Home Blog Page 392

लखीमपूर शेतकरी हत्याकांडा विरोधात महाविकास आघाडी तर्फे घुग्घुस बंद

0

 

घुग्घुस (प्रतिनिधि)
रमेश सद्दाला

उत्तरप्रदेश येथील लखीमपूर (खैरी) येथे केंद्र शासनाच्या तीन काळ्या कायद्या विरोधात शांततेत आंदोलन करून घरी परत जात असताना भाजप नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना ठार केले.
ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जवाबदारी आहे त्याच गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचा अमानुष हत्याकांड घडवून आणला.
आणि या नृशंस नरसंहाराला पाठीशी घालण्याचा पातक केंद्रातील मोदी शासन व उत्तर प्रदेश येथील योगी शासनाने केला.
हत्याकांडातील आरोपींना बेड्या घालण्या ऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच अटक केली.

या हितलरशाही केंद्र शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा आवाहन केला होता.

या आंदोलनाला प्रतिसाद देत घुग्घुस येथील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी एकत्रित येत घुग्घुस बंदचे आवाहन केले होते.
या पक्षाच्या आवाहनाला व्यापारी वर्गांने सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात दुकाने उघडलीच नाही.

काही तुरळक प्रमाणात उघडलेल्या दुकानांनी महाविकास आघाडीचे बाईक रैली येताच आप – आपली दुकाने बंद केली.

शहरातील चौका – चौकात आघाडीच्या नेत्यांनी मोदी व योगी शासनाचा निषेध व्यक्त केला.
सदर आंदोलन काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,
शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश बोंडे, बाळु चिकणकर, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे,गणेश शेंडे, तर राष्ट्रवादीचे सत्यनारायण डकरे, तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष मागास विभाग, इस्लाम अब्बासी,सतीश जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे किशोर बोबडे, निरंजन डंभारे,नुरुल सिद्दिकी, लखन हिकरे, प्रेमानंद जोगी, शेख शमीउद्दीन, इर्शाद कुरेशी, विशाल मादर, देव भंडारी,कपिल गोगला, शुभम घोडके,जुबेर शेख,विजय माटला, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, वस्सी शेख,आरिफ शेख,सुधाकर जुनारकर, योगेश ठाकरे,
शिवसेनेचे बंटी घोरपडे, योगेश भांदकर, रघुनाथ घोंगळे, वेदप्रकाश मेहता,महेश शेंडे,लक्ष्मण बोबडे, शहंशाह शेख, निखिल मोहितकर, खुशाल जगताप, हर्षल बांदूरकर, सतीश गोहोकर, रेहांत शेंडे,विकी चिवंडे,सुरज खोंडे,
व राष्ट्रवादीचे बंडू झाडे ,संजय भालेराव,कमाल उद्दीन, व
मोठया संख्येने तीन ही पक्षाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

नंदोरी गावात खुलेआम अवैध दारू विक्री

0

 

 

नंदोरी गावातील मुख्य चौकात होते दारू पिणार्यांची गर्दी

नंदोरी गावातील बाजार चौकात अवैध दारूचा महापूर

 

नंदोरी गावातून सर्वसामान्याना जाणे आता अडचणीचे होत आहे. या ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठ चौरस्ता जागेत खुलेआम अवैध देशी – विदेशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे ही जागा अवैध धंदे करणाऱ्यासाठी फार महत्त्वाची ठरत आहे.
सध्या या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैधरित्या थाटलेल्या या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. या तळीरामाच्या त्रासाला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. तात्पुरता आडोसा तयार करून या ठिकाणी हे अड्डे सुरू करण्यात आले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक काही पोलीस कर्मचारी या अवैध दारू विक्रेत्यांना मदत करतात असे बोलले जात आहे
या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.
नंदोरी गावात अवैध दारू विक्रेत्यांचा आपसी मतभेद सुरू असल्याचे असे गावात चर्चा आहे मागील काही दिवसापासून मोठे अवैध दारू तस्करांनी नंदोरी या गावात आश्रय घेतल्याचे पण सांगण्यात येत आहे या अवैध दारू तस्करांचे आपसी मतभेदांमुळे गावातील शांतता भंग होण्याच्या मार्गावर आहेत तरी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे

निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन शेतकरी गेले वाहून

0

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा तालुक्यातील मदनसुरीसह सबोतालच्या परिसरातील रामतीर्थ, अंबुलगा (वि), हाडोळी, रामलिंग मुदगड, हत्तरगा (हा) इत्यादी ठिकाणी दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नदी-नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे मदनसुरीतील ओढ्याला मोठा पूर आला आणि हा ओढा ओलांडत असताना संजय माने व शैलेश माने या दोन शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेले. मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले (NANA PATOLE)

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार

मुंबई, दि 10 ऑक्टोबर 2021

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (ajay mishra)यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली आहे. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी(priynka gandhi) यांनी या नरसंहारचा निषेध करत शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीर ताब्यात ठेवले न नंतर अटक केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल(bhupesh baghel) यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास जाऊ दिले नाही. काँग्रेसच्या खासदाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली. लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे.

भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या भाजपा विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी व लखीमपूर खेरी येथील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शेतकरी जगला तरच हा देश जगेल त्यामुळे राज्यातील जनतेने व व्यापा-यांनीही अन्नदाता बळीराजाच्या हक्कासाठी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.
Surya marathi news

निलंगा पोलिसाची दमदार कामगिरीमुळे गुऱ्हाळ खून प्रकरणातील आरोपीला 72 तासात अटक

0

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

दि. – 6 ऑक्टोंबर 2021 रोजी निलंगा पोलीस ठाणे येथे गुऱ्हाळ ता. निलंगा या ठिकाणी वयोवृद्ध महिला नामे शेषाबाई मोतीराव दूधभाते वय 80 वर्ष या दुपारी दोन वाजता च्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये शेती काम करण्याकरता गेली असता त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने चाकूने त्यांचा गळा कापून खून केला असल्याची माहिती पोलीस स्टेशन निलंगा यांना प्राप्त झाली त्यानंतर घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे साहेब पोलीस निरीक्षक शेजाळ सपोनि कुदळे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस उपनिरीक्षक अक्कमवाड पोलीस उपनिरीक्षक मुळीक पोलीस उपनिरीक्षक गरजे,पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलीस स्टेशनचा स्टॉप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व जखमी हिस उपजिल्हा रुग्णालय निलंगा या ठिकाणी उपचार कामी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी ते तपासून दाखल पूर्व मयत घोषित केले त्यानंतर मयत यांचा मुलगा नामे माधव मोतीराव दूधभाते वय 52 वर्ष व्यवसाय प्राध्यापक राहणार गुराळ तालुका निलंगा ह.मु.मुक्काम पोस्ट सारडा कॉलनी अक्षय गॅस एजन्सी च्या पाठीमागे परळी नाका गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांनी दिलेल्या जबाबा वरून पोलीस स्टेशन निलंगा गुन्हा रजिस्टर नंबर 286/21 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात पाहिजे आरोपीचा शोध डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चे तीन पथक आरोपीचा शोध घेणे कामी व गोपनीय माहिती काढणे कामे रवाना केले आज दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून संदीप आनंदा भोसले राहणार गुराळ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आर्थिक विवेचनातून व पैशाची गरज असल्याने गावातील वयोवृद्ध महिला शेषाबाई दूधभाते तिच्यावर लक्ष ठेवून शेतात एकटी असतांना धार धार हत्याराने गळ्यावर वार करून तिच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोत घेऊन गेला. सदर आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शन लाभले आरोपी शोध कामी निलंगा पोलीस स्टेशन चे अधिकारी उप विभागीय आधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेजाळ, सपोनि कुदळे, सपोनि डमाळे, सपोनि कामत, पोलीस उप निरीक्षक राठोड, अक्कमवाड, मुळीक, गर्जे, क्षिरसागर, महिला पोलीस उप निरीक्षक गायकवाड तसेच पोलीस स्टेशन चे अंमलदार बनाटे, बेग, सूर्यवंशी, चव्हाण, मजगे, सोमवंशी, माने, मुळे, बेबडे, नागमोडे, काळे व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सूर्यवंशी, कोतवाड, राजू मस्के, माधव बिल्लापट्टे, नकुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे उद्या सोमवार रोजी राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद आवाहन दि. ११ ऑक्टोबर सोमवार महाराष्ट्र बंद उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सरकार च्या मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून र्निदयीपणे मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चिड आणनारा आहे.

आपले भारत हे कृषी प्रधान देश असतांना या देशांमध्ये भारतातीलच शेतकरी गेली अनेक महिन्यापासुन आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करूण आपले म्हणने सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे पंरतु वेळो वेळी हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचे केन्द्रातील सरकार च्या माध्यमातुन दाबण्याचा व आंदोलनास भरकटविनयाचा प्रयत्न करीत आहे.

पंरतु यामध्ये पुर्णत:यश आलेले नाहीत.शेतकरी आंदोलन साम,दाम, दंड, भेद, वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आता भाजपा सरकारने चालविला आहे.अशा वेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाणे गरजेचे असून या निर्देयी कृतयााचा निषेध म्हणून दि. ११ ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,व शिवसेना, यांच्या तर्फे बंदचे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे
गटनेता जिल्हा परिषद जळगांव तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस प्रा.मुकेश येवले सर(नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ),रविभाऊ सोनवणेतालुका प्रमुख शिवसेना यांनी केले आहे .

चिमुकल्यासह देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महीलेचा रेल्वेखाली चिरडुन दुर्देवी मृत्यु

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक)

नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी आज सकाळी नांदगाव येथील चांडक प्लाँट भागातील दोन महीला आपल्या तीन चिमुकल्यासह रेल्वेे अंडरपासमध्ये पाणी असल्याने रेल्वे रुळ ओलांडत असतांना महाराष्ट्र एक्सप्रेस आल्याने रेल्वेखाली चिरडुन स्वाती रविंद्र शिंदे या महीलेचा दुर्देवी मृत्यु झाला.सदर महीला गरीब होतकरु रवि शिंदे यांच्या पत्नी होत्या.रेल्वे प्रशासन व नांदगाव नगरपालिकेच्या भोंगळ काराभारामुळे बनविण्यात आलेल्या अंडरपासमुळे हा दुर्दैवी मृत्यु झालेला आहे त्याचे शल्य मनाला टोचल्याने आपण नगरसेवक असुन न पा च्या अट्टाहासामुळे येथील जनतेचा पुरामुळे उद्भवलेल्या येण्या जाण्याच्या समस्या साेडवु शकलो नाही अशी खंत व्यक्त करत या वाँर्डातील नगरसेवक नितिन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नितीन जाधव यांनी असा राजीनामा देणे नगरपलिकेस काळे फासण्यासारखे आहे म्हणुनच त्वरीत अंडरपासचा प्रश्न मिटवा नाहीतर नगरपरीषद बरखास्त करा अशी संतप्त प्रतिक्रीया नांदगावमधील जनतेकडुन केली जात आहे.

यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

डी. एस. फोर तसेच बामसेफ व बी. एस. पी. चे संस्थापक मा. कांशीराम जी यांचा 15 वा परिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. बोरावल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात साजरा करण्यात आला. तरी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमांस निळे निशाण संघटनेचे ता. अध्यक्ष विलास भास्कर तसेच रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे, तसेच निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपअध्यक्ष अशोक तायडे तसेच संघटनेचे युवा ता. अध्यक्ष विशाल तायडे, तसेच शाखा अध्यक्ष अट्रावल भूषण संपकाळे, कैलास लोहार, ए. के. तायडे, विष्णू लोखंडे, राजू अडकमोल, भरत अडकमोल, विवेक तायडे, अविनाश भास्कर, अशोक मच्चीवाले, किशोर अडकमोल, सागर गजरे, राहुल गजरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले तर उपस्थित मंडळींचे आभार विलास भास्कर यांनी मानले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघेचा श्रेयस वाचनालयाने केला सत्कार

0

 

(हिंगणघाट)
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संकेत वाघे यांनी २६६ वा क्रमांक प्राप्त करून नेत्रदिपक यश संपादन केल्याबद्दल श्रेयस वाचनालय आणि संशोधन केद्रांच्या वतीने वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे आणि वाचानालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संकेतच्या निवास्थानी जाऊन त्याचा गौरव चिन्ह आणि पुष्प देऊन सत्कार केला.आपले मनोगत व्यक्त करतांना संकेतनी आपण देशसेवा करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भाग घेण्याचा निर्णय घेतल्याचे मत व्यक्त केले.आत्मविश्वास,दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही असा तो म्हणाला.यावेळी प्रा.जयंत दाणी,प्रा.शैलेंद्र गजभिये,प्रा.सचिन हिवरकर ,प्रा.मून,प्रा.लोहकरे ,प्रा.भटकर ,प्रा.झाडे,शशीमोहन थुटे यांची उपस्थिती होती.सत्कार समारंभाचे सँचालन व आभार प्रदर्शन प्रा.जयंत दाणी यांनी केले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

किनगाव परिसरात भुरट्या चोरटयांचा धुमाकुळ शेतकऱ्यांच्या शेती अवजारांनी होत चोरी पोलीसानी रात्रीची गस्त वाढवावी : शेतकऱ्यांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मागील दोन वर्षांन पासून संपुर्ण देशात कोरोना संसर्गाच्या या भयंकर महामारीमुळे शेती व उद्योग व्यवसायांवर मोठे विपरीत परिणाम झाले असुन , यामुळे सर्वसामान्या पासुन तर अन्नदाता शेतकरी बांधवांवर ही कठीण वेळ आलेली आहे. यातच शेतीला तर निसर्गाने ही मोठी हानी पोहचवली असुन यावर्षी शेतीला लावलेला खर्चही निघने कठीन झाले आहे आणी अशा परीस्थीतीत जर शेतकऱ्यांच्या शेतातून ८ दिवसात दोन वेळा विजपंपाच्या केबल वायरींची चोरी झाली तर त्या शेतकऱ्यांची परीस्थीती काय होईल असाच एक प्रकार किनगाव येथील शेतकरी संदीप चुडामण पाटील,सिताराम महाजन,चंदू टेलर व किनगांव बुद्रूक ग्रा.प.मालकीचे मोटकरे शेत
यांच्या बाबतीत घडला संदीप पाटील यांचे गट नं.१३ सह सिताराम महाजन,चंदू टेलर व ग्रा.प.चे मोटकरे शेत यांचे चुंचाळे रस्त्यावर शेत आहेत गेल्या आठवड्यात यांच्या शेतातून अंदाजीत २० हजार रूपये किंमतीची विजपंपाची केबलवायरी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या मात्र बागायत शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने वरील सर्व शेतकऱ्यांनी विज पंप सुरू करण्यासाठी नवीन २० हजार रूपयांच्या वायरी आणल्या व त्या लावून शेतीपिकांना पाणी देण्यास सुरूवात केली मात्र दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुंन्हा या केबल वायरी चोरून नेल्या आधीच शेतीत पुरेसे उत्पंन्न येईल कीनाही याची खात्री नसतांना आठ दिवसात जर दोनवेळा केबल वायरींची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्या शिवाय राहणार नाही किनगावसह परीसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असुन चोरांना पोलिसांचा धाक वाटत नाही की काय?असा प्रश्न निर्माण होत आहे शेतकरी दिवसरात्र शेतीत मेहनत करून एक एक रूपया जमा करतो आणी चोर मात्र हजारो रूपयांच्या शेतीपंपाच्या केबल वायरी चोरून नेतात म्हणून किनगावसह परीसरातील या भुरट्या चोरांनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त राबवावी अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.