Home Blog Page 409

कोरोणाच्या संकटात आता साथीच्या रोगाचं थैमान यवतमाळ मध्यें डेंग्यू मलेरियाचे थैमान रुग्णांची संख्यात वाढ

0

हंसराज उके अमरावती

अमरावती-: दिनांक ४सप्टे २०२१ कोरोना संकट असतानाच आता यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू मलेरियाने डोके वर काढले आहे यवतमाळ येथील वसंतराव नाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी
मोठ्या संख्येने गर्दी दिसुन येत आहे विशेषतः हे प्रमाण लाहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहे त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले
यवतमाळ जिल्ह्यात ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३५ उपकेंद्र आहेत याठिकाणी आता पर्यंत ३४१७ ईलायझा आणि रॅपीड टेस्ट केल्या त्यापैकी १८१ रुग्ण डेगुचे आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागात आहे परंतु या पेक्षा किती तरी जास्त रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या मध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये डेंग्यूचे , टायफाईड, आणि मलेरियाच्या आजारांची लक्षणे आढळुन येत असल्याने
सगळीकडे रुग्णालय हाऊस फुल झाल्याचे चित्र झाल्याचे दिसून येते आहे…..

जिल्हा परिषदेची अनुसूचित जमातीची रखडलेली विशेष शिक्षक भरती तात्काळ राबवा अन्यथा आंदोलन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचा ईशारा

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परोषदेचे शिष्टमंडळाने दिनांक २ / ९/२०२१ रोजी जळगांव जिल्हा जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांची भेट घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनामार्फत डिसेंबर २०१९ मध्ये आदिवासींची विशेष पदभरती राबविण्यात आली होती, त्याद्वारे जळगांव जिल्हा परिषदेमध्ये देखील आदिवासी प्रवर्गाच्या शिक्षक भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती, परंतु ही भरती कोरोना संसार्गाच्या काळापासून अद्याप पर्यंत राबविण्यात आलेली नाही,
मा.नागपूर खंडपीठाने आदेश निर्गमित केल्यानंतर सातारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि रायगड या जिल्हा परिषदेद्वारे संबंधित विशेष पदभरती राबविण्यात आली परंतु अद्याप नागपूर खंडपीठाने आदेश देऊन ही जळगांव जिल्हा परिषदेने ती पूर्ण केली नाही,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेमार्फत अद्याप पर्यंत अनेक वेळा निवेदनांद्वारे ही भरती जिल्ह्यात का राबविण्यात आली नाही याचा खुलासा जिल्हाधिकारी व त्यांचे मार्फत जिल्हा परिषदेचे आयुक्त, शिक्षणाधिकारी यांना विचारण्यात आला होता परंतु कोणतेही प्रत्युत्तर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेकडून आम्हाला अद्याप प्राप्त झालेले नाही, तरी हे शेवटचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत संबंधित सर्व विभागांना देण्यात येत असून येत्या ८ दिवसांत आदिवासी जमातीच्या विषेश पदभरती बाबत मा. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास आदेशाची अवमानता समजून संबंधित सर्व विभाग प्रमुखांविरोधात जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येऊन जोवर भरती होत नाही तोवर आमरण उपोषण करून आंदोलन छेडण्याचा ईशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेद्वारे देण्यात आला,
यावेळी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांना निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख करण शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष प्रविण पावरा, जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष लियाकत तडवी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

महिलेच्या नावाने सोशल मिडियाच्या माध्यमातून (हनी टॅप) श्रीमंतांना जाळ्यात अडकविणारा पुरुष आरोपी यवतमाळ पोलीसांच्या जाळ्यात

0

 

हंसराज उके अमरावती

सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रुपयांची फसवणूक
झाल्याचु तक्रार प्राप्त होताच अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा गुन्ह्यातील आरोपी निशपंन्न करून फसवणूकिची हस्तगत करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले सोशल मिडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकित
डाॅक्टरा सोबत मैत्री पुर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांचे कडुन दोन कोटी रोख रक्कम मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली त्यानंतर स्वतः चे अकाउंट अचानक बंद केल्याने स्वताची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने थेट
यवतमाळ गाठत पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे समक्ष येऊन आपलीं आपबिती सांगितली सदर तक्रारी चे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी त्वरित उपविभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ व सायबर सेल घटनेची शाहनिशा करुन आरोपी निशपंन्न करण्याबाबत निर्देशीत केले. त्या अनुषंगाने सायबर सेल यवतमाळ यांनी तक्रार दार यांची फसवणूक करणाऱ्या महिलेची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण केले असता डाॅक्टरची फसवणूक करणारी महिला नसुन तो पुरुष असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली प्राप्त
माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठित करून
अरुणोदय सोसायटी एका
घरी किरायाने इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी नामे संदेश अनिल मानकर नावाच्या इसमा कडुन १७२७००० अक्षरी
एक कोटी बाहत्तर लाख सात हजार रुपये निधी व
चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चार विविध कंपन्यांचे मोबाईल
फोन असा एकूण १७८०६१९८अक्षरी एक कोटी अठ्यात्तर लाख सहा हजार एकशे अठ्यानु रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले सदरची कार्यवाही डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ के एन धरने अप्पर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी
बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड पोलीस हवालदार
गजानन डोंगरे पोना विशाल भगत उल्हास कुरकुटे कविश पाळेकर पोलीस कॉन्स्टेबल महम्मद भगतवाले सलमान शेख पंकज झेंडेकर पंकज गिरी सर्व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी यशविरीत्या कार्यवाही पार पाडली नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर करताना अन ओळखी व्यक्तीवर विश्र्वास ठेवून त्यांना एन्टरटे करण्याची कितीही मोठी किंमत मोजावी लागु शकते हे या घटनेतुन स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन यवतमाळ पोलीस करण्यात आले

महिला मुख्याध्यापिकेच्या अथक प्रयत्नातून साकारली आदर्श उर्दू शाळा

0

 

प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा बीड कडून जि प उर्दू शाळा मोमिनपुरा मधील शिक्षकांचा कार्य गौरव

बीड दि.०४ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या शात्रेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णया नुसार ५ सप्टेंबर च्या निमित्ताने सबंध महाराष्ट्रभर शिक्षक कार्य गौरव करून थँक अ टीचर अभियान राबवले जात आहे. प्रत्येक शिक्षकाचे कार्य हे ज्ञानदानाचे असल्याने ते पवित्र व आदर्शवत असेच असते. परंतु केवड्याचा सुगंध जसा संपूर्ण जंगलात सुगंध पसरवून जातो, तसा आपल्या कार्याच्या सुगंधाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमिनपुरा उर्टू माध्यम केंद्र अशोक नगर ही शाळा बीड जिल्ह्यामध्ये आदर्श व शासनाचे १००% उपक्रम राबविल्यानंतर शाळेची रुपडे कशी बदलू शकते हे दर्शविणारे मॉडेल स्कुल ठरले आहे. म्हणूनच प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची विभागीय उपाध्यक्ष श्री पांडुरंग उनवणे, जिल्हाध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी, जिल्हा सचिव श्री अविनाश काळे, महिला कार्याध्यक्षा सय्यद मुमताज बाजी, उर्दू विभाग प्रमुख मिर्झा हसनात, बीड तालुकाध्यक्ष सय्यद जिलानी संपर्कप्रमुख श्री राजाराम लकडे ,कोषाध्यक्ष श्री उत्तरेश्वर बजगुडे,उपाध्यक्ष श्री शेख ऐनुद्दीन बशीरोद्दीन शाळेला भेट देऊन त्यांचा कार्य गौरव नुकताच केला. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमीनपुरा बीड ही शाळा उत्कृष्ट शाळा म्हणून सध्या चर्चेत आहे आणि यामागे आहे ती एक महिला मुख्याध्यापिका श्रीमती आलिया बाजी आणि त्यांचा सहकारी शिक्षक वृंद!! अथक परिश्रम ,उत्कृष्ट समन्वय ,शिस्त ,आदर्श प्रशासन विद्यार्थ्याप्रती असलेली बांधिलकी या सर्वांचा उत्कृष्ट समवाय या शाळेत प्रवेश करताच अनुभवास येतो.
या शाळेतील नीटनेटकेपणा शिक्षकांमधील उत्साह व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर एक वेगळाच अनुभव देणारा आहे. सुंदर माझे कार्यालय, बाला उपक्रम, कुंडीतील सुंदर वनराई, प्रत्येक वर्गखोली डिजिटल तंत्रज्ञानाने तयार केलेली, सुसज्ज वाचनालय व शाल्रेय पोषण आहारातील गुणवत्ता व दर्जा,अशा एक ना अनेक बाबी पाहून यामागे असलेल्री शिक्षकांची समर्पण, त्याग व आपल्या व्यवसायात प्रती असलेली निष्ठा यांचे दर्शन घडवते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आलिया बाजी, त्यांचे सहकारी श्री मोमीन सर व सर्व महिला शिक्षिका यांनी अत्यंत ताकतीने या शाळेचे काम उभे केलेले पाहण्यास मिळाले. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा बीड च्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आलिया बाजी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करून करण्यात आला. याप्रसंगी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व सर्वतोपरी सहकार्य प्रहार शिक्षक संघटना सातत्याने करत राहील असे जाहीर केले तर विभागीय उपाध्यक्ष पांडुरंग उनवणे यांनी अशा शिक्षकांच्या व शाळेच्या पाठीशी प्रहार शिक्षक संघटना नेहमीच उभी राहील असे वचन दिले. महिला
कार्याध्यक्षा सय्यद मुमताज बाजी यांनी महिला शिक्षकांनी अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य बजावून समाजाच्या उभारणीत हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्‍त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेची उर्दू विभाग प्रमुख मिर्झा हसनात सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे बीड तालुका अध्यक्ष श्री सय्यद जिलानी यांनी मानले.

तालुक्यातील जामुनझीरा येथे अर्धवट शिजलेले अंडी प्रकरणी आज पंचायत समितीचे उप सभापती योगेश भंगाळे यांनी गावाला जावुन परिस्थितीची पाहणी करून आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

.दरम्यान या संदर्भात यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या आदीवासी वस्तीवर एकात्मीक महीला व बालविकास विभागाच्या माध्यमातुन डॉ एपीजे अब्दुल कलाम अमृत पोषण आहार योजनेअंतर्गत ६ महीने ते ६ वर्ष वयोगटातील बाळांना व गरोदर मातांना विविध पौष्टीक आहार आंगणवाडी सेविकेंच्या हस्ते पुरविण्यात येत असते असे ,दरम्यान काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी जामुनझीरा येथील सेविका अंतीबाई प्यारसिंग बारेला म्हणुन कार्य करीत असलेल्या जामुनझीरा गावात आंगवाडी सेविकेने बाळांना अर्धवट शिजवलेले बॉईल अंडी वाटप केल्याने गावातील संतत्प आदीवासी बांधवांनी यावल येथील एकात्मीक महीला व बालविकास कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची भेट घेवुन या संदर्भात तक्रार दिली असुन , या अनुषंगा पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी जामुनझीरा या आदीवासी गावाला भेट दिली व आदीवासी बांधवांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या , या वेळी त्यांच्या सोबत एकात्मिक महीला व बालविकास कार्यालयाच्या सौखेडा सिम विभागाच्या पर्यवेक्षिका पी एस पाटील , मोहराळा येथील सामाजीक कार्यकर्ते लहु रामभाऊ पाटील गावातील पोलीस पाटील हिरा पावरा , बिलारसिंग पावरा हे सोबत होते, यावेळी सदरच्या आंगणवाडी सेविका अंतीबाई बारेला यांच्या विरूध्द करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या कड्डन पोषण आहार वितरणाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात काढुन घेण्यात आली असुन , नसीमा तडवी यांच्याकडे पोषण आहार वाटपाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहीती पर्यवेक्षिका पी एस पाटील यांनी दिली .

कापुसतळणी येथील कृषी केंद्राचा प्रताप सोयाबीन पिकावर फवारणीसाठी शिफारस नसलेली औषध दिल्याचा प्रकार.

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

प्रहार उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांच्या प्रयत्नाला यश.
कीटकनाशक तपासणी शास्त्रज्ञ समिती अहवाल निष्कर्षावरून औषध विक्रेता व कंपनीवर फौजदारी होणार.
कापूसतळणी येथील शेतकरी मधुकर देविदास काळे यांचे सराय मौजे मधील आठ एकर शेतात दि.१७ जूनला पेरणी केलेलं सोयाबीन पिक विक्रमी उत्पन्न असलेल्या फुलोल्या स्थितीत कापुसतळणी येथील सागर ॲग्रो सर्विस या कीटकनाशक दुकान दाराच्या सल्याने पिकांवर फवारणी केली. सात – आठ दिवसानंतर पिकाची पाहणी केली असता संपूर्ण फुलाची गळ झाल्याचे दिसून आले. ही बाब कीटकनाशक विक्रेता लक्ष्मीकांत राठी यांना सांगितले. परंतु श्री राठी यांनी सदर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आठ दिवस वेळ मारली. खरंतर औषध विक्रेता यांनी सदर औषध कंपनीला माहिती देऊन सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु औषध विक्रेत्यांनी तसे केले नाही म्हणून शेतकऱ्यांनी ही बाब परिसरातील शेतकऱ्यांना सांगितले असता ४०-५० शेतकऱ्यांनी गावातील शेतकऱ्यांचा कैवारी प्रहार संघटना उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांची भेट घेतली व श्री शेवाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आणि लगेच तालुका कृषी अधिकारी यांना दि.२७/८/२०२१ ला निवेदन दिले आणि दि. ३/९/२०२१ पर्यंत सदर पिकाची पाहणी शास्त्रज्ञां करून दोषींवर कारवाई करणे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 30 क्विंटल भरपाई मिळावी अन्यथा दि.३/९/२०२१ ला सदर शेतात अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक २/९/२०२१ ला समिती गठित करण्यात आली या समितीमध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकनाशक शास्त्रज्ञ कु. सोनल नागे, सदस्य तसेच एम .जी .कोरे (ता.कृ.अ.) सदस्य, ए.बी .राठोड (कृ.अ.प.स.) सदस्य सचिव, जी. आर. मोरे (कृ.अ.) एम .एम. जाधव(कृ.स.), तक्रार कर्ता अरुण शेवाणे, औषध विक्रेता लक्ष्मिकांत राठी , आदामा कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मोरे,पंच संजय हिंगे, प्रशांत सरदार, गजानन हरणे, शेतकरी सत्यम काळे आदींच्या समक्ष पाहणी झाली. समितीचा निष्कर्ष असा की, क्लोरोपायरीफॉस+सायपरमेथ्रीन हे औषध सोयाबीन पिकासाठी शिफारशीत नसल्यामुळे सोयाबीन पिकाचा संपूर्ण फुलोऱ्याची गळ झाली आणि भविष्यात उत्पन्न होऊ शकणार नाही अशाप्रकारे औषध विक्रेता दोषी असल्याचे सिद्ध झाले. म्हणून औषध विक्रेता व कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना हे. 30 क्विंटल ची मदत मिळावी अशी मागणी तक्रार कर्ते अरुण शेवाणे व शेतकऱ्यांनी केली आहे.

धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप दादा अडसड यांना प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांचे उर्वरित घरकुलाचा निधी मिळावा, व मंजूर झालेल्या डी पी आर चे अनुदान निधी त्वरित मिळावे घरकुल लाभार्थी व मा क प शिष्टमंडळांनी घेतली भेट

0

नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर समोर 25, 26, 27 2021 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वा घरकुल लाभार्थी यांच्या वतीने राहुटी आंदोलन करण्यात आले 27 तारखेला एल्गार सभेतून आंदोलनाची सांगता करण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप दादा अडसड यांनी आंदोलन कर्त्याशी फोनवरून संवाद साधला व शब्द दिला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पैशाचा लवकरात लवकर पाठपुरावा करणार व त्याबाबतचे मला निवेदन द्या असे फोन वरुण आमदार साहेबांनी सांगितले होते त्या आशयाचे निवेदन मा क प शिष्टमंडळ व प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांनी आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले

उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांनी कुटकी येथील शेतात केली अँपवर ई पिक नोंद

0

 

महाराष्ट्र शासनाचा माझा सातबारा माझी पिकनोंद, ई पिक पाहणी मोहिमे अंतर्गत हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांनी शेतकऱ्यांना स्वतः पिकाची नोंद करता यावी याकरिता कुटकी येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ऍपचे प्रत्यक्षिक करुन दाखविले यावेळी घोडमारे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट,मेश्राम तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट, समाशेर पठाण नायब तहसीलदार हिंगणघाट, संजय भोंग मंडळ अधिकारी अल्लीपूर, तलाठी दिपक अंधारे, अभिष रामटेके, कृषिसहाय्य्क कु. पवळ सरपंच माधुरी बोभाटे शेतकरी श्रीकांत महाजन, कृषीमित्र कापसे आणि गावकरी उपस्थित होते. या उपक्रमाचा पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांची नोंद अपद्वारे स्वतःच करावी असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी शेतकऱ्यांना केले
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा

जामुनझिरा आदिवासी वस्तीवर अमृत आहार योजनेत वाटले अर्धवट बॉइल अंडे, आदीवासी नागरीकांची तक्रार.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत वाटले अंडे हे
अर्धवट शिजवलेली असल्याची तक्रार नागरीकांनी केली व थेट अर्धवट कच्चे अंडे घेवुन त्यांनी यावल येथील महीला व बालविकास कार्यालय गाठत अर्धवट अंडी शिजवणाऱ्या सेविकेची लिखित तक्रार केली आहे.
येथील महीला व बालविकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत आदीवासी वस्तीवरील गरोदर मातांना शिजलेली अंडी अंगणवाडीच्या माध्यमातुन वितरण केली जातात तेव्हा यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या जामुनझिरा या आदीवासी वस्तीवर असलेल्या आंगणवाडी सेविकेने चक्क अर्धवट शिजलेले अर्थात अर्धवट बॉइल अंडे वितरण केले तेव्हा हा प्रकार नागरीकांच्या निदर्शनास येताच नागरीकांना अर्धवट बॉइल अंडी घेवुन थेट यावल येथील एकात्मिक महिला, बाल विकास कार्यालय गाठले व प्रकल्प अधिकारी यांना अंडी दाखवत सेविके विरूध्द तक्रार केली व अशा प्रकारे अर्धवट बॉइल केलेले अंडे वाटणाऱ्या सेविकेवर कारवाईची मागणी पोलिस पाटील हिरा पावरा, बिलारसिंग पावरा, भावसिंग पावरा, भाईराम पावरा, नरसिंग बारेला आदींनी केली आहे तेव्हा या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधीत आंगणवाडी सेविकेस नोटीस बजावण्यात आली असुन संर्दभात दोन दिवसात सदरील सेविके कडून लेखी खुलासा मांगवण्यात येईल यात ती दोषी आढळल्यास तिच्या विरूध्द कारवाई करण्यात येईल असे प्रसंगी महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगीतले. दरम्यान सदरची पोषण आहार वितरण करणाऱ्या सेविके कडुन ही जबाबदारी काढुन घेण्यात यावे असे ही तक्रारकर्ते आदीवासी बांधव यांनी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याशी बोलतांना सांगीतले .

न्हावी ग्रामपंचायत भ्रष्ठाचार रुपी प्रश्नांची माहीती देण्यास प्रशासन टाळाटाळ माहीती न मिळाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन : भीमआर्मीचा इशारा

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या दलीत वस्ती सुधार योजने बोगस व निकृष्ठ कामे तसेच ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचारी कारभारातुन झालेल्या विविध विकास कामांची माहीती मिळावी या दृष्टीकोणातुन भिमआर्मीच्या वतीने मागील सात दिवसांपूर्वी म्हणजेच दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून निवेदन देण्यात आलेले होते, न्हावी तालुका यावल ग्रामपंचायतीला लाभलेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजवर ६० लक्ष रुपयांच्या निधीतुन ग्रामस्तरावर यशवंत बोरोले यांच्या वाडयापासुन पवन मिस्त्री ( रोझोदा रोड ) यांच्या घरापर्यंत स्वच्छतेचा विचार करून वाढते घाणीचे साम्राज्य बघता ओतीव गटारीच्या झालेल्या कामांची माहीती तसेच महीला शौचालय , समाज मंदीर आदी कामांची सविस्तर माहिती तसेच ठरावीत झालेल्या कामांचे अंदाजपत्रक व आराखडा देऊन विविध प्रश्न घेऊन आम्ही आपल्या कडे निवेदन सादर केले परंतु सदर बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ही सर्व जाणूनबुजून कानाडोळा करत आहे की असे आजवर दिसुन येत आहे . सदरची माहीतीची प्रशासन पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुळे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व उपस्थित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट यांच्या वतीने न्हावी येथील ग्रामपंचायती समोर दि.१५ सप्टेंबर रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, याची प्रशासन स्तरावर आपण नोंद घ्यावी व तात्काळ मागणीची पूर्तता करण्यास कार्यवाही करावी अशी विनंती असे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . याप्रसंगी भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव, राज्यप्रवक्ता रमाकांत तायडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे, भीमआर्मीचे यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे , तालुका महासचिव प्रशांत तायडे, यावल येथील भीम आर्मीचे सदस्य मंथन महीरे, छोटू कोचुरे ,बाबु सुरवाडे आदी प्रमुख पदधीकारी व कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते . दरम्यान न्हावी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवुन विकासकामे करण्यात आली असुन , माहीती प्राप्त झाल्यावर सत्य समोर येईल असा विश्वास भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदानशिव यांनी व्यक्त केले आहे .