Home Blog Page 412

सोशल मीडियातील भाईगिरी भोवली; दगडी येथील बाप-लेकाच्या विरूध्द गुन्हा दाखल व अटक

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

व्हाटसअप स्टेटसवर शस्त्रांचे प्रदर्शन करून भाईगिरीची हौस बाप व त्याच्या मुलाच्या अंगलट आली असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील दगडी येथील हिरामण मोतीराम मोरे (वय ५७) आणि त्यांचा मुलगा अशोक हिरामण मोरे (वय २६) यांनी व्हाटसअपच्या स्टेटससाठी शॉर्ट व्हिडीओ तयार केला. यात हिरामण मोरे यांच्या हातात देशी बंदूक तर त्यांच्या मुलाच्या हातामध्ये तलवार दिसून येत आहे. याला एडिट करून आपल्या कथित शत्रूंना यातून अशोक मोरे याने धमकावले आहे. दगडी गावासह परिसरात सोशल मीडियावरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन यावल पोलीस स्थानकाच्या पथकाने आज दगडी गाव गाठून हिरामण मोतीराम मोरे आणि त्याचा मुलगा अशोक हिरामण मोरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बंदूक आणि तलवार देखील जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या विरूध्द भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच चर्चा सुरू असून या बाप-बेट्याला सोशल मीडियातील भाईगिरी भोवल्याचे मानले जात आहे. या संदर्भात यावल पोलीसात आर्मएक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन,
या गुन्ह्याची कारवाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस अमलदार संजय लक्ष्मण देवरे, कॉन्स्टेबल निलेश वाघ व चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली. सदरच्या बाप लेकांने केलेल्या सोशल मिडीयावरील भाईगिरीची प्रसारच्या गोंधळाची यावल तालुक्यात सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे .

अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्रच्या वतीने आज ३० आगस्ट २०२१पुणे येथील आयुक्त कार्यालयावर २०२०च्या पिक विमा मागणी करिता आंदोलन…..

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

आज दिनांक ३० आगस्ट २०२१रोजी पुणे राज्य कृषी आयुक्तालयावर भारतीय किसान सभा महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन.२०२०शेतकर्याना पिक विमा मिळावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा हक्कासाठी पिक विमा योजना लागू करुन शेतकऱ्यांच्या शेती मधले
सोयाबीन तुर कपाशी मुंग इतर सर्व पिके नष्ट झाली होती. पावसाचे पाणी जास्त झाले मुळे शेतकऱ्यांचा शेतातील पिके संपूर्ण वाहुन गेले होते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीमुळे शेतातील पिके संपूर्ण वाहुन गेले होते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीत पिके करपून शेतकऱ्यांचे पुर्णपणे नष्ट झाले असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभाग व कृषी विभाग यांनी सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिके संपूर्ण करपून गेली व शेतकरी राजा हा संकटात सापडला आहे म्हणून सरकारने हेक्टर मर्यादा ठरवून सरकारने दोन हेक्टरला आठ ते दहा हजार रुपये पर्यंत शेतकऱ्या प्रती सहानुभूती दाखवत मदत केली सरकारने पिक विमा देण्यास कुचराई करीत आहे एकीकडे सरकार अतिसृष्टीत मदत केली
पण विमा कंपनी शेतकऱ्यांच्या प्रती कुचराई करीत असल्याचे दिसून येत आहे

नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

0

 

प्रतिनिधी, सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)

चार ते पाच दिवस चालणार्‍या संततधार पावसामुळे घाटमाथा परिसरातील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेने या परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तालूक्यातील घाटमाथा परिसरात संततधारेमुळे झालेल्या कपाशी पिकांची पाहणी करण्यासाठी नांदगांव प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बोलठाण, जातेगांव, लोढरा, ढेकू परिसरात जाऊन नुकसानीचा आढावा घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या असता.चार ते पाच दिवस चालणार्‍या पावसामुळे कपाशी पिके पूर्णतः सूकून गेली आहेत. शेतकर्‍यांवर आलेल्या या अस्मानी संकटामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन व पिक विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी या आशेत आहे. परिसरात प्रशासनाकडून व विमा कंपनी प्रतिनिधींकडून अजूनही नुकसान झालेल्या कपाशी पिकांची पाहणी झाली नाही व पंचनामेही झाले नाही असे दिसून आले.यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहत आहे.विमा कंपनीला पिक नुकसानीची तक्रार आॅनलाईन दाखल केलेल्या बर्‍याच शेतकर्‍याच्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून अजूनही झालेले नाही.तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातील बर्‍याच शेतकरीवर्गाला तक्रार दाखल करणे शक्यही नाही .प्रहार संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना विनंती आहे की, प्रशासनाने कृषी सहायक तलाठी व विमा कंपनी प्रतिनिधींनी सदर परिसरात लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करावी.नूकसानीसंदर्भात आकडेवारी जाहीर करुन शासनाला माहिती पूरवावी व शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करावा. ज्या प्रमाणे शेतकर्‍यांना नुकसानीचा फायदा मिळण्यासाठी प्रशासन व पिक विमा कंपनीकडून विमा भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. तसेच अनेक वंचित शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना प्रशासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी.प्रशासनाकडून विमा कंपन्यांना पंचनाम्यांचे आदेश देऊन अंतिम शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.*
प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी तालूक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांना विनंती केली की, एक हक्काचे लोकप्रतिनिधी म्हणून या हंगामातीलही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या या प्रश्नात विशेष लक्ष घालून प्रशासनाला पाठपूरावा करावा .येत्या दोन तीन दिवसांत सर्वच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाठपुरावा करावा.
कोणत्याही विमा कंपनीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची टाळाटाळ केल्यास संबंधित विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी तालूक्यात फिरु देणार नाही.कृषीसहायक, तलाठी यांनी नूकसानग्रस्त भागातील नूकसानीबाबत अहवाल प्रशासनाला तत्काळ पाठवावा.अशा प्रकारे प्रहार शेतकरी संघटनेकडून आवाहन करण्यात आले.यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे, जातेगांव शाखा अध्यक्ष जनार्दन भागवत,संपर्क प्रमुख ईश्वर जाधव, रविकांत भागवत, राहूल पवार, तसेच प्रहार सेवक व शेतकरी उपस्थित होते.

डांभूर्णी येथे आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी रस्ता रुंदीकरण, रस्ता कॉक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन यांच्या हस्ते करण्यात आले.

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

डांभूर्णी येथे आमदार आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने पहूर, जळगाव, इंदौर, किनगाव, लंगडा आंबा रस्ता रा.मा. ४२ कि.मी. ५३/४०० ते ५९/०० (भाग विदगाव ते डांभूर्णी) ची रुंदीकारणासह सुधारणा करणे अंदाजित रक्कम रु. २८०.०० लक्ष व पहूर, जळगाव, किनगाव, लंगडा आंबा रस्ता रा.मा. ४२ वरील डांभूर्णी गावातील लांबी कॉक्रीटीकरण करणे अंदाजित रक्कम रु. ५६.०० लक्ष असे एकूण ३३६.०० लक्ष रुपयांचे मंजूर अशा विविध विकासकामांचे भुमिपूजन सोहळा आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आ. प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख व शिवसेना लोकसभा सह संपर्क प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, जिल्हा महानगर प्रमुख शरद तायडे, उपजिल्हा मुन्ना भाऊ प्रमुख रवि सोनवणे, माणिक महाजन, युवासेने तालुका प्रमुख गोटूभाऊ सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके, शिवाजी पाटील, उपतालुका प्रमुख योगेश पाटील, उपतालुका संघटक विनायक पाटील, एल. व्ही. गोटू साळुंके पाटील, सुधाकर पाटील, शरद कोळी, गिरडगाव सरपंच मधुकर पाटील, डाभुर्णी सरपंच लताताई कोळी, पिंप्री सरपंच मोहन कोळी, सुरेखाताई कोळी, मुरलीधर पाटील, आण्णा कोळी, बाळू पाटील, संजय कोळी, जितू कोळी, सुनिल फालक, योगेश कोळी, भैय्या धनगर, निलेश सोळुंके, दिनेश सोळुंके, पंढरीनाथ कोळी, सुनील साठे, भारसिंग पावरा, रोहिदास महाजन, श्रावण कोळी, श्रीराम महाराज, राजेंद्र पाटील, बाळू पाटील, निलेश पाटील, भरत चौधरी, दीपक कोळी, मनोहर भालेराव, आशिष झुरळकर, पराग महाजन, गोकुळ कोळी, विनायक सोनवणे, समाधान सोनवणे, प्रल्हाद कोळी, राजेंद्र कोळी, गोकुळ साळुंके, अशोक पाटील, हेमंत पाटील, सूर्यभान पाटील, प्रकाश कोळी, पंकज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळीची प्रमुख उपस्थिती होती.

भीम आर्मी ने दिले प्रशासनास स्मरण पत्र,तर 1 सप्टेंबर रोजी चुंचाळे फाट्यावर रस्ता रोको आंदोलन

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

। भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट आणि यावल तालुका युनिटने झोपलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील चुंचाळे गावातील रस्त्यांबाबत स्मरणपत्राव्दारे पुनश्च आठवण करुन दिली. अन्यथा, मागणी पुर्ण न झाल्यास येत्या (दि.१) सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

तथापि, “भीमा आर्मी” च्या शिष्टमंडळाने चुंचाळे गाव आणि चुंचाळे फाटा दरम्यानची स्थिती पाहून सुधारणा करण्याची मागणी केली होती. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने रस्ता खराब आहे. त्यामळे सर्व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अश्या या नादुरुस्त रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी “भिम आर्मी” ने लावून धरली. मात्र झोपलेले प्रशासन काही जागे झाले नाही. काही कार्यवाही करण्यात प्रशासन अपयशी ठरले. परंतु प्रशासन जरी झोपलेले असले तरी “भिम आर्मी” प्रशासनाला जागं करेल, कारण इथं प्रश्न नागरिकांच्या जीवाचा आहे. अशी आक्रमक भूमिका घेत आज (दि.२७ ऑगस्ट) रोजी “भिम आर्मी” च्या वतीने यावल गटविकास अधिकारी, यावल सा. बां. वि., यावल तहसीलदार व फैजपूर प्रांताधिकारी कार्यालय यांना स्मरणपत्र देण्यात आले. अन्यथा, येत्या ०१ सप्टेंबर रोजी “भिम आर्मी” च्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा देण्यात आला.

तसेच, दि.०१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या रास्ता रोको आंदोलनाला पोलीस परवानगी मिळावी यासाठी यावल पोलीस निरीक्षक याना विनंतीपर निवेदन देण्यात आले. सदर निवेदन व स्मरण पत्र देते समयी, “भिम आर्मी” राज्य सचिव सुपडू संदानशिव, यावल तालुका प्रमुख मा.हेमराज भाऊ तायडे, तालुका महासचिव प्रशांत तायडे, तालुका उप-प्रमुख आकाश बिऱ्हाडे, सत्यवान तायडे, सचिन वानखेडे, भैय्या तडवी, मा.सचिन पारधे, पंकज डांबरे, चंदू पारधे आदी उपस्थिती होते.

शिवसेनेकडून भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी

0

 

हिंगणघाट दि.२८ ऑगस्ट
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे भाजयुमोचेवतीने आज शहरातील जयस्तम्भ चौकात दहन करण्यात आल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी याचा निषेध करीत भारतीय जनता पार्टीच्या सहभागी कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली.
आज दि.२८ रोजी शहरातील जयस्तंभ चौकात सकाळी ११ वाजताचे दरम्यान भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन केले,यानंतर संतप्त झालेल्या शिवसेना तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यानी ठाणेदार संपत चव्हाण यांना निवेदन देत सहभागी कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली.
यावेळी शिवसेनेचे सतीश धोबे,अभिनंदन मुणोत,प्रकाश अनासाने,मनीष देवढे,दशरथ ठाकरे,अनिल भोंगाड़े,सुरेश मुंजेवार,मनोज वरघणे,भास्कर ठवरे,नंदू रेडलावार,श्रीधर कोटकर,महेश खडसे,निखिल वाघ,मुन्ना त्रिवेदी,आकाश निखाड़े,आकाश निखाड़े,मुन्ना काशीनिवास,आशिष भांडे इत्यादि हजर होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

भाजयुमो कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळीत निषेध

0

 

हिंगणघाट दि.२८
शिवसेनेच्यावतीने भाजपानेत्यांच्या अवमान झाल्याच्या घटनांमधे दिवसेंदिवस वाढ होत असून याप्रकरणी कारवाई केल्या जात नाही,यासाठी संतप्त झालेल्या भारतीय युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळीत निषेध व्यक्त केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चप्पलीने मारतो,थोबाड फोड़तो अशी भर सभेत धमकी देण्यात आली होती.
आमदार संतोष बांगर यांनी कोथळा बाहेर काढील तसेच आमदार संजय गायकवाड़ यांनी घरात घुसुन मारण्याची धमकी दिली.
यवतमाळ शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष ठेवळे यांनी एनकाउंटर करु अशी धमकी केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांना दिली आहे.
यासंदर्भात आज दि.२८ रोजी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात महाविकास आघाड़ीचे सरकार असल्यामुळे व त्यात शिवसेना महत्वाच्या भुमिकेत आहे त्यामुळे वरील कुठल्यास नेत्यांवर अजुन पर्यंत कुठलेही गुन्हेदाखल किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही,त्यामुळे शहरातील जयस्तम्भ चौक येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.या वेळी युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री कवीश्वर इंगोले,युवा मोर्चा अध्यक्ष सोनु पांडे,तालुका अध्यक्ष विठु बेनिवार,नगरसेवक सोनु गवळी,सिंदि रेल्वे युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमोल गवळी,समुद्रपुर तालुका अध्यक्ष संकेत गवळी,यु. मो.शहर महामंत्री स्वप्निल शर्मा,अतुल नंदागवळी,स्वप्निल सुरकार, गौरव ताबोळी,राहुल दारुनकर,नितीन नादे, सतीष खोंडे, भूषण राऊत, सौरभ वसु,अभय झाड़े, नयन नदवटे,मुकेश गुजराती इत्यादिसह जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

कोळन्हावी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर (गोटू) सोळंके व उपाध्यक्ष अश्विनी साळुंके यांची निवड

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील कोळन्हावी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर (गोटु) सोळंके व उपाध्यक्षपदी अश्विनी सोळंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे समितीचे सदस्य म्हणून ज्योतीताई सोळंके, सरलाताई सपकाळे, विद्याताई सोळंके, अनिताताई सुरवाडे, ललिताई सोळंके, पितांबर सोळंके, गंगाधर सपकाळे, विकास (गोटु) सोळंके, रेणुका सोळंके, शुभम सोनवणे, सचिव लालचंद साळुंखे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळुंके व उपाध्यक्ष अश्विनी सोळुंके यांचे तसेच सर्व सदस्यांचे स्वागत शाळेच्या वतीने आणि ग्रामपंचायत कोळन्हावी गावाच्या वतीने सरपंच मंजुषा सोळंके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या बैठकीला शाळेतील शिक्षक राजेंद्र साळुंके, प्रमोद रानेराजपुत, शहाजी चौधरी, शीतल बाविस्कर यांच्यासह विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन नारायण कुंभार यांनी केले.

पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारल्यानंतर शेंदुर्णीस त्यांची ही पहिलीच व अनोखा भेट

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

पहुर पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या अनोख्या अशा Talk With Morning Walk या उपक्रमाची सुरुवात आज शेंदुर्णी पासुन झाली असुन यात जनतेच्या समस्या समजावुन घ्यायच्या ,सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता अबाधित ठेऊन पोलीस व जनता यांच्या मध्ये विश्वासाचे नातं अधिक दृढ व्हावे यासाठी हा अभिनव प्रयोग पो.नि.अरुण धनवडे हे सातत्याने राबवित असतात.
भल्या पहाटे आपल्या पोलीस स्टेशनच्या एका गावात एकट्यानेच पायी चालत जायचे,तेथे गेल्यानंतर जनतेच्या समस्या, अडचणी समजुन घ्यायच्या व तात्काळ त्यावर कायद्याच्या चौकटीत राहुन त्या समस्येवर मार्ग काढायचा असा पो.नि.अरुण धनवडे यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
आज पहुर ते शेंदुर्णी हे ११ कि.मी.अंतर पायी चालत जात ते पहाटे शेंदुर्णीत पोहचले ,पो.नि.अरुण धनवडे यांनी पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारल्यानंतर शेंदुर्णीस त्यांची ही पहिलीच व अनोखा भेट होती.यावेळी शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे भेट दिली. यावेळी शेंदुर्णीच्या पोलीस पाटील कु.ममता देविदास सुर्यवंशी यांनी व पोलीस बांधवांनी पो.नि.अरुण धनवडे यांचे स्वागत केले. यावेळी शेंदुर्णी पंचक्रोशीतील संवेदनशील गावांची माहिती घेत कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देत मार्गदर्शक सुचना केल्यात.
या अभिनव उपक्रमाचे सर्व स्थरातुन स्वागत होत असुन साहेब आपल्या गावात ही भावना सर्व सामान्य माणसाला अधिक भावनारी आहे.

माकपाच्या एल्गार सभेने राहुटी आंदोलनाची सांगता

0

 

प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांचे निवेदन न स्वीकारणाऱ्या मुख्यधिकारी यांचा केला निषेध

नांदगाव खंडेश्वर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शहर कमिटी प्रधानमंत्री आवास योजना वापस लाभार्थी यांचे वतीने तीन दिवसीय राहुटी आंदोलनाची सांगता. एल्गार सभा घेऊन करण्यात आली. सभेला जिल्हा सचिव महादेव गारपवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सभेला तालुका सचिव श्याम शिंदे यांनी एल्गार सभेला संबोधित करताना. म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते तात्काळ मिळाले पाहिजे पण आवास योजनेची हप्ते घरात बसून मिळणार नाही. त्यासाठी जमिनीवरचा संघर्ष करावा लागेल. व त्याचे नेतृत्व लालबावटाच करेल. आणि येणाऱ्या पुढील काळात नगरपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पाई मार्च काढण्याचा एल्गार पुकारण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिल्या लाभार्थी यादीतील 110 लाभार्थ्यांचे घर बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनुदान वितरित केला, 400 लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर आहे. लाभार्थ्यांना अनुदान द्या, प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची लॉग इन साईड सुरु करा. वाढत्या मागणीनुसार 5 लाख रुपये घरकुल अनुदान द्या, राहुटी आंदोलनाचे नेतृत्व तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अब्दुल मोहसीन, प्रकाश मारोटकर, पुडलिक पुंड, गजानन मारोटकर, देविदास मारोटकर, विनोद गोलाईत, राजेंद्र शामसुंदर, यांनी केले, एलगार सभेला किसान सभेचे अध्यक्ष अनिल मारोटकर, तालुका सचिव दिलीप महल्ले, सुनील बावणे, राजू डोके, रामदास मते, ज्ञानेश्वर शिंदे, शहंशाह, आशिष रावेकर, काचन कटाने, लक्ष्मी सोळंके, अरुणा फुरसुगे, कातेश्वर पुंड, लक्ष्मण झिमटे, बबलू कठाने, राजेंद्र राऊत, दीपक अंबाडरे, रुस्तम भाई, बहादूरखान, वैद्य खा, शे युसूफ, कदीर भाई, बाबाराव वाघाडे, तसेच एल्गार सभेचे प्रास्ताविक राजगुरू शिंदे यांनी केले. व आंदोलनाची सांगता केली मुख्याधिकार्‍यांना राहुटी आंदोलकानी विनंती केली होती की शुक्रवारला सायंकाळी 5: वाजता निवेदन स्वीकारण्याकरीता यावे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नावे होते. त्यावर आवास योजनेच्या 150 लाभार्थ्यांचा सह्या घेऊन हे निवेदन संतत्त लाभार्थ्यांनी नगरपंचायतच्या गेटला चिटकवून निषेध केला. आंदोलकाचे निवेदन न स्वीकारणे ही लोकशाहीची चेष्टा आहे.
आमदार प्रताप अडसड यांनी साधला आंदोलकांशी फोनवरून संपर्क बोलताना म्हणाले की, राहुटी आंदोलनाची या विभागाचे आमदार असल्याने दखल घेतो. तुमाला शब्द देतो की. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रश्न त्वरित काली काली निकाली काढण्याचे फोनवरून बोलताना शब्द दिला. व खासदार साहेब याच्याशी संपर्क करून पाठपुरावा करण्यास सांगतो