Home Blog Page 397

निलंगा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत

0

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात केले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी,जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळ, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकरराव पाटील, शहर निलंगा काँग्रेसचे अध्यक्ष
गोविंद शिंगाडे सतिश पाटील वडगावकर, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, संजय बिराजदार, पंकज शेळके, हमीद शेख काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

साई क्रिटीकेअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

0

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी:

आज निलंगा येथे सकाळी 10.30 वाजता साई क्रिटीकेअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष विट्ठल-रुक्मिणी समिती, पंढरपूर)यांच्या अध्यक्षतेखाली सहकारमहर्षी मा.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी मा. अशोकराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस काँग्रेस कमिटी महाराष्ट्र),मा. अभयदादा सोळुंके(सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र),डॉ. हनुमंत किणीकर(न्यूरॉसर्जन सह्याद्री हॉस्पिटल लातूर),मा.लिंबनमहाराज रेशमे(सदस्य लातूर जिल्हा नियोजन समिती),सौ. शोभा जाधव(उपविभागीय अधिकारी निलंगा) निलंगा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रतिष्ठित नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे बदली झाल्याने त्यांचा कौटुंबिक स्वरूपात निरोप देण्यात आला.

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावेळी डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले की, कोरोनासारख्या महामारी संसर्गाच्या संकटात पंचायत समितीच्या माझ्या सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी कुटुंब प्रमुख म्हणुन दिलेली प्रत्येक शासकीय कार्यात साथ ही माझासाठी महत्वाची होती. पुढील शासकीय सेवेकरीता आयुष्यात प्रेरणादायी ठरणार आहे, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन डॉ निलेश पाटील हे मागील दोन वर्षापासुन कार्यरत होते. दरम्यान तत्काकालीन गटविकास अधिकारी म्हणुन यावल येथे सेवेत असलेले वाय.पी. सपकाळे यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बऱ्याच दिवसापर्यंत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचे कार्य मंदावले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन डॉ. निलेश पाटील यांनी यावल पंचायत समितीची सुत्रे स्विकारल्या नंतर विकासाच्या प्रलंबित कामांना गती मिळाली होती.

याप्रसंगी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी नईम शेख, कृषी अधिकारी डी.पी. कोते, कृषी विस्तार अधिकारी धिरज हिवराळे शाखा अभियंता, इंगळे साहेब. विजतंत्री अधिकारी आर. पी. देशमुख, कार्यालयीन कक्ष अधिकारी सरवर तडवी यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, ग्रामसेवक हितेंद्र महाजन,राजू तडवी. रविंद्र बाविस्कर, मजीत तडवी, कार्यालयीन कर्मचारी मिलींद कुरकुरे, अझहरोद्दीन फारूकी, जावेद तडवी,चैतन चौधरी.आदी कार्यक्रमास उपस्थित होते .

प्रेरणा वस्ती स्थर संघाकडून दिनेश वर्मा विरोधात निवेदन

0

 

आज दिनांक 1 ऑक्टोबर 2021 ला प्रेरणा वस्ती स्तर संस्था व शहर स्तरीय संघ च्या वतीने उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, ठाणेदार यांना दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीने संस्थेत व सदस्यांच्या घरी जाऊन धमकवण्याच्या प्रकरणी निवेदन देण्यात आले.
प्रेरणा वस्ती स्तर संस्था रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथे गटाच्या माध्यमातून बेघर व वृद्ध लोकांना सेवा दिली जाते परंतु काही दिवसांपासून दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीकडून वृत्तपत्रांमध्ये खोट्या बातम्या देऊन प्रत्यक्ष चालकांना धमकावून मानसिक त्रास देण्यात येत आहे मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या नियमानुसार निवाऱ्याचा सर्व आर्थिक व्यवहार हा नगर परिषदेला दिलेली आहे , तरी निवाऱ्यातील वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास देत निवाऱ्यामध्ये रात्री बेरात्री पुरुषांना आणणे व महिला चालकांना फोन करून उद्धट भाषेत बोलुन मानसिक त्रास देण्याचा पराक्रम दिनेश वर्मा या समाजकंटकाने केला आहे . स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजणारा दिनेश वर्मा, प्रेरणा वस्ती स्तर संस्थांचे अध्यक्ष व सभासद यांच्या निवास स्थानी जाऊन अभद्र व गलिच्छ वागणूक दिल्या प्रकरणी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली तसेच मुख्याधिकारी नगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय हिंगणघाट येथे निवेदन सादर करण्यात आले व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निर्मला भोंगाडे सचिव, शारदा भाले अध्यक्ष, प्रज्ञा नगराळे उपाध्यक्ष, विना बडे, अर्चना दुरबुडे ,चंद्रकला राऊत ,मंजू खानखुरे ,अनु मानकर, वर्षा लांजेवार शक्ती शहर स्तर संघ अध्यक्षा, सविता गायमुखे, मंगला कावळे, वैशाली कावळे,उषा कडू, सुकेशनी मुन, रेखा मुंजमवार, पुष्पा ठाकरे,जयश्री मेंडूले, शांता दुर्गे, शिला बोरकर, सिमा मेश्राम, सिंधू दखणे,राजश्री बाम्बोडे,शिला राजूरकर, संगीता भाजीखाये,दीपाली सुरकार कल्याणी इटनकर, माया फुलकर, भगत, रेडलावार इत्यादि सदस्य गण व विविध सामाजिक संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

बोडखा येथे विनापरवानगी सुरू असलेला एचडीपीई पाईपचा प्लांटबंद करा

0

 

दोन वर्षापासून बोडखा गावातील ठाकरे नामक ठिबक स्प्रिंकलर विक्रेता विनापरवानगी एचडीपीई पाईप चा प्लांट चालवत आहे त्यामुळे विनापरवानगी सुरू असलेला हा प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा याकरिता बोडखा गावातील पत्रकारअमोल ठाकरे व तालुक्यातील नागरिकांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी गवई यांनाशुक्रवार 24 सप्टेंबर रोजीलेखी तक्रार दिली

सदर दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की बोडखा गावात रहदारीच्या ठिकाणी ठिबक स्पिंकलर विक्रेता ठाकरे यांच्या जागेत विनापरवानगी एचडीपी पाईप बनविण्याचा प्लांट सुरू आहे ठिबक स्पिंकलर पाईप बनविण्याचा प्लांट अनधिकृतरित्या बोडखा गावामध्ये कुठलीही परवानगी न घेता सुरू आहे तसेच हा प्लांट सुरू करताना गावातील आजूबाजूंच्या स्थानिक नागरिकांची ना हरकत घेतली आहे का सदर ठिकाणी जो अवैधरीत्या जो प्लांट सुरू आहे त्या ठिकाणी महावितरणचे सी एल मीटर व्यावसायिक मीटर बसविण्यात आले आहे का की घरच्याच डी एल मीटर वर हा नॉनआय एस ओ एच डी पी ई पाईप बनविण्याचा प्लांट सुरू आहे संबंधित प्लांट चालक या सुरू असलेल्या प्लांट चा कर रिटर्न भरतो का जो माल या प्लांट मधून विक्री करण्यात येतो त्याचे बिल ग्राहकांना देतो का सदर प्लांटला कृषी आयुक्त कार्यालयाची परवानगी नसताना हा प्लांट कसा सुरु आहे ज्या ठिकाणी हा प्लांट सुरू आहे त्या ठिकाणी एचडीपी पाईप चे मटेरियल आहे त्यावर सी एम एनंबर आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी व अवैधरित्या सुरु असलेला एच डी पी ई पाईपचा प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा अशी तक्रार अमोल ठाकरे एकनाथ दुतोंडे रवींद्र अवचार यांनी तालुका कृषी अधिकारी गवई यांच्याकडे केली आहे

प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांना लेखी तक्रार देतांना अमोल ठाकरे आदी

यावल नगर परिषद अतिरिक्त साठवण तलावाच्या भ्रष्ठाचाराची न्यायलयीन चौकशी व्हावी : गटनेते अतुल पाटील यांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी यांनी केलेले अतिरिक्त साठवण तलाव भ्रष्ठाचाराचे आरोप हास्यास्पद असुन त्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्ठाचाराच्या आरोपा विषयाची सखौल माहीती न घेता नगराध्यक्ष यांना दिलेले समर्थन म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असेच म्हणावे लागेल , अशी प्रतिक्रिया आज यावल येथील नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी अतिरिक्त साठवण तलाव भष्ठाचारा विषयी सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या पत्रकार परिषरेत व्यक्त करण्यात आली . यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहराला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची उणीव भासु नये या दृष्टीकोणातुन सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतत्वाखाली नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी व त्यांच्या सहकारी सर्व नगरसेवकांनी मिळुन विकासाचा विधायक दृष्टीकोण समोर ठेवुन गावाला येणाऱ्या कालखंडामध्ये मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरीता सर्यतीचे पर्यंत करून नगर परिषदला सुमारे १ कोटी ७६ लक्ष रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावास मंजुरी मिळवली व सदरचे काम पुर्णत्वास आले असता, चार दिवसापुर्वी नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी व त्यांच्यासह चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे सदरचे साठवण तलावाच्या कामात मोठा भ्रष्ठाचार करण्यात आल्याची लिखित तक्रार केली असुन , याविषयाला आता राजकीय वळ्ण मिळाले असुन , काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये या अतिरिक्त साठवण तलावात झालेल्या भ्रष्ठाचाराची चौकशी व्हावी या नगराध्यक्ष यांच्या मागणी समर्थन देण्यात आलेत, याच विषयाला घेवुन आज सकाळी ११ वाजता सत्ताधारी गटातील गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी त्यांच्या गटातील सर्व ११ नगरसेवकांना सोबत घेवुन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी यांनी केलेल्या अतिरिक्त साठवण तलावातील उभारणीत झालेल्या कामात भ्रष्टाचारा विषयी गंभीर आरोप लावुन याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणीच जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने नगर परिषदच्या वर्तुळात एकच खळबळ उडवुन दिली असुन , याच विषयाला घेवुन अतुल पाटील यांनी आज उपनगराध्यक्ष अभीमन्यु चौधरी , नगरसेवक प्रा . मुकेश येवले , राकेश कोलते , शेख असलम शेख नबी , समिर शेख मोमीन , नगरसेविका सौ . देवयानी धिरज महाजन , सौ .रेखा युवराज चौधरी , सौ . पोर्णीमा राजेन्द्र फालक, शिला श्रीधर सोनवणे , सौ . कल्पना दिलीप वाणी , सौ .रूख्माबाई भालेराव ( महाजन ) यांना सोबत घेवुन , सदरील अतिरिक्त साठवण तलावाच्या उभारणी कामात मोठया प्रमाणात झालेल्या भ्रष्ठाचाराच्या आरोपांना फेटाळुन लावले असुन , नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी यांच्या संपुर्ण देखरेख व आदेशाव्दारे पुर्णत्वास आलेल्या तलावाची त्यांनीच भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी हे संपुर्ण विषय हायस्पद तर आहेच पण यातुन यावल शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या नगरसेवकांच्या विश्वासाची प्रतिमा मलीन करण्याचा हा एक प्रकारे राजकीय षड्यंत्र असल्याची माहीती या वेळी पत्रकार परिषद मध्येे देवुन या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय न्यायलयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही आपण जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना गटनेते अतुल पाटील यांनी दिली .

अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली.

0

 

निलंगा/ प्रतिनिधी दगडू पिंगळे

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर येथे आज सकाळी वरिष्ठ अधिकारी सहकार्यांसह जाऊन, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, ग्रामस्थ, शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा दिला .
अपघातग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याच्या परिभाषेत बसणारे हे अभूतपूर्व संकट असल्यामुळे शासन त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करील अशी ग्वाही दिली. नदीकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी असे निर्देश याप्रसंगी दिले आहेत.

ग्राम सवाद संघटणेची वणी विधानसभा आमदार मा.संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्या मार्फत ऊर्जा मंत्री मा.नितिनजी राऊत यांणा दिले निवेदन.

0

 

उषा पानसरे
कार्ययकारी    संपादिका
मो.9921400542

मारेगाव :- स्ट्रीट लाईट बिल हे ग्रामपंचायत ने न
भरता हे पूर्वी प्रमाणे प्रशासनानेच भरावे असे मारेगाव तालुक्यातील ग्राम संवाद सरपंच संघटना यांची मागणी आज रोज मंगळवार दि.२८/९/ २०२१ मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार साहेब यांच्या मार्फत महारस्ट्राचे ऊर्जा मंत्री मा.नितीनजी राऊत साहेब यांना निवेदन देऊन सार्वजनिक स्ट्रीट लाईट बिल हे पूर्वी प्रमाणे प्रशासनाने भरावे असी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटना मारेगावच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट तालुका सचिव सुरेश लांडे तालुका उपाध्यक्ष यादवराव पांडे सरचिटणीस पांडुरंग नन्नवरे कोषाध्यक्ष जगदीश ठेंगणे सरचिटणीस प्रवीण नाणे विनोद आत्राम रामचंद्र जवदे रविराज चंदणखेडे जनार्धन गाडगे पप्पू विखणकर दिलीप आत्राम गजानन ठाकरे सौ. नीलिमा थेरे प्रेमिला आदेवार सुरेखा चिकराम वैशाली परचाके व आदी सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

बेनोडा ता. आर्वी येथील पोलीस पाटील यांच्या गैरवर्तणुकीमुळे होत असलेल्या वारंवार तक्रारीवर न्याय मिळत नसून आनंद वंजारी (माजी सरपंच) यांनी थेट राज्यपाल यांना एक पत्राद्वारे केली न्यायाची मागणी.अन्यथा आत्मदहणाची परवानगी द्या?

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

मिळालेल्या माहितीनुसार दि.४/५/२०२१ पासून बेनोडा गावातील पोलीस पाटील गावामध्ये गैरवर्तणुक ,गावामध्ये झगडे लावणे , गावातील शांतता बिघडविणे, व गावामध्ये दहशत करणे,गावामध्ये अवैध धंदयांना प्रोत्साहन देणे व इतर काही भ्रष्टाचाराचे प्रकार घडवीत असल्याबाबत आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने व अर्ज देत आलो. परंतु या आमच्या प्रकरणामध्ये कोणतीही दखल घेण्यात आली नाही, तसेच बेनोडा या गावचे पोलीस पाटील हे पद रिक्त करण्यात आले नाही. आनंद वंजारी (माजी सरपंच) तसेच गावातील अनेक ३० ते ४० नागरिकांनी पोलीस पाटील यांच्या होत असलेली गैरवर्तणुक,दबाव तंत्राचा वापर करणे, गावातील शांतता भंग करणे. इत्यादी सर्व बाबतीत तक्रारी केल्या आहेत.
यावर सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आणि सामान्य सामान्य माणसाचे जगणे मिश्किल झाले असून या पोलीस पाटील पासून गावातील लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.
करिता या प्रकरणाबाबत वाचा फोडावी, व बोनोडा गावातील जनतेला न्याय मिळवून द्यावा.
न्याय न मिळाल्यास आनंद वंजारी (माजी सरपंच) यांनी संबंधित प्रशासनाकडे मागितली आत्मदहनाची परवानगी.

आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी निलंगा ते झरे गावाकडे 320Km चा सायकळीवरून केला ध्येयवेडा प्रवास

0

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा येथील राहत असलेला संदीप दगडोजी वजीर याने आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी 08. 00 वाजता निलंगा ते झरे शासकीय विश्राम ग्राहकडे निघाला असता त्या दरम्यान संदीपला त्यांच्या गावातील नागरिकांनी त्यांचा प्रवास सुखाचा अशा शुभेच्छा दिल्या तसेच आ. पडळकर साहेबांनी त्यांना फोन करून विचार पुंस केली आणि काही अडचण आल्यास फोन करण्यास सांगितले अशा प्रकारे सायकलीवरून केला ध्येयवेडा प्रवास