Home Blog Page 396

घानिचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी मनसेचे उपोषण सुरू पहिल्या दिवशी विविध संघटना सह नागरिकांचा पाठिंबा

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

नांदुरा शहरातील शिवाजी नगर व आठवडी बाजार ते सिंधी काँलनी रोड वरिल घानिचे साम्राज्य येत्या नवरात्र उसव आगोदर साफ सफाई करून प्रश्न मार्गी लावावा करिता न. प.नांदुरा ला वारंवार निवेदन देऊन हि कोनतिच कार्यवाहि नाही शेवटी आज.दि.१आँकटोबर पासुन आमरन उपोषनास सुरवात करण्यात आली आहे आज पहिल्या दिवशी आज विविध संघटना व शहरातील नागरिक आपले अभिप्राय देउन पाठिंबा देत आहेत जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही त तो पर्यंत उठनार नाही असा ठाम अजेंडा मनसे सैनिकांनी घेतला आहे

ज्ञानदीप विद्या निकेतन च्या दोन विद्यार्थ्यांची नवोदयकरीता निवड.

0

 

ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथिल विद्यार्थिनी कु. जानवी संतोष माथनकर हिची वर्ग ६ वी करीता नवोदय विद्यालय सेलू (काटे) येथे निवड झाली. त्याचप्रमाणे ज्ञानदीप विद्या निकेतन, वाघोली येथिल विद्यार्थी लेखराज नरेंद्र पर्बत याची सुद्धा वर्ग ६ वी करीता नवोदय विद्यालयात निवड करण्यात आली. नवोदय विद्यालयात निवड होण्याची ही सलग दुसरे वर्ष आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन संस्थापक सचिव श्री गिरधर बाबू राठी, अध्यक्षा अर्पणा राठी, मुख्याध्यापिका मिनाती बस्तीया यांनी केले. त्याचप्रमाणे संपुर्ण शिक्षकवृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन ज्ञानदीप विद्या निकेतन ची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे चा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी शाल व श्रीफळ देऊन केले सत्कार.

0

 

हिंगणघाट:-०३ ऑक्टोंबर २०२१
आपल्या हिंगणघाट शहरातील संकेत वाघे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर २६६ वा क्रमांक मिळवून उज्वल यश मिळविले त्याबद्दल माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी त्यांचे निवासस्थानी भेट देऊन संकेत वाघे यांस शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संकेत वाघे या युवकाने आपल्या हिंगणघाट शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याने ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दिल्या.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

प्रादेशिक वनपरिक्षेत्र परतवाडा वनक्षेत्र मधील वृक्ष ची तस्करी थांबवा.!

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादिका मो. 9921400542

मनसेचे प्रितेश अवघड यांनी दिले वनरक्षक श्री बाला यांना निवेदन..

वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप भड यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..

मुक्तागिरी स्थित जंगलात सागवान वृक्षांची दिवसा तस्करी…

अचलपूर:-.. प्रादेशिक वनपरिक्षेत्र परतवाडा अधिनस्त येत असलेल्या मुक्तागिरी हद्द प्रारंभ स्थित असलेल्या वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे याचे छायाचित्र लावलेले निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्या नेतृत्वात उपवनसंरक्षक श्री बाला यांना देण्यात आले. तसेच, वनपरिक्षेत्र कार्यालय अधिनस्त येत असलेल्या सर्व वनक्षेत्रातील वृक्ष तस्करी ची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप भड यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी असेही निवेदनात नमूद आहे..
खरपी ते मुक्तागिरी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वनक्षेत्रा मधील करोडो रूपये किमती सागवान वृक्षाची झाडे चोरी गेल्याचे पुराव्यावरून उपवनसंरक्षक यांनी प्रत्यक्ष स्थळी गेल्यावर त्यांच्या निदर्शनास येईल.मुक्तागिरी पर्यटन क्षेत्राकडे जाण्या-येण्यासाठी हाच मुख्य मार्ग असून, मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असतानासुद्धा दिवसा ढवळ्या चोरी होते कशी? याबाबत वृक्षप्रेमी नीही काळजी व्यक्त केली आहे. तसेच, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.प्रदीप भड यांच्या कार्यप्रणालीवर देखी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.श्री भड यांच्या कार्यक्षेत्रात दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यासह इतर असलेल्या भागातील क्षेत्रांमध्येही वृक्षतोडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जोर धरत आहे…
________________________
“आर एफ ओ म्हणतात, हि व्यापारी चोरी नाही”..
मुक्तागिरी स्थित वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा कार्यालयाच्या जंगलामधील वृक्ष चोरीबाबत श्री.भड यांना विचारले असता, “ही वृक्ष चोरी व्यापारी चोरी नाही” ती स्थानिक आदिवासींची असेल. असे मत व्यक्त केले. असे प्रितेश अवघड हयांचे म्हणने आहे यावरून हे तर सिद्ध होते कि, चोरी रोखण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय असमर्थ ठरत असल्यामुळे ते स्थानिक आदिवासींकडे बोट दाखवत असावे असाही अवघड ह्यांचा आरोप आहे
____________________________

“शहरात कोरोना, जंगलात वृक्ष चोरोना”

गेली दोन वर्षात काही महिने सोडले की संपूर्ण परतवाडासह इतरही तालुक्यात लाॅकडाऊन मुळे लोक बाहेर पडू शकली नाही. पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या प्रकारे कोरोनाने शहरात तांडव घातला होता. त्याचप्रमाणे वृक्ष तस्करांनी जंगलात तांडव घातला असावा असे चोरी झालेल्या शेकडो वृक्षाच्या बुंद्यापासून स्पष्ट होऊ शकते…
____________________________

मुख्य वनसरक्षक प्रादेशिक ज्योती बॅनर्जी यांच्या पुढे वनपरिक्षेत्र कार्यालयाची कैफियत मांडू__ प्रितेश अवघड. जिल्हा उपाध्यक्ष, मनसे …
उपवनसरक्षक श्री बाला यांना रीतसर तक्रार देण्यात आली होती पण त्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्याने वन अधिकारी वनांबद्दल किती संवेदनशील आहे यावरून दिसून येते. त्यामुळे प्रादेशिक वनपरिक्षेत्र परतवाडा मधील अनेक उणिवा त्याच्यापुढे मांडून कारवाई कार्यवाही करण्याची मागणी करू असे मत जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांनी व्यक्त केले..

यावल शहरात अविवाहीतीत तरूणीची आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील फालक नगरमध्ये राहणाऱ्या एका तरूणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , या घटनेची पोलीसात नोंद करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की पुजा भैरवलाल प्रजापती वय१९ वर्ष राहणार फालक नगर, स्वामी समर्थ केन्द्राच्या बाजुस यावल शहर , मुळ राहणार सेतवाणा जिल्हा चित्तोडगड (राजस्थान ) हिने दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरात छ्ताच्या लोखंडी पाईपास दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन, याबाबत मुलीचे वडील भैरवलाल बगदीराम प्रजापती यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास पोलीस अमलदार नेताजी वंजारी हे करीत आहे. मुलीचे वडील भैरवलाल प्रजापती हे मागील २०ते २२वर्षापासुन यावल येथे भेलपुरी विक्रीच्या व्यवसायाकरीता आले असता ते यावल येथे स्थायीक झाले असुन , सदरच्या या अविवाहीत तरूणीने आत्महत्या का केली हे मात्र समजु शकले नाही . मयत तरूणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिडके यांनी केले असुन , प्रजापती कुटुंबाने मयत मुलीस अत्यंसंस्कारासाठी आपल्या मुळगावी राजस्थानातील सैतवाणा येते घेवुन घेले आहेत

गिरडगाव ते चुंचाळे फाटा व शिरसाड ते पिळोदे रस्ता या सहा कोटी रुपये निधी कामांचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या हस्ते शुभारंभ

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील शिरसाङ ते पिळोदा रस्ता व गेल्या अनेक दिवसांपासुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अत्यंत खराब झालेल्या रस्ता बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील गिरडगाव ते चुंचाळे फाटा रस्त्याच्या कामाचे शुभारंभ आज रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख विलास पारकर, चोपडा विधानसभेच्या आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थित करण्यात आले . आज दिनांक ३ ऑक्टोबर आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामांचे आज रोजी चोपडा विधानसभा क्षेत्रातील शिरसाड ते पिळोदे गावापर्यंत सुमारे तिन किलो रस्ता मजबुतीकरण खर्च १ कोटी५० लाख रुपये आणी बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव ते चुंचाळे गाव फाटया पर्यंतच्या पाच किलोमिटर पर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण खर्च पाच कोटी रुपये या कामांचे शुभारंभ रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख विलास पारकर, चोपडा यावल विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार प्रा . चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थित संपन्न झाले . याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील ( मुन्नाभाऊ ) तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, गोटू सोनवणे , पिळोदा गावाचे सरपंच मनोहर पाटील , माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला , गोटू साळुंखे कोरपावली सरपंच विलास अडकमोल , संतोष खर्चे , स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी शरद कोळी , महेन्द्र चौधरी , गोकुळ कोळी , संतोष महाजन , योगेश कोळी , प्रकाश कोळी , अनिल कोळी , चंद्रशेखर साळुंके , उदयभान पाटील , धनराज पाटील यांच्यासह विविध गावातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते .

जनावर चोरी प्रकरणात हिंगणघाट डीबी पथकाने 4 आरोपीला अटक करून 731000 रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

0

 

शहरातील पशुधन पालकांची पाळीव जनावरांच्या चोरी प्रकरणात अलीकडे वाढ झाली असून अनेक पशुपालकांनी बकऱ्या व गुरांची चोरी झाल्याच्या तक्रारी हिंगणघाट पोलिसांत केल्या आहे.
सदर चोरी प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना पशुधन चोरी करणारी टोळी हाती लागली असून या टोळीतील चार गुन्हेगारांसह 7 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांत शहरातील
संत कबीर वार्ड, गोमाजी वार्ड,इंदिरा गांधी वार्ड येथून विविध ठिकाणावरून फिर्यादी तसेच इतर पशुपालकांची 12 जनावरे चोरून नेल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. 879/2021 कलम 379, 380 अ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला होता.
सदर प्रकरणी शहरात तसेच परिसरात शोध घेऊन संशयित आरोपी बबलु उर्फ शुभम मनोहर फुलझेले. वय 28 व रा
बडवाईक वस्तीगृहामागे, रामबाग, नागपूर, प्रतिक राजु पंचभाई, वय 19 वर्ष, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट, वैभव किसनाजी लेदे, वय 21 वर्ष, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट तसेच वैभव कालीदास खुडसंगे. वय 21वर्ष रा.चांदीमारी
चौक, तुकूम, चंद्रपूर यांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली, पोलिसांच्या दंडुकयाचा धाक दाखविताच आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी आरोपींकडुन गुन्हा करण्याकरीता वापरलेली महेन्द्र स्कार्पियो मोटरगाड़ी क्र. एमएच-34/ए-1186, मारोती
स्वीफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच-04/जीडी-8221 तसेच आरोपिंचे चार मोबाईल असा एकुण 7लाख 31 हजार रूपये
किमतीचा माल जप्त करण्यात आला.
सर्व आरोपीना पोलीस कोठडी दिली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सोमेश्वर टापरे हे करीत आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, ,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोलंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे,बाबु मुंडे,डीबी पथकाचे शेखर डोंगरे,नापोशी निलेश तेलरांधे,सचिन घेवन्दे,विशालबंगाले,सचिन भालशंकर,पोशी विजय हरनूर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

सुनगांव येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आले स्वच्छता अभियान…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला असे लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाली. सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामपंचायत सुनगाव तर्फे गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावामधून किराणा दुकान जनरल स्टोअर मेडिकल कृषी केंद्र या ठिकाणी जमा झालेला प्लास्टिकचा कचरा गोळा करीत तसेच गावातील मेन रस्ता झाडून व त्यावरील कचरा गोळा करून गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले हे अभियान राबविताना गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. अभियान राबविताना जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, मंडळ अधिकारी चोपडे, तलाठी केदार,तलाठी वाघ, ग्रामसेवक देवरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई, बळीराम धुळे, संतोष वंडाळे,सौ.कुरवाडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत कपले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,परिक्षित ठाकरे,काटोले,अशोक काळपांडे,समाधान काळपांडे,मोहनसिंह राजपुत, प्रविण धर्मे,विजय भड,उमेश कुरवाडे, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, यांच्यासह जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

महागाव येथील पुल समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष,तालुक्काध्यक्षासहीत १४ ग्रामस्थ बसले शेगाव तहसिल समोर आमरण उपोषणाला.

0

 

शेगाव तालुक्यातील मौजे महागाव येथील बोर्डी नदीवर त्वरीत पुलाची निर्मीती व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे,ता.अध्यक्ष दादाराव अंभोरे यांचेसह चौदा गावकरी म.गांधी जयंती पासुन शेगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.दरम्यान शेतकरी संघटनेचे प्रशात डीक्कर, आ.संजय कुटे यांचे शिष्टमंडळ,तसेच जि.प बांधकाम विभागाचे अभियंता बुरुजे साहेब,गुळदे साहेब यांनी भेटी दील्या.
शेगाव तालुक्यातील जवळा या गावालगत ‘महागाव’ हे एक लहानसे खेडेगाव असुन या गावची लोकसंख्या साडेचारशे-ते पाचशे च्या आसपास आहे. स्वातंत्र्यानंतरही हे खेडे मुलभुत सुविधांपासुन वंचित असुन आतापर्यंत या गावाला साधा पुल सुद्धा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ अनेक सोयी सुविधापासुन वंचित आहे. दरम्यान नदीतील पुराच्या पाण्यातुन उमेश महादेव डाबेराव हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी जिवनावश्यक वस्तुची पोतडी डोक्यावरुन वाहुन नेत असतांना पाय घसरुन अपघात झाला.नागपुर येथे उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यु होऊन सदर व्यक्तीचे घरातील सदस्य उघड्यावर पडले आहेत. ही गंभीर बाब सोबतच अनेक समस्यांचा पाढा गावकर्‍यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे,ता.अध्यक्ष दादाराव अंभोरे यांचे समोर वाचला असता. चौकशे यांनी शेगाव तहसिल कार्यालयात पंधरा वीस दिवसापुर्वी पुल प्रश्न मार्गी लावावा यासाठी निवेदन सादर करुन.शासनाकडून योग्य पावले न उचलल्यास गांधी जयंतीपासुन आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता.शासनाला दिलेल्या निवेदनाप्रमाने जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे,ता.अध्यक्ष दादाराव भोजने,विशाल गोविंदा सावदेकर,रविंद्र समाधान वासनकार,सागर बाबुराव डोंगरे, धम्मपाल भास्कर सावदेकर,अरविंद साहेबराव सावदेर,गजानन गणेश बहिर,दिपक केशव सावदेकर,योगेश गजानन कोल्हे,राहुल भिमराव सावदेकर,सचिन गजानन सावदेकर,राजु बाबुराव डोंगरे,केवलसिंग धनसिंग पवार नागोराव अशोक सावदेकर बळीराम सुगदेव कोल्हे.हे आमरण उपोषणाला बसले आहेत. या वेळी वंचितचे जेष्ठ नेते रामकृष्ण रजाने, शरद वसतकार,जिल्हा महासचिव अॅड. अनिल ईखारे,जिल्हा महीलाध्यक्षा विशाखा सावंग,जि.उपाध्यक्ष चंद्रभान कळंबे, जि.उपाध्यक्ष मनोहर सनगाळे मामा, जळगाव जा. तालुक्का अध्यक्ष संतोष गवई सर,मोहन पाटील,प्रकाश गवई,कैलाश दाभाडे, ता.महासचिव शिवाजी गुरव,प्रमोद भारती, समाधान खंडेराव, नगरसेविका प्रितीताई शेगोकार, तालुक्काध्यक्षा मनोरमा सावदेकर शहराध्यक्षा संगीता ससाने ,उदय सुरवाडे ता. प्रसिद्धी प्रमुख पंडीत परघरमोर यांचेसह शेकडो महिला पुरुष ग्रामस्थासह वंचित बहुजन आघाडीच्या असंख्यकांची उपस्थीती होती.

अर्थसत्तेचे ‘लक्ष्य’ गाठण्यासाठीच म.से.सं.ने स्थापन केली ‘जिजाऊ बँक’!

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक .
मो.9921400542

अमरावती : ‘जिजाऊ बँक’ ही केवळ मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आली असून, सर्वसामान्य व मुख्य सामाजिक प्रवाहाबाहेरील घटकांना अर्थसत्तेत आपले स्थान निश्चित करण्याचे त्यामागील उद्दिष्ट आहे; असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे महासचिव इंजि.मधुकर मेहकरे यांनी केले. मराठा सेवा संघाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

गुरुवारी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांची आढावा बैठक जिजाऊ प्रतिष्ठान, मराठा नगरी, रहाटगाव येथील इंजि.सचिन चौधरी सभागृहात संपन्न झाली. यावेळी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षप्रमुखांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे यांनी संवाद साधला. यावेळी संघटनेच्या मागील दोन वर्षांचा आढावा मांडण्यात आला. याप्रसंगी मेहकरे यांनी प्रामुख्याने जिजाऊ बँकेच्या कामकाजासंबंधी सूचना केल्या. ते म्हणाले, की पुरुषोत्तम खेडेकर यांनी पुढाकार घेऊन ‘जिजाऊ बँक’ स्थापन केली. सर्वसामान्य बहुजनांना अर्थसत्तेकडे नेण्याचा त्यामागील एकमेव उद्देश आहे. त्यामुळे बँकेचा कारभार सुरळीत व व्यवस्थित चालावा, अशा सूचना जिजाऊ बँकेच्या संचालकांना त्यांनी यावेळी दिल्या. आढावा बैठकीला मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष इंजि.अरविंद गावंडे, मराठा उद्योजक कक्षाचे राज्याचे सचिव शिवाजीराव झोंबाडे, जिजाऊ ब्रिगेड चे राज्य पदाधिकारी कीर्ती माला चौधरी , सीमा ताई बोके जिल्हा अध्यक्ष, मनाली तायडे .मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, जिल्हा सचिव संजय ठाकरे, जिल्हा प्रवक्ता चंद्रकांत मोहिते, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भोजराज चौधरी, शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शुभम शेरकर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे डॉ.तुषार देशमुख, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.