा गडकरी साहेबांनी खंत व्यक्त केली की]याला आता खुप उशीर झाला आहे.या अगोदर हे खातेच माझ्याकडे होते.त्यावेळेला हा विषय आमदार समीर कुणावार ;akuh माझ्याकडे आणला असता तर केव्हाच हा प्रश्न निकाली निघाला असता. म्हणजे इथे देणारे तयार आहे पण घेणारे तयार नाही. आणि हे सर्व कशामुळे घडते आहे तर जनतेनी निवडून दिलेल्या या लोकप्रतीनिधींच्या मनात जनतेच्या कामाप्रती असलेल्या अनास्थेमुळे घडते आहे.असे हे नेतृत्व आपल्या वर्धा जिल्ह्याला लाभल्यामुळे जिल्ह्यात ना नवे उद्योग येऊ शकले ना तरूणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकल्या.
आता तरी जनतेने अशा सामाजिक बांधीलकी नसलेल्या ]जनतेच्या कामाप्रती आस्था नसलेल्या नेतृत्वापासून सावध रहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे विदर्भ विकासआघाडीचे अनिल जवादे यांनी जनतेला केले आहे.
सूर्या मराठी न्यूज सचिन वाघे वर्धा

दिराकडून 42 वर्षीय बावजयिला’ अनैतिक संबंधाचे व्हिडिओ वायरल करण्याची धमकी”

0

 

SURYA MARATHI NEWS

पूणे:- पूर्वीसारखे अनैतिक संबंध ठेवायचे असे सांगून भावजयीला चक्क मारहाण करणार्‍या व अनैतिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देणार्‍या दीराविरुद्ध वारजे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कर्वेनगरमधील (Karve Nagar) ४२ वर्षाच्या विवाहितेने वारजे पोलीस ठाण्यात Warje Malwadi Police Station (३५३/२१) फिर्याद दिली आहे. की
हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान मधे घडला. आहे
फिर्यादी या त्यांच्या घरात असताना त्यांचा दीरने जबरदस्तीने त्यांच्या घरात आला.
आनी त्याने फिर्यादीचे हाताचे दोन्ही दंड पकडून फिर्यादी यांना पूर्वीसारखे आपले अनैतिक संबंध कायम ठेवायचे आहेत़ असे म्हणून फिर्यादीच्या गालावर हात फिरवला.
फिर्यादी यांनी विरोध करुन पतीला नाव तुझ नाव सांगेल, असे बोलल्यावर त्याने तुझ्या पतीस मारुन टाकीन अशी धमकी दिली. व
तसेच त्यांच्या गालावर चापट मारुन फिर्यादीला म्हणाला की तुझ्या मुलीला मी आत टाकली आहे.
त्या केसमध्ये मला मदत केली नाही तर तुझे आणि माझे अनैतिक संबंधाचे व्हिडीओ सगळीकडे व्हायरल (Video Viral) करील, अशी प्रकारची धमकी दिली. या धमकीमुळे त्यांनी आपल्या दीराविरुद्ध विनयभंगाची (molestation case)
तक्रार केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रायकर पुढील तपास करीत आहेत. SURYA MARATHI NEWS

31 वर्षीय विवाहिते सोबत जबरदस्तीने शरीर संबंध

0

 

पुणे : surya marathi news जिवलग मैत्री असताना खासगी फोटो काढून त्याला व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहिती सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करुण (physical relation) ठेवून त्याने त्याचे व्हिडिओ पन काढले. व
त्यानंतर त्या तरुणाने आता बनावट फेसबुक अकाऊंट (Facebook Account) काढून त्यावर ते व्हिडिओ टाकून ते तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठविले. व तसेच पतीला पाठवून तिची नाहक बदनामी करणार्‍या अमेरिकेतील तरुणाविरुद्ध पोलिसांनी बलात्कार (Rape) व विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल केला (Pune Crime) आहे.
राज ज्ञानेश्वर धोंडे (Raj Dnyaneshwar Dhonde) (रा. अंबर अपार्टमेंट, अमरावती. सध्या टेक्सास, अमेरिका) असे गुन्हा दाखल (Pune Crime) झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत होत होता.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या विवाहितेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात chaturshringi police station (गु. र. नं. ४६४/२१) फिर्याद दिली आहे. व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत घट्ट मैत्री करुन फिर्यादीचे मोबाईलमधील खासगी फोटो त्याच्या मोबाईलमध्ये फ़ोटो घेतले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर सुखाची संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ काढले. व त्यानंतर त्याने फिर्यादीचे नावे फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर फिर्यादीचे नातेवाईक व मित्र यांना पाठवून फिर्यादीची विवाहिती ची बदनामी केली. तसेच फिर्यादीचे पती यांना सुद्धा शरीर संबंधाचे व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी (Pune Crime) केली आहे. फिर्यादीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती. सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) प्राथमिक तपास करुन तो चतु:श्रृंगी पोलिसांकडे (chaturshringi police) वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक लांबतरे तपास करीत आहेत. Surya marathi news

यावल नगर परिषदच्या आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पुर्ण ताकदनिशी उतरणार : अनिल चौधरी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पुर्ण ताकदनिशी सर्व जागा लढवणार असल्याची माहीती आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावल येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली . यावल येथील यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी त्यांनी यावल नगर परिषदच्या नुतन साठवण तलावाच्या उभारणीत झालेल्या कथीत भ्रष्टाचारास आपण शहरातील जनते समोर घेवुन जाणार असल्याचे सांगुन प्रहारच्या हातात नगर परिषदची सत्ता आल्यास साठवण तलावात भ्रष्टाचार करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असे बोलुन यापुर्वी किती नगराध्यक्ष नगर परिषदेत होवुन गेलेत मात्र खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर यावल शहराचा विकास झाला आहे का ? असा प्रश्न यावेळी आपल्या समोर येतो , यावल शहराच्या विकासाचे व्हीजन घेवुन प्रहार पक्ष हे निवडणुक लढवणार असुन , येणाऱ्या निवडणुकीत यावलकर मंडळी अत्यंत गार्भीयांने विचार करून निर्णय घेतील कुणाच्या हातात नगर परिषदची सुत्रे सोपव्याची असे , या वेळी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले राज्यात महाविकास आघाडीचे शासन असुन आपला पक्ष यावल नगर परिषदच्या निवडणुकीत जर आपल्या पक्षाला समाविष्ठ करण्याची संधी मिळाली तर आपला पक्ष महाविकास आघाडी सोबत जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी चौधरी यांना विचारले असता , यावल नगर परिषद वगळता ईतर ठीकाणी जर असा प्रस्ताव आला तर आम्ही आघाडीत शामिल होवु असे चौधरी यांनी सांगीतले , यावेळी पत्रकार परिषदेत नगर परिषदचे विद्यमान उपनगराध्दक्ष अभीमन्यु विश्वनाथ चौधरी ( हेंद्री), माजी नगरसेवक व प्रहारचे यावल शहराध्दक्ष तुकाराम बारी , मोहम्मद शेख हकीम, ( प्रहार अल्पसंख्यां तालुका अध्यक्ष ) , प्रहारचे यावल रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख, प्रहार अल्पसंख्यांक चे जिल्हा उपाध्यक्ष हाजी हाकीम खाटीक , शेख शकील सर , यावल तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे , खलील शेख , रफीक टेलर , गोकुळ कोळी , नितिन कोळी , शेख निजाम , सागर चौधरी , तन्वीर मन्यार, युनुस खन्ना , उमर अली कच्छीआदी कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते

शाहरुख खानचे मन्नत बगल्यावर एनसीबीचे अधिकारी आल्यावर शाहरुख काय म्हणाला

0

 

(Suryamarathinews)

आर्यन खानला( aryan khan) ची जामिन फेटाळल्याने शाहरुख ला आर्यन ला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता. पन 3 ऑक्टोबरपासून आर्यन खान (aryan khan)ला आधी एनसीबी अधिकारी आणि त्या नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. आज एनसीबीची अधिकारी (NCB) टीम शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर (Mannat) गेली होती. तेव्हा शाहरुख खुपच हतबल झाल्याचे दिसला.
एनसीबी शाहरुख खानला (sharukh khan) ला नोटिस देण्यासाठी गेली होती. शाहरुखने स्वत: ही नोटीस घेतली. यावेळी मन्नत बंगल्यावर आलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांना तुम्ही चांगले काम करत आहात, माझा मुलगा लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावा अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.
आर्यन खानकडे aryan khan जर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असेल तर ते एनसीबीकडे जमा करावे, असे त्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. शाहरुखच्या घरी व्ही व्ही सिंह गेले होते. त्यांनी म्हटले होते की, तपासाचे काही कागदोपत्री कारवाई राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी ते आले होते. आपले काम झाल्यावर अधिकाऱ्यांटी टीम मन्नतवरून निघाली.
आर्यन खान aryan khan याच्यासह अटकेत असलेल्या इतरांच्या न्यायालयीन कोठडीत आता ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी गेल्या १६ दिवसांत ४ वेळा जामीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.एनसीबीच्या मागणीनुसार मुंबई हायकोर्टात आता मंगळवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे.
आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. चर्चेवेळी दोघांमध्ये काचेची भिंत होती. दोन्ही बाजूने इंटरकॉम होता. कुठल्याही सामान्य आरोपीच्या नातेवाईकांना भेटायला जातात तसं शाहरूखनं आरोपी आर्यनची भेट घेतली. त्याला कुठलीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही. मुलाखतीची वेळ संपताच शाहरूख स्वत:चा बाहेर पडला. Surya marathi news

शहीद क्रांतिवीर बाबुराव शेळमाके यांच्या पुण्यतिथी दिनी काँग्रेस कार्यालयात शहीद दिन संपन्न

0

 

घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला,

घुग्घुस : इंग्रजांच्या जुलमी,अन्यायकारक अत्याचारी साम्राज्यवादी शासना विरोधात वयाच्या चोविसाव्या वर्षी पांचशे आदिवासी युवकांना सोबत घेऊन इंग्रजांशी बंड पुकारणाऱ्या क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके (राजगोंड) यांच्या शहिद दिनी 21 ऑक्टोबरला घुग्घुस काँग्रेस कार्यलयात संघर्षाचे सदैव स्मरण रहावे याकरिता शहीद दिन साजरा करण्यात आला.
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,
कामगार नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते किशोर बोबडे,सुमेश रंगारी,गोगला शंकरजी, बालकिशन कूळसंगे, संजय कोवे,इर्शाद कुरेशी,कोंडय्या तलारी, सचिन कोंडावार, सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्वामी समर्थ मंदिर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो. 9921400542 असदपूर

रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी डॉ. राणी चौधरी ,होमिओपॅथिक तज्ञ अमरावती यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र रहाटगाव येथे निशुल्क आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये ५० पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात आले. शिबिरामध्ये बोलताना डॉ. राणी चौधरी यांनी होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती बद्दल मार्गदर्शन केले. होमिओपॅथी ही अतिशय सशक्त व नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या पॅथीमध्ये सगळ्या आजारांवर तसेच अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत औषधोपचार केले जातात. रुग्णांची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात घेऊन औषधी दिल्या जातात. शरीर आणि मन यांना आपण विभक्त करू शकत नाही. त्यामुळे आपल्या विचार शैलीचा आपल्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होत असतो. म्हणून विचारांमध्ये सकारात्मकता, समतोल आहार ,नियमित व्यायाम, रोज सकाळी फिरायला जाणे या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या गेल्या तर निश्चितच आपले आरोग्य आपल्या हाती राहील असे डॉ. राणी चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले . तसेच श्री. स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष श्री. बोरखडे सर व सौ. बोरखडे मॅडम यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

आद.भिमराव तायडे याच्या मार्गदर्शनाखाली नायगांव ता.नांदुरा येथे भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म ग्रंथ सांगता समारोह संपन्न

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधि

आज दि.20/10/2021 वार बुधवारला मौजे नायगांव ता.नांदुरा येथे भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म या महान धम्मग्रंथाचा सांगता समारोह संपन्न झाला. सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.रुपाजी सपकाळ यांनी भगवान बुद्ध आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प अर्पण करुन दिप प्रज्वलनकरुन केली नंतर बौ.गजानन जाधव यांच्या हस्ते पूजापाठ घेण्यात आली.नंतर ग्रंथाचे वाचण ग्रंथ वाचक आद. संजय सपकाळ यांनी केले व भाषणाला सुरुवात झाली. प्रथम रमाई चरित्रावर बौ.शिवराम ईंगळे सर यांनी बहारदार गीत सादर केले.नंतर बौ.गजानन जाधव यांनी शीलाचे महत्त्व विषद करताना उपोसथ व्रताचेही महत्त्व सांगितले नंतर आद. भिमराव तायडे साहेबांनी नकारात्मक पंचशिलाचे सकारात्मक स्पष्टीकरण केले.यावेळी आद.भिमराव तायडे साहेबांच्या वतीने रमाबाई महीला मंडळाच्या पदाधिकारी यांना तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतीमा भेट म्हणून देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला बौ.देविदास गाढे,संजय नरवाडे, किशोर गाढे,कडुजी सपकाळ, सापुर्डा सपकाळ, निबांजी वाघ,यांच्यासह बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होत्या
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आद. संजय सपकाळ यांनी केले.
शेवटी सरणत्तय घेऊन सांगता करण्यात आली

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने यावल तालसीलदार यांना केंद्र सरकार च्या विरोधात इंधन दर वाढ निषेधार्थ निदर्शने करत दिले निवेदन

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

आज दिनांक 20/10/2021 रोजी सकाळी 10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग अयोजित केली होती .प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचने प्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटीलयांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकल यावल तहसिल ऑफिस मध्ये नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांना निवेदन दिले सदर निवेदन केंद्र सरकारच्या विरेधात निषेधार्थ पेट्रोल,डिझेल,घरगुतीगॅस,खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 20/10/2021रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले या प्रसंगी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभागी झाले होते यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्ह्याअध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील राजपुरी जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील तालुका समन्वयक किशोर माळी कार्याध्यक्ष किशोर पाटील तालुका उपाध्यक्ष पवन पाटील समाधान पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार राहुल चौधरी धनराज पालक समीर तडवी विजय भोई भरत भोई छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील तात्या कोळी यशवंत अडकमोल युवराज भास्कर पाटील कैलास अडकमोल पटेल ुभम विटवे चंद्रकांत कोळी मुस्‍तुफा तडवी आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते