Home Blog Page 406

येथील महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यात यावे यासाठी मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावरील खड्यांचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

नेहमी वर्दळीचा असेलला महामार्ग खड्डेमय झाला आहे. या खाड्यांमध्ये पाणी साचत असून यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने एखाद्याचा यात नाहक बळी जात असेल तर या खड्यांचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यात महामार्गावरील खड्ड्यांची पूजा करून त्याचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी तात्काळ हे खड्डे बुजविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना गौरव कोळी, विभागाध्यक्ष आबिद कच्छी, विपुल येवले, प्रतिक येवले, राज शिर्के, गणेश माळी, कुणाल बारी, आकाश चोपडे, कमलेश शिर्के आदी सहभागी झाले होते.

महागांव ७० वर्षापासून बोर्डी नदीवरील पुलाच्या प्रतीक्षेत, पूल नसल्यामुळे विकासापासून वंचित

0

 

आजारी वृध्द रुग्णांना युवक हाताची साखळी बनवून नदितून घरी पोहचवतात

बुलढाणा : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावाला शहराशी जोडण्यासाठी रस्ते जोडणीचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र असे असले तरीही शेगाव तालुक्यातील महागाव हे जवळा पळसखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असून गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेऊन विविध विकास कामांसाठी मागणी करण्यात येते मात्र याठिकाणी भेदभाव या भावनेतून या गावात रस्ते सेवांतर्गत सुविधा करण्यात आलेल्या नाहीत असा गावकर्‍यांकडून आरोप करण्यात येत असला तरीही या गावाची ही वास्तविकता नाकारता येत नाही.

महागांव बोर्डी नदीच्या काठावर वसलेले आहे.  ४५० लोकसंख्येच्या गाव विकासासाठी सर्व धर्मीय एकत्र येऊन प्रयत्न करतात मात्र या ठिकाणी गावकऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो जसे की विद्युत पुरवठा,पिण्याचे पाणी यासाठी संघर्ष करावा लागला सहजतेने कोणत्याही गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या नाहीत.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी महागावला भेट दिली. त्यावेळी स्वतः त्यांनी बोर्डी नदीच्या पाण्यातूनच गावात प्रवेश केला यावेळी त्यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या आणि गावकऱ्यांना बोर्डी नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन दिल्या गेले असे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर गावकऱ्यांचा पाठपुरावा कमी पडला असावा किंवा कुठेतरी पाणी मुरले असावं अशी शंका गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे त्यामुळेच महागावच्या बोर्डी नदीवर पूल बांधण्यात आला नसावा.

या बोर्डी नदीतूनच महागाव येथील गावकऱ्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ये-जा करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात या गावांमध्ये जर एखादा व्यक्ती मरण पावला आणि बोर्डी नदीला पूर जर असला तर तो मृतदेह पूर ओसरेपर्यंत दोन दिवस घरांमध्ये ठेवावा लागतो कारण मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याकरिता महागाव वासीयांना बोर्डी नदीच्या पलीकडून जवळा बुद्रुक येथील स्मशानभूमी येथे घेऊन जावे लागते. त्याच बरोबर दळण,किराणा,दवाखाना अशा विविध गोष्टींसाठी गावकर्‍यांना ही नदी ओलांडून बाजूच्या जवळा बुद्रुक या गावांमध्ये जावे लागते त्याचबरोबर एखाद्यावेळेस मुले ही जवळा बुद्रुक या गावी शाळेत असताना नदीला पूर आला तर मुले ही बोर्डी नदीच्या तिकडच्या काठावर अडकून असतात आणि मुलांचे आई वडील महागाव मध्ये अशा गंभीर परिस्थितीचा सामना या गावकऱ्यांना करावा लागत आहे.

गावकऱ्यांशी आणखी बाबी विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या मूलभूत गरजा साठी भांडत असताना कित्येक अधिकाऱ्यांना याबाबतीत माहिती सुद्धा नाही कि महागाव हे कुठे आहे असे आम्हाला विचारण्यात येते.  महागाव वासियांची परिस्थिती आज रोजी आदिवासी लोकांपेक्षाही गंभीर अशी परिस्थिती बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे झालेली आहे. कारण या गावामध्ये लोकसेवक आतापर्यंत ही आलेले नाहीत जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनासुद्धा महागाव कुठे आहे हे माहीत नसावे असे गावकरी सांगतात.

बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे या गावातील उमेश महादेव डाबेराव ३२ वर्षीय युवक हा आपल्या वैयक्तिक कामासाठी एक धान्याची गोणी डोक्यावर घेऊन नदीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता यावेळी त्याचा पाय घसरून तो गोणीसह पडला यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या मृत्यूशी झुंज देत आहे असे त्याच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे.

ही सर्व घटना घडल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे कारण हा अपघात फक्त बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे घडला आहे जर या नदीवर पूल असता तर एखादं वाहन गावात येऊन तो युवक त्या वाहनात त्याची धान्याची गोणी घेऊन गेला असता. महागाव येथील नागरिक हे आजारी असताना त्यांना या नदीच्या पाण्यातून प्रवेश करावा लागतो वयोवृद्धांना या गावातील युवक साखळी बनवून हातावर उचलून नदीच्या त्या काठावरून ते महागाव पर्यंत घेऊन येतात अशी गंभीर परिस्थिती आज रोजीही महागांव येथे आहे.

बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी गावकरी संघटित होऊन लढा देणार असल्याचे पाहून विविध राजकीय संघटनाडून या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात येत आहे. महागाव येथील बोर्डी नदीवर पूल बांधण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून समस्या सोडवण्यासाठी कोणतेही पावले उचलली गेली नाहीत तर गावकऱ्यांकडून रीतसर निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाची भूमिका गावकरी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महागाव या गावासाठी बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा याकरिता गावकरी आता सज्ज झाले असून वेळ पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन,उपोषण, आत्मदहनही करावे लागले तर मागे सरणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी ठाम केली आहे. येत्या निवडणूकीवर गावकरी वेळ पडल्यास बहिष्कार सुद्धा घालतील असे सुद्धा गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आता लोकसेवक आणि प्रशासनाची भूमिका महागाव येथील बोर्डी नदीच्या पुला संबंधित कोणती असणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

आंदोलनसम्राट’ राणा चंदन यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन

0

 

गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपले आयुष्य समर्पीत करणार्‍या राणा चंदन यांचे मागील ९ सप्टेंबर रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने चंदन परिवारावर दुःखाचा डोंगर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आभाळ कोसळले आहे. कार्य करतांना कुणाचीही जात, धर्म किंवा पक्ष-संघटना न बघणार्‍या राणाने समाजात माणूसकी पेरली…चळवळीतील एक आदर्श नेता आणि आयुष्यात निर्मोही असणार्‍या राणाजींप्रति अनेकांच्या मनात आदर, प्रेम, आपुलकी आणि सन्मान आहे. मन हेलावून आणि डोळे पाणावून गेलेल्या राणाजींसाठी मनात दाटलेल्या भावना व्यक्त करण्याची सर्वांचीच इच्छा आहे. एखाद्या व्यक्तीमत्वाचे न माहिती असलेले पैलूही सर्वांपर्यंत पोहोचले पाहीजेत, या हेतूने स्वाभिमानी शेतकरी संघटना परिवाराकडून स्व. राणा चंदन यांना ‘जाहीर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तमाम बुलडाणेकर तसेच राणाजींवर प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग यांनी याची नोंद घ्यावी.

दिनांक ः बुधवार, १५ सप्टेंबर २०२१

वेळ ः सायंकाळी ४ वाजता.
स्थळ ः बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी सभागृह, मलकापूर रोड, बुलडाणा
विनीत ः स्वाभिमानी शेतकरी संघटना परिवार,बुलडाणा._

 

वर्धा जिल्हातील आर्वी तालुक्यात अवैद्य गुटखा विक्रीला जोरात प्रतिसाद,प्रशासनाची कार्यवाही कागदावरच

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री बंदी असूनही वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात गुटखा विक्री सर्रास पान टपरी व दुकानांत होतांना दिसतं आहे मात्र या गुटखा व पान मसाला विक्रीमुळे युवा पिढी नशेचा आधीन होत आहे, आणि कर्करोगाच्या बिमारीला बळी पडावे लागेल अशी चर्चा आर्वीतील जनतेमध्ये होतांना दिसून येत आहे. पान टपरी व दुकांनादारांमध्ये गुटखा विक्री चे एवढे बळ येते तरी कुठून या गुटखा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद तर नाही ना ? अशी चर्चा आर्वी तालुक्यातील जण सामान्यतः होत आहे. तरीही आर्वी तालुक्यात गुटखा विक्री वर संबधित प्रशासन बंदी आणणार की नाही ? या कडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

आमदार.शिरीष चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून यावल ग्रामीण रुग्णालयास अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आली असून शुक्रवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.

0

 

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी कोरोना संसर्गाच्या अतिश्य दुदैवी व संकटमय काळातील घटनांवर प्रकाश टाकून रुग्णालयास ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेची गरज असल्याचे सांगितले असता येथील ग्रामीण रुग्णालयात स्थानिक आमदार विकास निधीतून आमदार शिरीष चौधरी यांनी रुग्णांच्या सेवेसाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात कार्डियाक ही अत्याधुनिक यंत्रणा असलेली रुग्णवाहिका अर्पण केली. या रुग्णवाहीका लोकापर्ण सोहळ्याच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कदीर खान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. बी. बारेला आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या रुग्णवाहिका लोकापर्ण सोहळ्यात काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे ,नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, माजी नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर, काँग्रेस आदीवासी सेलचे यावल तालुका अध्यक्ष बशीर तडवी, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, युवा कार्यकर्ते धनंजय शिरीष चौधरी, मारुळ चे सरपंच जावेद जनाब समाधान पाटील उमेश जावळे, इमररान पहेलवान, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला इंगळे, हाजी गफ्फार शहा,जलील पटेल, ,शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, अनिल जंजाळे, युवक कॉग्रेसचे नईम शेख, यावल नगर परिषदचे गटनेते सैय्यद यनुस सैय्यद युसुफ, सक्लेन शेख, रहेमान खाटीक, अ.जा. जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी,कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, मारुळचे सरपंच सैय्यद असद अली , काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, खरेदी विक्रीसंघाचे माजी संचालक सतीश पाटील, समाधान पाटील,, राजू करांडेसह अनेक कार्यकर्ते पदधिकारी या लोकापर्ण सोहळयास उपस्थित होते

उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे हत्तीरोग विकृती व्यवस्थापन किट चे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते वाटप.

0

 

राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे हत्तीरोग रुग्णांना हत्तीरोग विकृती व्यवस्थपन किट च्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक ०८/०९/२०२१ ला पार पडला. सदर कार्यक्रमाला हिंगणघाट विधानसभेचे आमदार मा. समीर कुणावार तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चाचरकर आणि वर्धा जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी मा.सौ. जयश्री थोटे मॅडम उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा हत्तीरोग पर्यवेक्षक श्री दिलीप बरबट ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. चिंचोळकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण वासाडे हे उपस्थित होते.
हत्तीरोग झाल्यानंतर रूग्णांना पायाशी संबंधित विविध त्रासाला सामोरे जावे लागते. या त्रासापासून सरंक्षण करण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजने संबधीत विस्तृत मार्गदर्शन हत्तीरोग रुग्णांना सौ थोटे मॅडम यांनी केले. भविष्यात हत्तीरोग रुग्णांची संख्या कमी करून हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यासाठी समाज सहभागाचे महत्व मा.आमदार समिर कुणावार यांनी अधोरेखित केले. कीटकजन्य रोगापासून स्वतःचा आणी स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची सविस्तर माहिती आपल्या भाषणातून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर सर यांनी दिली. या कार्यक्रमाला हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील संपुर्ण ग्रामीण भागातील हत्तीरोग रुग्ण उपस्थित होते. दोन्ही तालुक्यातील एकूण 135 हत्तीरोग रुग्णांना हत्तीरोग व्यवस्थापण किट चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हत्तीरोग उपपथकाचे प्रभारी आरोग्य सहाय्यक श्री उमेश मेश्राम, यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री लिडबे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. सचिन खंदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल कुमरे,,सुभाष वाडगे राम मेश्राम, रोशन सावळीकर,मनोज वरभे, प्रशांत बारडे,कमल शेंडे सिध्दार्थ बहादे इ.नी सहकार्य केले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

प्रहार चे बाळा जगताप यांच्या नेतृत्वामध्ये किसान आंदोलनाच्या समर्थानात प्रहार च्या सायकल रॅलीचे दिल्ली कडे रवाना तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली सायकल रॅली ला हिरवी झेंडी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी दिली रॅली ला हिरवी झेंडी

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

केंद्र सरकार द्वारा पारित कृषी कायद्यांच्या विरोधात व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज आर्वी येथून प्रहारचे नेते बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी ते दिल्ली सायकल रॅलीला राज्यमंत्री व प्रहारचे संस्थापक बच्चु कडू यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली.यावेळी रॅलीच्या सुरूवातीला झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर राज्यमंत्री बच्चु कडू व कार्यक्रमाचे आयोजक बाळा जगताप यांच्यासह लढा संघटनेचे संस्थापक संजय देशमुख, पूर्व विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष गजूभाऊ कुबडे, नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, वर्धा जिल्हा अध्यक्ष जयंत तिजारे, देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख राजेश सावरकर, पंचायत समिती सदस्या अरुणा सावरकर, सुधीर जाचक, अक्षय भोने, निलेश ठाकरे आदी उपस्थित होते.

राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली. राज्यमंत्री बच्चु कडू यांनी आपल्या मनोगतात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर आपल्या खास शैलीत आसूड ओढले.
आयोजक बाळा जगताप यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर करून रॅलीचे नियोजन, सुरुवात, उद्देश आपल्या भाषणात स्पष्ट केले. राज्यमंत्री बच्चु कडू, बाळा जगताप, संजय देशमुख यांनी सायकल चालवून व हिरवी झेंडी देऊन रॅलीला सुरवात केली. सभेचे संचालन प्रहार कार्यकर्ता विवेक ढवळे तर आभार देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्ष राजेश सावरकर यांनी मानले.

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनि अमानत रक्कम जमा करून त्यांना विहिरी वरिल विज कनेक्शन मिळाले नाही

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनि अमानत रक्कम जमा करून सुध्दा त्यांना विहिरी वरिल विज कनेक्शन मिळाले नाही तरी१५दिवसाचेआत विज कनेक्शन जोडनी करून.द्यावी अन्यथा शिवसेना नांदुरा तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व समोर होणाऱ्या प्रक्रियेस शिवसेना जबाबदार राहणार नाही अशा प्रकारचा.महाराष्ट्र विधुत केंद्र नांदुरा यांना निवेदना.द्वारे. ईशारा देण्यात आलेला त्या वेळी उपस्थित शिवसेना ता.प्रमूख संतोष भाऊ डिवरे शिवसेना उपसभापती गजानन भाऊ गवाळे. गजानन करंगाळे. सुभाष गवळी. महादेव काळे व शिवसेनेचे तमाम कार्य करते उपस्थित होते

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नगरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजूर कामाना तात्काळ सुरवात करावी

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्र

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नगरी वस्ती सुधार योजना हि.मागासवर्गीयांचे राहनिमान उच्चावे हा या योजनेचा उद्देश आहे त्या नुसार ह्या योजनेअंतर्गत विविध कामाना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून निधि सुध्दा उपलब्ध आहे प्रशासकीय मान्यता तसेच निधि उपलब्ध असताना एकाही कामाला सुरुवात झालेली नाही यावरुन मागासवर्गीयाप्रति मुख्य धिकारि यांचि भुमिका आकस असलेलि दिसुन येत आहे. तरी प्रशासकीय मान्यता व.निधि उपलब्ध असलेली कामे पंधरा दिवसाच्या आत सुरवात करावी अन्य था बहुजन समाज पारटी मलकापूर विधानसभा नांदुरा युनिट दारा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल ह्यामध्ये धरने आंदोलन. रस्ता रोको उपोशन यांचा समावेश राहिल यामुळे नगरपरिषध प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन मुख्य धिकारि नगर परिषध नांदुरा यांना देण्यात आले आहे ह्या निवेदनावर सुशिल इंगळे. अनिल वाकोडे. शकिल भाई. देविदास गोरे संतोष तायडे इत्यादि कार्य करते यांच्या सह्या आहेत

कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने गावातील विकास कामे व समस्या कशी सुटणार : सरपंच विलास अडकमोल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचा ग्रामसेवक मिळावा या मागणीचे निवेदन सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांच्याकडे दिले असुन लोकप्रतिनिधींना जर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामसेवक मिळत नसेल तर आम्ही काय करावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . दरम्यान कोरपावली तालुका यावल ग्राम पंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांनी ग्रामपंचायतीच्या गोंधळलेल्या कारभारामुळे तात्काळ बदली करण्यात आली असुन , प्रविण सपकाळे यांच्या बदलीच्या जवळपास दोन महीन्यानंतर ही कोरपावली ग्रामपंचायतीला अद्याप कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंच , उपसरपंच व त्यांच्या सहकार्यांना गावपातळीवर विकासकामे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान या संदर्भात आज कोरपावली ग्रामपंचायतीचे सरपंच विलासा नारायण अडकमोल यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश शांताराम पाटील यांची भेट घेवुन आपल्या ग्रामपंचायतीला कायम गावाग्रामसेवक नसल्याने गावाच्या विविध विकास कामे करण्यात येत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावातील ग्रामस्थ मंडळी कडुन नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची माहीती त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिली , यासंदर्भात आपण दोन दिवसा निर्णय घेवु असे आश्वासन याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिले असुन , या संदर्भात काही ग्रामसेवकांच्या कार्यपद्धती बद्दल तक्रारी देखील असुन आपण अशा बेशीस्त वागणाऱ्या ग्रामसेवकांना आपल्या पध्दतीने शिस्त लावणार असल्याचे सांगुन काही ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच पंचायत समिती स्तरावर सहा ग्रामविकास अधिकारी आणी चार ग्रामसेवकांच्या जागा या अद्याप ही आपल्याकडे रिक्त असल्याच्या त्यांनी सांगीतले.