Home Blog Page 392

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या हस्ते प्रधानमंञी उज्वला गॅस वाटप

0

 

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाने डोणगांव येथिल शेकडो लाभार्थ्यांना गॅस वाटप

आज दिनांक २०.१०.२०२१ रोजी डोणगाव येथे रहमत नगर फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल डोणगाव समोरच्या प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयासमोर छोटेखानी गॕस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये सद्दाम शहा कट्टु शहा ग्रामपंचायत सदस्य डोणगांव,जिल्हा नेते भागवत जाधव तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,तालुका अध्यक्ष पक्ष नितीन अग्रवाल,तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी अमोल धोटे,श्री संत गजानन महाराज एच.पी.गॕस एंजन्सीचे संचालक अंकुश जाधव ,व्यवस्थापक अलिम भाई हे होते. या कार्यक्रमामध्ये डोणगाव येथील नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ब-याच लाभार्थ्‍यांना अजून पर्यंत १०० रुपयांमध्ये गॅस वाटप झालेले नव्हते.अध्यापर्यंत काही कुंटुबाला या योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ही बाब स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ .टाले यांच्या लक्षात आणून दिली व लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यासाठी श्री संत गजानन महाराज एचपी गॅस एजन्सी लेहनी च्या माध्यमातून तसेच डोणगाव येथील स्वाभिमानी एचपी गॅस पॉइंट यांच्या मदतीने गावातील पात्र लाभार्थींकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेमार्फत गॕस वाटपासाठी कागदपत्रे गोळा करून ऑनलाइन करण्यात आले. त्यानंतर सतत गेल्या चार महिन्यापासून यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी पाठपुरावा करून शेकडो गॅस मंजूर करून आणले त्यामुळे डोणगाव येथील महिलांसाठी “धूर मुक्त चुल मुक्त” अभियान राबविले असून यामुळे घरातील धुरामुळे होणारे आजार कमी होतील कुंटुबाला प्रदुषणमुक्त वातावरण मिळेल.तसेच इंधनाचा वापर सुद्धा कमी होऊन वृक्षतोड थांबेल व निसर्ग चक्र सुरळीत राहण्यास मदत होईल.तसेच पुढील काळात सुद्धा डोणगांव मधिल उर्वरित पाञ लोकांना लाभ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने आम्ही प्रयत्नशील राहू व शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोचविण्यासाठी स्वाभिमानी चा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता मदत करणार आहे या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कोणत्याही कुटुंबाला अजून पर्यंत लाभ मिळाला नसेल तर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते शी संपर्क साधावा आम्ही त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू सत्ता असो अगर नसो मात्र जनसामान्यांसाठी नेहमीच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कायम आघाडीवर असते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे व त्यांचे समाधान करणे यातच आम्हाला सत्तेचा आनंद मिळतो असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी व्यक्त केले.डॉ.ज्ञानेश्वर टाले व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते गॕस इतर साहीत्य वितरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळालेल्या लाभार्थींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते व त्यांनी या उपक्रमाचे कौतुक सुद्धा केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले,तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी अमोल धोटे,तालुका अध्यक्ष पक्ष नितीन अग्रवाल,जिल्हा नेते भागवत जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक युवानेते देवेंद्र आखाडे यांनी केले व सूत्रसंचालन गौतम सदावर्ते सर यांनी केले या कार्यक्रमासाठी सद्दाम शहा युनुश शहा,सलिम शहा,जावेद शहा,निलेश सदावर्ते,अयुब शहा यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने उज्वला प्रधानमंञी योजनेचे लाभार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष गणेश जुंनघरे,अरविंद दांदडे,अमोल वाघमारे. अभिमन्यू देशमुख, सतिष देशमुख, राजू पळसकर, रूशांक चव्हाण, मिनेश बाजड, मिथुन साळवे, सुरेश खरात, उत्तम खरात, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, युसूफ खान पठाण, रामेश्वर वायाळ,संतोष टाले,संतोष नेमाडे, नकुल खोडके, इकबाल शहा,आलिम शहा आयुब शहा, जावेद शहा, इमरान आतार, जाहिद मौलाना, तालीब अली शहा, हुसेन शहा, शरीफ भाई उपसरपंच नागपूर, बंडू भाऊ खिल्लारे ग्राम पंचायत सदस्य नागपूर, देवानंद खोडके ग्रामपंचायत सदस्य नागपूर, सय्यद याकुब ग्रामपंचायत सदस्य नागपूर,अनिल जगताप. पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित होती.

पातुर्डा    येथील सेन्ट्रल बँकेत शॉर्ट सर्किट मुळे आग,नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

0

 

पातुर्डा   येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत दि 19 ऑक्टोबर च्या रात्री 12 वाजता अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असता तेथील नागरिकांच्या सतर्कता मुळे मोठा अनर्थ टळला
सविस्तर असे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक    पातुर्डा बु ही येथील प्रकाश दवे यांच्या मालकीच्या वरच्या मजल्यावर असून दि 19 ऑक्टोबर ला रात्री 12 वाजता अचानक शॉर्ट सर्किट झाले व आग लागली आग उग्र रूप धारण करत असताना बँक समोरील अजय व्यास याना बँक मधून धूर निघताना दिसला असता त्यांनी बँक कर्मचारी गजानन देवकर याना ताबडतोब बोलवले व बँक उघडली तिथे पाहिले असता आग धीर धिरे उग्र रूप धारण करत होती आजू बाजूच्या अजय व्यास,प्रकाश दवे,कुशल दवे,योगेश तायडे,रमण सेवक,लातीश भुतडा या नागरिकांनी ती आग पाणीच्या साहाय्याने विजवली व मोठा अनर्थ टळला,नाहीतर ही बाब अजय व्यास याच्या लक्षात आली नसती तर सेंट्रल बँक संपूर्ण जळाली असती कारण बँकेत मोठं मोठ्या बॅटऱ्या आहेत व बँक चे कागदपत्रे आहेत या मुळे आग वाढली असती व जीवित हानी पण झाली असती मात्र व्यास यांच्या सतर्कतामुळे व बाजू च्या नागरिक मुळे ती विजविण्यास यश आले वृत्त लिहेपर्यंत कोणताही प्रकारचा पंचनामा न झाल्यामुळे बँक चे किती रु चे नुकसान आहे ते कळू शकले नाही मात्र बँक मधील सी पी यु,मॉनिटर,की बोर्ड,व प्रिंटर व काही महत्वाची कागदपत्रे हे पूर्णता जळाले आहे

दुसऱ्या दिवशी बँक काम काज बंद
शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यात बऱ्याच वस्तु जाळल्या व काही प्रमाणात एलक्ट्री सिटी जळाली म्हणून दुसऱ्या दिवशी बँक चे सर्व काम काज बंद करण्यात आले

बँक मॅनेजर ची उदासीनता पातुरडा येथील सेंट्रल बँकेत रात्री 12 वाजता आग लागली ही बाब बँक चे कर्मचारी यांनी रात्रीच बँक मॅनेजर श्री घोंगे याना दिली मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी बँक मध्ये लवकर यायला पाहिजे होते मात्र असे झाले नाही बँक मॅनेजर हे रेग्युलर आपल्या वेळे नुसार बँकेत दाखल झाले,जसे काही झालेच नाही या मुळे त्याची बँक प्रति उदासीनता दिसून आली व किमान बँक मॅनेजर यांनी दुसऱ्या दिवशी लवकर यायला पाहिजे होते अशी चर्चा त्या ठिकाणी जमलेले नागरिक करत होते

सूनगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष नागरिकांनी चक्क ग्रामपंचायत मध्ये टाकला कचरा

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत लगतच असलेल्या वार्ड क्रमांक एक मध्ये ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष दिसत आहे तसेच या वॉर्डमध्ये नाली बांधकाम केलेले नाही व जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत व पावसाच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही ग्रामपंचायतीने त्यावर कोणतीच दखल घेतली नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाकडून 2 ते 3 सफाई कामगार कार्यरत असूनही ग्रामपंचायत कडून नाली मधील काढलेला कचरा उचल्या जात नाही रोडवरील कचऱ्याचे ढीग या वार्ड नंबर 1 मध्ये दिसत आहे व वार्ड नंबर 1 मध्ये रस्त्याची दुर्दशा ही फार खराब झालेले आहे तसेच घाणीचे साम्राज्य भरपूर आहे त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यालाच त्रस्त होऊन वार्ड क्रमांक 1 मधील निखिल कतोरेअक्षय घोलप सुनील कापरे सुरेश कापरे यांनी या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा बाबतीत सरपंच यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीच विल्हेवाट लावली नाही यालाच त्रस्त होऊन या नागरिकांनी रोडवरील कचरा हा चक्क ग्रामपंचायत मध्ये आणुन टाकलेला आहे यावरून ग्रामपंचायतच मुजोरीपणा निदर्शनास आला आहे व नागरिकांचा या बाबतीत असा आरोप आहे की वार्ड क्रमांक 1 मधील ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मधील स्वच्छतेकडे लक्ष देत नाही तरी वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन व विचार करावा व योग्य ती कारवाई करावी

ट्रॅफिक बूथ लावण्यासाठी बहुजन समाज पार्टीची मागणी

0

 

घुग्घुस प्रतिनिधी
रमेश सुद्दाला,

बहुजन समाज पार्टी द्वारा आज दिनांक 19/10/2021 ला घुग्घुस पुलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. नवीन बस स्टँड घुग्घुस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चंद्रपूर व वणी महामार्गावर तत्काळ ट्रॅफिक बूथ लावण्यात यावे व एक ट्रॅफिक पुलिस अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी द्वारा करण्यात आली, असून आज वणी चंद्रपूर महामार्गावर प्रवासी, शाळेतील मुले, मुली व गाव करी तसेच अनेक प्रकार चे जड वाहन टू व्हीलर, फोर व्हिलर, हायवा , अशे अनेक प्रकार चे जड वाहांना चे आवागमन मोठ्या प्रमाणात सुरू असताना तिथं गती रोधक ब्रेकर नआल्याने मोठा अपघात होण्याचे प्रमाण अधिक का अधिक वाढत आहे तरी बहुजनां च्या हितासाठी बहुजन समाज पार्टी द्वारा आज अशी मागणी करण्यात आली की तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ट्रॅफिक बूथ व ट्रॅफिक नियंत्रणासाठी एक ट्रॅफिक पुलिस नेमण्यात यावे व होणाऱ्या जीव हानिस टाळावे ही विनंती करण्यात आले,
निवेदन देते वेळेस अध्यक्ष मोहन येमुर्ले, उपाध्यक्ष सिद्धार्थ रामटेके यांच्या हस्ते घुग्घूस पोलिस अधिकारी यांना देण्यात आले….

शिवाजी नगर परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर चाकूहल्ला; यावल पोलीसात एकावर गुन्हा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाने वासूदेव सुरेश पाटील (वय-३३) रा. यावल या तरूणावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांच्या माहितीनुसार, वासुदेव सुरेश पाटील (वय-३३) रा. शिवाजी नगर, यावल हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास वासुदेव पाटील हा घराच्या समोर उभा असतांना विलास उर्फ पिंटू सुकदेव सुर्यवंशी रा. शिवाजी नगर हा तिथे आला. विलासने वासूदेव पाटील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर वासूदेवने पैसे दिले नाही याचा राग आल्याने विलास सुर्यवंशी याने चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व हातातील चाकूने मानेवार व हाताच्या अंगठ्यावर वार करून जखमी केले. जखमी तरूणाला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वासूदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विलास सुर्यवंशी यांच्यावर आज सकाळी ११ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहे.

सांगवी-भालोद रस्त्यावर नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ; यावल पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावर एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात कामाला जात असतांना वाटेत असलेले हरी बोरोले यांच्या शेताजवळ एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी मजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. याघटनेमुळे यावल परिसरात खळबळ उडाली आहे. मजूरांनी तातडीने यावल पोलीसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालकाला उचलून तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल (वय-२६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माता पित्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठाण करीत आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी निलंगा तालुका मतदार संघातून मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

 

दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी

निलंगा मतदार संघाचे लाडके लोकप्रिय नेते, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांनी निलंगा तालुका सोसायटी मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केले या वेळी मा. आ. धीरज देशमुख , मा. आ.बाबासाहेब पाटील तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

वैभव वानखडे यांना अंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0

 

सुनील पवार नांदुरा ता.प्रतिनिधि

माऊली फिल्म व शिव छत्रपती सामराज बहुउदेशिय सेवाभावी शिक्षण संस्था यांच्या वतीनेदिला जानारा.२०२१चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार वैभव वानखडे यांना३१आँकटोंबर ला अकोला येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात देण्यात येणार आहे वैभव वानखडे हे युवा भिमसेना या सामाजिक संघटनेचे संस्थापक अधक्ष आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला

जळगाव जिल्ह्यातील पहिल्यांदा चुंचाळे येथील ग्रामपंचायतीच्या दुसऱ्यांदा झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत सुनंदा पाटील यांचा दणदणीत विजय

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुंचाळे तालुका यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व तो पारित देखील झाला मात्र, लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासंदर्भात ग्रामसभेची देखील मंजुरी आवश्यक असते. म्हणून आज जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता पिठासिन अधिकारी पी टी देवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम विस्तार अधिकारी हबीब तडवी , ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली व त्यांनंतर आता प्रत्यक्षात या सरपंचाविरूद्ध आणलेल्या ९ ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाच्या विरूद्ध झालेल्या मतदानात आज ग्रामस्थांच्या मतदानास सुरूवात होवुन एकुण २२९२ मतदारांपैक्की११३० असे एकुण ५२ टक्के % मतदान झाले . यात सरपंच सौ सुंनदा पाटील यांना ६८४तर सदस्यांच्या गटाला एकुण २१६ मते मिळाली व २३० मतदान हे बाद झाली. यावल तालुक्यासह संपुर्ण परिसराचे लक्ष वेधणाऱ्या या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा पाटील यांनी विजय मिळवले आहे .

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. तेव्हा दिनांक ७ जुन२०२१ रोजी चुंचाळे ग्रामपंचायत येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती व सरपंच पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम असल्याने, तेव्हा जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या व या अनुषंगाने गावात आज १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदान घेण्यात आले. मतदान येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत एका मतदान केन्द्रावर प्रत्यक्षात जावुन ग्रामस्थांनी आपल्या मतदानाचा द्वक, या मतदानात एकुण २ हजार९२ पैक्की ११३० मतदारांनी मतदानात सहभाग घेतला .

तेव्हा चुंचाळे गावातील शाळेतील मतदान केन्द्रा बाहेर ग्रामस्थांची मोठी केली होती सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती .या विशेष ग्रामसभेच्या पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज यांनी काम पाहीले तर ग्रामसेवक यांनी त्यांना सहकार्य केले . या ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यात आले असुन यात ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून मोठया मतदानाने विजयी माळ त्यांच्या गळयात घातली असुन , लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा मतदान करण्याची ही राज्यातील दुसरी तर जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावरील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी पोलीस निरिक्षक सुधिर पाटील व पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला होता . चुंचाळे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदावर दुसऱ्यांदा विजयी माळ घालुन आपल्याला निस्वार्थ सेवेची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थांचे मनस्वी आभार मानले .

नांदगाव अनुसुचित जाती विभाग तालुका काँग्रेस महीला अध्यक्षपदी सौ.सुनिता देहाडे आणि पुरुषगट तालुका देविदास दिवे तर शहरअध्यक्षपदी सौ.अल्का पगारे आणि पुरुषगट शहर रोहीत जाधव यांची निवड

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

मा.अनिलदादा आहेर (माजी आमदार) व युवानेते दर्शनभाऊ आहेर यांच्या हस्ते सौ.सुनिता विलास देहाडे यांचा नांदगाव तालुका काँग्रेस अ.जा.महीला अध्यक्ष आणि सौ.अल्का सुनिल पगारे यांची अ.जा.महीला शहराध्यक्षपदी नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.पुरुषगट अनुसुचित जाती विभाग तालुका अध्यक्षपदी देविदास दिवे तर शहर अध्यक्षपदी रोहीत जाधव यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी नवनियुक्त महीला पदधिकारी व युवा पदाधिका-यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर निवडीचे नांदगाव तालुका काँग्रेसच्यावतीने सर्व पदाधिकारीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.