Home Blog Page 401

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा वाचवला जीव

0

 

उषा पानसरे ,मूख्य कार्यकारी संपादक

सातारा, कराड : पुणे-बंगलोर नॅशनल हायवे (एन. एच. ४) कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत गुजरातमधील आनंद जिल्हा पोलीस गाडीचा मोठा अपघात झाला ही बातमी समजताच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीस गाडीत अडकलेल्या सहा पोलिसांना स्वतःचे ट्रॅक्टर आणून बेल्टच्या सहाय्याने बाहेर काढले व अँब्युलन्समध्ये बसवून त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर पोलीस गाडी गुजरातहून हुबळीकडे जात असतांना चुकून बाजूच्या डिवायडरला आदळल्याने पोलीस गाडीचा मोठा अपघात झाला आहे. सदर पोलीस गाडीत एकूण सहा पोलीस कर्मचारी होते. सर्वजन जखमी असून पोलीस चालकाच्या पायाला जबर मार लागला असल्याने दोन्ही पाय निकामी झाल्याचे बोलले जात आहे. या पोलीस बांधवांना रुग्णालयात दाखल करून जीवदान दिल्याबद्दल पोलीस बांधावानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. या उत्कृष्ट कार्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, श्रीकांत चौधरी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रविण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, कार्याध्यक्ष रणजीत मोरे, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, संघटक श्रीनिवास माने, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदू पगार, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी महेश जाधव यांचे कौतुक केले आहे.

समाज मागासलेपणावर आधारीत शिक्षण , नोकरी व राजकीय क्षेत्रात ओबीसी समाजाला सन्मान संधी मिळावी : लोकनेत्या प्रतिभाताई शिंदे

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

या देशात सर्व वर्गाना त्यांचा शैक्षणीक , आर्थिक व सामाजीक मागासलेपणावर आधारीत त्यांना शिक्षण, नोकरी व राजकीय क्षेत्रात समान संधी मिळाली पाहीजे यासाठी आरक्षण देण्याची गरज आहे . म्हणुन आपल्याला या सर्व क्षेत्रामध्ये ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे मात्र याबाबत सातत्याने आपल्यावर अन्याय करण्यात आले आहे .आपल्या देशामध्ये १९३३नंतर कुठलीही जातीनिहाय जनगणना आज पर्यंत करण्यात आलेले नाही मंडल आयोगाने या१९३३च्या जनगणनेनुसार आपले ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण ५२ % टक्के पकडण्यात आले यात ओबीसीचे आरक्षण हे २७ % टक्के आणी हा अन्याय करून ही ओबीसी समाजाचे हे आरक्षण कसे कमी करता येईल याबाबत दोन टक्के जाती असलेल्या समाजाकडुन करण्यात येत आहे अशी माहीती लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी यावल येथे संपन्न झालेल्या ओबीसी आरक्षण हक्क परिषदच्या वतीने आढावा बैठकीत दिली . यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सायंकाळी ५ , ३० वाजता संपन्न झालेल्या ओबीसी आरक्षण हक्क परिषदच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संजय पवार , मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक करीम सालार, अखिल भारतीय लेवा महासंघाचे अध्यक्ष विष्णु भंगाळे , सामाजीक कार्यकर्ते एजाज मलीक , आदीवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम .बी .तडवी सर , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर , युवक राष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील, प्रशांत लिलाधर चौधरी, अमोल दुसाने , नरेन्द्र भागवत पाटील , मोहन एकनाथ सपकाळे, भागवत आस्वार आदी ओबीसी समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी जळगाव येथील छ्त्रपती संभाजीराजे नाटय गृहात आयोजीत ओबीसी आरक्षण हक्क परिषद या कार्यक्रमासाठी ओबीसीचे जेष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ना . छगनराव भुजबळ , पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील , ऑल इंडीया मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी , आमदार कपील पाटील यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार असुन समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकनेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना केले. याप्रसंगी एम बी तडवी यांनी ही आपले विचार मांडले .

यावल येथे २४ सप्टेंबर रोजी नुतन उपनगराध्यक्ष करीता नगर परिषदची ऑनलाईन विशेष सभाचे आयोजन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी २४ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजेला येथील तहसीलदार महेश पवार यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीसाठीच्या ऑनलाईन विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावल येथील नगर परिषदच्या तत्कालीन उपनगराध्यक्षा सौ . देवयानी गिरीश महाजन यांनी त्यांचे पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड होत आहे.
येथील नगर पारिषदचच्या उपनगराध्यक्ष पदासाठी २४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या निवडीचा कार्यक्रम असा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे ्‍यानंतर अर्जांची छाननी दुपारी १२, ३oते १२ , ४५या अर्धा तासात अर्जाची माघार घेणे यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेणे असल्याच्या सुचनांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे पत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान नगरपरिषदच्या उर्वरीत उपनगराध्यक्षपदाच्या कालावधी करीता नगरसेवक अभीमन्यू विश्वनाथ चौधरी ( हेन्द्री ) यांचे नांव निश्चीत मानले जात आहे .

जनतेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पशुवैद्यकीय विभाग

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोबती असलेले पशुधन विविध रोगाने आजरावर आणी उपचार करणारे पशुधन विकास अधिकारी वाऱ्यावर अशी अवस्था शेळीपालन करणारे आणी शेतकऱ्यांची झाली असल्याने जनतेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पशुवैद्यकीय विभाग बऱ्याच दिवसापासून या विभागाच्या खूप तक्रारी होत्या त्याबाबत दिनांक २१ / ९ / २०२१ रोजी पार पडलेल्या यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत या बाबत पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी तक्रार करून पशुधनाशी संबंधीत विभागास चांगलेच धारेवर धरले , त्यानंतर यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांनी उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या प्रमुख उपास्थित तात्काळ पशुधनशी निगडीत असलेल्या सर्व पशुधन विकास अधिकारी यांची स्वतंत्र बैठक काल दि. २२ / ९ / २०२१ रोजी बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीत डॉ एस एन बढे , न्हावी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ एम सी पाटील, फैजपुरचे पशुधन विकास अधिकारी डॉ एन डी इंगळे , डांभुणीचे पशुधन विकास अधिकारी डॉ एम पी पाटील , यावलचे पशुधन विकास अधिकारी डॉ .आर सी भगुरे यांच्यासह नायगावचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ सि एस पाटील , हिंगोणा येथील . सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ . एन एम पाटील , डोंगर कठोऱ्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ .यु एन पवार , साकळीचे सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ . युवराज पाटील , आमोदा येथील सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ . श्रीमती ज्योती पाटील, यावलचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ आर पी ढाके व भालोद येथील सहाय्याक पशुधन विकास अधिकारी डॉ व्ही बी पाटील आदी वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते .यांनी संपूर्ण तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांची मिटिंग आयोजित केली त्या वेळी गटनेते शेखर पाटील आणी उपसभापती योगेश भंगाळे व गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील उपस्थित राहून पशुधन संदर्भातील नागरीकांच्या तक्रारींचा पाढाच वाचला सर्वांसमोर झालेल्या या तक्रारी मध्ये सुधारणा झाली नाही तर मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकजआशिया यांच्या समक्ष तक्रार करणार शेतकरी नागरीकांना घेऊन जाऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या , त्याचा परिणाम म्हणुन आज सकाळ पासुन जाणवत असुन , अचानकपणे जे पशुधन विकास अधिकारी नागरीकांना महीनो महीने दिसत न होते ते आता पशु चिकित्सालयावर दिसु लागले आहे .याच पार्श्वभूमीवर आज यावल येथे गटनेते शेखर पाटील यांनी अचानक यावल येथील पशुचिकीत्साल्यात भेट देवुन येथील पशुवैद्यकीय असता त्या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ आर सी भगूरे हजर होते काल झालेल्या बैठकीचा हा परिणाम असुन, सद्या शेतकामांचे दिवस असुन , पशुधनावर मोठया प्रमाणावर लाडी खुरपत व गोचळयांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने शेतकरी वेळेवर जनावरांचे उपचार होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. काल झालेल्या बैठकीत गटनेते शेखर पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी पशुधन अधिकाऱ्यांविषयी तक्रार केल्याने गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरल्पाने आज बदल झाल्याचे दिसुन आलं व पशुधनचिकीत्सालय उघडल्याचे व त्या ठीकाणी पशुधन डॉ हजर असल्याचे दिसत होते .

कलोडे चौकात एका व्यक्तीला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न

0

 

हिंगणघाट दि.22 सप्टेंबर रात्री 9.30 दरम्यान एक अनोळखी व्यक्ती दारू पिऊन डोलत जात असताना अपघात नाही झाला पाहिजे म्हणून दोन व्यक्तींनी त्याला रोडच्या बाजूला नेऊन ठेवले असता तो झोपी गेला, या संधीचा फायदा घेत आरोपी राजीव उर्फ मिरची दुरबुडे राहणार कलोडे चौक हिंगणघाट याने या व्यक्तीचे खिशे तपाले असता त्याला त्याच्या खिशात काही रुपये दिसले नाही. त्याच वेळी त्या व्यक्तीला जागा आला व शिवीगाळ केली त्यामुळे आरोपी राजीव उर्फ मिरची याने दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला असे आरोपी ने सांगितले सदर प्रकरणात आरोपी वर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

महीलांना अस्मितेला सूरक्षा कवच मिळणार का? की नराधमांना मोकाट रान?

0

 

उषा पानसरे जि. प्रतिनीधी

महीलांन्या अस्मितेला तडा जानारी घटना दृष्टीक्षेपास पडले या घटनेच्या वेध घेतला असता । खरच आपण माणूस नावाच्या संवेदनशील प्राण्यांच्या जगात वावरतो का? हा प्रश्र मनाला पोरखून टाकतो या घटने च्या मागोवा घेतल्सास शाशन व न्यायमंडळ यातील अस्थिरता अशा घटना दरोरज घडत ते स्पष्ट होतो !या घटने च्या बळी पडलेल्या महीलांना न्याय मिळण्यास कित्येक वर्षाची प्रतिक्षा करावी लागतो ! ही सर्वात मोठी दुदैवी बाब आहे याला जर एवढ्या कालावधी लागत असतील’ तर हा न्याय म्हणता येईल का ? यावर गंभिरर्याने विचार करणे खूप गरजेचे आहे! कारण एवढा वेळ लागत असतील तर नरमाधमांच मनोबल उंचावेल आणी यावर अंकूश लावणे ! जरूरी आहे ज्यामूळे अशा घटनेचा वाढ होवून आणखी कित्येक महीलेचा बळी जाईल ? ही शक्यता नाकारता येणार नाही! संपूर्ण भारताला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बल्लाकारीची पूनरावूत्ती संपूर्ण भारताना हादरुवुन टाकले सांस्कृतिक राजधानी पुणेला, पूणे तिथे काय उणे अस म्हटले जातो खरच का? पुण्यात काहीच उणे नाही ! पूण्यातील गेल्या काही दिवसात घडलेल्या बल्लाकाराचे घटना घडत आहे ज्या पूणेला विधेचे माहेर घर म्हटल्या जातो! पूणेच्या संस्कृतीचे गोडवे गायिले जाते त्या पूण्यात सूध्दा अशा घटना घडल्या ! पुण्याचा वैभव शाली इतिहास काळीमा फासणार यात काहीच शंका नाही ? रेल्वे स्टेशनवर 14 वर्षीय मूलीवर रेल्वे कर्मचारी दोन अकरा रिक्षा चालक?आमडापूर ,मूबई तील साकीरनाका ! प्रत्येक जिल्हात तालूक्यात गावो गावी घटना ऐकाला मिळतो ? अशा विकृती नराधम जर मोकाट सूटले तर अनेक महीलाचे जिवन उध्वस्तं व्हायला वेळ लागणार नाही ? या वर सर्वानी विचार करायला पाहीजे ना!
या ही व्यतिरित्त चाकू हल्ला , अँसिड हल्ला , जिवत पणे पेटविणे, गळ फास देणे अशा प्रकारे अनेक महीलेला आपला जिव गमवावा लागत आहे!म्हणून विचाराधीन ठेवून महीलेच्या सूरक्षेच्या दृष्टीने कडक कठोर कायदे करून दोषीना वेळीच शिक्षा देणे क्रम प्राप्तझाले पाहीजे अन्यथा देशातील महीलेच भविष्य धोक्यात येईल हे निविंवाद संत्य नकारता येत नाही ?
लेखिका
उषा पानसरे पत्रकार

शेगाव वाशी यांनी केले रस्त्यातील खड्डे चे स्वागत

0

 

शेगाव अर्जुन कराळे

मागील पंधरा ते वीस दिवसापासून शेगाव शहरातील एम एस सी बी चौक येथे एक मोठा भयंकर स्वरूपाचा खड्डा पडला आहे परंतु संबंधित बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे त्या अनुषंगाने आज 23 सप्टेंबर रोजी शेगाव शहरातील नागरिकांनी त्याचे पूजन करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला व शासनाला अल्टीमेटम देत सांगले की येत्या 48 तासात या खड्ड्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे सामाजिक बांधकाम विभाग यांच्याविरोधात आंदोलन करू

मुळ मुद्यावरुन लक्ष विचलीत करण्याचा भाजपाचा प्रयत्न – निलेश घोंगे

0

 

शेगांव नगर पालिकेची सत्ता चालवितांना तिथे आपल्याच हातात सत्ता कायम राहील या भ्रमात ही मंडळी वावरत असुन स्वतःच निर्माण केलेल्या खोटारडेपणात अडकुन आता शहर वासियांना सत्यपरिस्थिती दिसत असल्याने निवडणुक समोर असल्याने हे राज्यकर्ते कांगावा करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करुन प्रहारची मुस्कटदाबी करण्याचा केवीलवाना प्रयत्न निंदणीय असुन महीलांच्या नावाने राजकारण करुन या मंडळींनी सलग पाच वर्षे केलेला भ्रष्ट कारभाराला ही मंडळी लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा आता जनतेच्या न्यायालयातच फ ाडु हे न.प. सत्ताधार्‍यांनी लक्षात ठेवावे. महीलांच्या सन्मानाचे संस्कार प्रहारचे सर्वेसर्वा ना. बच्चुभाऊ कडू यांचेकडूनच मिळालेले आहेत. भ्रष्टाचाराची सोय व्हावी म्हणून गणरायाच्या नावाने न.प. सत्ताधार्‍यांनी मनमानी करावी, गणेशभक्तांच्या भावना दुखवाव्यात, विकासाच्या नावाने वार्डा वार्डात वितृष्ट निर्माण करावे, सुलभ शौचालयातील पालीकेचे उत्पन्न वाढविणारे दुकान संकूल हेतुपुरस्पर स्थगीत करावे, तर आपल्यांची मर्जी संपादीत करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण हयात भाजप मध्ये घालविली ते स्व. गजाननभाऊ पोटदुखे यांच्याच कुटूंबीयांचा विरोध असतांनाही तेथील काम सुरु ठेवण्यासाठी हट्ट धरावा, इंदीरा नगरातील बुध्द विहाराच्या संरक्षण भिंतीचे काम चतुराई करून बंद पाडावे यासाठी खटाटोप करावा, निविदेतील मलीदा लाटण्यासाठी नियमांची एैशीतैशी करावी, डोळे बंद करून दुध पिणार्‍या मांजरीला कोणी बघत नाही असे वाटत आहे तर पाच वर्षातील पालीकेचा गैरकारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत फ सला आहे, पालीकेचे अधिकारी न.प. सत्ताधार्‍यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे.

विकास आराखड्याच्या नावावर गरीबांना विस्थापीत करावे व घरकुलाच्या यादीत आपल्याच लोकांना पंगतीत बसवायचे. यामुळे पालीकेला व्यवसायीक धंद्याचे दुकान बनवून सत्ताधारी या नंतर जनतेला उल्लू बनवू शकणार नाही. भाजपाच्या दिव्याखाली अंधार आहे, त्यामुळे भाजपाने झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवावी अन्यथा भाजपाच्या पालीकेतील भ्रष्टाचाराची लख्तरे चव्हाट्यावर आणल्या शिवाय प्रहार गप्प बसणार नाही. महीलांचा सन्मान आज भाजपाला आठवला आहे, परंतु पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या नावाची कमान कुतसीत राजकारणांमुळे तिन वर्षे भाजपाने प्रलंबीत ठवेली नसती याची त्यांनी जाण ठेवावी. प्रहारने आंदोलन करतांना तिथे हजर नसतांनाही गुन्हे दाखल केले, परंतु भाजपाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये 100-150 पेक्षाही जास्त कायकर्ते असुनही त्यात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री अनिल गोपाळ यांना दिसू शकले नाही, त्यामुळे गलथानपणाचा हा गोपाळकाला प्रहार जनतेसमोर आणल्या शिवाय राहणार नाही.

 

शेख हमीद शेख वाहेद यांचाआपले सरकार सेतू केंद्र रद्द झाल्याने अपंग सागर तसरे दि. १५ बुधवार पासूनचे आमरण उपोषण समाप्त ……..

0

 

अमरावती – उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादिका

अमरावती जिल्हातील वलगाव येथील आपले सरकार सेतू केंद्र अपंग / महिला बचत गटास देण्याकरिता जिल्हाधिकारी अमरावती मार्फत जाहिरात निघाली होती. परंतु जाहिरातीतील शर्थी व अटीत अपात्र तसेच बनावटी कागदपत्रे बनविण्याऱ्या शेख हमीद शेख वाहेद यास आर्थिक देवाणघेवाणीतून आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आल्याने वलगाव येथील पात्र उमेदवार अपंग सागर संजय तसरे दि. १५ बुधवार पासून पब्लिक पार्लमेंट च्या वतीने आमरण उपोषणास बसले होते. आज दि. 23 गुरुवार रोजी आपले सरकार सेतू केंद्राचे अधीक्षक चंद्रपाल मेश्राम यांनी रणजित भोसले उपजिल्हाधिकारी अमरावती यांचे पत्र आणून दिले तसेच सागर तसरेला ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आले. त्या पत्रानूसार शेख हमीद शेख वाहेद यांचे आपले सरकार सेतू केंद्र रद्द करण्यात आले व पात्रतेचा कसोटीत अपंग सागर तसरेला आपले सरकार सेतू केंद्र देण्याचे आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर असे कि महाराष्ट्र सरकारने गावातील नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा मिळाव्या म्हणून आपले सरकार सेतू केंद्र गावागावात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर शेख हमीद शेख वाहेद यांना आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आले. या संबंधात अपंग सागर संजय तसरे यांनी माहितीच्या अधिकारात शेख हमीद शेख वाहेद यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती मिळविली असता शेख हमीद शेख वाहेद यांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र दि. २९/१२/२०२७ जिल्हा शल्य चिकित्सकाचे खोटे व बनावटी प्रमाणपत्र दाखल केल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झाली. या विरोधात सागर ठाकरेने दि. १५ बुधवार पासून आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याने पब्लिक पार्लमेंटचे अँड. सिद्धार्थ गायकवाड, फूजैल सय्यद, मीनाताई नागदिवे सुषमा मोरे वहिदा नायक अविनाश गोंडाने श्रीकृष्ण तातड, अँड. रमेश तंतरपाडे यांनी सहकार्य केल्याबद्दल सागर संजय तसरे यांनीं आभार व्यक्त केले

निळाई वर्षभर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साजरी करणार

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

” युगकवी वामनदादा कर्डक जनसामान्यांच्या आवाज :- प्रविण कांबळे ”

निळाई परिवाराकडून युगकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त माटोडा बैनोडा येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते . यावेळी वामनदादा कर्डक यांच्या, गझल,कवीता, गीत, यांचा समावेश करीत कविनी आपल्या रचना सादर केल्या. सुरेश वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवि समेलनात शिला आठवले, करूना मुन, अहिल्याबाई रंगारी, अपेक्षा कांबळे. माणिक खोब्रागडे, रंगराज गोस्वामी, धम्मप्रचारक सुरेश भिवगडे, छत्रपाल तामगाडगे, सुर्यकांत मुनघाटे, नरेश पाटील, राजेंद्र कांबळे, मनोहर गजभिये,नरेद्रं पखाले मधुकर सवाळे यांनी सहभाग घेतला या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन प्रवीण कांबळे संपादक निळाई त्रैमासिक यांनी केले. वामनदादा कर्डक यांच्या कवितेने कवी संमेलनाची सुरुवात झाली ” काय सांगू तुला मी भिम माझा कसा होता, लेकराला जशी माता भिम माझा तसा होता, यावेळी भिख्खु संघ भिक्खूनी आर्या पटाचारा, भन्ते धम्मरत्न टाकरखेडा व आर्यपूत्त धम्ममेध उपस्थित होता . धम्मप्रचारक सुरेश भिवगडे यांनी भाद्रपद पौर्णिमा यांचे महत्व समजावून सांगितले. सर्वप्रथम पंचशील बुद्धविहार बेनोडा येथे त्रिशरण पंचशील घेऊन मिरवणूक काढून चंद्रमनी बुद्ध विहार मोटोडा येथे सहभागी कवीचे स्वागत करण्यात आले. येथे या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन चंद्रमणी बुद्ध विहार मोटोडा बेनोडा उपासक उपासीका यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहाराचे अध्यक्ष अतुल कांबळे तर आभार प्रदर्शन प्रविण कांबळे यावेळी गावातील चरणदास भगत, संकेत कांबळे, अनुसया वावरे, शशिकला विघ्ने, रामरावजी वावरे नारायण ढाणके. कुमुद कांबळे विशाल भगत धम्मा ढाणके. धीरज कांबळे समीर कांबळे मुकुंद वावरे प्रकाश गडलिंग अशोक भगत आनंद वंजारी, शकुंतला वावरे प्रतिभा पखाले अनिता भगत शोभा कांबळे ग्रा. प. सदस्य, प्रमिला कोल्हे सविता पखाले दीपिका कांबळे श्रीधर कांबळे मोनिका कांबळे अक्षरा कांबळे परी कांबळे खुशी कांबळे लक्ष्मण पखाले बबनराव मेंढे इमला मेंढे नंदा मोहोड सुनन्दा गजभिये मीना गडलिंग पुष्पा वावरे शांती वावरे पारबता वावरे कल्पना वावरे रेखा वावरे सविता पखाले चंदा कांबळे गीताबाई ढाणके रजनी कांबळे चंद्रकला नाखले सुजाता ढाणके रमा कांबळे संगीता भगत रमाबाई कांबळे शुभम भगत अमित ढाणके मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती