Home Blog Page 413

जिगाव प्रकल्पास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर नाव द्या करिता एक दिवसीय आंदोलन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

एक दिवसीय धरने आंदोलन जिगाव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर हे नाव देण्यात यावे या मागनिकरीता आँल इंडिया पँथर सेना नांदुरा तालुकाचे वतिने आज दि.२७/८/२०२१रोजी एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले असून सर्व पदाधिकारी उपस्थित होते व युवा भीम सेना सामाजिक संघटना स.अधक्ष भाई वैभव वानखडे यांच्या कडुन आँल इंडिया पँथर सेनेला जाहीर पाठिंबा जिल्हा अधक्ष अशांत रनित यांच्या कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवा भिम सेना पदाधिकारी उपस्थित होते अमोल वाकोडे. राहुल रनीत. युवराज रनीत. आकाश धुंदाळे. शुभम तायडे इत्यादि कार्यकरते उपस्थित होते

पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करावे – न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे

0

 

प्रतिनिधी । यावल विकी वानखेडे

न्यायालयात दीर्घकाळ खटले चालवण्यापेक्षा लोक आदालत मध्ये मध्यस्थी करून आपसात तडजोड करीत तात्काळ प्रकरणांचा निपटारा केल्यास वादी व प्रतिवादी दोघांनाही समाधान मिळते व कोण हरलं कोण जिंकलं हे न होता दोघंच जिंकतात म्हणून अधिकाधिक प्रमाणावर पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी केले ते शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
येथील न्यायालयामध्ये शुक्रवारी तालुका विधी सेवा समिती आणि स्थानिक वकील संघाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे होते तर शिबीराचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की येत्या २५ सप्टेंबर रोजी यावल न्यायालयामध्ये लोकआदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी न्यायालयात न्याय प्रतीक्षेत दीर्घकाळ रेंगाळत असलेली प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला पाहिजे व मध्यस्ती च्या माध्यमातून तडजोड करीत समतोल निकाल लावून घेतला पाहिजे. कारण न्यायालयात खटला चालवतांना वादी किंवा प्रतिवादी यातील एक जिंकतो तर एकाचा पराभव होतो मात्र, जर तुम्ही मध्यस्ती च्या माध्यमातून तडजोड करीत प्रकरण निकाली काढले तर दोघांनाही विजय प्राप्त होतो. म्हणून ना कोई हारा, ना कोई जीता, दोघं जिंकले असा एक वेगळा समाधान असतो आणि आपल्याला न्याय निर्वाळा देखील मिळतो. तेव्हा पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. या कायदेविषयक शिबिरात न्यायधिश एम. एस.बनचरे सोबत सह दिवानी न्यायधिश व्ही.एस.डामरे, वकील संघाचे सचिव एड. निलेश मोरे, एड. एस. आर. लोंढे, एड. यु. सी. बडगुजर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी एस. एस. तडवी, ऍड. देवेंद्र बाविस्कर, सरकारी वकील फरीद शेख सह सर्व वकील संघाच्या सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. ए. आर. सुरडकर यांनी केले तर आभार न्यायालय कक्ष अधीक्षक एस. बी. शुक्ला यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अधिक्षक एस. बी. शुक्ला, सी. एम. झोपे, के.के. लोंढे सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

हिंगणघाट शहरात कंपनी ठेकेदाराकडून कामगारांची पिळवणूक यांच्या समस्यांकडे कामगार अधिकारी यांचे दुर्लक्ष ?

0

 

हिंगणघाट  1)कंपनी नियमानुसार कोणतीही सुविधा जागेवर नाही.
2) कंपनी ठेकेदाराकडून कामगारांना दोन महिन्यापासून पगार नाही.
त्यामुळे कंपनी कामगारांनी काम बंद केले . याबाबत खुलासा करण्याकरिता भेट दिली असता जागेवर कंपनी च्या नावाचा बोर्ड नाही ? कंपनी कशाचे उत्पादन करते माहिती नाही ?
कंपनी मालक उदयसिंग विजयसिंग मोहता हे सांगितले परंतु ऑनलाइन पटवारी रेकॉर्ड तपासले असता या नावाने वनी शिवारात कुठेही शेत जमीन नव्हती तर या शिवारात गीमाटेक्स कंपनी, इंटिग्रेट टेक्स्टाईल पार्क या नावाने शेत जमिनी दाखवल्या त्यामुळे कंपनीबद्दल शंका निर्माण झाली . म्हणून आज ग्रामपंचायत वनी येथून माहिती घेतली असता ही कंपनी ब्रजलता विजय सिंग मोहता या नावाने आहे व आज येथील कामगारांना त्यांच्या कामाच्या हक्काचे पूर्ण पैसे मिळाल्याची माहिती मिळाली .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

भालशिव येथे झोक्यातुन पडुन डोक्यास गंभीर दुखापत होवुन उपचारा दरम्यान एक वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील भालशिव गावात एक वर्षाची लहान चिमकुलीचा झोक्यातुन पडुन मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असुन , यावल पोलीसात या संदर्भात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील भालशिव या गावातील शिवारात शेतात राहणार गिरीष पारधी यांची एक वर्षाची राषी गिरीष पारधी नांवाची मुलगी ही झोपडी मधील बांधलेल्या झोक्यातुन पडल्याने तिला डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला जळगाव येथे उपचारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी ५, ३० वाजेच्या उपचारा दरम्यान सुमारास तिचा दुदैवी मृत्यु झाला असुन, या संदर्भात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीकारी डॉ . रेणुका भंगाळे यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद वर्ग करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल अशोक जवरे हे करीत आहे .

अखेर त्या कुपोषणग्रस्त मरण पावलेल्या आठ महीन्याच्या आकाश पावराच्या मृत्युची नोंद यावल पोलीसात झाली

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

अखेर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागुन असलेल्या आसराबारी वस्तीवरील आठ महीन्याच्या बालकाचे कुपोषणामुळे जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याप्रकरणी यावल पोलीसात नोंद करण्यात आली आहे . या संदर्भातील पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की , आसराबारी तालुका यावल येथील राहणारे जवानसिंग पावरा यांच्या आठ महीन्याच्या आकाश पावरा या कुपोषणग्रस्त बाळाला उपचारा करीता जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान दिनांक ३१ जुलै रोजी दुदैवी मृत्यु झाला होता , दरम्यान मृत्युच्या जवळपास २६ दिवसानंतर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . सचिन अहिरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस स्टेशन मध्ये सिआरपीसी कलम१७४प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस हेड काँस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे .दरम्यान कुपोषणामुळे आठ महीन्याच्या बालकाचा झालेला दुदैवी मृत्यु घटनेला जवळपास एक महीना होत असुन तरी देखील प्रशासना कडुन निवळ कागदपत्रांची देवाण घेवाणच्या पलीकडे वरिष्ठ पातळीवर ठोस असे काहीही झाले नसल्याने कुपोषणग्रस्तांचे गंभीर प्रश्न हे राजकीय दबावाखाली दडपले जाणार तर नाही ना असे अनेक प्रश्न आदीवासी सामाजीक संघटनाच्या माध्यामातुन उपस्थित करण्यात येत आहे .

सर्वांना सोबत घेऊन पहुर परिसरातील गुन्हेगारी नष्ट करणार कार्यतत्पर पोलीस निरीक्षक – अरुण धनवडे

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी काल आपल्या पदभार स्वीकारला असुन यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी व सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना पहुर पोलीस ठाण्याचे हद्दीत कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य व गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची मदत घेणार असून त्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकार व सामान्य नागरिक यांचे सहकार्य लाभणार आहे, सर्व सामन्य नागरिक , महिलांवर होणारे अन्याय,तसेच गुन्हेगारीवर पुर्णतः नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना संसर्गाच्या काळात केलेली कार्यवाही जिल्ह्यात लक्ष्णीय ठरली होती .

आत्महत्या करणारे बहुतांश लोकांना वाचविणारे श्री. चेतन कदम व विवेक सावंत यांचा धाडसी कार्यसाठी वरिष्ठांन कडुन सत्कार करण्यात आले

0

 

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

दि.०७/०८/२०२१ रोजी संध्याकाळी राजीव गांधी सागरी सेतूवर एक इसम आपल्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्यास आला होता, ही बातमी कंपनीतील स्टाफला समजताच कामावर रुजू असणारे कर्मचारी श्री. चेतन कदम आणि कु. विवेक सावंत यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन त्या इसमास वाचवण्यास यशस्वी ठरले. ही बाब कंपनीतील वरिष्ठांना समजली असता त्यांनी आज दोघांचाही सत्कार केला. या वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.उत्तम पवार साहेब, श्री. सुबोध गरुड साहेब ,श्री.सुनिल पवार साहेब आणि श्री. महेंद्र गोळे साहेब तसेच कंपनीतील सहकारी मित्र वर्ग यांच्या उपस्थित हा सत्कार करण्यात आला. श्री.चेतन कदम यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशीच घटना २०१६ मध्ये सुद्धा घडली होती, माझी कामगिरी बजावली व त्या व्यक्तीस वाचविण्यास यश आले होते. त्या कार्ये साठी सुद्धा दिनांक १५/०८/२०१९ रोजी वरळी येथील जेष्ठ नागरिक लोकांनी देखील माझं सत्कार करुन व धनादेश देऊन गौरवण्यात आले होते. ह्या धाडसी कामाची दखल प्रसार माध्यमातून सुद्धा प्रसारित झाली होती.

असे बहादूर व धाडसी कार्याला महाराष्ट्र राज्य तर्फे पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानिता करण्यात आले पाहिजे. असे मत लोकांनी बातमी द्वारे व्यक्त केले.

भाजपा किसान मोर्चाचे सेलू तहसीलदारांना निवेदन

0

 

किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा दोन हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी त्रुटी निर्माण झाले असून या त्रुटीमुळे सेलू तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा लाभ मिळण्यासाठी सेलू तहसीलच्या चकरा माराव्या लागत आहे अनेक वेळा चकरा मारून अनेक वेळा त्रुटींची पूर्तता करून देखील सदरील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी च्या लाभ मिळालेला नाही त्यामुळे भाजपा किसान सेलू तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे सदरील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे सेलू तालुक्यातील बहुतांशी लाभधारक शेतकरी किसान सन्मान निधी च्या लाभापासून वंचित राहिले आहे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी सेलू तहसील मध्ये कागदपत्रांची पूर्तता करून देखील सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आज पर्यंत एक हप्ता मिळालेला नाही वेळोवेळी शेतकरी सेलू तहसील मध्ये चकरा मारतात तहसील मधून शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी पाठवले जाते तहसील कार्यालय आणि कृषी विभाग यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्याचा गोरगरीब शेतकऱ्यांना फटका बसत आहे त्यामुळे किसान सन्मान निधी च्या अनुदानाचा लाभ तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी भाजपा किसान मोर्चा सेलू च्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये चकरा मारत असलेल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा लाभ मिळण्यासाठी सेलू तहसील दार यांनी तात्काळ लक्ष घालून सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रश्न तात्काळ सोडवावा आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर किसान सन्मान निधी चे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावी अशी मागणी आज गुरुवार रोजी दिनांक 26 8 दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली आहे वरील मागणीचे लेखी निवेदन तहसीलदारांना भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अभिजीत रोडगे गोविंद मगर गिरगाव चे सरपंच अंकुश काटे नारायण दुबे भाजपा तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड रामा शेवाळे तुकाराम धनवटे भागवत दळवे तिच्या कर ना कपिल फुलारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे

स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात अंत्यविधीची तयारी

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधि

कनारखेड: कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुरुवारी एका वृद्धचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करायचे कोठे करायचे म्हनत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत इमारत परिसरात तयारी केल्याने खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. गुरुवारी गावातील चंद्रभागाबाई मारुती वाकोडे या महिलेचा रात्री मृत्यू झाला. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ई क्लास किंवा शासनाची कुठलीही जमीन नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी बुलढाणा, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली आहे. गायगाव बु, गायगाव खुर्द, कनारखेड अशा तीन गावांची गट ग्रामपंचायत आहे. गायगाव गट ग्रामपंचायत ने सुद्धा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरता ठराव घेतला आहे. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या करमणूक केंद्र परिसरात लाकडे आणून अंत्यविधीसाठी तयारी सुरू केली.
बैलगाडीत लाकडे आणून करमणूक केंद्राचे परिसरात ग्रामस्थ ठाण मांडून बसले आहेत.
कनारखेड गावातील लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. शासनाचा वारंवार गावकऱ्यांनी पाठपुरावा करूनही आज पर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.
त्यामुळे कणारखेड येथील रहिवाशांनी गावातील गट ग्रामपंचायत चे इमारत परिसरातील कार्यरत असलेले करमणुक केंद्र परिसरात परिसरात येऊन व अंतिम संस्कार च्या लाकडं आणून आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ग्रामपंचायत परिसरामध्ये आम्ही अंतिम संस्कार करू यासाठी ठाण मांडून येथील नागरिक शासनाविरोधात रोष व्यक्त करत होते.

किनगाव गावात रात्री एका तरुणाची आपल्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्मह्त्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील राहणाऱ्या एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीसात अवसमात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातीत किनगाव गावात दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ , १५ वाजेच्या सुमारास दगडु यादव धनगर या २६ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरातील मागच्या खोलीत रात्री २ वाजताच्या सुमारास झोपला असता घरातीत सुतळी पटयाने घराच्या छताला असलेल्या लाकडी दांडयाला बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेची खबर सचिन रामकृष्ण धनगर वय३६ वर्ष राहणार किनगाव यांने दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . तरूण दगड्ड धनगर याने आत्महत्या केली याचा स्पष्ठ कारण कळाले नसले तरी काही दिवसांपासुन त्याचे मानसीक संतुलन बिघड्ल्याचे कळाले असुन यातच त्याने आत्महत्या केली असावी असा कयास आहें.
.