Home Blog Page 402

भूमिपुत्रांच्या पाठिंब्या कडे सर्वांचे लक्ष तर २८ सप्टेंबरला करणार पाठिंबा जाहीर :- राम पाटील बोरकर

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनीधी सेनगाव

होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकांसाठी भूमिपुत्र लवकरच पाठिंबा जाहीर करणार असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी सांगितले होते या बातमीनंतर मात्र सर्व जिल्ह्याचे लक्ष हे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पाठिंबा कडे लागले होते येत्या २८ सप्टेंबरला रिसोड येथील भूमिपुत्र च्या कार्यालयात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंत भुतेकर साहेब व तसेच राज्याचे प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र गवळी साहेब आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर जी अवचार यांच्या प्रमुख उपस्थित पाठिंबा जाहीर करणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी केले आहे

भारतरत्न डॉ .बाबासाहेबांचे अप्रकाशीत विचारधन हे विश्वाला कळणार कधी ? प्रकाशीत करण्याची भीम आर्मीची राज्य शासनाकडे मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांनी राज्यशासनाकडे केली जाहीर मागणी आहे.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार ह्या विश्वाला तारणारे महान क्रांतदर्शी विचार असून त्यांनी आपल्या महान ग्रंथातून , भाषणांतून , लेखातून वैश्विक मानवजातीला नेहमीच मार्गदर्शन केले असून त्यासंबंधी त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध असून , महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे हे महान विचारधन जगाच्या अंतिम टोकापर्यंत नेण्यासाठी प्रकाशित करण्याचा विडा उचलला त्यानुसार १५ मार्च १९७५ रोजी राज्यशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली असून , गेल्या ४४ वर्षांत शासनाने फक्त २२ खंड व ०३ सोअर्स मटेरियल इतकीच साहित्यसंपदा प्रकाशित केली आहे , त्यातच २००६ पासून ते आजतागायत म्हणजे *गेल्या १५ वर्षांत एकसुद्धा ग्रंथ प्रकाशित केलेला नाही. बाबासाहेबांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणीअसून ,बाबासाहेबांच्याच साहित्याचा अभ्यास करून अनेक देशातील सरकारे आपल्या प्रजेच्या प्रश्नांची उत्तरे शोधून कार्यरत आहे तर बाबासाहेब लिखित “प्रॉब्लेम ऑफ रुपी” ह्या ग्रंथाच्या आधारावरच आपल्या देशाची सर्वोच्च बँक असणारी “रिझर्व्ह बँक” स्थापित झालेली आहे.
बाबासाहेबांचे विचार विश्वाला मार्गदर्शन करत असताना त्यांचे अप्रकाशित साहित्य मात्र सरकारी गोदामात धूळ खात पडले असून , *सरकारची ही अक्षम्य घोडचूक आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते मा.रमाकांतजी तायडे यांनी सांगितले असून वेळप्रसंगी आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या क्रांतीप्रेरणेतून उग्र आंदोलन छेडू , असा सज्जड दम सुद्धा मा.रमाकांतजी तायडे यांनी दिला आहे.

आर्वी शहर मे उर्स मुबारक

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

टिपू सुलतान ग्रुप आर्वी की ओर से हजरत सैय्यद अब्दुल हमीद क़ादरी उर्फ रबर वाले मामूजान रह.अलै. (आर्वी) बारगाह मे चादर पेश की गई उपस्थिति. तौसीफ खान अबरार खान शेख शाहरुख कादरी शोएब शेख तनवीर दर्पण भाई अजीब फारुकी शेख मारुक अहमद शेख जुनैद शहजाद शेख सलमान खान लोकेश भाई योगी भाई आवेश खान फैजान खान सोनू कुरैशी और सब पदाधिकारी उपस्थिति थे

प्रहार संघटनेच्या त्या “कृत्या ‘विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी-भाजपा महिला मोर्चा ची मागणी..

0

 

शेगाव: प्रहार संघटनेच्या वतीने नगरपालिकेचे कार्यालयासमोर नगराध्यक्ष यांचा प्रतिकात्मक पुतळा साडी नेसवून जाळण्याचा प्रयत्न म्हणजे महिलावर्गाची विटंबना होय या घटनेबद्दल प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. शेगाव शहरात 19 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन करण्यात आले सध्या कोरूना प्रादुर्भाव वाढू नाही करिता नगरपालिकेने भागामध्ये खाजगी वाहनाद्वारे गणपती विसर्जन उभे केले होते या खासगी वाहनांमध्ये ठेवण्यात आलेले पाण्याच्या टाकी ह्या अतिशय घाणीने माखलेले असल्याने अशा घाण युक्त पाण्यामध्ये गणपती विसर्जन करून नगरपालिकेने गणपती मूर्तीचे विटंबना केल्याचा आरोप संघटनेने करून नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शकुंतला बुच यांचा प्रतीकात्मक पुतळा पुतळ्याला साडी नेसून प्रहार संघटनेच्या वतीने शेगाव नगरपालिका कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात आला या घटनेचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षाच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली व प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली या प्रमाणे आज 22 सप्टेंबर रोजी तहसीलदार शेगाव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा तर्फे व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की अशा प्रकारे साडी नेसून पुतळा जाळण्याचा प्रकार म्हणजे महिलांचा अपमान करणे होय या प्रकरणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते विरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉक्टर ज्योती भुतडा, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस सौ कल्पनाताई मसणे, शेगाव शहर सरचिटणीस सौ.मंजू शर्मा नगरसेविका अलका खांजोडे मॅडम, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे , तालुकाध्यक्ष विजय भालतिलक, माजी शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानोले जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय लांजुळकर भाजपा किसान आघाडीचे माजी, अमित जाधव, नगरसेवक पुरुषोत्तमा हाडोळे भाजपाचे माजी नगरसेवक शांताराम बेडेकर, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या.प्रेरणेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र

ग्राम अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रेरणेने देशाचे यशवि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रम हा भाजप ग्रामीण महिला आघाडी च्या वतिने व ग्रामस्थांच्या सहकार्याने घेण्यात आला या कार्यक्रमाला मा.सभापती तथा महिला ग्रामीण च्या अधक्षा.सौ अरचना ताई शिवाजिराव पाटिल. विमुक्त भटक्या सेलचे जिल्हा अधक्ष शत्रुघुन पाचपोर. मा.सभापती तथा भा.ज.पा.ता.अधक्ष शैलेश मिरगे. जि.सचिव. सौ. लासुरकार ताई. ता.उपाअध्क्ष. सौ.तायडे ताई. शिलाताई तायडे. भगवान आबा शेळके. कैलास डांगे. नारायण बाठे. महादेव डांगे. दिलिप शेळके. हरिभाऊ रिंगने. रमेश बगाडे. रमेश हातळकर. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक संघटनेचे जिल्हा अधक्ष शिवाजिराव पाटील. यांनी केले व नियोजन भाजयुमो ता.उपाअध्क्ष सतिष गायगोळ. व सोषल मिडिया प्रमुख सागर सपकाळ. यांनी व कार्यकर्ते यशस्वी कार्यक्रम पार पाडला

उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे डॉ.रा.भ.उपाख्य अण्णासाहेब शेंडे यांची 92वी जयंती साजरी

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

वैद्यकीय अधिक्षक डॉ. मोहनजी सुटे यांनी अण्णासाहेब यांचा फोटोचे हरार्पण व पूजन केले. आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.अण्णासाहेबांचे कार्य सर्वश्रुत आहे. त्यांनी जिवंतपणी समाजाला सामाजिक स्थान मिळवून देण्यात स्वतः चे आयुष्य समर्पित केले. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,अँड.हरिदास बाबूजी आवळे, बॅरिस्टर खोब्रागडे यांच्याशी जवळचा संबंध आला. वर्धा जिल्ह्यातील सर्व सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी बौद्धविकार म्हणून आपल्या वाणीचे जनतेमध्ये छाप निर्माण केली.
अशा एका सामाजिक योद्धयाचे निर्वाण २अक्टोबर 2010 ला स्वतः चे घरी नांदपूर ता. आर्वी जि. वर्धा येथे झाले.
त्यांच्या जयंतीनिमित्त डॉ.वंदनाताई वावरे, डॉ.निरज कदम,डॉ.आशिष सोनी,डॉ.उज्वल देवकाते,डॉ.हेमंत पाटील,डॉ.नरेंद्र गुप्ता, राहुल शेंडे(समुपदेशक), सोनाली घुरडे,कोमलताई जवादे रुग्णालयातील ईतर कर्मचारी तसेच सुरेशभाऊ भिवगडे, नरेंद्र पखाले (शिक्षक) सारीपुत्र भगत, संजयभाऊ हिरवे, अरुणभाऊ भोगे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब द्वारा आयोजित राष्ट्रीय फुटबॉल लिग स्पर्धा चे आयोजन व बक्षीस वितरण.

0

 

हिंगणघाट: ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट तर्फे दिनांक 17 ,18 19 ,सप्टेंबरला फुटबॉल लिग स्पर्धा चे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आले या स्पर्धेत प्रथम पुरस्कार 7000 हजार व ट्रॉफी द्वितीय पुरस्कार 5000 हजार व ट्रॉफी ही स्पर्धा तीन गटात होती गटात होती 14 वर्षीय ,17वर्षीय मुले आणि खुले महिला गट . यामध्ये इतर राज्यातील फुटबॉल संघ सहभागी झाले होते ए.बी ग्रुप फुटबॉल क्लब ,शक्ती गर्ल्स स्पोर्टिंग क्लब , नागपुर टीम्स अन्सारी क्लब, चंद्रपूर, नाशिक, गोंदिया, वर्धा, आर्वी, बुलढाणा, कामटी तीन संघ मुंबई, दादाभाई क्लब वैकुंडपूर छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, कानपूर, हरियाणा, पंजाबमधून गॅलेक्सी 11 स्पोर्टिंग क्लब चंदीगड एकूण 26 संघ सहभागी झाले.

या स्पर्धेचे उद्घघाटन संगीता रांका यांनी केले, यामध्ये त्यांनी सर्व खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. आयोजकांनी सांगितले की, प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वीरांगना ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे, श्रमिक समर्थ आणि बंधक कामगार संघटनेच्या, आणि चंद्रपूर वर्धा, गडचिरोली विधान परिषदेचे प्रमुख डॉ.रामदास आबंटकर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार , हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर कोठारी हिंगणघाट नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, लेखक इरफान खान, मुझफ्फर हुसेन, सामाजिक कार्यकर्ते अविनाश
नवरखेले. पत्रकार नदीम सर , मोहसीन खान
कदिर बख्श. शिव सकाळ चे संपादक
उपस्थित होते , आगामी काळात ब्राइट फ्यूचर स्पोर्टिंग क्लबला सहकार्य करण्यास सांगितले.

14 वर्षीय मुलांमध्ये :-
1 पुरस्कार: अन्सारी क्लब नागपूर
2 पुरस्कार: किड्स ब्राईट फ्युचर

17 वर्षांखालील मुलांमध्ये
1 बक्षीस: किड्स ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट
दुसरा पुरस्कार: अन्सारी क्लब नागपूर

आणि खुल्या महिला गटात
1 बक्षीस: किड्स ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट
2 पुरस्कार: रझा स्पोर्टिंग क्लब
ला मिळाला
3 पुरस्कार दिल्ली संघाला देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शर्मा यांनी केले. आयोजक हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब राष्ट्रीय खेळाडू मुस्तफा बक्ष यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

निसर्गसाथी फाउंडेशन चा  फुलपाखरू महोत्सव’  निःशुल्क विविध स्पर्धांचे आयोजन

0

 

हिंगणघाट (२०/९) शहरात पर्यावरण तथा पशु पक्षी संवर्धनासाठी कार्यरत निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने यंदा शहरात आढळणारया फुलपाखराचे संवर्धन तथा जनजागृती होण्याचे दृष्टीने ‘ फुलपाखरू महोत्सव’ आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवांतर्गत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपले साहित्य ज्योतिर्लिंग टायपिंग एल आय सी आफीस जवळ,नेताजी किराणा दुकान,पराग बुक डेपो,सत्संग मेडीकल, अरविंद दहापुते गोमाजी वार्ड यांचे कडे २५ सप्टे पुर्वी पाठवावेत,तद्वतच आपले साहित्य https://forms.gle /3bnmzEYyZFSZvckf8 या लिंकवर पाठवुन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने प्रविण कडु,राकेश झाडे , गुणवंत ठाकरे, अरविंद दहापुते,रश्मी चंदनखेडे ,प्रा डॉ बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे आदींनी केले आहे .
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

यावल चोपडा रोडवर अज्ञात वाहनाने मोटर सायकलच्या भिषण अपघातात साकळीच्या तरूणाचा जागीच दुदैवी मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधि)विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास यावल चोपडा मार्गावरील साकळी गावापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या भारत तोलकाटयाच्या जवळ साकळी येथील राहणारा रोहीत अरूण कोळी वय२६ वर्ष हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १४जेएन २६८५ वाहनाने साळ्ळीकडुन किनगावकडे जात असतांना एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात गंभीर दुखापत होवुन जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे . दरम्यान मरण पावलेल्या रोहीत कोळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , याबाबत कैलास कोळी यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली , अपघाताची माहीती कळताच पंचायत समितीचे सदस्य दिपक अण्णा पाटील ,दिपक नागो पाटील पिक सोसायटी चेअरमन काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह साकळी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने या ठीकाणी उपस्थित होते . सदरच्या अपघातात मरण पावलेला तरूण रोहीत कोळी हा अरूण कोळी यांचा एकुलता एक मुलगा होता .

जिल्हा परिषद/पंचायत समिती असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधि) विकी वानखेडे

श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह जिप जळगाव येथे राज्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली
महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ निलम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगांव जिल्हा कार्यकारिणी तथा तालुका अध्यक्षांची निवड जिल्हाध्यक्ष यांचे तर्फे जाहीर करण्यात आली असुन ,
जिल्हा कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार म्हणून जिप अध्यक्ष ना.सौ . रंजनाताई प्रल्हाद पाटील यांचेसह
शिवसेना गटनेते तथा जिप सदस्य नानाभाऊ महाजन इतर जिल्हा परिषय सदस्यांत पवन सोनवणे,सुरेखा पाटील,हिंमत पाटील, पल्लवी सावकारे,नंदा सपकाळे, कैलास सरोदे,अनिता गवळे, गजेंद्र सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), सरोजिनी गरुड,सौ माधुरी अत्तरदे, प्रमिला पाटील,अनिल देशमुख,दिलिप पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे,मा.जिप सदस्य आर.जी.नाना पाटील वगैरे जि .प. व पं.स.सदस्यांत प्रतिभा बोरोले रावेर,प्रविण पाटील अमळनेर, अशोक पाटील पारोळा, अनिल महाजन एरंडोल,अमर पाटील जामनेर, सुभाष पाटील पाचोरा, रामकृष्ण पाटील भडगाव, शिवाजी सोनवणे चाळीसगांव यांची उपस्थिती होती. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असोसिएशन यावल तालुका अध्यक्षपदी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांची निवड करण्यात आली , या निवडी बद्दल त्यांचे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , नईम शेख , काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, विक्की पाटील , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल , सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल, धिरज कुरकुरे, कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल , रमेश पाटील , अभ्य महाजन आदींनी त्यांचे शुभेच्छा देवुन अभीनंदन केले आहे.